Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१००
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
६२३ प्राप्तं च प्रहरेत्काले न च संवर्तते पुनः ।
हन्तुकामस्य देवेन्द्र पुरुषस्य रिपून्प्रति ।। १२ । १०३।२० यो हि कालो व्यतिक्रामेत्पुरुषं कालकाङ्क्षिणम् । दुर्लभः स पुनस्तेन कालः कर्मचिकीर्षुणा || १२|१०३।२१
।
( बृहस्पति इंद्राला म्हणतात ) देवेंद्रा, शत्रूला मारण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषानें योग्य संधि आली असतां प्रहार केला पाहिजे. गेलेली वेळ फिरून येत नसतेः कार्य साधण्याच्या इच्छेनें योग्य काळाची वाट पाहणाऱ्या पुरुषाने आलेली संधि गमावली तर ती त्याला फिरून मिळणे कठीण.
६२४ प्रायेण नीचा व्यसनेषु मन्ना
निन्दन्ति देवं कुकृतं न तु स्वम् ||८|२१|१
नीच लोक संकटांत सांपडले म्हणजे बहुतकरून देवाला दोष लावतात; ते आपल्या दुष्कर्माला बोल लावीत नाहींत !
६२५ प्रायेण श्रीमतां लोके भोक्तुं शक्तिर्न विद्यते ।
जीर्यन्त्यपि हि काष्ठानि दरिद्राणां च सर्वशः || १२|२८|२९
बहुतकरून श्रीमंत लोकांना जेवण्याची शक्तिच नसते. आणि दरिद्री मनुष्यांना लाकडेंसुद्धां सर्व पचून जातात.
६२६ प्रार्थना विषम् || ३|३१३।८६
याचना है विषच होय.
६२७ प्रीयते हि हरन्पापः परवित्तमराजके |
यदास्य उद्धरन्त्यन्ये तदा राजानमिच्छति । १२/६७|१३
दुसऱ्याचें द्रव्य हरण करणाऱ्या पापी मनुष्याला देशांत राजा नसलेला बरा वाटतो; पण जेव्हां त्याचें द्रव्य दुसरे लोक नेऊ लागतात, तेव्हां त्याला राजा असावा, असें वाटू लागतें.
For Private And Personal Use Only