________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
AVAVAVAN
' सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय तेरावा. पान ७१०. गेली असल्यास त्या नदीच्या दोनी तीरांवरील दोन निरनिराळे देश समजावेत. मधून एखादा पर्वत गेला असल्यास त्या पर्वताच्या दोहोंकडील बाजूंच्या देशांना देशांतर (निराळे देश) समजावे, आणि भाषाभेद असला मणजे त्याला देशांतर समजावें. किंवा तीस योजनाच्या पलीकडच्या देशाला देशांतर समजावें. पूर्वी जे अशौचाचे प्रकार सांगितले आहेत ते जवळच्या भाऊबंदाला देशांतरी देखील प्राप्त होतात असें मुनींनी सांगितले आहे.
देशांतरी असलेल्या पुत्राला देशांतरी मृत झालेल्या मातापितराचे आशीच. पितरौ चेन्मृतौ स्यातां दूरस्थोऽपि हि पुत्रकः ।।
श्रुत्वा तद्दिनमारभ्य पुत्राणां दशरात्रकम् ॥ ७१ ॥ ___ अर्थ- आतां पुत्राविषयी विषेश सांगतात. दूरदेशी असलेल्या पुत्राचे आई किंवा बाप हे मेले असतां ज्या दिवशी ते मेल्याचे समजेल त्या दिवसापासून पुढे दहा दिवस त्याने आशौच धरावे.
पत्नी व पति ह्यांच्याविषयी विशेष. पत्न्या अपि तथाऽशौचं भवेदेव विनिश्चितम् ॥ पत्न्याशौचं भवेद्भरित्यवं मुनिरब्रवीत् ।। ७२ ॥ दूरस्था निधनं भर्तुर्दशाहात् श्रूयते बहिः॥
MPANaMUVNMKeBARMY
For Private And Personal Use Only