________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३७१.
NNNNNNNNNNrerer
अग्निं सन्धुक्षयेच्चुल्ल्यां प्रक्षाल्य स्थालिकास्ततः ॥ स्वयं पाकविधिः कार्यो नानारससमन्वितः ॥ २९ ॥ घृतप पयःपाकं सूपोदनं सशर्करम् ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
आपूपव्यञ्जनान्येव भाग्यस्येद्धं फलं विदुः ॥ ३० ॥
अर्थ - नंतर चुलींत कांहीं जीवजंतु वगैरे आहेत किंवा काय हें नीट पाहून, ज्यांत जीवजंतु नाहींत असे वाळलेले सर्पण आणून तींत घालावें. मग अग्नि पेटवून व स्वयंपाकाची भांडीं धुवून घेऊन, अनेक रसांनी युक्त असा पाक स्त्रीने स्वतः करावा. त्यांत आपल्याला जसें वैभव असेल, त्या मानानें तुपांत तळलेले पदार्थ, दुधांत शिजविलेले पदार्थ, वरण, भात, साखरेनें युक्त असे पदार्थ, अनरसे वगैरे पदार्थ, तिखट, लोणचीं वगैरे पदार्थ करावेत. असें पुष्कळ करणें हें भाग्याचें फल आहे.
स्त्रियांचा भोजनकाल.
आदौ सन्तर्प्य सत्पात्रं भर्तारं च सुतादिकम् ॥
गृहदेवश्च सन्तर्प्य ततः स्याद्भोजनं स्त्रियः ॥ ३१ ॥
अर्थ - पाक सिद्ध झाल्यावर प्रथम सत्पात्राला अन्नदान करून, नंतर पति, पुत्र वगैरेंना भोजन घालून, | गृहदेवतांना बलिदान करून नंतर स्त्रियांनीं भोजन करावें.
For Private And Personal Use Only