Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३७४ दाने तपसि सत्ये च यस्य नोच्चरितं यशः ।
विद्यायामर्थलाभे वा मातुरुच्चार एव सः ॥ ५।१३३।२४ दान, तप, सत्यभाषण, विद्या किंवा संपत्ति यांपैकी कोणत्याहि बाबतींत ज्याची कीर्ति कोणी गात नाहीं तो आपल्या मातेचा केवळ मलोत्सर्ग होय. ( म्हणजे त्याच्या जन्माच्या रूपाने त्याच्या आईने केवळ आपल्या पोटांतील घाण बाहेर टाकली.) ३७५ दान्तस्य किमरण्येन तथाऽदान्तस्य भारत ।
यत्रैव निवसेदान्तस्तदरण्यं स चाश्रमः ।।१२।१६०३६ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) इंद्रिये स्वाधीन असल्यावर अरण्यांत जाण्याची गरज काय ? व नसल्यावर जाऊन उपयोग काय ? जितेंद्रिय पुरुष ज्या ठिकाणी वास्तव्य करील तेच त्याचे अरण्य व तोच त्याचा आश्रम. ३७६ दुरन्वयं दुष्पवर्ष दुरापं दुरतिक्रमम् ।
सर्वं वै तपसाभ्येति तपो हि बलवत्तरम् ॥ १३॥१२२।८ दुस्तर, अजिंक्य, प्राप्त होण्यास कठीण, अनुल्लंघनीय असे सर्व काही तपाच्या योगाने साध्य होतें. खरोखर तप हे अत्यंत सामर्थ्यवान् आहे. ३७७ दूताः किमपराध्यन्ते यथोक्तस्यानुभाषिणः।। ५।१६।३९
सांगितलेला निरोप कळविणाऱ्या दूतांचा तसे करण्यांत काय बरें अपराध आहे ? ३७८ देशकालो समासाद्य विक्रमेत विचक्षणः ।
देशकालव्यतीतो हि विक्रमोनिष्फलोभवेत्॥१२॥१४०१२८ देशकालांची अनुकूलता पाहून शहाण्याने पराक्रम गाजवावा. कारण योग्य देश आणि योग्य काल निघून गेल्यावर केलेला पराक्रम निष्फल होतो. ३७९ दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ॥ ६॥४०५
दैवी संपत्ति मोक्षाला, व आसुरी संपत्ति बंधनाला, कारणीभूत होते. ३८० दौष्कुलेयाश्च लुब्धाश्च नृशंसा निरपत्रपाः।
ते त्वां तात निषेवेयुयोवदाकपाणयः ॥ १२॥८३७ [ भीष्म सांगतात ] बा युधिष्टिरा, हलक्या कुळांत जन्मलेले, लोभी, दुष्ट, निर्लज असे जे लोक आहेत, ते त्यांचा हात ओला होत आहे (अर्थात् त्यांना द्रव्यादिक पोचत आहे ) तोपर्यंतच तुझी सेवा करतील.
For Private And Personal Use Only