________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuni Cyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३५१.
ह्मणजे पंक्तीचा दोष नाही.
भोजनकाली एकमेकास स्पर्श झाला असता. एकपंक्त्युपविष्टानामन्योऽन्यं स्पृश्यते यदि ॥
भुक्त्वा चान्नं विशङ्कः सन्नष्टोत्तरशतं जपेत् ॥ २२२ ॥ १ अर्थ- एका पंक्तीत बसलेल्या लोकांचा जर एकमेकाला स्पर्श झाला तर वाढलेले अन्न निःशंकपणे ९ भक्षण करावें. आणि भोजन झाल्यावर एकशेहे आठ वेळा जप करावा.
मित्रादिकाकरितां अन्नत्याग. पूर्व किञ्चित्समुध्दृत्य स्थाल्या अन्नादिकं परम् ॥
मित्राद्यर्थ स्वयं शेषमश्नीयादित्ययं क्रमः ।। २२३ ॥ __ अर्थ- आपण भोजनाकरितां पानावर अन्न वाढून घेण्याच्या पूर्वी आपल्या मित्राकरितां वगैरे अशा बुद्धीने योडेसें अन्न काढून ठेवावे. आणि राहिलेले अन्न घेऊन भोजनास बसावें. असा क्रम शास्त्रांत सांगितला आहे."
भोजनपात्र रिक्त न ठेवणे. भुक्त्वा पीत्वा तु तत्पात्रं रिक्तं त्यजति यो नरः॥ स नरः क्षुत्पिपासातों भवेज्जन्मनि जन्मनि ॥२२४ ।।
For Private And Personal Use Only