Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४४६ संयोगेच वियोगेच महान्तोहि महाशयाः॥६।११।११
पुत्र, मित्र इत्यादिकांचा समागम किंवा वियोग झाला असतां महात्मे पुरुष मेरुपर्वताप्रमाणे स्थिर असतात. ४४७ संशान्ताहंकृतेर्जन्तोर्मोगा रोगा महामते ।
न स्वदन्ते सुतृप्तस्य यथा प्रतिविषा रसाः॥४॥३३॥६८ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात. ) भोजन करून अत्यंत तृप्त झालेल्या मनुष्याला उत्तमोत्तम पक्वान्नेही विषाप्रमाणे वाटतात; त्याप्रमाणे अहंकार नाहीसा होऊन आत्मज्ञानाने तृप्त झालेल्या मनुष्याला विषयोपभोग रोगांप्रमाणे वाटतात. . ४४८ संशान्ते चित्तवेताले यामानन्दकलां तनुः ।
याति तामपि राज्येन जागतेन न गच्छति ॥४।१५।२० चित्तरूपी वेताळ शांत झाला असतां, शरीराला प्राप्त होणाऱ्या सुखाच्या एका कलेची म्हणजे सोळाव्या हिश्शाची बरोबरी सर्व जगताचे राज्य मिळाल्याने होणा-या आनंदालाही करता येणार नाही. ४४९ संसार एव दुःखानां सीमान्त इति कथ्यते ।
तन्मध्यपतिते देहे सुखमासाद्यते कथम् ॥ ५।९।५२ संसार म्हणजे दुःखाची पराकाष्ठा असें सत्पुरुष सांगतात. तेव्हां अशा संसारांत पडलेल्या देहामध्ये सुखप्राप्ति कोठून होणार ? ४५० संसारविषवृक्षोऽयमेकमास्पदमापदाम् ।
अज्ञं संमोहयेन्नित्यं मौख्यं यत्नेन नाशयेत् ॥२।११।६ संसार हा एक विषवृक्ष असून त्याच्यापासून सर्व त-हेच्या आपत्ति उत्पन्न होतात. अज्ञमनुष्याला हा संसार मोह उत्पन्न करतो, यासाठी प्रयत्न करून अज्ञानाचा नाश केला पाहिजे.
For Private And Personal Use Only