________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १३१.
evere
न दोषाय भवत्यत्र लोकास्याददूषणं स्मृतम् ॥ ३७ ॥
अर्थ -- कर्माला जो योग्य काल वर सांगितला, त्यापेक्षां दोन घटिकाच जर अधिक झाल्या तर त्यांत दोष नाहीं. परंतु लोकांच्या मुखानें तसें कर्म करणाऱ्याची निंदा होते. ह्मणून तसें करूं नये.
उत्तमा तारकोपेता मध्यमा लुप्ततारका ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अधमा सूर्यसंयुक्ता प्रातः सन्ध्या त्रिधा स्मृता ॥ ३८ ॥
अर्थ- जी प्रातःसंध्या पहाटेस नक्षत्रे दिसत असतां होते ती उत्तम समजावी. जी नक्षत्रे दिसेनाशीं झालीं असतां केली जाते ती मध्यम, आणि सूर्योदयानंतर जी केली जाते ती अधम समजावी. ह्याप्रमाणें । प्रातःसंध्येचे तीन प्रकार आहेत.
अहो रात्रेश्च यः सन्धिः सूर्यनक्षत्रवर्जितः ॥
सा तु सन्ध्या समाख्याता मुनिभिस्तत्त्वदर्शिभिः ॥ ३९ ॥
अर्थ- सूर्योदय होण्याच्या पूर्वी आणि नक्षत्रें दिसेनाशी झाल्यावर जो दिवस आणि रात्र ह्यांच्या जोडणीचा काल त्यास संध्या ह्मणावें. असें तत्वज्ञानी मुनींनीं सांगितलें आहे.
सन्ध्योत्तमा तृतीयांशे पञ्चमांशे दिनस्य तु ॥
मध्याह्निकी तदूर्ध्वं वा पूर्वेव स्याद्विधौ हि सा ॥ १४० ॥
For Private And Personal Use Only