Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीरामायण सुभाषितानि
३७७ यदन्नः पुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः || २|१०३।३० ( राम म्हणतो. ) जें अन्न पुरुष भक्षण करीत असेल तेंच अन्न त्यानें आपल्या देवतांना द्यांवें.
७९
३७८ यदाचरति कल्याणि शुभं वा यदि वाशुभम् ।
तदेव लभते भद्रे कर्ता कर्मजमात्मनः || २/६३/६
( दशरथ कौसल्येला म्हणतो. ) हे कल्याणि मनुष्य शुभ अथवा अशुभ जें कांहीं कर्म करितो, त्याचें फल त्या कर्त्या पुरुषाला कर्माप्रमाणें प्राप्त होतेंच.
३७९ यदा विनाशो भूतानां दृश्यते कालचोदितः ।
तदा कार्ये प्रमाद्यन्ति नराः कालवशं गताः || ३|५६।१६ जेव्हां कालाच्या प्रेरणेप्रमाणें प्राण्यांचा नाश होण्याचा समय दिसत असतो, तेव्हां कालाच्या अधीन झालेल्या लोकांची बुद्धि कर्तव्या संबंधानें विपरीत होत असते.
३८० यदि त्वं प्रस्थितो दुर्गं वनमद्यैव राघव ।
अग्रतस्ते गमिष्यामि मृगन्ती कुशकण्टकान् ॥ २।२७/७ ( सीता म्हणते. ) हे राघवा, आपण जर आजच दुर्गम वनवासाला निघालां, तर तुमच्यापुढें मीहि दर्भ व कांटे तुडवीत तुडवीत जाणार. ३८१ यदिन्द्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसौ सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नभः ॥४॥३९॥२ चन्द्रमा रजनीं कुर्यात्प्रभया सौम्य निर्मलाम् त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परंतप || ४|३९|३ ( राम सुग्रीवाला म्हणतो. ) इंद्रानें जर पर्जन्यवृष्टि केली किंवा हजारों किरणांनी युक्त असलेल्या सूर्यानें आकाश अंधकाररहित केलें, चंद्रानें आपल्या प्रभेच्या योगानें रात्र निर्मल करून टाकिली किंवा हे विनयसंपन्न शत्रुतापना, तुझ्यासारख्यानें मित्रांवर प्रेम केलें, तर कांहीं आश्चर्य म्हणतां येणार नाहीं.
For Private And Personal Use Only