Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
।। कोबातीर्थमंडन श्री महावीरस्वामिने नमः ।।
।। अनंतलब्धिनिधान श्री गौतमस्वामिने नमः ।।
।। गणधर भगवंत श्री सुधर्मास्वामिने नमः ।।
।। योगनिष्ठ आचार्य श्रीमद् बुद्धिसागरसूरीश्वरेभ्यो नमः ।।
। चारित्रचूडामणि आचार्य श्रीमद् कैलाससागरसूरीश्वरेभ्यो नमः ।।
आचार्य श्री कैलाससागरसूरिज्ञानमंदिर
पुनितप्रेरणा व आशीर्वाद राष्ट्रसंत श्रुतोद्धारक आचार्यदेव श्रीमत् पद्मसागरसूरीश्वरजी म. सा.
जैन मुद्रित ग्रंथ स्केनिंग प्रकल्प
ग्रंथांक :१
जैन
आराधन
श्री महावी
केन्द्र को
कोबा.
॥
अमतं
तु विद्या
श्री महावीर जैन आराधना केन्द्र
शहर शाखा
आचार्यश्री कैलाससागरसूरि ज्ञानमंदिर कोबा, गांधीनगर-श्री महावीर जैन आराधना केन्द्र आचार्यश्री कैलाससागरसूरि ज्ञानमंदिर कोबा, गांधीनगर-३८२००७ (गुजरात) (079) 23276252, 23276204 फेक्स : 23276249 Websiet : www.kobatirth.org Email : Kendra@kobatirth.org
आचार्यश्री कैलाससागरसूरि ज्ञानमंदिर शहर शाखा आचार्यश्री कैलाससागरसूरि ज्ञानमंदिर त्रण बंगला, टोलकनगर परिवार डाइनिंग हॉल की गली में पालडी, अहमदाबाद - ३८०००७ (079)26582355
-
-
-
For Private And Personal Use Only
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्यसभाषितानि
For Private And Personal Use Only
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
For Private And Personal Use Only
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
HINDISEASONSENSEXSixSEXSEISE
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि संपादक-विष्णु विनायक परांजपे, पेण भाषांतरकार-चिंतामण मोरेश्वर परांजपे,
बी. ए., एलएल. बी. (१०३२ सुभाषितें, किंमत १२ आणे)
सार्थश्रीरामायणसुभाषितानि भाषांतरकार-भालचंद्र शंकरशास्त्री देवस्थळी
(९०२ सुभाषितें, किंमत ८ आणे)
HESISEASKASHISHASHREAKISTASEASEKISAHARSHISHASSAGE
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि भाषांतरकार-विष्णु विनायक परांजपे ( ५०८ सुभाषितें, किंमत ८ आणे )
RSHISHIKEKRSHISSISAKESESSISESSISHSAANI
सार्थश्रीभागवतसुभाषितानि भाषांतरकार-विष्णु विनायक परांजपे (११७ सुभाषितें, किंमत ३ आणे )
सार्थश्रीरामरक्षा ( किंमत १ आणा)
Hased
For Private And Personal Use Only
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
साधेश्रामहाभारतसुभाषितानि
-
संपादक विष्णु विनायक परांजपे, पेण
भाषांतरकार चिंतामण मोरेश्वर परांजपे,
बी. ए., एल्एल्. बी.
प्रकाशक
केशव भिकाजी ढवळे, गिरगांव-मुंबई
आवृत्ति दुसरी
आषाढ शके १८५२ सन १९३०
किंमत १२ आणे
For Private And Personal Use Only
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
( सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन )
मुद्रक:- रा. रा. रघुनाथ रामचंद्र बखले, मुंबईवैभव प्रेस, सव्र्हेंटस् ऑफ इंडिया सोसायटी, गिरगांव, मुंबई.
प्रकाशक -- केशव भिकाजी ढवळे, ( रामचंद्र बिल्डिंग ) गिरगांव, मुंबई.
For Private And Personal Use Only
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
प्रस्तावना
लोकांचं अज्ञान नाहींसें होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षीनीं महाभारत ग्रंथ निर्माण केला. यामध्यें चतुर्विध पुरुषार्थांचें प्रतिपादन पूर्णपणें केलें असून आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना कर्तव्याचा मार्ग स्पष्टपणे दाखविला आहे, त्याप्रमाणेंच या ग्रंथामध्यें आर्यसंस्कृतिही सांठविली आहे. एक लक्ष लोकांचा एवढा मोठा विस्तृत ग्रंथ संस्कृत भाषेवांचून इतर कोणत्याही भाषेंत नाहीं. महाभारताची भाषा समजण्याळा सोपी असून संस्कृत भाषेचें उत्तम जिवंत स्वरूप या ग्रंथामध्ये चांगल्या प्रकारचें आढळतें.
या महाभारतांतील, सर्व लोकांना उपयोगी पडणारी, सुबोध, निवडक १०३२ संस्कृत सुभाषित वचनें प्रस्तुत पुस्तकांत घेतलीं आहेत. हीं ओजस्वी वचनें विद्यार्थ्यांनी तोंडपाठ केल्यास त्यांचें संस्कृत भाषेचें ज्ञान वाढून त्यांना चांगले स्फूर्तिदायक विचार समजतील आणि पुढील आयुष्यांत व्यवहारांतील अनेक प्रसंगी योग्य रीतीनें वागण्यास ते समर्थ होतील. श्रोत्यांच्या मनावर महाभारतांतील वचनांचा ठसा अधिक उमटतो यासाठीं प्रतिपादनाचे वेळी हरिदास, पुराणिक यांना या सिद्धान्तरूप वचनांचा विशेष उपयोग होईल. वक्ते व लेखक यांनाही हीं मार्मिक वचनें
For Private And Personal Use Only
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
(६) वरीच उपयोगी पडतील. तसेंच संस्कृत भाषेची अभिरुचि असणाऱ्या सामान्य वाचकांनाही या वचनांचा उपयोग होईल. ___ या पुस्तकांतील वचने महाभारताच्या मुंबईप्रतीतून घेतली आहेत. वचनें वर्णक्रमाने दिली असून शेवटीं मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. वचनांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांतील डावीकडून पहिला अंक पर्वाचा, दुसरा अध्यायाचा व तिसरा श्लोकाचा समजावा. ज्या वचनांत जो विषय आला, त्या वचनाचा क्रमांक त्या विषयापुढे मूचीमध्ये घातला आहे. सूचीमध्ये एकाच अर्थी आलेले अनेक शब्द त्या त्या ठिकाणी दिले असून पर्याय शब्द कंसांत घातले आहेत.
श्रीमहाभारतातील ओजस्वी वचनांचा परिचय सर्वांना सुलभतेने होण्याला हे पुस्तक उपयोगी पडो, अशी भगवान् श्रीकृष्णपरमात्म्याजवळ प्रार्थना करून प्रस्तावना संपवितो.
भीष्माष्टमी, शके १८५० र विष्णु विनायक परांजपे
S राहणार पेण, जिल्हा कुलाबा
For Private And Personal Use Only
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
निवेदन
श्रीमहाभारत, श्रीरामायण, श्रीयोगवासिष्ठ व श्रीभागवत या राष्ट्रीय व धार्मिक ग्रंथांतील निवडक सुभाषितांची मराठी भाषांतरासह चार पुस्तकें प्रकाशित केलीं. हीं पुस्तकें सर्व लोकांना मान्य झाल्यामुळे पहिली आवृत्ति एका वर्षांतच खपून गेली. आतां ही दुसरी आवृत्ति काढिली आहे.
वचन कोणी कोणाला सांगितलें, हें समजण्याची विशेष अवश्यकता ज्या श्लोकांत दिसून येते, अशा लोकांचा अर्थ देतांना आरंभी कंसांत अवतरण दिलें आहे. अशा अवतरणांची संख्या या आवृत्तीत वाढविली आहे.
धार्मिक शिक्षण देण्याच्या कामीं हीं चारहि सुभाषितांचीं पुस्तकें बरींच उपयोगी पडतात, असें पुष्कळ पालकांच्या व शिक्षकांच्या प्रत्ययास आले आहे. तरी सर्व जनतेला या पुस्तकांचा उपयोग होवो, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे.
आषाढ, शके १८५२
For Private And Personal Use Only
प्रकाशक
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
श्रीमहाभारतांतील १८ पर्वांची नांवें
१ आदिपर्व २ सभापर्व ३ वनपर्व ४ विराटपर्व ५ उद्योगपर्व ६ भीष्मपर्व ७ द्रोणपर्व ८ कर्णपर्व ९ शल्यपर्व
१० सौप्तिकपर्व ११ स्त्रीपर्व १२ शान्तिपर्व १३ अनुशासनपर्व १४ अश्वमेधपर्व १५ आश्रमवासिकपर्व १६ मौसलपर्व १७ महाप्रास्थानिकपर्व १८ स्वर्गारोहणपर्व
For Private And Personal Use Only
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Hollstha
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । देवी सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥
१ अकाले कृत्यमारब्धं कतार्थाय कल्पते । प. अ. श्लो.
तदेव काल आरब्धं महतेऽर्थाय कल्पते ॥१२॥१३८।९५ कोणतेंहि कार्य भलत्याच वेळी आरंभिलें असतां त्यापासून कर्त्यांचे मनोगत सिद्ध होत नाही. तेंच योग्य वेळी केले तर तेणेकरून मोठा लाभ होतो. २ अकृत्वा कर्म यो लोके फलं विन्दति धिष्ठितः ।
स तु वक्तव्यतां याति द्वेष्यो भवति भूयशः ॥१०।२।१७ काही परिश्रम न करता अधिकारारूढ आहे एवढ्यामुळेच अधिक लाभ घेतो, त्याची जगांत बहुत निंदा होते आणि तो दुसऱ्यांच्या द्वेषाला पात्र होतो. ३ अकृत्वा मानुषं कर्म यो दैवमनुवर्तते ।
वृथा श्राम्यति संप्राप्य पर्ति क्लीबमिवाङ्गन्ना ॥१३।६।२० कोणत्याही कार्यासाठी लोकप्रसिद्ध योग्य उपाय न करतां जो केवळ दैविक उपायांचाच अवलंब करितो त्याला, पौरुषहीन पतीशीं गांठ पडलेल्या स्त्रीप्रमाणे, वृथा क्लेश मात्र होतात. तात्पर्य दोन्ही केली पाहिजेत.
म. भा. १
उपतता
For Private And Personal Use Only
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
www.
४ अगोप्तारश्च राजानो बलिषड्भागतस्कराः ।
समर्थाश्चाप्यदातारस्ते बै निरयगामिनः ॥१३।२३।८० प्रजेचे रक्षण न करता तिच्यापासून उत्पन्नाचा सहावा हिस्सा कर मात्र घेणारे राजे व सामर्थ्य असून दान न करणारे खचित नरकास जातात. ५ अग्निस्तेजो महल्लोके गूढस्तिष्ठति दारुषु ।
न चोपयुङ्क्ते तदारु यावन्नोद्दीप्यते परैः ॥ ५॥३७६० पृथ्वीवरील अग्निरूप प्रचंड तेज लाकडांचे ठिकाणी गुप्तरूपानें वसत असते, पण जोपर्यंत ते दुसऱ्यांनी [ घर्षणादिकांच्या योगानें ] चेतविलेले नसतें तोपर्यंत ते लाकूड त्याचा उपयोग करीत नाही. ( काही पुरुषांचे अंगीं लोकोत्तर शौर्यादिगुण असतात पण जोपर्यंत त्यांस दुसऱ्यांकडून अत्यंत त्रास पोंचला नाही किंवा प्रोत्साहन मिळाले नाही तोपर्यंत ते व्यक्त होत नाहीत.) । ६ अग्नी प्रास्तं तु पुरुष कर्मान्वेति स्वयं कृतम् ।
तस्मात्तु पुरुषो यत्नाद्धर्म संचिनुयाच्छनैः ॥ ५।४०११८ [ मरणोत्तर ] अग्नीत टाकून दिलेल्या मनुष्याबरोबर त्याने केलेले [ बरे वाईट ] कर्म तेवढे येत असते. यासाठीच मनुष्याने हळूहळू पण यत्नपूर्वक धर्माचा ( पुण्याचा) संचय केला पाहिजे. ७ अग्न्याधानेन यज्ञेन काषायेण जटाजिनः।।
लोकान्विश्वासयित्वैव ततो लुम्पेद्यथा वृकः ॥ १।१४०।१९ अग्निहोत्र ठेवून, यज्ञ करून, भगवी वस्त्रे परिधान करून, जटा वाढवून, मृगाजिन पांघरून, आधी लोकांचा विश्वास संपादन करावा; आणि मग लांडग्याप्रमाणे झडप घालून त्यांचा नाश करावा. ८ अङ्कुशं शौचमित्याहुरथानामुपधारणे।
आनाम्य फलितां शाखां पकं पकं प्रशातयेत् ॥१११४०२० फळांनी भरलेली झाडाची खांदी [ आकडीनें ] वाकवून तिच्यावरील पिकलेली उत्तम फळे तोडून घ्यावी, त्याप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त करून घेण्याच्या कामी धर्माच्या बाह्य अवडंबराचा अंकुशासारखा उपयोग होतो.
For Private And Personal Use Only
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९ अचिन्त्याः खलु ये भावा न तांस्तर्केण साधयेत् ।
प्रकृतिभ्यः परं यत्तु तदचिन्त्यस्य लक्षणम् ॥ ६।५।१२ मनाला अचिंत्य असलेल्या अशा ज्या गोष्टी त्यांचा निर्णय केवळ युक्तिवादाने होणे शक्य नाही. प्रकृतीच्या--म्हणजे पंचमहाभुते, मन, बुद्धि व अहंकार या मूलतत्त्वांच्या पलीकडे असलेल्या वस्तूला (आत्मतत्त्वाला ) अचिंत्य असे म्हणतात. १० अज्ञश्वाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः॥६२८४० __ अज्ञ असून श्रद्धा न ठेवणारा असा संशयखोर मनुष्य सर्वथा नाश पावतो, अशा संशयात्म्याला ना इहलोक, ना परलोक, ना सुख. ११ अज्ञानतिमिरान्धस्य लोकस्य तु विचेष्टतः।
ज्ञानाञ्जनशलाकाभिर्नेत्रोन्मीलनकारकम् ॥ १।११८४ अज्ञानांधकाराने डोळ्यांवर झापड येऊन धडपडणाऱ्या लोकांच्या डोळ्यात ज्ञानरूपी अंजन घालून त्यांना दिव्य दृष्टि देणारें [ असें हैं महाभारत आहे. ]
१२ अज्ञानेनावृतो लोकः ।। ३।३१३१८२ लोक अज्ञानांत गुरफटलेले आहेत. १३ अञ्जलिः शपथः सान्त्वं शिरसा पादवन्दनम् ।
आशाकरणमित्येवं कर्तव्यं भूतिमिच्छता ॥ १११४०६७ हात जोडणे, शपथ घेणे, मधुर भाषण करणे, पायांवर डोके ठेवणे, लालूच दाखविणे या सर्व गोष्टी उत्कर्षेच्छु पुरुषाने केल्या पाहिजेत. १४ अतिक्रान्तं हि यत्कार्य पश्चाच्चिन्तयते नरः। । तचास्य न भवेत्कार्य चिन्तया च विनश्यति ॥८।३१२९
गोष्ट होऊन गेल्यानंतर तिच्याविषयों जो मागाहून चिंता करीत बसतो त्याचे तें कार्य तर होत नाहीच, पण चिंतेने नाश मात्र होतो.
For Private And Personal Use Only
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
20
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि १५ अति धर्माद्धलं मन्ये बलाद्धर्मः प्रवर्तते ।
बले प्रतिष्ठितो धर्मो धरण्यामिव जङ्गमम् १२।१३४।६ बल हे धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण, बलापासूनच धर्माची प्रवृत्ति होते. सर्व जंगम पदार्थ ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आधाराने राहतात, त्याप्रमाणे बलाच्या आधारानेच धर्म राहतो. १६ अतियोगमयोगं च श्रेयसोऽर्थी परित्यजेत् ॥१२॥२८७।२४
कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्याने [ आहारविहारादिकांचें ] अतिशय सेवन करणे व मुळीच सेवन न करणे या दोहोंचाहि सर्वथा त्याग करावा. १७ अतीतेष्वनपेक्षा ये प्राप्तेष्वर्थेषु निर्ममाः।।
शौचमेव परं तेषां येषां नोत्पद्यते स्पृहा ।।१३।१०८।१० द्रव्य नष्ट झाले असतां जे शोक करीत नाहीत, व प्राप्त झाले असता त्याच्या ठिकाणी जे आसक्त होत नाहीत, आणि ज्यांच्या अंतःकरणांत लोभ उत्पन्नच होत नाही ते अत्यंत शुचिभूर्तच होत. १८ अतो हास्यतरं लोके किंचिदन्यन्न विद्यते ।
यत्र दुर्जनमित्याह दुर्जनः सज्जनं स्वयम् ॥ १।७४।९५ स्वतः दुर्जन असलेल्याने उलट सन्जनालाच दुर्जन म्हणावें, यापेक्षा जगांत अधिक हास्यास्पद गोष्ट दुसरी कोणतीच नसेल ! १९ अथवा जायमानस्य यच्छीलमनुजायते ।
श्रूयते तन्महाराज नामृतस्यापसपेति ॥ ३।८११ ( व्यास महर्षि धृतराष्ट्र राजाला म्हणतात ) हे राजा, प्राणी जन्मतःच जो स्वभाव बरोबर घेऊन येतो, तो मरेपर्यंत त्याला सोडून जात नाही असें ऐकण्यांत येते. २० अथवा वसतो राजन्वने वन्येन जीवतः ।
द्रव्येषु यस्य ममता मृत्योरास्ये स वर्तते ॥ १२।१३।१० (सहदेव धर्मराजाला म्हणतो) हे राजा, वनांत राहून कंदमूळांवर उपजीविका करीत असतांनाहि ऐहिक वस्तूंविषयी ज्याला ममत्वबुद्धि वाटते, तो खरोखर मृत्यूच्या जबड्यांत पडला आहे असे समजावें.
For Private And Personal Use Only
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२१ अदत्तस्यानुपादानं दानमध्ययनं तपः ।
अहिंसा सत्यमक्रोध इज्या धर्मस्य लक्षणम् ॥१२॥३६।१० कोणी देईल तेवढ्याचाच स्वीकार करणें, दान, अध्ययन, तप, अहिंसा, सत्य भाषण, क्रोध नसणे आणि यज्ञ करणे ही धर्माची लक्षणे होत. २२ अद्रोहसमयं कृत्वा चिच्छेद नमुचेः शिरः।
शक्रः, साभिमता तस्य रिपौ वृत्तिः सनातनी ॥२।५५।१३ (दुर्योधन शकुनीला म्हणाला. ) — मी तुझ्याशी द्रोह करणार नाही' अशी प्रतिज्ञा करून इंद्राने नमुचि दैत्याचा शिरच्छेद केला. शत्रूशी वागण्याची ही त्याची रीति पूर्वापार चालत आलेली असून सर्वसंमत आहे. २३ अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा ।
अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते ॥ १२॥१२४१६६ कृतीने, मनाने व वाणीने कोणत्याहि प्राण्यास त्रास न देणे, परोपकार करणे आणि दान करणे या प्रकाराचे शील प्रशस्त होय.
२४ अद्रोहेणैव भूतानामल्पद्रोहेण वा पुनः। ___या वृत्तिःस परोधर्मस्तेन जीवामि जाजले ॥१२।२६२।६
( तुलाधार वैश्य जाजलि ब्राह्मणाला म्हणतो. ) हे जाजले, कोणत्याहि प्राण्यास मुळीच उपद्रव न देतां, अथवा [ प्रसंगच पडल्यास ] अगदी थोडी पीडा देऊन आपला निर्वाह करणे हा श्रेष्ठ प्रकारचा धर्म होय, त्याचेच अवलंबन करून मी रहात असतो. २५ अधनं दुर्बलं प्राहुर्धनेन बलवान्भवेत् ।
सर्वं धनवता प्राप्यं सर्वं तरति कोशवान् ॥१२॥१३०।४९ निर्धनाला दुबळा समजतात, धनाने मनुष्य बलसंपन्न होतो. सर्व काही धनसंपन्न असलेल्याला प्राप्त करून घेता येते. द्रव्याचा खजिना ज्याच्यापाशी आहे तो सर्व [ आपत्ति ] तरून जातो.
For Private And Personal Use Only
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२६ अधनस्य मृतं श्रेयः ।। ६।९६६ निर्धन मनुष्याला मरण श्रेयस्कर ! २७ अधनाद्धि निवर्तन्ते ज्ञातयः सुहृदो द्विजाः । ___अपुष्पादफलाद्वक्षाद्यथा कृष्ण पतत्त्रिणः ।। ५।७।२०
ज्याप्रमाणे पक्षी पुष्परहित व फलरहित वृक्षाचा त्याग करतात त्याप्रमाणे दरिद्री मनुष्याचे नातलग व इष्टमित्र त्याला सोडून जातात.
२८ अधनेनार्थकामेन नार्थः शक्यो विधित्सितुम् । ____ अर्थैरा निबध्यन्ते गजरिव महागजाः ॥ १२८।२०
धनाची इच्छा करणाऱ्याला, आरंभी थोडेतरी धन जवळ असल्याशिवाय, धन मिळणे शक्य नाही, हत्ती पकडण्यास जशी हत्तीचीच योजना करावी लागते, तसें द्रव्यानेच द्रव्य मिळवावे लागते. २९ अधर्मः क्षत्रियस्यैष यच्छय्यामरणं भवेत् ॥ १२९७।२३ अंथरुणावर पडून मरणे हा क्षत्रियाचा धर्म नव्हे. ३० अधर्मरूपो धर्मों हि कश्चिदस्ति नराधिप ।
धर्मश्चाधर्मरूपोजस्ति तच्च ज्ञेयं विपश्चिता ॥ १२॥३३॥३२ ( व्यास महर्षि युधिष्ठिराला सांगतात.) हे राजा, केव्हां केव्हां धर्माला अधर्माचें रूप येतें, व अधर्माला धर्माचे स्वरूप येत असते. हे ससजून घेणे शहाण्या पुरुषाचें काम आहे. ३१ अधर्मो धर्मतां याति स्वामी चेद्धार्मिको भवेत् ।
स्वामिनो गुणदोषाभ्यां भृत्याः स्युर्नात्र संशयः॥११।८।३३ मालक जर धर्मनिष्ठ असला व सेवक अधार्मिक असला तरीसुद्धां धार्मिक बनतो. धन्याच्या आंगच्या गुणदोषांप्रमाणे चाकरांच्या ठिकाणी गुणदोष उत्पन्न होतात यांत संशय नाही. ३२ अध्रुवा सर्वमयेषु श्रीरुपालक्ष्यते भृशम् ॥ ९६५/२० सर्व मनुष्यांचे ऐश्वर्य पूर्ण अशाश्वत आहे असे दिसून येते.
For Private And Personal Use Only
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३३ अनन्तं बत मे वित्तं यस्य मे नास्ति किंचन ।।
मिथिलायां प्रदीप्तायां न मे दह्यति किंचन ॥ १२॥१७/१९ ( जनकराजा म्हणतो. ) खरोखर माझें ऐश्वर्य अनंत ( अविनाशि ) आहे; कारण माझी कशावरहि ममता नाही. साऱ्या मिथिला नगरीला आग लागली तरी त्यांत माझें असें कांहीहि दग्ध व्हावयाचें नाहीं. ३४ अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। .
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ६॥३३२२२ [ भगवान् श्रीकृष्ण सांगतात ] जे लोक अनन्यनिष्ठेने माझें चिंतन करून मला भजतात, अशा नित्य माझी भक्ति करणाऱ्या लोकांचा योगक्षेम मी चालवीत असतो. ३५ अनहते यद्ददाति न ददाति यदहते ।
अनिर्हापरिज्ञानादानधर्मोऽपि दुष्करः ॥ १२।२०।९ दानाला पात्र कोण व अपात्र कोण हे न समजल्याने कोणी अपात्री दान करतो आणि सत्पात्री करीत नाही. तस्मात् दानरूप धर्म सुद्धा मोठा कठीण आहे. ३६ अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च यः।
द्वावेव सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति ॥१२॥१३७१ पुढे येणाऱ्या संकटाची आधी तरतूद करून ठेवणारा, व प्रसंग पडतांच ताबडतोब ज्याला युक्ति सुचते तो, अशा दोन प्रकारच्या मनुष्यांनाच सुखाचा लाभ होत असतो. दीर्घसूत्री सर्वथा नाश पावतो. ३७ अनायुष्यं दिवा स्वप्नं तथाभ्युदितशायिता॥१३॥१०४।१३९ दिवसा झोप घेणे आणि सूर्योदयाचेवेळी निजणे ही आयुष्याची हानि करणारी आहेत. ३८ अनारम्भात्तु कार्याणां नार्थः संपद्यते कचित् ॥१०।२।३४ केव्हांहि कार्याला आरंभ केल्याशिवाय कोणतीहि गोष्ट साध्य होत नसते. ३९ अनार्याचरितं तात परस्वस्पृहणं भृशम् ॥ २।५४।६ (धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणतो.) बाबा, परद्रव्याचा अभिलाष धरणे हे केव्हांहि आर्य मनुष्याचे ब्रीद नव्हे.
For Private And Personal Use Only
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४० अनाहूतः प्रविशति अपृष्टो बहु भाषते ।
अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः ॥ ५॥३३॥३६ मूर्ख मनुष्य कोणी न बोलावितांच प्रवेश करतो, विचारल्यावांचून बडबडत सुटतो, आणि विश्वासास पात्र नसलेल्यावर विश्वास ठेवतो. ४१ अनित्यं यौवनं रूपं जीवितं द्रव्यसंचयः।
आरोग्यं प्रियसंवासो गृध्येत्तत्र न पण्डितः॥१२॥३३०१४ तारुण्य, रूप, जीवित, द्रव्यसंचय, आरोग्य व प्रियजनांचा सहवास ही सर्व अशाश्वत आहेत. शहाण्या पुरुषाने त्यांचा लोभ धरूं नये. ४२ अनित्यचित्तः पुरुषस्तस्मिन्को जातु विश्वसेत् ।
तस्मात्प्रधानं यत्कार्यं प्रत्यक्षं तत्समाचरेत् ॥१२।८०९ मनुष्याचे मन फार चंचल आहे. त्याच्यावर कोण विश्वास ठेवील ? ( कोणाची बुद्धि केव्हां कशी पालटेल याचा काय नेम ? ) यासाठी, जे काम महत्त्वाचे असेल ते स्वतःच करावें. ४३ अनिर्वेदः श्रियो मूलं लाभस्य च शुभस्य च ॥५।३९।५९ लक्ष्मी, लाभाचे आणि कल्याणाचें मूळ सतत उद्योग करणे हे आहे. ४४ अनिदेन दीर्पण निश्चयेन ध्रुवेण च ।
देवदेवप्रसादाच्च क्षिप्रं फलमवाप्यते ॥१२॥१५३।११७ दीर्घोद्योगानें, दृडनिश्चयाने व ईश्वरी कृपेनें सत्वर कार्यसिद्धि होते. ४५ अनिष्टं सर्वभूतानां मरणं नाम भारत । __मृत्युकाले हि भूतानां सद्यो जायति वेपथुः॥१३॥११६।२७
( भीष्म धर्मराजाला सांगतात.) खरोखर कोणत्याहि प्राण्याला मरण नकोसे वाटते. मृत्युकाल जवळ आला की सर्वांना कापरे भरतें ! .
४६ अनीशश्वावमानी च स शीघ्रं भ्रश्यते श्रियः॥१०।२।२५ हातांत सत्ता नसतांना जो दुसऱ्याचा उपमर्द करतो तो ऐश्वर्यापासून लवकरच भ्रष्ट होतो.
For Private And Personal Use Only
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
॥ ७/१५८११९
दाखविणे हेच सत्पुरुषाचे
४९ अनय
४७ अनुकम्प्यो नरः पन्या पुष्टो रक्षित एव च ।
प्रपतेद्यशसोदीप्तात्स च लोकान्न चाप्नुयात्॥१४॥९०४७ बायकोच्या जिवावर पोसलेल्या व जगलेल्या पुरुषाची कीवच केली पाहिजे ! असा पुरुष उज्ज्वल कीर्तीपासून च्युत होतो, व स्वर्गलोकहि गमावून बसतो.
४८ अनुक्त्वा विक्रमेयस्तु तद्वै सत्पुरुषव्रतम् ॥ ७१५८।१९ न बोलतां पराक्रम करून दाखविणे हेच सत्पुरुषाचे व्रत होय. ४९ अनुग्रहं च मित्राणाममित्राणां च निग्रहम् । ___ संग्रहं च त्रिवर्गस्य श्रेय आहुर्मनीषिणः ॥ १२॥२८७१६ मित्रांवर उपकार करणे, शत्रूचा पाडाव करणे आणि ( धर्म, अर्थ व काम या) तीनहि पुरुषार्थांची प्राप्ति करून घेणे हे श्रेयस्कर आहे असे ज्ञाते लोक सांगतात.
५० अनृतं जीवितस्यार्थे वदन्न स्पृश्यतेऽनृतैः ॥ ७/१९०४७ जीव वाचविण्याकरितां असत्य भाषण करणाराला असत्य भाषण केल्याचा दोष लागत नाही. ५१ अन्त्येषु रेमिरे धीरा न ते मध्येषु रेमिरे ।
अन्त्यप्राप्तिं सुखामाहुदुःखमन्तरमन्त्ययोः॥१२॥१७४।३४ ज्ञाते लोक कोणती तरी एक तड पतकरतात, मधल्या स्थितीत आनंद मानीत नाहीत. कारण कोणती तरी शेवटची स्थिति ही सुखकारक आहे, आणि मधली स्थिति ही दुःखदायक आहे. ५२ अन्नपानानि जीयन्ते यत्र भक्षाश्च भक्षिताः।
तस्मिन्नेवोदरे गर्भः किं नान्नामिव जीयते ॥१२॥३३१।२४ अन्नपान व भक्षण केलेले इतर पदार्थ ज्या उदरांत जिरतात त्याच उदरांत असलेला गर्भ अन्नादिकांप्रमाणे कसा जिरून जात नाही ? ५३ अन्यत्र राजन्हिसाया वृत्तिर्नेहास्ति कस्यचित् ।।
अप्यरण्यसमुत्थस्य एकस्य चरतो मुनेः।। १२।१३०१२८ (भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे राजा, दुसऱ्याला मुळीच पीडा न देता जगांत कोणाचीही जीवितयात्रा चालू शकत नाही. मग तो अरण्यांत जन्मलेला व एकटाच राहणारा एकादा मुनि का असेना ?
For Private And Personal Use Only
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५४ अन्यथा चिन्तितो ह्यर्थः पुनर्भवति सोऽन्यथा । _अनित्यमतयो लोके नराः पुरुषसत्तम ॥ ५८०६
( नकुल श्रीकृष्णाला म्हणतो) हे पुरुषोत्तमा, मनुष्याने एका प्रकाराने केलेला बेत पुनः फिरलेला दिसतो. याचे कारण ] जगांत माणसांची बुद्धि नेहमीं पालटत असते. ५५ अन्यया यौवने मत्यों बुद्धया भवति मोहितः ।
मध्येऽन्यया जरायां तु सोऽन्यां रोचयते मतिम्॥१०॥३।११ मनुष्याला तरुणपणी एका विचाराची भुरळ पडते; प्रौढ वयांत दुसरीच एकादी गोष्ट बरी वाटते; व म्हातारपणी तिसराच एखादा विचार आवडू लागतो. ५६ अन्यान्परिवदन्साधुर्यथा हि परितप्यते ।
तथा परिवदन्नन्यांस्तुष्टो भवति दुजेनः ॥११७४।९२ दुसऱ्याची निंदा करण्यांत सज्जनाला जितका खेद वाटतो, तितकाच दुर्जनाला परनिंदा करण्यांत संतोष वाटतो. ५७ अन्यो धनं प्रेतगतस्य भुङ्के
वयांसि चाग्निश्च शरीरधातून् । द्वाभ्यामयं सह गच्छत्यमुत्र
पुण्येन पापेन च वेष्टयमानः ।। ५।४०१६ कुडी सोडून गेलेल्या जीवाचे धन दुसरा कोणी भोगतो, [ रक्त-मांसादि] देहस्थ धातु पक्षी व अग्नि यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. फक्त दोन गोष्टी बरोबर घेऊन जीव परलोकी जातो. त्या म्हणजे त्याने इहलोकी केलेले पुण्य व पाप.
५८ अन्योधर्मः समर्थानामापत्स्वन्यश्च भारत॥१२॥१३०१४ (भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे भारता, सामर्थ्य असतां आचरण्याचा धर्म निराळा आणि संकटप्रसंगाचा धर्म निराळा.
५९ अन्योन्यसमुपष्टम्भादन्योन्यापाश्रयेण च ।। ___ ज्ञातयः संप्रवर्धन्ते सरसीवोत्पलान्युत ॥ ५॥३६३६ तळ्यांत वाढणाऱ्या कमलांप्रमाणे, परस्परांस साहाय्य करून व परस्परांचा आश्रय घेऊन ज्ञातींचा उत्कर्ष होत असतो.
For Private And Personal Use Only
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ११ ६० अन्यो हि नानाति कृतं हि कर्म
मनुष्यलोके मनुजस्य कश्चित् । यत्तेन किंचिद्धि कृतं हि कर्म
तदनुते नास्ति कृतस्य नाशः ॥३॥२०७।२७ मृत्युलोकी एका मनुष्याने केलेल्या कर्माचे फळ दुसरा कोणीहि भोगीत नाही. त्याने जे काही केले असेल त्याचे फळ त्याला भोगावेच लागते. केलेल्याचा नाश केव्हांहि होत नाही.
६१ आप च ज्ञानसंपन्नः सर्वान्वेदान्पितुगृहे । __ श्लाघमान इवाधीयाद्ग्राम्य इत्येव तं विदुः॥१३॥३६॥१५ बापाच्या घरी राहून मोठ्या ऐटीत सर्व वेदांचा अभ्यास करून जरी कोणी. ज्ञानसंपन्न झाला तरी लोक त्याला खेडवळच म्हणणार. ६२ अपि चेत्सुदराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः॥६॥३३॥३० [श्रीकृष्ण सांगतात ] अत्यंत दुराचारी असलेला मनुष्यहि जर अनन्यभावाने मला भजेल तर तो साधुच समजावा. कारण [ तो मला भजू लागला म्हणजे ] त्याचा निश्चय चांगला झाला. ( तो चांगल्या मार्गाला लागला.)
६३ अपिचेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः । __ सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥६।२८।३६ (श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना,) सर्व पापी लोकांहुन तूं जरी अधिक पापी असलास तरी ज्ञानरूप नौकेच्या योगानेच तूं सर्व पापसमुद्र तरून जाशील.
६४ अपि पापकृतो रौद्राः सत्यं कृत्वा पृथक्पृथक् । -- अद्रोहमविसंवादं प्रवर्तन्ते तदाश्रयाः ॥१२॥२५९।११ पाप करणारी आणि भयंकर अशी जरी मनुष्ये असली, तरी ती सुद्धां परस्परांशी सत्याने वागण्याची शपथ घेऊन त्या सत्याच्या आधारानें, परस्परांशी विश्वासघात व फसवणूक न करितां वागतात.
For Private And Personal Use Only
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm ६५ अपि शाकं पचानस्य सुखं वै मघवन्गृहे।
अर्जितं स्वेन वीर्येण नाप्यपाश्रित्य कंचन ॥३॥१९३२९ (बकमुनि म्हणतात ) हे इंद्रा, कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या हिंमतीने मिळविलेली मीठभाकर सुद्धा स्वतःच्या घरी खाण्यांत सुख आहे. ६६ अपि सर्वस्वमुत्सृज्य रक्षेदात्मानमात्मना।।१२।१३८।१७९ सर्वस्वाचा त्याग करून देखील आपण आपलें रक्षण करावें. ६७ अप्युन्मत्तात्पलपतो बालाच्च परिजल्पतः ।
सर्वतः सारमादद्यादश्मभ्य इव काञ्चनम् ॥ ५॥३४॥३२ वेडाच्या लहरींत बरळणाऱ्या वेड्यापासून, तसेच बोबडे बोल बोलणाऱ्या बालकापासून, सर्वांपासून, दगडांतून सोने निवडावे त्याप्रमाणे, चांगले तेवढे ग्रहण करावे. ६८ अप्रयत्नागताः सेव्या गृहस्थैर्विषयाः सदा ।
प्रयत्नेनोपगम्यश्च स्वधर्म इति मे मतिः ॥ १२।२९५३३५ (पराशर मुनि जनकराजाला म्हणतात ) मुद्दाम प्रयत्न न करितां प्रारब्धानुसार ओघानें प्राप्त होतील तेवढ्याच विषयांचे गृहस्थाश्रमी पुरुषाने सेवन करावे, आणि स्वधर्माचे आचरण प्रयत्नपूर्वक करावे असे माझे मत आहे. ६९ अप्राप्तकालं वचनं बृहस्पतिरपि ब्रुवन् ।
लभते बुद्धयवज्ञानमवमानं च भारत ।। ५।३९।२ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ) समयाला न शोभण्यासारखे भाषण करणारा बृहस्पति जरी असला तरी त्याच्या बुद्धीचा तिरस्कार होतो व तोहि अपमानालाच पात्र होतो.
७० अबलस्य कुतः कोशो ह्यकोशस्य कुतो बलम् । ___ अबलस्य कुतो राज्यमराज्ञः श्रीभवेत्कुतः ॥ १२॥१३३१४
दुर्बळाला द्रव्य कोठून मिळणार ? व ज्याच्यापाशी द्रव्य नाही त्याला सामर्थ्य कोठलें ? तसेच ज्याला सामर्थ्य नाही त्याचे राज्य कसे राहणार ? व राज्य नाहींसें झाले म्हणजे संपत्ति तरी कशी टिकणार ?
For Private And Personal Use Only
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
. १३ ७१ अब्रुवन्कस्यचिनिन्दामात्मपूजामवर्णयन् ।
न कश्चिद्गुणसंपन्नः प्रकाशो भुवि दृश्यते ॥ ३२०७५० कोणाचीहि निंदा न करतां व आत्मस्तुति न करता कोणताहि गुणसंपन्न पुरुष जगांत प्रसिद्धीस येत असल्याचे दृष्टीस पडत नाही. ७२ अभिमानकृतं कर्म नैतत्फलवदुच्यते।
त्यागयुक्तं महाराज सर्वमेव महाफलम् ॥ १२।१२।१६ ( नकुल युधिष्ठिराला म्हणाला ) [ मी कर्ता अशा ] अभिमानाने केलेले कर्म सफल झाले असे म्हणता येत नाही. त्यागबुद्धीने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ फार मोठे मिळतें. ७३ अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः ।
चत्वारि संप्रवर्धन्ते कीर्तिरायुर्यशो बलम् ।। ५।३९।७६ नेहमी वृद्धजनांना वंदन करून त्यांच्या समागमांत जो राहतो, त्याची कीर्ति, आयुष्य, यश व सामर्थ्य ही चार वृद्धिंगत होतात. ७४ अभिशस्तं प्रपश्यन्ति दरिद्रं पार्श्वतः स्थितम् ।
दारिद्रयं पातकं लोके न तच्छसितुमर्हति ॥१२।८।१४ दरिद्री मनुष्य जवळ उभा राहिला तर एकाद्या पातकी मनुष्याप्रमाणे लोक त्याजकडे पाहतात. या लोकामध्ये दारिद्य हे एक पातकच आहे ! म्हणूनच त्याची प्रशंसा करणे योग्य नाही. ७५ अभ्यावहति कल्याणं विविधं वाक्सुभाषिता ।
सैव दुर्भाषिता राजननायोपपद्यते ॥ ५।३४७७ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, वाणीने चागले भाषण केले असता त्यापासून अनेक प्रकारे कल्याण होते, परंतु, दुर्भाषण केले असतां तीच वाणी अनर्थाला कारण होते.
For Private And Personal Use Only
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७६ अमर्षजो हि संतापः पावकादीप्तिमत्तरः ३ | ३५।११ असहिष्णुतेमुळे होणारा संताप अग्नीपेक्षांहि अधिक प्रखर असतो. ७७ अमित्रमुपसेवेत विश्वस्तवदविश्वसन् ।
प्रियमेव वदेन्नित्यं नाप्रियं किंचिदाचरेत् ।। १२|१०३ ९
( बृहस्पति इंद्राला म्हणतात. ) शत्रूवर विश्वास न ठेवतां विश्वास ठेवल्याचा बहाणा करून त्याच्या कलानें वागावें. त्याच्याशीं सदा गोड बोलावें, व त्याला न रुचणारी कोणतीहि गोष्ट करूं नये.
७८ अमित्रो न विमोक्तव्यः कृपणं बह्वपि ब्रुवन् ।
कृपा न तस्मिन्कर्तव्या हन्यादेवापकारिणम् ||१|१४०/२२ शत्रु अगदीं दीनवाणीनें बोलूं लागला तरी त्याला मोकळा सोडूं नये. त्याच्यावर दया न करतां त्या अपकार करणाऱ्याला ठार मारावें.
७९ अमित्रो मित्रतां याति मित्रं चापि प्रदुष्यति ।
सामर्थ्ययोगात्कार्याणामनित्या वै सदा गतिः १२।१३८।१३
कार्याच्या महत्त्वाच्या मानानें शत्रुहि मित्र होतात व मित्रहि शत्रु होतात. कारण, कोणतीहि स्थिति ही कायमची अशी नसतेच.
८० अमृतस्येव संतृप्येदवमानस्य तत्त्ववित् ।
विषस्येवोद्विजेन्नित्यं संमानस्य विचक्षणः || १२|२२९/२१ तत्त्ववेत्त्या पुरुषाला अपमान झाला तर अमृतप्राप्ति झाल्याप्रमाणें संतोष वाटला पाहिजे. व शहाण्याने विषाप्रमाणे सन्मानाचा तिटकारा मानला पाहिजे.
८१ अयुध्यमानो म्रियते युध्यमानश्च जीवति ।
कालं प्राप्य महाराज न कश्चिदतिवर्तते ।११/२/५
( भारतीय युद्धानंतर विदुर धृतराष्ट्राचे सांत्वन करतो ) हे राजा, रणांत पाऊल न टाकणाराहि मरून जातो, आणि घनघोर रणकंदन करूनहि मनुष्य जिवंत राहूं शकतो. सारांश काळ आल्यावर त्याचा प्रतिकार कोणालाहि करितां यावयाचा नाहीं.
3
For Private And Personal Use Only
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८२ अरक्षितारं राजानं बलिषड्भागहारिणम् ।
तमाहुः सर्वलोकस्य समग्रं पापचारिणम् ॥१२१३९ जो राजा प्रजेचे रक्षण न करितां प्रजेपासून उत्पन्नाचा सहावा भाग कर म्हणून घतो तो [ त्या कराच्या रूपानें ] सर्व प्रजेचें पापच ग्रहण करतो असे म्हणतात. ८३ अरक्षितारं हारं विलोप्तारमनायकम् ।
तं वै राजकलिं हन्युः प्रजाः संना निघृणम् ॥ १३॥६११३२ प्रजेचे रक्षण न करितां तिजपासून जो कर घेतो, व प्रजेला सन्मार्गाला न लावितां जो लुबाडतो तो राजरूपी कली प्रजेनें सज्ज होऊन निष्ठुरपणे ठार मारावा. ८४ अरण्ये विजने न्यस्तं परस्वं दृश्यते यदा ।
मनसापि न हिंसन्ति ते नराः स्वर्गगामिनः॥१३॥१४४।३१ अरण्यांत एकीकडे पडलेले दुसऱ्याचे द्रव्य दृष्टीस पडलें असतांही जे लोक मनानेंसुद्धा त्याचा अभिलाष धरीत नाहीत ते स्वर्गाला जातात. ८५ अराजकेषु राष्ट्रेषु धर्मो न व्यवतिष्ठते ।।
परस्परं च खादन्ति सर्वथा धिगराजकम् ॥ १२॥६७।३ राजा नसलेल्या राष्ट्रामध्ये धर्म रहात नाही. तसेंच लोक एकमेकांना फाडून खातात. अराजकतेला सर्वथा धिक्कार असो ! ८६ अरिणापि समर्थेन संधिं कुर्वीत पण्डितः ।
मूषिकश्च बिडालश्च मुक्तावन्योन्यसंश्रयात् ॥१२॥१३८।२०३ सुज्ञ मनुष्याने शत्रु सामर्थ्यसंपन्न असल्यास त्याच्याशीहि संधि करावा. परस्परांचा आश्रय केल्यानेच मूषिक आणि मार्जार हे उभयतांहि संकटांतून मुक्त झाले. ८७ अर्थं महान्तमासाद्य विद्यामैश्वर्यमेव वा।
विचरत्यसमुन्नद्धो यः स पण्डित उच्यते ॥ ५।३३।४० विपुल संपत्ति, विद्या किंवा अधिकार प्राप्त झाला असतां जो निरभिमान वृत्तीने वागतो त्याला पंडित म्हणावें.
For Private And Personal Use Only
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८८ अर्थयुक्त्या हि जायन्ते पिता माता सुतस्तथा ।
मातुला भागिनेयाश्च तथा संबन्धिबान्धवाः । १२॥१३८।१४५ आई, बाप, मुलगा, मामे भाचे, तसेच इतर संबंधी आणि बांधव हे सर्व द्रव्याच्याच संबंधाने परस्पर (प्रीतियुक्त ) होत असतात. ८९ अर्थसिद्धि परामिच्छन् धर्ममेवादितश्चरेत् ।
न हि धर्मादपैत्यर्थः स्वर्गलोकादिवामृतम् ॥५:३७/४८ पुष्कळ द्रव्य मिळावे अशी इच्छा करणाऱ्याने प्रथम धर्माचेंच आचरण करावें, कारण, स्वर्गलोकाला सोडून जसें अमृत जात नाही तसा अर्थ ( द्रव्य ) धर्माला सोडून रहात नाही. ९० अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित् ।।
इति सत्यं महाराज बद्धोऽस्यर्थेन कौरवैः ॥ ६४३।४१ ('तुम्ही कौरवांचा पक्ष कां सोडीत नाही ? ' या युधिष्ठिराच्या प्रश्नाला भीष्मद्रोणादिकांनी दिलेले उत्तर ) पुरुष हा अर्थाचा दास आहे, अर्थ कोणाचाहि दास नाहीं. ह्यास्तव, खरोखर, हे राजा ! मी अर्थामुळे कौरवांशी बांधला गेलों आहे. ९१ अर्थागमो नित्यमरोगिता च
प्रिया च भार्या प्रियवादिनी च । वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या ।
षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ।। ५।३३।८२ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, सदोदित द्रव्यप्राप्ति, निकोप प्रकृति, मधुर भाषण करणारी प्रेमळ स्त्री, आज्ञाधारक पुत्र व धनोत्पादक विद्या ही सहा मृत्युलोकांतील सुखें होत. ९२ अर्थाद्धर्मश्च कामश्च स्वर्गश्चैव नराधिप। ..
प्राणयात्रापि लोकस्य विना ह्यर्थं न सिध्यति ॥१२।८।१७ (अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो)अर्थ (द्रव्य) असेल तर धर्म, काम आणि स्वर्ग यांची प्राप्ति होते. फार काय, पण लोकांची जीवितयात्रा देखील अर्थावांचून चालणार नाही.
For Private And Personal Use Only
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९३ अर्थानामीश्वरो यः स्यादिन्द्रियाणामनीश्वरः ।
इन्द्रियाणामनैश्वर्यादैश्वर्यादृश्यते हि सः ॥ ५॥३४॥६३ जो मनुष्य संपत्तीचा मालक असून इंद्रियांचा दास होऊन राहतो तो इंद्रियांवर ताबा नसल्यामुळे ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो. ९४ अर्थानारभते बालो नानुबन्धमवेक्षते ॥ २।१५।१४
अज्ञ मनुष्य निरनिराळ्या कामांना हात घालतो पण पुढील परिणामाकडे लक्ष्य देत नाही. ९५ अर्थी तु शक्यते भोक्तुं कृतकार्योऽवमन्यते ।
तस्मात्सर्वाणि कार्याणि सावशेषाणि कारयेत्।।१२।१४००२० कोणत्याहि मनुष्याला आपली गरज आहे तोवरच त्याचा उपयोग करून घेतां येतो. एकदा त्याचे कार्य झाले म्हणजे तो आपली पर्वा करीत नाही. यास्तव कोणतेहि काम पूर्णपणे न करता त्यांतील अवशेष ठेवावा. ९६ अर्थेन हि विहीनस्य पुरुषस्याल्पमेधसः।
विच्छिद्यन्ते क्रियाः सर्वा ग्रीष्मे कुसरितोयथा ॥१२।८।१८ ज्याप्रमाणे ग्रीष्मऋतूंत लहान लहान नद्यांना खांडवे पडतात, त्याप्रमाणे द्रव्यहीन अशा मंदबुद्धि पुरुषाच्या सर्व क्रिया छिन्न विच्छिन्न होऊन जातात. ९७ अर्थेभ्यो हि विवृद्धेभ्यः संभृतेभ्यस्ततस्ततः ।
क्रियाः सर्वाः प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगाः॥१२।८।१६ पर्वतांपासून नद्या उगम पावतात त्याप्रमाणे सर्व बाजूंनी द्रव्य संपादन करून त्याची वाढ झाली म्हणजे त्यापासून सर्व कार्ये सिद्ध होतात. ९८ अर्थे सर्वे समारम्भाः समायत्ता न संशयः ।
स च दण्डे समायत्तः पश्य दण्डस्य गौरवम्॥१२।१५।४८ (अर्जुन युधिष्ठराला म्हणतो) सर्व प्रकारचे उद्योग द्रव्यावर अवलंबून आहेत यांत संशय नाही. आणि ते द्रव्य दंडाच्या (नियामक शक्तीच्या ) अधीन आहे. यावरून दंडाची थोरवी केवढी आहे पहा !
म. भा. २
For Private And Personal Use Only
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९९ अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा ।
भायों मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः ॥११७४|४१ स्त्री से पुरुषाचे अर्धे आंगच होय. स्त्री हाच पुरुषाचा सर्वोत्तम मित्र होय. (धर्म, अर्थ व काम या ) तीनहि पुरुषार्थाचें मूळ स्त्रीच आहे. संसार तरून जाण्याची इच्छा करणाऱ्याचे मुख्य साधन स्त्रीच. १०० अलातं तिन्दुकस्येव मुहूर्तमपि हि ज्वल ।
मा तुषाग्निरिवानर्चिधूमायस्व जिजीविषुः ॥ ५।१३३।१४ (विदुला माता संजयास म्हणते) टेंभुरणीच्या लाकडाच्या कोलतीप्रमाणे थोडा वेळ का होईना, पण चमकून जा. केवळ जिवाची आशा धरून ज्वाला न निघणाऱ्या कोंड्याच्या अग्नीसारखा नुसता धुमसत राहूं नको. १०१ अल्पोऽपि ह्यरिरत्यर्थ वर्धमानः पराक्रमः।
वल्मीको मूलज इव ग्रसते वृक्षमन्तिकात् । २।५५।१७ शत्रु क्षुद्र असला तरी तो आपल्या पराक्रमाने प्रबल होत जाऊन, बुंध्याशी असलेले वारूळ जसें अखेर झाडाला खाऊन टाकतें त्याप्रमाणे, आपल्या प्रतिपक्ष्याचा नाश करतो. १०२ अवज्ञानं हि लोकेस्मिन्मरणादपि गर्हितम् ॥ ३।२८।१२
या जगांत मानखंडना होणे हे मरणापेक्षांहि दुःखदायक आहे. १०३ अविद्वांसमलं लोके विद्वांसमपि वा पुनः ।
नयन्ति ह्यपथं नार्यः कामक्रोधवशानुगम् ॥ १३॥४८३७ जगांत कोणी विद्वान् असो किंवा अविद्वान् असो, तो कामक्रोधांच्या तडाक्यांत सांपडला की स्त्रिया त्याला कुमार्गाला नेतात. १०४ अविश्वासो नरेन्द्राणां गुह्यं परममुच्यते ॥ १२॥८५।३४
कोणाचाहि विश्वास न धरणे हे राजे लोकांचे एक मोठे रहस्य आहे.
For Private And Personal Use Only
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
१०५ अविसंवादनं दानं समयस्याव्यतिक्रमः ।
१९
आवर्तयन्ति भूतानि सम्यक्प्रणिहिता च वाक् ||५|३८|३६
सरळ बुद्धीनें दिलेलें दान, वचनाचे परिपालन आणि नीट विचार करून केलेलें भाषण यांच्या योगाने सर्व लोक आपलेसे करून घेतां येतात. १०६ अवृत्तिर्भयमन्त्यानां मध्यानां मरणाद्भयम् ।
उत्तमानां तु मर्त्यानामवमानात्परं भयम् || ५ | ३४ /५२ निकृष्ट स्थितींतील लोकांना उपासमारीचें भय वाटतें, मध्यम लोकांना मरणाचें भय वाटते. परंतु उत्तम कोटींतील मनुष्यांना अपमानाचें फार भय वाटतें.
१०७ अवेक्षस्व यथा स्वैः स्वैः कर्मभिर्व्यापृतं जगत् ।
तस्मात्कर्मैव कर्तव्यं नास्ति सिद्धिरकर्मणः || १२|१०|२८
( भीम युधिष्ठिराला म्हणतो ) असें पहा कीं, जगांतील सर्व प्राणी आपआपली कर्मे करण्यांत गुंतलेले आहेत तस्मात्, कर्मच केलें पाहिजे. कर्मावांचून सिद्धि नाहीं. १०८ अव्यापारः परार्थेषु नित्योद्योगः स्वकर्मसु ।
रक्षणं समुपात्तानामेतद्वैभवलक्षणम् || २|५४/७
दुसऱ्याच्या कामांत ढवळाढवळ न करणें, आपल्या कामांत सदा गर्क असणें आणि संपादन केलेल्या द्रव्याचें रक्षण करणें हीं वैभवाची साधनें होत. १०९ अशङ्किन्तेभ्यः शङ्केत शङ्किन्तेभ्यश्च सर्वशः ।
अशङ्कन्याद्भयमुत्पन्नमपि मूलं निकृन्तति ॥ १।१४०/६१
संशयास्पद मनुष्यांवर मुळीच विश्वास ठेवूं नये. इतकेंच नव्हे ज्याच्याविषयीं कोणाला शंका वाटत नाहीं अशाचा देखील विश्वास धरूं नये. कारण विश्वासू, मनुष्याकडून कांहीं संकट उत्पन्न झाले तर तें समूळ नाश करते. ११० अशाश्वतमिदं सर्वं चिन्त्यमानं नरर्षभ ।
कदलीसंनिभो लोकः सारो ह्यस्य न विद्यते ।। ११।३।४ खरोखर विचार केला असता हे सर्व जग अशाश्वत आहे. याची स्थिति केळीसारखी आहे. यांत सार म्हणून कांहींच नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१११ अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः ॥५/४०१४
दुर्लक्ष्य, त्वरा व स्तुति हे तीन विद्येचे शत्रु होत. ११२ अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येत्पराक्रमम् ।
भैषज्यमेतदुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ॥११।२।२७ पराक्रम करता येईल असें दिसेल तर शोक न करतां प्रतिकार करावा, दुःखावर औषध हेच की, त्याचे एकसारखें चिंतन करीत बसू नये. ११३ अश्नाम्याच्छादयामीति प्रपश्यन्पापपूरुषः।
नामर्ष कुरुते यस्तु पुरुषः सोऽधमः स्मृतः ॥ २।५०।१७ अन्न आणि आच्छादन आपल्याला मिळत आहे एवढ्यावरच नजर देऊन स्वस्थ राहणारा व शत्रूच्या उत्कर्षाविषयी असहिष्णुता नसणारा पुरुष अधम पापी, असे म्हटले आहे. ११४ अश्रद्धा परमं पापं श्रद्धा पापप्रमोचनी ।
जहाति पापं श्रद्धावान्सर्पो जीणामिव त्वचम्।।१२।२६४।१५ अश्रद्धा हे मोठे पाप आहे. श्रद्धा ही पापापासून मुक्त करणारी आहे. जसा सर्प जीर्ण झालेली कात टाकून देतो तसा श्रद्धावान मनुष्य पातकाचा त्याग करतो. ११५ अश्रुतश्च समुनरो दरिद्रश्च महामनाः ।
अश्विाकर्मणा प्रेप्सुर्मूढ इत्युच्यते बुधैः ॥ ५।३३।३० अध्ययन नसतांनाहि गर्विष्ट, दरिद्री असून मोठमोठ्या खर्चाच्या गोष्टी मनामध्ये आणणारा आणि उद्योग न करितां द्रव्यप्राप्तीची इच्छा करणारा अशाला शहाणे लोक मूढ म्हणतात. ११६ अश्वमेधसहस्रं च सत्यं च तुलया धृतम् । __अश्वमेधसहस्राद्धि सत्यमेव विशिष्यते ॥१२।१६२।२६
सहस्र अश्वमेध आणि सत्य ही तराजूत घातली तेव्हां सहस्र अश्वमेधांपेक्षां सत्यच अधिक भरलें.
For Private And Personal Use Only
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि २१ ११७ अष्टादश पुराणानि धर्मशास्त्राणि सर्वशः।
वेदाः साङ्गास्तथैकत्र भारतं चैकतः स्थितम् ॥१८।५।४६ __ अठरा पुराणे, सर्व धर्मशास्त्रे ( स्मृति ) आणि सांग वेद एका बाजूला व एकटें भारत एका बाजूला [ एवढी भारताची योग्यता आहे. ] ११८ असंशयं दैवपरः क्षिप्रमेव विनश्यति ॥ १२॥१०५।२२
दैववादी मनुष्य सत्वर सर्वथा नाश पावतो यांत संशय नाही. ११९ असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥६॥३०॥३५ ( भगवान् श्रीकृष्ण म्हणतात ) हे महाबाहो अर्जुना, खरोखरच मन हे चंचल असून त्याचा निग्रह करणे अति कठीण आहे. तरीपण अभ्यासाने व वैराग्याने ते ताब्यात आणता येते. १२० असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः॥६।२७१९
आसक्ति न ठेवतां कर्म करणारा मनुष्य परमपद खचित प्राप्त करून घेतो. १२१ असतां प्रतिषेधश्च सतां च परिपालनम् ।
एष राज्ञां परो धर्मः समरे चापलायनम् ॥१२।१४।१६ दुष्टांचे निवारण करणे, सजनांचे परिपालन करणे आणि युद्धांत शत्रूला पाठ न दाखविणे हा क्षत्रियांचा श्रेष्ठ धर्म होय. १२२ असतां शीलमेतद्वै परिवादोऽथ पैशुनम् ॥ १२॥१३२।१३ ___ दुसन्यांची निंदा करणे, आणि चुगल्या करणे हा दुर्जनांचा स्वभावच आहे. १२३ असदुच्चैरपि प्रोक्तः शब्दः समुपशाम्यति ।
दीप्यते त्वेव लोकेषु शनैरपि सुभाषितम् ॥१२।२८७१३२ अयोग्य भाषण मोठ्या जोराने केले तरी त्याचे तेज पडत नाही आणि योग्य भाषण हळू केले तरी लोकांत त्याचें तेज पडतेच. १२४ असंतोषः श्रियो मूलम् ॥ २।५५।११
असंतोष हे उत्कर्षाचे मूळ आहे.
For Private And Personal Use Only
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१२५ असंत्यागात्पापकृतामपापां
स्तुल्यो दण्डः स्पृशते मिश्रभावात् । शुष्कणाई दह्यते मिश्रभावात्
तस्मात्पापैः सह संधिं न कुर्यात् ॥ ५॥३४७० पापी लोकांचा त्याग केला नाही, तर त्यांच्याशी मिसळल्यामुळे निर्दोषी माणसांनाहि त्यांच्या बरोबरीने दंड सोसावा लागतो. मुक्याबरोबर मिसळल्याने ओलेहि जळून जाते. यास्तव, पापी लोकांशी संबंध ठेवू नये. १२३ असभ्याः सभ्यसंकाशाः सभ्याश्चासभ्यदर्शनाः ।
दृश्यन्ते विविधा भावास्तेषु युक्तं परीक्षणम् ।।१२।११११६५ पुष्कळ असभ्य मनुष्ये सभ्य असल्यासारखी दिसतात व सभ्य असलेली असभ्य दिसतात. नानाप्रकारच्या वस्तु दिसतात. [ त्या तशाच असतात असे नाही ] यास्तव, त्यांची नीट परीक्षा करणे युक्त आहे. १२७ असंभवे हेममयस्य जन्तो
स्तथापि रामो लुलुभे मृगाय । प्रायः समासनपराभवाणां
धियो विपर्यस्ततरा भवन्ति ॥२।७६।५ सोन्याचा मृग असणे संभवत नाही, असे असतांहि श्रीरामचंद्राला सुवर्णमृगाचा मोह पडला ( यावरून असे दिसते की ) बहुतकरून विनाशकाल जवळ आला की, माणसांच्या बुद्धीला भ्रम होतो. १२८ असम्यगुपयुक्तं हि ज्ञानं सुकुशलैरपि ।
उपलभ्यं चाविदितं विदितं चाननुष्ठितम् ।। ५।३९।३४ जे समजून घेणें अवश्य आहे तें जर समजून न घेतले अथवा समजल्यावरहि त्याप्रमाणे वर्तन न केले तर अतिनिपुण पुरुषांनीहि केलेला ज्ञानाचा उपदेश व्यर्थ जाणार.
For Private And Personal Use Only
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि २३
rammar.mmmm १२९ असाधुभ्योऽर्थमादाय साधुभ्यो यः प्रयच्छति ।
आत्मानं संक्रमं कृत्वा कृच्छ्रधर्मविदेव सः ॥१२॥१३२।४ जो राजा ( आपन्न स्थितीत असलेल्या लोकांना ) तरून जाण्याचा एक प्रकारचा सेतुच बनून, दुष्ट लोकांपासून द्रव्य काढून घेऊन तें सुष्ट लोकांना देतो, तोच आपद्धर्म जाणणारा होय. १३० असुहृत्ससुहच्चापि सशत्रुमित्रवानपि ।
सप्रज्ञः प्रज्ञया हीनो दैवेन लभते सुखम् ॥१२॥१७४।२८ स्नेही असोत वा नसोत, मित्र असोत वा शत्रु असोत, बुद्धिहि असो अथवा नसो, तथापि मनुष्यास दैवयोगाने सुखप्राप्ति होते. १३१ अस्यैकपदं मृत्युरतिवादः श्रियो वधः ।। ५।४०१४
एकटा मत्सर मृत्यूला कारण होतो. मर्यादा सोडून भाषण करणे हे लक्ष्मीच्या नाशाला कारण होते. १३२ अस्मिन्महामोहमये कटाहे
सूर्याग्निना रात्रिदिवेन्धनेन । मासर्तुदींपरिघट्टनेन
भूतानि कालः पचतीति वाता॥ ३॥३१३।११८ असे म्हणतात की मोहरूप प्रचंड कढईत दिवसरात्ररूपी सर्पणाने सूर्यरूपी अग्नीवर, मास-ऋतु-रूप पळीने ढवळीत ढवळीत, काल हा सर्व प्राण्यांना शिजवीत आहे. १३३ अहं वो रक्षितेत्युक्त्वा यो न रक्षति भूमिपः ।
स संहत्य निहन्तव्यः श्वेव सोन्माद आतुरः॥१३॥६११३३ 'मी तुमचे रक्षण करीन' असे म्हणून जो राजा त्याप्रमाणे प्रजेचे रक्षण करीत नाही त्याला, सर्वांनी एक होऊन, पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे, ठार करावें. १३४ अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम् ।
शेषाःस्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम् ॥३॥३१३।११६ रोजच्यारोज मृत्युलोकांतील प्राणी यमसदनास जात असूनहि बाकीचे लोक चिरंजीव आहों असें समजतात, यापरतें आश्चर्य तें कोणते ?
For Private And Personal Use Only
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१३५ अहिंसा परमो धर्मः ॥ ३।२०७/७४
अहिंसा हा परमश्रेष्ठ धर्म होय. १३६ अहिंसायां तु निरता यतयो द्विजसत्तम ।
कुर्वन्त्येव हि हिंसां ते यत्नादल्पतरा भवेत् ॥३।२०८।३४ (धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणाला) अहिंसेकरितां झटणाऱ्या यतींच्या हातून देखील हिंसा घडतेच; मात्र ती टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे फार थोडी घडते. १३७ अहिंसार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् ।
यास्यादहिंसासंयुक्तःस धर्म इति निश्चयः॥१२।१०९।१२ प्राण्यांना पीडा होऊ नये एवढ्यासाठीच धर्म सांगितला आहे. जो अहिसेनें युक्त असेल तोच धर्म, हा सिद्धांत आहे. १३८ अहिंसा सत्यवचनं सर्वभूतेषु चार्जवम् ।
क्षमा चैवाप्रमादश्च यस्यैते स सुखी भवेत् ।। १२।२१५/६ अहिंसा, सत्य भाषण, सर्वांशी सरळपणाची वागणूक, क्षमाशीलता व सावधानता हे गुण ज्याच्यापाशी असतील तो सुखी होईल. १३९ अहिंसाऽसाधुहिंसेति श्रेयान्धर्मपरिग्रहः ॥ १२।१५।४९
दुष्टांची हिंसा ही धर्मशास्त्राप्रमाणे अहिंसाच होय असे मानणे युक्त आहे. १४० अहो बत महत्कष्टं विपरीतमिदं जगत् । ___ येनापत्रपते साधुरसाधुस्तेन तुष्यति ॥ ३२।६४
अरेरे ! मोठी दुःखाची गोष्ट की, या जगाची रीत विपरीत आहे. ज्याच्या योगानं सज्जनाला खेद होतो त्यानेच दुर्जनाला संतोष वाटतो. १४१ अहो ह्यनित्यं मानुष्यं जलबुद्धदचञ्चलम् ।। ७७८११७ पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे मनुष्याचें जीवित किती क्षणभंगुर आहे !
For Private And Personal Use Only
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१४२ आकिंचन्ये न मोक्षोऽस्ति किंचन्ये नास्ति बन्धनम् ।
किंचन्ये चेतरे चैव जन्तुज्ञानेन मुच्यते ॥१२॥३२०५० दारियांत मोक्ष नाही किंवा श्रीमंतीत बंधन नाही. श्रीमंतींत काय आणि गरिबीत काय, मनुष्य ज्ञानाने मुक्त होत असतो. १४३ आगमानां हि सर्वेषामाचारः श्रेष्ठ उच्यते ।
__आचारप्रभवो धर्मो धर्मादायुर्विवर्धते ॥ १३॥१०४।१५६
सर्व शास्त्रांत आचार हाच श्रेष्ठ म्हटला आहे. आचारापासून धर्माची उत्पत्ति होते. धर्माचरणाने आयुष्य वाढते. १४४ आत्मदोषैनियच्छन्ति सर्वे दुःखसुखे जनाः ॥११७८१३०
सर्व लोकांना स्वतःच्या कर्मामुळेच मुख किंवा दुःख प्राप्त होत असते. १४५ आत्मा जेयः सदा राज्ञा ततो जेयाश्च शत्रवः । __अजितात्मा नरपतिर्विजयेत कथं रिपून् ॥१२॥६९।४
राजाने नेहमी प्रथम आपले मन जिंकावें. म्हणजे मग त्याला शत्रूवर जय मिळविता येईल. ज्याने स्वतःचे मन जिंकलें नाहीं तो राजा शत्रूना कसा जिंकणार ? १४६ आत्मानं कः समुद्भध्य कण्ठे बद्धा महाशिलाम् ।
समुद्रं तरते दोभ्यां तत्र किं नाम पौरुषम् ॥४।४९।१६ स्वतःस जखडून घेऊन आणि गळ्यांत मोठी धोंड बांधून नुसत्या बाहूच्या जोरावर समुद्र तरून जाण्याच्या भरीस कोण पडेल ? असलें साहस करण्यांत पुरुषार्थ कसला ? १४७ आत्मानमसमाधाय समाधिसति यः परान् । -विषयेष्विन्द्रियवशं मानवाः प्रहसन्ति तम् ॥१२॥२६७।२७
आपले मन स्वाधीन न ठेवतां जो दुसऱ्यांना आपल्या ताब्यात ठेवू पहातो, अशा विषयासक्त इंद्रियाधीन पुरुषाचा लोक उपहास करतात. १४८ आत्मा पुत्रः सखा भायों
कृच्छ्रे तु दुहिता किल ॥ १११५९।११ पुत्र म्हणजे आपला आत्माच होय. भार्या हा मित्र होय. परंतु मुलगी म्हणजे मात्र खरोखर संकट होय!
For Private And Personal Use Only
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२६
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१४९ आत्मार्थे संततिस्त्याज्या
राज्यं रत्नं धनानि च ॥ १२॥१३८।१७९ स्वतःकरितां संततीचा, राज्याचा, रत्नांचा व सर्व प्रकारच्या द्रव्याचा त्याग करावा. १५० आत्मा सर्वस्य भाजनम् ॥ ९।४।४२
जीवं हाच सर्व गोष्टींचा आधार आहे. [ आधीं जीव जगेल तर सर्व काही अनुकूल होईल.] १५१ आत्मैव ह्यात्मनः साक्षी कृतस्यापकृतस्य च ॥१३।६।२७
आपला आत्माच आपल्या वऱ्या वाईट कृत्यांचा साक्षी आहे. १५२ आत्मैवादौ नियन्तव्यो
दुष्कृतं संनियच्छता ॥ १२॥२६७।२९ पापाचे नियमन करू इच्छिणाऱ्याने प्रथम आपल्या मनाचे नियमन केले पाहिजे. १५३ आत्मोत्कर्ष न मार्गेत परेषां परिनिन्दया ।
__ स्वगुणैरेव मार्गेत विप्रकर्ष पृथग्जनात् ॥ १२॥२८७।२५
दुसऱ्याची निंदा करून आपला उत्कर्ष साधण्याची इच्छा धरूं नये. आपल्या आंगच्या गुणांच्या जोरावरच सामान्य लोकांपेक्षा वरचढ होण्याची इच्छा करावी. १५४ आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः॥६॥३०॥३२ ( श्रीकृष्ण म्हणतात ) अर्जुना, आपणांला जसें सुखदुःख होते तसेच सर्व प्राण्यांना होते, अशा बुद्धीने जो सर्वत्र सारखेच पहातो तो योगी परमश्रेष्ठ होय. १५५ आददानस्य चेद्राज्यं ये केचित्परिपन्थिनः ।
हन्तव्यास्त इति प्राज्ञाः क्षत्रधर्मविदो विदुः ॥१२।१०७ राज्य घेण्याच्या कामी जर कोणी अडथळा करतील तर त्यांचा वध करावा असें क्षत्रधर्म जाणणारे शहाणे लोक सांगतात.
For Private And Personal Use Only
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारत सुभाषितानि
१५६ आदावेव मनुष्येण वर्तितव्यं यथाक्षमम् । यथा नातीतमर्थं वै पश्चात्तापेन युज्यते ।। ११।११३५
आधीपासूनच मनुष्यानें योग्य रीतीनें वागावें. म्हणजे गोष्ट हातची गेल्यावर त्याकरितां पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाहीं.
१५७ आदित्यचन्द्रावनिलानलौ च द्यौर्भूमिरापो हृदयं यम । अहश्व रात्रिश्व उभे च संध्ये
२७
धर्मश्च जानाति नरस्य वृत्तम् ||१|७४|३०
सूर्य, चंद्र, वायु, अग्नि, आकाश, पृथ्वी, जल, तसेंच आपले अंतःकरण, यम, दिवस, रात्र, सकाळ संध्याकाळचा संधिप्रकाश आणि धर्म इतक्यांना मनुष्याचें बरेवाईट कृत्य समजते.
१५८ आनृशंस्यं परो धर्मः परमार्थाच्च मे मतम् || ३ | ३१३।१२९
[ युधिष्ठिर यक्षाला म्हणतो ] क्रौर्य नसणे म्हणजे दयाळुपणा हाच श्रेष्ठ धर्म होय. असें माझें निश्चित मत आहे.
१५९ आपत्सु विहितं स्तैन्यं विशिष्टं च महीयसः ।
विप्रेण प्राणरक्षार्थं कर्तव्यमिति निश्चयः ।। १२।१४१।३९
आपत्काली एकवेळ पोट भरेल इतक्या धान्याचें चौर्य शास्त्रविहित आहे. त्यांतूनहि विशेषतः मोठ्यांना. कारण ते प्राणान्तींही शास्त्राचें उल्लंघन न करणारे असल्यामुळे प्राणास. मुकतील. म्हणून ब्राह्मणानेही प्राणरक्षणार्थ तें करावें असा सिद्धांत आहे. १६० आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेद्धनैरपि ।
आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि || ५|३७|१८
संकटप्रसंगी उपयोग व्हावा म्हणून धनाचें रक्षण करावें. धनाचा त्याग करूनसुद्धां स्वस्त्रीचें रक्षण करावें. आणि धनाचा व स्त्रीचा त्याग करून देखील नेहमी स्वतःचें रक्षण करावें.
For Private And Personal Use Only
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२८
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१६१ आपदेवास्य मरणात्पुरुषस्य गरीयसी।
श्रियो विनाशस्तद्धयस्य निमित्तं धर्मकामयोः।।५।७२।२७ द्रव्यनाश हे मनुष्याला मरणापेक्षाहि अधिक मोठे संकट होय. कारण, त्याचा धर्म व काम या दोनहि पुरुषार्थाचे साधन द्रव्य हे आहे. १६२ आभ्यन्तरं भयं रक्ष्यमसारं बाह्यतो भयम्।।१२।१०७।२८
आपापसांतील भयाचे प्रथम निरसन केले पाहिजे. कारण, बाह्य लोकांपासून उत्पन्न होणारी भीति ( आपसांतील भीतीपेक्षा ) निःसार असते. १६३ आर्तिरार्ते प्रिये प्रीतिरेतावन्मित्रलक्षणम् ।
विपरीतं तु बोद्धव्यमरिलक्षणमेव तत् ।। १२।१०३१५० मित्र पीडित झाला असतां आपण पीडित होणे आणि तो आनंदित असतां आनंदित होणे हे मित्राचे लक्षण होय. आणि याच्या उलट स्थिति असणे हे शत्रूचेच लक्षण जाणावें. १६४ आर्यण हि न वक्तव्या
__ कदाचित्स्तुतिरात्मनः ॥ ७/१९५।२१ - आर्य मनुष्याने केव्हांहि आत्मस्तुति करूं नये. १६५ आलस्यं मदमोहौ च चापलं गोष्ठिरेव च ।
स्तब्धता चाभिमानित्वं तथाऽत्यागित्वमेव च
एते वै सप्त दोषाः स्युः सदा विद्यार्थिनां मताः॥५।४०५ आळस, गर्व व मोह, चंचलपणा, जनसमुदायांत जाणे, उद्धटपणा, अभिमान आणि लोभ हे विद्यार्थ्यांचे नेहमी सात दोष ( त्याज्य ) होत. १६६ आशा कालवती कुर्यात्कालं विघ्नेन योजयेत् ।
विघ्नं निमित्ततो ब्रूयानिमित्तं चापि हेतुतः ॥१११४०।८८ [प्रसंगविशेषीं शत्रूला ] आशाहि दाखवावी पण तिला काळाची मर्यादा सांगावी. आणि तो काळ आला म्हणजे ती सफल होण्याच्या मार्गात विघ्नं उपस्थित करावी. त्या विघ्नांचेंहि काहीतरी कारण सांगावे. आणि त्या कारणाच्याहि मूळाशी कांहीं मतलब असावा.
For Private And Personal Use Only
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२९
१६७ आशां महत्तरां मन्ये पर्वतादपि सद्रुमात् ।
आकाशादपि वा राजन्नप्रमेयैव वा पुनः ॥ १२॥१२५/६ (युधिष्ठिर भीष्मांना म्हणतो ) राजा, मला वाटते की वृक्षाच्छादित पर्वतापेक्षा आणि आकाशापेक्षांहि आशा ही मोठी आहे. खरोखर तिच्या मोठेपणाला सीमाच नाही ! १६८ आशीविषैश्च तस्याहुः सङ्गतं यस्य राजभिः॥१२॥८२।२४
जो राजेलोकांच्या समागमांत राहतो तो खरोखर सर्वांच्याच सहवासात राहतो. १६९ आश्चर्याणामनेकानां प्रतिष्ठा भगवान् रविः ॥ १२॥३६२।२
भगवान सूर्यनारायण अनेक चमत्कारांचे आश्रयस्थान आहे. १७० आश्रमांस्तुलया सर्वान्धृतानाहुर्मनीषिणः ।
एकतश्च त्रयो राजन् गृहस्थाश्रम एकतः ।। १२।१२।१२ एकीकडे वाकीचे तीन आश्रम व एकीकडे एकटा गृहस्थाश्रम ठेवला तरी बरोबरी होईल असे ज्ञाते लोक म्हणतात. १७१ इच्छतोरत्र यो लाभः स्त्रीपुंसोरमृतोपमः ।
अलाभश्चापि रक्तस्य सोऽपि दोषो विषोपमः।।१२।३२०६९ परस्परांची इच्छा करणाऱ्या स्त्रीपुरुषांना परस्परांचा लाभ होईल तर तो अमृततुल्य असतो, आणि न होईल तर ते दुःखहि विषतुल्यच होय. १७२ इज्याध्ययनदानानि तपः सत्यं क्षमा दमः ।
अलोभ इति मार्गोऽयं धर्मस्याष्टविधः स्मृतः॥ ५।३५/५६ यज्ञ, अध्ययन, दान, तप, सत्यपालन, क्षमाशीलता, इंद्रियनिग्रह आणि निर्लोभताः असा आठ प्रकारचा धर्मप्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे.
For Private And Personal Use Only
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१७३ इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् । _ विभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रहरिष्यति ॥ १।१।२६८
[ रामायण महाभारतादि ] इतिहास आणि पुराणे यांच्या अभ्यासाने वेदाध्ययनाची 'पूर्तता करावी. कारण, अर्धवट शिकलेल्या मनुष्याविषयी वेदाला अशी धास्ती वाटते की, हा माझ्यावर प्रहार करील. (म्हणजे अर्थाचा अनर्थ करून दुरुपयोग करील.) १७४ इत्यर्थमिष्यतेऽपत्यं तारयिष्यति मामिति ॥११५९१४
मनुष्याला अपत्य एवढ्याकरितां हवे असते की त्याने आपल्याला [ नरकापासून ] तारावें. १७५ इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ६२७३४ इंद्रिये आणि त्यांचे विषय यांच्यामधील प्रीति व द्वेष ही ठरलेली आहेत. त्यांच्या ताब्यांत मनुष्याने जाऊ नये. कारण ते त्याचे शत्रु होत. १७६ इन्द्रियाणामनुत्सर्गो मृत्युनापि विशिष्यते । ___अत्यर्थ पुनरुत्सर्गो सादयेदैवतानपि ।। ५।३९।५३
इंद्रियांचा आत्यंतिक निरोध मरणापेक्षांहि दुःसह होय, उलट तीच अजीबात मोकळी सोडली असतां देवतांचा देखील नाश करतील. १७७ इन्द्रियाणां प्रसङ्गेन्न दोषमछंत्यसंशयम् । ___ संनियम्य तु तान्येव सिद्धिमानोति मानवः।। १२२३२३।८
मनुष्य इंद्रियांच्या नादी लागला म्हणजे त्याच्या हातून निःसंशय पापाचरण 'घडते. परंतु तीच ताव्यांत ठेवल्याने सिद्धि ( मोक्ष ) प्राप्त करून घेतो. १७८ इन्द्रियाण्येव तत्सर्वं यत्स्वर्गनरकावुभौ। .
निगृहीतविसृष्टानि स्वर्गाय नरकाय च ।। ३।२११११९ स्वर्ग व नरक म्हणून जे काही आहे ते सर्व इंद्रियेच होत. कारण इंद्रिये, आंवरून धरल्याने स्वर्गाला, आणि मोकळी सोडल्याने नरकाला, कारण होत असतात.
For Private And Personal Use Only
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१७९ इन्द्रियाण्येव संयम्य तपो भवति नान्यथा॥३॥२११११८ ___ इंद्रियांचें संयमन केल्यानेच तपश्चर्या घडते, नाही तर घडत नाही. १८० इष्टं च मे स्यादितरच न स्या
देतत्कृते कर्मविधिः प्रवृत्तः । इष्टं त्वनिष्टं च न मा भजेते
त्येतत्कृते ज्ञानविधिः प्रवृत्तः ॥ १२।२०१।११ मला इष्ट गोष्टी तेवढ्या घडाव्या व अनिष्ट टळाव्या यासाठी कर्मकांडाची प्रवृत्ति आहे. इष्ट व अनिष्ट या दोहोंचाहि लेप मला न लागावा यासाठी ज्ञानकांड आहे. १८१ इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैदत्तानप्रदायभ्यो यो भुड़े स्तेन एव सः॥ ६।२७/१२ (श्रीकृष्ण म्हणतात ) यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हांला ( यज्ञ करणाऱ्यांना ) इच्छित भोग देतील. त्यांनी दिलेल्या त्या भोगांचा त्यांना दिल्याशिवाय जो उपभोग घेतो तो चोरच म्हटला पाहिजे. १८२ इह प्राज्ञो हि पुरुषः स्वल्पमप्रियामिच्छति ॥ ५।१३५।१७
[विदुला संजयाला म्हणते ] इहलोकी शहाण्या मनुष्याला अल्पस्वल्पाने संतोष होत नाही. १८३ इह लोके हि धनिनां स्वजनः स्वजनायते ।
स्वजनस्तु दरिद्राणां जीवतामपि नश्यति ॥१२॥३२११८८ या जगांत धनवान् लोकांचे आप्तेष्ट आप्तेष्टांसारखे वागतात. दरिद्री मनुष्याला मात्र आप्तेष्ट असून नसल्यासारखे होतात. . १८४ ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूनानि यन्त्रारूढानि मायया ॥६।४।६१ (श्रीकृष्ण म्हणतात ) अर्जुना, परमेश्वर सर्व भूतांच्या अंतर्यामी वास करतो, व आपल्या मायेच्या योगाने यंत्राने चढविलेल्या [ कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे ] सर्व भूतांना नाचवीत असतो.
For Private And Personal Use Only
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१८५ उच्चैवत्तेः श्रियो हानिर्यथैव मरणं तथा ॥१२॥१३३१५
उच्च वृत्तीने राहणाऱ्या मनुष्याला संपत्तीचा नाश मरणासारखाच होय. १८६ उत्थानवीरः पुरुषो वाग्वीरानधितिष्ठति ॥ १२।५८।१५
कर्तृत्ववान् पुरुष वाचाळ पुरुषांवर छाप ठेवतो. १८७ उत्थानहीनो राजा हि बुद्धिमानपि नित्यशः।
प्रधर्षणीयः शत्रूणां भुजङ्ग इव निर्विषः॥ १२॥५८।१६ राजा बुद्धिमान् असला तरी दुसऱ्यांवर चढाई न करील तर, विषहीन सर्पाप्रमाणे, नेहमीं शत्रूच्या हल्ल्यांना पात्र होतो. १८८ उत्थानेनामृतं लब्धमुत्थानेनासुरा हताः ।
उत्थानेन महेन्द्रेण श्रेष्ठयं प्राप्तं दिवीह च ॥ १२॥५८।१४ [ देवांनासुद्धां ] प्रयत्नानेच अमृताची प्राप्ति झाली, व प्रयत्नानेच दैत्यांचा संहार करितां आला. इंद्रदेखील प्रयत्नानेंच इहपरलोकी श्रेष्ठपणा मिळविता झाला. १८९ उत्थायोत्थाय गच्छेत नित्ययुक्तो रिपोहान् ।
__कुशलं चास्य पृच्छेत यद्यप्यकुशलं भवेत्॥१२।१४०।२२ नेहमी सावध राहून दररोज उठून शत्रूच्या घरी जावे आणि तो जरी खुशाल नसला तरी त्याला कुशलप्रश्न विचारावे. १९० उत्पन्नस्य रुरोः शृङ्गं वर्धमानस्य वर्धते ।
प्रार्थना पुरुषस्येव तस्य मात्रा न विद्यते ॥ १३॥९३।४५ उपजलेलें हरिणाचे पोर वाढू लागले की त्याच्याबरोबर त्यांची शिंगेंही वाढत जातात. तद्वत् मनुष्याची हांव तो वाढू लागला की वाढू लागते. मग तिला काही मर्यादा रहात नाही. १९१ उत्साहश्चापि यत्नेन कर्तव्यो भूतिमिच्छता॥१॥१४०८५
वैभवाची इच्छा करणाऱ्याने उत्साहाने उद्योग केला पाहिजे. १९२ उदाराणां तु सत्कर्म दैवं क्लीवा उपासते ॥१२॥१३९।८२
श्रेष्ठ प्रकारचे लोक सत्कर्माची कास धरतात. दुबळे लोक दैवावर हवाला ठेवतात.
For Private And Personal Use Only
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३३
१९३ उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । ____ आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥६॥३०१५ ___ मनुष्याने आपण होऊन आपला उद्धार करावा. आपण आपला नाश करूं नये. कारण, प्रत्येक मनुष्य आपणच आपला बंधु ( हितकर्ता) किंवा आपणच आपला शत्रु होतो. १९४ उद्यच्छेदेव न नमेदुयमो ह्येव पौरुषम् ।
अप्यपर्वणि भज्येत न नमेतेह कस्यचित् ॥१२॥१३३।१० मानी पुरुषाने नेहमी ताठ (बाणेदारपणानें ) असावे कधी कोणापुढे वाकू नये. ताठपणाने मोडावें पण ( कोणापुढेहि ) वांकू नये. न वांकणे हाच खरा मानीपणा. १९५ उद्यम्य शस्त्रमायान्तमपि वेदान्तगं रणे ।
निगृह्णीयात्स्वधर्मेण धर्मापेक्षी नराधिपः ॥ १२॥५६२९ रणांगणांत शस्त्र उपसून धावून येणारा शत्रु वेदान्तविद्यापारंगत असला तरी त्याचा, धर्माची आस्था बाळगणाऱ्या राजाने धर्मयुद्ध करून मोड करावा. १९६ उन्मत्ता गौरिवान्धा श्रीः कचिदेवावतिष्ठते ॥ ५॥३९।६६
उन्मत्त गाईप्रमाणे, अविचारी लक्ष्मी कोठे तरी रहात असते ! १९७ उपस्थितस्य कामस्य प्रतिवादो न विद्यते।
__अपि निमुक्तदेहस्य कामरक्तस्य किं पुनः॥ ५।३९।४६ प्राप्त झालेल्या विषयाचा त्याग, देहाची पर्वा न करणाऱ्या जीवन्मुक्ताच्याहि हातून होणे शक्य नाही. मग विषयलंपट पुरुषाची गोष्ट कशाला पाहिजे ! १९८ ऊधश्छिन्द्यात्तु यो धेन्वाः क्षीरार्थी न लभेत्पयः।
. एवं राष्ट्रमयोगेन पीडितं न विवर्धते ॥१२७११६
दुधाच्या आशेनें जो गाईची कांस कापील त्याला दूध कधीच मिळणार नाही. त्याचप्रमाणे अयोग्य रीतीने कर वैगेरे लादून राष्ट्राला पीडा दिली असतां राष्ट्राचा उत्कर्ष होत नाही.
म. भा. ३
For Private And Personal Use Only
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१९९ ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न च कश्चिच्छृणोति मे ।
धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थ न सेव्यते ॥१८।५।६२ [ महर्षि व्यास म्हणतात. ] मी बाहू उभारून मोठ्याने ओरडून सांगतो आहे पण कोणीच माझे ऐकत नाही. बाबांनो, धर्मापासूनच अर्थ व काम प्राप्त होतात त्या धर्माचे आचरण तुम्ही कां करीत नाही ? २०० ऊर्ध्व प्राणा ह्युत्क्रामन्ति यूनः स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ॥ ५॥३८१ कोणी वृद्ध पुरुष जवळ येऊ लागला की, तरुणाचे प्राण वर जाऊं लागतात. त्याला सामोरे जाऊन वंदन केल्याने ते पुनः तरुणाला प्राप्त होतात. २०१ ऋणशेषमग्निशेषं शत्रुशेषं तथैव च ।
पुनः पुनःप्रवर्धन्ते तस्माच्छेषं न धारयेत् ॥१२॥१४०५८ ऋण, अग्नि व शत्रु यांचा थोडासा भाग जरी शिल्लक राहिला तरी तो पुनः पुनः वाहू लागतो. यास्तव त्यांचा काही अवशेष ठेवू नये. २०२ ऋषीणां च नदीनां च कुलानां च महात्मनाम् ।
प्रभवो नाधिगन्तव्यः स्त्रीणां दुश्चरितस्य च ॥५॥३५/७२ ___ ऋषि, नद्या व थोर लोकांचे कुल, त्याचप्रमाणे स्त्रियांचे दुश्चरित्र यांचे मूळ शोधण्याच्या भरीस पडूं नये. २०३ एक एव चरेद्धर्म नास्ति धर्मे सहायता ।
केवलं विधिमासाद्य सहायः किं करिष्यति।।१२।१९३३३२ केवळ धर्मविधीचा आश्रय करून स्वतः एकट्यानेच धर्माचे आचरण करावें. धर्माचरणांत दुसऱ्याच्या साहाय्याची अपेक्षाच नाही.. मग साहाय्यकर्त्यांचा उपयोग काय ?
For Private And Personal Use Only
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२०४ एकं विषरसो हन्ति शस्त्रेणैकश्च वध्यते ।
___ सराष्ट्र सप्रजं हन्ति राजानं मन्त्रविप्लवः ।।५।३३।४५ _ विष एकालाच ठार मारतें आणि शस्त्रानेसुद्धां एकाचाच घात होतो. परंतु राजाच्या गुप्त मसलतीत काही बिघाड झाला, तर तो सर्व प्रजेसह राजाच्या नाशाला कारणीभूत होतो. २०५ एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता ।
बुद्धिबुद्धिमतोत्सृष्टा हन्याद्राष्ट्र सराजकम् ॥ ५॥३३॥४३ तिरंदाजाने सोडलेला तीर जेमतेम एका प्राण्याचा वध करील न करील. परंतु बुद्धिमान् पुरुषाने योजलेली युक्ति राजासह सर्व राष्ट्राचा घात करील. २०६ एकः क्रुद्धो ब्राह्मणो हन्ति राष्ट्रम् ॥ ५।४०८
क्रुद्ध झालेला एक ब्राह्मण सर्व राष्ट्राचा नाश करूं शकेल. २०७ एकः क्षमावतां दोषो द्वितीयो नोपपद्यते ।
यदेनं क्षमया युक्तमशक्तं मन्यते जनः ॥ ५॥३३॥४८ क्षमाशील पुरुषांच्या ठायीं एकच दोष आढळतो, दुसरा नाही. तो दोष एवढाच की, त्याच्या सहनशीलतेमुळे लोक त्याला दुर्बल समजतात. २०८ एकः पापानि कुरुते फलं भुङ्क्ते महाजनः ।
भोक्तारो विप्रमुच्यन्ते को दोषेण लिप्यते ॥ ५॥३३॥४२ एकजण पाप करतो व त्याचे फळ पुष्कळ लोकांना भोगावे लागते. परंतु हे भोगणारे अजीबात सुटून जातात आणि कर्त्याला मात्र पापाचा दोष लागतो. २०९ एकत्र चिरवासो हि न प्रीतिजननो भवेत् ॥ ३॥३६३६
एकाच ठिकाणी फार दिवस राहणें सुखावह होत नाही. २१० एकमेव हि लोकेऽस्मिन्नात्मनो गुणवत्तरम् ।
इच्छन्ति पुरुषाः पुत्रं लोके नान्यं कथंचन ॥ ७१९४१५ या जगांत एक पुत्रच तेवढा आपल्यापेक्षा अधिक गुणवान् व्हावा, असें लोक इच्छीत असतात; दुसरा कोणीहि असा वरचढ होण्याची इच्छा करीत नाहीत. ...
For Private And Personal Use Only
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२११ एकशत्रुवधेनैव शूरो गच्छति विश्रुतिम् ॥ ५॥१३४।२३
एका शत्रूचा वध करितांच शूराची प्रसिद्धि होत असते. २१२ एकः शत्रुने द्वितीयोऽस्ति शत्रुः ___ अज्ञानतुल्यः पुरुषस्य राजन् ।। १२।२९७।२८
मनुष्याचा एकच शत्रु आहे, अज्ञानासारखा दुसरा कोणताच शत्रु नाही. २१३ एकस्मिन्नेव जायते कुले क्लीबमहाबलौ। ___ फलाफलवती शाखे यथैकस्मिन्वनस्पतौ ॥ ५॥३३ एकाच वृक्षावर ज्याप्रमाणे फळांनी भरलेली व फलरहित अशा दोनहि प्रकारच्या खांद्या असतात, त्याप्रमाणे एकाच कुळांत अति बलिष्ठ व अत्यंत दुर्बळ पुरुष जन्माला येतात. २१४ एकस्मिन्नेव पुरुषे सा सा बुद्धिस्तदा तदा ।
भवत्यकृतधर्मत्वात् सा तस्यैव न रोचते ॥१०३१३ मनावर धर्माचा संस्कार झालेला नसल्यामुळे एकाच मनुष्याच्या ठिकाणी समयानुरूप निरनिराळे विचार उत्पन्न होतात, व पुढे ते त्याचे त्यालाच आवडेनासे होतात. २१५एकान्ततोन विश्वासःकार्यो विश्वासघातकैः॥१२॥१३९।२८
विश्वासघात करणाऱ्यांवर पूर्ण विश्वास टाकू नये. २१६ एकान्तेन हि विश्वासः कृत्स्नो धर्मार्थनाशकः । ____ अविश्वासश्च सर्वत्र मृत्युना च विशिष्यते ॥ १२१८०१०
कोणावरहि सर्वथा विश्वास ठेविल्याने धर्म व अर्थ यांचा नाश होतो. उलट, कोणाचाच विश्वास न धरणे हे मरणापेक्षा दुःखदायक होय. २१७ एकान्तेन हि सर्वेषां न शक्यं तात रोचितुम् ॥१२॥८९।१९
कोणतीहि गोष्ट सर्वांना सर्वथा आवडणे शक्य नाही. २१८ एतज्ज्ञानं विदुर्विप्रा ध्रुवमिन्द्रियधारणम् ॥ ५।६९।२० खरोखर इंद्रिये ताब्यात ठेवणे यालाच ज्ञाते पुरुष ज्ञान असे म्हणतात.
For Private And Personal Use Only
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२१९ एतत्पृथिव्याममृतमेतच्चक्षुरनुत्तमम् ।
यद्ब्राह्मणमुखाच्छास्त्रमिह श्रुत्वा प्रवर्तते ॥१३॥३६।१० ब्राह्मणाच्या तोंडून शास्त्रार्थ ऐकून त्याप्रमाणे वर्तन करणे हे पृथ्वीवरील अमृत होय, हेच सर्वोत्कृष्ट दिव्य ज्ञान होय. “२२० एतावानेव पुरुषः कृतं यस्मिन्न नश्यात ॥११५७।१४
ज्याच्या टिकाणी केलेला उपकार व्यर्थ जात नाही तोच मनुष्य म्हणावयाचा. २२१ एतावानेव पुरुषो यदमर्षी यदक्षमी ॥ ५।१३३३३३
जो अपमान व अपकार सहन करीत नाही, तोच पुरुष. २२२ ऐकगुण्यमनीहायामभावः कर्मणां फलम् । ___अथ द्वैगुण्यमीहायां फलं भवति वा न वा ॥५/१३५।२८
उद्योगरहित राहिले असतां उद्योगाने प्राप्त होणारें में फल त्याचा अभाव हा एकच प्रकार संभवतो. परंतु उद्योग करीत राहिले असतां, फल प्राप्त होणे व न होणे असे दोन प्रकार संभवतात. २२३ ऐश्वर्यमदमत्तो हि नापतित्वा विबुध्यते ॥ ५॥३४॥५३ __ ऐश्वर्यमदानें धुंद झालेला मनुष्य ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्याशिवाय शुद्धीवर येत नाही. २२४ कः कस्य चोपकुरुते कश्च कस्मै प्रयच्छति ।
प्राणी करोत्ययं कर्म सर्वमात्मार्थमात्मना ॥ १२।२९२।१ कोण कोणावर उपकार करणार ? आणि कोण कोणाला देणार ? जो तो प्राणी सर्व कांही स्वतःकरितां करीत असतो. २२५ कच्चिच्छारीरमाबाधमौषधैर्नियमेन वा।
मानसं वृद्धसेवाभिः सदा पार्थापकर्षास ॥२।५।८९* [ नारदमुनि विचारतात ] बा युधिष्ठिरा, शारीरिक पीडा औषधाने व नियमित आचरणाने आणि मानसिक पीडा वृद्ध जनांची सेवा करून तूं नेहमी दूर करतोस ना ?
__* श्लोक २२५ ते २३१ नारदमुनींनी युधिष्ठिराला विचारलेल्या ' कच्चितप्रश्नांतील' आहेत.
For Private And Personal Use Only
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३८
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
२२६ कच्चित्कृतं विजानीषे कर्तारं च प्रशंससि ।
सतां मध्ये महाराज सत्करोषि च पूजयन् ॥ २/५ ।११९
( नारदमुनि युधिष्ठिराला विचारितात ) राजा, तूं केलेला उपकार स्मरतोस ना ? आणि उपकारकर्त्यांची प्रशंसा करतोस ना ? त्याचप्रमाणे चांगल्या लोकांसमोर त्याचा गौरव करून सत्कार करतोस ना ?
२२७ कच्चित्ते सर्वविद्यासु गुणतोऽर्चा प्रवर्तते ।। २/५/९६
[ राजा ], तूं सर्व विद्यांचा त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें परामर्ष घेतोस ना ? २२८ कच्चित्सहस्रैर्मूर्खाणामेकं क्रीणासि पण्डितम् ।
पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यान्निःश्रेयसं परम् || २/५/३५
हजारों मूर्ख देऊन त्यांच्या बद्दल एक पंडित तूं विकत घेतोस का ? कारण अडीअडचणीच्या प्रसंगीं पंडिताचा फार उपयोग होईल.
२२९ कच्चि प्रथम यामौ रात्रेः सुप्त्वा विशांपते ।
संचिन्तयसि धर्मार्थी याम उत्थाय पश्चिमे || २/५/८५
राजा, रात्रींच्या दुसऱ्या व तिसऱ्या ह्या दोन प्रहरांत झोप घेतोस ना ? शेवटच्या ( चौथ्या ) प्रहरीं उठून तूं धर्मार्थाचें चिंतन करतोस ना ?
२३० कच्चिद्राष्ट्रे तडागानि पूर्णानि च बृहन्ति च
भागशो विनिविष्टानि न कृषिर्देवमातृका || २/५/७७
तुझ्या राज्यांत पाण्याने तुडुंब भरलेले मोठाले तलाव जागोजाग खोदलेले आहेत ना ? शेती केवळ पावसावर अवलंबून नाहीं ना ?
२३१ कच्चिद्विद्याविनीतांश्च नराञ्ज्ञानविशारदान् ।
यथा गुणतश्चैव दानेनाभ्युपपद्यसे || २/५/५३
विद्याविनयसंपन्न व कलाकुशल गुणी जनांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें व गुणाप्रमाणे पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करतोस ना ?
For Private And Personal Use Only
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
२३२ कपाले यद्वद्दापः स्युः श्वदृतौ च यथा पयः । आश्रयस्थानदोषेण वृत्तहीने तथा श्रुतम् || १२|३६|४२
३९
ज्याप्रमाणें मस्तकाच्या कवटींत ठेवलेले पाणी किंवा कुत्र्याच्या कातड्याच्या पिशवीत घातलेलें दूध आश्रयस्थान वाईट असल्यामुळे दूषित होतें, त्याप्रमाणें आचारहीन मनुष्याचें ज्ञान व्यर्थ होतें.
२३३ करिष्यन्न प्रभाषेत कृतान्येव तु दर्शयेत् || ५|३८|१६ एकादी गोष्ट करण्याचें मनांत असतांच उगाच बोलू नये. काय तें करूनच दाखवावें.
२३४ कर्णिनालीकनाराचान् निर्हरन्ति शरीरतः ।
वाक्शल्यस्तु न निर्हर्तुं शक्यो हृदिशयो हि सः || ५ | ३४।७९
शरीरांत रुतलेला बाण, तीर किंवा भाला उपटून काढतां येतो. वाग्बाण मात्र उपटून काढतां येत नाहीं; कारण तो हृदयांत खोल शिरून बसलेला असतो. २३५ कर्तव्यमिति यत्कार्य नाभिमानात्समाचरेत् ||३|२|७६ कर्तव्य म्हणून जें करावयाचें तें अहंकारबुद्धीनें करूं नये.
२३६ कर्मणा येन केनैव मृदुना दारुणेन च ।
उद्धरेद्दीनमात्मानं समर्थो धर्ममाचरेत् ||१|१४० /७२
सौम्य किंवा तीव्र कोणत्याहि उपायाने प्रथमतः आपला हीन स्थितींतून उद्धार करावा; आणि समर्थ होऊन धर्माचरण करावें.
२३७ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि || ६ |२६|४७
[ अर्जुना ], फक्त कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, कर्मफलाच्या ठिकाण मुळींच नाहीं. [ यासाठी ] तूं कर्मफलाची इच्छा करूं नकोस. तसेंच कर्म न करण्याचाहि आग्रह धरूं नको.
२३८ कर्मभूमिरियं ब्रह्मन् फलभूमिरसौ मता ||३|२६१।३५ मृत्युलोक ही कर्मभूमि असून परलोक ही फलभूमि आहे, असें म्हणतात.
For Private And Personal Use Only
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
-
~
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि २३९ कल्योत्थानरतिनित्यं गृहशुश्रूषणे रता । . सुसंमृष्टक्षया चैव गोशकृत्कृतलेपना ॥ १३१४६१४८ · [स्त्रीनें ] सकाळी लवकर उठून दक्षतेने घरकाम करावे. सर्व घर उत्तमप्रकारें झाडून स्वच्छ करावे. आणि गाईच्या शेणाने सारवून काढावे. २४० कश्चित्तरति काष्ठेन सुगम्भीरां महानदीम् ।
स तारयति तत्काष्ठं स च काष्ठेन तार्यते॥१२॥१३८१६२ एकादा प्राणी लाकडाच्या ओंड्याचा आश्रय करून अतिखोल व विस्तीर्ण नदी तरून जातो. [ त्यासमयीं ] तो त्या लाकडाला नदीपार करतो, व लाकूडहि त्याला तारून नेते. २४१ कामक्रोधग्राहवती पञ्चेन्द्रियजला नदीम् ।
नावं धृतिमयीं कृत्वा जन्मदुगाणि संतर ॥५४०२२ काम व क्रोध ह्या जिच्यांतील सुसरी आहेत, आणि चक्षुरादि पांच इंद्रिये हे जिच्यांतील उदक आहे, अशी ही संसाररूप नदी ज्ञानरूप नौकेचे अवलंबन करून जन्ममरणपरंपरारूप धोक्याची स्थळे चुकवून तरून जा. २४२ कामचारी तु कामेन य इन्द्रियसुखे रतः।
ब्रह्मचारी सदैवैष य इन्द्रियजये रतः ॥ १४॥२६।१५ विषयलालसेनें जो इंद्रियसुखांत गढून जातो तो कामचारी होय. जो सदैव इंद्रियांचे दमन करण्यांत आनंद मानतो तो ब्रह्मचारी होय. २४३ कामं नैतत्पशंसन्ति सन्तः स्वबलसंस्तवम् ।
गुणसंकीर्तनं चापि स्वयमेव शतक्रतो ॥ ॥३४२ (गरूड म्हणतो ) हे इंद्रा, स्वतःच्या बळाची स्तुति करणे आणि आपणच आपलें गुणवर्णन करणे हे सज्जनांना मुळींच प्रशस्त वाटत नाही. २४४ कामे प्रसक्तः पुरुषः किमकार्य विवर्जयेत् ॥१२।८८२१ कामासक्त पुरुष कोणतें अकार्य वर्ण्य करील ?
For Private And Personal Use Only
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४१
२४५ काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः।
सर्वकर्मफलत्यागं माहुस्त्यागं विचक्षणाः ॥ ६४२।२ [भगवान् श्रीकृष्ण सांगतात ] सकाम कर्माचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष संन्यास असे म्हणतात. आणि सर्व कर्माच्या फलाचा म्हणजे फलाशेचा त्याग करणे यालाच शहाणे लोक त्याग म्हणतात. २४६ कारणात्मियतामेति
द्वेष्यो भवति कारणात् । अर्थार्थी जीवलोकोऽयं
न कश्चित्कस्यचित्मियः ॥ १२।१३८।१५२ कोणी झाला तरी काहीतरी कारणानेच प्रिय वाटतो, व कारणानेंच द्वेष्य वाटतो. हे जग सगळे स्वार्थी आहे. [ खरोखर निष्कारण ] कोणी कोणाला प्रिय नसतो. २४७ कारणाद्धर्ममन्विच्छन्न लोकचरितं चरेत् ॥१२।२६२।५३
हेतूकडे लक्ष्य देऊन धर्माचरण करावें, केवळ लोकांनी केले म्हणून आपणहि तसें करूं नये. २४८ कार्यापेक्षा हि वर्तन्ते
भावस्निग्धाः सुदुलेभाः ॥ १२॥११११८६ कार्याच्या अपेक्षेनेंच लोक प्रेमाने वागतात. खरोखर स्वभावतःच प्रेमळ असे लोक अत्यंत दुर्लभ. २४९ कालः कर्षति भूतानि सर्वाणि विविधान्युत ।
न कालस्य प्रियः कश्चिन्न द्वेष्यः कुरुसत्तम ॥ ११।२।८ [विदुर धृतराष्ट्राला म्हणतो. ] हे कुस्श्रेष्ठा, निरनिराळ्या प्रकारच्या सर्व प्राण्यांना काळ ओढून नेतो. काळाला कोणी प्रिय नाही, कोणी द्वेष्य नाही. २५० कालः पचति भूतानि कालः संहरते प्रजाः।
कालः सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः॥११।२।२४ काळ प्राण्यांना शिजवून काढतो; काळ प्रजेचा संहार करतो, सर्व प्राणी झोपीं गेले असतां काळ जागा राहतो. खरोखर काळाचे अतिक्रमण करणे अशक्य आहे !
For Private And Personal Use Only
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४२ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि २५१ कालः पचति भूतानि सर्वाण्येवात्मनात्मनि ।
यस्मितु पच्यते कालस्तं वेदेह न कश्चन ॥१२॥२३९।२५ काळ स्वतः सर्व प्राण्यांना आपल्या पचनी पाडतो, परंतु काळाला जो पचनी पाडतो त्या परमात्म्याला कोणीच जाणत नाही. २५२ कालमूलमिदं सर्व भावाभावौ सुखासुखे ॥ १।१।२४७
जन्म आणि मृत्यु, सुख आणि दुःख ही सर्व काळावर अवलंबून आहेत. २५३ काले काले तु संप्राप्ते मृदुस्तीक्ष्णोऽपि वा भवेत् ॥३।२८।२४
जसजशी वेळ येईल त्याप्रमाणे सौम्य किंवा कठोर वृत्तीने वागावें. २५४ कालेन पादं लभते तथार्थ
ततश्च पादं गुरुयोगतश्च । उत्साहयोगेन च पादमृच्छेत्
शास्त्रेण पादं च ततोऽभियाति ॥ ५।४४१६ प्रथमतः गुरूंपासून चतुर्थांश विद्या प्राप्त होते; नंतर आपल्या बुद्धिवैभवानें चतुर्थाश; कालांतराने विचारपरिपक्कतेमुळे चतुर्थाश; आणि आपल्याबरोबरच्या लोकांशी चर्चा केल्याचे योगाने (विचारविनिमयाने ) चतुर्थांश विद्या प्राप्त होते. (या श्लोकांत पाठक्रमाहून अर्थक्रम भिन्न आहे असें टीकाकारांनी म्हटले आहे त्याला अनुसरून वरील अर्थ दिला आहे.) २५५ कालेन रिपुणा संधिः काले मित्रेण विग्रहः।
कार्य इत्येव संधिज्ञाःपाहुर्नित्यं नराधिप।१२।१३८।२०८ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात.) हे राजा, प्रसंगानुसार शत्रूशीहि संधि करावा, व मित्राशींहि विरोध करावा, असेंच संधिवेत्ते लोक सदैव सांगत असतात. २५६ कालेनाभ्याहताः सर्वे कालो हि बलवत्तरः॥१२।२२७५६ काळाने सर्वांना मारून टाकले आहे. काळ सर्वांना पुरून उरला आहे.
For Private And Personal Use Only
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहामारतसुभाषितानि
२५७ काले मृदुर्यो भवति काले भवति दारुणः ।
प्रसाधयति कृत्यानि शत्रु चाप्यधितिष्ठति॥१२॥१४०६७ योग्य वेळी जो सौम्य होतो व योग्यवेळी भयंकर होतो त्याची सर्व कार्य सिद्धीस जातात आणि तोच शत्रूला आपल्या ताब्यात ठेवितो. २५८ काले हि समनुप्राप्ते त्यक्तव्यमपि जीवनम् ॥ ५।९०७७.
तसाच प्रसंग पडला असतां जीविताचासुद्धा त्याग केला पाहिजे. २५९ कालोन परिहार्यश्च न चास्यास्ति व्यतिक्रमः॥१२॥२२७।९७
काळाला चुकवितां येणे शक्य नाही. तसेंच त्याचा प्रतिकारहि करितां यावयाचा नाही. २६० कालोपहतचित्ता हि सर्वे मुह्यन्ति भारत ॥ ९॥६३।४७
खरोखर काळाने बुद्धि ग्रासून टाकली असता सर्वांना मोह पडत असतो. २६१ कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम् । . इति ते संशयो माभूद्राजा कालस्य कारणम् ॥ १२॥६९/७९
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात.) काळ हा राजाला कारण होतो का राजा हाच काळाला कारण होतो, याविषयीं तूं संशयांत पडूं नको. कांकी, राजा हाच काळाला कारण आहे. २६२ कालो हि परमेश्वरः ॥ १३॥१४८।३९
काळ हा खरोखर परमेश्वरच आहे ! २६३ किंचिदेव ममत्वेन यदा भवति कल्पितम् ।
तदेव परितापार्थं नाशे संपद्यते पुनः ।। १२।२७६।८ एकाद्या वस्तूविषयी ही माझी' अशी भावना धरिली, म्हणजे त्या वस्तूचा नाश झाला असतां तीच दुःखाला कारण होते. २६४ किं तस्य तपसा राज्ञः किंच तस्याध्वरैरपि ।
सुपालितप्रजो यः स्यात् सर्वधर्मविदेव सः॥१२।६९/७३ जो राजा प्रजेचें उत्तम प्रकारे पालन करितो तो सर्व धर्म जाणणाराच होय. अशा राजाला तप काय करावयाचें ? यज्ञांची तरी त्याला काय गरज ? २६५ किं तु रोषान्वितो जन्तुहेन्यादात्मानमप्युत ॥ ७१५६।९५
खरोखर क्रोधाविष्ट झालेला मनुष्य स्वतःचा देखील घात करील.
For Private And Personal Use Only
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२६६ किं तैर्येऽनडुहो नोह्याः किं धेन्वा वाप्यदुग्धया ।
वन्ध्ययाभार्ययाकोऽर्थः कोऽर्थो राज्ञाप्यरक्षता॥१२७८४१ जे वाहून नेण्याच्या कामी येत नाहीत त्या बैलांचा काय उपयोग ? दूध न देणारी गाय काय कामाची ? वांझ स्त्री काय करावयाची ? तसेंच, रक्षण न करणारा राजा हवा कशाला? २६७ किं नु मे स्यादिदं कृत्वा किं नु मे स्यादकुर्वतः।
इति कर्माणि संचिन्त्य कुर्यादा पुरुषो न वा ॥५॥३४।१९ हे केल्याने माझा काय फायदा होईल, न केल्याने काय तोटा होईल, असा विचार करून मग कोणतेंहि कार्य मनुष्याने करावे अथवा करूं नये. २६८ कीर्तिरक्षणमातिष्ठ कीर्तिर्हि परमं बलम् ।
नष्टकीर्तेर्मनुष्यस्य जीवितं ह्यफलं स्मृतम् ॥ १।२०३।१० कीर्ति राखण्याकरितां झटून प्रयत्न कर. कारण, कीर्ति हे श्रेष्ठ प्रकारचे बल आहे. ज्याची कीर्ति नष्ट झाली त्या मनुष्याचे जिणें व्यर्थ गेले. २६९ कीर्तिर्हि पुरुषं लोके संजीवयति मातृवत् ।
अकीर्तिर्जीवितं हन्ति जीवतोऽपि शरीरिणः ॥३३००।३२ कीर्ति ही मातेप्रमाणे मनुष्याला जगांत खरेखुरे जीवन प्राप्त करून देते. अपकीर्ति जिवंत असलेल्या प्राण्याच्याहि जीविताचा नाश करिते. २७० कुतः कृतघ्नस्य यशः कुतः स्थानं कुतः सुखम् ।
अश्रद्धेयः कृतघ्नो हि कृतघ्ने नास्ति निष्कृतिः॥१२।१७३।२० कृतघ्न मनुष्याला यश कोठून येणार ? अधिकार कोठचा ? आणि सुख तरी कोठचें ? [ अर्थात् त्याला यांपैकी काहींच मिळत नाही ]. कारण, कृतघ्न हा अविश्वसनीय बनलेला असतो. कृतघ्नाला प्रायश्चित्त नाही. २७१ कुर्यात्कृष्णगतिः शेषं ज्वलितोऽनिलसारथिः । __न तु राजाभिपन्नस्य शेषं कचन विद्यते ॥ १२॥६८१५० वारा ज्याचा सहकारी आहे असा प्रज्वलित झालेला अग्नि एक वेळ दग्ध केलेल्या वस्तूंतील काही शेष ठेवील. परंतु राजाने ज्याच्यावर हल्ला केला त्याचे काहीएक शिल्लक राहणार नाही.
For Private And Personal Use Only
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
२७२ कुर्यात्तृणमयं चापं शयीत मृगशायिकाम् । अन्धःस्यादन्धवेलायां बाधिर्यमपि संश्रयेत्।। १२।१४०।२७
[ राजानें प्रसंगविशेषीं ] तृणाचें देखील धनुष्य करावें, हरिणाप्रमाणे सावधपणानें झोंप घ्यावी, अंध होण्याचा प्रसंग आल्यास अंधाप्रमाणें वागावें, व [ बधिर होण्याचा प्रसंग आल्यास ] बहिरेपणाचाहि आश्रय करावा.
४५
२७३ कुलानि समुपेताति गोभिः पुरुषतोऽर्थतः ।
कुलसंख्यां न गच्छन्ति यानि हीनानि वृत्तः || ५ | ३६।२८ गोधन, कर्तबगार पुरुष आणि द्रव्य यांच्या योगानें कुलांना मोठेपणा प्राप्त होत असतो. पण तीं आचार भ्रष्ट असली तर त्यांची गणना चांगल्या कुळांत होत नाहीं. २७४ कुलीनस्य च या निन्दा वधो वाऽमित्रकर्शन ।
महागुणो वधो राजन्न तु निन्दा कुजीविका ||५/७३।२४
( श्रीकृष्ण म्हणतात. ) हे शत्रुनाशका धर्मराजा, कुलीन पुरुषाची निंदा अथवा वध होण्याचा प्रसंग आला असतां त्याचा वध होणें फार बरें; जीवितच दुःखदायक करून टाकणारी निंदा बरी नव्हे.
२७५ कृतज्ञेन सदा भाव्यं मित्रकामेन चैव ह ।। १२।१७३।२२ मनुष्यानें सदैव कृतज्ञ असावें, व मित्र जोडण्याविषयीं इच्छा बाळगावी. २७६ कृतं ममाप्रियं तेन येनायं निहतो मृधे ।
इति वाचा वदन्हन्तून् पूजयेत रहोगतः || १२ | १०२।३७
' संग्रामांत ज्याने या योद्ध्याचा वध केला असेल त्यानें माझें अप्रिय केलें ' असे उद्गार तोंडाने काढावे, आणि अंतस्थ रीतीने त्या शत्रूला ठार मारणाऱ्यांचा गौरव करावा.
२७७ कृतवैरे न विश्वासः कार्यस्त्विह सुहृद्यपि ।
छन्नं संतिष्ठते वैरं गूढोऽग्निरिव दारुषु || १२ | १३९/४४ वैर करणारा मनुष्य जरी मूळचा मित्र असला तरी त्याजवर विश्वास ठेवू नये.. कारण, लाकडांत दडून राहिलेल्या अमीप्रमाणें वैर गुप्तपणे वसत असतें.
For Private And Personal Use Only
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२७८ कृतार्था भुञ्जते दूताः पूजां गृह्णन्ति चैव ह ॥ ५।९१११८
चांगले दूत कामगिरी पार पाडल्यावरच आराम करतात व सत्कार स्वीकारतात. २७९ कृती सर्वत्र लभते प्रतिष्ठां भाग्यसंयुताम् ।
__ अकृती लभते भ्रष्टः क्षते क्षारावसेचनम् ॥१३।६।११ कार्यात सिद्धि पावलेल्या मनुष्याला सर्वत्र मानसन्मान व सद्भाग्य लाभते. यशस्वी न झालेला, जखमेवर खारे पाणी शिंपडावे त्याप्रमाणे तिरस्काराला पात्र होतो. २८० कृपणं विलपन्ना? जरयाभिपरिप्लुतः।
म्रियते रुदतां मध्ये ज्ञातीनां न स पूरुषः॥ ९।५।३४ शरीर जरेने व्यापलेले, व्याधिग्रस्त होऊन करुणपणे विलाप करतो आहे आणि आप्तस्वकीय भोवताली बसून रडत आहेत अशा स्थितीत जो मरण पावतो, तो पुरुषच नव्हे. २८१ कृपणाः फलहेतवः ।।६।२६।४९ __ कर्मफलाची इच्छा करणारे दीन होत. २८२ के न हिंसन्ति जीवान् लोकेऽस्मिन्दिजसत्तम ।
बहु संचिन्त्य इति वै नास्ति कश्चिदहिंसकः॥३२०८६३३ (धर्मव्याध म्हणतो. ) या मर्त्यलोकांत जीवांची हिंसा कोण करीत नाहीत ? या विषयी पुष्कळ विचार केला असतां [ असे दिसून येते की ] खरोखर मुळीच हिंसा • न करणारा कोणीच नाही. २८३ को हि जानाति कस्याद्य मृत्युकालो भविष्यति ।
युवैव धर्मशील स्यादनित्यं खलु जीवितम् ॥१२।१७५।१६ - आज कोणाचा मरणदिवस आहे हे कोण जाणू शकेल ? [ अर्थात् कोणीच नाही. या साठी ] मनुष्याने तरुणपणींच धर्मपरायण व्हावे. कारण, जीवित हे खरोखर क्षणभंगुर आहे.
For Private And Personal Use Only
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२८४ को हि नाम पुमाँल्लोके मर्षयिष्यति सत्त्ववान् ।
सपत्नानृध्यतो दृष्टा हीनमात्मानमेव च ।। २।४७१३२ आपल्या वैयांचा उत्कर्ष होत आहे, आणि आपण मात्र हीनस्थितीत आहों, असें पाहून खरोखर कोणता बाणेदार पुरुष ते सहन करील ? २८५ कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥६।३३।३१
(श्रीकृष्ण म्हणतात.) अर्जुना, माझा (भगवंताचा ) भक्त कधींहि नाश पावत नाहीं हे तूं पक्कं समज. २८६ ऋव्यादा अपि राजेन्द्र कृतघ्नं नोपभुञ्जते ॥१२।१७२।२४
हिंस्र पशुपक्षीसुद्धां कृतघ्नाला भक्षण करीत नाहीत. २८७ क्लीबा हि वचनोत्तराः ॥ ५।१६२।४४
नामर्द लोक नुसते बोलण्यांत शूर असतात. २८८ क्लेशान्मुमुक्षुः परजात्स वै पुरुष उच्यते ॥ २।४९।१३
शत्रूकडून होणारी पीडा दूर करण्यास झटतो त्यालाच पुरुष म्हणावें. २८९ क्षताद्भीतं विजानीयादुत्तमं मित्रलक्षणम् ।
- ये तस्य क्षतमिच्छन्ति ते तस्य रिपवः स्मृताः॥१२।८०१९ . [राजावर ] येणाऱ्या संकटाची भीति वाटणे हे (राजाच्या) उत्तम मित्राचे लक्षण होय आणि जे त्याचा नाश इच्छितात ते त्या राजाचे शत्रुच होत. २९० क्षत्रधर्म विदित्वाहं यदि ब्राह्मण्यमाश्रितः ।
प्रकुर्या सुमहत्कर्म न मे तत्साधुसंमतम् ॥१०।३।२२ . [ अश्वत्थामा कृपाचार्यास म्हणतो. ] क्षत्रिय धर्म एकदा पत्करल्यावर जर मी ब्राह्मणधर्माला अनुसरून शमदमादिक मोठमोठी साधनें करीत बसेन, तर ते माझें करणें सज्जनांना पसंत पडणार नाही. ( 'विदित्वा' म्हणजे जाणून असा नेहमींचा अर्थ असतां या ठिकाणी ' पत्करल्यावर ' असा अर्थ प्रसंगानें व लक्षणेने घेतला आहे.)..
For Private And Personal Use Only
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२९१ क्षत्रियस्य मलं भैक्ष्यं ब्राह्मणस्याव्रतं मलम् । ८१४५।२३
भिक्षा मागणे हे क्षत्रियाला लांछन आहे, व्रतादिकांचा त्याग करणे हे ब्राह्मणाल लांछन आहे. २९२ क्षत्रियस्य महाराज जये वृत्तिः समाहिता ।
स वै धर्मस्त्वधर्मो वा स्ववृत्तौ का परीक्षणा ॥ २।५५/७ युद्धांत जय मिळविणे हा क्षत्रियाचा व्यवसाय ठरलेला आहे; मग त्यांत धर्म असो किंवा अधर्म असो. स्वतःच्या व्यवसायाची चिकित्सा करून काय फायदा ? २९३ क्षत्रियस्य विशेषेण हृदयं वज्रसंनिभम् ॥ १२।२२।९
क्षत्रियाचे अंतःकरण विशेषेकरून वज्रासारखें कठीण असले पाहिजे. २९४ क्षत्रियस्य सदा धर्मो नान्यः शत्रुनिबर्हणात् ॥४२११४३
सदोदित शत्रूचे पारिपत्य करणे याशिवाय क्षत्रियाचा दुसरा धर्म नाही. २९५ क्षत्रियस्य हि धर्मोऽयं हन्याद्धन्येत वा पुनः॥७१९७१३८
एकतर मारावें, नाही तर मरून जावें हाच क्षत्रियाचा धर्म. २९६ क्षत्रियस्यातिहत्तस्य ब्राह्मणेषु विशेषतः ।
ब्रह्मैव संनियन्तु स्यात्क्षत्रं हि ब्रह्मसंभवम् ॥१२।७८।२१ क्षत्रिय जर आपला धर्म सोडून विशेषतः ब्राह्मणांवर अत्याचार करूं लागेल, तर ब्राह्मणच त्याचे नियमन करील. कारण, क्षत्रिय हा ब्राह्मणापासून उत्पन्न झालेला आहे. २९७ क्षत्रियाणां बलं तेजो ब्राह्मणानां क्षमा बलम्॥१।१७५/२९
क्षत्रियांचे बळ पराक्रम. ब्राह्मणांचे बळ क्षमाशीलता. २९८ क्षममाणं नृपं नित्यं नीचः परिभवेज्जनः ।
हस्तियन्ता गजस्येव शिर एवारुरुक्षति ॥ १२॥५६।३९ राजा सदैव अपराध सहन करूं लागला, म्हणजे निकृष्ट प्रतीचे लोकसुद्धा त्याची अवज्ञा करूं लागतात. ( इतकेच नव्हे तर) हत्तीच्या मस्तकावर आरोहण करणाऱ्या महाताप्रमाणे ते त्याच्या डोक्यावर बसण्याची इच्छा करूं लागतात.
For Private And Personal Use Only
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
२९९ क्षमा गुणो ह्यशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा || ५|३३|४९
क्षमा हा दुर्बळांचा गुण, व समर्थाचें भूषण होय.
३०० क्षमा प्रशस्यते लोके न तु पापोऽर्हति क्षमाम् || ७|१९८।२६
क्षमा करणे ही गोष्ट लोकांत चांगली समजली जाते. तरीपण पापी मनुष्य क्षमेला पात्र नाहीं.
३०१ क्षमावन्तं हि पापात्मा जितोऽयमिति मन्यते ।। ७।१९८।२७ क्षमा करणाऱ्याविषयीं दुष्ट मनुष्याला वाटतें कीं आपण याला जिंकलें. ३०२ क्षमावान्निरमर्षश्च नैव स्त्री न पुनः पुमान् ॥ ५।१३३।३३ जो अपमान सहन करतो, ज्याला राग येत नाहीं तो स्त्रीहि नव्हे, तर तो नव्हेच नव्हे !
आणि पुरुष
३०३ क्षात्रो धर्मो ह्यादिदेवात्प्रवृत्तः
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पश्चादन्ये शेषभूताश्च धर्माः ॥ १२।६४।२१
३०४ क्षिप्रं विजानाति चिरं शृणोति
ब्रह्मदेवापासून क्षात्रधर्म हाच प्रथम उत्पन्न झाला, व नंतर दुसरे धर्म निर्माण झाले असून ते सर्व त्याचे अंगभूत आहेत.
विज्ञाय चार्थे भजते न कामात् । नासंपृष्टो व्युपयुके परार्थे
तत्प्रज्ञानं प्रथमं पण्डितस्य || ५|३३|२२
४९
सांगितलेलें चटकन् समजणे, दुसऱ्याचें म्हणणे पुरेसा वेळ ऐकून घेणें, इच्छेची पर्वा न करतां विचार करून कोणतीहि गोष्ट हातीं घेणें आणि कोणी विचारल्यावांचून दुसऱ्याच्या कामांत न पडणें, हें पंडिताचे मुख्य लक्षण होय.
३०५ क्षुधा निर्णदति प्रज्ञां धर्मबुद्धिं व्यपोहति ।
क्षुधापरिगतज्ञानो धृतिं त्यजति चैव ह । १४ ९० १९१ क्षुधा ही बुद्धिभ्रंश करते, धर्मबुद्धि नष्ट करते, आणि क्षुधेच्या योगानें मनुष्याचे ज्ञान पार नाहींसें होऊन त्याचें धैर्य गळून जातें.
म. भा. ४
For Private And Personal Use Only
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३०६ क्षेत्रं पुरुषकारस्तु दैवं बीजमुदाहृतम् ।
क्षेत्रबीजसमायोगात्ततः सस्यं समृध्यते ॥ १३॥६८ उद्योग हे शेत व दैव हे बी आहे ( उद्योगरूप ) शेत व [ दैवरूप ] बी यांचा संयोग झाला म्हणजे उत्तम प्रकारचे [ यशोरूपी ] पीक येते. ३०७ खरीवात्सल्यमाहुस्तनिःसामथ्येमहेतुकम् ॥ ५।१३५/८
में निष्कारण आणि निरुपयोगी वात्सल्य त्याला गाढवीचें प्रेम म्हणतात. ३०८ गतोदके सेतुबन्धो यादृक्ताङ्मतिस्तव ।
संदीप्ते भवने यद्वत्कूपस्य खननं तथा ॥ ६।४९।२३ (पांडवांशी युद्धाचा प्रसंग आणूं नको, म्हणून मी दुर्योधनाला परोपरीने सांगितले असें धृतराष्ट्राने म्हटले त्यावर संजयाने दिलेले हे उत्तर आहे.) पाणी वाहून गेल्यावर बंधारा बांधावा, किंवा घराला आग लावल्यावर विहीर खणूं लागावें त्यासारखा हा तुझा विचार आहे. ३०९ गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रसंग्रहैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता ॥ ६।४३३१ एकट्या गीतेचे चांगले अध्ययन करावें. इतर भाराभर शास्त्रांची गीतेपुढे काय मातब्बरी ? गीता ही प्रत्यक्ष पद्मनाभ जो परमात्मा श्रीकृष्ण त्याच्या मुखकमलांतून बाहेर पडलेली आहे. ३१० गुणयुक्तेऽपि नैकस्मिन्विश्वसेत विचक्षणः ॥१२॥२४॥१८
गुणसंपन्न अशाहि एकट्या मनुष्यावर शहाण्यानें विश्वास ठेवू नये. ३११ गुणानामेव वक्तारः सन्तः सत्सु नराधिप॥१२॥१३२।१३ __ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) सज्जन हे सज्जनांचे गुण तेवढेच सांगत असतात. ३१२ गुणान्गुणवतां शल्य गुणवान्वेत्ति नागुणः ।। ८१४०१२
(कर्ण म्हणतो.) हे शल्या, गुणवान् लोकांच्या गुणांची पारख स्वतः गुणी असलेल्यालाच होत असते; गुणहीन असलेल्याला होत नाही..
For Private And Personal Use Only
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१ मिळत.
३१३ गुरुरात्मवतां शास्ता शास्ता राजा दुरात्मनाम् ।
अथ प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः ॥ ५।३५/७१ सुष्टांचा शास्ता गुरु, आणि दुष्टांना शासन करणारा राजा होय. परंतु चोरून पापें करणाऱ्यांना शिक्षा करणारा विवस्वानाचा पुत्र यम हाच होय. ३१४ गुरुलाघवमादाय धर्माधर्मविनिश्चये ।
यतो भूयास्ततो राजन्कुरुष्व धर्मनिश्वयम् ॥ ३॥१३१।१३ ( ससाण्याच्या रूपाने आलेला इंद्र शिविराजाला म्हणतो. ) हे राजा, धर्म कोणता व अधर्म कोणता, याचा निर्णय करितांना तारतम्य पाहून त्यांतल्या त्यांत जो अधिक श्रेयस्कर दिसेल तोच धर्म, असें निश्चित समज. ३१५ गुरुशुश्रूषया ज्ञानं शान्ति योगेन विन्दति ॥ ५॥३६॥५२
गुरुशुश्रूषेनें ज्ञान आणि योगाने शांति मिळते. ३१६ गुरूणामवमानो हि वध इत्यभिधीयते ॥ ८७०।५१
गुरुजनांचा अपमान करणे म्हणजे त्यांचा वधच करणे होय ! ३१७ गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः ।
उत्पथप्रतिपन्नस्य न्याय्यं भवति शासनम् ॥१११४०५४ गर्वाने फुगून गेलेला, कार्य कोणतें अकार्य कोणते हे न जाणणारा, व दुर्मार्गाने चालणारा गुरु जरी असला तरी त्याला शिक्षा करणे न्याय्य आहे. ३१८ गृध्रदृष्टिबकालीनः श्वचेष्टः सिंहविक्रमः ।
अनुद्विग्नः काकशङ्की भुजङ्गचरितं चरेत् ॥१२॥१४०।६२ [ कार्यसाधु पुरुषाने ] गिधाडासारखी दूरदृष्टि ठेवावी, बगळ्याप्रमाणे निश्चल रहावें, कुत्र्यासारखें सावध असावे, सिंहासारखा पराक्रम गाजवावा. निर्भय राहून कावळ्याप्रमाणे साशंक असावें, व सर्पासारखें नागमोडी वर्तन ठेवावें. ३१९ गृहस्थस्त्वेष धर्माणां सर्वेषां मूलमुच्यते ॥ १२॥२३४१६ गृहस्थाश्रमी पुरुष हा सर्व धर्याचा मल आधार आ
For Private And Personal Use Only
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३२० गौरवेण परित्यक्तं निःस्नेहं परिवर्जयेत् ।
सोदर्य भ्रातरमपि किमुतान्यं पृथग्जनम् ॥ १२।२९२।२ सख्खा भाऊ जरी असला तरी त्याचे पूर्वीचे महत्त्व जाऊन तो शुष्क पडला, त्याचे द्रव्य संपलें म्हणजे इतर बांधव त्याच्या वान्यासही उभे रहात नाहीत. मग इतर सामान्य लोकांची गोष्ट कशाला ? ३२१ ग्रस्यतेऽकर्मशीलस्तु सदानथुरकिंचनः ॥ १२॥१३९८३
उद्योग न करणाऱ्या दरिद्री मनुष्यावर संकटे नेहमी कोसळत असतात. ३२२ चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि वलबद्दढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ६३०३४ [ अर्जुन म्हणतो ] हे श्रीकृष्णा, मन हे चंचल, [ इंद्रियांना विषयांकडे । जबरदस्तीने ओढून नेणारें बलिष्ठ आणि दृढ आहे. त्याचा निग्रह करणें हें वाऱ्याची मोट. बांधण्याप्रमाणे मला अत्यंत कठीण वाटते. ३२३ चण्डालत्वेऽपि मानुष्यं
सर्वथा तात शोभनम् ॥ १२।२९७३१ ( पराशर मुनि जनक राजाला म्हणतात ) बाबारे, चांडाळयोनीत का होईना, पण मनुष्याचा जन्म येणे हे सर्वात उत्तम. ३२४ चतुर्वेदोऽपि दुर्वृत्तः स शूद्रादतिरिच्यते ॥३॥३१३।१११
चारी वेद पढलेला असला तरी दुर्वर्तनी असेल तर तो शूद्रापेक्षांहि कनिष्ठ समजावा. ३२५ चत्वारि यस्य द्वाराणि सुगुप्तान्यमरोत्तमाः।
उपस्थमुदरं हस्तौ वाक्चतुर्थी स धर्मवित् ॥१२।२९९।२८ ( हंसरूपाने आलेला ब्रह्मदेव म्हणतो.) देव हो, उपस्थ, उदर, हात व चवथी वाणी ही चार द्वारें जो दाबांत ठेवतो तो धर्म जाणणारा होय. ३२६ चराणामचरा ह्यन्नमदंष्ट्रा दंष्ट्रिणामपि ।
आपः पिपासतामन्नमन्नं शूरस्य कातराः ॥ १२।९९।१५ स्थावर पदार्थ हे जंगम प्राण्यांचे अन्न होय. तसेंच दाढा नसलेले प्राणी दाढा असलेल्यांचे. पाणी हे तहानेलेल्यांचे अन्न. तसेंच भित्रे. लोक शूराचे भक्ष्य होत.
For Private And Personal Use Only
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३२७ चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः ॥ ६।२८।१३
[ भगवान् श्रीकृष्ण म्हणतात ] गुण आणि कर्म यांच्या अनुरोधाने चातुर्वर्ण्य मीच उत्पन्न केले. ३२८ चारैः पश्यन्ति राजानः ॥ ५॥३४॥३४
राजे लोक हेरांच्या द्वारे पहात असतात. ३२९ चिरं ह्यपि जडः शूरः पण्डितं पर्युपास्य ह । ___ न स धर्मान्विजानाति दर्वी सूपरसानिव ॥ १०५।३
जो बुद्धीचा जड तो धिमेपणाने फार दिवस जरी एकाद्या पंडिताजवळ राहिला तरी. पक्वान्नांतीळ पळीला पक्वान्नाची गोडी जशी कळत नाही, तसा त्याला धर्मतत्त्वांच बोध म्हणून होत नाही ! ३३० चिरकारी हि मेधावी नापराध्यति कर्मसु ॥ १२।२६६।३
विचारपूर्वक फार वेळानें काम करणारा बुद्धिमान् मनुष्य कामांत चुकत नाही. . ३३१ जरामृत्यू हि भूतानां खादितारौ वृकाविव ।
बलिनां दुर्बलानां च इस्वानां महतामपि ॥ १२।२८।१४ सबळ दुर्बळ, लहान थोर, सर्व प्राण्यांना जरा व मरण ही लांडग्यांप्रमाणे खाऊन टाकितात. ३३२ जरा रूपं हरति हि धैर्यमाशा
मृत्युः प्राणान्धर्मचर्याममूया । क्रोधः श्रियं शीलमनार्यसेवा
हियं कामः सर्वमेवाभिमानः ॥ ५॥३५/५० वार्धक्य रूपाचा नाश करतें; आशा धैर्याचा, मृत्यु प्राणांचा, मत्सर धर्माचरणाचा, क्रोध लक्ष्मीचा, दुर्जनसेवा शीलाचा, विषयेच्छा विनयाचा, आणि अभिमान सर्वस्वाचा नाश करतो.
For Private And Personal Use Only
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५४
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
३३३ जलौकावत्पिबेद्राष्ट्रं मृदुनैव नराधिपः ।
व्याघ्रीव च हरेत्पुत्रान् संदशेन्न च पीडयेत् || १२|८८ ५
एकाद्या जळूप्रमाणे राजानें सौम्यपणानेंच राष्ट्रांतील द्रव्य कराच्या रूपाने घ्यावे. वाघीण जशी पिलांना आपले दांत लागू न देतां उचलून नेते, त्याप्रमाणें प्रजेला त्रास न होईल अशा बेतानें तिजपासून कर घ्यावा.
३३४ जातमन्वेति मरणं नृणामिति विनिश्वयः || १२|२९७/२२ मनुष्य जन्मास आल्याबरोबर मरण त्याच्या पाठोपाठ येतें हैं निश्चित होय. ३३५ जातस्य हि ध्रुवो मृत्युर्घुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ।। ६ । २६।२७
( श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना, ) जन्मास आलेल्याला मरण ठेवलेलेच आहे; तसेंच मेलेल्याला पुनः जन्म ठेवलेलाच. यासाठीं, या अपरिहार्य असलेल्या गोष्टीबद्दल शोक करणें तुला शोभत नाहीं.
३३६ जिता सभा वस्त्रवता मिष्टाशा गोमता जिता ।
अध्वा जितो यानवता सर्वं शीलवता जितम् ||५|३४|४७ चांगलीं वस्त्रे परिधान करणाऱ्याला सभेमध्यें मान मिळतो. गाई बाळगणाऱ्या मनुष्याची मिष्टान्न खाण्याची हौस सिद्धीस जाते. ज्याच्यापाशीं वाहन असतें त्याला मार्ग सहज आक्रमण करतां येतो. आणि शीलवान् पुरुषाचें सर्वच कांहीं सिद्धीस जातें. ३३७ जीर्णमन्नं प्रशंसन्ति भार्यौ च गतयौवनाम् ।
शूरं विजितसंग्रामं गतपारं तपस्विनम् ||५|३५/६९
खाल्लेल्या अन्नाची प्रशंसा तें पचल्यावर करावी. तसेंच स्त्रीची तारुण्य उलटून गेल्यावर, शूराची लढाई जिंकल्यावर, आणि तपस्व्याची तपःसमाप्तीनंतर प्रशंसा करावी. ३३८ जीर्यन्ति जीर्यतः केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यतः ।
चक्षुःश्रोत्रे च जीर्यते तृष्णैका न तु जीर्यते || १३|७|२४ वार्धक्याने शरीर जर्जर झालें म्हणजे केस जीर्ण होतात, दांत जीर्ण होतात, डोळे आणि कानहि जीर्ण होतात; परंतु एकटी तृष्णा ( लोभ ) मात्र जीर्ण होत नाहीं !
For Private And Personal Use Only
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
३३९ जीवन्भद्राणि पश्यति || ४|३८|४२
कोणी झाला तरी आधीं जगेल तेव्हां मग चांगले दिवस पाहणार ! ३४० ज्ञातयो वर्धनीयास्तैर्य इच्छन्त्यात्मनः शुभम् ||५|३९|१८ स्वतःचें कल्याण व्हावें असें जे इच्छितात त्यांनी अगोदर आपल्या आप्तेष्टांचा उत्कर्ष करावा.
३४१ ज्ञानं तत्त्वार्थसंबोध: || ३ | ३१३।९०
ज्ञान म्हणजे आत्मतत्त्वाचा बोध होणें. ३४२ ज्यायांसमपिचेद्वद्धं गुणैरपि समन्वितम् ।
आततायिनमायान्तं हन्याद्धातकमात्मनः || ६ |१०७/१०१ मारण्याच्या इच्छेनें आपल्या अंगावर धांवून येणारा आततायी मनुष्य वयाने मोठा असला, किंबहुना वृद्ध असला, आणि गुणसंपन्न जरी असला तरी त्यास ठार करावें. ३४३ तदा स वृद्धो भवति तदा भवति दुःखितः ।
५५
तदा शून्यं जगत्तस्य यदा मात्रा वियुज्यते ।। १२/२६६।३० ज्यावेळी मनुष्याला मातेचा वियोग होतो त्यावेळींच तो खरा वृद्ध होतो, त्यावेळींच तो खरा दुःखी होतो आणि त्यावेळींच त्याला सर्व जग शून्य वाटतें ! ३४४ तदेवासनमन्विच्छेद्यत्र नाभिपतेत्परः || ४|४|१३
ज्या ठिकाणीं दुसरा कोणी येणार नाहीं [ व ऊठ म्हणून म्हणणार नाहीं ] अशीच जागा शोधून काढावी.
३४५ तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्रेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः || ६ |२८|३४
( श्रीकृष्ण म्हणत 'त हे अर्जुना, ) प्रणाम केल्यानें, परोपरीने प्रश्न विचारिल्यानें आणि सेवा केल्याने तत्त्वद्रष्टे ज्ञानी लोक तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील असें समज. ३४६ तपः श्रुतं च योनिश्चाप्येतद्ब्राह्मण्यकारणम् ।
त्रिभिर्गुणैः समुदितस्ततो भवति वै द्विजः ॥ १३।१२१।७ तप, वेदाध्ययन व ब्राह्मणकुलांत जन्म यांच्या योगानें ब्राह्मण्य प्राप्त होतें. या तीन गुणांनी युक्त असेल तरच तो द्विज या संज्ञेला पात्र होतो.
For Private And Personal Use Only
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३४७ तपसा प्राप्यते स्वर्गस्तपसा प्राप्यते यशः ।
आयुः प्रकर्षों भोगाश्च लभ्यन्ते तपसा विभो ॥१३॥५७/८ ( भीष्म युधिष्ठिराला म्हणतात,) तपानें स्वर्ग मिळतो, तपाने यश प्राप्त होते. आयुष्य, वैभव आणि सर्वप्रकारच्या उपभोग्य वस्तु तपानें प्राप्त होतात. ३४८ तपसा लभ्यते सर्वम् ॥१२॥१५३४
तपाने सर्व काही प्राप्त करून घेता येते. ३४९ तपसा विन्दते महत् ।।३।३१३१४८
तपाच्या योगाने मनुष्य महत्पदाला पोचतो. ३५० तपः स्वधर्मवर्तित्वम् ।। ३।३१३१८८
ता म्हणजे स्वधर्माप्रमाणे वागणे. ३५१ तपोर्थीयं ब्राह्मणी धत्त गर्भ
गौर्वोढारं धावितारं तुरङ्गी । शूद्रा दासं पशुपालं च वैश्या
वधार्थीयं क्षत्रिया राजपुत्री ॥ ११।२६।५ ब्राह्मणस्त्री गर्भ धारण करते तो त्याने [ जन्माला येऊन ] तप करावे म्हणून, गाईने ओझी वाहणारा, घोडीने धावणारा, शूद्रस्त्रीने दास्यकर्म करणारा, वैश्य स्त्रीने गुरे राखणारा आणि क्षत्रिय राजकन्येनें युद्धांत मरून जाणारा, गर्भ धारण केलेला असतो. ३५२ तरसा ये न शक्यन्ते शस्त्रैः सुनिशितैरपि ।
साम्ना तेऽपि निगृह्यन्ते गजा इव करेणुभिः।।१२।१३९।३९ जबरदस्तीने अथवा तीक्ष्ण शस्त्रांच्या योगानेंहि ज्यांना दाबांत ठेवितां येत नाही ते सुद्धा, हत्ती हत्तिणींना वश होतात त्याप्रमाणे, सामोपचाराने वश करितां येतात.
For Private And Personal Use Only
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३५३ तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम् । धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां
५७
महाजनो येन गतः स पन्थाः || ३ | ३१३।११७
[ धर्मतत्त्वाचा विचार करूं लागलें असतां ] युक्तिवाद लंगडा पडतो, श्रुतिवाक्यें "पहावीं तर ती निरनिराळ्या प्रकारचीं आहेत, ज्याचें मत सर्वाना प्रमाण आहे असा एकहि ऋषि आढळून येत नाहीं. तात्पर्य, धर्माचं तत्त्व गुहेत दडलेले आहे ( म्हणजे अत्यंत गूढ आहे ) अशा स्थितीत, थोर लोक ज्या मार्गाने गेले तोच मार्ग उत्तम ! ३५४ तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ || ६ |४०|२४
( श्रीकृष्ण म्हणतात. ) अर्जुना, कार्य कोणतें, अकार्य कोणतें याचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्रच प्रमाण मानिलें पाहिजे.
३५५ तृणानि भूमिरुदकं वाक्चतुर्थी च सूनृता ।
सतामेतानि गेहेषु नोच्छिद्यन्ते कदाचन || ५|३६|३४
गवताचें आसन, स्वच्छ जागा, पाणी आणि चौथे सत्य व प्रिय भाषण या चार - गोष्टींची तरी सज्जनांच्या घरीं केव्हांहि वाण पडत नाहीं. ३५६ तेजसोर्हि द्वयोर्देवाः सख्यं वै भविता कथम् || ५|१०|२२
[ ' तूं इंद्राशी सख्य कर' असे सांगण्याकरितां आलेल्या देवांना वृत्रासुर म्हणतो ] देवहो, दोन तेजस्वी पुरुषांचें सख्य कसे व्हावयाचें ? ३५७ त्यजन्ति दारान्पुत्रांश्च मनुष्याः परिपूजिताः ।। १२/९११५३ मनुष्यांचा बहुमान केला म्हणजे ते आपल्या स्त्रीपुत्रांचाहि त्याग करण्यास तयार होतात.
३५८ त्यजेत्कुलार्थे पुरुषं ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् || ५|३७|१७
[ प्रसंग पडल्यास ] कुलाच्या रक्षणाकरितां कुलांतील एका मनुष्याचा त्याग करावा. - सबंध ग्रामाकरितां एका कुळाची पर्वा करूं नये. देशाकरितां एका गांवावरहि उदक सोडावें. आणि आत्मकल्याणाकरितां सर्व पृथ्वीचाहि त्याग करावा.
For Private And Personal Use Only
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५८
सार्यश्रीमहाभारतसुभाषितानि
३५९ त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् || ६ |४०|२१ काम, क्रोध व लोभ हीं तीन आत्मनाश करणारीं नरकाचीं द्वारे होत. तस्मात् या तिहींचाही त्याग करावा.
३६० त्रीण्येव तु पदान्याहुः पुरुषस्योत्तमं व्रतम्
I
न चैव दद्याच सत्यं चैव परं वदेत् || १३ | १२० |१० तीनच गोष्टींना पुरुषाचें उत्तम व्रत असें म्हटलें आहे. त्या म्हणजे, मत्सर करूं नये, दान करावें, आणि श्रेष्ठ असें सत्यच बोलावें. ३६१ त्वमित्युक्तो हि निहतो गुरुर्भवति भारत || ८|६९।८३
( श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ) गुरूला ' तूं ' असें संबोधिलें म्हणजे त्याचा वध केल्यासारखेंच झालें. ३६२ दण्ड एव हि राजेन्द्र क्षत्रधर्मो न मुण्डनम् ॥ १२।२३।४७ ( व्यासमुनि युधिष्ठिराला म्हणतात. ) दंडन हाच क्षत्रियाचा धर्म आहे; मुंडन नव्हे ! ३६३ दण्डनीत्यां यदा राजा सम्यक्कात्स्न्र्त्स्न्येन वर्तते ।
तदा कृतयुगं नाम कालसृष्टं प्रवर्तते ।। १२/६९/८०
जेव्हां राजा योग्य रीतीनें आणि पूर्णपणें दंडनीतीच्या अनुरोधानें चालतो, तेव्हां कालनिर्मित अशा कृतयुगाची प्रवृत्ति होते.
३६४ दण्डचेन भवेल्लोके विनश्येयुरिमाः प्रजाः ।
जले मत्स्यानिवाभक्ष्यन् दुर्बलान्बलवत्तराः ।। १२।१५।३०
जगांत जर दंड नसता तर प्रजा नाश पावल्या असत्या. पाण्यांतील माशांप्रमाणे बलवत्तर लोकांनीं दुर्बळांना खाऊन टाकलें असतें.
३६५ दण्डः शास्ति प्रजाः सर्वा दण्ड एवाभिरक्षति ।
दण्डः सुप्तेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधाः || १२|१५|२ दंड हाच सर्व प्रजेला वळण लावतो. दंडच सर्वांचें रक्षण करतो. सर्व लोक झोपीं गेले तरी दंड जागा राहतो. म्हणूनच दंड हाच धर्म आहे असें ज्ञानी लोक समजतात..
For Private And Personal Use Only
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३६६ दण्डस्यैव भयादेके न खादन्ति परस्परम् ।
__ अन्धे तमसि मज्जेयुयदि दण्डो न पालयेत् ॥१२।१५।७ दंडाच्याच भीतीमुळे काही प्राणी परस्परांना खाऊन टाकीत नाहीत. जर दंडशक्तीने लोकांचे रक्षण केले नाही तर ते घोर अंधकारांत बुडून जातील. ३६७ दत्तभुक्तफलं धनम् ॥ ५/३९/६७ ___ दान करणे व भोग्य वस्तूंचा उपभोग घेणे हे धनाचें फळ होय. ३६८ दया सर्वसुखैषित्वम् ॥ ३॥३१३।९०
दया म्हणजे सर्वांना सुख व्हावे अशी इच्छा. ३६९ दर्पो नाम श्रियः पुत्रो जज्ञेऽधमादिति श्रुतिः॥१२।९०।२६
दर्प हा लक्ष्मीचा पुत्र आहे; तो तिला अधर्मापासून झाला असें ऐकण्यात येते. ३७० दाक्ष्यमेकपदं धर्म्य दानमेकपदं यशः।
सत्यमेकपदं स्वयं शीलमेकपदं सुखम् ॥ ३॥३१३७० दक्षता हेच धर्माचे मुख्य कारण होय. दान हेच यशःप्राप्तीचे मुख्य साधन होय. सत्य हेच स्वर्गप्राप्तीचे मुख्य साधन हाय.आणि शील हेच सुखाचे मुख्य निधान होय. ३७१ दानपथ्यौदनो जन्तुः स्वकर्मफलश्नुमते ॥ १२॥२९८१३९
दान हेच मनुष्याला परलोकींच्या मार्गात शिदोरीप्रमाणे उपयोगी पडते. प्राण्याला स्वतःच्याच कर्माचे फळ मिळत असते. ३७२ दानमेव हि सर्वत्र सान्त्वेनानभिजल्पितम् ।
न पीणयति भूतानि निव्यञ्जनमिवाशनम् ॥ १२८४७ दान झाले तरी गोड शब्द बोलून केलें नाही, तर ते, तोंडी लावण्यावांचून दिलेल्या भोजनाप्रमाणे लोकांच्या मनाला आनंद देत नाही. ३७३ दानं मित्रं मरिष्यतः ॥ ३३१३६४ दान हा मरणोन्मुख झालेल्याचा मित्र होय.
For Private And Personal Use Only
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३७४ दाने तपसि सत्ये च यस्य नोच्चरितं यशः ।
विद्यायामर्थलाभे वा मातुरुच्चार एव सः ॥ ५।१३३।२४ दान, तप, सत्यभाषण, विद्या किंवा संपत्ति यांपैकी कोणत्याहि बाबतींत ज्याची कीर्ति कोणी गात नाहीं तो आपल्या मातेचा केवळ मलोत्सर्ग होय. ( म्हणजे त्याच्या जन्माच्या रूपाने त्याच्या आईने केवळ आपल्या पोटांतील घाण बाहेर टाकली.) ३७५ दान्तस्य किमरण्येन तथाऽदान्तस्य भारत ।
यत्रैव निवसेदान्तस्तदरण्यं स चाश्रमः ।।१२।१६०३६ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) इंद्रिये स्वाधीन असल्यावर अरण्यांत जाण्याची गरज काय ? व नसल्यावर जाऊन उपयोग काय ? जितेंद्रिय पुरुष ज्या ठिकाणी वास्तव्य करील तेच त्याचे अरण्य व तोच त्याचा आश्रम. ३७६ दुरन्वयं दुष्पवर्ष दुरापं दुरतिक्रमम् ।
सर्वं वै तपसाभ्येति तपो हि बलवत्तरम् ॥ १३॥१२२।८ दुस्तर, अजिंक्य, प्राप्त होण्यास कठीण, अनुल्लंघनीय असे सर्व काही तपाच्या योगाने साध्य होतें. खरोखर तप हे अत्यंत सामर्थ्यवान् आहे. ३७७ दूताः किमपराध्यन्ते यथोक्तस्यानुभाषिणः।। ५।१६।३९
सांगितलेला निरोप कळविणाऱ्या दूतांचा तसे करण्यांत काय बरें अपराध आहे ? ३७८ देशकालो समासाद्य विक्रमेत विचक्षणः ।
देशकालव्यतीतो हि विक्रमोनिष्फलोभवेत्॥१२॥१४०१२८ देशकालांची अनुकूलता पाहून शहाण्याने पराक्रम गाजवावा. कारण योग्य देश आणि योग्य काल निघून गेल्यावर केलेला पराक्रम निष्फल होतो. ३७९ दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ॥ ६॥४०५
दैवी संपत्ति मोक्षाला, व आसुरी संपत्ति बंधनाला, कारणीभूत होते. ३८० दौष्कुलेयाश्च लुब्धाश्च नृशंसा निरपत्रपाः।
ते त्वां तात निषेवेयुयोवदाकपाणयः ॥ १२॥८३७ [ भीष्म सांगतात ] बा युधिष्टिरा, हलक्या कुळांत जन्मलेले, लोभी, दुष्ट, निर्लज असे जे लोक आहेत, ते त्यांचा हात ओला होत आहे (अर्थात् त्यांना द्रव्यादिक पोचत आहे ) तोपर्यंतच तुझी सेवा करतील.
For Private And Personal Use Only
Page #71
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३८१ द्रव्यागमो नृणां सूक्ष्मः पात्रे दानं ततः परम् । .
कालः परतरो दानाच्छ्रद्धा चैव ततः परा॥१४१९०९४ द्रव्य संपादन करणे ही गोष्ट कमी महत्त्वाची आहे. सत्पात्री केलेल्या दानाची योग्यता त्याहून जास्त आहे. योग्य काळी दान करणे हे त्यापेक्षांहि श्रेष्ठ. आणि श्रद्धा ही तर त्याहिपेक्षा श्रेष्ठ आहे. ३८२ द्रोहाद्देवैरवाप्तानि दिवि स्थानानि सवशः॥१२।८।२८
द्रोहाच्याच योगानें देवांनी स्वर्गातील सर्व स्थाने संपादन केली. ३८३ द्वावम्भसि निवेष्टव्यौ गले बद्धा दृढ शिलाम् ।
धनवन्तमदातारं दरिद्रं चातपस्विनम् ॥ ५॥३३॥६० धनवान् असून दान न करणारा आणि दरिद्री असून तपश्चर्या न करणारा या दोघांना गळ्यांत मोठी धोंड बांधून पाण्यात बुडवून टाकावें. ३८४ द्वाविमो कण्टको तीक्ष्णौ शरीरपरिशोषिणौ ।
यश्चाधनः कामयते यश्च कुप्यत्यनीश्वरः॥ ५।३३।५६ निर्धन असून चैनीची इच्छा करणे व अंगांत सामर्थ्य नसतां रागावणे हे दोन शरीरातील रक्त अगदी नाहीसे करून टाकणारे तीक्ष्ण कांटे होत. ३८५ द्वे कर्मणी नरः कुर्वन्नस्मिँल्लोके विरोचते।
अब्रुवन्परुषं किंचिदसतोऽनचेयस्तथा ॥ ५।३३।५४ दोन गोष्टी करणारा मनुष्य या लोकी योग्यतेस चढतो. यत्किंचितहि कठोर न बोलणे आणि दुर्जनांचा गौरव न करणे. ३८६ द्वेष्यो न साधुभवति न मेधावी न पण्डितः ।
प्रिये शुभानि कार्याणि द्वेष्ये पापानि चैव ह॥ ५।३९।४ जो ज्याच्या द्वेषास पात्र झालेला असतो तो त्याला सज्जन, बुद्धिमान् अथवा शहाणा वाटत नाही. कारण, प्रिय असलेल्या मनुष्याची कृत्ये सर्व काही चांगलीं, आणि द्वेषास पात्र झालेल्या मनुष्याची कृत्ये सर्व काही वाईट [ समजणे ही सामान्य लोकांची रीतच आहे.]
For Private And Personal Use Only
Page #72
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३८७ द्यक्षरस्तु भवेन्मृत्युस्यक्षरं ब्रह्म शाश्वतम् ।
ममेति च भवेन्मृत्युन ममेति च शाश्वतम् ॥१२।१३।४ दोन अक्षरे म्हणजे मृत्यु व तीन अक्षरे म्हणजे शाश्वत ब्रह्म होय. 'मम' म्हणजे माझे असें मानिल्याने मृत्यु, आणि 'न मम' म्हणजे माझें नव्हे असे मानिल्याने शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होते. ३८८ धनं लभेत दानेन मौनेनाज्ञां विशांपते ।
उपभोगांश्च तपसा ब्रह्मचर्येण जीवितम् ॥ १३७।१४ दान करून धन मिळवावें, मौनाने, लोकांनी आपल्या आज्ञेप्रमाणे वागणे, तपश्चर्येने उपभोग आणि ब्रह्मचर्याने ( दीर्घ ) जीवित ही प्राप्त करून घ्यावी, ३८९ धननाशेऽधिकं दुःखं मन्ये सर्वमहत्तरम् ।
ज्ञातयोह्यवमन्यन्ते मित्राणि च धनाच्युतम्॥१२॥१७७३४ (वैराग्य संपन्न मंकि म्हणतो) मला वाटते, द्रव्यनाशाचे दुःख सर्वात अत्यंत अधिक, कारण नातलग व मित्रहि द्रव्य नष्ट झालेल्याचा अपमान करितात. ३९० धनमाहुः परं धर्म धने सर्व प्रतिष्ठितम् ।
जीवन्ति धनिनो लोके मृता ये त्वधना नराः॥५/७२।२३ धन मिळविणे हा श्रेष्ठ धर्म होय असे म्हणतात. धनावरच सर्व काही अवलंबून आहे. धनसंपन्न लोकच जगांत जिवंत असतात. धनहीन पुरुष मेल्यांतच जमा. ३९१ धनात्कुलं प्रभवति धनाद्धर्मः प्रवर्धते ।
नाधनस्यास्त्ययं लोको न परः पुरुषोत्तम ॥ १२।८।२२ (अर्जुन युधिष्ठराला म्हणतो ) हे नरश्रेष्ठा, धनाच्या योगानें कुळाचा उत्कर्ष होतो. धन असेल तर धर्माची वाढ होते. निर्धनाला ना इहलोक ना परलोक,
For Private And Personal Use Only
Page #73
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
३९२ धनेन किं यन्न ददाति नाश्नुते बलेन किं येन रिपुं न बाधते । श्रुतेन किं येन न धर्ममाचरेत्
६३
किमात्मना यो न जितेन्द्रियो वशी ।। १२।३२१/९३
ज्याचा दान करण्याकडे किंवा भोगण्याकडे उपयोग केला जात नाहीं तें धन काय कामाचें ? ज्याच्या योगानें शत्रूला त्रास दिला जात नाहीं त्या बळाचा काय उपयोग ? धर्मानुष्ठान नाहीं तर विद्येची काय किंमत आणि जो जितेंद्रिय, मनोनिग्रही नाहीं तो जीव काय करावयाचा ? ३९३ धनेनाधर्मलब्धेन यच्छिद्रमपिधीयते ।
असंवृतं तद्भवति ततोऽन्यदवदीयते || ५|३५/७०
अन्यायाने मिळविलेल्या द्रव्याने एकादें व्यंग झांकलें तर तें खरोखर झांकलें जात नाहींच, परंतु त्यापासून आणखीहि एक उत्पन्न होतें. ३९४ धन्यानामुत्तमं दाक्ष्यं धनानामुत्तमं श्रुतम् ।
लाभानां श्रेय आरोग्यं सुखानां तुष्टिरुत्तमा || ३ | ३१३।७४ धन मिळविण्याच्या साधनांत दक्षता सर्वांत श्रेष्ठ आहे. धनांमध्ये उत्तम धन विद्या. सर्व लाभांत उत्कृष्ट लाभ म्हणजे आरोग्य. आणि सर्व सुखांत संतोष श्रेष्ट. ३९५ धर्म एको मनुष्याणां सहायः पारलौकिकः । १३।१११।१७ एकटा धर्मच मनुष्यांचा परलोकांतील सोबती आहे.
३९६ धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः । ३।३१३।१२८
आपण धर्माचा घात केला तर धर्मच आपला घात करतो. आणि आपण धर्माचें रक्षण केलें तर धर्म आपले रक्षण करतो.
३९७ धर्मं यो बाधते धर्मो न स धर्मः कुवर्त्म तत् ।
अविरोधात्तु यो धर्मः स धर्मः सत्यविक्रम ||३|१३१।११ ( ससाण्याच्या रूपाने आलेला इंद्र शिबि राजाला म्हणतो ) ज्याच्या योगानें खऱ्या धर्माला बाध येतो तो धर्मच नव्हे, तो कुमार्ग होय. ज्याचा खऱ्या धर्माशीं विरोध येत नाहीं तोच धर्म.
For Private And Personal Use Only
Page #74
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६ ४
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
३९८ धर्म संहरते तस्य धनं हरति यस्य सः ।
हियमाणे धने राजन्वयं कस्य क्षमेमहि || १२/८/१३
( भीम युधिष्ठिराला म्हणतो. ) जो ज्याचें द्रव्य हरण करतो त्यानें त्याच्या धर्माचाच उच्छेद केल्यासारखें होतें राजा, आमच्या द्रव्याचा अपहार होऊ लागला तर आम्ही कोणाला क्षमा करावी काय ?
३९९ धम हि यो वर्धयते स पण्डितो
य एव धर्माच्च्यवते स मुह्यति ||१२|३२१/७८
धर्माची जो वाढ करतो तोच पंडित जो धर्मापासून च्युत होतो तो मोहांत सांपडला असें समजावें.
४०० धर्मनित्यास्तु ये केचिन्न ते सीदन्ति कर्हिचित् ॥ ३।२६३।४४ सदोदित धर्माने जे वागतात त्यांचा कधींहि नाश होत नाहीं. ४०९ धर्ममूलः सदैवार्थः कामोऽर्थफलमुच्यते || १२|१२३|४ केव्हां झालें तरी अर्थप्राप्तीचें मूळ धर्म होय. काम ( म्हणजे इष्टप्राप्ति ) हें अर्थाचें फळ होय.
४०२ धर्म पुत्र निषेवस्व सुतीक्ष्णौ च हिमातपौ ।
क्षुत्पिपासे च वायुं च जय नित्यं जितेन्द्रियः । १२।३२१।४
( व्यास मुनि शुकाला सांगतात. ) हे पुत्रा, तूं धर्माचरणानें वाग. नेहमीं जितेंद्रिय राहून कडक थंडी व ऊन, तहान व भूक, आणि ( म्हणजे सहन करण्यास शीक ).
प्राणवायु यांना जिंक
४०३ धर्म पूर्वे धनं मध्ये जघन्ये काममाचरेत् । अहन्यनुचरेदेवमेष शास्त्रकृतो विधिः || ३|३३|४०
दिवसाच्या पूर्वभागांत धर्मानुष्ठान, मध्यभागांत द्रव्यसंपादन व शेवटल्या भागांत विषयसेवन करावें. याप्रमाणे प्रत्यहीं वागावें हा शास्त्रोक्त विधि आहे. ४०४ धर्मव्युच्छित्तिमिच्छन्तो येऽधर्मस्य प्रवर्तकाः ।
हन्तव्यास्ते दुरात्मानो देवैर्दैत्या इवोल्बणाः || १२|३३|३०
जे धर्माचा उच्छेद करूं पाहतात व अधर्माचा प्रसार करतात अशा दुरात्म्यांना. देवानीं महाभयंकर अशा दैत्यांना ठार मारिलें त्याप्रमाणे, ठार मारावें.
For Private And Personal Use Only
Page #75
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४०५ धर्मश्च सूक्ष्मो निपुणोपलक्ष्यः ॥ २॥६७।३८
सूक्ष्म अशा धर्माचे बारकाईने परीक्षण करावें. ४०६ धर्मश्चार्थेन महता शक्यो राजनिषेवितुम् ॥ ३॥३३॥४८
(भीम युधिष्ठिराला म्हणतो ) हे राजा, धर्माचे आचरण विपुल द्रव्याच्याच योगाने करता येणे शक्य आहे. ४०७ धर्मस्य निष्ठात्वाचारस्तमेवाश्रित्य भोत्स्यसे॥१२।२५९।६
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) धर्माचा आधार आचार होय. त्याचाच आश्रय केल्यावर तुला धर्माचे ज्ञान होईल. ४०८ धर्मः सत्यं तथा वृत्तं बलं चैव तथाप्यहम् ।
शीलमूला महाप्राज्ञ सदा नास्त्यत्र संशयः॥१२।१२४१६२ [ लक्ष्मी प्रहादास म्हणते ] धर्म, सत्य तसेच सद्वर्तन, सामर्थ्य आणि मी ( लक्ष्मी ) या सर्वांचे मूळकारण शील हेच होय यांत संशय नाही. ४०९ धर्मादपेतं यत्कर्म यद्यपि स्यान्महाफलम् ।
न तत्सेवेत मेधावी न तद्धितमिहोच्यते ॥ १२॥२९३८ धर्माला सोडून असलेले कृत्य केवढेहि मोठे फल देणारे असले तरी ते शहाण्याने करू नये. कारण त्यापासून खरें कल्याण होत नाही. ४१० धर्माय राजा भवति न कामकरणाय तु ॥ १२।९०३
धर्मरक्षणासाठी राजाची उत्पत्ति आहे, आपल्या इच्छा तृप्त करून घेण्यासाठी नव्हे. ४११ धर्मार्थकामकुशलो धर्मार्थावप्यपीडयन् ।
धर्मप्रधानकार्याणि कुर्याश्चेति पुनःपुनः ।। ७१५११३७ (द्रोणाचार्य दुर्योधनाला सांगतात ) तूं धर्म, अर्थ व काम यांविषयी कुशल आहेस. परंतु, धर्म व अर्थ या दोहोंसहि धक्का न लागू देतां धर्मप्रधान अशीच कृत्यें करीत जा, हे मी तुला पुनः पुनः सांगतो.
म. भा. ५
For Private And Personal Use Only
Page #76
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ।
vvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvvv.
n
wr.
४१२ धर्मार्थकामाः समसेव सेव्या
यो ह्येकभक्तः स नरो जघन्यः । तयोस्तु दाक्ष्यं प्रवदन्ति मध्यं
स उत्तमो योऽभिरतस्त्रिवर्गे ॥१२॥१६७१४० धर्म, अर्थ आणि काम यांचे सेवन सारख्याच प्रमाणाने केले पाहिजे. यांपैकी कोणत्याहि एकावरच जो भर देतो तो मनुष्य निकृष्ट होय. यांतून दोहोंच्या ठिकाणी दक्ष असणारा मध्यम प्रतीचा होय. सर्वांत श्रेष्ठ तोच की, जो या तीनहि पुरुषार्थामध्ये रममाण होऊन राहतो. ४१३ धर्मार्थों धर्मकामौ च कामार्थों चाप्यपीडयन् ।
धर्मार्थकामान्योऽभ्यति सोऽत्यन्तं सुखमश्नुते ।।९।६०२२ धर्म व अर्थ, धर्म व काम, काम व अर्थ यांचा एकमेकांशी विरोध येऊ न देतां धर्म, अर्थ व काम या तिहींचें जो सेवन करतो त्याला आत्यंतिक सुख प्राप्त होते. ४१४ धर्मे चार्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ ।
यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्कचित् ॥१॥६२।५३ (वैशंपायन जनमेजय राजाला सांगतात ) धर्माविषयीं, कामाविषयी आणि मोक्षाविषयीं यांत ( महाभारतांत ) जें सांगितले आहे तेच इतर ग्रंथांत आहे. जे यांत नाही ते कुठेच नाही. ४१५ धर्मेण राज्यं विन्देत धर्मेण परिपालयेत ।।
धर्ममूलां श्रियं प्राप्य न जहाति न हीयते ॥ ५॥३४॥३१ धर्माने राज्य मिळवावें व धर्मानेंच त्याचे संरक्षण करावें. धर्माने मिळविलेल्या राजलक्ष्मीचा त्याग करण्याचा प्रसंग येत नाहीं; व तीहि राजाला सोडून जात नाही. ४१६ धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मे राजनि तिष्ठति ।
तं राजा साधु यः शास्ति स राजा पृथिवीपतिः।।१२।९०५ धर्माच्या आधाराने प्राणी राहतात, धर्म, राजाच्या आधाराने राहतो, त्या धर्माचे पालन जो राजा उत्तम प्रकारे करतो तो राजा सर्व पृथ्वीचा राजा होतो.
For Private And Personal Use Only
Page #77
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ४१७ धर्मे ते धीयतां बुद्धिर्मनस्तु महदस्तु च ॥ १५॥१७॥२१
(कुंती युधिष्ठिराला म्हणते ) तुझी बुद्धि धर्माच्या ठिकाणी स्थिर होवो, आणि तुझें मन मोठे असो.. ४१८ धर्मे मतिर्भवतु वः सततोत्थितानां
स ह्येक एव परलोकगतस्य बन्धुः। अर्थाः स्त्रियश्च निपुणैरपि सेव्यमाना
नैवाप्तभावमुपयान्ति न च स्थिरत्वम् ॥ १।२।३९१ ( सौति शौनकादिक ऋषींना सांगतो ) सतत प्रयत्नपूर्वक धर्मानुष्ठान करण्याकडे तुमची प्रवृत्ति असू दे. कारण तोच एकटा परलोकी गेल्यावर आपल्या उपयोगी पडणारा आहे. कनक आणि कांता यांची दक्षतेने सेवा केली तरी ती कामास येत नाहीत, ती चिरकाल टिकतहि नाहीत. ४१९ धर्मेऽसुखकला काचिद्धर्मे तु परमं सुखम् ॥१२॥२७११५६ __ धर्माचरणांत थोडेसे कष्ट वाटले तरी अत्यंत श्रेष्ठ सुख धर्मातच आहे. ४२० धर्मो हि परमा गतिः ॥ १२॥१४७८
धर्म हाच उत्कृष्ट प्रकारच्या गतीचे साधन होय. ४२१ धम्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्
क्षत्रियस्य न विद्यते ॥ ६।२६।३१ धर्मयुद्धासारखें श्रेयस्कर क्षत्रियाला दुसरे काहीच नाही. ४२२ धारणाद्धर्ममित्याहुधर्मेण विधृताः प्रजाः ।
यः स्याद्धारणसंयुक्तःस धर्म इति निश्चयः॥१२॥१०९।११ धारण करतो म्हणून धर्म म्हणतात. धर्मानेच लोकांना धारण केले आहे. धारण करण्याच्या गुणानें जो युक्त असेल तोच धर्म असा सिद्धांत आहे. ४२३ धिक्तस्य जीवितं राज्ञो राष्ट्रं यस्यावसीदति ।
अवृत्त्यान्यमनुष्योऽपियो वैदेशिक इत्यपि ॥१२॥१३०३४ ज्याचे राष्ट्र क्षीण दशेप्रत पावते आणि परदेशांत राहणारा अन्य मनुष्यहि ज्याच्या -राष्ट्रांत उपजीविका न झाल्यामुळे नाश पावतो त्या राजाच्या जीविताला धिक्कार असो!
For Private And Personal Use Only
Page #78
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४२४ धृमायन्ते व्यपेतानि ज्वलन्ति सहितानि च
धृतराष्ट्रोल्मकानीव ज्ञातयो भरतर्षभ ॥ ५॥३६६० (विदुर म्हणतो ) हे भरतश्रेष्टा धृतराष्ट्रा, लाकडाची कोलितें एकएकटी असली म्हणजे नुसती धुमसत राहतात; पण तीच एकत्र असली म्हणजे त्यांच्यापासून ज्वाला उत्पन्न होते. त्याचप्रमाणे नातलगांची गोष्ट आहे. ४२५ धूमो वायोरिव वशे बलं धर्मोऽनुवर्तते । ___ अनीश्वरो बले धर्मो द्रुमे वल्लीव संश्रिता ॥ १२॥१३४१७.
धूर वाऱ्याच्या अंकित राहतो तसा धर्म बळाच्या पाठोपाठ येतो. वृक्षाच्या आश्रयाने राहणाऱ्या लतेप्रमाणे धर्म बळावर अवलंबून असतो. ४२६ धृतिर्दाक्ष्यं संयमो बुद्धिरात्मा
धैर्य शौर्य देशकालाप्रमादः । अल्पस्य वा बहुनो वा विवृद्धौ ।
धनस्यैतान्यष्ट समिन्धनानि ॥ १२॥१२०३७ संथपणा, दक्षता, मनोनिग्रह, बुद्धिमत्ता, विचारशीलता, धैर्य, शौर्य आणि स्थळकालाविषयीं सावधगिरी, ही आठ साधनें मूळचे थोडे किंवा पुष्कळ असलेलें धन वाढविण्याची होत. ४२७ धेनुवेत्सस्य गोपस्य स्वामिनस्तस्करस्य च
पयः पिबति यस्तस्या धेनुस्तस्येति निश्चयः॥१२।१७४।३२ गाईवर वासराची, गवळ्याची, मालकाची व (प्रसंगविशेषीं ) चोराचीहि सत्ता असते. पण ज्याला तिचे दूध प्राशन करण्यास मिळते त्याचाच तिजवर खरा हक्क होय हे निश्चित. ४२८ न कश्चिजात्वतिक्रामेजरामृत्यू हि मानवः ।
अपि सागरपर्यन्तां विजित्येमा वसुंधराम् ॥१२।२८।१५ समुद्रवलयांकित ही सर्व पृथ्वी जिंकूनसुद्धां कोणीहि मनुष्य जरा आणि मृत्यु यांचे अतिक्रमण करूं शकत नाही.
For Private And Personal Use Only
Page #79
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४२९ न कश्चित्कस्यचिन्मित्रं न कश्चित्कस्यचित्सुहृद ।
अर्थतस्तु निबध्यन्ते मित्राणिरिपवस्तथा॥१२॥१३८।११० मुळांतच कोणी कोणाचा मित्र नसतो, आणि कोणी कोणाचा शत्रुहि नसतो. कार्याच्याच अनुरोधाने मित्र आणि शत्रु हे होत असतात. ४३० न कश्चिन्नापनयते पुमानन्यत्र भार्गवात् ।
शेषसंप्रतिपत्तिस्तु बुद्धिमत्स्वेव तिष्ठति ॥५॥३९॥३० [ नीतिशास्त्रप्रणेत्या | शुक्राचार्यांव्यतिरिक्त दुसरा कोणीहि मनुष्य कधी चुकत नाहीं असें नाही. परंतु चूक झाल्यावर पुढे काय याचा विचार करण्याची अक्कल बुद्धिमान पुरुषांच्याच ठायी असते. ४३१ न कालो दण्डमुद्यम्य शिरः कुन्तति कस्यचित् ।
कालस्य बलमेतावद्विपरीतार्थदर्शनम् ॥ २।८।११ विनाशकाल प्राप्त झाला म्हणजे तो काही प्रत्यक्ष दंड उगारून कोणाचे डोकें उडवीत नाही. तर बुद्धीत अंश पाडून विपरीत प्रकार भासविणे एवढ्यापुरताच तो आपल्या बळाचा उपयोग करतो. ४३२ न कुलं वृत्तहीनस्य प्रमाणमिति मे मतिः।
अन्तेष्वपि हि जातानां वृत्तमेव विशिष्यते ।५।३४१४१ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) दुर्वर्तनी माणसाच्या कुलीनपणाला काही किंमत देता येत नाही असे मला वाटते. हीन कुळांत जन्मलेल्यांच्यासुद्धां शीलालाच महत्त्व आहे. ४३३ न कृतस्य तु कर्तुश्च सख्यं संधीयते पुनः ।
हृदयं तत्र जानाति कतुश्चैव कृतस्य च ॥ १२॥१३९।३६ अपराध करणारा आणि त्याचे प्रायश्चित्त देणारा ह्या उभयतांमध्ये पुनरपि मैत्री जडत नसते. कारण, परस्परांचा संबंध काय आहे हे प्रायश्चित्त देणारा व अपराध करणारा ह्या उभयतांचे अंतःकरणच जाणत असते. ४३४ न कोशः शुद्धशौचेन न नृशंसेन जातुचित् ।
मध्यमं पदमास्थाय कोशसंग्रहणं चरेत् ॥१२॥१३३३३ अगदी सोवळेपणाने राहून संपत्ति मिळत नसते; तशीच ती दुष्टपणानेही कधीच मिळत नाही. यास्तव मध्यम मार्गाचा अवलंब करून संपत्तीचा संग्रह करावा.
For Private And Personal Use Only
Page #80
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww ४३५ न गृहं गृहमित्याहुहिणी गृहमुच्यते।
गृहं तु गृहिणीहीनमरण्यसदृशं मतम् ॥ १२॥१४४६ नुसत्या घराला घर म्हणत नाहीत. गृहिणी हेच घर. गृहिणी नसलेलें घर अरण्यासमान होय. ४३६ न च कश्चित्कृते कार्ये कोरं समवेक्षते ॥१२॥१३८।११२
कार्य होऊन गेल्यावर कर्त्याकडे कोणाचें लक्ष्य जात नाही. ४३७ न च शत्रुरवज्ञेयो दुर्बलोऽपि बलीयसा ।
अल्पोऽपि हि दहत्यनिर्विषमल्पं हिनस्ति च ॥१२॥५८।१७ __ स्वतः बलाढ्य असलेल्यानेसुद्धां दुर्बळ अशाहि शत्रूला तुच्छ समजू नये. कां की, अमि लहान असला तरी जाळल्यावांचून रहात नाही, आणि विष थोडे असले तरी प्राणनाश करतेंच. ४३८ न च शुद्धानृशंसेन शक्यं राज्यमुपासितुम् ।।१२।७५/१८
निर्भेळ दयाळूपणाने राज्य चालविणे शक्य नाही. ४३९ न चैव पुरुषो द्रष्टा स्वर्गस्य नरकस्य च । ___आगमस्तु सतां चक्षुर्नृपते तमिहाचर ।।१२।२८।५४
( अश्म नामक ब्राह्मण जनक राजाला सांगतो ) हे राजा, स्वर्ग आणि नरक मनुष्याला दिसत नाहीत. परंतु त्यांना अवलोकन करण्याचे सज्जनांचे नेत्र म्हणजे शास्त्र होय. म्हणून तूं शास्त्रप्रमाणे वाग. ४४० न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति ।
हविषा कृष्णवर्मेव भूय एवाभिवर्धते ॥ १७५.५० इच्छित वस्तूंच्या उपभोगाने भोगेच्छेची तृप्ति कधीच होत नसते. आहुतींच्या योगाने अधिक पेट घेणाऱ्या अग्नीप्रमाणे ती उलट अधिकच वाढते. ४४१ न जातु त्वमिति ब्रूयादापन्नोऽपि महत्तरम् । ___ त्वंकारोवा वधो वेति विद्वत्सु न विशिष्यते ॥ १३॥१६२१५३
संकटांत असतांनाहि मोठ्या मनुष्याला 'तूं' असें एकेरी संबोधू नये. विद्वानाला तूं असें म्हणणे व त्याचा वध करणे सारखेच..
For Private And Personal Use Only
Page #81
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
४४२ न जातु विवृतः कार्यः शत्रुः सुनयमिच्छता ।। १२ । १०५/१४
उत्कृष्ट प्रकारच्या नीतीप्रमाणें वागूं इच्छिणाऱ्या पुरुषानें केव्हांहि उघड रीतीनें शत्रुत्व करूं नये.
४४३ न जानपदिकं दुःखमेकः शोचितुमर्हति ।
अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येदुपक्रमम् ।। १२ । ३३०।१५ सर्व देशाच्या दुःखाचा एकट्यानें शोक करणें युक्त नव्हे. शोक न करितां प्रतिकाराचा जर कांहीं उपाय सुचला तर तो मात्र अंमलांत आणावा.
४४४ न तत्तरेद्यस्य न पारमुत्तरेत् न तद्धरेद्यत्पुनराहरेत्परः । न तत्खनेद्यस्य न मूलमुद्धरेत्
न तं हन्याद्यस्य शिरो न पातयेत् ।। १२/१४०/६९ ज्याच्या पैलतीराला पोंचतां येणार नाहीं तें तरून जाण्याच्या भरीस पडूं नये. जें फिरून कोणी आपल्यापासून हिरावून घेईल त्याचें हरण करूं नये. ज्याचें मूळ उपटून टाकतां येत नाहीं तें खणूं नये. ज्याचें शीर खालीं पाडतां येत नाहीं त्याच्यावर प्रहार करूं नये.
४४५ न तत्परस्य संदध्यात्प्रतिकूलं यदात्मनः ।
७१
एष संक्षेपतो धर्मः कामादन्यः प्रवर्तते || १३ | ११३८
आपल्याला अनिष्ट अशी जी गोष्ट ती दुसऱ्याच्या संबंधाने करूं नये. धर्माचें संक्षिप्त स्वरूप हैं असें आहे. याला सोडून असलेला तो निव्वळ स्वेच्छाचार होय. ४४६ न तथा बाध्यते कृष्ण प्रकृत्या निर्धनो जनः ।
यथा भद्रां श्रियं प्राप्य तया हीनः सुखैधितः ॥ ५/७२/२९
( युधिष्ठिर श्रीकृष्णांना म्हणतो ) उत्तम प्रकारचें वैभव प्राप्त होऊन सुखांत वाढलेल्या मनुष्याला तें वैभव नष्ट झालें असतां जेवढे दुःख होतें, तेवढे मूळांतच दरिद्री असलेल्या मनुष्याला होत नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #82
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
www
nomwww
४४७ न तथेच्छन्ति कल्याणान्परेषां वेदितुं गुणान् ।
यथैषां ज्ञातुमिच्छन्ति नैर्गुण्यं पापचेतसः ॥५॥३७॥४७ दुष्ट मनुष्यांना दुसऱ्यांचे दोष जाणण्याची जशी इच्छा असते, तशी त्यांचे चांगले गुण समजून घेण्याची इच्छा नसते. ४४८ न तल्लोके द्रव्यमस्ति यल्लोकं प्रतिपूरयेत् ।।
समुद्रकल्पः पुरुषो न कदाचन पूर्यते ॥ १३९३४६ जगांत असे कोणतेच द्रव्य नाहीं की, जे लोकांना पुरून उरेल. मनुष्य हा समुद्रासारखा आहे. त्याला कधीच कांहीं पुरत नाही. ४४९ न तृप्तिः प्रियलाभेऽस्ति तष्णा नाद्भिः प्रशाम्यति ।
संप्रज्वलति सा भूयः समिद्भिरिव पावकः॥१२॥१८०२६ प्रिय वस्तूचा लाभ झाल्याने तृप्ति होते असे नाही. तृष्णा ( हांव, लोभ ) ही पाण्याने शांत होत नाही. समिधांनी जसा अग्नि, तशी ती [ इष्टप्राप्तीनें ] अधिकच प्रज्वलित होते. ४५० न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः।
बालोऽपि यःप्रजानाति तं देवाः स्थविरं विदुः।।३।१३३।११ एकाद्याचे केस पांढरे झाले म्हणजे तेवढ्यानें तो वृद्ध झाला असे नाही. वयाने लहान असला तरी, जो ज्ञानी आहे त्यालाच देव वृद्ध समजतात. ४५१ न त्वेवात्मावमन्तव्यः पुरुषेण कदाचन ।
न ह्यात्मपरिभूतस्य भूतिभवति शोभना ।। ३३२।५८ पुरुषाने स्वतःस केव्हांहि हीन लेखू नये कारण, स्वतःस हीन मानणारास उत्तम प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत नाही. ४५२ न दरिद्रो वसुमतो नाविद्वान्विदुषः सखा ।
न शूरस्य सखा क्लीवः सखिपूर्व किमिष्यते ॥१११३१९ (द्रुपदराजा द्रोणाचार्यांना म्हणतो) दरिद्री हा श्रीमंताचा अथवा मूर्ख हा विद्वानाचा मित्र नसतो. शूराची नामर्दाशी मैत्री असणे शक्य नाही. तर सख्यपूर्वक तूं काय मागतोस?
For Private And Personal Use Only
Page #83
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४५३ न दृष्टपूर्व प्रत्यक्षं परलोकं विदुर्बुधाः ।
आगमांस्त्वनतिक्रम्य श्रद्धातव्यं बुभूषता ॥ १२।२८।४२ परलोक हा पूर्वी कोणी प्रत्यक्ष पाहिला आहे असें शहाणे लोक समजत नाहीत. परंतु शास्त्रमार्गाचे उल्लंघन न करितां उत्कर्षेच्छु पुरुषाने त्याविषयीं श्रद्धा ठेवावी. ४५४ न देवा दण्डमादाय रक्षन्ति पशुपालवत् ।
यं तु रक्षितुमिच्छन्ति बुद्धया संविभजन्ति तम् ५।३५।४० देव काही एकाद्या गुराख्याप्रमाणे हातांत दंड घेऊन कोणाचे रक्षण करीत नाहीत. तर ज्याचे रक्षण करण्याची त इच्छा करतात, त्याला ते उत्तम प्रकारची बुद्धि देतात. ४५५ न देवैरननुज्ञातः कश्चिद्भवति धार्मिकः ॥ १२।२७१।४९
देवांची तशी इच्छा असल्याशिवाय कोणी धार्मिक बनत नाही. ४५६ न द्वितीयस्य शिरसश्छेदनं विद्यते कचित् ।
नच पाणेस्तृतीयस्य यन्नास्तिन ततोभयम्॥१२॥१८०।२९ __ आपले दुसरें डोके कोणी कापील किंवा तिसरा हात तोडील अशी केव्हांहि भीति नसते. कां की, जे मूळातच नाही त्याची भीति मुळीच नसते. ४५७ न धर्मः प्रीयते तात दानदत्तमहाफलैः॥
न्यायलब्धैर्यथा सूक्ष्मः श्रद्धापूतः स तुष्यति॥१४।९०९९ (धर्म उंछवृत्तीच्या ब्राह्मणाला म्हणतो ) बाबारे, न्यायाने मिळविलेल्या आणि श्रद्धेनें पवित्र झालेल्या थोड्याशा द्रव्याच्या दानाने धर्म जसा संतुष्ट होतो, तसा केवळ मोठे फळ देणाऱ्या दानांनी संतोष पावत नाही. ४५८ न धर्मपर एव स्यान्न चार्थपरमो नरः।
न कामपरमो वा स्यात्सर्वान्सेवेत सर्वदा ॥ ३॥३३॥३९ मनुष्याने केवळ धर्माचेंच अवलंबन करूं नये, एकट्या अर्थाच्याच पाठीमागे लागू • नये आणि नुसत्या कामाकडेही सर्व लक्ष्य देऊ नये. परंतु, [ धर्म, अर्थ व काम ] या सर्वोचें सर्वदा सेवन करावे.
For Private And Personal Use Only
Page #84
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७४
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
४५९ न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखम् ॥१२।२५।२३ कोणालाहि नेहमींच दुःख होत नाहीं, किंवा नेहमींच सुख होत नाहीं. ४६० न निर्मन्युः क्षत्रियोऽस्ति लोके निर्वचनं स्मृतम् ||३|२७|३७ ज्याला अपमानाची चीड येत नाहीं तो क्षत्रिय नव्हे, अशी लोकांत म्हणच आहे. ४६१ न पश्यामोऽनपकृतं धनं किंचित्कचिद्वयम् || १२|८|३०
( अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो ) दुसऱ्याला यत्किंचितहि उपद्रव न देतां कोणाला केव्हां कांहीं धन मिळल्याचे आमच्या पाहण्यांत नाहीं. ४६२ न पूर्वे नापरे जातु कामानामन्तमाप्नुवन् ॥१२।१७७ २२ पूर्वकाळचे किंवा दुसरे कोणतेहि लोक इच्छेच्या अंतापर्यंत पोंचले नाहींत. ४६३ न बाह्यं द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवति भारत ।
शारीरं द्रव्यमुत्सृज्य सिद्धिर्भवति वा न वा ।। १२।१३।१ ( सहदेव युधिष्ठिराला म्हणतो ) बाह्य द्रव्याचा त्याग केल्यानें सिद्धि प्राप्त होत नसते. शरीरांत राहणाऱ्या [ कामक्रोधादिविकाररूप ] द्रव्याचा त्याग करूनहि सिद्धि मिळेल का नाहीं हा प्रश्नच आहे.
४६४ न बुद्धिर्धनलाभाय न जाड्यमसमृद्धये ।
लोकपर्यायवृत्तान्तं प्राज्ञो जानाति नेतरः || ५|३८|३३
बुद्धि असली म्हणजे धन मिळतें असें नाहीं, आणि बुद्धिमांद्य असले म्हणजे दारिद्र्य येतें असेंहि नाहीं. लोकव्यवहार हा चतुर पुरुषालाच समजतो, इतरांना नाहीं. ४६५ न बुद्धिशास्त्राध्ययनेन शक्यं
प्राप्तुं विशेषं मनुजैरकाले । मूर्खोऽपि चामोति कदाचिदर्थान्
कालो हि कार्यं प्रति निर्विशेषः || १२/२५/६
काळ प्रतिकूल असतां नुसत्या बुद्धिमत्तेने किंवा शास्त्राभ्यासानें मनुष्याला विशेषसा लाभ होणें शक्य नाहीं. उलट, एकादे वेळेस मूर्खालासुद्धां कार्यात यश येते. तस्मात् काळ हाच कार्यसिद्धीच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा आहे.
For Private And Personal Use Only
Page #85
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारत सुभाषितानि
४६६ न ब्रह्मचार्यधीयीत कल्याणीं न दुहेत गाम् ।
न कन्योद्वहनं गच्छेद्यदि दण्डो न पालयेत् ॥ १२।१५ ३७ जर दंड लोकांचें संरक्षण न करता तर ब्रह्मचा-यानें अध्ययन केलें नसतें. सवत्सा नूनें दूध दिलें नसतें; आणि मुलीनें विवाह करून घेतला नसता. ४६७ न लोके दीप्यते मूर्खः केवलात्मप्रशंसया ।
अपि चापिहितःश्वभ्रे कृतविद्यः प्रकाशते ।। १२।२८७।३१ लोकांत नुसत्या आत्मप्रौढीनें मूर्खाचें तेज पडत नाहीं. परंतु जो खरा खरा विद्वान् आहे त्याला एखाद्या बिळांत कोंडून ठेविलें, तरी तो चमकल्याशिवाय राहणार नाहीं. ४६८ नवनीतं हृदयं ब्राह्मणस्य
वाचि क्षुरो निशितस्तीक्ष्णधारः ।
७५
तदुभयमेतद्विपरीतं क्षत्रियस्य
वाङ्नवनीतं हृदयं तीक्ष्णधारमिति || १।३।१२३
ब्राह्मणाचे हृदय लोण्यासारखें मऊ असतें, परंतु बोलण्यांत तीक्ष्ण धारेच्या पाजवलेल्या वस्तऱ्यासारखा तो कठोर असतो. क्षत्रियाच्या या दोनहि गोष्टी उलट असतात. म्हणजे बोलणें मृदु पण हृदय कठीण.
४६९ न विश्वसेदविश्वस्ते विश्वस्ते नातिविश्वसेत् ।
विश्वासाद्भयमुत्पन्नं मूलान्यपि निकृन्तति || ५|३८|९
अविश्वासू माणसावर विश्वास ठेवू नये. विश्वासू मनुष्यावर देखील अति विश्वास टाकू नये. कारण, विश्वास ठेविल्यामुळे जर कांहीं भय उत्पन्न झालें, तर तें आपली पाळेमुळे खणून काढतें.
४७० न वै मानं च मौनं च सहितौ वसतः सदा ।
अयं हि लोको मानस्य असौ मौनस्य तद्विदुः || ५|४२|४४ मान व मौन हीं सर्वदा एकत्र रहात नाहींत. हा लोक मानाचा असून परलोक मौनाचा आहे असें म्हणतात.
( अन्न, स्त्री इत्यादि भोगांचे ठिकाणीं जो अभिलाष त्याला 'मान' असें म्हणतात. - आणि ब्रह्मानंदसुखाच्या प्राप्तीचें जें कारण त्याला 'मौन' असें म्हणतात. )
For Private And Personal Use Only
Page #86
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७६
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
४७१ न वै श्रुतमविज्ञाय वृद्धाननुपसेव्य वा ।
धर्मायौं वेदितुं शक्यौ बृहस्पतिसमैरपि || ५|३९|४१
शास्त्र समजून घेतल्यावांचून अथवा वृद्धांचा समागम केल्यावांचून धर्म व अर्थ या दोन पुरुषार्थाचें ज्ञान होणें बृहस्पतीसारख्या बुद्धिमान् पुरुषांनाहि शक्य नाहीं. ४७२ न वै सुखं प्राप्नुवन्तीह भिन्नाः || ५ | ३६ | ५६
आपसांत फुटून राहणारांना जगांत सुख खचित प्राप्त होत नाहीं.
४७३ न शत्रुर्वशमापन्नो मोक्तव्यो वध्यतां गतः || ५|३८|२९
ज्याचा अवश्य वध केला पाहिजे असा शत्रु हातांत सांपडला असतां सोडून देऊ नये.
४७४ न शत्रुर्विवृतः कार्यो वधमस्याभिकाङ्क्षता ।
क्रोधं भयं च हर्षे च नियम्य स्वयमात्मनि ॥१२११०३।८
शत्रूला ठार मारण्याची इच्छा करणाऱ्यानें आपला शत्रु प्रगट करूं नये, म्हणजे - त्याच्याशीं उघड द्वेष करूं नये. राग, भय व आनंद हीं आंतल्याआत दाबून ठेवावीं. ४७५ न श्रेयः सततं तेजो न नित्यं श्रेयसी क्षमा || ३ |२८|६ सदोदित तीव्रपणा श्रेयस्कर नाहीं, तसेंच नेहमीं सौम्यपणाहि कामाचा नाहीं. • ४७६ नष्टं समुद्रे पतितं नष्टं वाक्यमशृण्वति ।
अनात्मनि श्रुतं नष्टं नष्टं हुतमनग्निकम् ||५|३९|४२
जें समुद्रांत पडलें तें नष्ट झालें. न ऐकणाऱ्याला सांगितलेले वायां गेलें. स्वेच्छाचारी माणसाची विद्या फुकट गेली. राखेंत टाकलेली आहुति व्यर्थ गेली. ४७७ न संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति ।
संशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति ।। १२/१४०/३४ संकटांत सांपडल्यावांचून मनुष्याला चांगल्या गोष्टी प्राप्त होत नाहींत. पण संकटांत • सांपडल्यानंतर जर तो जिवंत राहिला तर त्याला आपलें कल्याण झालेलें दिसून येईल.
For Private And Personal Use Only
Page #87
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४७८ न स क्षयो महाराज यः क्षयो वृद्धिमावहेत् । ।
क्षयः स त्विह मन्तव्यो यं लब्ध्वा बहु नाशयेत् ॥५।३९/७. ( विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ) जो क्षय उत्कर्षाला कारण होतो तो खरोखर क्षय नव्हे. जो प्राप्त झाला असतां बहुत नाश करतो त्यालाच क्षय म्हणावें. ४७९ न सख्यमजरं लोके हृदि तिष्ठति कस्यचित् । __ कालो ह्येनं विहरति क्रोधो वैनं रहत्युत ॥१।१३१७
जगांत कोणाच्याहि अंतःकरणांत स्नेहभाव कमी न होतां एकसारखा टिकून रहात नाही. कालांतराने स्नेह नाहीसा होतो किंवा क्रोधामुळेहि नष्ट होतो. ४८० न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा
न ते वृद्धा ये न वदन्ति धर्मम् । नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति
न तत्सत्यं यच्छलेनाभ्युपेतम् ॥ ५।३५।५८ जेथे वृद्ध लोक नाहींत ती सभा नव्हे. जे धर्माला अनुसरून भाषण करीत नाहीत. ते वृद्ध नव्हेत. ज्यांत सत्य नाहीं तो धर्म नव्हे. आणि जें कपटाने युक्त असेल तें सत्यहि नव्हे. ४८१ न हायनैर्न पलितैर्न वित्तैर्न च बन्धुभिः । __ऋषयश्चक्रिरे धर्म योऽनूचानःस नो महान् ॥ १२॥३२३१६
वयोमान, पिकलेले केस, धनदौलत आणि सोयरेधायरे यांचे बलावर कोणाला मोठेपणा प्राप्त होत नाही. ऋषींनी असा नियम ठरविला की, जो सांगवेदाचें अध्ययन करणारा त्यालाच आम्ही श्रेष्ठ समजतो. ४८२ न हि कल्याणकृत्कश्चिद्दगति तात गच्छति ॥ ६।३०४०
(श्रीकृष्ण सांगतात ) बा अर्जुना, शुभ कर्मे करणारा केव्हांहि दुःस्थितीप्रत जात नाही. ४८३ न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।।६।२७५ काहीहि कर्म न करितां कोणीहि एक क्षणभर देखील राहू शकत नाही,
For Private And Personal Use Only
Page #88
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४८४ न हि खल्लनुपायेन कश्चिदर्थोऽभिसिध्यति ।
सूत्रजालैर्यथा मत्स्यान्बध्नन्ति जलजीविनः ॥१२।२०३।११ उपाय केल्यावांचून कोणतेंहि कार्य खचित सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ, जलचरांवर उपजीविका करणारे लोक सुतांचे जाळे टाकूनच माशांना घेरीत असतात. '४८५ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ॥६।२८।३८
खरोखर ज्ञानासारखें पवित्र या जगांत दुसरे काहीच नाही. ४८६ न हि दैवेन सिध्यन्ति कार्याण्येकेन सत्तम ।
न चापि कर्मणैकेन द्वाभ्यां सिद्धिस्तु योगतः ॥ १०॥२॥३ [ कृपाचार्य अश्वत्थाम्याला सांगतात ) एकट्या दैवाने किंवा एकट्या उद्योगाने कार्य सिद्धीस जात नसतात. परंतु या दोहोंच्या संयोगानें कोणतेंहि काम साधत असतें. ४८७ न हि पश्यामि जीवन्तं लोके कंचिदहिंसपा ।
सत्त्वैः सत्त्वा हि जीवन्ति दुबलैबलवत्तराः॥१२।१५।२० ( अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो ) अहिंसावृत्तीने जगांत जिवंत राहणारा कोणी दिसून येत नाही. खरोखर बलवान् प्राणी आपल्याहून दुर्बल असलेल्या प्राण्यांवर उपजीविका करीत असतात. ४८८ न हि प्रमादात्परमस्ति कश्चित्
वधो नराणामिह जीवलोके । प्रमत्तमा हि नरं समन्तात्
त्यजन्त्यनाश्च समाविशन्ति ॥ १०।१०।१९ या लोकी मनुष्यांना बेसावधपणापेक्षा अधिक घातक असें कांहींच नाही. बेसावध राहणाऱ्या मनुष्याला सर्व प्रकारची संपत्ति सोडून जाते, आणि त्याच्यावर संकटें मात्र कोसळतात.
For Private And Personal Use Only
Page #89
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
- ४८९ न हि प्राणात्मियतरं लोके किंचन विद्यते ।
७९
तस्माद्दयां नरः कुर्याद्यथात्मनि तथा परे ||१३|११६ । १२
मृत्युलोकीं प्राणापेक्षां प्रियतर असें कांहींच नाहीं. यास्तव, मनुष्यानें स्वतः प्रमाणेंच · दुसऱ्याविषयीं कळकळ बाळगून दया करावी.
: ४९० न हि बुद्धयान्वितः प्राज्ञो नीतिशास्त्रविशारदः ।
निमज्जत्यापदं प्राप्य महतीं दारुणामपि ।। १२:१३८|४० नीतिशास्त्रनिपुण, बुद्धिमान्, चतुर पुरुष केवढेहि मोठें भयंकर संकट प्राप्त झालें तरी त्यांत बुडून जात नाहीं. ४९१ न हि वैरं महात्मानो विवृण्वन्त्यपकारिषु ।
शनैः शनैर्महाराज दर्शयन्ति स्म ते बलम् || १२|१५७/१०
( भष्म युधिष्ठिराला म्हणतात ) थोर लोक आपला अपकार करणाऱ्याविषयींचें वैर एकदम प्रगट करीत नाहींत. तथापि हळू हळू आपलें सामर्थ्य दाखविल्यावांचून ते रहात नाहींत.
: ४९२ न हि वैराग्निरुद्भूतः कर्म चाप्यपराधजम् ।
शाम्यत्यदग्ध्वा नृपते विना ह्येकतरक्षयात् ।। १२ । १३९/४६
( पूजनी पक्षीण ब्रह्मदत्त राजाला म्हणते ) वैररूपी अग्नि एकदां उत्पन्न झाला म्हणजे तो दग्ध केल्यावांचून शांत होत नाहीं. आणि अपराधजन्य पातक दोहोंतून एकाचा क्षय केल्यावांचून नाश पावत नाहीं.
४९३ न हि वैराणि शाम्यन्ति दीर्घकालधृतान्यपि ॥ ५/७२ ६२ वैर दीर्घ कालपर्यंत धारण केलें तरी सुद्धा नाहींसें होत नाहीं.
४९४ न हि शौर्यात्परं किंचित् ॥ १२/९९/१८
शौर्यापेक्षां श्रेष्ठ कांहींच नाहीं.
४९५ न हि संचयवान्कश्चिदृश्यते निरुपद्रवः || ३|२|४८ कोणीहि संचयी पुरुष उपद्रवरहित असल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाहीं. ४९६ न हि सर्वत्र पाण्डित्यं सुलभं पुरुषेण वै || ३ |२८|२७ मनुष्याची अक्कल सर्व बाबतीत चालणें खचित सोपें नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #90
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४९७ नहीदृशमनायुष्यं लोके किंचन विद्यते । __ यादृशं पुरुषस्येह परदारोपसेवनम् ॥ १३॥१०४।२१
खरोखर, परस्त्रीगमनाइतकें पुरुषाच्या आयुष्याची हानि करणारे जगांत दुसरें कांहीं नाहीं. ४९८ न हृष्यत्यात्मसंमाने नावमानेन तप्यते ।
गाङ्गो हद इवाक्षोभ्यो यः स पण्डित उच्यते ॥ ५।३३।२६ ___ आपला सन्मान झाला असतां जो आनंद मानीत नाही, अपमान झाला असतां कष्टी होत नाही, आणि गंगेच्या डोहाप्रमाणे ज्याची शांति केव्हाही ढळत नाही त्याला पंडित म्हणतात. ४९९ न ह्यनाढ्यः सखाव्यस्य ॥ १।१३१।६९
दरिद्री श्रीमंताचा मित्र नसतो. ५०० न ह्यनुप्तं प्ररोहति ॥ १३॥१६३।११
पेरल्याविना उगवत नाही. ५०१ न ह्यात्मनः प्रियतरं किंचिद्भूतेषु निश्चितम् ॥ ११७।२७.
प्राणिमात्राला स्वतःपेक्षा प्रिय कांहींच नाही हे निश्चित होय. ५०२ न ह्यात्मस्तवसंयुक्तं वक्तव्यमनिमित्ततः ॥ ११३४१३
आत्मस्तुतीने युक्त असे भाषण कारणावांचून करूं नये. ५०३ न ह्युत्थानमृते दैवं राज्ञामर्थ प्रसाधयेत् ॥ १२॥५६।१४
उद्योगावांचून नुसते दैव राजांचे मनोरथ सिद्धीस नेणार नाही. ५०४ न हृतेऽर्थेन वर्तेते धर्मकामाविति श्रुतिः॥ १२॥१६७१२
अर्थाला (द्रव्याला ) सोडून धर्म व काम हे पुरुषार्थ रहात नाहीत अशी श्रुति आहे. ५०५ नाकारो गृहितुं शक्यो बृहस्पतिसमैरपि ॥७१२।१४ मनांतील हेतु छपविणे बृहस्पतीसारख्यांनाहि शक्य नाही.
For Private And Personal Use Only
Page #91
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५०६ नाकालतो म्रियते जायते वा
नाकालतो व्याहरते च बालः । नाकालतो यौवनमभ्युपैति
नाकालतो रोहति बीजमुप्तम् ॥ १२।२५।११ वेळ आल्याशिवाय कोणी मरत नाही किंवा जन्माला येत नाही. योग्य काळ आल्यावांचून लहान मूल बोलूं लागत नाही. योग्य काळाशिवाय कोणास तारुण्यावस्था प्राप्त होत नाही. आणि पेरललेले बी अकाली उगवत नाही. ५०७ नाकृतात्मा वेदयति धर्माधर्मविनिश्चयम् ॥ ३२१५।१८
मनोनिग्रह केल्याशिवाय धर्म कोणता, अधर्म कोणता याचे निश्चित ज्ञान होत नाही. ५०८ नाकृत्वा लभते कश्चित् किंचिदत्र प्रियाप्रियम् १२।२९८१३०
काही तरी केल्याशिवाय या लोकी कोणालाहि काही सुखदुःख प्राप्त होत नाही. ५०९ नागामिनमनर्थ हि प्रतिघातशतैरपि ।
शक्नुवन्ति प्रतिव्योहुमृते बुद्धिबलानराः ॥१२।२२७१३२ शेकडों प्रकारचे उपाय केले तरी मनुष्यांना बुद्धिसामर्थ्य असल्यावांचून भावी अनर्थाचा प्रतिकार करितां येणे शक्य नाही. ५१० नामतः कीर्तिरस्तीह न वित्तं न पुनः प्रजाः ।
इन्द्रो वृत्रवधेनैव महेन्द्रः समपद्यत ॥ १२।१५।१५ शत्रचा वध न करणाऱ्या राजाला या लोकी कीर्ति लाभणार नाहीं, धन मिळणार नाही आणि त्याची प्रजाहि सुरक्षित राहणार नाही. इंद्र सुद्धां वृत्रासुराचा वध करूनच महेंद्रपदवीला पोचला. ५११ नाच्छित्वा परममाणि नाकृत्वा कर्म दारुणम् ।
नाहत्वा मत्स्यघातीव प्राप्नोति महतीं श्रियम् १२११४०५० शत्रूच्या मर्मस्थानांवर घाव घातल्याशिवाय, भयंकर पराक्रम गाजविल्याशिवाय, आणि मासे मारणाऱ्या कोळ्याप्रमाणे हत्त्या केल्याशिवाय मोठ्या लक्ष्मीचा ( राजलक्ष्मीचा ) लाभ होणार नाही.
म. भा.६
For Private And Personal Use Only
Page #92
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५१२ नातः पापीयसीं कांचिदवस्थां शम्बरोऽब्रवीत् । __ यत्र नैवाद्य न प्रातर्भोजनं प्रति दृश्यते ॥ ५/७२।२२
आजच्या अथवा उद्यांच्याहि अन्नाची तजवीज ज्या अवस्थेमध्ये दृष्टीस पडत नाही, त्या अवस्थेपेक्षा कोणतीहि अवस्था अधिक दुःखदायक नाही, असें शंबरानेहि सांगितले आहे. ५१३ नात्मच्छन्देन भूतानां जीवितं मरणं तथा ।
नाप्यकाले सुखं प्राप्यं दुःखं वापि यदूत्तम ॥ ५।७२।५० (युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणतो ) हे यदुश्रेष्ठा, प्राण्यांना आपल्या इच्छेप्रमाणे जन्म किंवा मरण येत नाही. तसेंच, सुख काय किंवा दुःख काय, अकाली प्राप्त होत नसते. ५१४ नात्मच्छिद्रं रिपुर्विद्याद्विद्याच्छिद्रं परस्य तु ।
गृहेत्कर्म इवाङ्गानि रक्षेद्विवरमात्मनः ॥ १२॥१४०।२४ आपले मर्मस्थान शत्रूला समजू देऊ नये. आपण मात्र शत्रूचे मर्मस्थान शोधून काढावें. कासव ज्याप्रमाणे आपले सर्व अवयव आपल्या शरीरांतच दडवून ठेवतें त्याप्रमाणे राज्याची सर्व अंगें गुप्त राखावी. आणि आपल्या छिद्रांविषयी जपून असावें. ५१५ नात्यन्तं गुणवत्किंचिन्न चाप्यत्यन्तनिर्गुणम् ।
उभयं सर्वकार्येषु दृश्यते साध्वसाधु वा ॥ १२।१५।५० सर्वस्वी गुणसंपन्न असे काही नाही. आणि सर्वथा गुणहीनाह काही नाही. सर्व गोष्टींत बरें व वाईट ही दोनहि असलेली दिसून येतात. ५१६ नादेशकाले किंचित्स्याद्देशकालौ प्रतीक्षताम् ॥३॥२८॥३२
देशकाल अनुकूल नसतां कांही होणार नाही. यास्तव, देशकालाकडे नजर द्यावी. ५१७ नाधनो धर्मकृत्यानि यथावदनुतिष्ठति ।
धनाद्धि धर्मः स्रवति शैलादभि नदी यथा ॥१२।८।२३ ___ द्रव्य नसतां धर्मकृत्ये यथासांग करितां येत नाहीत. पर्वतापासून जशी नदी, तसा द्रव्यापासून धर्म उत्पन्न होतो.
For Private And Personal Use Only
Page #93
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५१८ नाधर्मश्चरितो राजन्सद्यः फलति गौरिव ।
शनैरावय॑मानो हि कर्तुर्मूलानि कृन्तति ॥ १।८०२ (शुक्राचार्य वृषपाला म्हणतात.) हे राजा, केलेलें पाप गाईप्रमाणे ताबडतोब फल देत नाही. परंतु ते पुनः पुनः केले जाऊन हळूहळू काची पाळे मुळे खणून काढते. ५१९ नाधर्मो विद्यते कश्चिच्छत्रून्हत्वाततायिनः ।
अधय॑मयशस्यं च शात्रवाणां प्रयाचनम् ॥ ५।३२१ आततायी अशा शत्रूना ठार मारल्याने कसलाहि अधर्म होत नाही. परंतु शत्रूजवळ याचना करणे हे मात्र धर्माविरुद्ध असून कीर्तीला काळिमा लावणारे आहे. ५२० नान्यत्र विद्यातपसोर्नान्यत्रेन्द्रियनिग्रहात् ।
नान्यत्र लोभसंत्यागाच्छान्तिं पश्यामि तेऽनघ ॥५/३६.५१ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे निष्पाप राजा, विद्या व तप यांच्यावांचून, इंद्रियनिग्रहावांचून, आणि लोभाचा सर्वथा त्याग केल्यावांचून तुला शांति प्राप्त होण्याचा अन्य मार्ग दिसत नाही. ५२१ नान्यद्दःखतरं किंचिल्लोकेषु प्रतिभाति मे ।
अर्थविहीनः पुरुषः परैः संपरिभूयते ॥ ३॥१९३।२० (वकमुनि इंद्राला म्हणतात ) लोक द्रव्यहीन पुरुषाचा सर्व प्रकारे अपमान करतात, यापेक्षा अधिक दुःखदायक गोष्ट जगात दुसरी कोणतीही असेल, असे मला वाटत नाही. ५२२ नापराधोऽस्ति नारीणां नर एवापराध्यति ।
सवेकायोपराध्यत्वान्नापराध्यन्ति चाङ्गन्नाः १२।२६६१४० स्त्रियांचे पाऊल कुमार्गाकडे वळण्याच्या कामी स्त्रियांचा काहीएक अपराध नाही. या कामी पुरुष हाच सर्वस्वी दोषी असतो. अशा प्रकारच्या सर्व बाबतीत पहिली आगळीक पुरुषाकडून होत असल्यामुळे स्त्रीवर्गाकडे दोष येत नाही. ५२३ नापृष्टः कस्यचिढ्यानाप्यन्यायेन पृच्छतः ।
ज्ञानवानपि मेधावी जडवत्समुपाविशेत् ॥ १२।२८७३५ कोणी प्रश्न न करितां किंवा अन्यायाने प्रश्न केला असतांही शहाण्या मनुष्याने उत्तर देऊ नये. तर त्यास त्या गोष्टीचे ज्ञान असूनहि त्याने अजाणत्याप्रमाणे गप्प बसावे.
For Private And Personal Use Only
Page #94
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
. ५२४ नापाप्यं तपसः किंचित् ।। १२।२९५।२३
तपाला अप्राप्य असे काहीच नाही. ५२५ नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् ।
आपत्सु च न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः ॥ ५॥३३॥३३ __ विचारी लोक अप्राप्य वस्तूचा अभिलाष धरीत नाहीत, गेलेल्याचा शोक करीत नाहीत, आणि अडचणीच्या प्रसंगी भांबावून जात नाहीत. ५२६ नाभीतो यजते राजन्नाभीतो दातुमिच्छति ।
नाभीतः पुरुषः कश्चित्समये स्थातुमिच्छति ॥१२।१५।१३ (अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो ) राजा, [ दंडाची ] भीति असल्याशिवाय कोणी यज्ञा करीत नाही, भीति वाटल्याशिवाय कोणाला दान करण्याची इच्छा होत नाही, आणि भीति वाटल्याशिवाय कोणी मनुष्य केलेला करार पाळू इच्छित नाही. ५२७ नामर्ष कुरुते यस्तु पुरुषः सोऽधमः स्मृतः ॥ २।५०१७
ज्या पुरुषाला दुसऱ्याने अपमान केला असतां क्रोध येत नाही, तो अधम समजावा. ५२८ नाऽमृतस्य हि पापीयान्भार्यामालभ्य जीवति ॥४.१७/१५
[ कीचकानें अपमान केला असतां द्रौपदी संतप्त होऊन पांडवांस म्हणते.] जिवंत पुरुषाच्या भार्येचा अपमान करणारा पापी कदापि जिवंत राहू शकणार नाही ! ५२९ नायमत्यन्तसंवासो लभ्यते जातु केनचित् ।
अपि स्वेन शरीरेण किमुतान्येन केनचित् ॥१२।२८।५२ कोणासहि खुद्द आपल्या शरीराचासुद्धा सहवास अनंत काळपर्यंत लाभत नाही. मग इतर वस्तूंची कथा काय ? ५३० नायं परस्य सुकृतं दुष्कृतं चापि सेवते ।
करोति यादृशं कर्म तादृशं प्रतिपद्यते ॥ १२॥२९०१२२ हा जीवात्मा दुसऱ्याचे सुकृत किंवा दुष्कृत भोगीत नाही. तर स्वतः ज्या प्रकारचे कर्म करतो त्याप्रकारचे फळ भोगतो.
For Private And Personal Use Only
Page #95
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५३१ नारभेतान्यसामर्थ्यात्पुरुषः कार्यमात्मनः ।
मतिसाम्यं द्वयोनास्ति कार्येषु कुरुनन्दन ॥२॥५६।८ मनुष्याने दुसऱ्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून आपले कार्य हाती घेऊ नये, कारण एकाच कार्याविषयी दोघांचे मत सारखे नसते. ५३२ नालं सुखाय सुहृदो नालं दुःखाय शत्रवः ।
न च प्रज्ञालमानांन सुखानामलं धनम् ॥१२॥१७४।२९ मित्र असले म्हणून ते सुख देऊ शकतात असे नाही, व शत्रु असले म्हणून ते दुःख देऊ शकतात असेंहि नाहीं, बुद्धीच्या योगाने द्रव्यप्राप्ति होतेच असे नाही, व द्रव्याच्या योगाने सुख होतेच असेंहि नाही. ५३३ नालसाः प्राप्नुवन्त्यर्थान्न क्लीवा नाभिमानिनः ।
नच लोकरवाद्भीतान वै शश्वत्प्रतीक्षिणः ॥१२॥१४०१२३ आळशी, दुर्बळ, गर्विष्ठ, लोकापवादाला भिणारे, आणि नेहमी वाट पहात राहणारे दीर्घसूत्री अशांना इष्टप्राप्ति होत नाही. ५३४ नावं न शक्यमारुह्य स्थले विपरिवर्तितुम् ।
तथैव रथमारुह्य नाप्सु चर्या विधीयते ॥ १४॥५०॥३० नावेत बसून जमिनीवर इकडे तिकडे हिंडतां येणे शक्य नाही. आणि रथांत बसून पाण्यावर चालता येणार नाही. ५३५ नाश्रोत्रियः श्रोत्रियस्य नारथी रथिनः सखा ।
नाराजा पार्थिवस्यापि सखिपूर्व किमिष्यते ॥१।१३।११ (द्रुपद राजा द्रोणाचार्यांना म्हणतो ) वेदवेत्त्या ब्राह्मणाचा मित्र वेद न जाणणारा नसतो. रथांतून लढणा-या योद्धयाचा मित्र त्याच्याचसारखा असतो. राजाचा मित्र राजाच असतो. पूर्वीच्या मैत्रीला काय करावयाचें ? ५३६ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥६२६१६ जें मूळांतच नाही ते अस्तित्वात येणे शक्य नाही, आणि जे आहे ते नाहीसे होणे शक्य नाही. असा दोहोंच्या खऱ्या स्वरूपाचा निर्णय तत्त्वदर्शी पुरुषांनी ठरविला आहे.
For Private And Personal Use Only
Page #96
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८६
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५३७ नासम्यक्कतकारी स्यादप्रमत्तः सदा भवेत् ।
कण्टको ह्यपि दुश्छिन्नो विकारं कुरुते चिरम् ॥ १२।१४०/६० निष्काळजीपणाने कांहीं करूं नये. नेहमीं सावध असावें. कारण एकादा कांटासुद्धां जर अयोग्य रीतीनें तुटला तर तो पुष्कळ काळपर्यंत विकार उत्पन्न करतो.
५३८ नास्ति जात्या रिपुर्नाम मित्रं वापि न विद्यते । सामर्थ्ययोगाज्जायन्ते मित्राणि रिपवस्तथा ।। १२।१४०/५१
नसतो किंवा मित्रहि नसतो. सामर्थ्याच्या योगानें
खरोखर जन्मतःच कोणी शत्रु मित्र आणि शत्रु हे होत असतात.
५३९ नास्ति भार्यासमं किंचिन्नरस्यार्तस्य भेषजम् ।। १२।१४४|१५
आर्त पुरुषाला भार्येसारखे दुसरें औषध नाहीं.
५४० नास्ति भार्यासमो बन्धुर्नास्ति भार्यासमा गतिः ।
नास्ति भार्यासमो लोके सहायो धर्मसंग्रहे ॥। १२।१४४।१६
भार्येसारखा मित्र नाहीं, भार्येसारखा आसरा नाहीं. या लोकीं भार्येसारखा धर्मानुष्ठानांत साहाय्य करणारा कोणी नाहीं.
५४१ नास्ति मातृसमा च्छाया नास्ति मातृसमा गतिः ।
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया ।। १२/२६६।३१ मातेसारखी सांवली नाहीं, मातेसारखी गति नाहीं, मातेसारखें छत्र नाहीं. मातेसारखी प्रिय कोणी नाहीं.
५४२ नास्ति विद्यासमं चक्षुर्नास्ति सत्यसमं तपः ।
नास्ति रागसमं दुःखं नास्ति त्यागसमं सुखम् ।। १२।३२९/६ विद्येसारखा अन्य नेत्र नाहीं. सत्यासारखे तप नाहीं. विषयवासनेसारखें दुःख नाहीं, आणि त्यागासारखें सुख नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #97
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५४३ नास्ति वै जातितः शत्रुः पुरुषस्य विशांपते ।
येन साधारणी वृत्तिः स शत्रुर्नेतरो जनः ॥२।५५।१५ (दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो ) राजा, जन्मतःच कोणी मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा शत्रु नसतो. आपल्या सारखीच ज्याची उपजीविका असेल तोच आपला शत्रु; दुसरा कोणी नाही. ५४४ नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।
न हि तीव्रतरं किंचिदनृतादिह विद्यते ॥ ११७४।१०५ सत्यापरता धर्म नाही, सत्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. असत्यापेक्षा अधिक भयंकर असें जगांत कांहींच नाही. ५४५ नास्थाने प्रक्रिया क्षमा ।। १२।११९।३
अस्थानी बहुमान करणे योग्य नव्हे. ५४६ नाहं राज्यं भवदत्तं भोक्तुमिच्छामि पार्थिव ।
बाहुवीयार्जितं राज्यमश्नीयामिति कामये ।। १२|७४।१८ [ मुचुकुंद कुबेराला म्हणतो ] तुझ्याकडून दान मिळालेले राज्य भोगण्याची माझी इच्छा नाही. स्वतःच्या बाहुबलाने मिळवून त्याचा उपभोग घ्यावा असें मी इच्छितो. ५४७ नाह्ना पूरयितुं शक्या न मासैभरतर्षभ ।
अपूयो पूरयनिच्छामायुषापि न शक्रयात्॥१२॥१७१४ वासनेची तृप्ति एका दिवसाने किंवा काही महिन्यांनीहि होणे शक्य नाही. वासना ही 'अपूर्य ' असून तिची पूर्ति करणे सबंध आयुष्य खर्चुन सुद्धां शक्य नाही. ५४८ निकृत्या निकृतिप्रज्ञा हन्तव्या इति निश्चयः।
न हि नैकृतिकं हत्वा निकृत्या पापमुच्यते ।। ३।५२।२२ कपटबुद्धि शत्रूचा कपटानेच वध केला पाहिजे असा सिद्धांत आहे. कपटी शत्रूचा कपटाने वध केला असता त्याला पाप म्हणत नाहीत.
For Private And Personal Use Only
Page #98
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८८
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
५४९ नित्यं यस्तु सतो रक्षेदसतश्च निवर्तयेत् ।
स एव राजा कर्तव्यस्तेन सर्वमिदं धृतम् || १२|७८|४४ जो नेहमीं सज्जनांचें पालन करील आणि दुर्जनांना घालवून देईल त्यालाच राजा करावे. त्याच्याच आश्रयानें सर्व विश्व असतें.
५५० नित्यं रक्षितमन्त्रः स्याद्यथा मूकः शरच्छिखी ।। १२।१२०/७ ज्याप्रमाणे मोर हा शरहतूंत मौन धारण करतो, त्याप्रमाणें राजानें आपली मसलत नेहमीं गुप्त राखावी.
५५१ नित्यं विश्वासयेदन्यान् ।
परेषां तु न विश्वसेत् ।। १२।१३८।१९५
आपल्याविषयीं दुसऱ्यांच्या मनांत नेहमीं विश्वास उत्पन्न करावा. आपण मात्र दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नये.
५५२ नित्यमुद्यतदण्डस्य भृशमुद्विजते नरः ।
तस्मात्सर्वाणि भूतानि दण्डेनैव प्रसाधयेत् || १२ | १४०१८ दंडशक्ति नेहमीं सज्ज असली म्हणजे लोक फार वचकून असतात. यास्तव राजानें सर्व प्राण्यांना दंडशक्तीच्या योगानेंच आपल्या ताब्यांत ठेवावे. ५५३ नित्यं बुद्धिमतोऽप्यर्थः स्वल्पकोऽपि विवर्धते ।
दाक्ष्येण कुर्वतः कर्म संयमात्प्रतितिष्ठति ।। १२ । १३९।८८
बुद्धिमान् पुरुषाजवळ आरंभीं अगदी थोडे द्रव्य असले तरी तें नेहमीं वाढत जातें. दक्षतेनें, एकाग्रतेनें उद्योग करणाराचे कार्य पक्के होतें.
५५४ निमेषमात्रमपि हि वयो गच्छन्न तिष्ठति ।
स्वशरीरेष्वनित्येषु नित्यं किमनुचिन्तयेत् ॥ १२।३३०/२२
आयुष्य एकसारखें चाललें असून एक पळभरसुद्धां थांबत नाहीं. स्वतःचें शरीरच जेथें अशाश्वत, तेथें कोणती वस्तु शाश्वत म्हणून समजावयाची ? ५५५ नियन्ता चेन्न विद्येत न कश्चिद्धर्ममाचरेत् ||४|६८।४५ नियमन करणारा कोणी नसेल तर कोणीहि धर्माप्रमाणें वागणार नाहीं..
For Private And Personal Use Only
Page #99
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
wwwwwwwwwwwwwrrmwar
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ५५६ निरीहो नाश्नुते महत् ॥ ५।१३३३३४
काहीएक उद्योग न करणाऱ्या पुरुषाला मोठेपणा प्राप्त होत नाही. ५५७ निर्मन्युश्चाप्यसंख्येयः पुरुषः क्लीबसाधनः ॥५।१३३॥६
ज्याला कधी राग येत नाही असा नामर्द पुरुष कोणाच्या खिसगणतीत नसतो. ५५८ निर्वनो वध्यते व्याघ्रो नियाघ्रं छिद्यते वनम् ।
तस्माद्वयाघ्रो वनं रक्षेद्वनं व्याघ्रं च पालयेत् ॥५।२९।५५ वन नसेल तर वाघांचा वध होत असतो, आणि ज्यांत वाघ नाहीं तें वनहि लोकांकडून तोडले जाते. यास्तव वाघाने वनाचे रक्षण करावे, आणि वनानेंहि वाघाचें पालन करावें. ५५९ निश्चयः स्वार्थशास्त्रेषु विश्वासश्चासुखोदयः॥१२॥१३९।७०
नीतिशास्त्राचा असा सिद्धांत आहे की, विश्वास हा सर्व दुःखांचे उत्पत्तिस्थान आहे. ५६० निश्चित्य यः प्रक्रमते नान्तर्वसति कर्मणः ।
अवन्ध्यकालो वश्यात्मा स वै पण्डित उच्यते॥५।३३।२४ प्रथम निश्चय केल्यावरच जो कार्य हाती घेतो, कार्य हाती घेतल्यावर ते पार पडल्यावांचून जो स्वस्थ बसत नाही, जो आपला वेळ फुकट घालवीत नाही आणि ज्याचे मन स्वाधीन आहे त्याला पंडित असे म्हणतात. ५६१ निषेवते प्रशस्तानि निन्दितानि न सेवते ।
अनास्तिकः श्रद्दधान एतत्पण्डितलक्षणम् ॥५।३३।१६ जो प्रशस्त कर्माचे आचरण करतो, निंद्य कर्मापासून दूर राहतो [ पुनर्जन्म, परलोक इत्यादिकांविषयीं ] आस्तिक्यबुद्धि धारण करतो, आणि [गुरु, वेदवाक्य इत्यादीवर ] विश्वास ठेवतो तो पंडित होय.
For Private And Personal Use Only
Page #100
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५६२ नैकमिच्छेदगणं हित्वा स्याचदन्यतरग्रहः ।
यस्त्वेको बहुभिः श्रेयान्कामंतेन गणं त्यजेत्।।१२।८३।१२
श्रेयसो लक्षणं चैतद्विक्रमो यस्य दृश्यते ॥१२।८३३१३ समुदायाला सोडून [ राजानें ] एकाच मनुष्याची इच्छा करूं नये; व एकाचाच अंगीकार करणे अवश्य असल्यास, जो एकटा इतर पुष्कळांपेक्षा श्रेष्ठ असेल, त्याचा स्वीकार करून समुदायाचा खुशाल त्याग करावा. कारण, ज्या पक्षांत जास्त पराक्रम असेल तो स्वीकारणे हे कल्याणाचे लक्षण आहे. ५६३ नैवास्य कश्विद्भविता नायं भवति कस्यचित् ।।
पथि सङ्गतमेवेदं दारबन्धुसुहृज्जनः ।। १२।२८।३९ ह्या जीवात्म्याचा कोणी नाही आणि हा कोणाचा नाही. स्त्री, इतर नातलग व इष्ट मित्र यांचा सहवास हा केवळ रस्त्यांतील भेटीसारखा आहे. ५६४ नैवाहितानां सततं विपश्चितः
क्षणं प्रतीक्षन्त्यपि दुर्बलीयसाम् । विशेषतोऽरीन्व्यसनेषु पण्डितो
निहत्य धर्म च यशश्च विन्दते ॥ ८९०७१ शत्र दुर्बळ झाले म्हणजे शहाणे लोक केव्हांहि त्यांचा नाश करण्याला क्षणभरदेखील विलंब लावीत नाहीत. शत्रूचा वध करणें तो विशेषेकरून तो संकटांत असतांनाच केला पाहिजे. शहाण्याने अशाच स्थितीत शत्रूचा नाश केल्यास त्याजकडून धर्माचरण होऊन शिवाय त्यास कीर्तिहि प्राप्त होते. ५६५ नोदकक्लिन्नगावस्तु स्नात इत्यभिधीयते ।
सस्नातोयो दमस्त्रातः स बाह्याभ्यन्तरः शुचिः।।१३।१०८९ पाण्याने आंग भिजविलें म्हणजे स्नान केले असे म्हणत नाहीत. ज्याने इंद्रियदमनरूप उदकांत स्नान केलें तोच खरोखर 'स्नात' झाला. तो अंतर्बाह्य शुचिर्भूत झाला. ५६६ न्यायागतस्य द्रव्यस्य बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ।
अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम् ॥५॥३३॥५९ न्यायाने मिळालेल्या द्रव्याचे दोन दुरुपयोग जाणावे. एक, अपात्री दान करणे. व दुसरा, सत्पात्री न करणे.
For Private And Personal Use Only
Page #101
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
mmmmmmmmmmmmmmmmmm
५६७ पकानां हि वधे मूत वज्रायन्ते तृणान्युत ।। ७।११।४८ पक्व झालेल्यांचा वध करण्याच्या कामी तृणाचासुद्धा वज्रासारखा उपयोग होतो. ५६८ पञ्चमेऽहनि षष्ठे वा शाकं पचति स्वे गृहे ।
अनृणी चाप्रवासी च स वारिचर मोदते ॥३।३१३।११५ (युधिष्ठिर यक्षाला म्हणतो) पांचव्या अथवा सहाव्या दिवशी का होईना, जो, स्वतःचे घरीच असेल तो भाजीपाला उकडून खातो, ज्याला कोणाचे देणे नाही, आणि ज्याला प्रवास करावा लागत नाही तो, हे यक्षा, आनंदाने राहतो. ५६९ पञ्चेन्द्रियस्य मत्यस्य छिद्रं चेदेकमिन्द्रियम् । . ततोऽस्य स्रवति प्रज्ञा दृतेः पात्रादिवोदकम् ।। ५।३३।७७
मनुष्याच्या पांच इंद्रियांपैकी एकादें जरी ताब्यात नसेल तरी त्याच्या द्वारें, भांड्यांतील पाणी भोकांतून गळून जावे त्याप्रमाणे, त्याची बुद्धि नष्ट होते. ५७० पठकाः पाठकाश्चैव ये चान्ये शास्त्रचिन्तकाः ।
सर्वेव्यसनिनोमुखायःक्रियावान्सपण्डितः॥३॥३१३।११० शिकणारे व शिकविणारे तसेच इतर जे कोणी शास्त्राविषयी विचार करतात ते सर्व अभागी, मूर्ख आहेत. जो काही तरी करून दाखवितो तोच खरा शहाणा. ५७१ पण्डितेन विरुद्धः सन् दूरस्थोऽस्मीति नाश्वसेत् ।
दीघौबुद्धिमतो बाहू याभ्यां हिंसति हिसितः।।१२।१४०६८ पंडिताशी विरोध आला असतां, आपण त्याच्यापासून दूर आहो असे समजून निर्भयपणे राहूं नये. कारण बुद्धिमान् पुरुषाचे बाहू [ दिसण्यांत जेवढे दिसतात तेवढे नसून ते ] फार लांब असतात, व त्याला पीडा दिल्यास त्यांच्या योगानें तो पीडा देणाऱ्यांचा वध करतो. ५७२ पतितः शोच्यते राजन्निधनश्चापि शोच्यते ।
विशेषं नाधिगच्छामि पतितस्याधनस्य च ॥१२।८।१५ ( अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) राजा, लोक पातकी मनुष्याच्या संबंधानें हळहळतात आणि निर्धनाच्या संबंधानेंहि हळहळतात. मला तर महापातकी आणि दरिद्री यांच्यामध्ये काहीं भेद दिसत नाही.
For Private And Personal Use Only
Page #102
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५७३ पतिर्हि देवो नारीणां पतिबन्धुः पतिर्गतिः।
पत्या समा गतिनास्ति दैवतं वा यथा पतिः॥१३॥१४६।५५ पति हाच स्त्रियांचा देव, पति हाच वांधव, आणि पति हेच आश्रयस्थान, स्त्रियांना पतीसारखी गति नाही, पति हा खरोखर देवासमान हाय. ५७४ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ।। ६।३३।२६ (भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ) पान, फूल, फळ किंवा नुसते पाणी सुद्धां जो मला ( परमेश्वराला ) भक्तिपूर्वक अर्पण करतो, त्या शुद्ध अंतःकरणाच्या मनुष्याचे भक्तीने अर्पण केलेले मी स्वीकारीत असतो.. ५७५ परं विषहते यस्मात्तस्मात्पुरुष उच्यते ॥५॥१३३३३५
शत्रूचा पराजय करतो म्हणून पुरुष म्हणतात. ५७६ परं क्षिपति दोषेण वर्तमानः स्वयं तथा । ___ यश्च क्रुध्यत्यनीशानः स च मूढतमो नरः ॥५॥३३॥३७
जो दोष स्वतःचे ठिकाणी आहे त्याच दोषाबद्दल जो दुसऱ्याला नावे ठेवतो, तसेंच आंगीं सामर्थ्य नसतां जो रागावतो तो मनुष्य पराकाष्ठेचा मूर्ख होय. ५७७ परनेयोग्रणीर्यस्य स मार्गान्प्रतिमुह्यति ।
पन्थानमनुगच्छेयुः कथं तस्य पदानुगाः ॥२।५५।४ ज्याचा पुढारी दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा असतो, त्याचा स्वतःचाच मार्ग चुकतो. मग आणखीहि त्याच्या मागून जाणारांना योग्य मार्ग कसा सांपडावा ? ५७८ परवाच्येषु निपुणः सर्वो भवति सर्वदा ।
.. आत्मवाच्यं न जानीत जानन्नपि च मुह्यति ॥ ८४५१४४ दुस-याचे दोष काढण्यांत सर्वजण प्रवीण असतात. कोणालाही स्वतःचा दोष मात्र समजत नाहीं; आणि समजला तर उमजत नाही.
For Private And Personal Use Only
Page #103
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
Annnnnnnnnnnn~
५७९ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ६।२८।८ (श्रीकृष्ण म्हणतात) सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी, दुष्टांचे निर्दलन करण्यासाठी, आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी युगायुगांच्या ठिकाणी मी ( परमेश्वर ) अवतार घेत असतो. ५८० पर्जन्यः पर्वते वर्षन् किं नु साधयते फलम् ।
कृष्ट क्षेत्रे तथा वर्षन् किं न साधयते फलम् ॥ १०।२।५ पाऊस डोंगरावर पुष्कळ पडला तरी त्यापासून कोणते फळ मिळणार ? तोच नांगरलेल्या शेतांत पडला तर कोणते फळ मिळणार नाही ? ५८१ पर्जन्यनाथाः पशवो राजानो मन्त्रिवान्धवाः ।
पतयो बान्धवाः स्त्रीणां ब्राह्मणा वेदबान्धवाः॥५॥३४॥३८ पर्जन्य हा पशूचा बांधव ( हितकर्ता ) होय. राजांचा बांधव प्रधान. स्त्रियांचा बांधव पति, आणि ब्राह्मणांचा बांधव वेद होय. ५८२ पर्यन्शय्या भूमिश्च समाने यस्य देहिनः ।
शालयश्चकदन्नं च यस्य स्यान्मुक्त एव सः॥१२।२८८।३४ पलंगावर पहुडणे व जमिनीवर पडणे ही दोनहि ज्याला सारखींच वाटतात, तसेंच उंची पक्वान्न आणि कदन्न ज्याला सारखेच तो मुक्तच होय. ५८३ पात्रे दानं स्वल्पमपि काले दत्तं युधिष्ठिर ।
मनसा हि विशुद्धेन प्रेत्यानन्तफलं स्मृतम् ॥३२५९।३४ ( व्यासमुनि म्हणतात ) हे युधिष्ठिरा, योग्य ठिकाणी योग्य वेळी शुद्ध मनाने केलेले दान अत्यल्प जरी असले, तरी त्यापासून मरणोत्तर मोठे फळ मिळतें.. ५८४ पानमक्षास्तथा नार्यों मृगया गीतवादितम् ।
एतानि युक्त्या सेवेत प्रसङ्गोह्यत्र दोषवान्॥१२॥१४०२६ __ मद्य, जुगार, त्याचप्रमाणे स्त्रिया, मृगया आणि गाणे बजावणे यांचे जपून सेवन करावें. कारण, यांची चटक लागणे फार वाईट.
For Private And Personal Use Only
Page #104
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
९४
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
५८५ पापानां विद्ध्यधिष्ठानं लोभमेव द्विजोत्तम । ३।२०७/५८ ( धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणतो ) हे द्विजश्रेष्ठा, सर्व पापांचे आश्रयस्थान लोभ हेच आहे असें जाण.
५८६ पापेभ्यो हि धनं दत्तं दातारमपि पीडयेत् ।
तस्माद्धर्मार्थमनृतमुक्त्वा नानृतभाग्भवेत् || ८|६९/६५
दुष्टांना धन मिळू दिलें असतां त्यापासून देणारालासुद्धां पीडा होते. [ म्हणून चोराला धन कोठें आहे हें सांगण्यापेक्षां खुशाल खोटें सांगावें. ] म्हणून धर्मासाठी खोटें बोललें असतां खोटें बोलण्याचे पाप लागत नाहीं.
५८७ पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
पुत्राश्च स्थाविरे भावे न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ॥ १३ | ४६।१४ स्त्रीचें कुंवारपणीं बाप रक्षण करितो, तरुणपणीं पति रक्षण करितो, आणि वृद्धपण - मुलगे रक्षण करितात. एवंच, स्त्री ही स्वातंत्र्याला पात्र नाहीं.
५८८ पित्रा पुत्रो वयःस्थोऽपि सततं वाच्य एव तु ।
यथा स्याद्गुणसंयुक्तः प्राप्नुयाच महद्यशः || १ |४२|४ मुलगा मोठा झाला असला, तरी मुद्धां तो सद्गुणी व्हावा आणि त्याला उत्तम प्रकारचें यश लाभावें, म्हणून बापानें त्याला तशा प्रकारचा उपदेश करावा. ५८९ पिवन्त्येवोदकं गावो मण्डूकेषु रुवत्स्वपि ॥१२।१४१।८२ ( तळ्यांतील ) बेडकांनी कितीहि डरांव डरांव केलें तरी गाई पाणी पितातच ! ५९० पुत्र आत्मा मनुष्यस्य भार्या दैवकृतः सखा || ३ | ३१३।७२
पुत्र हाच मनुष्याचा आत्मा होय, आणि भार्या हा देवानें प्राप्त झालेला सखा होय. ५९१ पुत्रं हि मातापितरौ त्यजतः पतितं प्रियम् ।
लोकोरक्षति चात्मानंपश्यस्वार्थस्यसारताम् ||१२|१३८ । १४६
आपला पुत्र प्रिय असूनहि पतित झाला तर आईबापसुद्धां त्याचा त्याग करतात. लोकहि [ इतरांकडे न पाहतां ] स्वतःचें संरक्षण करीत असतात, स्वार्थाचा प्रभाव केवढा आहे पहा !
For Private And Personal Use Only
Page #105
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५९२ पुत्र नात्मावमन्तव्यः पूर्वाभिरसमृद्धिभिः ।। ५।१३५२५
(विदुला माता संजयाला म्हणते ) हे पुत्रा, प्रथमतः आपणापाशी जरी संपत्ति नसली तरी त्याकरितां पुरुषाने स्वतःला दीन समजू नये. ५९३ पुत्रपौत्रोपपन्नोऽपि जननी यः समाश्रितः । ___ अपि वर्षशतस्यान्ते स द्विहायनवच्चरेत् ॥ १२॥२६६।२८
मनुष्य पुत्रपौत्रांनी युक्त असला तरी ज्याला मातेचा आश्रय आहे, तो आपल्या वयाच्या शंभराव्या वर्षीच्या शेवटीहि दोन वर्षांच्या लहान मुलाप्रमाणे वागेल ! ५९४ पुत्रस्पर्शात्सुखतरः स्पर्शो लोके न विद्यते ॥ ११७४।५८
पुत्रस्पर्शापेक्षा सुखकर स्पर्श जगांत कोणताच नाही. ५९५ पुत्रः सखा वा भ्राता वा पिता वा यदि वा गुरुः ।
रिपुस्थानेषु वर्तन्तो हन्तव्या भूतिमिच्छता ॥१।१४०५२ पुत्र, मित्र, भाऊ, बाप किंवा गुरु, कोणीहि असो, तो जर शत्रुत्वाने वागत असेल तर त्याचा उत्कर्षेच्छु पुरुषाने वध करावा. ५९६ पुत्रा इव पितुर्गेहे विषये यस्य मानवाः ।
निर्भया विचरिष्यन्ति स राजा राजसत्तमः ॥१२॥५७३३ बापाच्या घरांत जसे मुलगे, तसे ज्याच्या राज्यांत लोक निर्भयपणे संचार करूं शकतात, तो राजा सर्व राजांत श्रेष्ठ होय. ५९७ पुनरावर्तमानानां भग्नानां जीवितैषिणाम् ।
भेतव्यमरिशेषाणामेकायनगता हि ते ॥ ९।५८।१५ जिवाची इच्छा करणारे पण एकदा पराभव पावले असून, पुनः उलटून येणारे असे जे शत्रूकडील उरलेले लोक त्यांचे भय धरावें. कारण, [ मारीन किंवा मरेन एवढा ] एकच विषय त्याच्या दृष्टीपुढे असतो.
For Private And Personal Use Only
Page #106
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९६
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५९८ पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयंभुवा || १ |७४।३९
पुत् नामक नरकापासून मुलगा हा बापाचें रक्षण करतो, म्हणून त्याला स्वतः ब्रह्मदेवानेच पुत्र असें म्हटलें आहे.
५९९ पुरुषे पुरुषे बुद्धिर्या या भवति शोभना ।
तुष्यन्ति च पृथक्सर्वे प्रज्ञया ते स्वया स्वया || १० | ३ ३
प्रत्येक मनुष्यामध्यें जो म्हणून शहाणपणाचा भाग असतो, तेवढ्यावरच जो तो आपआपल्या ठिकाणी खुष असतो.
६०० पुष्पं पुष्पं विचिन्वीत मूलच्छेदं न कारयेत् ।
मालकार इवारामे न यथाङ्गारकारकः || ५|३४|१८ बागेतील माळ्याप्रमाणे वृक्षाचें मूळ न तोडितां फूल येईल तेवढे घेत असावे. लोणाऱ्याप्रमाणे मुळासकट वृक्ष तोडून टाकू नये.
६०१ पूर्व संमानना यत्र पथाच्चैव विमानना ।
जह्यात्तत्सत्त्ववान्स्थानं शत्रोः संमानितोऽपि सन्।१२।१३९।३३
जेथें पहिल्यानें बहुमान मिळतो व मागाहून अपमान होतो तें ठिकाण, शत्रूकडून पुनरपि मानसन्मान मिळाला तरी, स्वाभिमानी पुरुषानें सोडूनच दिलें पाहिजे. ६०२ पृथिवी रत्नसंपूर्णा हिरण्यं पशवः स्त्रियः ।
नालमेकस्य तत्सर्वमिति मत्वा शमं व्रजेत् || १/७५/५१
रत्नांनी परिपूर्ण असलेली सर्व पृथ्वी, सोनें, पशु, स्त्रिया हे सर्व एकट्याला मिळालें तरी, पुरणार नाहीं असा विचार करून, मनुष्यानें मनोनिग्रह करण्यास शिकावे. ६०३ प्रक्षालनाद्धि पडून्स्य श्रेयो न स्पर्शनं नृणाम् || ३|२|४९
चिखल [ आंगावर उडाल्यावर ] धुऊन टाकण्यापेक्षां त्याला स्पर्शच न करणें मनुष्यांना सुखावह होतें.
For Private And Personal Use Only
Page #107
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६०४ प्रच्छन्नो वा प्रकाशो वा योगो योऽरिं प्रबाधते ।
तद्वै शस्त्रं शस्त्रविदां न शस्त्रं छेदनं स्मृतम् ।।२।५५।९ उघड असो अथवा गुप्त असो, ज्या उपायाने शत्रूचा नाश होत असेल त्या उपायालाच वीरांचे शस्त्र म्हणतात. [हातपाय] तोडणाऱ्या शस्त्राला शस्त्र म्हणत नाहीत. ६०५ प्रज्ञया मानसं दुःखं हन्याच्छारीरमौषधैः।
एतद्विज्ञानसामर्थ्य न बालैः समतामियात् ॥१२।२०५।३ मानसिक दुःख विवेकाने आणि शारीरिक दुःख औषधानें नाहींसें करावें. अशा प्रकारे दुःखाचा नाश करणे हेच ज्ञानाच्या सामर्थ्याचे लक्षण आहे. [ दुःखाचा परिहार न करितां ] लहान बालकांसारखे वागू नये. ६०६ प्रज्ञा प्रतिष्ठा भूतानां प्रज्ञा लाभः परो मतः ।
प्रज्ञा निःश्रेयसी लोके प्रज्ञा स्वर्गो मतः सताम्।।१२।१८०२ ज्ञान हाच प्राण्यांचा आधार आहे. ज्ञान हाच उत्कृष्ट असा लाभ आहे. लोकांत ज्ञान हेच मोक्षालाहि कारण आहे. ज्ञान हाच प्रत्यक्ष स्वर्ग आहे. असें सत्पुरुषांचें मत आहे. ६०७ प्रतिकूलः पितुर्यश्च न स पुत्रः सतां मतः ।। ११८५।२४
बापाशी जो वैर करतो तो पुत्र सज्जनांना मान्य होत नाही. ६०८ प्रत्युपकुर्वन्बह्वपि न भाति पूर्वोपकारिणा तुल्यः ।
एकाकरोतिहिकृतनिष्कारणमेवकुरुतेऽन्यः॥१२।१३८/८२ उपकारांची भरपूर फेड करणारा मूळ उपकार करणाऱ्याच्या बरोबरीचा ठरेल असे वाटत नाही. कां की, एकजण आधी उपकृत झाल्यावर मग [ फेड म्हणून ] करीत असतो, तर दुसरा निरपेक्ष बुद्धीनेच उपकार करतो. ६०९ प्रत्युपस्थितकालस्य सुखस्य परिवर्जनम् ।
__ अनागतसुखाशा च नैव बुद्धिमतां नयः॥१२॥१४०।३६ वेळेवर चालून आलेलें सुख सोडून द्यावयाचे आणि प्राप्त न झालेल्या सुखाची आशा करीत बसावयाचे ही शहाण्यांची रीतच नव्हे.
म. भा. ७
For Private And Personal Use Only
Page #108
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९८
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
६१० प्रभवन् योऽनहंवादी स वै पुरुष उच्यते ॥१३॥१४६।१५
हाती सत्ता असून ज्याला गर्व नाहीं तोच पुरुष म्हणावयाचा. ६११ प्रभवार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् । ___यः स्यात्प्रभवसंयुक्तःस धर्म इति निश्चयः||१२।१०९।१०
जीवांचा उत्कर्ष व्हावा एवढ्यासाठीच धर्म कथन केला आहे. जो उत्कर्षाने युक्त असेल तोच धर्म असा सिद्धांत आहे. ६१२ प्रयोजनेषु ये सक्ता न विशेषेषु भारत ।
तानहं पण्डितान्मन्ये विशेषा हि प्रसङ्गिन्नः॥ ५॥३८१४४ [विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ] हे राजा, जे केवळ कार्ये पार पाडण्याविषयी तत्पर असतात, फाजील भानगडीत पडत नाहीत, त्यांना मी शहाणे समजतो. कारण, स्वतःचे आधिक्य दाखविणारे कलहाचा प्रसंग आणितात. ६१३ प्रवारणं तु बालानां पूर्व कार्यमिति श्रुतिः ॥ ५/७१७
बालकांची इच्छा प्रथम पुरवावी अशी श्रुति आहे. ६१४ प्रवृत्तवाक् चित्रकथ ऊहवान्प्रतिभानवान् ।।
आशु ग्रन्थस्य वक्ता च यः स पण्डित उच्यते।।५।३३।२८ __ बोलका, मनोरंजक गोष्टी माहीत असलेला, तर्कवान् अणि समयसूचक असून जो ग्रंथाचा अर्थ चटकन् सांगतो तो पंडित होय. ६१५ प्रसादो निष्फलो यस्य क्रोधश्चापि निरर्थकः ।
न तं भर्तारमिच्छन्ति षण्डं पतिमिव स्त्रियः ॥५॥३४॥२१ ज्याच्या मेहरबानीचा काही उपयोग नाही आणि रागापासूनहि काही हानि नाही, असा अधिपति, ज्याप्रमाणे स्त्रियांना नामर्द पति नको असतो त्याप्रमाणे, प्रजेला नको असतो. ६१६ प्रसृतैरिन्द्रियैर्दुःखी तैरेव नियतैः सुखी ।
तस्मादिन्द्रियरूपेभ्यो यच्छेदात्मानमात्मना ।।१२।२०४९ इंद्रिये मोकळी सोडल्याने मनुष्य दुःखी होतो व तीच आंवरून धरल्याने सुखी होतो; यासाठी, इंद्रियांच्या निरनिराळ्या विषयांपासून आपण आपले मन आवरून धरावें.
For Private And Personal Use Only
Page #109
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६१७ प्रस्थं वाहसहस्रेषु यात्रार्थ चैव कोटिषु ।
प्रासादे मञ्चकं स्थानं यः पश्यति स मुच्यते॥१२।२८८१३० हजारों नव्हे कोट्यवधि गाडे धान्य पुढे पडलें असतांहि, जो केवळ निर्वाहाला लागणाऱ्या मापटेंभर धान्याचीच अपेक्षा करतो, व ज्याला मोठा राजवाडा रहावयास दिला असतां, एक खाट ठेवण्याइतकीच जागा जो पुरेशी समजतो तो मुक्त होतो. ६१८ प्रहरिष्यन्मियं ब्रयात्महरन्नपि भारत ।
प्रहत्य च कृपायीत शोचेत च रुदेत च ॥ १।१४०५६ (कणिक ब्राह्मण धृतराष्ट्राला सांगतो ) (शत्रूवर ) प्रहार करण्याचे मनांत असतां "वरकरणी त्याच्याशी गोड बोलावे, तसेंच प्रहार करीत असतांहि गोडच बोलावें आणि प्रहार केल्यावर त्याच्याविषयी सहानुभूति दाखवावी, खेद प्रदर्शित करावा व रडावेंहि. ६१९ प्राकृतो हि प्रशंसन्वा निन्दन्वा किं करिष्यति । - वने काक इवाबुद्धिवाशमानो निरर्थकम् ॥ १२॥११४८
हलका मनुष्य, प्रशंसा करून असो, अथवा निंदा करून असो, करणार काय आहे ? अरण्यांत निरर्थक ओरडणाऱ्या कावळ्याप्रमाणे मंदबुद्धि मनुष्याची स्थिति आहे. ६२० प्राज्ञस्तु जल्पता पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः। ___ गुणवद्वाक्यमादत्ते हंसः क्षीरमिवाम्भसः ॥ १७४।९१
यथेच्छ बरळणाऱ्या लोकांचे बरे वाईट बोलणे ऐकून, पाणी टाकून देऊन दूध ग्रहण करणाऱ्या हंसाप्रमाणे, त्यांतून चांगले बोलणे तेवढे शहाणा मनुष्य घेत असतो. ६२१ प्राज्ञो वा यदि वा मूर्खः सधनो निर्धनोऽपि वा ।
सर्वः कालवशं याति शुभाशुभसमन्धितः॥१२।१५३।४३ शहाणा असो, मूर्ख असो, श्रीमंत असो दरिद्री असो सर्वांना आपआपलें पापपुण्य बरोबर घेऊन काळाच्या स्वाधीन व्हावे लागते. ६२२ प्राणस्यानमिदं सर्व जगन्मं स्थावरं च यत् ।।१२।१०६ स्थावर जंगम जें जें कांही आहे ते सर्व प्राणाचे अन्न होय.
For Private And Personal Use Only
Page #110
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१००
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
६२३ प्राप्तं च प्रहरेत्काले न च संवर्तते पुनः ।
हन्तुकामस्य देवेन्द्र पुरुषस्य रिपून्प्रति ।। १२ । १०३।२० यो हि कालो व्यतिक्रामेत्पुरुषं कालकाङ्क्षिणम् । दुर्लभः स पुनस्तेन कालः कर्मचिकीर्षुणा || १२|१०३।२१
।
( बृहस्पति इंद्राला म्हणतात ) देवेंद्रा, शत्रूला मारण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषानें योग्य संधि आली असतां प्रहार केला पाहिजे. गेलेली वेळ फिरून येत नसतेः कार्य साधण्याच्या इच्छेनें योग्य काळाची वाट पाहणाऱ्या पुरुषाने आलेली संधि गमावली तर ती त्याला फिरून मिळणे कठीण.
६२४ प्रायेण नीचा व्यसनेषु मन्ना
निन्दन्ति देवं कुकृतं न तु स्वम् ||८|२१|१
नीच लोक संकटांत सांपडले म्हणजे बहुतकरून देवाला दोष लावतात; ते आपल्या दुष्कर्माला बोल लावीत नाहींत !
६२५ प्रायेण श्रीमतां लोके भोक्तुं शक्तिर्न विद्यते ।
जीर्यन्त्यपि हि काष्ठानि दरिद्राणां च सर्वशः || १२|२८|२९
बहुतकरून श्रीमंत लोकांना जेवण्याची शक्तिच नसते. आणि दरिद्री मनुष्यांना लाकडेंसुद्धां सर्व पचून जातात.
६२६ प्रार्थना विषम् || ३|३१३।८६
याचना है विषच होय.
६२७ प्रीयते हि हरन्पापः परवित्तमराजके |
यदास्य उद्धरन्त्यन्ये तदा राजानमिच्छति । १२/६७|१३
दुसऱ्याचें द्रव्य हरण करणाऱ्या पापी मनुष्याला देशांत राजा नसलेला बरा वाटतो; पण जेव्हां त्याचें द्रव्य दुसरे लोक नेऊ लागतात, तेव्हां त्याला राजा असावा, असें वाटू लागतें.
For Private And Personal Use Only
Page #111
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६२८ फलशाकमपि श्रेयो भोक्तं ह्यकृपणं गृहे ।
परस्य तु गृहे भोक्तुः परिभूतस्य नित्यशः॥३॥१९३३३० नित्य अपमान सहन करून दुसऱ्याच्या घरी जेवण्यापेक्षा, मिंधेपणा न पत्करतां स्वतःच्या घरी मीठभाकरसुद्धां खाल्लेली बरी ! ६२९ बकवचिन्तयेदर्थान् सिंहवच्च पराक्रमेत् ।।
वृकवच्चाप्यलुम्पेत शशवच्च विनिष्पत्तेत् ॥ १२॥१४०।२५ बगळ्याप्रमाणे आपल्या उद्दिष्टाकडे लक्ष्य ठेवावे आणि सिंहाप्रमाणे पराक्रम गाजवावा. लांडग्याप्रमाणे शत्रूवर अचानक हल्ला करावा, व सशाप्रमाणे निसटून जावें. ६३० बलं हि क्षत्रिये नित्यं बले दण्डः समाहितः॥१२।२३।१३
क्षत्रियांचे ठिकाणी बल हे नियमाने वास्तव्य करणारे असून बलावरच दंड अवलंबून आहे. ६३१ बलज्येष्ठं स्मृतं क्षत्रं मन्त्रज्येष्ठा द्विजातयः।
धनज्येष्ठाःस्मृता वैश्याःशूद्रास्तु वयसाधिकाः॥५।१६८।१७ क्षत्रिय बळाने श्रेष्ठ, ब्राह्मण मंत्रसामर्थ्याने श्रेष्ठ आणि वैश्य धनाने श्रेष्ठ होत. शूद्र हे मात्र केवळ वयाने मोठे. ६३२ बलं तु वाचि द्विजसत्तमानां - क्षात्रं बुधा बाहुबलं वदन्ति ॥ ८७०।१२
उत्तम ब्राह्मणांचे बळ वाणींत, व क्षत्रियांचे बळ बाहूंत असते असें शहाणे लोक सांगतात. ६३३ बलवत्संनिकर्षो हिन कदाचित्प्रशस्यते॥१२॥१३८।१७५
बलवानाशी सान्निध्य असणे केव्हांहि प्रशस्त नव्हे. ६३४ बलवांश्च यथा धर्म लोके पश्यति पूरुषः ।
स धर्मो धर्मवेलायां भवत्यभिहतः परः ॥२।६९।१५ धर्मनिर्णय करण्याची वेळ आली म्हणजे, जगांत बलसंपन्न पुरुष ठरवील तो धर्म ठरतो; दुसऱ्या धर्माची पायमल्ली होते.
..
मोरे
For Private And Personal Use Only
Page #112
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६३५ बलवान्वा कृती वेति कृती राजन्विशिष्यते ॥ ९॥३३९
(श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात ) हे राजा, बलवान् आणि कृती यांच्यांता श्रेष्ठ कोण असा विचार करतां, कृती (म्हणजे डावपेंच जाणणारा, युक्तिमान् ), हाच श्रेष्ठ ठरतो. ६३६ बलिना संनिकृष्टस्य शत्रोरपि परिग्रहः।
कार्य इत्याहुराचार्या विषमे जीवितार्थिना ॥१२॥१३८।४५ संकटांत सांपडल्यास जीविताची इच्छा करणाऱ्या वलाढ्यहि प्राण्याने आपल्या समीप असणाऱ्या शत्रूचाहि आश्रय करावा, असें नीतिशास्त्राच्या आचार्योनों सांगितलेलें आहे. ६३७ बहवः पण्डिता मूर्खा लुब्धा मायोपजीविनः ।
कुयुर्दोषमदोषस्य बृहस्पतिमतेरपि ॥ १२॥१११।६३ अनेक पंडित आणि मूर्ख लोक लोभी व कपटाचरणावरच उपजीविका करणारे असतात. आणि ते निर्दोष पुरुषालाच नव्हे तर प्रत्यक्ष बृहस्पतीच्याहि बुद्धीला दोष लावितात. ६३८ बालो युवा च वृद्धश्च यत्करोति शुभाशुभम् ।
तस्यां तस्यामवस्थायां तत्फलं प्रतिपद्यते ।१२।१८१४१५ बाल, तरुण अथवा वृद्ध पुरुष जें जें कांहीं शुभ अथवा अशुभ कर्म करतो, त्याचें फळ त्या त्या अवस्थेत त्याला अवश्य मिळतें. ६३९ बुद्धिमान्वद्धसेवया ॥ ३॥३१३।४८ __ वृद्धांचा समागम केल्याने मनुष्य चतुर होतो. ६४० बुद्धिश्च हीयते पुंसां नीचैः सह समागमात् ।
मध्यमैमध्यतां याति श्रेष्ठतां याति चोत्तमैः॥ ३॥१॥३० नीच लोकांच्या संगतीने मनुष्यांची बुद्धि भ्रष्ट होते, मध्यम लोकांच्या संगतीनें तो मध्यम होते, आणि उत्तम लोकांशी सहवास ठेविल्याने उत्तम होते.
For Private And Personal Use Only
Page #113
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१०३
६४१ बुद्धौ कलुषभूतायां विनाशे प्रत्युपस्थिते ।
अनयो नयसङ्काशो हृदयान्नापसर्पति ॥ ५/३४।८२: बुद्धि मलिन झाली व विनाशकाल जवळ येऊन ठेपला म्हणजे नीतीसारखी दिसणारी अनीति मनुष्याच्या हृदयांत ठाणे देऊन बसते. ६४२ बुभुक्षां जयते यस्तु स स्वर्ग जयते ध्रुवम् ॥१४।९०९१
ज्याने क्षुधा जिंकली त्याने खचित स्वर्ग जिंकला.. ६४३ ब्रह्मक्षत्रं हि सर्वेषां वर्णानां मूलमुच्यते ॥११७३१५
ब्राह्मण आणि क्षत्रिय हेच सर्व वर्णाचें मूळ होत. ६४४ ब्रह्म क्षत्रेण सहितं क्षत्रं च ब्रह्मणा सह । __ संयुक्तौ दहतः शत्रून्वनानीवाग्निमारुतौ ॥ ३॥१८५/२५
ब्राह्मणानें क्षत्रियाशी व क्षत्रियाने ब्राह्मणाशी सहकार्य केलें म्हणजे ते दोघे मिळून वनेंच्या वनें जाळून फस्त करणाऱ्या अग्नि-वायूंप्रमाणे, शबूंना जाळून टाकतील. ६४५ ब्रह्मचर्य परो धर्मः ॥ १।१७०।७१ ___ ब्रह्मचर्य पाळणे हा श्रेष्ठ धर्म होय. ६४६ ब्रह्म वर्धयति क्षत्रं क्षत्रतो ब्रह्म वर्धते ॥ १२।७३।३२
ब्राह्मण क्षत्रियाचे सामर्थ्य वाढवितो आणि क्षत्रियामुळे ब्राह्मणाचा उत्कर्ष होतो. ६४७ ब्रह्महत्याफलं तस्य यः कृतं नावबुध्यते ॥ ७१८३।२८ ___ आपणांवर दुसऱ्याने केलेला उपकार जो स्मरत नाही, त्याला ब्रह्महत्त्येचें पातक लागते. ६४८ ब्राह्मणस्य तु देहोऽयं न कामार्थाय जायते ।
इह क्लेशाय तपसे प्रेत्य त्वनुपमं सुखम् ।।१२।३२११२३ ब्राह्मणाचा देह हा सुखोपभोगासाठी निर्माण झालेला नाही, इहलोकी क्लेश भोगून तपाचरण करण्यासाठी ब्राह्मण जन्मला आहे. असे केले तरच परलोकी जीवाला निरुपम सुख मिळेल.
For Private And Personal Use Only
Page #114
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६४९ ब्राह्मण्यं बहुभिरवाप्यते तपोभि
स्तल्लब्ध्वा न रतिपरेण हेलितव्यम् । स्वाध्याये तपसि दमे च नित्ययुक्तः
क्षेमार्थी कुशलपरः सदा यतस्व ॥१२॥३२१।२४ ( व्यासमुनि शुकाला सांगतात.) पुष्कळ प्रकारे तप करावें तेव्हांच ब्राह्मणत्व प्राप्त होत असते. ते लाभल्यावर विषयांच्या नादी लागून व्यर्थ दवडू नये. आत्मकल्याण साधून घेण्याची इच्छा असेल तर वेदाभ्यास, तप व इंद्रियदमन यांमध्ये नेहमी दक्ष राहून सत्कर्म करून झटून प्रयत्न कर. ६५० भक्ष्योत्तमप्रतिच्छन्नं मत्स्यो बडिशमायसम् ।
___ लोभाभिपाती ग्रसते नानुबन्धमवेक्षते ।। ५/३४१३ ___ उत्तम प्रकारच्या खाद्य पदार्थाने आच्छादलेला लोखंडाचा गळ मासा लोभाने झडप घालून गिळून टाकतो, [ असें करितांना ] पाठीमागून परिणाम काय होईल इकडे त्याचे लक्ष्य नसते. ६५१ भज्येतापि न संनमेत् ॥ ९।५।१४
तुटून जावे पण वाकू नये. ६५२ भयेन भेदयेद्भीरुं शूरमञ्जलिकर्मणा ।
लुब्धमर्थप्रदानेन समं न्यूनं तथौजसा ॥१।१४०५० भित्रा असेल त्याला भीति दाखवून फितूर करावा; शूराला हात जोडून, लोभी असेल त्याला द्रव्य देऊन, आणि बरोबरीचा किंवा दुर्बळ असेल त्याला जबरदस्तीने वश करावा. ६५३ भर्तव्या रक्षणीया च पत्नी हि पतिना सदा ॥३॥६९।४१
पतीनें निरंतर पत्नीचे पोषण व रक्षण केले पाहिजे. ६५४ भवितव्यं सदा राज्ञा गर्भिणीसहधर्मिणा ॥१२॥५६१४४
ज्याप्रमाणे गर्भिणी स्त्री गर्भाचे संगोपन करते, त्याप्रमाणे राजानें निरंतर प्रजाजनांचे रक्षण करावें.
For Private And Personal Use Only
Page #115
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६५५ भारं स वहते तस्य ग्रन्थस्यार्थं न वेत्ति यः।
यस्तु ग्रन्थार्थतत्त्वज्ञो नास्य ग्रन्थागमो वृथा।।१२।३०५।१४ ज्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाहीं [ पण जो नुसती घोकंपट्टी करतो ] तो त्या ग्रंथाचा केवळ भार वाहतो. परंतु ज्याने ग्रंथाच्या अर्थाचे रहस्य जाणले त्याचाच अभ्यास सार्थकी लागला. ६५६ भार्यायां रक्ष्यमाणायां प्रजा भवति रक्षिता ।
प्रजायां रक्ष्यमाणायामात्मा भवति रक्षितः ॥ ३।१२।६९ भार्थेचे संरक्षण होऊ लागले असतां संततीचे संरक्षण होते, आणि संततीचे संरक्षण होऊ लागले असतां आपले संरक्षण होतें. ६५७ भार्या हि परमो ह्यर्थः पुरुषस्येह पठ्यते ।
असहायस्य लोकेऽस्मिल्लोकयात्रासहायिनी।।१२।१४४।१४ भार्या ही पुरुषाची इहलोकांतील परमश्रेष्ठ संपत्ति होय असे म्हटलेले आहे. या जगांत असहाय असलेल्या पुरुषाला संसाराच्या कामी साहाय्य करणारी तीच आहे. ६५८. भार्याहीनं गृहस्थस्य शून्यमेव गृहं भवेत् ॥१२॥१४४५ ___ भार्येवांचून गृहस्थाचे घर रिकामेच वाटते. ६५९ भिन्नानामतुलो नाशः क्षिप्रमेव प्रवर्तते ॥ १।२९।२०
ज्यांच्यांत भिन्नभाव उत्पन्न झाला त्यांचा तत्काळ सर्वथा नाश होतो. ६६० भिन्नाश्लिष्टा तु या प्रीतिने सा स्नेहेन वतेते॥१२॥११११८५
एकदा मोडून पुनः जोडलेला स्नेह स्नेहाच्या रूपाने टिकत नाही. ६६१ भीतवत्संविधातव्यं यावद्भयमनागतम् ।
आगतं तु भयं दृष्ट्वा प्रहतव्यमभीतवत् ॥ १।१४०।८२ संकट जोवर प्राप्त झालेले नाही, तोवर भित्र्या माणसाप्रमाणे त्याच्या निवारण्याच्या तजविजीत असावे. परंतु संकट येऊन ठेपलें असें दिसतांच, शूराप्रमाणे त्यास तोंड द्यावें.
For Private And Personal Use Only
Page #116
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०६
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६६२ भीमसेनस्तु धर्मेण युध्यमानो न जेष्यति । - अन्यायेन तु युध्यन्वै हन्यादेव सुयोधनम् ॥ ९।५८।४.
[ श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ] भीमसेन जर धर्माने लढेल तर त्यास जय मिळणार नाही; परंतु जर अन्यायाने युद्ध करील तर खात्रीने सुयोधनास ठार करील. ६६३ भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥६।२७१३
जे केवळ आपल्यासाठी अन्न शिजवितात, ते पातकी लोक [ त्या अन्नाच्या रूपानें ] पापच भक्षण करितात. ६६४ भूतं हित्वा च भाव्यर्थे योऽवलम्बेत्स मन्दधीः॥११२३३११५
प्राप्त झालेल्या फळाचा त्याग करून पुढे मिळणाऱ्या फळाची जो आशा करीत बसतो तो मूर्ख होय. ६६५ भूतिः श्रीींधृतिः कीर्तिर्दक्षे वसति नालसे॥१२।२७।३२
वैभव, संपत्ति, विनयशीलपणा, धैर्य व कीर्ति ही सर्व तत्परतेने उद्योग करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी वास करितात; आळशाच्या ठिकाणी रहात नाहीत. ६६६ भूमिरेतौ निगिरति सर्पो बिलशयानिव ।
राजानं चाप्ययोद्धारंब्राह्मणं चाप्रवासिनम॥१२।२३।१५ युद्ध न करणारा राजा आणि प्रवास न करणारा ब्राह्मण या दोघांना, बिळांत राहणाऱ्या प्राण्यांना सर्प खाऊन टाकतो त्याप्रमाणे, भूमि गिळून टाकते. ६६७ भूयांसं लभते क्लेशं या गौर्भवति दुर्दुहा । .....अथ या सुदुहा राजन्नैव तां वितुदन्त्यपि ॥ १२॥६७९
जी गाय धार काढू देण्यास फार त्रास देते, तिला अतिशय क्लेश भोगावे लागतात; पण जी मुखानें दूध देते तिला मुळीच कोणी त्रास देत नाही. ६६८ भेदे गणा विनश्युर्हि भिन्नास्तु सुजयाः परैः।
तस्मात्सङ्घातयोगेन प्रयतेरन्गणाः सदा ॥ १२॥१०७।१४ समुदायांत भेद उत्पन्न झाला की त्यांचा सर्वथा नाश ठरलेलाच. कारण त्यांच्यांत फूट पडली म्हणजे शत्रु त्यांचा सहज पराभव करूं शकतात. यास्तव, समुदायांनी नेहमीं संघशक्तीने कार्य करावें.
For Private And Personal Use Only
Page #117
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ६६९ भैषज्यमेतदुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ।
चिन्त्यमानं हि न व्येति भूयश्चापि प्रवर्धते ॥१२॥३३०११२ दुःखावर औषध हेच की त्याचे एकसारखे चिंतन करीत बसू नये. कारण, चिंतन केल्याने दुःख नाहींसें तर होत नाहीच, पण उलट अधिक वाढते मात्र. ६७० मनस्य व्यसने कृच्छे धृतिः श्रेयस्करी नृप ।।१२।२२७/३
धैर्येण युक्तं सततं शरीरं न विशीर्यते । विशोकता सुखं धत्ते धत्ते चारोग्यमुत्तमम् ॥१२।२२७४४
आरोग्याच शरीरस्य स पुनर्विन्दते श्रियम् ॥१२।२२७५ ( भीष्म युधिष्ठिराला सांगतात ) महत्संकटांत सांपडलेल्या मनुष्याने धीर धरणे श्रेयस्कर आहे. नेहमी धैर्य असले म्हणजे शरीराची हानि होत नाही. शोकाचा त्याग कल्याने सुख होते व त्यापासून उत्तम आरोग्य प्राप्त होते. आणि शरीर निरोगी राहिलें म्हणजे मनुष्य गेलेलें वैभव पुनः प्राप्त करून घेतो. ६७१ मद्यमांसपरस्वानि तथा दारा धनानि च ।
आहरेदागवशगस्तथा शास्त्रं प्रदर्शयेत् ।।१२।८८।२२ विषयाधीन झालेला मनुष्य मद्य, मांस, परस्त्री आणि परद्रव्य यांचा अपहार करील, आणि [ आपल्या दुष्कृत्याचे समर्थन करण्याकरितां ] तसा शास्त्रार्थहि काढून दाखवील. ६७२ मधुदोहं दुहेद्राष्ट्रं भ्रमरा इव पादपम् ।
वत्सापेक्षी दुहेच्चेव स्तनांश्च न विकुट्टयेत् ॥१२।८८४ भुंगा जसा झाडाला धका न लावतां फुलांतील मध तेवढा हळूच काढून घेतो त्याप्रमाणे राजाने प्रजेचें मन न दुखवितां तिजपासून कराच्या रूपाने द्रव्य ग्रहण करावें. अथवा, ज्याप्रमाणे गाईची धार काढणारा वासराला दूध राहील अशा बेतानें धार काढतो, आंचळ अगदी पिळून काढीत नाही. त्याप्रमाणेच राजाने प्रजेचें पोषण होईल अशा बेतानंच कर घ्यावा.
For Private And Personal Use Only
Page #118
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०८
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
६७३ मधु यः केवलं दृष्ट्रा प्रपातं नानुपश्यति ।
स भ्रष्टो मधुलोभेन शोचत्येवं यथा भवान् ।। ११।१।३७ ( भारती युद्धानंतर संजय घृतराष्ट्राला म्हणतो ) ज्याला तुटलेल्या कड्यास लटकणारे मधाचे पोळें मात्र दिसतें, पण तो तुटलेला कडा दिसत नाहीं, तो मधाच्या लोभानें पुढें जाऊन खालीं घसरतो आणि हल्लीं तूं शोक करीत आहेस असाच पश्चात्ताप करीत बसतो.
६७४ मन एव मनुष्यस्य पूर्वरूपाणि शंसति ।। १२/२२८/२
मनुष्याचा अभ्युदय किंवा हानि हीं पुढे व्हावयाची असली म्हणजे त्यांचीं पूर्वचिन्हें त्याचें मनच सांगत असतें.
६७५ मनसश्चेन्द्रियाणां चाप्यैकाग्र्यं परमं तपः ।
तज्ज्यायः सर्वधर्मेभ्यः स धर्मः पर उच्यते ।। १२/२५०/४
मन आणि इंद्रियें यांची एकाग्रता साध्य करणें हें फार मोठें तप आहे. ही एकाग्रता सर्व प्रकारच्या कर्माचरणापेक्षां श्रेष्ठ आहे. ती साध्य करणें हा श्रेष्ठ धर्म होय. ६७६ मनसो दुःखमूलं तु स्नेह इत्युपलभ्यते || ३|२/२७
मनाला दुःख होण्याचें मूळ कारण आसक्ति हॅच असल्याचे आढळून येतें. ६७७ मनुष्या ह्याढ्यतां प्राप्य राज्यमिच्छन्त्यनन्तरम् ।
राज्यादेवत्वमिच्छन्ति देवत्वादिन्द्रतामपि ।। १२।१८०।२४ खरोखर मनुष्यांना ऐश्वर्य प्राप्त झाले, म्हणजे त्यानंतर राज्य मिळविण्याची इच्छा होते. राज्य मिळालें कीं देवपद आणि देवत्वप्राप्तीनंतर इंद्रपदसुद्धां हवेंसें वाटू लागतें. ६७८ मन्यते कर्षयित्वा तु क्षमा साध्वीति शम्बरः ।
असंतप्तं तु यद्दारु प्रत्येति प्रकृतिं पुनः || १२|१०२।३१ शत्रूला जर्जर करून सोडल्यावर मग क्षमा केलेली चांगली, असें शंबराचें मत आहे. कारण तापविल्यावांचून वांकविलेले लाकूड पुनरपि पूर्वस्थितीस येते. ६७९ महत्त्वाद्भारवत्वाच्च महाभारतमुच्यते ।। १८/५/४५
या भारत ग्रंथाचें महत्त्व ( विस्तार ) आणि भार ( वजन ) फार असल्यामुळे यास महाभारत अशी संज्ञा प्राप्त झाली आहे.
For Private And Personal Use Only
Page #119
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
rrrrrrrrrrrrrrrr६८० महानप्येकजो वृक्षो बलवान्सुप्रतिष्ठितः।
प्रसह्य एव वातेन सस्कन्धो मर्दितुं क्षणात् ॥ ५॥३६॥६२ अथ ये सहिता वृक्षाः सङ्घशः सुप्रतिष्ठिताः ।
ते हि शीघ्रतमान्यातान्सहन्तेऽन्योन्यसंश्रयात् । ५।३६।६३ एकटा एक वृक्ष मोठा, बळकट असला, व भुईत खोल गेलेला असला तरी ( सोसाट्याच्या ) वाऱ्याने एका क्षणांत खोडासहवर्तमान त्याचा चुराडा होणे शक्य आहे. परंतु, जे एकत्र वाढलेले वृक्ष एका जमावाने बळकट पायावर उभे असतात, ते एकमेकांच्या आधारामुळे अति प्रचंड वायूंनाहि दाद देत नाहीत. ६८१ महान्भवत्यनिर्विण्णः सुखं चानन्त्यमश्नुते ॥ ५॥३९॥५९
सतत उद्योग करणाराच पुरुष योग्यतेला चढत असून अक्षय्य सुखहि त्यालाच प्राप्त होते. ६८२ माता पिता बान्धवानां वरिष्ठौ
___ भार्या जरा वीजमानं तु पुत्रः । भ्राता शत्रुः क्लिन्नपाणिर्वयस्य
आत्मा ह्येकः सुखदुःश्वस्य भोक्ता ॥ १२॥१३९।३० आईबाप हे सर्व आप्तवर्गात वरिष्ठ होत. भार्या ही पुरुषाला वार्धक्य आणण्यास कारणीभूत होत असते. पुत्र हा केवळ आपले बीज होय. भाऊ हा ( वाटणी घेत असल्यामुळे ) शत्रुच होय. जोवर हात भिजत आहे तोवरच मित्र. सारांश, सुख किंवा दुःख भोगणारा आत्मा हा आपला एकटा एक आहे. ६८३ मातापितृसहस्राणि पुत्रदारशतानि च ।
संसारेप्नुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे ।। १८।५।६० निरनिराळ्या हजारों जन्मांत अनुभवलेली हजारों आईवा व शेंकडों स्त्रिया आणि पुत्र ही सर्व मरून जातात व यापुढे होणारी इतरहि मरणारच. ६८४ मातृलाभे सनाथत्वमनाथत्वं विपर्यये ।। १२।२६६।२६
आई असली तरच मनुष्य सनाथ असतो, ती नसली की अनाथ होतो.
For Private And Personal Use Only
Page #120
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
६८५ मानं हित्वा प्रियो भवति ॥ ३३१३१७८
अभिमान सोडल्याने मनुष्य [ लोकांना ] प्रिय होतो. ६८६ मायया निर्जिता देवैरसुरा इति नः श्रुतम् ॥ ९१५८।५
( श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. ) कपटाच्या योगानेच देवांनी असुरांना जिंकलें, असे आम्ही ऐकले आहे. ६८७ मायावी मायया वध्यः सत्यमेतद्युधिष्ठिर ॥ ९॥३१७
(श्रीकृष्ण म्हणतात.) हे युधिष्ठिरा, कपटी मनुष्याचा कपटानेच वध केला पाहिजे हे सत्य होय. ६८८ मास्तं गमस्त्वं कृपणो विश्रूयस्व स्वकर्मणा ।
___ मा मध्ये मा जघन्ये त्वं माधोभूस्तिष्ठ गर्जितः।।५।१३३।१३ [विदुला संजयास म्हणते ] तूं दीन होऊन स्वतःचा नाश करून घेऊ नको. स्वपराक्रमाने प्रसिद्धीस ये. तूं मध्यम स्थितीत अथवा हीन स्थितीत राहूं नको. हीन न होतां [ कर्तृत्वानें ] गाजत रहा. ६८९ मित्रं च शत्रतामेति कस्मिंश्चित्कालपर्यये।
शत्रुश्च मित्रतामेति स्वार्थो हि बलवत्तरः॥१२॥१३८।१४२ एकादे वेळेस मित्र वैर करू लागतो आणि शत्रु मित्र बनतो. कारण, स्वार्थ हा फार प्रबळ आहे. ६९० मुहूर्त ज्वलितं श्रेयो न च धूमायितं चिरम् ।।५।१३३३१५
थोडा वेळ का होईना पण चमकून जाणे चांगले; परंतु चिरकाल धुमसत राहणे बरे नव्हे. ६९१ मूल् हि जल्पतां पुंसां श्रुत्वा वाचः शुभाशुभाः।
__ अशुभं वाक्यमादत्ते पुरीषमिव सूकरः ॥ ११७४।९० बोलणा-या लोकांचे बरे वाईट बोलणे ऐकून, त्यांतून वाईट बोलणे तेवढें, विटा प्रहण करणाऱ्या डुकराप्रमाणे, मूर्ख मनुष्य घेत असतो.
For Private And Personal Use Only
Page #121
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
६९२ मूलमेवादितच्छिन्द्यात्परपक्षस्य नित्यशः ।
ततः सहायांस्तत्पक्षान्सर्वाश्च तदनन्तरम् ।। १।१४०।१६
नेहमी आपल्या शत्रुपक्षाचें मूळच पहिल्याने तोडून टाकावें. नंतर त्याचे साथीदार व त्यानंतर त्याच्या पक्षांतील इतर सर्व लोक यांचा उच्छेद करावा. ६९३ मृतं वा यदि वा नष्टं योऽतीतमनुशोचति ।
दुःखेन लभते दुःखं द्वावनर्थों प्रपद्यते ।। ११।२६।४
१११
मेल्यामुळे किंवा हरवल्यामुळे जें नाहींसें झालें, त्याविषयीं जो शोक करीत बसतो, त्याला त्या दुःख करण्यापासून पुनः दुःख प्राप्त होतें, व अशा रीतीनें तो दोन अर्थात सांपडतो.
६९४ मृतं शरीरमुत्सृज्य काष्ठलेोष्टसमं जनाः ।
मुहूर्तमिव रोदित्वा ततो यान्ति पराङ्मुखाः।। १३।१११।१४ मेलेलें शरीर लाकडाप्रमाणे अथवा मातीच्या ढेकळाप्रमाणे फेंकून देऊन व क्षणभर रडून नंतर लोक पाठमोरे होऊन निघून जातात.
६९५ मृतकल्पा हि रोगिणः ।। ५३६/६७
रोगी मनुष्यें मेल्यांतच जमा.
६९६ मृतो दरिद्रः पुरुषः || ३।३१३।८४ दरिद्री पुरुष जिवंतपणीच मेलेला असतो.
६९७ मृदुं वै मन्यते पापो भाषमाणमशक्तिकम् ।
जितमर्थं विजानीयादबुधो मार्दवे सति || ५|४|६
कोणी सौम्यपगे बोलूं लागला तर दुष्ट लोक त्याला दुर्बळ समजतात. सौम्यपणा असला म्हणजे मूर्खाला वाटावयाचें कीं आपला पक्ष सिद्ध झाला.
६९८ मृदुना दारुणं हन्ति मृदुना हन्त्यदारुणम् ।
नासाध्यं मृदुना किंचित्तस्मात्तीव्रतरं मृदु || ३ |२८|३१ मृदुपणानें भयंकर शत्रूचा नाश करितां येतो आणि मृदुपणानें भयंकर नसलेल्या शत्रू चाहि नाश करितां येतो. मृदुपणानें असाध्य असें कांहींच नाहीं. यास्तव मृदपणा वस्तुतः तीक्ष्णापेक्षांहि तीक्ष्ण आहे.
For Private And Personal Use Only
Page #122
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
~~~~~~~~~
~~~~~~~.....
६९९ मृदुरित्यवजानन्ति तीक्ष्ण इत्युद्विजन्ति च ।
तीक्ष्णकाले भवेत्तीक्ष्णो मृदुकाले मृदुर्भवेत् ॥१२॥१४०/६५ राजा मऊपणाने वागणारा असला तर लोक त्याची अवज्ञा करितात. आणि कठोरपणाने वागणारा असला तर लोक त्याला भितात. यासाठी कठोरपणे वागण्याची वेळ येईल तेव्हां कठोर व्हावें, आणि मऊपणाने वागण्याची वेळ असेल तेव्हां मृदु व्हावें.
७०० मौनान स मुनिर्भवति नारण्यवसनान्मुनिः । . स्वलक्षणं तु यो वेद स मुनिः श्रेष्ठ उच्यते ॥५॥४३॥६०
मौनव्रत पाळले म्हणजे कोणी मुनि होत नाही. किंवा अरण्यांत राहिल्यानेहि मुनि होत नाही. ज्याने आत्मस्वरूप जाणले तोच मुनिश्रेष्ठ होय. ७०१ म्रियते याचमानो वै न जातु म्रियते ददत् ।।
ददत्संजीवयत्येनमात्मानं च युधिष्ठिर ॥१३॥६०५ ( भीष्म म्हणतात) हे युधिष्ठिरा, याचना करणारा मरण पावतो. देणारा कधीच मरत नाही. देणारा याचकाला व स्वतःलाहि जीवदान देतो. ७०२ य एव देवा हन्तारस्ताँल्लोकोऽर्चयते भृशम् ॥१२।१५।१६
शत्रूना ठार मारणारे जे देव आहेत, त्यांनाच लोक अतिशय भजतात. . ७०३ यः कश्चिदप्यसंबद्धो मित्रभावेन वर्तते ।
स एव बन्धुस्तन्मित्रं सा गतिस्तत्परायणम् ॥५॥३६।३८ कसल्याहि प्रकारचा संबंध नसतांहि जो कोणी आपल्याशी मित्रभावाने वागतो, तोच आपला बंधु, तोच मित्र, तोच आसरा, आणि तोच मोठा आधार. ७०४ यः कृशार्थः कुशगवः कृशभृत्यः कृशातिथिः ।
स वै राजन्कृशो नाम न शरीरकृशः कृशः ॥१२।८।२४ . ( अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो ) हे राजा, ज्याच्यापाशी द्रव्य नाहीं, गुरेढोरे नाहीत, नोकरचाकर नाहीत, अतिथींचा सत्कार करण्याचे सामर्थ्य नाही तोच खरोखर कृश म्हटला पाहिजे, जो केवळ शरीरानें कृश तो खरोखर कृश नव्हे.
For Private And Personal Use Only
Page #123
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७०५ यच्च कामसुखं लोके यच्च दिव्यं महत्सुखम् ।
तृष्णाक्षयसुखस्यैते नाईतः षोडशी कलाम् ॥१२।१७४१४६ इहलोकों विषयोपभोगापासून प्राप्त होणारे सुख आणि स्वर्गातील उच्च सुख ही दोनहि सुखें वासनाक्षयामुळे प्राप्त होणाऱ्या सुखाच्या पासंगास देखील लागणार नाहीत. ७०६ यच्छक्यं ग्रसितुं ग्रस्यं ग्रस्तं परिणमेच्च यत् ।
हितं च परिणामे यत्तदाचं भूतिमिच्छता ॥५॥३४।१४ जें खातां येण्यासारखे असेल, खाल्ल्यावर जें पचेल, व परिणामी में हितकर होईल तेंच अन्न कल्याणेच्छु पुरुषाने खाल्ले पाहिजे. ७०७ यतो धर्मस्ततो जयः ॥१३॥१६७४१
जिकडे धर्म तिकडे जय. ७०८ यत्करोति शुभं कर्म तथा कर्म सुदारुणम् ।
तत्कतेंव समश्नाति बान्धवानां किमत्र ह॥१२।१५३१४१ कोणीहि जे चांगले कर्म करतो अथवा वाईट कर्म करतो, त्याचे फळ त्याचे त्यालाच भोगावे लागते. यांत त्याच्या नातलगांचा काय संबंध ? ७०९ यत्तु कार्यं भवेत्कार्यं कर्मणा तत्समाचर ।
हीनचेष्टस्य यः शोकः स हि शत्रुधनंजय ॥७८०८ ( श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ) उद्दिष्ट साधण्यासाठी जे करावयाचें तें करण्याच्या उद्योगाला लाग. अर्जुना, जो प्रतिकाराचा काही उद्योग करीत नाही, त्याचा शोक हा शत्रुच होय. ७१० यत्नो हि सततं कार्यस्ततो दैवेन सिध्यति ॥१२॥१५३१५०
सतत प्रयत्न करीत असावे; म्हणजे दैववशात् यश मिळेल. ७११ यत्र दानपति शूरं क्षुधिताः पृथिवीचराः ।
प्राप्य तुष्टाः प्रतिष्ठन्ते धर्म कोऽभ्यधिकस्ततः।।५।१३२।२८ पृथ्वीवर हिंडणारे क्षुधित लोक ज्या शूर दानपतीपाशी आले असतां संतुष्ट होऊन पुढे जातात, त्याच्या धर्मापेक्षा कोणता धर्म अधिक आहे ?
म. भा. ८
For Private And Personal Use Only
Page #124
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७१२ यत्र धर्मो ह्यधर्मेण सत्यं यत्रानृतेन च ।
। हन्यते प्रेक्षमाणानां हतास्तत्र सभासदः॥ ५।९५।४९ ज्या सभेत सभासदांच्या डोळ्यांदेखत धर्माचा अधर्माने व सत्याचा असत्याने खून केला जातो, त्या सभेतील सभासदांना धिक्कार असो ! ७१३ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीविजयो भूतिध्रुवा नीतिमतिर्मम ॥६।४२।७८ [ संजय धृतराष्ट्राला म्हणतो ] जिकडे योगेश्वर कृष्ण, जिकडे धनुर्धारी अर्जुन, तिकडेच लक्ष्मी, विजय, अखंड वैभव आणि नीति ही राहणार असे माझे मत आहे. ७१४ यत्र सूक्तं दुरुक्तं च समं स्यान्मधुसूदन ।
न तत्र प्रलपेत्प्राज्ञो बधिरेष्विव गायनः॥५।९२।१३ (विदुर श्रीकृष्णांना म्हणतो ) ज्याप्रमाणे जेथे चांगले बोलण्याचा किंवा वाईट बोलण्याचा उपयोग सारखाच होतो तेथें, बहिऱ्या लोकांमध्ये बसून गायन करणे गवयास योग्य नाही त्याप्रमाणे, शहाण्या पुरुषाने काहीएक न बोलणे चांगले. ७१५ यत्र स्त्री यत्र कितवो बालो यत्रानुशासिता।'
मज्जन्ति तेऽवशा राजन्नद्यामश्मप्लवा इव ॥ ५॥३८॥४३ (विदुर धृतराष्ट्र राजाला म्हणतो ) ज्यांच्यावर स्त्री किंवा लुच्चा मनुष्य किंवा अल्पवयी मुलगा अधिकार चालवीत असेल, ते लोक पराधीन होत्साते, नदीत वुडणाऱ्या पाषाणमय होड्यांप्रमाणे नाश पावतात. ७१६ यत्सुखं सेवमानोऽपि धर्मार्थाभ्यां न हीयते ।।
कामं तदुपसेवेत न मूढव्रतमाचरेत् ।। ५।३९।६१ ज्या सुखाचे सेवन केले तरी धर्म व अर्थ या दोन पुरुषार्थाना कांहीं बाध येत नाही, तेंच यथेष्ट सेवन करावे. मूर्खासारखें [ अविचाराचें ] वर्तन करूं नये. ७१७ यथा कर्म तथा लाभ इति शास्त्रनिदर्शनम् ॥१२॥२७९।२० जसे कर्म तसें फळ असा शास्त्राचा सिद्धांत आहे.
For Private And Personal Use Only
Page #125
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७१८ यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ।
समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागमः ॥ १२।२८।३६ ज्याप्रमाणे महासागरांत लाकडाचे दोन ओंडके वहात वहात एका ठिकाणी येतात, व [ थोड्या वेळानें ] फिरून एकमेकांपासून दूर जातात, त्यासारखा सर्व प्राण्यांचा एकमेकांशी असणारा सहवास आहे. | ७१९ यथा छायातपौ नित्यं सुसंबद्धौ निरन्तरम् ।
तथा कर्म च कर्ता च संबद्धावात्मकर्मभिः ॥ १३३१७५ प्रकाश व छाया यांचा जसा निरंतर नित्यसंबंध असतो, तसाच कर्म व कर्ता यांचा त्या त्या स्थितीत नित्य संबंध असतो. ७२० यथा जीर्णमजीर्ण वा वस्त्रं त्यक्त्वा तु पूरुषः ।
अन्यद्रोचयते वस्त्रमेवं देहाः शरीरिणाम् ॥ ११॥३९ 'जुने झालेले किंवा कधीकधी नवेंही एक वस्त्र टाकून मनुष्य दुसरे घेतो, त्याप्रमाणेच प्राण्यांच्या देहांचीही गोष्ट आहे. ७२१ यथा दानं तथा भोग इति धर्मेषु निश्चयः ॥ १३॥६२।८
जसे दिले असेल तसेंच भोगावयास मिळते, असा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. ७२२ यथा धेनुसहस्रेषु वत्सो विन्दति मातरम् ।
तथा पूर्वकृतं कर्म कर्तारमनुगच्छति ॥ १२॥३२२।१६ हजारों गाईतून वासरूं जसे नेमके आपल्या आईला हुडकून काढते, तसे पूर्वजन्मीं केलेले कर्म कर्त्याच्या पाठोपाठ येते. ७२३ यथा नदीनदाः सर्वे सागरे यान्ति संस्थितिम् ।
. एवमाश्रमिणःसर्वे गृहस्थेयान्ति संस्थितिम् ॥१२।२९५।३९ ज्याप्रमाणे सर्व नद्या आणि नद अखेर समुद्राला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे इतर सर्व आश्रमांतील लोकांना गृहस्थाश्रमी पुरुषाचा आधार आहे.
For Private And Personal Use Only
Page #126
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७२४ यथा बर्हाणि चित्राणि विभर्ति भुजगाशनः ।
__ तथा बहुविधं राजा रूपं कुर्वीत धर्मवित् ॥ १२॥१२०१४ मोर जशी चित्रविचित्र पिसें धारण करतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य ओळखणाऱ्या राजाने [ प्रसंगानुसार ] निरनिराळी रूपें धारण करावी. ७२५ यथा बीजं विना क्षेत्रमुप्तं भवति निष्फलम् ।
तथा पुरुषकारेण विना दैवं न सिध्यति ॥ १३॥६७ शेत तयार न करितां त्यांत बी टाकिल्याने जसें तें वायां जाते, त्याप्रमाणे उद्योग केल्यावांचून नुसत्या दैवाने सिद्धि मिळत नाही. ७२६ यथामति यथापाठं तथा विद्या फलिष्यति॥१२॥३२७/४८
जशी बुद्धि असेल आणि जसा अभ्यास असेल त्या मानाने विद्येचें फल मिळणार. ७२७ यथा मधु समादत्ते रक्षन्पुष्पाणि षट्पदः।
तद्वदर्थान्मनुष्येभ्य आदद्यादविहिंसया ॥ ५/३४।१७ भुंगा जसा फुलांना अपाय न करता त्यांतील मध तेवढा काढून घेतो, त्याप्रमाणे राजाने लोकांचे मन न दुखवितां त्यांजपासून द्रव्य घ्यावे. ७२८ यथा मातरमाश्रित्य सर्वे जीवन्ति जन्तवः ।
. एवं गार्हस्थ्यमाश्रित्य वर्तन्त इतराश्रमाः ॥ १२।२६९।६ जसे सर्व प्राणी मातेचा आश्रय करून जिवंत राहतात, तसे गृहस्थाश्रमाच्या आधाराने इतर आश्रम राहतात. ७२९ यथा यथा हि पुरुषो नित्यं शास्त्रमवेक्षते ।
तथा तथा विजानाति विज्ञानमथ रोचते ॥ १२।१३०११० - मनुष्य जसजसा नेहमी शास्त्राचे अवलोकन करीत जाईल, तसतसे त्याला समजू लागेल, आणि नंतर त्याला ज्ञानाची आवड उत्पन्न होईल. ७३० यथा यथैव जीवेद्धि तत्कर्तव्यमहेलया ।
जीवितं मरणाच्छ्रेयो जीवन्धर्ममवाप्नुयात्॥१२॥१४१६५ ज्या ज्या प्रकारे जीविताचे संरक्षण होईल तें बेलाशक करावे. मरण्यापेक्षा जगणे हेच श्रेयस्कर आहे. कारण आधीं जगेल तर पुढे धर्म आचरण करील.
For Private And Personal Use Only
Page #127
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७३१ यथा राजन्हस्तिपदे पदानि
___ संलीयन्ते सर्वसत्त्वोद्भवानि । एवं धर्मान् राजधर्मेषु सर्वान्
सर्वावस्थं संप्रलीनान्निबोध ॥ १२॥६३।२५ ( भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) हे राजा, ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलांत इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा सर्व प्रकारे अंतर्भाव होतो हे तूं पक्के समज.. ७३२ यथाऽवध्ये वध्यमाने भवेदोषो जनार्दन ।
स वध्यस्यावधे दृष्ट इति धर्मविदो विदुः॥ ५।८२।१८ ( द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणते ) वधास पात्र नसलेल्याचा वध होऊ लागला असतां जो दोष लागतो, तोच वधास पात्र असलेल्याचा वध होत नसल्यास दोष लागतो, असे धर्मवेत्त्यांचे मत आहे. ७३३ यथा वायुस्तणाग्राणि संवर्तयति सर्वशः।
तथा कालवशं यान्ति भूतानि भरतर्षभ ॥ १।२।९ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ) जसा वारा गवताचे सर्व शेंडे हलवून सोडतो त्याप्रमाणे सर्व प्राणी काळाच्या तडाक्यांत सांपडतात. ७३४ यथाशक्ति मनुष्याणां शममालक्षयामहे ।
। अन्येषामपि सत्त्वानामपि कीटपिपीलिकैः ॥४५०।१४ ( अश्वत्थामा कर्णाला म्हणतो ) आम्हांला वाटते की, मनुष्यांच्या सहनशीलतेला झाली तरी काही मर्यादा असतेच. फार काय पण किडामुंगी वगैरे इतर प्राणीहि काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच दुःखें सहन करितात. ७३५ यथा शरीरं न ग्लायेन्नेयान्मृत्युवशं यथा ।
तथा कर्मसु वर्तेत समर्थो धर्ममाचरेत् ॥ १२॥२६५।१४ ज्याप्रकारे शरीराला थकवा येणार नाही आणि तें मृत्युवश होणार नाही, अशा प्रकारचे कर्माचे आचरण करावे. समर्थ राहून धर्माचरण करावे.
For Private And Personal Use Only
Page #128
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११८
सार्यश्रीमहाभारतसुभाषितानि
७३६ यथा समुद्रो भगवान् यथा हि हिमवान् गिरिः।
ख्यातावुभौ रत्ननिधी तथा भारतमुच्यते ॥ १८।५।६५ जसा भगवान् समुद्र आणि जसा पर्वतराज हिमालय रत्ननिधि म्हणून प्रसिद्ध आहेत तसेंच महाभारत हेहि आहे. ७३७ यथा हि पुरुषः शाला पुनः संप्रविशेन्नवाम् ।
एवं जीवः शरीराणि तानि तानि प्रपद्यते ॥१२।१५।५७ मनुष्याने [ एक घर सोडून ] पुनः दुसऱ्या नव्या घरांत प्रवेश करावा, तसा जीव हा निरनिराळ्या देहांत प्रविष्ट होत असतो. ७३८ यथा ह्यकस्माद्भवति भूमौ पांसुर्विलोलितः ।
तथैवेह भवेद्धमः सूक्ष्मः सूक्ष्मतरस्तथा ॥ १२॥१३६।११ भुईवरील धुळीचा कण एकाएकी हलविला असतां जसा [ सूक्ष्म असल्यामुळे दिसेनासा ] होतो, तसाच धर्म हा सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म आहे. ७३९ यथा ह्यामिषमाकाशे पक्षिभिः श्वापदभुवि ।
भक्ष्यते सलिले मत्स्यैस्तथा सर्वत्र वित्तवान् ।। ३।२।४० ज्याप्रमाणे आकाशामध्ये पक्षी, भूतलावर श्वापदे, आणि पाण्यामध्ये मासे आमिषावर झडप घालीत असतात, त्याप्रमाणे द्रव्यवान् पुरुषाला लुटण्याकरितां सर्व ठिकाणी लोक टपून बसलेले असतात. ७४० यदतप्तं प्रणमते नैतत्संतापमर्हति ।
यत्स्वयं नमते दारु न तत्संनामयन्त्यपि ।। १।६७।१० तापविल्याशिवायच में लवतें तें तापविण्याची गरज नाही. में लाकूड आपोआपच वांकतें तें तापविण्याच्या भरीस कोणी पडत नाही. ७४१ यदन्येषां हितं न स्यादात्मनः कर्म पौरुषम् ।
अपत्रपेत वा येन न तत्कुोत्कथंचन ॥ १२॥१२४१६७ आपला जो प्रयत्न किंवा जी कृति दुसऱ्याच्या हिताची होणार नाही, अथवा जें केल्याने आपली आपल्यालाच लाज वाटेल तें केव्हांहि करूं नये.
For Private And Personal Use Only
Page #129
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७४२ यदन्यविहितं नेच्छेदात्मनः कर्म पूरुषः ।
न तत्परेषु कुर्वीत जाननप्रियमात्मनः ॥ १२।२५९।२० जे दुसऱ्यांनी आपल्यासंबंधाने करूं नये असें मनुष्याला वाटते, ते आपल्याला अप्रिय आहे, हे लक्षांत वागवून, त्यानेंहि दुसऱ्यासंबंधाने तसे करूं नये ७४३ यदर्थो हि नरोराजस्तदर्थोऽस्यातिथिः स्मृतः ॥१५।२६।३७
(धृतराष्ट्र युधिष्ठिराला म्हणतो ) राजा, अतिथि कितीहि योग्यतेचा असला तरी, तो ज्याचा अतिथि असेल त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याने झाले पाहिजे असा नियमच आहे. ७४४ यदा तु कश्चिज्ज्ञातीनां बाह्यः प्रार्थयते कुलम् ।
न मर्षयन्ति तत्सन्तो बाह्येनाभिप्रधर्षणम् ॥ ३२४३३३ जेव्हां कोणी परका मनुष्य भाऊबंदांच्या कुळावर उठतो, तेव्हां परक्याकडून आपल्या कुळाचा होत असलेला तो अपमान सज्जन सहन करीत नाहीत. ७४५ यदा मानं लभते माननाई
स्तदा स वै जीवति जीवलोके । यदावमानं लभते महान्तं
तदा जीवन्मृत इत्युच्यते सः ॥ ८६९/८१ सन्मान्य पुरुष जोपर्यंत मान मिळवितो, तोपर्यंतच या जगांत तो जिवंत असतो. एकदा त्याचा अतिशय अपमान झाला की, तो जिवंत असूनहि मेल्याप्रमाणेच झाला ! ७४६ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । ____ अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ६।२८१७
[ भगवान् श्रीकृष्ण सांगतात. ] अर्जुना, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानि येते व अधर्माचा उत्कर्ष होतो त्या त्या वेळी मी (भगवान् श्रीकृष्ण ) अवतार घेत असतो. ७४७ यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६।२६।५८ कासव जसे आपले सर्व अवयव आंत ओढून घेते त्याप्रमाणे जेव्हां मनुष्य आपली सर्व इंद्रिये त्यांच्या त्यांच्या विषयांपासून आंवरून धरतो, तेव्हांच त्याची बुद्धि स्थिर झाली असे म्हणतात.
For Private And Personal Use Only
Page #130
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७४८ यदिदं ब्रह्मणो रूपं ब्रह्मचर्यमिति स्मृतम् ।
परं तत्सर्वधर्मभ्यस्तेन यान्ति परां गतिम् ॥१२।२१४१७ [ परब्रह्माच्या प्राप्तीचे साधन असल्यामुळे ] ब्रह्मचर्य हे परब्रह्माचें केवळ स्वरूपच आहे असे सांगितले आहे. ते सर्व प्रकारच्या धर्मनियमांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या योगानेच अत्यंत श्रेष्ठ गति प्राप्त होते. ( मोक्ष मिळतो.) ७४९ यदि नात्मनि पुत्रेषु न चेत्पौत्रेषु नप्तषु ।
न हि पापं कृतं कर्म सद्यः फलति गौरिव ॥१२।९२१ आपल्या पापकर्माचे प्रायश्चित्त आपल्याला भोगावे लागले नाही तर आपल्या मुलांना, त्यांना नाही तर नातवांना ( तरी भोगावे लागेल ) कारण, गाईला खाणे घातले असतां ती लगेच जास्त दूध देते, त्याप्रमाणे पापकर्माचे फळ ताबडतोब मिळते असे नाही. ( 'गो' म्हणजे भमि असा अर्थ घेऊन या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीचा पुढील प्रमाणे दुसराहि अर्थ टीकाकारांनी केलेला आहे:-' भूमीत धान्य पेरिले की ते लागलेच जसें पिकत नाही, तसेंच केलेल्या पापकर्माचे फळ तत्काळ मिळू शकत नाही.) ७५० यदि नैवंविधं जातु कुर्या जिह्ममहं रणे। ___ कुतो वा विजयो भूयःकुतो राज्यं कुतो धनम् ॥ ९।६११६४
[ श्रीकृष्ण पांडवांस म्हणतात ] युद्धांत [ भीष्मद्रोणादिकांना मारण्याच्या कामी ] अशा प्रकारचे कपट जर मी केले नाही, तर तुम्हांला जय कसा मिळेल ? फिरून राज्य कसे मिळणार ? धन कोठून मिळणार ? ७५१ यदिष्टं तत्सुखं प्राहुढेष्यं दुःखमिहेष्यते ॥ १२।२९५।२७
इहलोकी में इष्ट वाटतें तें सुख, आणि जें द्वेष्य वाटतें तें दुःख असें मानिले जाते. ७५२ यदि संन्यासतः सिद्धिं राजा कश्चिदवाप्नुयात् ।
पर्वताश्च द्रमाश्चैव क्षिप्रं सिद्धिमवाप्नुयुः ॥ १२।१०।२४ संन्यासाने जर एकाद्या राजाला सिद्धि प्राप्त होती तर [ निष्क्रिय अशा ] पर्वतांना व वृक्षांनासुद्धां सिद्धि तत्काळ मिळाली असती !
For Private And Personal Use Only
Page #131
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७५३ यदि स्यात्पुरुषः कर्ता शक्रात्मश्रेयसे ध्रुवम् । । आरम्भास्तस्य सिध्येयुर्न तु जातु पराभवेत् १२ २२२|१८
[ स्थानभ्रष्ट व पाशबद्ध झालेला प्रहाद इंद्राला म्हणतो ] इंद्रा, आत्मकल्याण साधून घेणे ही गोष्ट जर निश्चर्येकरून पुरुषाच्याच हातची असती, तर त्याचे सर्व उद्योग सिद्धीस गेले असते; त्याला केव्हांहि अपयश आलें नसतें. ७५४ यदैव शत्रुर्जानीयात्सपत्नं त्यक्तजीवितम् । तदैवास्मादुद्विजते सर्पाद्वेश्मगतादिव || ५ | १३५/३६
१२१
आपला प्रतिपक्षी जिवावर उदार झाला आहे असे जेव्हां शत्रूला समजून येतें, तेव्हांच त्याला घरांत शिरलेल्या सर्पासारखी त्याची भीति वाटू लागते.
७५५ यद्दुरापं दुरान्नायं दुराधर्षं दुरन्वयम् ।
तत्सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम् || १४|५१।१७
जे जे म्हणून असाध्य, अज्ञेय, अत्यंत भयंकर किंवा अत्यंत दुस्तर असें असेल तें सर्व तपानें साध्य होतें, खरोखरच, तपाचें अतिक्रमण करणें अशक्य आहे. ७५६ यद्भूतहितमत्यन्तं तत्सत्यमितिधारणा ॥ ३ ।२०९।४
ज्याच्या योगानें जीवाचें अतिशय कल्याण होतें तेंच सत्य असा सिद्धांत आहे. ७५७ यद्यत्प्रियं यस्य सुखं तदाहु
स्तदेव दुःखं प्रवदन्त्यनिष्टम् ।। १२/२०१।१०
ज्याला जें प्रिय वाटतें त्याला तो सुख म्हणतो, तेंच अप्रिय झालें कीं त्यालाच दुःख म्हणतो.
७५८ यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते || ६ |२७|२१
श्रेष्ठ पुरुष ज्या ज्या प्रकारें वागतो त्या त्या प्रकारेंच इतर लोक वागतात. त्याला जें मान्य होतें, त्याचेंच अनुकरण लोक करीत असतात.
For Private And Personal Use Only
Page #132
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७५९ यद्यदाचरते राजा तत्प्रजानां स्म रोचते || १२/७५/४
राजा जें जें करतो तें प्रजेला आवडूं लागतें.
७६० यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोऽशसंभवम् || ६ | ३४ |४१
भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ) जी जी वस्तु मोठेपणा, ऐश्वर्य किंव वैभव यांनी युक्त असेल, ती ती प्रत्येक माझ्या ( परमेश्वराच्या ) तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेली आहे असे तूं पक्के समज.
७६१ यद्यपि भ्रातरः क्रुद्धा भार्या वा कारणान्तरे ।
स्वभावतस्ते प्रीयन्ते नेतरः प्रीयते जनः ।। १२।१३८।१५४
कारणपरत्वें भाऊ जरी रागावले किंवा बायको रागावली तरी तीं स्वभावतःच प्रेम करीत असतात. तसें इतर लोक प्रेम करीत नाहींत.
७६२ यन्निमित्तं भवेच्छोकस्तापो वा दुःखमेव च ।
आयासो वा यतो मूलमेकाङ्गमपि तत्त्यजेत् || १२ |१७४|४३ ज्याच्यामुळे शोक, ताप, दुःख किंवा कष्ट होतात, तें कारण जरी आपल्या शरीराचा एक अवयव असले तरीहि त्याचा त्याग केला पाहिजे.
७६३ यमाजीवन्ति पुरुषं सर्वभूतानि संजय ।
पक्कं द्रुममिवासाद्य तस्य जीवितमर्थवत् ।। ५।१३३।४३ ( विदुला म्हणते ) संजया, पक्क वृक्षाप्रमाणे ज्याच्याजवळ गेल्यानें सर्व जीवांचें प्राणरक्षण होतें त्याचेंच जीवित सफल झालें.
७६४ ययोरेव समं वित्तं ययोरेव समं श्रुतम् ।
तयोर्विवाहः सख्यं च न तु पुष्टविपुष्टयोः || १।१३१।१०
ज्यांची श्रीमंती सारखी, ज्यांचे ज्ञान सारखें, त्यांचाच विवाहसंबंध म्हणा किंवा स्नेहसंबंध म्हणा, होत असतो. एक श्रीमंत आणि दुसरा गरीब अशांचा अशा प्रकारचा संबंध कधींहि होत नसतो.
For Private And Personal Use Only
Page #133
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७६५ यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ।।६।४०।२३ शास्त्रांत सांगितलेला विधि सोडून जो स्वेच्छाचाराने वागतो, त्याला सिद्धि प्राप्त होत नाही, आणि श्रेष्ठ गतिहि नाही. ७६६ यस्तु निःश्रेयसं श्रुत्वा प्राक्तदेवाभिपद्यते ।
आत्मनो मतमुत्सृज्य स लोके सुखमेधते ॥५॥१२४।२४ आपलें खरें कल्याण कशांत आहे हे ऐकल्यावर, स्वतःचे मत बाजूला सारून, जो प्रथमतः त्याचेच आचरण करतो त्याला जगांत सुख होतें. ७६७ यस्तु वृद्धया न तृप्येत क्षये दीनतरो भवेत् ।
एतदुत्तममित्रस्य निमित्तमिति चक्षते ॥ १२॥८०१६ अभ्युदय कितीही झाला तरी तृप्ति न होणे, आणि हानि झाल्यास अत्यंत दीन. होणे हे उत्तम प्रतीच्या मित्राचे लक्षण होय असे सांगितलेले आहे. ७६८ यस्माददान्तान्दमयत्यशिष्टान् दण्डयत्यपि ।
दमनाद्दण्डनाच्चैव तस्माद्दण्डं विबुधाः ॥ १२॥१५/८ ज्याअर्थी [राजदंड हा] स्वैराचरण करणाऱ्यांना वठणीस आणतो आणि असभ्यपणे वागणारांना शिक्षा करतो, त्याअर्थी दमन करणे आणि दंड करणे या दोन गुणांमुळे ज्ञाते लोक त्याला दंड असें म्हणतात. ७६९ यस्मिन्क्षमा च क्रोधश्च दानादाने भयाभये ।
निग्रहानुग्रहौ चोभौ स वै धर्मविदुच्यते ॥ १२।१४।१७ ज्याच्या ठायीं [प्रसंगानुरूप ] क्षमा व क्रोध, दान व ग्रहण, भय व अभय, तसेच निग्रह व अनुग्रह ही दोनहि आढळतात तोच खरोखर धर्म जाणणारा होय. ७७० यस्मिन्नर्थे हितं यत्स्यात्तद्वर्ण रूपमादिशेत् ।
बहुरूपस्य राज्ञो हि सूक्ष्मोऽप्यर्थो न सीदति ॥१२॥१२०१६ ज्या बाबतीत जे योग्य दिसेल त्याप्रकारचे रूप [ राजानें ] धारण करावे. कारण [प्रसंगाप्रमाणे ] निरनिराळी रूपें धारण करणाऱ्या राजाची बारीकसारीक गोष्टीत सुद्धा फसगत होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #134
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७७१ यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्य
स्तस्मिंस्तथा वर्तितव्यं स धर्मः। मायाचारो मायया वर्तितव्यः
साध्वाचारः साधुना प्रत्युपेयः ॥ ५।३७७ ___ ज्याच्याशी जो मनुष्य ज्या प्रकारे वागतो, त्याच्याशी त्याने त्याचप्रकारे वागावें. असे करण्यांतच धर्म आहे. कपट करणाराशी कपटाने वागावे, आणि सरळपणाने चालणाराशी सरळपणा ठेवावा. ७७२ यस्मै देवाः प्रयच्छन्ति पुरुषाय पराभवम् । __बुद्धिं तस्यापकर्षन्ति सोऽवाचीनानि पश्यति ॥ ५/३४१८१
देवांच्या मनांतून ज्याचा नाश करावयाचा असतो, त्याची बुद्धि ते हिरावून घेतात, आणि मग त्याला प्रतिकूल असलेल्या गोष्टी घडून आलेल्या दिसतात. ७७३ यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रित परे ।
कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते ॥ ५॥३३॥१८ पुढे करावयाचे ज्याचे कृत्य अथवा योजलेला बेत दुसऱ्यांना कळत नाही, काय तें प्रत्यक्ष कृतीत आल्यावरच समजते त्याला पंडित म्हणतात. ७७४ यस्य दानजितं मित्रं शत्रवो युधि निर्जिताः । ___ अन्नपानजिता दाराः सफलं तस्य जीवितम् ।। ५।३९८३ ज्याने उदारपणाने मित्र आपलासा केला, युद्ध करून शत्रूना जिंकले आणि अन्नपानादिकांच्या योगाने स्त्रीला स्वाधीन ठेवले त्याचें जीवित सफल झाले. ७७५ यस्य धर्मो हि धर्मार्थः क्लेशभाङ् न स पण्डितः ।
न स धर्मस्य वेदार्थ सूर्यस्यान्धः प्रभामिव ॥ ३।३३।२३ [ तत्त्व न जाणतां ] केवळ धर्मासाठी जो धर्माचरण करतो तो शहाणा नसून दुःखाचा मात्र वांटेकरी होणारा असतो. अंधळ्याला ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा समजत नाही, त्याप्रमाणे त्याला धर्माचा अर्थ समजत नाही.
For Private And Personal Use Only
Page #135
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१२५
७७६ यस्य नास्ति निजा प्रज्ञा केवलं तु बहुश्रुतः ।
न स जानाति शास्त्रार्थ दर्वी सूपरसानिव ॥ २।५५।१ ज्याला स्वताची बुद्धि नाही पण ज्याने केवळ पुष्कळसें ऐकलेले आहे त्याला, आमटींतल्या पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे शास्त्राचे रहस्य कळत नाही. ७७७ यस्य बुद्धिः परिभवेत्तमतीतेन सान्त्वयेत् ।।
__ अनागतेन दुष्पज्ञं प्रत्युत्पन्नेन पण्डितम् ॥ ११४०७४ ज्याची बुद्धि मंद असेल त्यास आपल्या पूर्वीच्या बढाईच्या गोष्टी सांगाव्या, जो मूर्ख असेल त्यास 'पुढे अमुक करीन' वगैरे आशा लावावी, आणि जो शाहणा असेल त्यास धनादिक देऊन संतुष्ट करावें. ७७८ यस्य भार्या गृहे नास्ति साध्वी च प्रियवादिनी ।
अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ॥१२।१४४।१७ ज्याच्या घरांत सत्त्वशील व प्रिय भाषण करणारी स्त्री नाही, त्याने अरण्यांत निघून जावे. कां की, जसें अरण्य तसेच त्याचें घर. ७७९ यस्य वृत्तं न जल्पन्ति मानवा महदद्भुतम् ।
राशिवर्धनमात्रं स नैव स्त्री न पुनः पुमान् ॥५।१३३।२३ ज्याच्या हातून एकादी मोठी अद्भुत गोष्ट घडल्याचे लोक बोलत नाहीत तो मनुष्य कुचकामाचा, केवळ ! मनुष्यजातीची] संख्या वाढविणारा होय. वस्तुतः त्याला स्त्रीहि म्हणता येत नाही, मग पुरुष तर तो नव्हेच नव्हे. ७८० यस्य स्वल्पं प्रियं लोके ध्रुवं तस्याल्पमप्रियम् ॥५।१३५।१७
जगामध्ये अल्पस्वल्प सत्ता ज्याला प्रिय असते, त्याची ती सत्ता निःसंशय त्याच्या अनर्थालाच कारण होते. ७८१ यस्यास्तस्य मित्राणि यस्यास्तस्य बान्धवाः । ___ यस्यार्थाः स पुमाल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः।।१२।८।१९
ज्याच्याजवळ द्रव्य असेल त्याच्यासाठी मित्र असतात ज्याच्याजवळ द्रव्य आहे त्याच्याकरितां आप्तेष्ट आहेत. जगांत ज्याच्याजवळ द्रव्य असेल तोच खरा पुरुष आणि तोच पंडित.
For Private And Personal Use Only
Page #136
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२६ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ७८२ यस्यैव बलमोजश्च स धर्मस्य प्रभुर्नरः ॥ १२।१५२।१८
ज्याच्या आंगीं सामर्थ्य आणि तेज ही असतात तोच मनुष्य धर्माचरणास समर्थ होतो. ७८३ यः सदारः स विश्वास्यः ॥ १।७४।४४
जो सपत्नीक असेल त्याच्यावर विश्वास ठेवावा. ७८४ यः सपत्नश्रियं दीप्तां हीनश्रीः पर्युपासते ।
मरणं शोभनं तस्य इति विद्वज्जना विदुः ॥ ११७९।१३ जो स्वतःचे ऐश्वर्य नष्ट झाले असतां प्रतिपक्ष्याच्या डोळे दिपणाऱ्या वैभवाची आराधना करतो, त्याला मृत्यु आलेला फार उत्तम असें ज्ञाते लोक म्हणतात. ७८५ यः समुत्पतितं क्रोधं क्षमयेह निरस्यति । ___ यथोरगस्त्वचं जीर्णा स वै पुरुष उच्यते ॥ ११७९।४
सर्प जसा जीर्ण झालेली त्वचा टाकून देतो त्याप्रमाणे अंतःकरणांत उत्पन्न झालेल्या क्रोधाचें क्षमेच्या योगानें जो निवारण करतो. तोच पुरुष म्हणावयाचा. ७८६ यः सौहृदे पुरुष स्थापयित्वा
पश्चादेनं दूषयते स बालः ॥ २॥६४।१३ जो पहिल्याने आपणच एकाद्याला आपला स्नेही समजतो व मागून त्याला दूषण देतो तो पोरकट होय. ७८७ या दुस्त्यजा दुर्मतिभिर्या न जीयति जीर्यतः ।
योऽसौपाणान्तिकोरोगस्तांतृष्णांत्यजतःसुखम्॥१३।७।२१ दुष्ट मनुष्यांना जिचा त्याग करितां येत नाही, शरीर जीर्ण होत असतां जी कमी होत नाही, जी केवळ प्राणांतीच संपणाऱ्या रोगासारखी आहे त्या तृष्णेचा [ लोभाचा ] त्याग करणारास सुख प्राप्त होतें.
For Private And Personal Use Only
Page #137
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१२७
७८८ यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः।
सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम् ॥१३।६।६ शेतकरी शेतांत ज्या प्रकारचे बीज टाकतो त्या प्रकारचे त्यास फळ मिळते. जर याने चांगले बी पेरले तर त्यास चांगले फळ येते; आणि वाईट पेरिलें तर वाईट फळ येते. ७८९ यादृशः पुरुषस्यात्मा तादृशं संप्रभाषते ॥ ५।३।१
पुरुषाचे अंतःकरण जशा प्रकारचे असते तशा प्रकारचे तो भाषण करीत असतो. ७९० यादृशैः संनिविशते यादृशांश्चोपसेवते ।
यादृगिच्छेच्च भवितुं तादृग्भवति पूरुषः॥ ५।३६।१३ कोणी मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांशी सहवास ठेवितो, ज्या प्रकारच्या मनुष्यांची सेवा करतो, आणि ज्या प्रकारचा होण्याची इच्छा धरतो त्या प्रकारचा तो होतो. ७९१ यादृशो जायते राजातादृशोऽस्य जनो भवेत् ।।११।८।३२
जसा राजा असेल तशी त्याची प्रजा होते. ७९२ यावच्च मार्दवेनैतान् राजन्नुपचरिष्यसि ।
तावदेते हरिष्यन्ति तव राज्यमरिंदम ॥ ५/७३।८ [श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणतात ] हे शत्रूचे दमन करणाऱ्या धर्मराजा, जोपर्यंत तूं सामोपचाराने यांच्याशी [ म्हणजे कौरवांशी ] वागत राहाशील तोपर्यंत हे तुझे राज्य बळकावून बसतील. ७९३ यावत्कीर्तिमनुष्यस्य न प्रणश्यति कौरव ।
तावज्जीवति गान्धारे नष्टकीर्तिस्तु नश्यति ॥१॥२०३।११ (भीष्म म्हणतात ) गांधारीपुत्रा दुर्योधना; जोपर्यंत मनुष्याची कीर्ति नष्ट झालेली नाही तोपर्यंत तो जिवंत असतो. कीर्ति नाहीशी झाली म्हणजे त्याचा नाश होतो. ७९४ यावद्धि तीक्ष्णया मूच्या विध्येदग्रेण केशव ।।
तावदप्यपरित्याज्यं भूमेन: पाण्डवान्पति ॥ ५।१२७।२५ (दुर्योधन म्हणतो ) कृष्णा, तीक्ष्ण सुईच्या टोकानें जेवढ्याचा वेध करता येईल तेवढी भूमि देखील आम्ही पांडवांना देणार नाही.
For Private And Personal Use Only
Page #138
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२८
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७९५ युक्ता यदा जानपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव ।
अभीक्ष्णं भिक्षुरूपेण राजानं नन्ति तादृशाः॥१२।११।२३ राष्ट्रांतील प्रजा उद्योगशील असूनहि जर ( उद्योगाच्या अभावामुळे) भिक्षुरूपी बनून ब्राह्मणांप्रमाणे वारंवार भिक्षा मागू लागली तर तिच्यायोगाने राजाचा वध होतो. ७९६ ये च मूढतमा लोके ये च बुद्धः परं गताः।
त एव सुखमेधन्ते मध्यमः क्लिश्यते जनः ।१२।२५।२८ जगांत जे अत्यंत मूढ असतील, अथवा जे ज्ञानाच्या पैलतीराला पोचलेले असतात तेच सुखाने नांदत असतात. मध्यम स्थितीतल्या लोकांना क्लेशच होतात. ७९७ ये तु बुद्धया हि बलिनस्ते भवन्ति बलीयसः।
प्राणमात्रबला ये वै नैव ते बलिनो मताः॥१२॥१५६।१३ जे बुद्धीने बलिष्ठ असतील, तेच खरे प्रबळ होत. जे केवळ शारीरिक बलाने संपन्न ते खरोखर बलवान् नव्हत. ७९८ ये दम्भान्नाचरन्ति स्म येषां वृत्तिश्च संयता ।
विषयांश्च निगृह्णन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते ॥१२॥११०३ जे दांभिकाचरण करीत नाहीत, ज्यांची वृत्ति संयमशील आहे व जे विषयांना जिंकतात ते सर्व संकटांतून पार पडतात. ७९९ ये धनादपकर्षन्ति नरं स्वबलमास्थिताः ।
ते धर्ममर्थ कामं च प्रमश्नन्ति नरं च तम् ॥ ५/७२।२४ स्वतःच्या बलाचा आश्रय करून जे एकाद्या मनुष्याचे द्रव्य हिरावून घेतात, ते त्याचा धर्म, अर्थ व काम आणि तो मनुष्य या सर्वांचा विध्वंस करतात. ८०० येन खटां समारूढः परितप्येत कर्मणा ।
. आदावेव न तत्कुर्यादध्रुवे जीविते सति ॥ ५॥३९॥२९
खाटेवर (म्हणजे मृत्युशय्येवर ) पडल्यावर ज्या कृत्यामुळे पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येईल असे कृत्य प्रथमतःच करूं नये, कारण जीवित क्षणभंगुर आहे.
For Private And Personal Use Only
Page #139
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
८०१ ये न मानित्वमिच्छन्ति मानयन्ति च ये परान् । मान्यमानान्नमस्यन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते ।। १२।११०।१९
जे सन्मानाची इच्छा करीत नाहींत, जे दुसऱ्यांना मान देतात आणि सन्मानास पात्र असलेल्यांना प्रणाम करितात ते संकटांच्या पार जातात. ८०२ येन येन शरीरेण यद्यत्कर्म करोति यः ।
तेन तेन शरीरेण तत्तत्फलमुपाश्नुते || १३|७|३
कोणीहि ज्या ज्या शरीरानें जें जें कर्म करतो त्या त्या कर्माचें फळ तें तें शरीर धारण करून भोगतो.
८०३ ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् || ६|२८|११ [ श्रीकृष्ण म्हणतात ] जे मला ( परमेश्वराला ) जसे भजतात तसें मी त्यांना फल देतों.
८०४ येऽर्थाः स्त्रीषु समायुक्ताः प्रमत्तपतितेषु च ।
१२९
ये चानायें समासक्ताः सर्वे ते संशयं गताः || ५|३८|४२ जीं कामें स्त्रिया किंवा झिंगलेला अथवा पतित मनुष्य यांच्यावर सोपविलीं गेलीं, तसेंच जीं कामें अनार्य मनुष्याकडे दिली गेलीं तीं सगळीं संशयांत पडली. ८०५ येषां त्रीण्यवदातानि विद्या योनिश्च कर्म च ।
तान्सेवेतैः समास्या हि शास्त्रेभ्योऽपि गरीयसी ॥। ३।१।२७
विद्या, कुल आणि आचरण हीं तीन ज्यांचीं शुद्ध आहेत त्यांची संगत धरावी. खरोखर, त्यांचा समागम शास्त्राभ्यासापेक्षांहि श्रेष्ठ होय. ८०६ येषां शास्त्रानुगा बुद्धिर्न ते मुह्यन्ति भारत ॥ १।१।२४४
( संजय धृतराष्ट्राला म्हणतो ) ज्यांची बुद्धि शास्त्रानुसार चालते ते भांबावून जात नाहींत.
८०७ ये हि धर्मस्य लोप्तारो वध्यास्ते मम पाण्डव ।। ७।१८१।२८ ( श्रीकृष्ण म्हणतात. ) अर्जुना, जे धर्म बुडवणारे असतील ते माझ्याकडून मारिले जाण्यास योग्य होत.
म. भा. ९
For Private And Personal Use Only
Page #140
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१३०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८०८ ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।। . आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ६।२९।२२
( श्रीकृष्ण म्हणतात. ) अर्जुना, इंद्रियांचा विषयांशी संबंध घडल्याने जे भोग उत्पन्न होतात ते खरोखर दुःखाचे माहेरघरच होत, त्यांना आदि असून अंतहि असतो. त्यांच्या ठिकाणी शहाणा पुरुष रममाण होत नाही. ८०९ योगः कर्मसु कौशलम् ॥ ६।२६१५०
योग म्हणजे कर्मे करण्याचे कौशल्य. ( कर्मफलाचा लेप न लागेल अशा रीतीने निष्कामबुद्धीने कर्मे करणे.) ८१० यो दुर्लभतरं प्राप्य मानुष्यं द्विषते नरः।
धर्मावमन्ता कामात्मा भवेत्स खलु वञ्च्यते।।१२।२९७३४ जो कोणी मनुष्य दुर्लभ मनुष्ययोनीत उत्पन्न होऊनहि धर्माचा द्वेष किंवा निदान अवमान करतो आणि कामोपभोगांत गढून जातो त्याची अखेर फसगत होते. ८११ यो न दर्शयते तेजः क्षत्रियः काल आगते ।
सर्वभूतानि तं पार्थ सदा परिभवन्त्युत ॥ ३।२७।३८ [ द्रौपदी धर्मराजास म्हणते. ] हे कुंतीपुत्रा, समय प्राप्त झाला असतां जो क्षत्रिय आपलें तेज प्रकट करीत नाही त्याचा अपमान सर्व प्राणी नेहमी करीत असतात. ८१२ योऽन्यथा सन्तमात्मानमन्यथा प्रतिपद्यते ।
किं तेन न कृतं पापं चौरेणात्मापहारिणा ॥ ५॥४२॥३७ जो आपले खरे स्वरूप एकाप्रकारचे असतां ते दुसऱ्या प्रकारचे असल्याचे भासवितो, त्या स्वतःचे खरे स्वरूप लपविणाऱ्या चोराने कोणतें पाप केलें नाहीं ? ८१३ यो मा प्रयतते हन्तुं ज्ञात्वा प्रहरणे बलम् ।
तस्य तस्मिन्पहरणे पुनः प्रादुर्भवाम्यहम् ॥ १४॥१३॥१३ [ काम म्हणजे अहंकार म्हणतो. ] एकाद्या आयुधांत सामर्थ्य आहे असे समजून जो मला त्याने मारण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या त्या आयुधांतच मी फिरून उत्पन्न होतो.
For Private And Personal Use Only
Page #141
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८१४ यो यथा वर्तते यस्मिंस्तस्मिन्नेव प्रवर्तयन् ।
नाधर्म समवानोति नचाश्रेयश्च विन्दति ॥५।१७८।५३ जो ज्याच्याशी ज्याप्रकारे वागतो त्याच्याशी त्या प्रकारे वागण्यांत कोणताहि अधर्म घडत नाही, आणि त्यापासून अकल्याणहि होत नाही. ८१५ यो यस्मिञ्जीवति स्वार्थे पश्येत्पीडां न जीवति ।
स तस्य मित्रंतावत्स्याद्यावन्नस्याद्विपर्ययः।।१२।१३८।१४० जो जिवंत राहिला असतां स्वार्थाला बाध येणार नाही व आपले प्राण वाचतील असें ज्याला वाटत असेल त्याचा तो मित्र, उलट स्थिति आली नाही तोवरच असतो. ८१६ योऽरिणा सह संधाय सुखं स्वपिति विश्वसन् ।
स वृक्षाग्रे प्रसुप्तो वा पतितः प्रतिबुध्यते ॥ १२॥१४०।३७ जो शत्रूशी तह केल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवून खुशाल झोपा काढतो तो, झाडाच्या शेंड्यावर झोपी गेलेल्या मनुष्याप्रमाणे, पडल्यावरच जागा होतो. ८१७ यो विद्यया तपसा संप्रद्धः
स एव पूज्यो भवति द्विजानाम् ॥ १।८९।३ जो विद्येने व तपाने वृद्ध झाला तोच द्विजांना पूज्य वाटतो. ८१८ यो वै संतापयति यं स शत्रुः प्रोच्यते नृप ॥२।५५।१०
( दुर्योधन धृतराष्ट्राला सांगतो ) हे राजा, जो ज्याला पीडा करतो तो त्याचा शत्रु समजला जातो. ८१९ यो हि तेजो यथाशक्ति न दर्शयति विक्रमात ।
क्षत्रियो जीविताकाङ्क्षी स्तेन इत्येव तं विदुः।।५।१३४।२ जिवाच्या आशेने जो क्षत्रिय यथाशक्ति पराक्रम करून आपलें तेज प्रकट करीत नाहीं तो चोरच म्हटला पाहिजे ! | ८२० रक्षणं सर्वभूतानामिति क्षात्रं परं मतम् ॥१२॥१२०१३
सर्व भूतांचे रक्षण करणे हाच क्षत्रियाचा परम धर्म होय.
For Private And Personal Use Only
Page #142
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१३२
सार्थश्रीमहाभारतसभाषितानि
vvvvvvvvvvvvvvvv
८२१ रथः शरीरं भूतानां सत्त्वमाहुस्तु सारथिम् ।
इन्द्रियाणि हयानाहुः कर्मबुद्धिस्तु रश्मयः ॥११७१३ जीवाचें शरीर हा रथ व बुद्धि हा सारथि होय. इंद्रिये हे [ या रथाला जोडलेले । घोडे होत. आणि मन हा लगाम होय. ८२२ राजन्सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यसि ।
आत्मनो बिल्बमात्राणि पश्यन्नपि न पश्यसि ॥११७४१८२ ( शकुंतला दुष्यंताला म्हणते ) राजा, दुसऱ्यांचे मोहरीएवढे बारीक दोष तुला दिसतात, पण स्वतःचे बेलफळा एवढे मोठे दोषहि तूं पहात असूनहि तिकडे. डोळेझांक करतोस. ८२३ राजमूला महाबाहो योगक्षेमसुदृष्टयः ।
प्रजासु व्याधयश्चैव मरणं च भयानि च ॥१२॥१४११९ (भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) प्रजेचा योगक्षेम नीट चालणे, पर्जन्य चांगला पडणे, तसेंच प्रजेला रोग, मरण अथवा भय प्राप्त होणे या सर्वांचे मुख्य कारण राजाच आहे. ८२४ राजमूलो महाप्राज्ञ धर्मो लोकस्य लक्ष्यते ।
प्रजा राजभयादेव न खादन्ति परस्परम् ॥ १२॥६८८ ( बृहस्पति वसुमना राजाला सांगतात) लोक धर्माने वागतात याचे कारण राजाच होय असे दिसून येते. राजाच्या भीतीमुळेच लोक एकमेकांना खाऊन टाकीत नाहीत. ८२५ राजा कृतयुगस्रष्टा त्रेताया द्वापरस्य च ।
युगस्य च चतुर्थस्य राजा भवति कारणम् ॥१२॥६९/९८ जगांत कृतयुग उत्पन्न करणारा राजाच होय. तीच गोष्ट त्रेतायुगाची व द्वापर युगाची आणि चौथ्या म्हणजे कलियुगालाहि राजाच कारण होतो. ८२६ राजा चेन भवेल्लोके पृथिव्यां दण्डधारकः ।
जले मत्स्यानिवाभक्ष्यन्दुबैलं बलवत्तराः ॥ १२॥६७१६ पृथ्वीवर दंड धारण करणारा राजा जर नसता, तर पाण्यातील माशांप्रमाणे बलवत्तर लोकांनी दुर्बळांना खाऊन टाकलें असतें.
For Private And Personal Use Only
Page #143
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१३३
.८२७ राजानं प्रथमं विन्देत्ततो भार्या ततो धनम् ।
राजन्यसति लोकस्य कुतो भार्या कुतो धनम्॥१२॥५७१४१ मनुष्यांनी प्रथमतः राजा प्राप्त करून घ्यावा. तदनंतर स्त्री व त्यानंतर धन. कारण राजाच जर नसेल तर लोकांना स्त्री तरी कोटून मिळणार ? आणि धन तरी कोठून मिळणार ? .८२८ राजा लोकस्य रक्षिता ॥ १२।९०१३
राजा हाच लोकांचा पालनकर्ता होय. ८२९ राजैव कर्ता भूतानां राजैव च विनाशकः ।
धर्मात्मा यःस कर्ता स्यादधर्मात्मा विनाशकः॥१२।९१९ प्राण्यांचे कल्याण करणारा राजाच आणि त्यांचा नाश करणारहि पण राजाच. कारण, तो धर्माने वागेल तर कल्याणकर्ता आणि अधर्माने वागेल तर नाश करणारा ठरतो. ८३० राजैव युगमुच्यते ॥ १२।९११६
राजालाच युग म्हणतात. [म्हणजे जसा राजा असेल तसें बरे वाईट युग उत्पन्न होतें] ८३१ राज्ञः प्रमाददोषेण दस्युभिः परिमुष्यताम् ।
अशरण्यः प्रजानां यःस राजा कलिरुच्यते ॥ १२।१२।२९ राजाच्या हलगर्जीपणामुळे चोरांकडून लुबाडल्या जाणाऱ्या प्रजेला जो राजा अभय देऊ शकत नाही तो (मूर्तिमंत ) कलिच होय.. ८३२ राज्ञां हि चित्तानि परिप्लुतानि
सान्त्वं दत्त्वा मुसलैर्घातयन्ति ॥२॥६४।१२. राजांचें चित्त नेहमी कलुषित असल्यामुळे ते प्रथमतः गोड बोलतात आणि मागाहून डोक्यांत मुसळ घालून प्राण घेतात. ८३३ राज्ञा हि पूजितो धर्मस्ततः सर्वत्र पूज्यते ॥ १२।७५।४ राजाने अगोदर धर्माचा मान ठेवला म्हणजे सर्व लोक धर्माचा मान ठेवतात.
For Private And Personal Use Only
Page #144
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१३४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
anAAAAAI
८३४ राज्यं हि सुमहत्तन्त्र धार्यते नाकृतात्मभिः ।
न शक्यं मृदुना वोटुमायासस्थानमुत्तमम् ॥ १२॥५८।२१ राज्य चालविणे हे अत्यंत अवघड काम आहे. ज्याने आपल्या बुद्धीला विशिष्ट प्रकारचे वळण लावलेले नाही, त्याला तें झेंपणार नाही. राज्यधुरा वाहणे हे अत्यंत कष्टप्रद असून ते लेच्यापेच्या मनुष्याला शक्य नाही. ८३५ राज्यं प्रणिधिमूलं हि मन्त्रसारं प्रचक्षते ॥ १२॥८३१५१
हेर हा राज्याचा आधार, आणि सल्लामसलत ही शक्ति होय असे म्हणतात. ८३६ राष्ट्रस्यैतत्कृत्यतमं राज्ञ एवाभिषेचनम् ।
अनिन्द्रमबलं राष्ट्र दस्यवोऽभिभवन्त्युत ॥ १२॥६७।२ कोणत्यातरी राजाला राज्याभिषेक करणे हे एक राष्ट्राचे प्रमुख कर्तव्य आहे. कारण राष्ट्राला कोणी नियंता नसला म्हणजे ते दुर्बळ झाल्यामुळे शत्रु त्याच्यावर हल्ला करतात. ८३७ रोहते सायकैर्विद्धं वनं परशुना हतम् ।
वाचा दुरुक्तं बीभत्सं न संरोहति वाक्क्षतम् ।।५।३४१७८ बाणांनी वेधलेले अथवा कुन्हाडीने तोडलेलें वन फिरून वाढीस लागते. परंतु दुष्ट व बीभत्स बोलण्याने पडलेली जखम भरून येत नाही. ८३८ लोकयात्रार्थमेवेह धर्मस्य नियमः कृतः ॥ १२।२५९।५ : लोकव्यवहार सुरळीतपणे चालावा एवढ्यासाठीच धर्माचरणाचा नियम घालून दिला आहे. ८३९ लोकरञ्जनमेवात्र राज्ञां धर्मः सनातनः ॥१२॥५७।११
या लोकी प्रजेला सुखी ठेवणे हाच राजांचा सनातन धर्म आहे. ८४० लोकसत्ताद्राजवृत्तमन्यदाह बृहस्पतिः ॥२।५५।६।। प्रजेच्या कर्तव्याहून राजाचे कर्तव्य निराळे असल्याचे बृहस्पतीने प्रतिपादिले आहे.
For Private And Personal Use Only
Page #145
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८४१ लोको ह्यार्यगुणानेव भूयिष्ठं तु प्रशंसति ॥ १३॥१२२।२
लोक चांगल्या गुणांचीच अतिशय प्रशंसा करीत असतात. ८४२ लोभं हित्वा सुखी भवेत् ॥ ३॥३१३१७८
लोभ टाकिल्यानें मनुष्य सुखी होतो. ८४३ लोभात्पापं प्रवर्तते ॥ १२॥१५८१२
लोभापासून पातकाची प्रवृत्ति होते. ८४४ लोहितोदा केशतणां गजशैलां ध्वजद्रमाम ।
महीं करोति युद्धेषु क्षत्रियो यः स धर्मवित्॥१२॥५५॥१८ जो संग्रामामध्ये पृथ्वीला रक्तरूपी जलाने युक्त, केशरूपी तृणाने आच्छादित झालेली, गजरूपी पर्वत असलेली व ध्वजरूपी वृक्षांनी युक्त अशी करितो, तोच क्षत्रिय खरा धर्म वेत्ता होय. ८४५ वधमेव प्रशंसन्ति शत्रूणामपकारिणाम् ॥१११४०।१० ___ अपकार करणाऱ्या शत्रूचा वधच करणे प्रशस्त मानतात. ८४६ वध्यन्ते न ह्यविश्वस्ताः शत्रुभिर्दुर्बला अपि ।।
विश्वस्तास्तेषु वध्यन्ते बलवन्तोऽपि दुर्बलैः १२।१३८।१९८ जे सावध असतात ते दुर्बळ असले तरी शत्रूकडून मारिले जात नाहीत. पण बलाढ्य असले तरी शत्रूविषयी बेसावध राहणारे, दुर्बळ शत्रूकडूनहि मारिले जातात. ८४७ वर्तमानः सुखे सर्वो मुह्यतीति मतिर्मम ॥३॥१८॥३०
( अजगर झालेला नहुष राजा युधिष्ठिराला म्हणतो.) सुखांत असतां सर्वांना मोह उत्पन्न होतो असे माझे मत आहे. ८४८ वर्धमानमृणं तिष्ठेत्परिभूताश्च शत्रवः ।
__ जनयन्ति भयं तीव्र व्याधयश्चाप्युपेक्षिताः॥१२॥१४०५९ ___ ऋण अवशिष्ट राहिले तर तें वृद्धिंगतच होत जाते. शत्रु शिल्लक ठेविले तर त्यांचा अपमान झाल्यामुळे ते पुढे अत्यंत भीति उत्पन्न करितात. आणि रोगांची उपेक्षा केली तर त्यापासूनहि अतिशय भीति उत्पन्न होते.
For Private And Personal Use Only
Page #146
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१३६
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८४९ वशे बलवतां धर्मः सुखं भोगवतामिव ।
नास्त्यसाध्यं बलवता सर्वं बलवतां शुचि ॥१२॥१३४।८ सुख जसें भोगसाधनें अनुकूल असलेल्याच्या स्वाधीन, तसा धर्म - बलसंपन्न असलेल्यांच्या अधीन. ज्यांच्यापाशी बल आहे त्यांना असाध्य असे काहीच नाही. बलवान् असेल त्याचे सर्वच शुभ. ८५० वसन्विषयमध्येऽपि न बसत्येव बुद्धिमान् ।
संवसत्येव दुर्बुद्धिरसत्सु विषयेष्वपि ॥१२।२९८६ शहाणा मनुष्य विषयांच्या गराड्यांत राहूनहि न राहिल्यासारखा असतो. मूर्ख मनुष्य विषय जवळ नसतांहि त्यांत गुरफटल्याप्रमाणे असतो. ८५१ वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालस्य पर्ययः ।
प्राप्तकालं तु विज्ञाय भिन्द्याघटमिवाश्मनि ॥१२॥१४०११८ आपला काल उलट आहे तोवर शत्रूला खांद्यावर देखील बसवावें, परंतु योग्य काल आला आहेसे दिसून येतांच, मडके दगडावर आपटावें तसा, त्याचा चुराडा करून सोडावा. ८५२ वाक्शल्यं मनसो जरा ।। ५।३९/७९
वाग्बाणामुळे मनाला वार्धक्य येते. ८५३ वाक्संयमो हि नृपते सुदुष्करतमो मतः । ____ अर्थवच्च विचित्रं च न शक्यं बहुभाषितुम् ॥५॥३४७६
[विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ] वाणीचा संयम करणे अत्यंत दुर्घट म्हणून म्हटले आहे. परंतु यथार्थे असून चटकदार असें भाषण पुष्कळ करणे शक्यहि नाही. ८५४ वाक्सायका वदनानिष्पतन्ति
यैराहतः शोचति राज्यहानि । परस्य नामर्मसु ये पतन्ति
तान्पण्डितो नावसृजेत्परेषु ।। १३।१०४।३२ वाग्बाण हे तोंडातून सुटत असतात. ते ज्याला लागले तो रात्रंदिवस तळमळत राहतो. यास्तव दुसऱ्याच्या वर्मी लागतील असे वाग्वाण सुज्ञ मनुष्याने दुसऱ्यावर केव्हांही टाकू नये.
For Private And Personal Use Only
Page #147
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१३७
८५५ वाग्वज्रा ब्राह्मणाः प्रोक्ताः
क्षत्रिया बाहुजीविनः ॥ १२॥१९९।४६ वाणी हे ब्राह्मणांचे शस्त्र असून क्षत्रिय हे बाहुबलावर जगणारे होत असें म्हटले आहे. ८५६ वाचा भृशं विनीतः स्यादयेन तथा क्षुरः।
स्मितपूर्वाभिभाषी स्यात्सृष्टो रौद्रेण कर्मणा ।। १।१४०६६ बोलण्यांत अगदी विनयशील पण हृदयाने कठोर असावे. स्मितपूर्वक बोलावें परंतु आपले खरे स्वरूप भयंकर कृति करून प्रगट करावे. ८५७ वासांसि जीर्णानि यथा विहाय
_ नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही ॥ ६२६।२२ ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी घेतो, त्याप्रमाणे आत्मा हा जीर्ण झालेली शरीरें टाकून देऊन दुसऱ्या नव्या शरीरांत प्रवेश करतो. ८५८ विक्रमाधिगता ह्याः क्षत्रधर्मेण जीवतः ।
मनो मनुष्यस्य सदा प्रीणन्ति पुरुषोत्तम ॥ ५।९०७९ ( कुंती श्रीकृष्णाला म्हणते ) हे पुरुषोत्तमा, पराक्रम करून मिळविलेले द्रव्य क्षात्रधर्माने चालणाऱ्या मनुष्याच्या मनाला सदा संतोष देते. ८५९ विगुणा ह्यपि संरक्ष्या ज्ञातयो भरतर्षभ ॥ ५॥३९।२०
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ) हे भरतश्रेष्ठा, आपल्या कुलांतील गुणहीन पुरुषांचेंहि संरक्षण करणे अवश्य आहे. ८६० विजयो मन्त्रमूलो हि राज्ञो भवति भारत ॥२२५२७
( नारद युधिष्ठिराला म्हणतात. ) राजाला विजय प्राप्त होण्याला मूळ कारण गुप्त सल्लामसलत हेच होय.
For Private And Personal Use Only
Page #148
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१३८
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८६१ विदिते चापि वक्तव्यं सुहृद्भिरनुरागतः ॥ ४।४।९
एकाद्यास माहीत असलेली गोष्टहि आप्तेष्टांनी पुनः प्रेमाने सांगावी हे त्यांचे कर्तव्यच आहे. ८६२ विद्या तपो वा विपुलं धनं वा
सर्व ह्येतद्यवसायेन शक्यम् ॥ १२॥१२०१४५ विद्या काय, तप काय अथवा विपुल द्रव्य काय हे सर्व उद्योगानेच मिळविणे शक्य आहे. ८६३ विद्यामदो धनमदस्तृतीयोऽभिजनो मदः।
मदा एतेऽवलिप्तानामेत एव सतां दमाः॥ ५३४॥४४ विद्येचा मद, धनाचा मद व तिसरा कुलाचा मद हे तीन गर्विष्ट लोकांच्या बाबतीत मद म्हणजे अहंकार वाढविणारे ठरतात, तेच सज्जनांच्या बाबतींत दम म्हणजे इंद्रियनिग्रहाला कारण होतात. . ८६४ विद्या हि सा ब्रह्मचर्येण लभ्या ॥ ५।४४२
विद्या म्हणून जी आहे ती ब्रह्मचर्यानेच साध्य होत असते. ८६५ विना वधं न कुर्वन्ति तापसाःप्राणयापनम् ।।१२।१५।२४
जीवहत्या घडल्याविना तपस्व्याचेसुद्धां प्राणधारण होत नाही. ८६६ विरूपो यावदादर्श नात्मनः पश्यते मुखम् ।
मन्यते तावदात्मानमन्येभ्यो रूपवत्तरम् ॥ ११७४६८७ कुरूप मनुष्य जोवर आरशांत आपले तोंड पहात नाही, तोवर त्याला वाटत असते की, आपण इतरांपेक्षा रूपवान् आहों. ८६७ विवर्जनं ह्यकार्याणामेतत्सुपुरुषव्रतम् ॥ ४।१४।३६ दुष्कृत्य सर्वथा वर्ण्य करणे हे सत्पुरुषांचे व्रत होय.
For Private And Personal Use Only
Page #149
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१३९
-
~
~
~
८६८ विवाहकाले रतिसंप्रयोगे
प्राणात्यये सर्वधनापहारे ।। विप्रस्य चार्थे ह्यनृतं वदेत
पञ्चानृतान्याहुरपातकानि ॥ ८॥६९।३३ विवाहकाली, संभोगसमयीं, प्राणसंकट ओढवले असतां, सर्वस्वाचा नाश होण्याचा समय आला असता, तसेंच एकाद्या ब्राह्मणाचे हित साधत असेल तर मनुष्याने असत्य भाषण केले तरी चालेल. या पांच प्रसंगी असत्य भाषणाच्या योगाने पातक लागत नाही. ८६९ विश्वासयित्वा तु परं तत्त्वभूतेन हेतुना । ___ अथास्य प्रहरेकाले किंचिद्विचलिते पदे ॥१२॥१४०४४
खरेखुरे कारण दाखवून शत्रूचा विश्वास संपादन करावा. आणि कालांतराने त्याचें आसन जरासें डळमळीत झाले की, त्याच्यावर प्रहार करावा. ८७० विश्वासयेत्परांश्चैव विश्वसेच न कस्यचित् ।
पुत्रेष्वपि हि राजेन्द्र विश्वासो न प्रशस्यते ॥ १२॥८५।३३ ( भीष्म युधिष्ठिराला म्हणतात ) दुसऱ्यांचा विश्वास संपादन करावा. पण आपण मात्र कोणावरहि विश्वास ठेवू नये. राजा, फार काय, पण पोटच्या मुलाचासुद्धां पूर्ण विश्वास धरणे प्रशस्त नव्हे. ८७१ विश्वासाद्भयमभ्येति नापरीक्ष्य च विश्वसेत् १२।१४०४३
[ भलत्याच मनुष्यावर ] विश्वास टाकिल्याने भीति उत्पन्न होत असते. यास्तव, परीक्षा पाहिल्यावांचून कोणावरहि विश्वास ठेवू नये. ८७२ विषमं न हि मन्यन्ते प्रपातं मधुदर्शिनः ॥ ५॥५१२६
मध पाहणारे [ मधाच्या ठिकाणाचा ] तुटलेला कडा किती भयंकर आहे इकडे. लक्ष देत नाहीत. ८७३ विषमां च दशां प्राप्तो देवान् गर्हति वै भृशम् ।
आत्मनः कर्मदोषाणि न विजानात्यपण्डितः॥३२०९।६. मूर्ख मनुष्य दुर्दशेच्या फेऱ्यांत सांपडला म्हणजे देवांच्या नांवानें खडे फोडतो,. पण आपले चुकते कोठे, हे त्याला समजत नाही...
For Private And Personal Use Only
Page #150
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४०
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
८७४ विषमावस्थिते दैवे पौरुषेऽफलतां गते
विषादयन्ति नात्मानं सत्त्वोपाश्रयिणो नराः || ३|७९।१४
दैव प्रतिकूळ होऊन प्रयत्न फुकट गेला असतां, सत्वशील पुरुष अंतःकरण खिन्न होऊ देत नाहींत.
८७५ विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्ज रसोऽप्यस्य परं दृष्टा निवर्तते ।। ६ । २६ । ५९
निराहारी पुरुषाला विषय सोडून जातात, पण त्यांची आवड शिल्लक राहतेच, ही आवडसुद्धां परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर नष्ट होते.
८७६ विष्वग्लोपः प्रवर्तेत भिद्येरन्सर्व सेतवः ।
ममत्वं न प्रजानीयुर्यदि दण्डो न पालयेत् ।। १२।१५ ३८
दंडाने जर संरक्षण केलें नसतें तर चोहोंकडे शून्य होऊन गेलें असतें; सर्व प्रकारच्या मर्यादांचा भंग होऊन गेला असता; आणि कोणाची कशावर मालकी • राहिली नसती.
८७७ विहीनं कर्मणाऽन्यायं यः प्रगृह्णाति भूमिपः ।
उपायस्याविशेषज्ञं तद्वै क्षत्रं नपुंसकम् || १२ | १४२/३१ सामादिक उपाय व त्यांचे भेद यांचे ज्ञान नसणारा जो राजा, अन्यायानें प्रजेकडून कर वसूल करतो; पण आपलें प्रजापालनरूप कर्तव्य मात्र करीत नाहीं तो क्षत्रिय केवळ नपुंसक होय.
८७८ वृक्षमूलेऽपि दयिता
यस्य तिष्ठति तद्गृहम् |
प्रासादोऽपि तया हीनः
कान्तार इति निश्चितम् ।। १२।१४४।१२
कोणी झाडाखाली राहिला, तरी त्याची स्त्री बरोबर असेल, तर तें त्याचें घरच होय, आणि तिजवांचून जरी एकादें राजमंदिर असले तरी तें निःसंशय अरण्यच होय.
For Private And Personal Use Only
Page #151
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८७९ वृत्तं यत्नेन संरक्षेद्वित्तमेति च याति च। _अक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ५/३६।३७
शीलाचे यत्नपूर्वक रक्षण करावे. द्रव्य काय, मिळते आणि जातें, जो केवळ द्रव्याने क्षीण झाला तो खरोखर क्षीण नव्हे, पण ज्याचे शील भ्रष्ट झाले त्याचा सर्वस्वी नाश झाला. ८८० वृत्तेः कार्पण्यलब्धाया अप्रतिष्ठैव ज्यायसी ॥५।९०७४ मिंधेपणाने उपजीविका करण्यापेक्षा अगदी निराधार असणेच चांगलें. ८८१ वृत्तेन हि भवत्यार्यो न धनेन न विद्यया ॥५९०५३
शीलाच मनुष्य आर्य गणला जातो; धनाने नव्हे, अथवा विद्येनेंहि नव्हे. ८८२ वेदाच्या वृत्तसंपन्ना ज्ञानवन्तस्तपस्विनः। __यत्र तिष्ठन्ति वै विप्रास्तन्नाम नगरं नृप ॥ ३२००९१
(मार्कंडेय युधिष्ठिराला म्हणतात ) हे राजा, वेदपारंगत, शीलसंपन्न, ज्ञानी व तपस्वी असे ब्राह्मण ज्यांत राहात असतील त्यालाच खरोखर नगर म्हणावें. ८८३ वेदाऽहं तव या बुद्धिरानृशंस्याऽगुणैव सा ॥१२।७५।१८
[धर्माचरण करण्याच्या इच्छेने राज्य सोडून अरण्यांत जाऊ इच्छिणाऱ्या युधिष्ठिरास भीष्म म्हणतात ] तुझ्या बुद्धीला क्रूरत्वाचा संपर्क नाही हे मी जाणून आहे पण तशा प्रकारची बुद्धि निष्फल होय. ८८४ वैद्याश्चाप्यातुराः सन्ति बलवन्तश्च दुर्बलाः ।
श्रीमन्तश्चापरे घण्टा विचित्रः कालपर्ययः॥ १२२८।२२ वैद्यांनासुद्धा रोग होतात. आणि बलवान् देखील दुबळे ठरतात. तसेंच कित्येक श्रीमंत लोक नामर्द असतात. ही काळाचीच विचित्र गति आहे. ८८५ व्यक्तं हि जीर्यमाणोऽपि बुद्धिं जरयते नरः॥७।१४३।१६
मनुष्य वृद्ध होऊ लागला म्हणजे त्याची बुद्धिहि त्याच्या शरीराबरोबरच जीर्ण होऊ लागते हे अगदी खरे आहे.
For Private And Personal Use Only
Page #152
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८८६ व्यवसायं समाश्रित्य सहायान् योऽधिगच्छति ।
न तस्य कश्चिदारम्भः कदाचिदवसीदति ॥१२।२९८१४२ जो आपली मुख्य भिस्त स्वतःचे प्रयत्नावर ठेवून मग दुसऱ्यांचे साहाय्य घेतो, त्याचा कसलाहि प्रयत्न केव्हांहि फसत नाही. ८८७ बजे वाप्यथवारण्ये यत्र सन्ति बहुश्रुताः !
तत्तनगरमित्याहुः पार्थ तीर्थ च तद्भवेत् ॥ ३२००९२ (मार्कंडेय म्हणतात ) हे युधिष्टिरा, बहुश्रुत ब्राह्मण जेथे असतील तो गौळवाडा असला, अथवा अरण्य जरी असले तरी त्यालाच नगर म्हणतात, आणि तेच तीर्थ होते. ८८८ शकुनानामिवाकाशे मत्स्यानामिव चोदके ।
पदं यथा न दृश्येत तथा पुण्यकृतां गतिः॥१२॥३२२।१९ पक्ष्यांनी आकाशांत आणि माशांनी पाण्यांत आक्रमिलेल्या मार्गाची जशी काही खूग दिसत नाही, त्याप्रमाणे पुण्यवान् लोकांना प्राप्त होणारी गति उघड दिसत नाही. ८८९ शक्नोति जीवितुं दक्षो नालसः सुखमेधते ॥ १०॥२।१५ ___ तत्परतेने उद्योग करणारा मनुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. आळशी मनुष्याला मुख म्हणून मिळत नाही. ८९० शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥६।२९।२३ शरीर टाकून देण्यापूर्वी या जगांत असतांनाच, जो कामक्रोधांचा तडाका सहन करूं शकतो तो योगी होय. तोच मनुष्य सुखी होतो. ८९१ शक्यं ह्येवाहवे योद्धं न दातुमनसूयितम् ॥ १३॥८।१०
समरांगणांत लढणे सहज शक्य आहे; पण असूया [ म्हणजे हेवा, लोभ वगैरे ] न धरितां दान करणे हे मात्र शक्य नाही. ८९२ शत्रुः प्रवृद्धो नोपेक्ष्यो दुबैलोऽपि बलीयसा ॥ ५।९।२२
शत्रु दुर्बळ जरी असला तरी तो वृद्धिंगत झाला असतां, बलाढ्य पुरुषानेहि त्याची उपेक्षा करितां उपयोगी नाही.
For Private And Personal Use Only
Page #153
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१४३
८९३ शत्रु च मित्ररूपेण सान्त्वेनैवाभिसान्त्वयेत् ।
नित्यशश्चोद्विजेत्तस्माद्हात्सर्पयुतादिव ॥ १२॥१४०।१५ वरकरणी मित्रत्वाचा आव आणून शत्रूला सामोपचारानेच वश करावे; परंतु आंत सर्प शिरलेल्या घराप्रमाणे त्याचे निरंतर भय बाळगावें. ८९४ शत्रुपक्षं समृध्यन्तं यो मोहात्समुपेक्षते । ___व्याधिराप्यायित इव तस्य मूलं छिनत्ति सः ॥२।५५।१६
भरभराटीत असलेल्या शत्रुपक्षाची जो मूर्खपणाने उपेक्षा करतो, त्याचा समूळ उच्छेद तो शत्रुपक्ष, विकोपास गेलेल्या व्याधीप्रमाणे करितो. ८९५ शत्रुनिमज्जता ग्राह्यो जङ्घायां प्रपतिष्यता ।
विपरिच्छिन्नमूलोऽपि न विषीदेत्कथंचन ॥५॥१३३१२० बुडतां बुडतां अथवा पडतां पडतांसुद्धां शत्रूची तंगडी पकडावी, आणि त्यासह बुडावे किंवा पडावें. मुळासकट सर्वनाश झाला तरी केव्हांहि खिन्न होऊन बसू नये. ८९६ शत्रुश्चैव हि मित्रं च न लेख्यं न च मातका ।
यो वै संतापयति यस शत्रुः प्रोच्यते नृप॥२।५५।१० [ दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो ] हे राजा, अमका हा शत्रु आणि अमका हा मित्र, असा काही कोणावर छाप मारलेला नाही, किंवा अक्षरेंहि खोदलेली नाहीत ! तर, ज्याच्यापासून ज्याला ताप होतो, त्यालाच त्याचा शत्रु असें म्हणत असतात. ८९७ शत्रोरपि गुणा ग्राह्या दोषा वाच्या गुरोरपि ॥४॥५१॥१५
शत्रूचेसुद्धा गुण घ्यावे. आणि दोष गुरूचे असले तरीसुद्धां निंद्य मानावे. ८९८ शयानं चानुशेते हि तिष्ठन्तं चानुतिष्ठति । ___अनुधावति धावन्तं कर्म पूर्वकृतं नरम् ॥११॥२॥३२
पूर्वजन्मी केलेले कर्म मनुष्य झोपी गेला की, त्याच्याबरोबरच झोपी जातें, उभा राहिला की लगेच उभे राहते, आणि तो धावू लागला म्हणजे त्याच्या मागोमाग धांवत जाते.
For Private And Personal Use Only
Page #154
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ८९९ शरीरनियमं प्राहुाह्मणा मानुषं व्रतम् ।
मनो विशुद्धों बुद्धिं च दैवमाहुव्रतं द्विजाः ॥३९३।२१ [ व्यासादिकमुनि पांडवांना म्हणतात. ] शारीरिक नियम पाळणे हे ज्ञानी लोक मानवी व्रत समजतात. आणि मनावर जय मिळवून बुद्धि शुद्ध करणे हे दैवी व्रत मानतात. ९०० शरीरस्य विनाशेन धर्म एव विशिष्यते ॥२२१३२०
आपला प्राण खर्ची घालूनहि धर्म पाळणे हेच अधिक श्रेयस्कर आहे. ९०१ शाश्वतोऽयं धर्मपथः सद्भिराचरितः सदा ।
यद्भायाँ परिरक्षन्ति भतारोऽल्पबला अपि ॥३॥१२॥६८ [ द्रौपदी पांडवांस म्हणते. ] भर्ते अशक्त असले तरीहि भायेंचे संरक्षण करितात. हा सनातन धर्ममार्ग असून सज्जनांनी नेहमीं आचरलेला आहे. ९०२ शीलं प्रधानं पुरुषे तद्यस्येह प्रणश्यति ।
न तस्य जीवितेनार्थो न धनेन न बन्धुभिः ॥५॥३४।४८ मनुष्याच्या ठिकाणी शील हेच मुख्य आहे. तेंच ज्याचें नष्ट झाले त्याला या जगांत जीविताचा, धनाचा अथवा बांधवांचा काहीएक उपयोग नाही. ९०३ शीलवृत्तफलं श्रुतम् ॥५॥३९॥६७
विद्येचें फल म्हणजे उत्तम शील आणि सदाचार. ९०४ शीलेन हि त्रयो लोकाः शक्या जेतुं न संशयः ।
नहि किंचिदसाध्यं वै लोके शीलवतां भवेत्॥१२॥१२४।१५ शीलाच्या जोरावर त्रैलोक्य जिंकणे शक्य आहे. यांत शंका नाही. खरोखर, शीलसंपन्न मनुष्यांना असाध्य असें कांहींच नाही. ९०५ शुचेरपि हि युक्तस्य दोष एव निपात्यते ।
मुनेरपि वनस्थस्य स्वानि कर्माणि कुर्वतः ॥१२॥११११६० शुचिर्भूत व आपले कर्तव्य करण्यांत तत्पर अशाहि पुरुषावर दोषारोप केला जातो. आणि अरण्यामध्ये राहून केवळ आपली कर्मे करीत असणाऱ्या ऋषीवरहि दोषारोप केला जातो.
For Private And Personal Use Only
Page #155
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९०६ शुभं वा यदि वा पापं द्वेष्यं वा यदि वा प्रियम् ।
अपृष्टस्तस्य तद्रूयाधस्य नेच्छेत्पराभवम् ॥५॥३४।४ ज्याची हानि होऊ नये अशी आपल्याला इच्छा असते, त्याला त्याने जरी विचारिलें नसले तरी, त्याच्यासंबंधाने में आपणाला दिसत असेल ते सांगावे; मग तें शुभ असो अथवा अशुभ असो. आणि त्याचप्राणे त्याला प्रिय होवो अथवा अप्रिय होवो. ९०७ शुभं सर्वपवित्रेभ्यो दानमेव परं द्विज ॥१३॥१२०१६
(व्यास मैत्रेय मुनींना म्हणतात ) सर्व पवित्र वस्तूंपेक्षां दान हेच अत्यंत कल्याणकारक आहे. ९०८ शुभानामशुभानां च द्वौ राशी पुरुषर्षभ ।
यः पूर्व सुकृतं भुङ्क्ते पश्चानिरयमेव सः॥ १८३॥१३ (इंद्र युधिष्ठिराला म्हणतो.) पुण्य आणि पाप यांच्या दोन निरनिराळ्या राशी आहेत. यांपैकी सुकृत म्हणजे पुण्य जो प्रथम भोगतो, त्याच्या वाट्याला मागाहून नरकच येतो. ९०९ शुभेन कर्मणा सौख्यं दुःखं पापेन कर्मणा ।
कृतं भवति सर्वत्र नाकृतं विद्यते कचित् ॥ ११।२।३६ सत्कर्माने सुख आणि दुष्कर्माने दुःख प्राप्त होते. जे पूर्वी केले असेल तेंच केव्हां झाले तरी फलाला येणार. में केलें नाहीं त्याचें फळहि नाही. ९१० शुश्रूषुरपि दुर्मेधाः पुरुषोऽनियतेन्द्रियः ।
नालं वेदयितुं कृत्स्नौ धर्मार्थाविति मे मतिः ॥१०॥५॥१ तथैव तावन्मेधावी विनयं यो न शिक्षते ।
न च किंचन जानाति सोऽपि धर्मार्थनिश्चयम्॥१०५।२ ( कृपाचार्य अश्वत्थाम्याला म्हणतात.) मंद बुद्धीचा मनुष्य जिज्ञासु असला तरी इंद्रियांवर ताबा मिळविल्यावांचून तो धर्मार्थ पूर्णपणे जाणण्यास समर्थ होणार नाही, असे माझे मत आहे. तीच गोष्ट, ज्याच्या मनाला चांगले वळण लागलेले नाही अशा बुद्धिमान् मनुष्याची, त्याला सुद्धां धर्मार्थाचे निश्चित ज्ञान कधीच होत नाही.
म. भा. १०
For Private And Personal Use Only
Page #156
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९११ शूरः सर्वं पालयति सर्वं शूरे प्रतिष्ठितम् ।। १२।९९।१८ . शूर पुरुष सर्वांचे रक्षण करतो. शूराच्या आधाराने सर्व राहतात. ९१२ शूरा वीराश्च शतशः सन्ति लोके युधिष्ठिर ।
येषां सख्यायमानानां दानशूरो विशिष्यते ॥१३।८।११ ( भीष्म म्हणतात.) हे युधिष्ठिरा, शूर वीर जगांत शेकड्यांनी आहेत. पण त्यांची मोजदाद करूं म्हटलं, तर दानशूर हाच विशेष श्रेष्ठ ठरेल. ९१३ शगालोऽपि वने कर्ण शशैः परिवृतो वसन् ।
__ मन्यते सिंहमात्मानं यावत्सिहं न पश्यति ॥ ८।३९।२८ [ शल्य म्हणतो ] हे कर्णा, वनांत सशांच्या जमावांत बसला असतां कोल्ह्याला सुद्धा आपण सिंह आहो असे वाटते. [पण कोठवर ? ] सिंह दृष्टीस पडला नाही तोवर. ९१४ शृणु यक्ष कुलं तात न स्वाध्यायो न च श्रुतम् ।
कारणं हि द्विजत्वे च वृत्तमेव न संशयः॥३॥३१३।१०८ [युधिष्ठिर म्हणतो. ] बा यक्षा, ऐक. द्विजत्वाला कारण कुल नव्हे, वेदपठण नव्हे, किंवा शास्त्राभ्यासहि नव्हे, तर शील हेच द्विजत्वाला कारण होय यांत संशय नाही. ९१५ शोकः कार्यविनाशनः ॥ ७/८०७
शोकाने कार्यनाश होतो. ९१६ शोककाले शुचो मा त्वं हर्षकाले च मा हषः ।
अतीतानागतं हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय ॥ १२॥२२७/६६ [ बलि इंद्राला म्हणतो. ] दुःखाच्या वेळी तूं दुःख करूं नको आणि आनंदाच्या वेळी हर्ष मानूं नको. पूर्वी होऊन गेलेले आणि पुढे होणारे यांचा विचार करीत न बसतां वर्तमानकाळाकडे नजर देऊन वाग. ९१७ शोकस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च ।
दिवसे दिवसे मूढमाविशन्ति न पण्डितम् ।। १।२।२२ . रोजच्यारोज हजारों शोक करण्याजोग्या गोष्टी आणि शेंकडों भय वाटण्याजोग्या गोष्टी मूढाला प्राप्त होत असतात, शहाण्याला प्राप्त होत नाहीत.
For Private And Personal Use Only
Page #157
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९१८ श्रद्दधानः शुभां विद्या हीनादपि समाप्नुयात् ।
सुवर्णमपि चामेध्यादाददीताविचारयन् ॥ १२॥१६५।३१ चांगली विद्या हीन मनुष्यापासून देखील श्रद्धेने ग्रहण करावी. सोनें अपवित्र पदार्थाशी मिसळले असल्यास त्यांतूनही खुशाल काढून घ्यावे. ९१९ श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः॥ ६४१॥३
मनुष्य हा श्रद्धामय आहे ज्याची जशी श्रद्धा असेल तसा तो होतो. ९२० श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ६२८१३९ इंद्रिये ताब्यात ठेवून दक्षतेने प्रयत्न करणाऱ्या श्रद्धावान् मनुष्याला ज्ञान प्राप्त होतें. ज्ञान प्राप्त झाल्यावर लवकरच त्याला परमशांतीचा लाभ होतो. ९२१ श्रिय एताः स्त्रियो नाम सत्कार्या भूतिमिच्छता ।
पालिता निगृहीता च श्रीः स्त्रीभवति भारत॥१३॥४६।१५ स्त्रिया म्हणजे खरोखर मूर्तिमंत लक्ष्मीच होत; कल्याणेच्छु पुरुषाने त्यांचा गौरव करावा. उत्तम प्रकारे पालनपोषण करून योग्य दाबांत ठेविल्याने स्त्री ही [गृह-] लक्ष्मी होते. .९२२ श्रियं ह्यविनयो हन्ति जरा रूपमिवोत्तमम् ॥ ५॥३४॥१२
वार्धक्याने जसा सुंदर रूपाचा, तसा अहंकाराने ऐश्वर्याचा नाश होतो. ९२३ श्रियो बलममात्यांश्च बलवानिह विन्दति ।
यो ह्यनाढ्यः स पतितस्तदुच्छिष्टं यदल्पकम् ॥१२॥१३४।४ ऐश्वर्य, सामर्थ्य, आणि अमात्य हे सर्व बलसंपन्न असलेल्याला प्राप्त होते. जो बलसंपन्न नसेल तो खरोखर पतित होय. अल्पशी सत्ता असणे हे केवळ उच्छिष्टच होय. ९२४ श्रीमन्तं ज्ञातिमासाद्य यो ज्ञातिरवसीदति ।
दिग्धहस्तं मृग इव स एनस्तस्य विन्दति ॥ ५॥३९।२७ विषाने माखलेला बाण हातामध्ये घेऊन मृगहत्त्या करणाराला मृगहत्त्येचे पातक लागते, त्याप्रमाणे आपल्या कुलामध्ये श्रीमंत पुरुष असतांना जे ज्ञातिजन निकृष्ट दशेस पोचतात, त्यांचे पातक त्या श्रीमान् पुरुषाला प्राप्त होते.
For Private And Personal Use Only
Page #158
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४८
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९२५ श्रीमान्स यावद्भवति तावद्भवति पूरुषः ॥ ५॥७२॥३६
कोणीहि संपत्तीने युक्त असेल तोपर्यंतच खरोखर पुरुष गणला जातो. ९२६ श्रीहता पुरुषं हन्ति पुरुषस्याधनं वधः ॥५/७२।१९
लक्ष्मीचा घात झाला असतां पुरुषाचा वध होतो. कारण, निर्धनता हा पुरुषाचा वधच होय. ९२७ श्रुतमामोति हि नरः सततं वृद्धसेवया ॥१३॥१६२१४९ ___ सतत वृद्धजनांचा समागम केल्याने मनुष्य बहुश्रुत होतो. ९२८ श्रुतं प्रज्ञानुगं यस्य प्रज्ञा चैव श्रुतानुगा। ____ असंभिन्नार्यमर्यादः पण्डिताख्यां लभेत सः ५।३३।२९
बुद्धीला अनुरूप ज्याचें अध्ययन आहे, अध्ययनाला अनुरूप ज्याचे विचार आहेत, आणि आर्य पुरुषाच्या मर्यादेचें ज्याच्या हातून उल्लंघन होत नाही त्याला पंडित ही संज्ञा प्राप्त होते. ९२९ श्रुतेन तपसा वापि
श्रिया वा विक्रमेण वा। जनान्योऽभिभवत्यन्यान्
कर्मणा हि स वै पुमान् ॥ ५॥१३३१२५ विद्ये किंवा तपाने, संपत्तीने किंवा पराक्रमाने जो इतरांवर मात करतो, तो आपल्या कर्तृत्वामुळे खरा पुरुष ठरतो. ९३० श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ६२७३५ [श्रीकृष्ण सांगतात ] आचरण्यास सोपा अशा परधर्मापेक्षा, सदोष असला तरीहि स्वधर्मच श्रेष्ठ होय. स्वधर्मात राहून मरण आले तरी बेहेत्तर. ( कारण ), परधर्माचा स्वीकार करण्यांत मोठे भय आहे. ९३१ श्रेष्ठो हि पण्डितः शत्रुर्न च मित्रमपण्डितः ॥१२।१३८।४६
शहाणा शत्रु पत्करला, पण मूर्ख मित्र नको.
For Private And Personal Use Only
Page #159
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१४९
९३२ श्रोतव्यं खलु वृद्धानामिति शास्त्रनिदर्शनम् ।
न त्वेव ह्यतिवृद्धानां पुनबाला हि ते मताः॥५॥१६८।२६ वृद्धांचे अवश्य ऐकावें असें शास्त्र सांगते; पण अतिवृद्ध झालेल्यांचे ऐकू नये. कारण त्यांची गणना पुनरपि बाल झालेल्यांतच केली पाहिजे. ९३३ श्रोत्रियस्येव ते राजन्मन्दकस्याविपश्चितः ।
अनुवाकहता बुद्धि षा तत्त्वार्थदर्शिनी ॥ १२॥१०११ [ भीमसेन धर्मराजाला म्हणतो ] एकाद्या मतिमंद मठ ब्राह्मणाची बुद्धि वेदांची अर्थशून्य घोकंपट्टी करण्याने नष्ट व्हावी तसा, राजा, तुझ्या बुद्धीला भ्रम झाला असून तिला खरे तत्त्व कळेनासे झाले आहे. ९३४ श्वःकार्यमद्य कुर्वीत पूर्वाह्ने चापराह्निकम् ।
न हि प्रतीक्षतेमृत्युः कृतं वास्य न वा कृतम्॥१२॥३२११७३ उद्यांचे कार्य आज करावें; तिसऱ्या प्रहरी करावयाचे ते सकाळी करावे. कारण मृत्यु कोणाचे काम झालें अगर न झाले हे पहात बसत नाही. ९३५ षड्दोषाः पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता ।
निद्रा तन्द्री भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता ॥ ५।३३।७८ आपलें बरे व्हावे असे इच्छिणाऱ्या पुरुषाने सहा दोष टाळावे फार झोप, सुस्ती, भय, क्रोध, आळस आणि दीर्घसूत्रीपणा. . ९३६ स एव धर्मः सोऽधर्मो देशकाले प्रतिष्ठितः। ____ आदानमनृतं हिंसा धर्मो ह्यावस्थिकः स्मृतः ॥१२॥३६।११
योग्य वेळी आणि योग्य स्थळी जो धर्म ठरतो, तोच अयोग्य वेळी आणि अयोग्य स्थळी अधर्म होतो. चौर्यकर्म, असत्यभाषण, हिंसा या सर्वाची गोष्ट अशीच आहे. धर्म हा परिस्थितीप्रमाणे ठरवावा लागतो. ९३७ संयोगा विप्रयोगान्ता जातानां प्राणिनां ध्रुवम् ।
बुबुदा इव तोयेषु भवन्ति न भवन्ति च ॥१२।२७।३० जन्माला आलेल्या प्राण्यांच्या संयोगांची अखेर वियोगांतच होत असते. पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे, ते एकसारखे उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात.
For Private And Personal Use Only
Page #160
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९३८ संवासाज्जायते स्नेहो जीवितान्तकरेष्वपि ।
अन्योन्यस्य च विश्वासःश्वपचेन शुनो यथा १२।१३९।४० आपला प्राण घेणाऱ्याशी सुद्धा सहवासाने स्नेह जडतो, आणि एकमेकांना विश्वास वाटतो. उदाहरणार्थ, कुत्र्याचे मांस खाणारा चांडाल आणि कुत्रा. ९३९ संसारयति कृत्यानि सर्वत्र विचिकित्सते ।
चिरं करोति क्षिप्रार्थे स मूढो भरतर्षभ ॥ ५३३॥३४ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) जो स्वतः करावयाची कामें दुसऱ्यांवर सोपवितो. प्रत्येक बाबतीत फाजील चिकित्सा करीत बसतो, आणि जें कार्य लवकर झाले पाहिजे त्याला दिरंगाई करतो तो मूढ होय. ९४० संहता हि महाबलाः ।। ८।३४७
संघ करून एकत्र राहिलेले लोक अत्यंत वलाढ्य होतात. ९४१ सख्यं सोदर्ययोात्रो
दम्पत्योर्वा परस्परम् । कस्यचिन्नाभिजानामि
प्रीति निष्कारणामिह ॥ १२॥१३८।१५३ सख्खे बंधु अथवा पतिपत्नी यांच्यामध्ये जो परस्पर स्नेह असतो, तोहि कारणामुळेच होय. काही तरी कारण असल्यावांचून जगांत कोणाचे कोणावर प्रेम असल्याचे पाहण्यांत नाहीं ! ९४२ संक्षेपो नीतिशास्त्राणामाविश्वासः परो मतः १२।१३८।१९७
सर्व नीतिशास्त्रांचे थोडक्यांत सार हेच की, कोणाचा विश्वास म्हणून धरूं नये. ९४३ स चेनिकृत्या युध्येत निकृत्या प्रतियोधयेत् । ___ अथ चेद्धमतो युध्येद्धर्मेणैव निवारयेत् ।। १२।९५।९ प्रतिपक्षी जर कपटाने लढेल तर आपणहि उलट कपटानेच लढावे. आणि तो जर धर्मयुद्ध करील तर आपणहि धर्मानेच लढून त्याचे निवारण करावें.
For Private And Personal Use Only
Page #161
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१५१
९४४ सत्यं स्वर्गस्य सोपानं पारावारस्य नौरिव ॥ ५।३३।४७
समुद्र तरून जाण्यास जशी नाव तसा सत्य, हा स्वर्गास जाण्याचा जिना आहे. ९४५ सत्यं दमस्तपो दानमहिंसा धर्मनित्यता ।
साधकानि सदा पुंसां न जातिन कुलं नृप ॥३॥१८११४३ (अजगर झालेला नहुषराजा युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, सत्यभाषण, इंद्रियनिग्रह, तप, दान, अहिंसा आणि नित्य धर्माचरण हीच नेहमी मनुष्यांच्या उपयोगी पडणारी आहेत. जातीचा काही उपयोग नाही, आणि कुलाचाहि नाही. ९४६ सत्यस्य वचनं श्रेयः सत्यज्ञानं तु दुष्करम् । ___ यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं ब्रवीम्यहम् ।। १२।२८७।२० [ नारद गालवाला म्हणतात ] सत्य बोलणे चांगले खरे, पण सत्याचे निभ्रांत ज्ञान होणे मोठे कठीण. ज्याच्या योगाने जीवांचे अत्यंत कल्याण होते त्यालाच सत्य म्हणतों. ९४७ सत्यस्य वदिता साधुन सत्याद्विद्यते परम् । ____ तत्त्वेनैव सुदुज्ञेयं पश्य सत्यमनुष्ठितम् ।। ८।६९।३१
[श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात | सत्य सांगेल तो साधु. सत्यापरतें श्रेष्ठ काही नाही. परंतु सत्याचे आचरण करितांना वास्तविक सत्य कोणते हे समजणेच अत्यंत कठीण आहे. ९४८ सत्येन रक्ष्यते धर्मो विद्या योगेन रक्ष्यते ।
मृजया रक्ष्यते रूपं कुलं वृत्तेन रक्ष्यते ।। ५।३४३९ सत्याने धर्माचे रक्षण होते; व्यासंगाच्या योगाने विद्या जिवंत राहते. नेहमी साफसूफ ठेविल्याने रूप टिकून राहते; आणि सदाचरणानें कुलाचे रक्षण होते. ९४९ सत्येन विधृतं सर्व सर्व सत्ये प्रतिष्ठितम् ॥१२।२५९।१०
सर्व काही सत्याच्या पायावर उभे आहे. सर्व काही सत्याच्या आधाराने राहते. ९५० सन्तः परार्थ कुर्वाणा नावेक्षन्ति परस्परम् ॥३२९७४९ परोपकार करणारे संत उलट प्रत्युपकार होण्याची कधीही वाट पहात नाहीत.
For Private And Personal Use Only
Page #162
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९५१ सन्ति पुत्राः सुबहवो दरिद्राणामनिच्छताम् ।
नास्ति पुत्र:समृद्धानांविचित्रं विधिचेष्टितम् ।।१२।२८।२४ दरिद्री लोकांना इच्छा नसतां पुष्कळ मुलगे होतात आणि कित्येक श्रीमंतांना मुलगा नसतो. दैवाची लीला विचित्र आहे. ९५२ संतोषो वै श्रियं हन्ति ह्यभिमानं च भारत ।
__अनुक्रोशभये चोभे यैठूतो नाश्नुते महत् ॥ २।४९।१४ . [ दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो ] अल्पसंतुष्ट राहिल्याने ऐश्वर्याचा व स्वाभिमानाचा नाश होतो. दया आणि भय यांचीही गोष्ट अशीच. यांचा मनुष्यावर पगडा बसला म्हणजे मोठेपणाचें नांवच घ्यावयास नको ! ९५३ संनिमजेजगदिदं गम्भीरे कालसागरे ।
जरामृत्युमहाग्राहे न कश्चिदवबुध्यते ॥ १२॥२८॥४४ ... जरामृत्युरूपी मोठमोठ्या नकांनी व्याप्त असलेल्या खोल अशा कालसागरांत हैं सर्व जग (एक दिवस ) बुडून जाईल हे कोणाच्याच लक्ष्यांत येत नाही ! ९५४ सपत्नसहिते कार्ये कृत्वा संधिं न विश्वसेत् ।
अपकामेत्ततः शीघ्रं कृतकार्यो विचक्षणः।।१२।१४०।१४ ' में कार्य केले असतां शत्रूचे आणि आपलें सारखेच हित होईल, त्या कार्यापुरता शत्रूशी समेट करावा. तथापि त्याजवर विश्वास ठेवू नये; आणि कार्य झाले म्हणजे सुज्ञ मनुष्याने लागलेच शत्रूपासून दूर व्हावें. ९५५ समत्वं योग उच्यते ॥ ६२६४८
(सुखदुःख, यशापयश इत्यादि द्वंद्वांविषयी सारखी बुद्धि ठेवणे अशा प्रकारच्या) समत्वबुद्धीला योग असे म्हणतात. ९५६ समर्थ वाऽसमर्थ वा कृशं वाप्यकृशं तथा ।
रक्षत्येव सुतं माता नान्यः पोष्टा विधानतः ॥१२२२६६।२९ समर्थ असो वा असमर्थ असो, कृश असो वा लठ्ठ असो, मुलगा कसाहि असला तरी, आईच त्याचा प्रतिपाळ करते. तसें पोषण करणारा दुसरा कोणी नाही.
For Private And Personal Use Only
Page #163
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१५३
९५७ समुच्छये यो यतते स राजन् परमो नयः॥२॥५५।११
[ दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो ] हे राजा, भाग्योदय करण्याकडे जिची प्रवृत्ति असते तीच नीति श्रेष्ठ होय. ९५८ संपन्नतरमेवानं दरिद्रा भुञ्जते सदा ।
क्षुत्स्वादुतां जनयति सा चाढ्येषु सुदुर्लभा ।।५।३४।५० दरिद्री लोक नेहमीच अतिशय मिष्टान्नभक्षण करीत असतात. कारण भुकेने तोंडाला चव येत असते. आणि तीतर श्रीमंतांना फारच दुर्लभ. ९५९ संप्रीतिभोज्यान्यन्नानि आपद्भोज्यानि वा पुनः।।५।९।२५
प्रेम असल्यास अथवा कांही आपत्ति असल्यास एकाने दुसऱ्याकडचे अन्न भक्षण करावें. ९६० संभावितस्य चाकीर्तिमरणादतिरिच्यते ॥ ६॥२६॥३४
संभावित पुरुषाची अपकीर्ति होणे मरणापेक्षा वाईट. ९६१ संभोजनं संकथनं संप्रश्नोऽथ समागमः ।
एतानि ज्ञातिकार्याणि न विरोधः कदाचन ॥ ५।६४।११ एकत्र भोजन करणे, एकत्र गप्पागोष्टी करणे, एकमेकांस प्रश्न विचारणे आणि भेट देणे या गोष्टी ज्ञातिबांधवांनी कराव्या. केव्हांहि परस्परांशी विरोध करू नये. ९६२ सर्वकालं मनुष्येण व्यवसायवता सदा।
पीडाकरममित्राणां यत्स्यात्कर्तव्यमेव तत् ॥७१४३।६८ ज्या ज्या गोष्टीमुळे शत्रूना पीडा होईल ती प्रत्येक गोष्ट मनुष्याने सर्वकाळी मुद्दाम यत्नपूर्वक केली पाहिजे. ९६३ सर्व जिलं मृत्युपदमार्जवं ब्रह्मणः पदम् ।
एतावाज्ञानविषयः किं प्रलापः करिष्यति॥१२१७९।२१ कपटाने युक्त असलेले सर्व काही मरणाला कारण होते. सरळपणांत ब्रह्मप्राप्ति आहे. जे काय जाणावयाचें तें एवढेच. जास्त बोलण्यात काय अर्थ ?
For Private And Personal Use Only
Page #164
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५४
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
९६४ सर्वतीर्थेषु वा स्नानं सर्वभूतेषु चार्जवम् ।
उभे त्वेते समे स्यातामार्जवं वा विशिष्यते ।। ५।३५।२ सर्व तीर्थात स्नान करणें आणि सर्वांशीं निष्कपटानें वागणे या दोहोंची योग्यता सारखीच. कदाचित् निष्कपटपणाच कांकणभर श्रेष्ठ ठरेल.
९६५ सर्वथा धर्ममूलोऽर्थो धर्मश्वार्थपरिग्रहः ।
इतरेतर योनीतौ विद्धि मेघोदधी यथा || ३|३३|२९
( भीम युधिष्ठिराला म्हणतात. ) अर्थ हा सर्वस्वी धर्ममूलक असून धर्म हा अर्थावर अवलंबून आहे. सारांश, मेघ व समुद्र यांप्रमाणे धर्म व अर्थ हे परस्परांवर अवलंबून आहेत.
९६६ सर्वथानार्यकमैतत्प्रशंसा स्वयमात्मनः || ५/७६।६ आपली आपण प्रशंसा करणें हें सर्वस्वी अनार्य माणसाचें काम होय.
९६७ सर्वथा संहतैरेव दुर्बलैर्बलवानपि ।
अमित्रः शक्यते हन्तुं मधुहा भ्रमरैरिव || ३|३३|७० पोळ्यांतील मध काढणाऱ्याचा मधमाशा एकजुटीनें [ तुटून पडून ] प्राण घेतात. त्याप्रमाणें सर्वांची पूर्ण एकी असेल तर दुर्बळ लोक देखील बलिष्ठ अशाहि शत्रूला ठार करूं शकतात.
९६८ सर्वभूतहितः साधुरसाधुर्निर्दयः स्मृतः || ३ | ३१३ / ९२
सर्व भूतांच्या हितासाठीं झटतो तो साधु आणि निर्दयतेनें वागतो तो असाधु (दुष्ट) होय.
९६९ सर्वभूतेषु सस्नेहो यथात्मनि तथाऽपरे ।
ईदृशः पुरुषोत्कर्षो देवि देवत्वमश्नुते || १३ | १४४|५८
( महेश्वर म्हणतात. ) हे देवि, पार्वति, जो सर्व प्राण्यांविषयीं वत्सलता धारण करतो आणि आपल्यासारखेच सर्व भूतांना मानतो, तो श्रेष्ठ पुरुष देवत्वाला पोंचतो. ९७० सर्व प्रियाभ्युपगतं धर्ममाहुर्मनीषिणः ।। १२ । २५९/२५
ज्या ज्या योगानें दुसऱ्याचें प्रिय होईल ती ती प्रत्येक गोष्ट धर्मच होय असें ज्ञाते लोक सांगतात.
For Private And Personal Use Only
Page #165
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१५५
९७१ सर्व बलवतां पथ्यं सर्व बलवतां शुचि ।
सर्व बलवतां धर्मः सर्व बलवतां स्वकम् ॥ १५।३०।२४ बलसंपन्न असलेल्यांना सर्व काही हितकर आणि सर्व काही पवित्र आहे. पाहिजे तो त्यांचा धर्म आणि सर्व काही त्यांच्या सत्तेचें! ९७२ सर्व बलवतो वशे ॥ १२।१३४।३
सर्व काही बलवानाच्या हाती असतें. ९७३ सर्वस्य जीवलोकस्य राजधर्मः परायणम् । १२।५६।३
सर्व जीवसृष्टीला राजधर्म हाच मोठा आधार आहे. ९७४ सर्वस्य हि स्वका प्रज्ञा साधुवादे प्रतिष्ठिता।।
परबुद्धिं च निन्दन्ति स्वां प्रशंसन्ति चासकृत् ॥ १०३५ ज्याला त्याला स्वतःची बुद्धि सांगते, ते योग्य, असे ठाम वाटते. सर्वजण दुसऱ्याच्या बुद्धीची निंदा करितात, आणि स्वतःच्या बुद्धीची वारंवार प्रशंसा करितात. ९७५ सर्वस्वमपि संत्यज्य कार्यमात्महितं नरैः॥१२॥१३९।८४
सर्वस्वाचा त्याग करून सुद्धां मनुष्यांनी आत्मकल्याण साधावें. ९७६ सवः सर्व न जानाति सवज्ञो नास्ति कश्चन ।
नैकत्र परिनिष्ठास्ति ज्ञानस्य पुरुषे कचित् ॥ ३।७२।८ सर्वांनाच सर्व गोष्टींचे ज्ञान नसते. सर्वज्ञ असा कोणीच नाही. कोणाहि एकाच मनुष्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान एकवटलेले नाही. ९७७ सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ताः
सर्वे लोका राजधर्मे प्रविष्टाः ॥ १२॥६३।२९ सर्व विद्यांचा राजधर्माशी संबंध आहे. आणि सर्व प्रकारचे लोकव्यवहार राजधर्माशी निगडित झालेले आहेत. ९७८ सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रया,
संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं हि जीवितम् ॥१२२७॥३१ सर्व प्रकारच्या संचयांचा शेवट क्षयांत होत असतो, चढण्याची अखेर पडण्यांत होते, संयोगांचे पर्यवसान वियोगांत आणि जीविताचा अंत मरणांत होत असतो.
For Private And Personal Use Only
Page #166
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५६ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ९७९ सर्वेण खलु मर्तव्यं मर्त्यलोके प्रसूयता।
कृतान्तविहिते मार्गे मृतं को जीवयिष्यति।।१२।१५३११३ मृत्युलोकांत जन्मास येणाऱ्या प्रत्येकाला खचित मरावयाचे आहे, हा मार्ग कृतांतानें [ यमाने ] ठरविला असल्यामुळे मेलेल्याला जिवंत कोण करणार ? ९८० सर्वे धर्मा राजधर्मप्रधानाः ॥१२॥६३।२७
सर्व धर्मांमध्ये राजधर्म हा अग्रगण्य आहे. ९८१ सर्वे लाभाःसाभिमाना इति सत्यवती श्रुतिः।१२।१८०१० ___ सर्व प्रकारच्या लाभाच्या मुळाशी अहंकारबुद्धि असते, अशी श्रुति आहे ती यथार्थ आहे. ९८२ सर्वेषां कृतवैराणामविश्वासः सुखोदयः॥१२॥१३९।२८
आपणांशी वैर करणाऱ्या कोणाचाहि विश्वास न धरल्याने सुख होते. ९८३ सर्वो दण्डजितो लोको दुर्लभो हि शुचिर्जनः ।
दण्डस्य हि भयाद्भीतो भोगायैव प्रवर्तते ॥१२॥१५॥३४ सर्व लोक दंडाच्या योगाने वठणीवर येतात. स्वभावतःच शुचिर्भूत असलेला मनुष्य विरळा. खरोखर, दंडाच्या भयानेच कोणी झाला तरी, आपलें ठरलेले काम करीत असतो. ९८४ सर्वोपायैरुपायज्ञो दीनमात्मानमुद्धरेत् ॥ १२॥१४१।१००
चतुर पुरुषानें हरप्रयत्न करून हीन स्थितीतून आपला उद्धार करावा. ९८५ सर्वो विमृशते जन्तुः कृच्छ्रस्थो धर्मदर्शनम् ।
पदस्थः पिहितं द्वारं परलोकस्य पश्यति ॥ ९॥३२॥५९ कोणीहि मनुष्य संकटांत सांपडला, म्हणजे मग धर्मशास्त्राचा विचार करू लागतो. उच्चस्थितीत असतांना त्याला स्वर्गाचे द्वार बंद असलेलेच दिसते. ९८६ सर्वो हि मन्यते लोक आत्मानं बुद्धिमत्तरम् ॥१०।३।४ प्रत्येक मनुष्य स्वतःला अधिक शहाणा समजतो.
For Private And Personal Use Only
Page #167
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९८७ सर्वो हि लोको नृपधर्ममूलः || १२|१२०।५६
सर्व लोकांना राजधर्म हा आधारभूत आहे.
९८८ सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् । सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः || ६ |४२।४८
[ श्रीकृष्ण सांगतात. ] अर्जुना, स्वभावतः प्राप्त झालेलें कर्म सदोष असलें तरी, त्याचा त्याग करूं नये, कारण, अग्नि जसा धुरानें वेष्टिलेला असतो, तसा प्रत्येक कर्मात कांहींना काही दोष हा असतोच.
९८९ सहस्रशक्तिश्च शतं शतशक्तिर्दशापि च ।
दद्यादपश्च यः शक्त्या सर्वे तुल्यफलाः स्मृताः १४/९० १९७ ज्याच्याजवळ एक हजार रुपये आहेत त्यानें शंभर दिले, किंवा ज्याच्यापाशीं शंभर आहेत त्यानें दहा दिले आणि ज्याच्यापाशीं कपर्दिकहि नाहीं त्यानें यथाशक्ति नुसतें ओंजळभर पाणी दिलें, तर या तिघांस सारखेंच फळ मिळतें. ९९० सहायबन्धना ह्यर्थाः सहायाश्चार्थबन्धनाः ।
अन्योन्यबन्धनावेतौ विनान्योन्यं न सिध्यतः || ५|३७|३८
द्रव्य साहाय्यकर्त्यांवर अवलंबून असून साहाय्यकर्ते द्रव्यावर अवलंबून असतात. सारांश, परस्परांवर अवलंबून असलेल्या या दोन गोष्टी परस्परांवांचून सिद्ध होत नाहींत.
१५७
९९१ साङ्गोपाङ्गानपि यदि यश्च वेदानधीयते ।
वेदवेद्यं न जानीते वेदभारवहो हि सः ।। १२ । ३१८/५० सर्व अंगें आणि उपांगें यांसहित चारहि वेदांचें ज्यानें अध्ययन केलें, परंतु वेदांनीं जाणावयाचें जें परमात्मतत्त्व तें ज्याने जाणलें नाहीं, तो केवळ वेदग्रंथाचा भार वाहणारा होय.
९९२ सा भार्या या प्रियं ब्रूते स पुत्रो यत्र निर्वृतिः ।
तन्मित्रं यत्र विश्वासः स देशो यत्र जीव्यते ॥ १२।१३९/९६
जी प्रिय भाषण करते तीच भार्या, जो सुखाला कारण होतो तोच पुत्र, ज्याच्यावर विश्वास ठेवितां येतो तोच मित्र, आणि ज्या ठिकाणी उपजीविका होते तोच देश.
For Private And Personal Use Only
Page #168
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५८
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
९९३ साम्याद्धि सख्यं भवति वैषम्यान्नोपपद्यते ॥ १।१३१।६७ कांहींतरी सारखेपणा असेल तेव्हां सख्य होते; विषमता असेल तर ते शक्य नाहीं. ९९४ सायं प्रातर्मनुष्याणामशनं वेदनिर्मितम् ।
नान्तरा भोजनं दृष्टमुपवासी तथा भवेत् || १२।१९३।१०
मनुष्यांनी सकाळ संध्याकाळ भोजन करावें, असा नियम वेदाने घालून दिलेला आहे. मध्यंतरीं कांहीं खाऊं नये, अशा रीतीनें जो राहतो तो उपवासीच असतो. ९९५ साहसोत्पतितानां च निराशानां च जीविते ।
न शक्यमग्रतः स्थातुं शक्रेणापि धनंजय || ९ |५८/१६
( श्रीकृष्ण म्हणतात ) हे अर्जुना, जिवावर उदार होऊन साहसाने हल्ला करणाऱ्यांच्या पुढे उभे राहण्याची इंद्राची सुद्धां प्राज्ञा नाहीं.
९९६ सिंहस्य सततं पार्श्वे सिंह एवानुगो भवेत् ।
असिंहः सिंहसहितः सिंहवल्लभते फलम् || १२|११९।११ यस्तु सिंहः श्वभिः कीर्णः सिंहकर्मफले रतः ।
न स सिंहफलं भोक्तुं शक्तः श्वभिरुपासितः ।। १२।११९/१२
सदोदित सिंहाच्या संनिध असणारा त्याचा अनुचर सिंहच बनतो. सिंह ज्याच्या बरोबर आहे तो स्वतः सिंह नसला तरी त्याला सिंहाप्रमाणेच फल मिळतें, परंतु जो स्वतः सिंह असूनही कुत्र्यांच्या जमावांत राहतो आणि सिंहाप्रमाणे कर्मफल मिळण्याची इच्छा करतो, त्याला कुत्र्यांच्या सहवासांत असेपर्यंत तसें फळ मिळणें शक्य नाहीं.
९९७ सुखं वा यदि वा दुःखं प्रियं वा यदि वाऽप्रियम् ।
प्राप्तं प्राप्तमुपासीत हृदयेनापराजितः || १२|२५|२६
सुख असो किंवा दुःख असो, प्रिय असो अथवा अप्रिय असो जें जें म्हणून " प्राप्त होईल त्याचा, मनांतून नाउमेद न होतां स्वीकार करावा.
"
For Private And Personal Use Only
Page #169
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
९९८ सुखं सुखेनेह न जातु लभ्यं । दुःखेन साध्वी लभते सुखानि ||३| २३४ | ४
[ द्रौपदी सत्यभामेस सांगते ] इहलोकीं सुखासुखीं सुख लाभणें कधींच शक्य नाहीं. दुःख सोसल्यानेंच साध्वीला सुखप्राप्ति होत असते.
९९९ सुखं च दुःखं च भवाभवौ च । लाभालाभौ मरणं जीवितं च । पर्यायशः सर्वमेते स्पृशन्ति
तस्माद्धीरो न च हृष्येन्न शोचेत् || ५ | ३६ |४७
सुख आणि
दुःख, उत्कर्ष आणि -हास, फायदा आणि तोटा, उत्पत्ति आणि लय ह्रीं क्रमाक्रमानें सर्वानाच प्राप्त होत असतात. म्हणून शहाण्यानें त्याविषयीं हर्षहि मानूं - नये आणि शोक पण करूं नये.
१००९ सुखं दुःखान्तमालस्यं
१५९
दाक्ष्यं दुःखं सुखोदयम् || १२|२७|३२
आळसांत [ प्रारंभीं ] सुख वाटतें पण त्याचा शेवट दुःखांत होतो. तत्परतेनें उद्योग करण्यांत [ प्रथम ] दुःख वाटलें तरी त्यापासून परिणाम सुख होतें.
१००१ सुखं निराशः स्वपिति नैराश्यं परमं सुखम् ।। १२/१७४|६२
ज्यानें आशा सोडली त्याला सुखाने झोप येते. निराशेसारखें सुख नाहीं.
१००२ सुखमेव हि दुःखान्तं कदाचिद्दुःखतः सुखम् ।
तस्मादेतद्वयं जह्याद्य इच्छेच्छाश्वतं सुखम् ||१२|२५/२४
सुखाचा अंत दुःखांतच होतो. उलट केव्हां केव्हां दुःखांतून सुखाचा उदय होतो. म्हणून ज्याला शाश्वत सुख हवे असेल त्याने या दोहोंचाहि त्याग करावा.
For Private And Personal Use Only
Page #170
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
marwammmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm १००३ सुखं मोक्षसुखं लोके न च मूढोऽवगच्छति ।
प्रसक्तः पुत्रपशुषु धनधान्यसमाकुलः ॥ १२॥२८८५ ___ खरे सुख म्हणजे मोक्षसुख. परंतु मूढ मनुष्याला हे समजत नाही. तो जगांत पुत्र, पश्वादि संपत्ति यांतच गुंतून राहतो आणि धन, धान्य इत्यादिकांतच गढून गेलेला असतो. १००४ सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तरं सुखम् ।
पर्यायेणोपसर्पन्ते नरं नेमिमरा इव ॥ ३॥२६१।४९ चाकाच्या धावेमध्ये एकामागून एक अरे येत असतात त्याप्रमाणे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख आळीपाळीनें मनुष्यांना प्राप्त होत असते. १००५ सुखाद्बहुतरं दुःखं जीविते नास्ति संशयः।
स्निग्धस्य चेन्द्रियार्थेषु मोहान्मरणमप्रियम्॥१२।२०५।६ आयुष्यात सुखापेक्षा दुःखच पुष्कळ अधिक आहे यांत संशय नाही. परंतु मोहाने इंद्रियांच्या विषयाच्या ठिकाणी आसक्त होऊन राहिल्यामुळे मनुष्याला मरण अप्रिय वाटते. १००६ सुखार्थिनः कुतो विद्या
नास्ति विद्यार्थिनः सुखम् ।।५।४०१७ सुखच्छु पुरुषाला विद्या कोठून प्राप्त होणार ? आणि विद्यची इच्छा करणाऱ्याला सुख कोठून मिळणार ? १००७ सुतेषु राजन्सर्वेषु हीनेष्वभ्याधिका कृपा ॥३।९।१९
[व्यासमुनि धृतराष्ट्राला म्हणतात ] हे राजा, सर्व मुलांत जे गुणहीन असतील त्यांची ( आईबापांना ) काळजी अधिक. १००८ सुपूरा वै कुनदिका सुपूरो मुषिकाञ्जलिः ।
सुसन्तोषःकापुरुषः स्वल्पकेनैव तुष्यति ॥ ५।१३३।९ - लहानसा ओढा पाण्याने तेव्हांच भरून जातो. उंदराची ओंजळ सहज भरते. स्याचप्रमाणे क्षुद्र मनुष्यहि सहज संतुष्ट होत असून त्याचे थोडक्यानेच समाधान होते.
For Private And Personal Use Only
Page #171
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१००९ सुप्रज्ञमपि चेच्छ्ररमृद्धिर्मोहयते नरम् || ३ | १८१।३०
तीव्र बुद्धीच्या शूर पुरुषाला देखील ऐश्वर्याचा मोह पडत असतो.
१०१० सुप्रणीतो बलाघो हि कुरुते कार्यमुत्तमम् ।
अन्धं बलं जडं प्राहुः प्रणेतव्यं विचक्षणैः ॥२/२०१६
शक्तीचा ओघ कुशलतेने वळविला म्हणजे त्याच्याकडून उत्तम प्रकारचें कार्य होतें. बळ हे अंधळें असून जड ( म्हणजे अचेतन ) आहे. त्याचा शहाण्या में [ इष्टकार्याकडे ] उपयोग करून घेतला पाहिजे.
१०११ सुप्राकृतोऽपि पुरुषः सर्वः स्त्रीजनसंसदि ।
स्तौति गर्वायते चापि स्वमात्मानं न संशयः ।। १२।२८४।२७
कोणीहि अगदी सामान्य प्रतीचा सुद्धां पुरुष स्त्रीजनांच्या समुदायांत आपली आपणच स्तुति करून प्रौढी मिरवतो यांत संशय नाहीं.
१०१२ सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबन्धः श्लथायते ।। १।२२१।१७
[ अर्जुन सुभद्राविवाहानंतर आपल्या नव्या सवतीला उद्देशून द्रौपदी अर्जुनाला म्हणते. ] ओझें एकदां घट्ट बांधले असलें, तथापि त्यास जर पुनः दुसरी दोरी बांधिली, तर पहिली दोरी सैल पडावयाचीच !
१०१३ सुमन्त्रिते सुविक्रान्ते सुकृते सुविचारिते ।
सिध्यन्त्यर्था महाबाहो दैवं चात्र प्रदक्षिणम् || ३ | ३६।७
[ युधिष्ठिर भीमसेनाला म्हणतो ] हे महाबाहो, चांगल्या तऱ्हेची सल्लामसलत, चांगल्या तऱ्हेचा पराक्रम, चांगल्या तऱ्हेचा विचार आणि चांगल्या तऱ्हेचें कर्तृत्व यांच्या योगानें मनोरथ सिद्धीस जातात; परंतु या ठिकाणीं दैवाचीहि अनुकूलता असावी लागते.
म. भा. ११
For Private And Personal Use Only
Page #172
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१६२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१०१४ सुलभाः पुरुषा राजन्सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः।।५।३७११५ [विदुर धृतराष्ट्राला म्हणतो.] हे राजा, सतत प्रिय भाषण करणारे पुष्कळ आढळतात; परंतु अप्रिय असले तरी हितकर असेल तेंच सांगणारा विरळा, आणि ऐकणारा त्याहूनहि विरळा. १०१५ सूक्ष्मा गतिर्हि धर्मस्य दुर्जेया ह्यकृतात्मभिः १३।१०।६८
धर्माचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून मनोजय ज्यांनी केलेला नाही त्यांस तें समजणे कठिण. १०१६ सेनापतौ यशो गन्ता न तु योधान्कथंचन।।५।१६८।२८
यशाचे श्रेय नेहमीं सेनापतीला मिळणार, सैनिकांना कधीच नाही. १०१७ सोपानभूतं स्वर्गस्य मानुष्यं प्राप्य दुर्लभम् ।
तथात्मानं समादध्याद्मश्यते न पुनर्यथा।।१२।३२११८० स्वर्गास जाण्याचा [ जणूं ] जिनाच अशा मनुष्यजन्माला येऊन परमात्म्याकडे असें ध्यान लावावे की, जेणेकरून स्थानभ्रष्ट होण्याचा प्रसंग पुनश्च येणार नाही. १०१८ सौहदान्यपि जीर्यन्ते कालेन परिजीयतः ॥ १।१३११६
कालांतराने मनुष्य जीर्ण होतो तसा स्नेह सुद्धा कमी होत असतो. १०१९ स्थापयेदेव मर्यादा जनचित्तप्रसादिनीम् ।
__ अल्पेऽप्यर्थे च मर्यादा लोके भवति पूजिता १२।१३३३१३ लोकांची अंतःकरणे प्रसन्न राहतील अशाच प्रकारचे नियम केले पाहिजेत. लहानसहान गोष्टींतसुद्धां नियम असलेला लोकांना मान्य होतो.
For Private And Personal Use Only
Page #173
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
-
V
i
s..
.....
.
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि १०२० स्तेयं कुर्वश्च गुर्वर्थमापत्सु न निषिध्यते ।
बहुशः कामकारेण न चेयः संप्रवर्तते ॥ १२॥३४।२३ आपत्कालीं गुरुदक्षिणा देण्यासाठी चोरी करणे हे निषिद्ध नाही. मात्र मनुष्याने बुद्धिपूर्वक अनेकवार तसे करण्यास प्रवृत्त होऊ नये. १०२१ स्त्रियो यत्र च पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः॥१३॥४६॥५
जेथें स्त्रियांचा गौरव होतो तेथें देवता रममाण होतात. १०२२ स्वबाहुबलमाश्रित्य योभ्युज्जीवति मानवः ।
स लोके लभते कीर्ति परत्र च शुभां गतिम् ॥ ५।१३३।४५ __ आपल्या बाहुबळाचा आश्रय करून जो मनुष्य आत्मोद्धार करून घेतो, त्याची इहलोकी कीर्ति होऊन त्याला परलोकी उत्तम गति मिळते. १०२३ स्वभावनियतं कर्म कुर्वन्नामोति किल्बिषम् ॥६॥४२॥१७ __ स्वभावतः ठरलेलें कर्म करण्यांत पाप लागत नाही. १०२४ स्वमांसं परमांसेन यो वर्धयितुमिच्छति । ।
नास्ति क्षुद्रतरस्तस्मात्स नृशंसतरो नरः।।१३।११६।११ दुसऱ्याचे मांस भक्षण करून आपलें मांस वाढविण्याची जो इच्छा करतो, त्याच्यासारखा नीच कोणी नाही. तो मनुष्य अत्यंत दुष्ट होय. १०२५ स्वयमुत्पद्यते जन्तुः स्वयमेव विवर्धते ।
सुखदुःखे तथा मृत्युंस्वयमेवाधिगच्छति॥१२।२८८।१६ प्राणी स्वतःच जन्म घेतो, स्वतःच वाढतो. तसेंच सुखदुःखें आणि मृत्यु त्याला स्वतःलाच प्राप्त होत असतात. १०२६ स्वयं प्राप्ते परिभवो भवतीति विनिश्चयः॥ १३॥८२।१४
[ दुसऱ्याने न बोलावितां ] आपण होऊन जर कोणी दुसऱ्याकडे गेले तर त्याचा अपमान होतो, हे अगदी निश्चित होय.
For Private And Personal Use Only
Page #174
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१०२७ स्ववीर्य यः समाश्रित्य समाह्वयति वै परान् ।
अभीतो युध्यते शत्रून् स वै पुरुष उच्यते ॥५।१६३३३ स्वतःच्या सामर्थ्याचा आश्रय करून जो शāना युद्धाला आव्हान करतो आणि न भितां लढतो तोच खरा पुरुष म्हणावयाचा. १०२८ स्वार्थे सर्वे विमुह्यन्ति येऽपि धर्मविदो जनाः ॥ ४॥५१॥४
स्वार्थाचा मोह सर्वांना-जे धर्म जाणणारे त्यांनासुद्धां-पडत असतो. १०२९ स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः॥६॥४२।४५
आपआपले कर्तव्य आनंदाने करीत राहिल्याने मनुष्यास परमसिद्धि प्राप्त होते. १०३० हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ६।२६।३७ [ श्रीकृष्ण सांगतात ] अर्जुना, तुला जर युद्धात मरण आले तर स्वर्ग मिळेल, आणि तुझा जय झाला तर साऱ्या पृथ्वीचें राज्य तूं भोगशील. यासाठी, हे कुंतीपुत्रा, युद्धाचा निश्चय करून ऊ. १०३१ हर्षो योधगणस्यैको जयलक्षणमुच्यते ॥ ६।३।७५
सर्व सैनिकांना लढण्याचा हुरूप वाटणे हेच जय मिळण्याचे मुख्य लक्षण होय. १०३२ हितं यत्सर्वभूतानामात्मनश्च सुखावहम् ।
तत्कुयोदीश्वरे ह्येतन्मूलं सवाथसिद्धये ॥ ५॥३७४० सर्व भूतांना जें हितकर आणि स्वतःलाहि सुखावह तेच ईश्वरार्पणबुद्धीने करीत असावें. कारण, हेच सर्व गोष्टी सिद्धीस जाण्याचे मूळ आहे.
--
For Private And Personal Use Only
Page #175
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
विषयसूची
विषयः
क्रमाङ्कः अज्ञानम् १२ । २१२ अद्रोहः २३ । २४ । ६४ । ३६० अधनः २५-२८ । ३८४ । ३९० । ३९१ । ४४६ ।
५१७ । ५७२ । ९२६ ( दरिद्रः) अधर्मः ३० । ३१ । ३९३।४०४ । ५१८ । ५१९ । ७१२।
७४६ । ८१४ । ९३६ अनर्थः ४८८ । ५०९ । ६९३ अनार्यः ३९ । ३३२ । ८०४ । ९६६ अनिर्वेदः ४३ । ४४ (उत्साहः) अनृतम् ५० । ५४४ । ५८६ । ७१२ । ८६८ । ९३६ अन्नम् ३२६ । ६२२ । ९५९ अपण्डितः ८७३ ( मूढः मूर्खः ) अभिमानः २३५ । ३३२ । ५३३ अमर्षः ७६ । ११३ । २२१ । ३०२ । ५२७
For Private And Personal Use Only
Page #176
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१६६
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
अमित्रः ७७ । ७८ । ७९ । ८५१ । ९६२ । ९६७ ( अरिः परिपन्थी रिपुः शत्रुः सपत्नः )
अराजकम् ८५ । ६२७
अरि: ८६ । १०१ । १६३ । ५६४ | ५९७ । ६०४ । ८१६ ( अमित्रः परिपन्थी रिपुः शत्रुः सपत्नः )
अर्थः २८ । ३८ । ८७-९८ । ३७४ । ४०१ । ४०६ ४११-- ४१४ । ४५८ | ४७१ | ५०४ । ५२१ । ५५३ ७०४ । ७८१ । ७९९ । ८५८ । ९९० । ९९० अवमानः ४६ । ६९ । ८० । ३१६ । ३८९ । ४५१ । ४९८ ५९२ । ७४५
अविश्वासः १०४ । २१६ | ८४६ | ९४२ । ९८२
अश्रद्धा १० । ११४
असंतोषः १२४
असाधुः १२९ । ९६८
अहिंसा १३५ - - १३९ | ४८७ | ७२७
आचारः १४३ | ४०७ | ७५८ । ७५९
आततायी ३४२ । ५१९
आत्मा १४४ - १५४ । १९३ | ३९२ । ४५१ | ५०१ . ५९० | ५९२ । ६१६ | ६५६ | ६८२ । ७८९।८१२
For Private And Personal Use Only
Page #177
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
आपद् १५९-१६१ । ४९० । ५२५ आयुः ३७ । ७३ । १४३ । ३४७ । ४९७ आरोग्यम् ३९४ । ६७० आर्यः १६४ । ८४१ । ८८१ । ९२८ आलस्यम् १६५। ९३५ । १००० आशा १६६ । १६७ । ३३२ । ६०९ (इच्छा तष्णा) आश्चर्यम् १३४ । १६९ इच्छा ५४७ ( आशा तृष्णा) इन्द्रियम् ९३ । १७५-१७९ । २१८ । २४२ । ३९२ ।
५२० । ५६९ । ६१६ । ६७५ । ७४७ । ८२१ ।
९१० । ९२० ईश्वरः १८४ । १०३२ उत्थानम् १८६-१८८ । ५०३
( उद्यमः पुरुषकारः यत्नः व्यवसायः) उत्साहः १९१ ( अनिर्वेदः) उद्यमः १९४ ( उत्थानम् पुरुषकारः यत्नः व्यवसायः) ऐश्वर्यम् ९३ । २२३ ओजः ६५२ । ७८२
For Private And Personal Use Only
Page #178
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१६८
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
कर्म ६ । ६० । ७२ । १०७ । १८० । २२४ । २३७ । २३८ ।
२६७ । ४८६ । ५३० १७०८ १७१७।७१९।७२२॥
७३५। ७४१ । ७४९।८००1८०९।८९८ । ९०९ कामः २४२ । २४४ । ३३२ । ३५९ । ४०१ । ४०३ ।
४११-४१४ । ४४० । ४५८ । ४६२ । ५०४ ।
६४८ । ७०५ । ७९९ । ८१०। ८९० काल:-१। ८१ । १३२ । २४९-२६२ । ३७८।३८१
४२६ । ४३१ । ४६५ । ४७९ । ५०६ । ५१३ । ५१६ । ५८३ । ६२१ । ६२३ । ६८९ । ६९९ ।
७३३ । ८११ । ८५१ । ८६९ । ८८४ । ९५३ कीर्तिः ७३ । २६८ । २६९ । ५१०। ६६५ । ७९३ कृतघ्नः २७० । २८६ । ६४७ कृतज्ञः २२० । २७५ कृपा ७८ । ६१८ । १००७ (दया) कोशः २५ । ७० । ४३४ क्रोधः ३५९ । ४७४ । ४७९ । ६१५। ७८५ । ८९०।९३५ क्लीवः १९२ । २१३ । २८७ । ४५२ । ५३३ । ५५७
( नपुंसकम् षण्डः)
For Private And Personal Use Only
Page #179
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
क्षत्रियः २९ । २९०-२९७ । ३०३ । ३६२ । ४२१ ।
४६० । ४६८ । ६३० । ६३१ । ६३२ । ६४३ । ६४४ । ६४६ । ८११ । ८१९ । ८२० । ८४४ ।
८५५ । ८५८ । ८७७ क्षमा २०७ । २९८-३०२। ४७५ । ६७८ । ७८५ गुरुः ३१३-३१७ । ३६१ । ५९५ । ८९७ गृहस्थाश्रमः १७० । ३१९ । ७२३ । ७२८ गृहिणी ४३५ ( दयिता नारी पत्नी भार्या स्त्री) जननी ५९३ ( माता) जयः ६६२ । ७०७ । ७१३ । ७५० । ८६० । १०३१ जरा ३३१ । ३३२ । ४२८ । ६८२ । ८५२ जीवितम् २५८ । २८३ । ३३९ । ३८८ । ३९० । ४८७ ।
५१३ । ६३६ । ७३० । ७६३ । ७७४ । ७९३ ।
८०० । ८८९ । ९०२ । ९७८ । ९९५ । १००५ ज्ञातिः ५९ । ३४० । ४२४ । ७४४ । ८५९ । ९२४ । ९६१ ज्ञानम् ६३ । १२८ । १४२ । २१८ । ३१५। ३४१।३४५।
४८५ । ५२३ । ८८२ । ९२० । ९६३ । ९७६
(विद्या) तपः १७९ । ३४६-३५१ । ३७४ । ३७६।३८८१ ५२० ।
५२४ । ५४२ । ६४८ । ६४९ । ६७५ । ७५५ ।
८१७। ८६२ । ८८२ | ९२९ तुष्टिः ३९४ ( संतोषः)
For Private And Personal Use Only
Page #180
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१७०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
तृप्तिः ४४९ तृष्णा ३३८ । ४४९ । ७०५ । ७८७ ( आशा इच्छा ) तेजः ४७५ । ७६० । ८११ । ८१९ दक्षः ६६५ । ८८९. दण्डः ९८ । ३६२-३६६ । ४६६ । ५५२।६३० १७६८ ॥
८२६ । ८७६ । ९८३ दया ३६८ । ४८९ ( कृपा ) दयिता ८७८ ( गृहिणी नारी पत्नी भार्या स्त्री) दरिद्रः ७४ । १८३ । ३८३ । ४५२ । ६२५ । ६९६ ।
९५८ ( अधनः) दाक्ष्यम् ३७० । ३९४ । ४२६ । ५५३ । १००० दानम् २३ । ३५ । २३१ । ३६०।३६७ । ३७०--३७४।
३८१ । ३८८ । ५८३ । ५८६ । ६५२ । ७११ ।
७२१ । ७७४ । ८९१ । ९०७ । ९१२ दुःखम् ५१ । ११२ । १४४ । ३८९ । ४४३ । ४५९ ।
५१३ । ५२१ । ५३२ । ५४२ । ६०५। ६१६ । ६६९ । ६७६ । ६८२ । ६९३ । ७५१ । ७५७ ॥
७६२ । ८०८ । ९०९ / ९९९ । १००४।१००५ दुर्जनः १८ । ५६
For Private And Personal Use Only
Page #181
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
दुर्बल: ४८७ । ८२६ । ८४६ । ८८४ । ८९२
देश: ३७८ | ४२६ । ५१६ । ९३६ । ९९२
देहः ६४८ | ७२० ( शरीरम् )
दैवम् ३ । ११८ । १३० | १९२ । ३०६ | ४८६ । ५०३ । ७१० । ७२५ । ८७४ । १०१३
१७१
द्विजः ६३१ । ६३२ । ८१७ | ९१४ ( ब्राह्मणः विप्रः ) धनम् २५ । १६० । १८३ | ३६७ । ३८३ । ३८८--३९४। ३९८ । ४०३ । ४२६ । ४६१ । ४६४ । ५१७ । ५३२ | ५८६ | ६३१ । ६७१ | ७५० । ७९९ । ८२७ । ८६२ | ८६३ | ८६८ । ८८१ । ९०२ ( वित्तम् श्रीः ) धर्म: ६ । १५ । २१ । २४ । ३० । ३१ । ५८ । ६८ । ८९ । १३५ । १३७ । १३९ । १४३ । १५८ । १७२ । १९९ । २०३ । २४७ । २८३ । ३२९ । ३५३ । ३६५ । ३७० । ३९० । ३९१ । ३९२ । ३९५–४२२। ४२५ । ४४५ । ४५५ । ४५७ । ४५८ । ४७१ । ४८० । ४८१ । ५०४ । ५०७ । ५१७ । ५४० | ५५५ | ५६४ । ५७९ । ६११ । ६३४ । ६४५ | ६६२ । ६७५ । ७०७ । ७११ । ७१२ । ७१६ | ७२१ । ७३० । ७३१ । ७३५ । ७३८ । ७४६ | ७४८ | ७६९ । ७७१ । ७७५ | ७८२ ।
For Private And Personal Use Only
Page #182
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२७२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७९९ । ८०७ । ८१० । ८२४ । ८२९ । ८३३ । ८३८ । ८४४ । ८४९ । ९००। ९०११ ९१० ।
९३० । ९३६ । ९४३ । ९४८ । ९६५ । १०१५ धृतिः ४२६ । ६६५। ६७० नगरम् ८८२ । ८८७ नपुंसकम् ८७७ ( क्लीवः षण्डः) नयः ६०९। ६४१ । ९५७ ( नीतिः) नरकः १७८ । ३५९ । ४३९ । ५९८ (निरयः) नारी १०३ । ५७३ । ५८४ (गृहिणी दयिता पत्नी भायो स्त्री) निन्दा २७४ । ६१९ । ६२४ निरयः ४ । ९०८ ( नरकः) निर्मन्युः ४६० । ५५७ नीतिः ३६३ । ४९० । ७१३ ( नयः) पण्डितः ८६ । ८७।२२८ । ३०४ । ३८६।३९९ ५२५॥
५६० । ५६११५६४।५७० १५७१।६१२।६१४। ६३७ । ७७३ । ७७५। ७७७। ७८१।८५४९१७।
९२८ । ९३१ पतिः ५७३ । ५८१ । ६५३ ( भता ) पतितः ५७२ । ५९१ । ८०४ । ९२३
For Private And Personal Use Only
Page #183
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
पत्नी ६५३ ( गृहिणी दयिता नारी भार्या स्त्री) परधर्मः ९३० परिपन्थी १५५ ( अमित्रः अरिः रिपुः शत्रुः सपत्नः) पापम् १२५।२०८।४४७१५१२ । ५४८ । ५८५।५८६।
६२७ । ६६३ । ६९७ । ७४९ । ८१२ । ८४३ ।
९०६ । ९०९ पिता ६१ । ५८७ । ५८८ । ५९१ । ५९५। ६८२ पुत्रः १४८ । ५८७।५८८ । ५९०।५९११५९३-५९६।
५९८ । ६०७ । ६८२ । ७४९ । ८७० । ९९२. पुमान् २८४ । ३०२ । ७७९ । ७८१ । ९२९ (पुरुषः) पुरुषः ११३ । २२० । २२१ । २८० । २८८।५२७।५७५।
६१०। ७८५ । ९२५ । १०२७ (पुमान् ) पुरुषकारः ३०६ । ७२५ ( उत्थानम् उद्यमः यत्नःव्यवसायः) पौरुषम् १४६ । १९४ । ७४१ । ८७४ प्रजा ५१० । ६५६ । ७५९ । ८२३ । ८२४ । ८३१ प्रज्ञा ५३२।५६९।५९९।६०५।६०६।७४७१७७६।९२८ प्राज्ञः ४६४ । ४९० । ६२० । ६२१ । ७१४ प्राणः ९२ । २०० । ३३२ । ४८९ । ६२२ । ७८७।७९७।
८६५। ८६८
For Private And Personal Use Only
Page #184
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
१७४
प्रार्थना १९० । ६२६ ( याचना )
प्रियम् २४६ । ३८६ । ४८९ । ५०१ । ५०८ । ५९१ । ६१८ । ६८५ । ७५७ । ७८० । १०१४
प्रीति: ६६० । ७६१ | ८५८ । ९४१
फलम् ४४ । २३७ । २३८ । २८१ । ५८० | ५८३ | ६३८ । ७२६ । ७४९ । ७८८ । ८०२ । ९०३ । ९९६ बन्धः १४२ । ३७९
बन्धुः १९३ | ४१८ | ५४० | ५६३ । ५७३ । ७०३ । ९०२ ( बान्धवः )
बलम् १५ | २५ | ७० | ७३ | २९७ | ३९२ । ४०८ । ४२५ । ४३१ । ४८७ । ६३० – ६३६ । ६८० । ६८९ । ७८२ । ७९७ । ८२६ । ८४६ | ८४९ । ८८४ । ८९२ । ९२३ । ९७१ । ९७२ । १०१०
बान्धवः ५८१ । ६८२ । ७०८ । ७८१ ( बन्धुः ) बाल: ९४ । ६०५ | ६१३ । ६३८ । ७१५ । ७८६ । ९३२ बुद्धिः २०५ । २१४ । ४१७ । ४२६ । ४३० । ४५४ । ४६४ ।
४६५ । ४९० । ५०९ | ५५३ | ५७१ । ५९९ । ६०९ । ६३९ – ६४१ । ७७२ । ७७७ | ७९६ । ७९७ । ८०६ । ८२१ । ८५० । ८८३ । ८८५ । ८९९ । ९३३ । ९८६ ( मतिः )
For Private And Personal Use Only
Page #185
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
१७५
ब्रह्म ३८७ । ७४८ । ९६३ ब्रह्मचर्यम् ३८८ । ६४५। ७४८ । ८६४ ब्रह्मचारी २४२ । ४६६ ब्राह्मणः २९१ । ४६८ । ५८१ । ६४३ । ६४४ ।
६४६-६४८ । ६६६ । ८५५ ( द्विजः विप्रः) ब्राह्मण्यम् २९० । ३४६ । ६४९ भयम् १०६ । १६२ । ४५६ । ४६९ । ४७४ । ६५२ ।
६६१।८२३ । ८२४ । ८४८ । ८७१ ।९१७ । ९३५ भर्ता ५८७ । ६१५ । ९०१ ( पतिः) भार्या ९९ । १४८ । ५२८ । ५३९ । ५४० । ५९०।
६५६-६५८ । ६८२ । ७६१ । ७७८ । ८२७ ।
९०१ । ९९२ ( गृहिणी दयिता नारी पत्नी स्त्री) भाषणम् २३३ । ७८९ । ८५३ ( वचनम् ) भूतिः १३ । १९१ । ४५१ । ५९५। ६६५ । ७०६।
७१३ । ९२१ । ९३५ भूमिपः १३३ । ८७७ ( राजा) भेदः ४७२ । ६५२ । ६५९ । ६६० । ६६८ मतिः ५४ । ५५ । ४१८ । ५३१ । ७२६ ( बुद्धिः ) मनः ११९ । ३२२ । ४१७ । ५८३ । ६७४-६७६
८५२ । ८९९
For Private And Personal Use Only
Page #186
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१७६
- सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
मन्त्रः २०४ । ५५० । ५८१।६३१।७७३।८३५। ८६० ममत्वम् २० । ३३ । २६३ । ८७६ मरणम् ४५ । ३३४ । ५१३ । ७०१ । ७३० । ७८४ ।
८२३ । १००५ ( मृत्युः) महत् ३४९ । ४८१ । ५५६ । ६८१ । ७७९ । ८३४ महाभारतम् ११ । ११७ । ४१४ । ६७९ । ७३६ माता ३४३ । ३७४ । ५४१ । ५९१ । ६८२ । ६८४ ।
७२२ । ७२८ । ९५६ ( जननी) मानः ४७० । ६८५ । ७४५ । ८०१ मानुष्यम् १४१ । ३२३ । ८१०।१०१७ माया ६३७ । ६८६ । ६८७ । ७७१ मित्रम् १६३ । २५५।२७५।२८९।३७३।४२९ । ५३८ ।
६८९ । ७०३ । ७६७ । ७७४ । ७८१ । ८१५ ।
८९३१८९६ । ९३१ । ९९२ (वयस्यः सखा सुहृद्) मुनिः ७००।९०५ मूढः ४० । ११५। ५७६ । ७१६ । ७९६ । ९१७।९३९ ।
१००३ ( अपण्डितः मूर्खः) मूर्खः ४६५ । ४६७ । ५७० । ६२१ । ६३७ । ६९१
( अपण्डितः मूढः)
For Private And Personal Use Only
Page #187
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
१७७
मूलम् ४६९ । ६४३ । ६७६ । ६९२ । ७६२ । ८२३ ।
८३५ । ८६० । ८९४ । ८९५ मृतः ३९० । ६९३--६९६ । ७४५ । ९७९ मृत्युः १३१ । २८३ । ३३१ । ३३५ । ३८७ । ४२८ ॥
७३५ । ९३४ । ९६३ ( मरणम् ) मृदुः २५३ । २५७ । ६९७--६९९ । ८३४ मेधावी ३८६ । ५२३ । ९१० मोक्षः १४२ । ३७९ । ४१४ । १००३ यत्नः ७१०। ८७९ ( उत्थानम् उद्यमः पुरुषकारः व्यवसायः) यशः ७३ । ३४७ । ३७० । ३७४ । ५१९ । ५६४।
५८८ । १०१६ याचना ७०१ ( प्रार्थना ) युगम् ३६३ । ५७९ । ८२५ । ८३० युद्धम् ८४४ । ८९१ । १०३० योगः ३४ । ३१५ । ६०४ । ७१३ । ८०९ । ८२३ ।
९४८ । ९५५ योगी १५४ रक्षणम् ४५४ । ५१४ । ५९१ । ६५३ । ६५६ । ८२० ।
८२८ । ९०१ म. भा. १२
For Private And Personal Use Only
Page #188
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
राजा ८२। ८३ । १२१ । १६८।२६१।२६४।२६६ ।
२७१ । ३१३ । ३२८ । ३३३ । ३६३ । ४१० । ४१६ । ४२३ । ५०३ । ५३५ । ५४९ । ५८१ । ५९६ । ६२७ । ६५४ । ६६६ । ७२४ । ७३१ । ७५२ । ७५९ । ७७० । ७९१ । ७९५ । ८२३--८३३ । ८३६ । ८३९ । ८४० । ९७३ ।
९७७ । ९८० । ९८७ ( भूमिपः) राज्यम् ७० । ४१५ । ४३८ । ५४६ । ६७७ । ७५० ।
७९२ । ८३४ । ८३५ राष्ट्रम् १९८ । २०५।२०६ । ३३३ । ४२३ । ६७२। ८३६ रिपुः २२ । १८९ । १९३।२५५ । २८९ । ४२९ । ५३८ ।
५९५। ६२३ (अमित्रः अरिः परिपन्थी शत्रुः सपत्नः) रोगः ६९५ । ७८७ लाभः ४३ । १७१ । ३९४ । ६०६। ६८४ । ७१७ लोकः ९२ । २४७ । ४६४ । ५३३ । ५९१ । ६५७ ।
७०२ । ७५८ । ८२४ । ८२७ । ८२८ ।
८३८-८४१ । ९८६ । ९८७ लोभः ३५९ । ५२० । ५८५। ६५०। ६७३ । ८४२॥ ८४३ वक्ता १०१४ वचनम् ६९ ( भाषणम् )
For Private And Personal Use Only
Page #189
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
१७९
manorammaan
rrrrrrrrrrrr
वधः १३१ । २७४ । ३१६ । ४४१ । ४७४ । ४८८ ।
५६७ । ६८७ । ७३२ । ८०७ । ८४५ । ८४६ ।
८६५ । ९२६ वनम् ५५८ । ६४४ । ८३७ वयस्यः ६८२ (मित्रम् सखा सुहृद् ) वाक् ७५१८६ । २३४।४६८ । ६१४ । ६३२ । ६९१ ।
८३७ । ८५२-८५६ विक्रमः ३७८ । ५६२ । ८१९ । ८५८ । ९२९ विज्ञानम् ६०५ । ७२९ वित्तम् ५१०। ६२७। ७३९ । ७६४। ८७९ (धनम् श्रीः) विद्या १११ । २२७ । २५४ । ३७४ । ५२० । ५४२ ।
७२६ । ८०५। ८१७ । ८६२--८६४ । ८८१ ।
९१८ । ९४८ (ज्ञानम् ) विद्यार्थी १६५। १००६ विद्वान् ४५२ विनाशः ५७९ । ६४१ । ६५९ । ८२९ । ९०० । ९१५ विप्रः ८६८ । ८८२ (द्विजः ब्राह्मणः) विश्वासः ७ । ४२ । २१५। २१६ । २७७ । ३१० । ४६९।
५५१ । ५५९ । ५७१ । ७८३ । ८१६ । ८४६ ।। ८६९--८७१ । ९३८ । ९९२
For Private And Personal Use Only
Page #190
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१८०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
वृत्तम् १५७ । २३२ । २७३ । ४०८ । ४३२ । ७७९ ।
८४०। ८७९ । ८८११८८२।९०३। ९१४।९४८ वृद्धः ७३ । २२५ । ४७१ । ४८० । ६३८ । ६३९ । ८१७ ।
९२७ । ९३२ ( स्थविरः ) वृद्धिः ४२६ । ४७८ । ७६७ वैरम् २७७ । ४९१--४९३ व्यवसायः ८६२ । ८८६ (उत्थानम् उद्यमः पुरुषकारः यत्नः) व्यसनम् ५६४ । ५७० । ६२४ । ६७० व्याधिः ८२३ । ८४८ । ८९४ शत्रुः १४५।२११।२१२।२५७। ४३७ । ४४२ । ४७३।
४७४ । ५१९ । ५३२ । ५४३ । ६०१ । ६३६ । ६४४ । ६८२ । ६८९ । ७०९ । ७५४ । ७७४ । ८१८ । ८४५। ८४६ । ८४८ । ८९२-८९७ ।
९३१ ( अमित्रः अरिः परिपन्थी रिपुः सपत्नः) शमः ६०२ । ७३४ ( शान्तिः ) शरीरम् ६७० । ६९४ । ७०४।७३५१७३७।८०२।८२१॥
८५७ । ८९० । ९०० (देहः) शान्तिः ३१५ । ५२० । ९२० ( शमः ) शास्ता ३१३
For Private And Personal Use Only
Page #191
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
१८१
शास्त्रम् २१९ । ३५४ । ४६५ । ५७० । ६७१ । ७१७ ।
७२९ । ७६५ । ७७६ । ८०५। ८०६ । ९३२ शीलम् १९ । २३ । ३३२ । ३३६ । ३७० । ४०८ ।
९०२-९०४ शुचिः ५६५। ९०५। ९८३ शुभम् ६२० । ६२१ । ६३८॥ ६९११ ७०८ १९०६-९०९ शूरः २११ । ३२६ । ४५२ । ६५२ । ७११ । ९११। ९१२ शोकः ५२५ । ६१८ । ६७३ । ७०९ । ७६२ ।
९१५-९१७ । ९९९ शौचम् ८ । १७ । ४३४ शौर्यम् ४२६ । ४९४ श्रद्धा १० । ११४ । ३८१ । ४५३ । ४५७ । ५६१ ।
९१८-९२० श्रीः ३२ । ४३ । ४६ । ७० । १२४ । १३१ । १६१ ।
१८५ । १९६ । ४०८ । ४१५ । ४४६ । ५११ । ६२५। ६६५। ६७० । ७१३ । ७६० । ७८४ ।
८८४ । ९२१-९२६ । ९२९ (धनम् वित्तम् ) । श्रुतम् २३२ । ३४६ । ३९२ । ३९४ । ४७१ । ४७६ ।
७६४ । ९०३ । ९१४ । ९२७-९२९
For Private And Personal Use Only
Page #192
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
१८२
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
श्रेयः १६ । ४९ । ३९४ | ४२१ । ४७५ | ५६२ | ६०३
६०६ | ६२८ | ६७० । ६९० । ७३० । ७५३ । ९३०
श्रेष्ठः ६४० । ७५८ । ९३१
श्रोता १०१४
षण्ढः ६१५ । ८८४ ( क्लीव: नपुंसकम् )
संयमः ४२६ । ५५३ । ७९८ | ८५३ | ९२०
संयोगः ९३७ । ९७८
संशयः १० । ४७७ । ८०४:
सखा ४५२ । ४९९ । ५३५ । ५९० । ५९५ ( मित्रम् वयस्यः सुहृद् )
सख्यम् ३५६ । ४३३ । ४७९ । ७६४ । ९४१ । ९९३ ( संगतम् सौहृदम् )
संगतम् १६८ ( सख्यम् सौहृदम् )
सङ्घः ६६८ । ६८०
सत्त्वम् ४८७ । ७३१ | ७३४ । ७६० । ८२१ । ८७४
सत्यम् ६४ । ११६ | ३६० | ३७० | ३७४ । ४०८ । ४८० । ५४२ । ५४४ । ६८७ । ७१२ । ७५६ । ९४४ -- ९४९ सधनः ६२१
सन् २४३ | ३११ । ३५५ । ४३९ । ५४९ । ७४४ । ८६३ । ९०१ । ९५०
For Private And Personal Use Only
Page #193
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
१८३
संतोषः १२४ । ९५२ (तुष्टिः) संधिः ८६ । २५५ । ८१६ संन्यासः २४५ । ७५२ सपत्नः ७५४ । ७८४ । ९५४
( अमित्रः अरिः परिपन्थी रिपुः शत्रुः) सभा १२६ । ४८० । ७१२ समत्वम् ९५५ समर्थः ५८ । २३६ । ७३५ सहायः २०३ । ५४० । ६५७ । ६९२ । ८८६ । ९९० साधुः ६२ । ३८६ । ५१५ । ७७१ । ९६८ सामर्थ्यम् ७९ । ५३१ । ६०५ सिद्धिः ४६३ । ४८६ । ७५२ । ७५३ । ७६५ सुखम् १०।५१ । ६५ । ९१।१३०।१४४।२५२। ३७० ।
३९४ । ४१९।४५९।४७२। ५१३ । ५३२ । ५४२। ५९४। ६०९ । ६४८। ६७०।६८१ । ६८२१७०५। ७१६।७५११७५७। ७६५। ७६६ । ७८७ । ७९६ ।
८४७ । ९८९ । ९०९ । ९८२। ९९७--१००६ सुखी १३८ । ६१६ । ८४२ । ८९० सुहृद् ४२९ । ५३२ । ५६३ । ८६१ ( मित्रम् वयस्यः सखा)
For Private And Personal Use Only
Page #194
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१८४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
सौहृदम् ७८६ । १०१८ ( संगतम् सख्यम् )
स्त्री २३९ । ३०२ । ४१८ । ५८१ । ५८७ | ६०२ । ६१५ | ७१५ । ७७९ । ८०४ । ९२१ । १०११ । १०२१ ( गृहिणी दयिता नारी पत्नी भार्या )
स्थविरः २०० । ४५० ( वृद्धः )
स्वकर्म ६८८ । ९०५ । १०२९
स्वधर्मः ६८ । ९३०
स्वर्गः ८४ । १७८ । ३७० । ४३९ । ६०६ | ६४२ स्वार्थ: ५५९ । ५९१ । ६८९ | ८१५ । १०२८
हननम् १५५ । २७६ । ४०४ । ४४४ । ५४८ | ५६४ । ५९५ | ६०५ । ६६२ । ६९८ | ७०२ । ७९५ । ९२२ । ९२६
हर्षः ४७४ । ९१६ । ९९९ । १०३१
हिंसा ५३ | १३६ | १३९ । ९३६ हितम् ७०६ । ७४१ | ७५६ | ७७० | १०३२
For Private And Personal Use Only
Page #195
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
संपादक विष्णु विनायक परांजपे, पेण
-vihvvvv
भाषांतरकार
भालचंद्र शंकरशास्त्री देवस्थळी
प्रकाशक
केशव भिकाजी ढवळे, गिरगांव-मुंबई
आवृत्ति दुसरी
आषाढ शके १८५२ सन १९३०
किंमत ८ आणे
For Private And Personal Use Only
Page #196
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ans4
VIPINSISTANSENSENSIPINSINGH
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि संपादक-विष्णु विनायक परांजपे, पेण भाषांतरकार-चिंतामण मोरेश्वर परांजपे,
बी. ए., एल.एल. बी. ( १०३२ सुभाषितें, किंमत १२ आणे)
सार्थश्रीरामायणसुभाषितानि भाषांतरकार-भालचंद्र शंकरशास्त्री देवस्थळी
( ५०२ सुभाषितें, किंमत ८ आणे )
:5864545450S4ISAKSCHKOSHISHISHESHAN
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि भाषांतरकार-विष्णु विनायक परांजपे (५०८ सुभाषितें, किंमत ८ आणे )
सार्थश्रीभागवतसुभाषितानि भाषांतरकार-विष्णु विनायक परांजपे (११७ सुभाषितें, किंमत ३ आणे )
-
सार्थश्रीरामरक्षा ( किंमत १ आणा )
Hos66666666666
For Private And Personal Use Only
Page #197
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
प्रस्तावना
श्रीवाल्मीकिरामायण हे आदिकाव्य आहे. आर्य लोकांच्या राष्ट्रीय ग्रंथांमध्ये याची गणना होते. या सर्वमान्य ग्रंथांतील निवडक ५०२ सुभाषितवचनांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकांत केला आहे. वचनें वर्णक्रमाने दिली असून त्यांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांत कांड, सर्ग व श्लोक अशा क्रमाने अंक मांडिले आहेत. वचन प्रक्षिप्त सापैकी असल्यास मुख्य सगोचा व प्रक्षिप्त सर्गाचा असे दोन्ही अंक आहेत. वचनांच्या शेवटी मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. जो विषय ज्या वचनांत आला त्या वचनाचा क्रमांक त्या विषयापुढे सूचीमध्ये घातला आहे. सूचीमध्ये एकाच अर्थी आलेले अनेक शब्द त्या त्या ठिकाणी दिले असून पर्यायशब्द कंसांत घातले आहेत. ही सुभाषितवचनें सर्वांच्या वाचनांत येवोत, अशी श्रीरामप्रभूजवळ प्रार्थना करून प्रस्तावना संपवितों.
श्रीरामनवमी विष्णु विनायक परांजपे शके १८५१
, जिल्हा कुलाबा
रामायणांतील कांडांची नांवें १ बालकांड
५ सुंदरकांड २ अयोध्याकांड
६ युद्धकांड ३ अरण्यकांड
७ उत्तरकांड ४ किष्किंधाकांड
For Private And Personal Use Only
Page #198
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
निवेदन
श्रीमहाभारत, श्रीरामायण, श्रीयोगवासिष्ठ व श्रीभागवत या राष्ट्रीय व धार्मिक ग्रंथांतील निवडक सुभाषितांची मराठी भाषांतरासह चार पुस्तकें प्रकाशित केली. ही पुस्तकें सर्व लोकांना मान्य झाल्यामुळे पहिली आवृत्ति एका वर्षातच खपून गेली. आतां ही दुसरी आवृत्ति काढिली आहे.
वचन कोणी कोणाला सांगितले, हे समजण्याची विशेष अवश्यकता ज्या श्लोकांत दिसून येते, अशा श्लोकांचा अर्थ देतांना आरंभी कंसांत अवतरण दिले आहे. अशा अवतरणांची संख्या या आवृत्तीत वाढविली आहे.
धार्मिक शिक्षण देण्याच्या कामी ही चारहि सुभाषितांची पुस्तकें बरीच उपयोगी पडतात, असे पुष्कळ पालकांच्या व शिक्षकांच्या प्रत्ययास आले आहे. तरी सर्व जनतेला या पुस्तकांचा उपयोग होवो, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे.
आषाढ, शके १८५२
प्रकाशक
For Private And Personal Use Only
Page #199
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
मंगलाचरणम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥
हर्ता आपत्तींचा, दाता निखिलार्थसिद्धिचा तेवीं । . श्रीराम लोकनंदन, तच्चरणां नित्य नित्य मी सेवीं॥
१ अकुर्वन्तोऽपि पापानि शुचयः पापसंश्रयात् ।का. स. श्लो.
परपापविनश्यन्ति मत्स्या नागदे यथा ॥ ३॥३८॥२६ ज्याप्रमाणेसर्प असलेल्या डोहांतील मासे नाश पावतात, त्याप्रमाणे स्वतः शुचिर्भूत व पापकर्म न करणारे असेहि लोक पापीजनांचा आश्रय केल्यामुळे त्या दुसन्यांच्या पातकांनी नाश पावतात. २ अकृतात्मानमासाद्य राजानमनये रतम् ।
समृद्धानि विनश्यन्ति राष्ट्राणि नगराणि च ॥५।२१।११ ज्याच्या चित्ताला ज्ञानाचा संस्कार नाही, व जो अनीतीचे ठायीं आसक्त झालेला आहे, अशा राजाची प्राप्ति झाली असतां, समृद्ध राष्ट्र आणि नगरे नाश पावतात. ३ अग्नि प्रज्वलितं दृष्ट्वा वस्त्रेणाहर्तुमिच्छसि ।
कल्याणवृत्तां यो भायां रामस्याहर्तुमिच्छसि ३।४७।४३ (सीता रावणाला म्हणते ) ज्याअर्थी तूं रामाच्या सदाचरणी भार्येला हरण करण्याचे इच्छितोस, त्याअर्थी तूं प्रदीप्त झालेला आग्नि पाहून, त्याला वस्त्राने बांधून आणण्याचीच इच्छा करीत आहेस.
For Private And Personal Use Only
Page #200
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४ अङ्गप्रत्यङ्गजः पुत्रो हृदयाच्चाभिजायते ।
तस्मात्प्रियतरो मातुः प्रिया एव तु बान्धवाः।।२।७४।१४ (मुख, वक्षःस्थळ, उदर, हस्त, चरण इत्यादि) अंगांपासून व (नेत्र अंगुलि, इत्यादि) प्रत्यंगांपासून आणि हृदयापासून सर्व अंगांपासूनउत्पन्न झालेल्या तेजाच्या योगे होणारा पुत्र मातुश्रीस अत्यंत प्रिय असतो. इतर बांधव हे साधारणच प्रिय असतात. ५ अञ्जलिं कुर्मि कैकेयि पादौ चापि स्पृशामि ते ।
शरणं भव रामस्य माऽधर्मो मामिह स्पृशेत् ।।२।१२।३६ (दशरथ म्हणतो) हे कैकेयि, मी तुला हात जोडितों, व तुझ्या पायांनाही स्पर्श करितों, रामाचे रक्षण कर. ह्या जगांत अधर्म मला स्पर्श न करो. ६ अतिथिः किल पूजार्हः प्राकृतोऽपि विजानता ।
धर्म जिज्ञासमानेन किं पुनयादृशो भवान् ।। ५।१११३ (मैनाकपर्वत मारुतीला म्हणतो. ) धर्मजिज्ञासु ज्ञात्या पुरुषानें सामान्य अतिथिही पूजावा, हे योग्य आहे; मग तुजसारखा अतिथि प्राप्त झाला असता, त्याची पूजा करावी, हे वेगळे कशाला सांगितले पाहिजे ? ७ अतिमानिनमग्राह्यमात्मसंभावितं नरम् ।।
क्रोधनं व्यसने हन्ति स्वजनोऽपि नराधिपम्॥३॥३३॥१६ हट्टी, कशानेही न वळणारा, अति अभिमान बाळगणारा, व सदा क्रोध करणारा, असा मनुष्य, मग तो राजा का असेना, संकटांत आला असता, त्याचेच लोक त्याचा नाश करितात.
८ अतिस्नेहपरिष्वङ्गाद्वर्तिरार्द्रापि दह्यते ॥ ४।१।११७ अति स्नेहाच्या-तेलाच्या-संपर्काने भिजलेलीही वात दग्ध होते.
For Private And Personal Use Only
Page #201
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि
९ अतुष्टं स्वेषु दारेषु चपलं चपलेन्द्रियम् । नयन्ति निकृतिप्रज्ञं परदाराः पराभवम् ।। ५।२१।८ स्वस्त्रीचे ठायीं असंतुष्ट, अजितेंद्रिय, विपरीत बुद्धीच्या, चंचल मनाचे पुरुषास परस्त्रिया अपकीर्तीस पांचवितात.
३
१० अत्येति रजनी या तु सा न प्रतिनिवर्तते ।
यात्येव यमुना पूर्ण समुद्रमुदकार्णवम् ।। २ । १०५/१९ ज्याप्रमाणें उदकाने परिपूर्ण भरलेल्या समुद्राकडे यमुना नदी जाते ती कधीं मांगें परतून येत नाहीं, त्याप्रमाणें जी रात्र एकदां . निघून जाते, ती पुनः परत येत नाहीं.
११ अथवा किं ममैतेन राज्यद्रव्यमयेन तु ।
उद्धृतं मे स्वयं तोयं व्रतादेशं करिष्यति || २|२२|२८ ( राम लक्ष्मणाला म्हणतो वनवासाच्या व्रताचा संकल्प करण्यासाठी मी या अभिषेक जलानें स्नान करीन ) अथवा राज्यांतील द्रव्य ज्याकरितां खर्ची पडलें आहे असें हें उदक तरी मला कशाला पाहिजे ? मी स्वतः आणिलेल्या उदकानेंच माझा व्रतग्रहणाचा संकल्प होईल.
१२ अथात्मपरिधानार्थं सीता कौशेयवासिनी ।
संप्रेक्ष्य चीरं संत्रस्ता पृषती वागुरामिव || २|३७/९
( राम व लक्ष्मण यांनी वल्कले स्वीकारली ) नंतर पैठणी नेसलेली सीता आपल्याला नेसण्याकरितां (कैकेयीनें ) आणून दिलेले वल्कल पाहून, जाळे पाहिल्यावर त्रस्त होणाऱ्या हरिणीप्रमाणें त्रस्त झाली. १३ अधर्मः सुमहान्नाथ भवेत्तस्य तु भूपतेः ।
यो हरेद्वलिषड्भागं न च रक्षति पुत्रवत् || ३|६|११ ( तपस्वी ऋषि रामाला म्हणतात ) हे नाथ, जो राजा प्रजेपासून उत्पन्नाचा सहावा भाग करभार म्हणून घेऊन तिचें पुत्रवत् पालन करीत नाहीं, तो त्याचा मोठा अधर्म होय.
For Private And Personal Use Only
Page #202
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१४ अधर्षितानां शूराणां समरेष्वनिवर्तिनाम् ।
धर्षणामर्षणं भीरु मरणादतिरिच्यते ॥ ४।१६।३ (वाली तारेला म्हणतो) हे भिव्ये, परोत्कर्ष सहन न करणारे व समरांत माघार न घेणारे, अशा शूरांना शāनी केलेला अपमान सहन करणे हे मरणाहूनहि अधिक दुःखदायक आहे. १५ अनभिज्ञाय शास्त्रार्थान्
पुरुषाः पशुबुद्धयः। प्रागल्भ्याद्वक्तुमिच्छन्ति
मन्त्रिष्वभ्यन्तरीकृताः॥६।६३।१४ मंत्रिजनांमध्ये समाविष्ट केलेले पशुबुद्धि पुरुष आपल्या आंगच्या बोलकेपणाच्या जोरावर अनभिज्ञास-अज्ञान्यास-शास्त्रार्थाच्या गोष्टी सांगू इच्छितात. १६ अनवस्थौ हि दृश्यते युद्धे जयपराजयौ ॥५॥३७५५ युद्धामध्ये जय काय किंवा पराजय काय, हे अनिश्चित असतात. १७ अनागतविधानं तु कर्तव्यं शुभमिच्छता ।
आपदाशङ्कमानेन पुरुषेण विपश्चिता ॥३॥२४।११ कल्याण इच्छिणाऱ्या विद्वान पुरुषाने पुढे विपत्ति येईल, अशी शंका येतांच, ती विपत्ति प्राप्त होण्यापूर्वीच परिहाराची योजना करावी. १८ अनिर्वेदं च दाक्ष्यं च मनसश्चापराजयम् ।
कार्यसिद्धिकराण्याहुस्तस्मादेतद्रवीम्यहम् ॥४।४९।६ (सीतेचा शोध लावण्याविषयी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असें अंगद वानरमंडळीला सांगतो ) उत्साह, दक्षता, आणि कार्याविषयी उन्मुखता, ही कार्यसिद्धि घडवून आणितात, असें म्हणतात, म्हणून हे मी सांगतो.
For Private And Personal Use Only
Page #203
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि १९ अनिर्वेदः श्रियो मूलमनिर्वेदः परं सुखम् ॥५।१२।१० उत्साह हे संपत्तीचे कारण होय, आणि उत्साह म्हणजेच परम सुख होय. २० अनिर्वेदो हि सततं सर्वार्थेषु प्रवर्तकः ।
करोति सफलं जन्तोः कर्म यच करोति सः ॥५।१२।११ सर्व गोष्टींची प्रवृत्ति होण्याला उत्साह हेच एक नेहमींचे कारण आहे. प्राणी जे काही कर्म करितो, ते त्याचे कर्म हाच उत्साह सफल करितो. २१ अनुवन्धमजानन्तः कर्मणामविचक्षणाः ।
शीघ्रमेव विनश्यन्ति यथा त्वं विनशिष्यसि ॥३५१।२६ (जटायु पक्षी रावणाला म्हणतो) जे मूढ पुरुष आपल्या कृत्यांच्या परिणामाकडे लक्ष देत नाहीत ते तुझ्याप्रमाणे सत्वरच नाश पावतात. २२ अन्तं नोक्तपूर्व मे न च वक्ष्ये कदाचन ।
एतत्ते प्रतिजानामि सत्येनैव शपाम्यहम् ॥ ४।७।२२ (राम सुग्रीवाला म्हणतो) आजपर्यंत मी पूर्वी कधीं अनृत भाषण केले नाही, आणि पुढेही कधी करणार नाही, हे मी तुला प्रतिज्ञेनें सांगतों व यासंबंधी सत्याची शपथ वाहतो. २३ अन्तकाले हि भूतानि मुद्यन्तीति पुरा श्रुतिः।
राज्ञैवं कुर्वता लोके प्रत्यक्षा साश्रुतिः कृता॥२।१०६।१३ (भरत रामाला म्हणतो-दशरथ पित्याने कैकेयीचे म्हणणे मान्य केले-यावरून) अंतकाल प्राप्त झाला असतां प्राण्यांची बुद्धि विपरीत होते, असें पूर्वीपासून ऐकिवांत आहे; आणि ही गोष्ट, असें करणा-या राजानें, आज लोकांत सिद्ध करून दाखविली आहे.
For Private And Personal Use Only
Page #204
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२४ अपक्षो हि कथं पक्षी कर्म किंचित्समारभेत् ॥ ४५९।२३
(गृध्रराज संपाति वानरांना सांगतो) पंख नाहींतसे झालेला पक्षी कांहीं पराक्रमाचे कृत्य करण्यास प्रवृत्त होणार कसा? २५ अप्यहं जीवितं जह्यां त्वां वा सीते सलक्ष्मणाम् ।
न तु प्रतिज्ञां संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः॥३।१०।१८ ( राम म्हणतो) हे सीते, मी तुझा, लक्ष्मणाचा, व स्वतःच्या जीविताचाही त्याग करीन. परंतु कोणाजवळ, विशेषतः ब्राह्मणांजवळ, केलेल्या प्रतिज्ञेचा त्याग कधीही करणार नाही. २६ अप्यहं जीवितं जह्यां युष्मान्वा पुरुषर्षभाः।
अपवादभयाद्रीतः किं पुनर्जनकात्मजाम् ॥७।४५।१४ ( राम बंधूंना म्हणतो) पुरुषश्रेष्ठांनो, लोकापवादाला भिऊन मी स्वजीविताचा व तुमचाहि त्याग करीन; मग जनककन्येचा त्याग करीन, यांत आश्चर्य तें काय? .. २७ अप्येव दहनं स्पृष्ट्वा वने तिष्ठन्ति पादपाः।
राजदण्डपरामृष्टास्तिष्ठन्ते नापराधिनः ॥ ६।२९।१२ अग्नीने स्पर्श केलेले वृक्षही वनांत राहतात, परंतु राजदंडास पात्र झालेले अपराधी (जिवंत ) राहात नाहीत. २८ अप्रमत्तश्च यो राजा सर्वज्ञो विजितेन्द्रियः ।
कृतज्ञो धर्मशीलश्च स राजा तिष्ठते चिरम् ।।३।३३।२० जो राजा ( सर्वदा) सावधान, सर्वज्ञ, जितेंद्रिय, कृतज्ञ आणि धर्मशील असतो, तो राज्यावर चिरकाल स्थिर राहातो. २९ अप्रमत्तो बले कोशे दुर्गे जनपदे तथा ।
भवेथा गुह राज्यं हि दुरारक्षतमं मतम् ॥ २।५२/७२ (राम म्हणतो) हे गुहा, तूं सैन्य, कोश, किल्ले, तसेच देश यांसंबंधाने सावधान रहा. कारण, राज्याचे रक्षण करणे म्हणजे अत्यंत कठीण होय, असें मानिले आहे.
For Private And Personal Use Only
Page #205
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३० अमृतं विषसंपृक्तं त्वया वानर भाषितम् ।
यच्च नान्यमना रामो यच्च शोकपरायणः ॥५॥३७।२ (सीता मारुतीला म्हणते ) हे वानरा, तुझें भाषण विषमिश्रित अमृतासारखे आहे. 'रामाचे मन (तुजवांचून) कोणत्याही ठिकाणी आसक्त होत नाही, हे जे तूं बोललास, तें अमृतासारखें, व 'राम ( तुझ्यासंबंधानें ) एकसारखा शोक करीत आहे' असें जें तूं सांगितलेंस, ते मला विषासारखे वाटत आहे. ३१ अयं हि सागरो भीमः सेतुकर्मदिदृक्षया ।
ददौ दण्डभयाद्गाधं राघवाय महोदधिः।।६।२२।४७ ( वानरश्रेष्ठ नल म्हणतो ) ह्या भयंकर महोदधि सागराने, दंडाच्या भीतीमुळे, सेतुकार्य पाहाण्याची इच्छा धरून राघवास (आपला ) ठाव दिला. ३२ अयुक्तचारं दुर्दर्शमस्वाधीनं नराधिपम् ।
वर्जयन्ति नरा दूरान्नदीपङ्कमिव द्विपाः ॥ ३॥३३॥५ जो राजा (राष्ट्रांतील बातम्या समजाव्या म्हणून ) हेरांची योजना करीत नाहीं; (प्रजाजनांस) दर्शन देत नाही. जो परतंत्र असतो, (स्त्रियादिकांच्या स्वाधीन असतो) त्याला नदीतील चिखल पाहतांच हत्ती नदीचा त्याग करून जातात, त्याप्रमाणे लोक वयं करितात. ३३ अरयश्च मनुष्येण विज्ञेयाश्छद्मचारिणः ।
विश्वस्तानामविश्वस्ताश्छिद्रेषु प्रहरन्त्यपि ॥ ४।२।२२ कपटानें संचार करणाऱ्या शत्रंचा मनुष्याने शोध घेत रहावे. कारण, ते सावध राहून, संधि सांपडली असतां, विश्वास पावलेल्या (शत्रु) जनांवर प्रहार करण्यास चुकत नाहीत.
For Private And Personal Use Only
Page #206
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
namamannaannn
३४ अर्थ वा यदि वा कामं शिष्टाः शास्त्रेष्वनागतम् ।
व्यवस्यन्त्यनुराजानं धर्म पौलस्त्यनन्दन ॥ ३॥५०१९ (जटायु म्हणतो) हे रावणा, शास्त्रामध्ये ज्याचा नीट बोध होत नाही असा धर्म, अर्थ, अथवा काम राजाचंच आचरण पाहून शिष्ट लोक निश्चित करीत असतात. ३५ अर्थानान्तरे बुद्धिनिश्चितापि न शोभते ।
घातयन्तीह कार्याणि दूताः पण्डितमानिनः॥५।२।३८ ( लंका अवलोकन केल्यानंतर मारुतीचे स्वगत विचार ) कार्याकार्याविषयीं स्वामीनें मंत्र्यासहवर्तमान जरी एखादा विचार निश्चित केला असला, तरी अयोग्य दूताशीं गांठ पडल्यावर त्या विचारापासून काहीएक निष्पन्न होत नाही. कारण, शहाणपणाच्या घमेंडींत असणारे दूत स्वामिकार्याचा घात करितात. ३६ अर्थिनः कार्यनित्तिमकर्तुरपि यश्चरेत् ।
तस्य स्यात्सफलं जन्म किं पुनः पूर्वकारिणः॥४।४३७ ज्याने पूर्वी आपल्यावर उपकार केला नाही, अशा अर्थिजनाची (याचकाची ) कार्यसिद्धि केल्याने जीवित सफल होईल; मग ज्याने पूर्वी आपल्यावर उपकार केले आहेत, त्याचे कार्य केल्याने तें जीवित सफल होईलच, हे कशाला सांगितले पाहिजे ? ३७ अर्थिनामुपपन्नानां पूर्वं चाप्युपकारिणाम् । __ आशां संश्रुत्य यो हन्ति स लोके पुरुषाधमः॥४।३०।७१ पूर्वी ज्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत, अशा याचकांना त्यांच्या कार्यसिद्धीच्या कामी वचन देऊन जो कार्यहानि करितो, तो पुरुष लोकांमध्ये अधम होय.
For Private And Personal Use Only
Page #207
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि
३८ अर्थी येनार्थकृत्येन संव्रजत्यविचारयन् । तमर्थमर्थशास्त्रज्ञाः प्राहुरर्थ्याः सुलक्ष्मण || ३ | ४३ | ३४
( राम म्हणतो ) हे भल्या लक्ष्मणा, कोणी पुरुष एखाद्या अर्थाची अपेक्षा करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करितो, तो, विचार न करितां केलेला असला, तरी अर्थशास्त्रज्ञ शहाणे लोक त्यास ' अर्थच ' म्हणत असतात.
३९ अर्थेन हि विमुक्तस्य पुरुषस्याल्पचेतसः ।
विच्छिद्यन्ते क्रियाः सर्वा ग्रीष्मे कुसरितो यथा ६।८३।३३
९
ग्रीष्म ऋतूंत ज्याप्रमाणें लहान लहान नद्या आटून जातात त्याप्रमाणें द्रव्यहीन आणि अल्पबुद्धि अशा मनुष्याच्या सर्व क्रिया
नाश पावतात.
४० अर्थेभ्योऽथ प्रवृद्धेभ्यः संवृत्तेभ्यस्ततस्ततः ।
क्रियाः सर्वाः प्रवर्तन्ते पर्वतेभ्य इवापगाः || ६ | ८३।३२ पर्वतापासून ज्याप्रमाणें नद्या उत्पन्न होत असतात, त्याप्रमाणे संपादन केलेल्या आणि सर्वत्र वृद्धिंगत झालेल्या द्रव्यापासून सर्व क्रिया सिद्ध होतात.
४१ अर्थो हि नष्टकार्यार्थैरयत्नेनाधिगम्यते ॥ ४।१।१२१
नष्ट झालेली वस्तू ज्यांना अवश्य मिळवावयाची आहे त्यांना ती यत्नावांचून कधीहि मिळत नाहीं.
४२ अवश्यं लभते कर्ता फलं पापस्य कर्मणः ।
घोरं प्रत्यागते काले द्रुमः पुष्पमिवार्तवम् ||३|२९|८
ज्याप्रमाणें वृक्षावर त्या त्या ऋतुकालाला उचित अशीं पुष्पें उत्पन्न होतात, त्याप्रमाणें पापकर्माचें दुःखरूप फल भोगकाल आला असतां कर्त्याला अवश्य भोगावें लागतें.
For Private And Personal Use Only
Page #208
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४३ अवश्यं प्राणिना प्राणा रक्षितव्या यथावलम् ॥ ६।९।१४ प्रत्येक प्राण्याने आपले प्राण अवश्य यथासामर्थ्य रक्षण करावे. ४४ अविज्ञाय फलं यो हि कर्म त्वेवानुधावति ।
स शोचेत्फलवेलायां यथा किंशुकसेवकः ॥२।६३।९ जो पुरुष कर्माच्या फलाचा विचार न करितां तें कर्म करण्यास प्रवृत्त होतो, त्याची फळ मिळण्याची वेळ प्राप्त झाली असतां, पळसाच्या झाडाची ( फलप्राप्त्यर्थ ) सेवा करणान्यासारखी शोकस्थिति होईल. ४५ अविस्तरमसंदिग्धमविलम्बितमव्यथम् ।
उरःस्थं कण्ठगं वाक्यं वर्तते मध्यमस्वरम् ॥ ४॥३॥३१ अनया चित्रया वाचा त्रिस्थानव्यञ्जनस्थया । कस्य नाराध्यते चित्तमुद्यतासेररेरपि ॥ ४३३३ ( मारुतीचे भाषण ऐकून राम लक्ष्मणाला म्हणतो) ( उत्तम वाक्य म्हटले म्हणजे) में अति विस्तृत नसते, संदिग्ध नसते, त्वरित उच्चारितां येते, श्रोत्यांच्या कर्णास पीडा देत नाही. उरःस्थलापासून कंठाकडे मध्यम स्वरांत-अति उच्च नाही, किंवा आति नीचही नाही-अशा स्वरांत जातें तें होय. (हृदय, कंठ आणि शिरःस्थान अशा ) तीन ठिकाणी स्पष्टपणे व्यक्त होणान्या (ह्याच्या) वाणीने खड्ग उगारून आलेल्या शत्रूचेही रंजन झाल्यावांचून रहाणार नाही. ( मग इतरांचे होईल, हे उघडच आहे.) ४६ अशोक शोकापनुद शोकोपहतचेतनम् ।
त्वन्नामानं कुरु क्षिप्रं प्रियासंदर्शनेन माम् ।३।६०११७ (राम म्हणतो.) हे शोकहारका अशोका ! माझी शोकानें ज्ञानशक्ति नष्ट झाली आहे. प्रिये (सीते) च्या दर्शनाने मला त्वरित तुझ्या नामाप्रमाणे (अशोक) कर.
For Private And Personal Use Only
Page #209
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४७ असृजद्भगवान्पक्षौ द्वावेव हि पितामहः ।
सुराणामसुराणां च धर्माधर्मों तदाश्रयौ ॥६।३५।१३ ऐश्वर्यसंपन्न अशा पितामहाने-ब्रह्मदेवानें-देव आणि असुर असे दोन पक्ष निर्माण केले, आणि त्यांच्या ठिकाणी अनुक्रमें धर्म व अधर्म उत्पन्न केले. ४८ अस्मिञ्जीवति वीरे तु हतमप्यहतं बलम् ।
हनूमत्युज्झितप्राणे जीवन्तोऽपि मृता वयम् ॥६७४।२२ (मारुति जिवंत आहे काय, असा जांबवानाने बिभीषणाला प्रश्न केला असतां बिभीषणाने विचारले की, मारुतीबद्दलच प्रश्न कां विचारला यावर जांबवान् बिभीषणाला सांगतो) हा वीर हनुमान जिवंत असतां सैन्य मारले गेले, तरी तें न मारिल्यासारखे आहे, आणि हा मेला असतां आम्ही जिवंत असूनही मेल्यासारखे आहों. ४९ अस्वाधीनं कथं दैवं प्रकारैरभिराध्यते ।
स्वाधीनं समतिक्रम्य मातरं पितरं गुरुम् ।।२।३०१३३ (राम सीतेला म्हणतो) माता, पिता व गुरु ही आपल्या हातची दैवते टाकून देऊन स्वाधीन नसलेल्या दुसऱ्या दैवताची नाना प्रकारांनी आराधना, करावी तरी कशी ? ५० अहं हि वचनाद्राज्ञः पतेयमपि पावके ॥ २॥१८।२८
भक्षयेयं विषं तीक्ष्णं पतेयमपि चार्णवे । नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च ॥ २।१८।२९. ( राम कैकेयीला म्हणतो) मी राजाच्या सांगण्यावरून अग्नीत देखील पडेन. हितकर्ता गुरु, माझा बाप (दशरथ) राजा, याने आज्ञा केली असतां, मी तीक्ष्ण विषाचे भक्षण करीन, किंवा समुद्रांतही उडी घेईन.
For Private And Personal Use Only
Page #210
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
wwwmu.........
५१ अहितं च हिताकारं धाष्टजिल्पन्ति ये नराः ।
अवश्यं मन्त्रबाह्यास्ते कर्तव्याः कृत्यदूषकाः॥६।६३।१६ जे कोणी वस्तुतः अहितप्रद, परंतु बाहेरून हितकारक वाटण्याजोगें भाषण धाष्टानें करितात, ते कार्यनाशक होत. त्यांस आपल्या विचारांत-सल्लामसलतींत-घेऊ नये. ५२ अहिरेव अहेः पादान्विजानाति न संशयः॥ ५।४२।९ सर्पाचे पाय-चरणरहित गति-सर्पच जाणतो, यांत संशय नाही. ५३ अहो तम इवेदं स्यान्न प्रज्ञायेत किंचन ।
राजा चेन भवेल्लोके विभजन्साध्वसाधुनी ॥२।६७३६ चांगले आणि वाईट याची निवड करणारा राजा जर पृथ्वीवर नसेल, तर सर्वच अंधार होईल, आणि (कार्याकार्य) कांहींच समजणार नाही. ५४ अहोरात्राणि गच्छन्ति सर्वेषां प्राणिनामिह ।
आयूंषि क्षपयन्त्याशु ग्रीष्मे जलमिवांशवः।।२।१०५।२० ग्रीष्म ऋतूंत उदकाचा नाश करणान्या ( सूर्य ) किरणांप्रमाणे या मृत्युलोकों निघून जाणा-या दिवसरात्री सर्व प्राण्यांच्या आयुष्याचा शीघ्र नाश करितात. ५५ आकारश्छाद्यमानोऽपि न शक्यो विनिगुहितुम् ।
बलाद्धि विवृणोत्येव भावमन्तर्गतं नृणाम् ॥ ६।१७।६४ मनुष्याने आपला आकार-हर्षविकारादि मनोभावनांनी चेह-यावर होणारा फेरफार-आंवरून धरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो आंवरतां येत नाही. तो आकार, मनुष्यांचा अंतर्गत (चांगला वाईट) भाव कशाना कशा प्रकारे प्रगट करितोच.
For Private And Personal Use Only
Page #211
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
५६ आढ्यो वापि दरिद्रो वा दुःखितः सुखितोऽपि वा।
निर्दोषश्च सदोषश्च वयस्यः परमा गतिः॥४।८८ श्रीमंत असो, वा दरिद्री असो; सुखी असो वा दुःखी असो; निर्दोष असो, वा सदोष असो, मित्र म्हणजे परम गति होय. ५७ आत्मप्रशंसिनं दुष्टं धृष्टं विपरिधावकम् ।
सर्वत्रोत्सृष्टदण्डं च लोकः सत्कुरुते नरम् ॥६।२१।१५ आत्मप्रशंसा करणारा, दुष्ट आचरणाचा, साहसी, आपल्या प्रसिद्धीकरितां धांवपळ करणारा, व सर्वत्र दंड करीत जाणारा, अशाच पुरुषाचा लोक सत्कार करितात. ५८ आत्मानं नियमैस्तैस्तैः कर्षयित्वा प्रयत्नतः।
प्राप्यते निपुणधर्मो न सुखाल्लभते सुखम् ॥३।९।३१ (धर्मसंपादनार्थ जे जे नियम सांगितले आहेत ) त्या त्या नियमांच्या योगेंकरून प्रयत्नांनों शरीर झिजवून शहाणे लोक धर्माची प्राप्ति करून घेतात. कारण, सुखापासून सुख मिळत नसते. ( कष्ट करून सुख मिळवावे लागते.) ५९ आत्मानमनुशोच त्वं किमन्यमनुशोचसि ।
आयुस्तु हीयते यस्य स्थितस्याथ गतस्य च।।२।१०५।२१ ( राम भरताला म्हणतो) तूं आपल्याविषयीं शोक कर. दुसऱ्याविषयी काय म्हणून शोक करितोस ? कोणी मनुष्य, मग तो उभा असो, किंवा चालणारा असो त्याचे आयुष्य क्षीण होत असते. ६० आत्मा रक्ष्यः प्रयत्नेन ॥ ५।४६।१६ । (प्रत्येकानें ) प्रयत्नपूर्वक स्वदेहाचे रक्षण करावें. ६१ आत्मा हि दाराः सर्वेषा दारसंग्रहवर्तिनाम् ॥ २॥३७।२४ प्रत्येक विवाहित पुरुषाची स्त्री हा त्याचा आत्माच आहे.
For Private And Personal Use Only
Page #212
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४ सार्थश्रीरामायणसुभाषितानि ६२ आनृशंस्यं परो धर्मः ॥ ५।३८।३९ (प्राणिमात्रावर ) दया करणे हाच श्रेष्ठ धर्म होय. ६३ आभिजात्यं हि ते मन्ये यथा मातुस्तथैव च ।
नहि निम्बात्स्रवेत्क्षौद्रं लोके निगदितं वचः।।२।३५।१७ ( सुमंत्र सारथि कैकेयीला धिक्कारपूर्वक म्हणतो) तुझा कुलीनपणा तुझ्या आईप्रमाणेच मी समजत आहे! ( तुझ्या आईप्रमाणेच तूं दुष्ट आहेस.) 'लिंबाच्या झाडांतून कधी मध पाघळत नाही' ही म्हण लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. ६४ आनं छित्त्वा कुठारेण निम्बं परिचरेत्तु कः।
यश्चैनं पयसा सिञ्चन्नैवास्य मधुरो भवेत् ।। २।३५।१६ आंब्याचे झाड कु-हाडीने तोडून टाकून लिंबाच्या झाडाची जोपासना कोण करणार आहे ? कारण, या लिंबाच्या झाडाला जो पाणी घालील त्याच्याकरिता ते कधी मधुर होणार नाही. ६५ आयस्ते विपुलः कञ्चित्कच्चिदल्पतरो व्ययः ।
अपात्रेषु न ते कच्चिकोशो गच्छति राघव ॥२॥१००।५४ (राम भरताला विचारतो.) हे राघवा, तुझी प्राप्ति विपुल आहेना? तुझा खर्च अति अल्प आहेना ? तुझ्या खजिन्यांतील द्रव्य अपात्रीं खर्च होत नाहींना ? ६६ आराधिता हि शीलेन प्रयत्नश्वोपसेविताः।
राजानः संप्रसीदन्ति प्रकुप्यन्ति विपर्यये ॥ २।२६।३५ राजे लोकांची सद्वर्तनाने आराधना आणि प्रयत्नपूर्वक सेवा केली असतां ते प्रसन्न होतात. याच्या उलट वर्तनाने ते क्रुद्ध होतात.
For Private And Personal Use Only
Page #213
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
६७ आस्फोटयामास चुचुम्ब पुच्छं
ननन्द चिक्रीड जगौ जगाम । स्तम्भानरोहन्निपपात भूमौ
निदर्शयन्स्वां प्रकृति कपीनाम् ॥ ५।१०५४ ('ही सीता असावी' असा तर्क झाल्यावर मारुतीला आनंद झाला त्याचे वर्णन ) वानरांना योग्य असा आपला जातिस्वभाव दर्शविण्यास उद्युक्त झालेला तो हनुमान् आपले पुच्छ आपटूं लागला, त्याचे चुंबन घेऊं लागला, मनामध्ये आनंदित होऊन क्रीडा करूं लागला, गाऊ लागला. इकडे तिकडे धावाधाव करूं लागला. आणि खांबावर चढ़न फिरून जमिनीवरही उड्या मारूं लागला. ६८ आहुः सत्यं हि परमं धर्म धर्मविदो जनाः॥ २॥१४॥३ 'सत्य हाच परम धर्म होय,' असें धर्मवेत्ते लोक म्हणतात. ६९ इदं शरीरं निःसंज्ञं बन्ध वा घातयस्व वा ।
नेदं शरीरं रक्ष्यं मे जीवितं वापि राक्षस ॥ ३५६।२१
न तु शक्यमपक्रोशं पृथिव्यां दातुमात्मनः॥३५६।२२ (सीता रावणाला म्हणते) हे राक्षसा, हे जड शरीर बांधून ठेव, अगर याचा घात कर. कारण माझी पृथ्वीवर (सीता गैर चालीची निघाली अशा प्रकारची ) निंदा होणार असेल तर शरीर काय, अथवा जीवित काय, यांचे रक्षण मला करावयाचें नाहीं. . ७० इदं तु मम दीनस्य मनो भूयः प्रकर्षति ।
यदिहास्य प्रियाख्यातुने कुर्मि सदृशं प्रियम् ॥६।१।१२ एष सवेस्वभूतस्तु परिष्वङ्गो हनूमतः।
मया कालमिमं प्राप्य दत्तस्तस्य महात्मनः ॥६।१।१३ (रामम्हणतो) सीतेचा शोध लागला ही प्रियवार्ता कथन करणाऱ्या ह्या वानराचें-मारुतीचें-त्याने केलेल्या कार्यानुरूप प्रिय मी करूं शकत नाही, त्यामुळे मज दीनाचें मन अत्यंत खिन्न होत आहे. अशा वेळी कडकडून भेट देणें हेंच काय ते माझ्यापाशी उरलें आहे आणि ही भेट मी त्या महात्म्या हनुमंताला देत आहे.
For Private And Personal Use Only
Page #214
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
७१ उत्तरं नोत्सहे वक्तुं दैवतं भवती मम ।
वाक्यमप्रतिरूपं तु न चित्रं स्त्रीषु मैथिलि ॥३॥४५।२९ (लक्ष्मण म्हणतो) हे सीते, तूं माझें दैवत असल्यामुळे माझ्याने तुला उत्तर देववत नाही. स्त्रियांनी अनुचित भाषण करणे, ह्यांत कांहीं आश्चर्य नाही. (हे साहजिक आहे.) ७२ उत्साहवन्तः पुरुषा नावसीदन्ति कर्मसु ॥४।१।१२३ उत्साही पुरुष कोणत्याही कार्यात खचून जात नाहीत. ७३ उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् । __ सोत्साहस्य हि लोकेषु न किंचिदपि दुर्लभम् ।।४।१।१२२
(लक्ष्मण रामाला म्हणतो) हे आर्या, उत्साह हा (अत्यंत) बलवान आहे. उत्साहापेक्षा दुसरें श्रेष्ठ असें बल नाही. उत्साही पुरुषाला लोकांमध्ये दुर्लभ असें कांहींच नाही. ७४ उद्विजन्ते यथा सन्निरादनृतवादिनः ।
धर्मः सत्यपरो लोके मूलं सर्वस्य चोच्यते ॥२॥१०९।१२ सर्पापासून जशी लोकांना भीति असते, त्याचप्रमाणे असत्यवादी मनुष्यापासून लोकांना भीति असते. ज्यांत सत्य मुख्य आहे, असा जो धर्म, तोच लोकांत ( सर्व इष्टप्राप्तीचे ) मूळ आहे, असे सांगतात. ७५ उद्वेजनीयो भूतानां नृशंसः पापकर्मकृत् ।
त्रयाणामपि लोकानामीश्वरोऽपि न तिष्ठति ॥३।२९।३ जो प्राणिमात्राला उद्विग्न करितो, जो पापकर्मी व दुष्ट असतो तो तीनही लोकांचा प्रभु झाला, तरी फार कालपर्यंत टिकणार नाही. ७६ उपकारफलं मित्रमपकारोऽरिलक्षणम् ॥ ४८२१ उपकाररूप फल हे मित्रत्वाचे लक्षण व अपकार करणे हे शत्रुत्वाचे लक्षण होय.
For Private And Personal Use Only
Page #215
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि mmmmmmmmmmmmm ७७ उपकारेण वीरस्तु प्रतिकारेण युज्यते । ___ अकृतज्ञोप्रतिकृतो हन्ति सत्त्ववतां मनः॥४।२७।४५
वीर पुरुषावर कोणीही उपकार केला असता, तो वीर पुरुष प्रत्युपकार करितोच. उपकार न जाणून प्रत्युपकार न करील, तर तो सत्त्वशील पुरुषांचा मनोभंग करितो. ७८ उपभुक्तं यथा वासः सजो वा मृदिता यथा ।
एवं राज्यात्परिभ्रष्टः समर्थोऽपि निरर्थकः ॥३॥३३॥१९ ज्याप्रमाणे वापरलेले वस्त्र अथवा चुरगळलेल्या माळा निरुपयोगी होतात, त्याचप्रमाणे राज्यापासून भ्रष्ट झालेला पुरुष समर्थ असूनही निरुपयोगी होतो. ७९ उपशान्तवणिक्पण्या नष्टहर्षा निराश्रया ।
अयोध्या नगरी चासीनष्टतारमिवाम्बरम् ॥ २॥४८॥३५ (राम वनवासाला गेल्यावर अयोध्येची स्थिति.) वाण्यांची दुकानें बंद झाली, हर्ष नाहीसा झाला, लोकांचा आश्रय तुटल्यासारखा झाला अशा प्रकारे ती अयोध्या नगरी नक्षत्रशून्य आकाशाप्रमाणे निस्तेज दिसू लागली.
८० उपायकुशलो ह्येव जयेच्छवूनतन्द्रितः ॥६।८।१२ ___ उपाययोजनेंत कुशल अशा मनुष्याने आळस टाकून शत्रूस जिंकावें. .८१ उभे सन्ध्ये शयानस्य यत्पापं परिकल्प्यते ।
तच पापं भवेत्तस्य यस्यार्योऽनुमते गतः ॥२७५१४४ (आपल्या निरापराधिपणाविषयी खात्री करून देणारा भरत कौसल्येला म्हणतो) ज्याची अनुमति मिळवून आर्य-श्रीरामचंद्रवनवासाला गेला, त्यास सकाळी व संध्याकाळी निद्रा करणाऱ्याला जें पाप लागते, ते लागावें.
रा. सु. २
For Private And Personal Use Only
Page #216
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
८२ ऋद्धियुक्ता हि पुरुषा न सहन्ते परस्तवम् ॥ २।२६।२५
वैभवयुक्त पुरुषांस दुसऱ्याची स्तुति सहन होत नाही. ८३ एक एव हि वन्ध्यायाः शोको भवति मानसः।
अप्रजास्मीति संतोषो न ह्यन्यः पुत्र विद्यते ॥ २।२०३७ (कौसल्या रामाला म्हणते ) पुत्रा, वंध्येला (मला संतति नाही, असा ) एकच मानसिक शोक असतो; इतर कोणतेही दुःख तिला असत नाही. ८४ एकाङ्गहीनं हस्त्रेण जीवितं मरणाद्वरम् ॥२।९५५.५३ (राम कावळ्याला म्हणतो) मरणापेक्षा (माझ्या ) अस्त्राने एक अवयव कमी होऊन ( तुला ) जिवंत राहणे बरे आहे. ८५ एकैकस्योपकारस्य प्राणान्दास्यामि ते कपे ।
शेषस्येहोपकाराणां भवाम ऋणिनो वयम् ॥७॥४०॥२३ (राम मारुतीला म्हणतात) हे कपे, तुझ्या एकेका उपकाराकरितां मी प्राण देईन. शेष राहिलेल्या उपकारांचेबद्दल आम्ही तुझे ऋणी राहूं. ८६ एतदर्थ हि राज्यानि प्रशासति नराधिपाः। ___यदेषां सर्वकृत्येषु मनो न प्रतिहन्यते ॥२॥५२।२५
राजे लोक याकरितांच राज्य करितात की, (कामक्रोधादिविषयक प्रवृत्ति करणाऱ्या) कोणत्याही कृत्यांत आपला मनोभंग होऊ नये. ८७ एष स्वभावो नारीणामनुभूय पुरा सुखम् ।
अल्पामप्यापदं प्राप्य दुष्यन्ति प्रजहत्यपि ॥२॥३९।२१ स्त्रियांचा असा स्वभाव असतो की, पूर्वी सुखाचा अनुभव घेऊन पुढें अल्पही विपत्ति आली असता, त्या (पतीला) दोष देतात, किंवा त्याचा त्यागही करितात.
For Private And Personal Use Only
Page #217
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ८८ एषा हि प्रकृतिः स्त्रीणामासृष्टे रघुनन्दन ।
समस्थमनुरज्यन्ते विषमस्थं त्यजन्ति च ॥३॥१३॥५ (अगस्त्यमुनि रामाला म्हणतात ) सृष्टि निर्माण झाल्यापासून 'स्त्रियांचा स्वभावच असा दिसून येतो की, चांगल्या स्थितीत (पति) असल्यास त्या त्याचे अनुरंजन करितात. परंतु तो विषम-दरिद्रीस्थितीत असल्यास त्या त्याचा त्याग करितात. ८९ एष्टव्या बहवः पुत्रा गुणवन्तो बहुश्रुताः।
तेषां वै समवेतानामपि कश्चिद्गयां व्रजेत् ॥२॥१०७१३ गुणवंत आणि बहुश्रुत असे अनेक पुत्र असावे, अशी इच्छा (मनुष्याने ) करावी. कारण, त्या एकत्र झालेल्या पुत्रांतून एखादा तरी (पितरांच्या स्वर्गप्राप्त्यर्थ) गयेला जाईल. ९० ऐश्वर्यमदमत्तो हि सर्वोऽहमिति मन्यते ॥ ५/६४।१९
ऐश्वर्याच्या मदानें मत्त झालेला प्रत्येक इसम 'मीच (प्रभु), असें मानतो. ९१ ऐश्वर्ये वा सुविस्तीर्णे व्यसने वा सुदारुणे ।
रज्ज्वेव पुरुषं बद्धा कृतान्तः परिकषेति ॥५॥३७३ अत्यंत विपुल ऐश्वर्याच्या स्थितीत काय, किंवा महाभयंकर संकटाच्या स्थितीत काय, यम पुरुषास दोरीने बद्ध करून आकर्षण करीत असतो. ९२ औरस्यानपि पुत्रान् हि त्यजन्त्यहितकारिणः।
समर्थान्संप्रगृह्णन्ति जनानपि नराधिपाः ॥ २॥२६॥३६ राजे लोक औरस पुत्रांचा, ते अहित करणारे असल्यास, त्याम करितात. आणि समर्थ अशा प्राकृत मनुष्यांचाही संग्रह करितात.
For Private And Personal Use Only
Page #218
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२०
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
९३ कच्चिजानपदो विद्वान् दक्षिणः प्रतिभानवान् । - यथोक्तवादी दूतस्ते कृतो भरत पण्डितः ॥२।१००।३५
(राम म्हणतो) हे भरता, स्वदेशांतील, विद्वान्, हुशार, बुद्धिमान, आज्ञेनुसार वागणारे आणि चतुर दूत तूं ठेविले आहेसना ? (श्लोक ९३ ते १०० यांमध्ये रामाने भरताला कुशल प्रश्न विचारिले आहेत.) ९४ कचित्सहस्रैर्मूर्खाणामेकमिच्छसि पण्डितम् ।।
पण्डितो ह्यर्थकृच्छ्रेषु कुर्यानिःश्रेयसं महत् ॥२॥१००।२२ ., हजारों मूर्खाचा त्याग करून एकाच पांडताचा (सहवास) करण्याचें तूं इच्छितोस ना? कारण, कोणत्याही कार्यासंबंधाने संकट आले असतां पंडितच (तरणोपाय सुचवून ) कल्याण करितो. ९५ कचित्स्वादुकृतं भोज्यमेको नानासि राघव ।
कच्चिदाशंसमानेभ्यो मित्रेभ्यःसंप्रयच्छसि।।२।१०.७५ हे राघवा, (भरता) स्वादिष्ट केलेले भोज्य पदार्थ तूं एकटाच भक्षण करीत नाहींस ना ? त्या पदार्थांची इच्छा करणाऱ्या मित्रांना तूं ते देतोस ना ? ९६ कचिदर्थं च कामं च धर्म च जयतां वर ।
विभज्य काले कालज्ञ सर्वान्वरद सेवसे ॥२॥१००।६३ हे वीरश्रेष्ठा ! तूं कालज्ञआहेस, तसाच वरदही आहेस; तरी धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थाचें तूं वेळा नेमून योग्यकाली सेवन करीत. असतोस ना ? ९७ कच्चिदर्थं विनिश्चित्य लघुमूलं महोदयम् ।
क्षिप्रमारभसे कर्म न दीर्घयसि राघव ।। २।१००।१९ (राम भरताला म्हणतो) हे राघवा, जें अल्प यत्नाने साध्य होणारे व ज्याचें फल मोठे आहे, अशा कार्याचा निश्चय करून ते कार्य त्वरित करितोस ना ? त्या कामी विलंब लावीत नाहीस ना?
For Private And Personal Use Only
Page #219
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२१
९८ कच्चिन्न सर्वे कर्मान्ताः प्रत्यक्षास्तेऽविशङ्कया।
सर्वे वा पुनरुत्सृष्टा मध्यमेवात्र कारणम् ॥२।१००५२ ( राम भरताला विचारतो) तुझे सर्व चाकर निर्भयपणे तुझ्या दृष्टीसमोर येत नाहीत ना? किंवा त्या सर्वांना तूं बंदी केली नाहींस ना ? अशा संबंधांत (राजाने) मध्यम मार्ग धरिलेला बरा. ९९ कचिनिद्रावशं नैपि कच्चित्कालेऽवबुध्यसे ।
कचिच्चापररात्रेषु चिन्तयस्यर्थनैपुणम् ॥ २१००।१७ तूं निद्रावश होत नाहीस ना? तूं योग्य काली जागृत होतोस ना? द्रव्यप्राप्ति कोणत्या उपायाने होईल, याचे चिंतन उत्तररात्रीं करितोस ना? १०० कञ्चिन्मन्त्रयसे नैकः कञ्चिन्न बहुभिः सह ।
कच्चित्ते मन्त्रितो मन्त्रो राष्ट्र न परिधावति ॥२॥१००१८ (राम भरताला विचारतो ) तूं आपल्या स्वतःशीच एकटा अथवा पुष्कळ मंडळीशी मसलत करीत नाहीस ना ? तूं ठरविलेली मसलत अमलांत येण्यापूर्वीच राष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत नाही ना ? १०१ कथं राजा स्थितो धर्मे परदारान्परामृशेत् ॥ ३५०१६
(प्रजापालनरूप) धर्माचे ठिकाणी स्थित असणारा राजा परस्त्रीला कसा बरें स्पर्श करील ? १०२ कन्यापितृत्वं दुःखं हि सर्वेषां मानकाङ्क्षिणाम् ॥७९।१०
सर्व मानी मनुष्यांना पोटीं कन्या येणे म्हणजे खरोखर दुःख होय. १०३ कर्णवन्ति हि भूतानि विशेषेण तुरङ्गमाः।
यूयं तस्मानिवर्तध्वं याचनां प्रतिवेदिताः।। २।४५/१५ ( राम रथांत बसून अरण्यांत जाऊ लागला असतां, द्विजमंडळी रथाच्या घोड्यांना 'तुम्ही परत फिरा' असे म्हणतात) प्राण्यांना कान आहेत, विशेषेकरून अश्वांचे कान तर आधिक तिखट आहेत. म्हणून हे अश्वांनो, आमच्या याचनेकडे लक्ष देऊन तुम्ही परत फिरा. ( बहिन्यांसारखे पुढे जाऊ नका.)
For Private And Personal Use Only
Page #220
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२२
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि
१०४ कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभिः ॥ २/५६।२२ ( राम म्हणतो ) हे लक्ष्मणा, चिरकाल जीविताची इच्छा करणाऱ्यांनी वास्तुशांति करावी.
१०५ कर्म लोकविरुद्धं तु कुर्वाणं क्षणदाचर ।
तीक्ष्णं सर्वजनो हन्ति सर्प दुष्टमिवागतम् || ३ |२९|४
( राम खर राक्षसाला म्हणतो ) हे राक्षसा, प्राप्त झालेल्या दुष्ट सर्पाचा सर्व लोक वध करितात. त्याचप्रमाणें लोकविरुद्ध कर्म करणाऱ्या क्रूर पुरुषाचाही वध करितात.
१०६ कल्याणी बत गाथेयं लौकिकी प्रतिभाति
माम् । एति जीवन्तमानन्दो नरं वर्षशतादपि ।। ६ । १२६।२
( भरत मारुतीला म्हणतो) मनुष्य जिवंत राहिल्यास, शंभर वर्षांनीं कां होईना, त्याला आनंद प्राप्त होतो, ही लोकप्रसिद्ध म्हण कल्याणप्रद आहे, असें मला वाटतें.
१०७ कश्चिदाम्रवणं छित्त्वा पलाशांश्च निषिञ्चति ।
पुष्पं दृष्ट्वा फले गृध्नुः स शोचति फलागमे ॥ २/६३।८ः
जो कोणी आम्रवन तोडून पलाश वृक्षांचें सिंचन करितो, व त्या पळसांचें पुष्प पाहून फळही तसेंच मिळेल, अशी आशा करितो, तो फलप्राप्तिकालीं शोक पावतो.
१०८ कामं दृष्ट्वा मया सर्वा विश्वस्ता रावणस्त्रियः ।
न तु मे मनसा किंचिद्वैकृत्यमुपपद्यते ॥ ५।११।४२
( सीतेचा शोध लावण्यासाठी रावणाच्या अंतःपुरांत शिरलेला मारुति म्हणतो) परपुरुष आपणाला पाहील, अशी यत्किंचितही शंका ज्यांच्या मनांत नाहीं, अशा निःशंकपणें पडलेल्या सर्व रावणस्त्रिया मी पाहिल्या, परंतु या पाहण्यामुळे मनामध्यें कांहींच विकार उत्पन्न झाला नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #221
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२३
rrrrrrrrn.nanewranamamannaman
१०९ कायेन कुरुते पापं मनसा संप्रधार्य तत् ।
अनृतं जिह्वया चाह त्रिविधं कर्म पातकम् ॥२।१०९।२१ मनुष्य प्रथमतः अंत:करणांत पापकर्माचा निश्चय करितो, नंतर त्या पापाचा जिव्हेने उच्चार करितो, व तदनंतर देहाने त्याचें आचरण करितो, असें तीन प्रकारचे पापकर्म आहे. ११० कार्याणां कर्मणा पारं ।
यो गच्छति स बुद्धिमान् ॥६८८।१४ जो कृति करून कार्याच्या पार जातो, तो बुद्धिमान होय. १११ कार्यार्थिनां विमर्दो हि राज्ञांदोषाय कल्पते।।७५३।२४
कार्यार्थी लोकांचा कलह म्हटला म्हणजे राजांना दोषास्पद होतो. ११२ कार्ये कर्मणि निवृत्ते यो बहून्यपि साधयेत् ।
पूर्वकार्याविरोधेन स कार्य कर्तुमर्हति ॥५॥४१॥५ मुख्य कार्य सिद्धीला गेले असता, त्या पूर्वकार्यास विरोध न येईल, अशा रीतीने दुसरीही बहुत कार्ये जो करितो, तोच कार्य करण्याविषयी योग्य होतो. ११३ कालो हि दुरतिक्रमः॥ ३१६८।२१
कालाचें अतिक्रमण करणे ही गोष्ट दुःसाध्य आहे. ११४ किं त्वामन्यत वैदेहः पिता मे मिथिलाधिपः ।
राम जामातरं प्राप्य स्त्रियं पुरुषविग्रहम् ॥ २॥३०॥३ ( वनवासाला येण्यासंबंधाने अनुमति मिळावी म्हणून सीता रामाला म्हणते) हे रामा, माझा पिता मिथिलापति जनक यास, आकृतीने मात्र पुरुष, परंतु वस्तुतः स्त्री अशा तुम्हां जांवयाची प्राप्ति होऊन काय बरे वाटले असेल ? ११५ कीत्यर्थे तु समारम्भः सर्वेषां सुमहात्मनाम् ॥७॥४५।१३ सर्वमहात्मे कीर्ति संपादन करण्याकरितांच खटपट करीत असतात.
For Private And Personal Use Only
Page #222
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
११६ कुलीनमकुलीनं वा
वीरं पुरुषमानिनम् । चारित्रमेव व्याख्याति
शुचिं वा यदि वाशुचिम् ॥ २।१०९।४ पुरुष चांगल्या कुळांतील आहे किंवा वाईट कुळांतील आहे, वीर आहे किंवा अधीर आहे आणि पवित्र आहे की अपवित्र आहे, हे सर्व त्याच्या वर्तनावरून समजून येते. ११७ कृतकृत्या हि वैदेही छायेवानुगता पतिम् ।
न जहाति रता धर्मे मेरुमर्कप्रभा यथा ॥ २४०।२४ छायेप्रमाणे पतीला अनुसरणारी सीता खरोखर धन्य आहे. कारण, सूर्याची प्रभा ज्याप्रमाणे मेरुपर्वताला सोडीत नाही, त्याप्रमाणे धर्माचे ठिकाणी रत असलेली ही सीता आपल्या पतीला सोडून रहात नाही. ११८ कृतं न प्रतिकुर्याद्यः पुरुषाणां हि दूषकः ॥ ४॥३८।२६
पुरुषांमध्ये तोच धर्मनाशक होय की, जो केलेल्या उपकाराची फेड प्रत्युपकाराने करीत नाही. ११९ कृतार्था ह्यकृतार्थानां मित्राणां न भवन्ति ये ।
तान्मृतानपि क्रव्यादाः कृतघ्नानोपभुञ्जते ॥४॥३०१७३ " जे स्वतः कृतार्थ होऊन कृतकार्य न झालेल्या आपल्या मित्रांच्या उपयोगी पडत नाहीत, त्या कृतघ्नांस मेल्यावर श्वानादि मांसभक्षक पशुसुद्धां भक्षण करीत नाहीत. १२० कृते च प्रतिकर्तव्यमेष धर्मः सनातनः ॥५।१।१०६ उपकाराची प्रत्युपकाराने फेड करावी, हा सनातन धर्म होय.
For Private And Personal Use Only
Page #223
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२५
१२१ कृत्स्नाद्भयाज्ज्ञातिभयं सुकष्टं विदितं च नः ॥ ६।१६/८
( रावण विभीषणाला म्हणतो.) कोणत्याही भयापेक्षां भाऊबंदांचें भय फारच कठीण, हैं आम्हांला समजून चुकलें आहे. १२२ कैकेय मामकाङ्गानि मा स्प्राक्षीः पापनिश्चये ।
नहि त्वां द्रष्टुमिच्छामि न भार्या नच बान्धवी ॥। २।४२।६
( राम वनांत निघून गेल्यावर दशरथ कैकेयीला म्हणतो) हे कैकेय, तूं माझ्या अवयवांना स्पर्श करूं नको. हे पापनिश्चये, मला तुझें तोंड पाहण्याची इच्छा नाहीं. तूं माझी भार्या नव्हेस इतकेंच नव्हे परंतु (लांबची कोणी ) नातेवाईक सुद्धां नव्हेस. १२३ कोपं न गच्छन्ति हि सत्त्ववन्तः || ५/५२।१६ सत्त्वशील मनुष्य कधींही कोपवश होत नाहींत. १२४ क्रुद्धः पापं न कुर्यात्कः क्रुद्धो हन्याद्गुरूनपि ।
क्रुद्धः परुषया वाचा नरः साधूनधिक्षिपेत् ।। ५/५५/४ क्रुद्ध झाला असतां कोण बरें पाप करणार नाहीं ? क्रुद्ध पुरुष गुरूचाही वध करलि. क्रुद्ध मनुष्य आपल्या कठोर भाषणानें साधूंनाही टाकून बोलेल.
१२५ क्रोधः प्राणहरः शत्रुः क्रोधो मित्रमुखो रिपुः । क्रोधो ह्यसिर्महातीक्ष्णः
सर्व क्रोधोऽपकर्षति || ७|५९ प्र. २।२१
क्रोध हा प्राणहरणकर्ता शत्रु होय. क्रोध हा मित्रमुख शत्रु ( हितशत्रु) आहे. क्रोध अत्यंत तीक्ष्ण असा खड्ग आहे. क्रोध हा सर्वनाशक आहे.
For Private And Personal Use Only
Page #224
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२६
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१२६ क्षत्रियाणां तु वीराणां वनेषु नियतात्मनाम् ।
धनुषा कार्यमेतावदार्तानामभिरक्षणम् ॥ ३।९।२६ क्षत्रिय वीरांचा धर्म म्हटला म्हणजे, वनांत राहून मनोनिग्रह करणान्या पीडित जनांचे धनुष्याच्या साह्याने रक्षण करणे, हा होय. १२७ क्षत्रियाणामिह धनुर्हताशस्येन्धनानि च ।
समीपतः स्थितं तेजो बलमुच्छ्यते भृशम् ॥३९।१५ अग्नीचें तेज काष्ठाचे योगाने या लोकी जसें वृद्धिंगत होते, त्याप्रमाणे क्षत्रियांजवळ असलेले धनुष्य, त्यांच्या तेजोबलाची वृद्धि करिते. १२८ क्षत्रियैर्धार्यते चापो नातशब्दो भवेदिति ॥ ३३१०१३
( रक्षण होत नसल्यामुळे ) पीडित होऊन लोकांना रडत बसण्याची पाळी येऊ नये, एवढ्याचकरितां क्षत्रियांनी धनुष्य धारण करावयाचे असते. १२९ क्षत्रियो निहतःसंख्ये न शोच्य इति निश्चयः६१०९।१९
क्षत्रिय रणांगणावर पडला असता, त्याबद्दल शोक करूं नये, ही निश्चित गोष्ट आहे. १३० क्षमया हि समायुक्तं मामयं मकरालयः।
असमर्थ विजानाति धिक् क्षमामीदृशे जने ॥६।२१।२० (समुद्राने दर्शन दिले नाही तेव्हां राम लक्ष्मणाला म्हणतो) मी क्षमेचे अवलंबन केले असल्यामुळे हा समुद्र मला अशक्त समजत आहे. म्हणून अशा पुरुषाचे ठिकाणी दर्शविलेल्या क्षमेला धिक्कार. असो.
For Private And Personal Use Only
Page #225
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२७
१३१ गतिं खर इवाश्वस्य हंसस्येव च वायसः।
नान्वेतुमुत्सहे वीर तव मार्गमरिंदम ॥ ६।१२८१५ (भरत रामाला म्हणतो. ) हे शत्रुदमना वीरा, ज्याप्रमाणे घोड्याच्या गतीचे अनुकरण करण्यास गर्दभ असमर्थ आहे, अथवा हंसाची गति स्वीकारण्यास कावळा असमर्थ आहे. त्याप्रमाणे प्रजेचें रक्षण करण्याच्या तुझ्या मार्गाचे अवलंबन करण्यास मीअसमर्थ आहे.. १३२ गतिरेका पतिर्नार्या द्वितीया गतिरात्मजः।
तृतीया ज्ञातयो राजश्चतुर्थी नैव विद्यते ॥ २६१।२४ (कौसल्या दशरथाला म्हणते ) हे राजा, स्त्रियांना पहिली गति म्हणजे पति ही होय. त्यांची दुसरी गति म्हणजे पुत्र, आणि तिसरी.. गति म्हटली म्हणजे ज्ञाति होत. त्यांना चवथी गति (आधार) म्हणून नाही. १३३ गतोदके सेतुबन्धो न कल्याणि विधीयते ॥ २।९।५४
(मंथरा कैकेयीला म्हणते) हे कल्याणि, पाणी निघून गेल्यावर कोणी बांध घालीत नसतात. १३४ गर्जन्ति न वृथा शूरा निर्जला इव तोयदाः ॥६६५।३
शूर लोक, निर्जल मेघांप्रमाणे, व्यर्थ गर्जना करीत नसतात. १३५ गात्रेषु वलयः प्राप्ताः श्वेताश्चैव शिरोरुहाः ।
जरया पुरुषो जीर्णः किं हि कृत्वा प्रभावयेत् २।१०५।२३ (राम भरताला सांगतो) अवयवांवर सुरकुत्या पडतात, मस्तकावरील केस पांढरे होऊन जातात आणि जरेनें मनुष्य जीर्ण होऊन जातो. तेव्हां कोणता उपाय करून हे सर्व टाळण्याला प्राणी समर्थ होणार आहे ?
For Private And Personal Use Only
Page #226
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२८ सार्थश्रीरामायणसुभाषितानि १३६ गायन्ति केचित्प्रहसन्ति केचित्
नृत्यन्ति केचित्प्रणमन्ति केचित् । पठन्ति केचित्प्रचरन्ति केचित्
प्लवन्ति केचित्प्रलपन्ति केचित् ।। ५।६१।१७ (सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेले वानर मधुपान करून तर झाले) कित्येक (वानर ) गाऊ लागले, कित्येक हसू लागले, कित्येक नाचूं लागले, कित्येक प्रणाम करू लागले, कित्येक पठण करू लागले, कित्येक संचार करूं लागले, कित्येक उड्या मारू लागले, तर कित्येक बडबड करूं लागले. १३७ गुणवान्वा परजनः स्वजनो निर्गुणोऽपि वा।
निर्गुणः स्वजनःश्रेयान् यः परः पर एव सः॥६।८७१५ ( इंद्रजित् बिभीषणाला म्हणतो) स्वजन निर्गुण असून दुसरे जरी गुणी असले तरी निर्गुणी स्वजन बरे, परंतु जे परके ते 'परकेच होत. १३८ गुरुलाघवमर्थानामारम्भे कर्मणां फलम् ।
दोषं वा यो न जानाति स बाल इति होच्यते ॥२।६३७ कोणत्याही कर्माला आरंभ करण्याच्या वेळी त्याच्या फलासंबंधाने उत्कृष्टनिकृष्टभाव आणि गुणदोष जो जाणीत नाही त्याला मूर्ख असे म्हणतात. १३९ गुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः । ... उत्पथं प्रतिपन्नस्य कार्य भवति शासनम् ॥ २॥२१॥१३
कार्याकार्यविचार न जाणणारा, दुर्मार्गाला लागलेला, व गर्विष्ठ, अशा गुरूसही दंड करणे योग्य होय.
For Private And Personal Use Only
Page #227
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२९
१४० गृह्यन्ते यदि रोषेण त्वादशोऽपि विचक्षणाः। __ ततः शास्त्रविपश्चित्त्वं श्रम एव हि केवलम् ॥५॥५२।८ (बिभीषण रावणाला म्हणतो) तुझ्यासारखे शहाणे लोक जर क्रोधाधीन होतात, तर मग शास्त्रांमध्ये पांडित्य संपादन करणे म्हणजे केवळ वृथा श्रमच होत. १४१ गोने चैव सुरापे च चौरे भगवते तथा । निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः॥४॥३४।१२
गोहत्या करणाराला, सुरापान करणाराला, चोराला, व्रतभंग करणाराला, सज्जनांनी प्रायश्चित्त सांगितले आहे; परंतु कृतघ्नाला प्रायश्चित्त सांगितले नाही. १४२ गोदावरी प्रवेक्ष्यामि हीना रामेण लक्ष्मण । - आबन्धिष्येऽथवा त्यक्ष्ये विषमे देहमात्मनः॥॥३॥४५॥३७
पिबामि वा विषं तीक्ष्णं प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
न त्वहं राघवादन्यं कदापि पुरुषं स्पृशे ॥ ३१४५।३८ (सीता म्हणते ) हे लक्ष्मणा, रामाचा वियोग झाला असतां मी गोदावरीमध्ये उडी टाकीन, गळ्याला फास लावून घेईन, कड्यावर उभी राहून तेथून आपला देह लोटून देईन, नाहीतर तीक्ष्ण विष सेवन करीन अथवा अग्नीमध्ये प्रवेश करीन. परंतु रामावांचून इतर पुरुषाला मी कधीहि स्पर्श करणार नाही. १४३ गोब्राह्मणहितार्थाय देशस्य च हिताय च।
तव चैवाप्रमेयस्य वचनं कर्तुमुद्यतः ॥ १।२६।५ (विश्वामित्र मुनींनी ताटकेचा वध करण्याविषयी रामाला सांगितलें असतां राम विश्वामित्रांना म्हणतो ) गोब्राह्मणांच्या हिताकरितां आणि देशाच्या कल्याणाकरितां अतयं प्रभावाने युक्त जे आपण त्या आपल्या आज्ञेप्रमाणे वागण्यास मी तयार आहे.
For Private And Personal Use Only
Page #228
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
.wwwwwwwwwwwwwwwwwwwwwww
१४४ चतुर्णामाश्रमाणां हि गार्हस्थ्यं श्रेष्ठमुत्तमम् २।१०६।२२
चारही आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम हाच उत्तम होय. १४५ चन्द्रहीनमिवाकाशं तोयहीनमिवार्णवम् । __अपश्यनिहतानन्दं नगरं ते विचेतसः॥ २।४७११८
(रामाच्या पाठोपाठ गेलेले लोक खिन्न होऊन परत अयोध्येमध्ये आले त्या वेळी ) चंद्रहीन आकाशाप्रमाणे अथवा उदकशून्य सागराप्रमाणे आनंदरहित झालेले नगर त्या भांबावून गेलेल्या लोकांनी अवलोकन केले. १४६ चारेण विदितः शत्रुः पण्डितैर्वसुधाधिपः ।
युद्धे स्वल्पेन यत्नेन समासाद्य निरस्यते ॥ ६२९।२२ शहाण्या राजांनी हेरांकडून ज्याची माहिती मिळविली आहे 'असा शत्रु युद्धभूमीवर प्राप्त झाला असतां, अल्प प्रयत्नाने नाश पावतो. १४७ छिन्ना भिन्ना प्रभिन्ना वा दीप्ता वानौ प्रदीपिता।
रावणं नोपतिष्ठेयं किं प्रलापेन वश्चिरम् ॥ ५।२६।१० (सीता राक्षसस्त्रियांना म्हणते) तुमच्या या पुष्कळ बडबडीचा 'उपयोग काय ? मी छिन्नभिन्न झाले असतां, माझे तुकडे तुकडे झाले असतां, मी अग्नीने भाजून गेले असतां, अथवा पेटलें असतांही रावणाचा स्वीकार करणार नाही. १४८ जानामि शीलं ज्ञातीनां सर्वलोकेषु राक्षस ।
हृष्यन्ति व्यसनेष्वेते ज्ञातीनां ज्ञातयः सदा ॥६।१६।३ ( रावण बिभीषणाला म्हणतो ) हे राक्षसा, त्रैलोक्यामध्ये भाऊबंदांचा स्वभाव कसा असतो, हे मी जाणीत आहे. अरे, भाऊबंदांवर संकटे आली असतां दुसरे भाऊबंद नेहमी आनंद मानीत असतात.
"दृष्यन्ति व्यसनम
) हे राक्षसा
आहे. अरे,
For Private And Personal Use Only
Page #229
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१४९ जीवन्त्या हि स्त्रिया भर्ता दैवतं प्रभुरेव च ॥२।२४।२१
स्त्री जिवंत असतांना पति हेच तिचे दैवत आहे, त्याचप्रमाणे तो तिचा प्रभुही आहे. १५० जीवैच्चिरं वज्रधरस्य पश्चा
च्छची प्रधृष्याप्रतिरूपरूपाम् । न मादृशी राक्षस धर्षयित्वा
पीतामृतस्यापि तवास्ति मोक्षः ॥ ३४८२४ (सीता रावणाला म्हणते ) हे राक्षसा, वज्र धारण करणाऱ्या इंद्राची जी अनुपम सौंदर्यसंपन्न भार्या शची तिचा अपहार केल्यानंतरही कदाचित् पुष्कळ दिवसपर्यंत जिवंत राहणे शक्य आहे; परंतु बलात्काराने मजसारख्या रामभार्येला हरण करून नेल्यावर तूं जरी अमृतपान केलेस तरी मृत्यूपासून तुझी सुटका होणार नाही. १५१ जेतव्यमिति काकुत्स्थो मर्तव्यमिति रावणः ।
धृतौ स्ववीर्यसर्वस्वं युद्धेऽदर्शयतां तदा ॥६।१०७७ रामाने जिंकण्याचा व रावणाने मरण्याचा निश्चय करून आपले सर्व काही सामर्थ्य त्या वेळी युद्धामध्ये प्रगट केले. १५२ ज्येष्ठो भ्राता पिता वापि यश्च विद्यां प्रयच्छति ।
त्रयस्ते पितरो ज्ञेया धर्मे च पथि वर्तिनः ॥४।१८।१३ (राम वालीला म्हणतो) वडील बंधु, पिता आणि जो विद्या शिकवितो तो हे तिघेजण, धर्ममार्गाने चालणान्याचे पिते आहेत असे समजले पाहिजे.
For Private And Personal Use Only
Page #230
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१५३ तडित्पताकाभिरलंकृताना
मुदीर्णगम्भीरमहारवाणाम् । विभान्ति रूपाणि बलाहकानां
रणोत्सुकानामिव वानराणाम् ॥ ४।२८।३१ (वर्षाकालाचे वर्णन ) ज्यांच्याकडून गंभीर आणि मोठा शब्द उच्चारला जात आहे, अशी ही विद्युल्लतारूप पताकांनी शोभणारी मेघांची रूपें युद्धार्थ उत्सुक झालेल्या वानरांसारखीं शोभत आहेत. १५४ ततः सुमन्त्रेण गुहेन चैव
समीयतू राजसुतावरण्ये । दिवाकरश्चैव निशाकरश्च
यथाम्बरे शुक्रबृहस्पतिभ्याम् ॥ २।९९।४१ (भरत शत्रुघ्न वनामध्ये असलेल्या रामाला भेटले ) नंतर सूर्य आणि चंद्र हे जसे आकाशांत शुक्र आणि बृहस्पति यांच्याशी संयुक्त होतात (भेटतात ), त्याप्रमाणे ते राजपुत्र-रामलक्ष्मण-अरण्यांत. सुमंत्र (प्रधान) आणि गुह यांना भेटले. १५५ तदद्भुतं स्थैर्यमेवक्ष्य राघवे
समं जनो हर्षमवाप दुःखितः। न यात्ययोध्यामिति दुःखितोऽभवत्
स्थिरप्रतिज्ञत्वमवेक्ष्य हर्षितः॥२।१०६।३४ रामाच्या आंगचे (पितृवचनपालनरूप ) अद्भुतं स्थैर्य पाहून लोकांना दुःख झाले, तसाच हर्षही झाला. रामचंद्र अयोध्येला येत नाही, म्हणून दुःख झाले, त्याप्रमाणे त्याच्या प्रतिक्षेची स्थिरता पाहून त्यांना हर्ष झाला.
For Private And Personal Use Only
Page #231
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
ल
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि
१५६ तद्ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकाङ्क्षितम् । करिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते ।। २ ।१८।३०
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
( राम म्हणतो ) देवि ( कैकेयि, ) राजाच्या मनांत जो कांहीं अभिप्राय असेल, तो सांग. राम कधींही ( परस्परविरुद्ध ) दोनदां बोलत नसतो.
१५७ तन्मे दहति गात्राणि विष पीतमिवाशये ।
हा नाथेति प्रिया सा मां ह्रियमाणा यदब्रवीत् || ६ |५/७
यच्च दानं प्रयच्छति ।
३३
( राम लक्ष्मणाला म्हणतो ) उदरामध्यें विष घेतलें असतां तें ज्याप्रमाणें गात्रं दग्ध करून टाकितें, त्याप्रमाणें रावण हरण करून नेत असतांना 'हे नाथ' असें जें ती सीता मला उद्देशून म्हणाली तें म्हणणें माझीं गात्रें दग्ध करीत आहे.
१५८ तपते यजते चैव
क्रोधेन सर्वं हरति
तस्मात्क्रोधं विसर्जयेत् ॥ ७७५९ प्र. २।२२
मनुष्य जें कांहीं तप करितो, यजन करितो, अथवा दान देतो, त्या सर्वांचा क्रोध नाश करितो; म्हणून क्रोधाचा त्याग करावा. १५९ तपो हि परमं श्रेयः संमोहमितरत्सुखम् ॥ ७१८४/९
तप हैं परम कल्याण करणारें आहे; इतर सुख मोह पाडणारें आहे. १६० तीक्ष्णकामास्तु गन्धर्वास्तीक्ष्णकोपा भुजंगमाः ।
मृगाणां तु भयं तीक्ष्णं ततस्तीक्ष्णक्षुधा वयम् ||४|५९।९ ( गृधराज संपाति वानरांना म्हणतो ) ज्याप्रमाणें गंधर्वांची कामवासना तीक्ष्ण असते, सर्पाचा क्रोध तीक्ष्ण असतो आणि मृगांचें भय तीक्ष्ण असतें त्याप्रमाणें आम्हां गृध्रपक्ष्यांची क्षुधा तीक्ष्ण असते. रा. सु. ३
For Private And Personal Use Only
Page #232
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३४
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१६१ तीक्ष्णमल्पप्रदातारं प्रमत्तं गर्वितं शठम् ।
व्यसने सर्वभूतानि नाभिधावन्ति पार्थिवम्।।३।३३।१५ जो ( आपल्या प्रधानादिकांशी) कठोरपणाने वागतो, त्यांस वेतन वगैरे स्वल्प प्रमाणाने देतो, जो उन्मत्तपणे वागतो, गर्व धारण करितो, गुप्तपणे लोकांचे अहित करितो, अशा राजावर संकट आले असतां, त्याच्या संरक्षणाकरितां कोणीही त्याचे स्वजनहीं-धावून येत नाहीत. १६२ त्वद्विधा न हि शोचन्ति सततं सर्वदर्शनाः ।
सुमहत्स्वपि कृच्छेषु रामानिर्विण्णदर्शनाः ॥३॥६६।१४ (लक्ष्मण म्हणतो ) हे रामा, तुझ्यासारखे सर्वज्ञानसंपन्न लोक, केवढीही मोठी संकटे आली, तरी विषादरहित असतात. कधीही शोक करीत नाहीत. १६३ त्वं तु बालस्वभावश्च बुद्धिहीनश्च राक्षस ।
ज्ञातव्यं तं न जानीषे कथं राजा भविष्यसि ॥ ३॥३३॥८ (शूर्पणखा रावणाला म्हणते.) हे राक्षसा, तुझा बालस्वभाव अजून गेला नाही. तूं बुद्धिहीन आहेस. जे जाणण्यास योग्य तें तूं जाणत नाहीस. तूं राजा कसा होणार ? १६४ त्वं पुनर्जम्बुकः सिंहीं मामिहेच्छसि दुर्लभाम् ।
नाहं शक्या त्वया स्प्रष्टमादित्यस्य प्रभा यथा ३।४७।३७ (सीता रावणाला म्हणते ) हूं तर कोल्हा असून दुर्लभ अशा सिंहपत्नीची-माझी-इच्छा करीत आहेस; सूर्यापासून सूर्यप्रभा वेगळी करून स्पर्श करणे जसे शक्य नाही, त्याप्रमाणे तूं मला स्पर्श करणे ही गोष्ट शक्य नाही.
For Private And Personal Use Only
Page #233
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१६५ दण्ड एव परो लोके पुरुषस्येति मे मतिः।
धिक्क्षमामकृतज्ञेषु सान्त्वं दानमथापि वा॥६।२२।४६ (नल वानर रामाला म्हणतो अकृतज्ञ अनुपकारी पुरुषाला) दंड करणे, ही गोष्ट पुरुषाची मोठी कार्यसिद्धि घडवून आणणारी आहे, असे मला वाटते. कृतघ्नाला क्षमा करणे, सामोपचाराच्या गोष्टी सांगणे, किंवा दान करणे, हे धिक्कारास्पद आहे. १६६ दद्यान्न प्रतिगृह्णीयात्सत्यं ब्रूयान्न चानृतम् ।
अपि जीवितहेतोहि रामः सत्यपराक्रमः ॥ ५।३३।२५ (लंकेमध्ये अशोक वनांत सीता दृष्टीस पडल्यावर तिच्यापुढे मारुतीने श्रीरामचंद्राचे गुण वर्णन केले) सत्यपराक्रमी राम दान करील, प्रतिग्रह करणार नाहीं; सत्यभाषण करील, असत्य बोलणार नाही. किंबहुना जीविताचाही त्याग करील, परंतु सत्य सोडणार नाही. १६७ दीनो वा राज्यहीनो वा यो मे भर्ता स मे गुरुः ।
तं नित्यमनुरक्तास्मि यथा सूर्य सुवर्चला ॥ ५।२४।९ (सीता रावणाला म्हणते ) माझा भर्ता, मग तो दीन असो, अगर राज्यहीन असो, तो मला पूज्य आहे. ज्याप्रमाणे सूर्यपत्नी सुवर्चला सूर्याचे ठिकाणीं अनुरक्त असते, त्याप्रमाणे मी नेहमी त्या रामाचेच ठिकाणीं अनुरक्त आहे. १६८ दीप्तमग्निमरण्यं वा यदि रामः प्रवेक्ष्यति ।
प्रविष्टं तत्र मां देवि त्वं पूर्वमवधारय ॥ २।२१।१७ (लक्ष्मण कौसल्येला म्हणतो ) हे देवि, प्रज्वलित अग्नीत, अथवा अरण्यांत जर राम प्रवेश करील, तर त्याच्या आधीच मी त्या ठिकाणी प्रवेश करीन हे तूं पक्के समज.. १६९ दुःखितः सुखितो वापि सख्युनित्यं सखा गतिः४।८।४० दुःखी असो, अगर सुखी असो, मित्राला मित्रच गति होय.
For Private And Personal Use Only
Page #234
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१७० दुःखे मे दुःखमकरोत्रंणे क्षारमिवाददाः।
राजानं प्रेतभावस्थं कृत्वा रामं च तापसम् ॥२।७३३ (भरत कैकेयीला म्हणतो) राजाला ठार मारून व रामाला तपस्वी करवून, व्रणावर क्षाराचे सिंचन करावे, त्याप्रमाणे तूं माझ्या दुःखावर दुःखाची डागणी दिली आहेस. १७१ दुर्बलस्य त्वनाथस्य
राजा भवति वै बलम् ॥ ७.५९ प्र. ३२२२ दुर्बल व अनाथ यांचे बल म्हटले म्हणजे राजा होय. १७२ दुर्लभं हि सदा सुखम् ॥ २।१८।१३
नेहमी सुख मिळणे म्हणजे दुर्लभ आहे. १७३ दुर्लभस्य च धर्मस्य जीवितस्य शुभस्य च ।
राजानो वानरश्रेष्ठ प्रदातारो न संशयः॥४।१८।४२ ( राम वालीला म्हणतो ) हे वानरश्रेष्ठा, दुर्लभ धर्म, जीवित आणि कल्याण यांची (प्रजेला ) प्राप्ति करून देणारे राजेच आहेत. यांत संशय नाही. १७४ दुःशीलः कामवृत्तो वा धनैर्वा परिवर्जितः।
स्त्रीणामार्यस्वभावानां परमं दैवतं पतिः ॥२।११७।२४ वाईट आचरणाचा, स्वेच्छाचारी किंवा धनहीन असा जरी पति असला, तरी तो सुस्वभावी स्त्रियांना परम देवतच होय. १७५ दृश्यमाने भवेत्प्रीतिः सौहृदं नास्त्यदृश्यतः।
नाशयन्ति कृतघ्नास्तु न रामो नाशयिष्यति।।५।२६।३९ (लंकेमध्ये कारागृहांत पडलेली सीता विचार करते ) दृष्टीसमोर असलेल्या मनुष्याचे ठिकाणी प्रेम कायम असते. तेंच मनुष्य दृष्टीआड झाले असता त्याच्यासंबंधानें प्रेम कायम रहात नाही. परंतु (सांप्रत असेही म्हणता येणार नाही.) कारण कृतघ्न पुरुष दृष्टीआड झालेल्या मनुष्यावरील प्रेम नाहींसें करतात, तसें राम करणार नाही.
For Private And Personal Use Only
Page #235
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
अचन एकून समजावी, उच्चा
१७६ दृष्टपूर्वं न ते रूपं पादौ दृष्टौ तवानधे ।
कथमत्र हि पश्यामि रामेण रहितां वने ॥ ७४८।२२ ('तूं माझ्याकडे समक्ष बघून जा ' असें सीतेने लक्ष्मणाला सांगितले असतां लक्ष्मण सीतेला म्हणतो) हे निष्पापे (सीते, ) तुझें रूप मी पूर्वी पाहिलेले नाही. तुझे चरण मात्र मी पाहिलेले आहेत. ह्या वनांत राम संनिध नसतांना मी तुझ्याकडे कसा बरें पाहूं ? १७७ दृष्टा देवीति हनुमद्वदनादमृतोपमम् ।
आकर्ण्य वचनं रामो हर्षमाप सलक्ष्मणः ॥ ५/६४।४३ हनुमंताच्या तोंडून आपण देवी (सीता) पाहिली, असें अमृततुल्य वचन ऐकून लक्ष्मणाला व रामाला परम हर्ष झाला. (आनंदाची वार्ता लौकर समजावी, अशी सर्वांना स्वाभाविक उत्सुकता असते, म्हणून मारुतीने वाक्य उच्चारतांना देखील त्यांतल्या त्यांत जो महत्त्वाचा शब्द 'दृष्टा' हाच आरंभी उच्चारला आहे.) १७८ देशकालविहीनानि कर्माणि विपरीतवत् ।
क्रियमाणानि दुष्यन्ति हवींष्यप्रयतेष्विव ॥ ६।६३६६ अयोग्य ठिकाणी व अयोग्यवेळी घडणारी विपरीतकर्मे असंस्कृत अग्नीमध्ये टाकलेल्या हविर्द्रव्याप्रमाणे दुःखाला कारणीभूत होतात. १७९ देशे देशे कलत्राणि देशे देशे च बान्धवाः ।
तंतु देशं न पश्यामि यत्र भ्राता सहोदरः॥६।१०१।१४ किंतु राज्येन दुर्धर्ष लक्ष्मणेन विना मम । कथं वक्ष्याम्यहं त्वम्यां सुमित्रां पुत्रवत्सलाम् ॥
६।१०१।१५ . (युद्धामध्ये रावणाने लक्ष्मणाला पाडिले असतां राम शोक करितो.) ठिकठिकाणी भार्या आहेत व ठिकठिकाणी बांधवही आहेत; परंतु लक्ष्मणासारखा भ्राता कोठे दृष्टीस पडेल असे मला 'वाटत नाही. हे आंजक्य, तुज लक्ष्मणावांचून मला राज्याशी काय कर्तव्य आहे ? पुत्रवत्सल सुमित्रा मातेला मी आतां काय बरें सांगू?
For Private And Personal Use Only
Page #236
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१८० दैवतं हि पतिः स्त्रियाः ।। ७९५।१०
स्त्रीचे दैवत म्हणजे पति होय. १८१ दैवं पुरुषकारेण यः समर्थः प्रबाधितुम् ।
न देवेन विपन्नार्थः पुरुषः सोऽवसीदति ॥ २।२३।१८ जो पुरुष आपल्या पराक्रमाने देवाचा निरास करण्यास समर्थ असतो, त्याचा दैवाने कार्यनाश झाला, तरी तो खचून जात नाही. १८२ द्विधा भज्येयमप्येवं न नमेयं तु कस्यचित् ।
एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः॥६॥३६।११ (रावण माल्यवान राक्षसाला म्हणतो) प्रसंग पडल्यास माझ्या ( कळकाप्रमाणे ) दोन चिरफळ्याही होऊन जातील परंतु मी कोणाच्याही पुढे नम्र होणार नाही. हा माझा स्वाभाविक दोष आहे. परंतु स्वभाव पालटतां येणे अशक्य आहे. १८३ धनत्यागः सुखत्यागो देशत्यागोपि वानघ ।
वयस्यार्थे प्रवर्तन्ते स्नेहं दृष्ट्वा तथाविधम् ॥ ४।८९ ( सुग्रीव रामाला म्हणतो) हे निष्पापा, तशा प्रकारचा स्नेह पाहून, त्या स्नेह्याकरितां द्रव्याचा, सुखाचा किंवा देशाचाही त्याग केला जातो. १८४ धन्याः खलु महात्मानो ये बुद्धया कोपमुत्थितम् ।
निरुन्धन्ति महात्मानो दीप्तमग्निमिवाम्भसा ।।५।५५।३ प्रदीप्त झालेला अग्नि ज्याप्रमाणे उदकाने विझवून टाकितात, त्याप्रमाणे उत्पन्न झालेला क्रोध जे महात्मे आपल्या बुद्धीनें नाहींसा करतात ते खरोखर धन्य होत.
For Private And Personal Use Only
Page #237
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३९
१८५ धर्ममर्थं च कामं च काले यस्तु निषेवते ।
विभज्य सततं वीर स राजा हरिसत्तम ॥ ४।३८।२१ ( राम सुग्रीवाला म्हणतो ) हे वानरश्रेष्ठ वीरा, जो धर्म, अर्थ आणि काम यांचे कालविभागाने त्या त्या काळी सेवन करितो तोच ( खरा) राजा होय. १८६ धर्मलोपो महांस्तावत्कृते ह्यप्रतिकुर्वतः ।
अर्थलोपश्च मित्रस्य नाशे गुणवतो महान् ॥४॥३३॥४७ उपकाराबद्दल प्रत्युपकार न करणान्याच्या हातून मोठा धर्मलोप होतो. त्यामुळे गुणवान् मित्राच्या मैत्रीचा नाश होऊन मोठी अर्थहानिही होते. १८७ धर्मात्प्रच्युतशीलं हि पुरुषं पापनिश्चयम् ।
त्यक्त्वा सुखमवाप्नोति हस्तादाशीविषं यथा॥६८७।२२ हातांतून सर्पास टाकिलें असतां जसें सुख होते, त्याचप्रमाणे धर्मभ्रष्ट पापमति पुरुषाचा त्याग केला असतां सुख होते. १८८ धर्मादर्थः प्रभवति धर्मात्प्रभवते सुखम् ।
धर्मेण लभते सर्व धर्मसारमिदं जगत् ॥ ३।९।३० धर्मापासून अर्थलाभ होतो, धर्मापासून सुख होते. धर्मापासून सर्व काही प्राप्त होते. हे जग म्हणजे धमांच्या आश्रयावर आहे. १८९ धर्मेण राष्ट्रं विन्दत धर्मेणैवानुपालयेत् ।
धर्माच्छरण्यतां याति राजा सर्वभयापहः।।७।५९५.२०१५ धर्माने राजाला राष्ट्र प्राप्त होत असून धर्माच्याच योगानें तो प्रजेचें परिपालन करण्यास समर्थ होतो. धर्माच्याच योगाने राजा सर्व भयांचे निवारण करणारा होत असल्यामुळे शरण जाण्यास तो योग्य होत असतो.
For Private And Personal Use Only
Page #238
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४०
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१९. धर्मो हि परमो लोके धर्मे सत्यं प्रतिष्ठितम् ॥२२१४१ । लोकांमध्ये धर्म हा अत्यंत श्रेष्ठ आहे, आणि धर्माच्याच ठिकाणी सत्य प्रतिष्ठित आहे. १९१ धर्मो हि श्रूयते पक्ष अमराणां महात्मनाम् ।।
अधर्मो रक्षसां पक्षो ह्यसुराणां च राक्षस ॥६।३५।१४ (मातामह माल्यवान रावणाला म्हणतो) हे राक्षसा, धर्म हा महात्म्या देवांचा पक्ष आहे, आणि अधर्म हा राक्षस आणि असुर यांचा पक्ष आहे, असें ऐकण्यांत येते. १९२ धर्षितं मर्षणीयं च चेष्टितं कृतकर्मणाम् ॥ ५।६३३३०
(सुग्रीव दधिमुखाला म्हणतो. सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेल्या वानरांनी मधुवन फस्त करून टाकिलें.) हे वानर कृतकार्य असल्यामुळे, त्यांची दांडगाई आणि त्यांच्या चेष्टा क्षम्य आहेत. १९३ धारणाद्धर्ममित्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः।
यस्माद्धारयते सर्व त्रैलोक्यं सचराचरम् ॥७५९/प्र.२१७ धारणामुळे 'धर्म' असें नांव प्राप्त झाले आहे. प्रजा धर्मानं धारण केल्या जातात, याच कारणास्तव सर्व स्थावरजंगम त्रैलोक्याचे धारण धर्म करीत असतो. १९४ धारणाद्विद्विषां चैव धर्मेणारञ्जयन्प्रजाः।
तस्माद्धारणमित्युक्तं स धर्म इति निश्चयः॥७५९प्र.२८ शत्रूचे-अधर्माचें-नियमन करून व न्यायाला अनुसरून धर्म, प्रजांचें अनुरंजन करीत असतो. असा जो धर्म त्यासच 'धारण' असें निश्चित म्हटले आहे. १९५ धिगस्तु परवश्यताम् ।।५।२५।२० परवशतेला धिक्कार असो.
For Private And Personal Use Only
Page #239
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१९६ धिगस्तु योषितो नाम शठाः स्वार्थपरायणाः।
न ब्रवीमि स्त्रियः सर्वा भरतस्यैव मातरम्।।२।१२।१०० ( दशरथ म्हणतो) ज्या स्वार्थपरायण लबाड स्त्रिया आहेत, त्यांना धिक्कार असो. सर्व स्त्रियांविषयी मी बोलत नाही. भरताच्या मातेला मात्र माझं बोलणे लागू आहे. १९७ धुरमेकाकिनां न्यस्तां वृषभेण बलीयसा ।
किशोरवद्गुरुं भारं न वोढुमहमुत्सहे ॥६।१२८।३ ( भरत रामाला म्हणतो ) ज्याप्रमाणे एकाद्या बलिष्ठ बैलाने आपल्या खांद्यावरील जोखडाचा मोठा भार (जवळील) कोवळ्या गोह्यावर लादला असतां तो त्या वत्साच्याने वाहवत नाही, तसा मी हा मोठा राज्यभार वाहण्यास उत्साह पावत नाही. १९८ धृतिप्रवालः प्रसभाग्यपुष्प
___ स्तपोबलः शौर्यनिबद्धमूलः । रणे महानाक्षसराजवृक्षः
संमर्दितो राघवमारुतेन ॥ ६।१०९।१० ( रणांगणांत रावण मरून पडल्यानंतर बिभीषण म्हणतो) धैर्य हेच ज्याचे कोमल पल्लव, हट्ट हेच ज्याचे उत्कृष्ट पुष्प, तप हेच ज्याचें बल आणि शौर्य हेच ज्याचें खोल गेलेले मूळ, असा राक्षसराजरूप प्रचंड वृक्ष रणामध्ये रामरूप वायूनें उलथून पाडिला. १९९ न कश्चिन्नापराध्यति ॥४॥३६।११ ज्याच्याकडून अपराध घडत नाही, असा कोणी नाही.
For Private And Personal Use Only
Page #240
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२०० न कालस्यास्ति बन्धुत्वं न हेतुर्न पराक्रमः।
न मित्रज्ञातिसम्बन्धः कारणं नात्मनो वशः॥४।२५।७ कालाला बंधुत्व नाही, त्याला कोणत्याही कारणाची गरज लागत नाहीं; त्याला फिरविण्यास पराक्रम समर्थ होत नाही, मित्र व ज्ञातिजन यांचा संबंधही त्याला लागत नाही, तो कोणाच्याही अधीन राहत नाही. २०१ न कालादुत्तरं किंचित्परं कर्म उपासितुम् ॥ ४।२५।३
वेळ निघून गेली म्हणजे कोणतेही सत्कर्म करितां येत नाही. २०२ न कुलेन न रूपेण
न दाक्षिण्येन मैथिली। मयाधिका वा तुल्या वा
तत्तु मोहान बुध्यसे ॥६।१११२८ ( मरण पावलेल्या रावणाकडे पाहून त्याची स्त्री मंदोदरी विलाप करते ) कुलाने, रूपाने अथवा सरळस्वभावाने सीता माझ्यापेक्षा जास्त नाही, इतकेच नव्हे, तर माझ्या बरोबरीचीही नाही; परंतु मोहामुळे तुला या गोष्टीचा उमज पडला नाही. २०३ न खल्वद्यैव सौमित्रे
जीवितं जाह्नवीजले। त्यजेयं राजवंशस्तु
भर्तुर्मे परिहास्यते ॥ ७४८८ (सीता म्हणते) हे लक्ष्मणा, गंगेच्या पाण्यांत मी आज प्राणत्याग करीत नाही. तसे केल्यास (मी गर्भवती असल्याकारणाने) पतीचा राजवंश नष्ट होईल.
For Private And Personal Use Only
Page #241
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि २०४ नखैस्तुदन्तो दशनैर्दशन्त
स्तलैश्च पादैश्च समापयन्तः । मदात्कपि ते कपयः समन्ता
न्महावनं निर्विषयं च चक्रुः ॥ ५।६१२४ (सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेले वानर दधिमुखाने रक्षण केलेल्या मधुवनांत शिरले व त्याला न जुमानतां तेथे त्यांनी धुमाकूळ घातला.) काही जण नखांनी त्या दधिमुखाचे बोचकारे काढू लागले, काहीजण दांतांनी त्याला चावू लागले, आणि काहीजण चपराकांनी व लाथांनी त्याला मृतप्राय करूं लागले. असो. अशा रीतीने मद चढल्यामुळे त्या वानरांनी त्या सर्व महावनांतील यत्किंचितही योग्य वस्तु शिल्लक ठेविली नाही. २०५ न च कर्मसु सीदन्ति महत्स्वमिततेजसः ॥ ५।६८।१९ , महातेजस्वी लोक मोठ्या कामांत कधीही श्रम पावत नाहीत. ( खचून जात नाहीत.) २०६ न च पश्यामि सदृशं पृथिव्यां तव किंचन ।
सदृशं यत्प्रियाख्याने तव दत्त्वा भवेत्सुखम् ६।११३।१९ ( रामाने रावणाचा वध केला ही आनंदाची वार्ता मारुतीच्या मुखांतून ऐकल्यावर सीता म्हणते हे मारुते, ) तूं जी प्रियवार्ता कथन केलीस, त्याबद्दल योग्य देणगी तुला देऊन सुख पावेन, अशी एकही वस्तु पृथ्वीवर मला दिसत नाही. २०७ न च सीता त्वया हीना न चाहमपि राघव ।
मुहूर्तमपि जीवावो जलान्मत्स्याविवोद्भुतो ॥ २॥३५॥३१ (लक्ष्मण म्हणतो) हे राघवा, उदकांतून बाहेर काढलेले मासे ज्याप्रमाणे जिवंत राहणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे तुझा वियोग झाला असतां, सीतेला अथवा मला थोडावेळही जिवंत राहणे अशक्य आहे.
For Private And Personal Use Only
Page #242
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२०८ न चातिप्रणयः कार्यः कर्तव्योप्रणयश्च ते ।
उभयं हि महादोषं तस्मादन्तरदृग्भव ॥ ४।२२।२३ (सुग्रीवाबरोबर कसे वागावें याविषयी मरणोन्मुख वाली आपल्या अंगद पुत्राला उपदेश करतो. ) सुग्रीवाशी तूं अति लगटपणाही करूं नकोस, व तुटकपणानेही वागू नकोस; कारण ही दोन्ही मोठी अनर्थावह आहेत. म्हणून तूं मध्यम मार्गाकडे लक्ष देऊन वागत जा. २०९ न चिरं पापकर्माणः क्रूरा लोकजुगुप्सिताः ।
ऐश्वर्य प्राप्य तिष्ठन्ति शीर्णमूला इव माः ॥३।२९।७ ज्यांची मुळे छिन्न झाली आहेत, असे वृक्ष वांचत नाहीत; त्याप्रमाणे जे क्रूर असून पापकर्मे करणारे असतात, व तेणेकरून लोकनिंदेस पात्र झालेले असतात, त्यांस ऐश्वर्य प्राप्त झाले, तरी त्याचा ते चिरकाल उपभोग घेऊ शकत नाहीत. २१० न चिरात्प्राप्यते लोके पापानां कर्मणां फलम् ।
सविषाणामिवान्नानां भुक्तानां क्षणदाचर ॥ ३।२९।९ (राम खर राक्षसाला म्हणतो) हे निशाचरा, भक्षण केलेल्या सविष अन्नाचे फल प्राप्त होण्यास जसा फार वेळ लागत नाही, तसा जगामध्ये पापकर्माचे फळ प्राप्त होण्यास फार वेळ लागत नाही. २११ न तत्कुर्यादसिस्तीक्ष्णः सर्पो वा व्याहतः पदा।
अरिवो नित्यसंक्रुद्धो यथात्मा दुरनुष्ठितः।।७५९प्र.२।२५ कुमार्गाला लागलेलें मन ज्याप्रमाणे घात करते, त्याप्रमाणे तीक्ष्ण खड्ग, शेपटीवर पाय दिलेला सर्प किंवा नेहमों क्रुद्ध असलेला शत्रुदेखील घात करीत नाही.
For Private And Personal Use Only
Page #243
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि २१२ न तत्समाचरेद्धीरो यत्परोऽस्य विगर्हयेत् । _यथात्मनस्तथान्येषां दारा रक्ष्या विमर्शनात्॥३॥५०८
(जटायु रावणाला म्हणतो) दुसरा ज्याला नांव ठेवील तें कर्म विचारी पुरुषाने कधीही करू नये. आपल्या स्त्रीप्रमाणेच परस्त्रीचेही परपुरुषाच्या स्पर्शापासून रक्षण केले पाहिजे.. २१३ न तं पश्याम्यहं लोके परोक्षमपि यो नरः।
स्वमित्रोऽपि निरस्तोऽपि योऽस्य दोषमुदाहरेत्।।२।२१।५ (लक्ष्मण कौसल्येला म्हणतो) अपमान करून सोडलेला हाडवैरी जरी झाला, तरी रामाच्या मागेंसुद्धा त्याचा दोष काढणारा पुरुष या जगतामध्ये कोणी असेलसा मला दिसत नाही. २१४ न तु सद्योऽविनीतस्य दृश्यते कर्मणः फलम् ।
कालोऽप्यङ्गीभवत्यत्र सस्यानामिव पक्तये ॥३१४९।२७. बेफामपणे केलेल्या कृत्याचें फळ ताबडतोब दृष्टीस पडत नाही. कारण धान्ये परिपक्व होण्यास ज्याप्रमाणे कालाची अपेक्षा आहे.. त्याप्रमाणे कर्माचे फल प्राप्त होण्यास कालाची अपेक्षा आहे. २१५ न ते मनुष्या देवास्ते ये चारु शुभकुण्डलम् ।
मुखं द्रक्ष्यन्ति रामस्य वर्षे पञ्चदशे पुनः॥ २॥६४।६८ ( मरणोन्मुख दशरथराजा म्हणतो) रामचंद्राचे सुंदर कुंडलमंडित मनोहर मुख पंधराव्या वर्षी जे पुनः पाहातील, ते मनुष्य नव्हेत,. तर साक्षात् देव होत. २१६ न त्वां पश्यामि कौसल्ये साधु मां पाणिना स्पृश ।
रामं मेऽनुगता दृष्टिरद्यापि न निवर्तते ॥ २॥४२॥३४ ( राम वनवासाला गेल्यामुळे दुःखी झालेला दशरथराजा मध्यरात्री कौसल्येला म्हणतो.) हे कौसल्ये, तूं मला दिसत नाहीस. तूं मला आपल्या हस्ताने स्पर्श कर बरें! माझी दृष्टि रामाच्या बरोबर गेली आहे, ती त्यापासून निवृत्त होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #244
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४६
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२१७ न त्वेवानागते काले देहाच्यवति जीवितम् ।।२।३९।५
काल प्राप्त झाल्याशिवाय देहापासून जीवित नष्ट होत नाही. २१८ न दूतवध्यां प्रवदन्ति सन्तो
दूतस्य दृष्टा बहवो हि दण्डाः ॥ ५।५२।१४।। दूताचा वध करण्यास सज्जनांनी सांगितले नाही. दूताला इतर दंड सांगितले आहेत. २१९ न देशकालौ हि यथार्थधर्मा
ववेक्षते कामरतिर्मनुष्यः ॥ ४।३३।५५ कामासक्त झालेल्या मनुष्याला देशकालांचे भान राहात नाहीं आणि तो धर्म व अर्थ या पुरुषार्थाचीही पर्वा करीत नाही. २२० न नूनं चात्मनः श्रेयः पथ्यं वा समवेक्षसे । __ मृत्युकाले यथा मर्यो विपरीतानि सेवते ॥ ३॥५३॥१७ (सीता रावणाला म्हणते ) स्वतःला कोणती गोष्ट तात्काल किंवा परिणामी सुखावह होणारी आहे, याचा विचार तूं खरोखर मुळींच करीत नाहीस. मृत्यु समीप आलेला मनुष्य ज्याप्रमाणे विपरीत कृत्यांचे अवलंबन करूं लागतो, त्याप्रमाणे तूं करीत आहेस. २२१ नन्दन्त्युदित आदित्ये नन्दन्त्यस्तमितेऽहनि । ___ आत्मनो नावबुध्यन्ते मनुष्या जीवितक्षयम्॥२।१०५।२४
सूर्योदय झाला असतां मनुष्ये आनंदित असतात, आणि दिवस अस्ताला गेला असतांही आनंदीच असतात. परंतु आपल्या जीविताचा क्षय होत आहे, हे त्यांना समजत नाही.
For Private And Personal Use Only
Page #245
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४७
२२२ न परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्रः खादितुमिच्छति ।
एवमेव नरव्याघ्रः परलीढं न मन्यते ॥२।६१।१६ (कौसल्या दशरथाला म्हणते) ज्याप्रमाणे व्याघ्र दुसन्याने आणिलेलें भक्ष्य खाण्याची इच्छा करीत नाही, त्याचप्रमाणे श्रेष्ठ पुरुष दुसन्याचे उष्टें कधी घेत नाही. २२३ न पापानां वधे पापं विद्यते शत्रुसूदन ॥५।१२।११
(रावण बिभीषणाला म्हणतो) हे शत्रुनाशका, पाप्याचा वध करण्यांत पाप कधीही लागत नाही. २२४ न पिता नात्मजो वात्मा न माता न सखीजनः।
इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गतिः सदा ॥२।२७६ ( सीता रामाला म्हणते ) इहलोकीं, आणि परलोकीही स्त्रियांस पिता, पुत्र, आत्मा (स्वतः ती,) माता, किंवा सख्या यांतून एकही गति नसून त्यांची गति म्हणजे एक पतिच होय. २२५ न पित्र्यमनुवर्तन्ते मातृकं द्विपदा इति ।
ख्यातो लोकप्रवादोऽयं भरतेनान्यथा कृतः॥३॥१६॥३४ मनुष्ये पित्याच्या स्वभावाचे अनुकरण न करितां मातेच्या स्वभावाचे अनुकरण करितात, म्हणून लोकांत प्रसिद्धि आहे, ती भरताने खोटी करून दाखविली. (भरत कैकेयीच्या वळणावर गेला नाही.) २२६ न बुद्धिपूर्व नाबुद्धं स्मरामीह कदाचन ।
मातृणां वा पितुवोहं कृतमल्प च विप्रियम् ।।२।२२।८ ( राम लक्ष्मणाला म्हणतो) मातांना अथवा पित्याला अप्रिय असलेली क्षुल्कही गोष्ट समजून अथवा न समजून कधीही केल्याचे मला स्मरत नाही.
For Private And Personal Use Only
Page #246
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२२७ न मे दुःखं प्रिया दूरे न मे दुःखं हृतेति च ।
एतदेवानुशोचामि वयोऽस्या ह्यतिवर्तते ॥ ६।५।५ (राम लक्ष्मणाला म्हणतो) प्रिया दूर झाली म्हणून मी शोक करीत नाही किंवा तिचे शत्रूने हरण केले म्हणूनही मला दुःख नाही; परंतु हिचा आयुष्यकाल फुकट जात आहे, म्हणून मला दुःख होत आहे. २२८ नयनाभ्यां प्रसुप्तो वा जागर्ति नयचक्षुषा ।
व्यक्तक्रोधप्रसादश्च स राजा पूज्यते जनः ॥३॥३३॥२१ (शूर्पणखा रावणाला म्हणते) डोळे मिटून निजला तरी न्यायदृष्टि उघडी ठेवून जो जागत असतो, आणि योग्य ठिकाणींच ज्याचा क्रोध व कृपा ही व्यक्त होत असतात, त्याच राजाला लोक मान देत असतात. २२९ न राज्यभ्रंशनं भद्रे न सुहृद्भिर्विनाभवः । __ मनो मे बाधते दृष्ट्वा रमणीयमिमं गिरिम् ॥ २९४३ (राम चित्रकूट पर्वताची शोभा सीतेला दाखवितो ) हे कल्याणि, हा रमणीय पर्वत अवलोकन करून राज्यभ्रंश आणि सुहृदांचा वियोग यांच्या योगाने माझ्या मनाला पीडा होत नाही. २३० न राम परदारान्स चक्षुभ्यामपि पश्यति ॥ २७२।४८
(कैकेयी भरताला म्हणते) तो राम परस्त्रीकडे कधी डोळ्यांनी पहात देखील नाही. २३१ नवमासधृतं गर्भ भास्करस्य गभस्तिभिः ।
पीत्वा रसं समुद्राणां द्यौः प्रसूते रसायनम् ॥ ४॥२८३ (माल्यवान् पर्वतावर राहात असतां राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो.) सूर्यकिरणांच्या योगानें समुद्राचे पाणी शोषून घेऊन (कार्तिकादि ) नऊ महिनेपर्यंत धारण केलेला व रसायनाप्रमाणे लोकांच्या जीवनास कारण होणारा जलरूप गर्भ आकाशरूपी स्त्री टाकून देत आहे.
For Private And Personal Use Only
Page #247
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि २३२ न वाक्यमात्रेण भवान्प्रधानो । ... न कत्थनात्सत्पुरुषा भवन्ति ।। ६१७१।५९
(लक्ष्मण अतिकाय राक्षसाला म्हणतो) केवळ बडबड करण्याने तूं श्रेष्ठ होत नाहींस आणि फुशारक्या मारण्याने कोणी सत्पुरुषही होत नाहीत. २३३ न विषादे मनः कार्य विषादो दोषवत्तरः ।
विषादो हन्ति पुरुषं बालं क्रुद्ध इवोरगः ॥ ४।६४।९ (समुद्र पाहून खिन्न झालेल्या वानरांना धीर देऊन अंगद म्हणतो) तुम्ही मनामध्ये खेद करूं नका, खेद हा फार वाईट आहे. कारण कुद्ध झालेला सर्प ज्याप्रमाणे बालकाचा घात करतो, त्याप्रमाणे खेद हा मनुष्याचा घात करितो. २३४ न शक्तस्त्वं बलाद्धर्तुं वैदेहीं मम पश्यतः ।
हेतुभिायसंयुक्तैर्बुवां वेदश्रुतीमिव ॥ ३।५०।२२ ( जटायु रावणाला म्हणतो ) ज्याप्रमाणे न्याययुक्त हेतूंनी (प्रमाणांनी) सनातन वेदश्रुतीस अन्यथा करणे शक्य नाही, (मीमांसकांपुढे सनातन वेदश्रुतीला हेत्वाभासांच्या योगानें भलतीकडे नेण्यास ज्याप्रमाणे शास्त्री समर्थ होत नाही ) त्याप्रमाणे तूं माझ्या समक्ष बलात्काराने सीतेला हरण करण्याविषयी समर्थ होणार नाहींस. २३५ न शेकुः समवस्थातुं निहते वाहिनीपतौ।
सेतुबन्धं समासाद्य विशीर्ण सलिलं यथा ॥६।५८/५९ (प्रहस्त सेनापतीचा वध झाल्यावर राक्षसांची झालेली स्थिति ) फुटलेल्या बंधायापाशी येऊन पोचलेले पाणी ज्याप्रमाणे स्थिर राहण्यास समर्थ होत नाही, त्याप्रमाणे सेनापतीचा वध झाल्यावर ते राक्षस समरांगणामध्ये उभे राहण्यास समर्थ झाले नाहीत.
रा.सु. ४
For Private And Personal Use Only
Page #248
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५०
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२३६ न शोकपरितापेन श्रेयसा युज्यते मृतः ॥ ४।२५।२ शोकसंतापामुळे मृताला कधींही सद्गति प्राप्त होत नाहीं. २३७ न शोभार्थाविमौ बाहू न धनुर्भूषणाय मे ।
नासिरबन्धनार्थाय न शराः स्तम्भहेतवः || २।२३।३१ अमित्रमथनार्थाय सर्वमेतच्चतुष्टयम् || २।२३।३२
( लक्ष्मण रामाला म्हणतो ) हे माझे बाहु कांहीं शोभेकरितां नाहींत, हें धनुष्य भूषण म्हणून मीं बाळगिलेलें नाहीं. ही तरवार मी कांहीं कंबरेला बांधून ठेवण्याकरितांच घेतलेली नाहीं व हे बाण स्वस्थ पडून राहण्याकरितां मी धारण केलेले नाहींत. या सर्व चारीही वस्तु शत्रूंचा नाश करण्याकरितांच आहेत. २३८ नष्टं दृष्ट्वा नाभ्यनन्दन् विपुलं वा धनागमम् ।
पुत्रं प्रथमजं लब्ध्वा जननी नाप्यनन्दत || २|४८५
( वनांत निघालेल्या रामाच्यामार्गे जाऊन परत आलेल्या लोकांची स्थिति. ) नष्ट झालेली वस्तु सांपडली असतां अथवा पुष्कळ द्रव्य मिळालें असतांही कोणाला आनंद होईनासा झाला व पहिल्याच खेपेस पुत्र झाला तरी मातेला आनंद होईनासा झाला. २३९ न स क्षमः कोपयितुं यः प्रसाद्यः पुनर्भवेत् ।
पूर्वोपकारं स्मरता कृतज्ञेन विशेषतः || ४ | ३२/२०
( हनुमान् सुग्रीवाला म्हणतो ) ज्याची पुनरपि कृपा संपादन करण्याचा प्रसंग यावयाचा असेल त्याला क्रोध आणणेंच योग्य नाहीं. विशेषतः स्वतःवर पूर्वी झालेला उपकार स्मरणाऱ्या कृतज्ञ पुरुषानें तर ही गोष्ट करितांच उपयोगी नाहीं. २४० न सर्वे भ्रातरस्तात भवन्ति भरतोपमाः ।
मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः || ६ | १८|१५ ( सर्व वानरमंडळीकडे पाहून राम लक्ष्मणाला म्हणतो ) बाबारे, सर्वच भ्राते भरतासारखे नाहींत, पित्याचे सर्वच पुत्र माझ्यासारखे नाहींत किंवा तुमच्यासारखे मित्रही सर्वांना मिळत नाहींत.
For Private And Personal Use Only
Page #249
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२४१ न स संकुचितः पन्था येन वाली हतो गतः।
समये तिष्ठ सुग्रीव मा वालिपथमन्वगाः ॥४।३०८१ ( राम लक्ष्मणाला म्हणतो, तूं सुग्रीवाकडे जाऊन त्याला असें सांग की,) माझ्याकडून वध पावलेला वाली ज्या मार्गाने गेला, तो मार्ग काही अगदी संकुचित नाहीं, (वाली जात असतांना तुलाही त्याच्या बरोबर जातां येईल, इतका तो मोठा आहे.) म्हणून आपल्या वचनाविषयों खबरदार रहा. आणि वालीच्या मार्गाला जाऊ नकोस. २४२ न साम रक्षस्सु गुणाय कल्पते
न दानमर्थोपचितेषु युज्यते । न भेदसाध्या बलदर्पिता जनाः
पराक्रमस्त्वेष ममेह रोचते ॥ ५॥४१॥३ (लंकेंत शिरल्यावर मारुति विचार करतो.) या राक्षसांचे ठिकाणी सामाचा काही उपयोग होणार नाही. जे धनसंपन्न असतात, त्यांच्या ठिकाणी दानाचा उपयोग होत नाहीं; जे लोक बलाने गर्विष्ठ असतात, ते भेद उपायाने साध्य होत नसतात. ( या राक्षसांना जिंकण्याकरितां) पराक्रमाचीच योजना करणे मला इष्ट वाटते. २४३ न साना शक्यते कीर्तिने साना शक्यते यशः।
प्राप्तुं लक्ष्मण लोकस्मिञ्जयो वा रणमूर्धनि॥६।२१।१६ (राम म्हणतो) हे लक्ष्मणा, सामोपायाने ( देशांतरीं) कीर्ति होत नाही, किंवा ( स्वदेशीही ) यश प्राप्त होत नाही तसेच इहलोकी रणांगणावर जयही सामोपचारानें प्राप्त होत नाही. २४४ न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा
वृद्धा न ते ये न वदन्ति धर्मम् । नासौ धर्मो यत्र न सत्यमस्ति
न तत्सत्यं यच्छलेनानुविद्धम् ॥ ७.५९ प्र. ३३३३ जीमध्ये वृद्धमंडळी नाही, ती सभा नव्हे; जे धर्माला अनुसरून बोलत नाहीत ते वृद्ध नव्हेत; ज्यामध्ये सत्य नाहीं तो धर्म नव्हे; आणि ज्यांत कपट आहे, तें सत्य नव्हे.
For Private And Personal Use Only
Page #250
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२४५ न सुप्रतिकरं तत्तु मात्रा पित्रा च यत्कृतम् ॥२॥११११९
आईबापांनी ( पुत्रावर ) केलेले उपकार फेडणे कधीही शक्य नाही. २४६ न हि कंचन पश्यामो राघवस्यागुणं वयम् ॥२॥३६।२७
(सिद्धार्थ प्रधान दशरथाला म्हणतो ) राघवाच्या ठिकाणी आम्हांला कोणताच दोष दिसून येत नाही. २४७ न हि गन्धमुपाघ्राय रामलक्ष्मणयोस्त्वया ।
शक्यं संदर्शने स्थातुं शुना शार्दूलयोरिव ॥५।२११३१ (सीता रावणाला म्हणते)कुत्रा वाघाच्या दृष्टीपुढे उभा राहणे जसे अशक्य आहे, त्याचप्रमाणे रामलक्ष्मणांची यत्किंचितही गंधवार्ता (सुगावा ) लागतांच त्यांच्या दृष्टीसमोर राहणे तुला अशक्य आहे. २४८ न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥२॥३७।२९ ( वसिष्ठमुनि कैकेयीला म्हणतात ) जेथें राम राजा नाही, तें ( स्थल) कधीही राष्ट्र होणार नाहीं; आणि जेथें राम वास्तव्य करील, तें वनही राष्ट्र होईल. २४९ न हि ते स्त्रीवधकृते घृणा कार्या नरोत्तम ॥२५।१७
(विश्वामित्र रामाला ताटकेचा वध करण्याविषयी सांगतात) हे पुरुषश्रेष्ठा, स्त्रीवध करावा लागत आहे म्हणून तूं मनामध्ये दया आणूं नकोस. २५० न हि धर्मविरुद्धेषु बह्वपायेषु कर्मसु ।
मूलघातिषु सज्जन्ते बुद्धिमन्तो भवद्विधाः ॥५।५१११८ (मारुति रावणाला म्हणतो ) जी कृत्ये धर्माच्या विरुद्ध आहेत, ज्यांत अनेक अपाय आहेत, जी समूळ घात करणारी आहेत, त्या कृत्यांच्या ठिकाणी तुमच्यासारखे बुद्धिमंत लोक आसक्त होत नाहींत.
For Private And Personal Use Only
Page #251
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
ANNA
२५१ न हि धर्माभिरक्तानां लोके किंचन दुर्लभम् ॥७।१०।३३
जगांत धर्माच्या ठिकाणीं अनुरक्त असणाऱ्यांना कांहींच दुर्लभ
नाही.
२५२ न हि प्रकृष्टाःप्रेष्यन्ते प्रेष्यन्ते हीतरे जनाः॥५।३९।३९
(कार्याविषयों योजना करितांना) कनिष्ठ श्रेष्ठांना प्रेरणा करीत नसून श्रेष्ठच कनिष्ठांना प्रेरणा करितात. २५३ न हि प्रतिज्ञां कुर्वन्ति वितथा सत्यवादिनः ।
लक्षणं हि महत्त्वस्य प्रतिज्ञापरिपालनम् ॥६१०११५१ सत्यवादी लोक आपली प्रतिज्ञा कधीही खोटी करीत नसतात. प्रतिज्ञेचे परिपालन करणे हेच मोठेपणाचे लक्षण होय. २५४ न हि प्रेषयिता तात स्वामी प्रेष्यःकथंचन ॥४।६५।२२
(जांबवान् अंगदाला म्हणतो) बाबारे, जो प्रभु इतरांस (दूत म्हणून ) पाठविणारा, तो दूतांनी पाठविण्यास योग्य-प्रेष्य-कदापि होणार नाही. २५५ न ह्यतो धर्मचरणं किंचिदस्ति महत्तरम् । ___ यथा पितरि शुश्रूषा तस्य वा वचनक्रिया ॥२।१९।२२
( राम कैकेयीला म्हणतो) पित्याची शुश्रूषा करणे, अथवा त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे यापेक्षा कोणतेही धर्माचरण श्रेष्ठ नाही. २५६ न ह्यनिष्टोऽनुशास्यते ॥ ३।१०।२०
जो अप्रिय असेल त्याला कोणी हिताचा उपदेश करीत नसतो. २५७ न ह्यबुद्धिं गतो राजा सर्वभूतानि शास्ति हि ॥४।२।१८
बुद्धिभ्रष्ट झालेला राजा सर्व प्रजांवर अंमल चालविण्यास समर्थ होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #252
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२५८ न ह्यास्तत्र तिष्ठन्ति न दारा न च बान्धवाः ।
सुप्रीतो भृत्यवर्गस्तु यत्र तिष्ठति राघव ॥ ७६४।६ जेथें (शत्र चालून आला असतां) संतुष्ट भृत्यवर्ग राहतो ( उपयोगी पडतो ) तेथे द्रव्य, स्त्रिया किंवा बांधव, हे रहात नाहीत ( उपयोगी पडत नाहीत.) २५९ न ह्येकः साधको हेतुः स्वल्पस्यापीह कर्मणः ।
यो ह्यर्थ बहुधा वेद स समर्थोऽर्थसाधने ॥ ५।४१६ स्वल्पही कार्य साधण्याच्या कामी एकच हेतु पुरा होत नाही. ज्याला भरपूर साधनें माहीत आहेत, तोच कार्यसिद्धिं करूं शकतो. २६० नाग्निरग्नौ प्रवर्तते ॥ ५।५५।२२
अग्नीस दग्ध करण्यास अग्नि प्रवृत्त होत नाही. २६१ नाग्निर्नान्यानि शस्त्राणि न नः पाशा भयावहाः। - घोराः स्वार्थप्रयुक्तास्तु ज्ञातयो नो भयावहाः॥६।१६।७ (पद्मवनांत पूर्वी हत्तींनी म्हटलेले श्लोक रावण बिभीषणाला सांगतो) अग्नि, इतर शस्त्रे आणि पाश ही आम्हांला भय उत्पन्न करणारी नाहीत, परंतु हे क्रूर, स्वार्थसाधु भाऊबंद मात्र आम्हांला. भयावह आहेत. २६२ नातन्त्री विद्यते वीणा नाचक्रो विद्यते रथः ।
नापतिः सुखमेधेत या स्यादपि शतात्मजा ॥२॥३९।२९ वीणा जशी तारेवांचून वाजणे शक्य नाहीं, रथ जसा चक्रावांचून असणे शक्य नाही, तशी शतपुत्रवती स्त्री असली, तरी ती पतीवांचून सुख पावणार नाही.
For Private And Personal Use Only
Page #253
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२६३ नात्र कश्चिद्यथाभावं प्राणी समतिवर्तते ।
तेन तस्मिन्न सामर्थ्य प्रेतस्यास्त्यनुशोचतः २।१०५।२८ ह्या लोकी कोणीही प्राणी जन्ममरणांचे उल्लंघन करू शकत नाही. (असें आहे तरी तो मृतास उद्देशून शोक करितो.) वस्तुतः ह्या शोक करणान्याच्या आंगांत स्वजनावर येणारा मृत्यु टाळण्याचं सामर्थ्य नसते. २६४ नाददानं शराघोरान्विमुञ्चन्तं महाबलम् ।
न कार्मुकं विकर्षन्तं रामं पश्यामि संयुगे ॥ ३॥३४७ (शूर्पणखा रामाची हकीकत रावणाला सांगते ) हा महाबलवान राम (भात्यांतून ) घोर बाण केव्हां काढितो, केव्हां शत्रूवर सोडितो, तसेंच रणांगणावर धनुष्य केन्हां आकर्षण करितो, हे मला काहीच कळत नाही. २६५ नाराजके जनपदे तूद्यानानि समागताः ।
सायाह्ने क्रीडितुं यान्ति कुमार्यों हेमभूषिताः।।२।६७।१७ अराजक देशामध्ये सुवर्णभूषणांनी भूषित झालेल्या कुमारिका एकत्र जुळून सायंकाळी बागांतून क्रीडा करण्यास जात नाहीत. २६६ नाराजके जनपदे धनवन्तः सुरक्षिताः ।
शेरते विवृतद्वाराः कृषिगोरक्षजीविनः ॥२॥६७१८ राजहीन देशांत धनवान लोक सुरक्षित नसतात. कृषि करणारे गोरक्षण करणारे लोकही दरवाजे उघडे टाकून निजूं शकत नाहीत. २६७ नाराजके जनपदे प्रहष्टनटनर्तकाः।
उत्सवाश्च समाजाश्च वर्धन्ते राष्ट्रवर्धनाः ॥२।६७।१५ अराजक देशांत आनंदित नट व सूत्रधार ज्यामध्ये आहेत असे देवादिकांचे उत्सव व राष्ट्रोन्नतीला कारण होणारे समाज वृद्धिंगत होत नाहीत.
For Private And Personal Use Only
Page #254
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि २६८ नाराजके जनपदे योगक्षेमः प्रवर्तते ॥ २०६७।२४
राजहीन देशांत लोकांचे योगक्षेम सुखाने चालत नाहीत. २६९ नाराजके जनपदे स्वकं भवति कस्यचित् ।
मत्स्या इव जना नित्यं भक्षयन्ति परस्परम् ।।२।६७४३१ राजहीन देशांत कोणाचाही जीव स्वस्थ नसतो. मत्स्य जसे परस्परांचे भक्षण करीत असतात, तसेंच अशा देशांत लोक परस्परांस भक्षण करितात. २७० नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले ।।
नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥४।६।२२ (सीतेचे अलंकार ओळखण्यास सांगितलें असतां लक्ष्मण रामाला म्हणतो) सीतेची बाहुभूषणे मला ठाऊक नाहींत, व कुंडलेंही माहीत नाहीत. परंतु नेहमी सीतेच्या पायां पडण्याचा प्रसंग येत असल्यामुळे तोरड्यांची मात्र मला ओळख पटत आहे. २७१ नित्यमन्योन्यसंहृष्टा व्यसनेष्वाततायिनः।
प्रच्छन्नहृदया धोरा ज्ञातयस्तु भयावहाः ॥ ६।१६।५ (रावण विभीषणाला म्हणतो) एकमेकांच्या विपत्तीमध्ये आनंद मानून आपला आशय गुप्त ठेवणारे हे क्रूर आततायी ( एकमेकांच्या घरावर अग्नि ठेवणारे ) भाऊबंद फारच भयंकर आहेत. २७२ निमित्तं लक्षणं स्वमं शकुनिस्वरदर्शनम् ।
अवश्यं सुखदुःखेषु नराणां परिदृश्यते ॥ ३५२।२ सुखाचे किंवा दुःखाचे प्रसंग यावयाचे असल्यास स्वप्न अथवा पक्ष्यांचा स्वर असें कांहीं तरी सूचक चिन्ह मनुष्यांच्या दृष्टीस अवश्य येत असते. २७३ नियुक्तैमन्त्रिभिर्वाच्यो ह्यवश्यं पार्थिवो हितम् ४१३२।१८ नियोजित मंत्र्यांनी राजाला हिताच्या गोष्टी अवश्य सांगाव्या.
For Private And Personal Use Only
Page #255
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
५७
२७४ निरायुधानां क्रमतामसङ्गगतिपौरुषाः ।
दारा ह्युपहसिष्यन्ति स वै घातः सुजीवताम्॥६।६६२० (युद्धाचे वेळी पळत सुटणान्या वानरांना अंगद म्हणतो. ) तुमची गति व पराक्रम ही दोन्ही कोठेही कुंठित होणारी नसतांना आयुधांचा त्याग करून जर तुम्ही जाऊं लागला, तर तुमच्या बायकाही तुम्हांला हसतील आणि स्त्रियांनी उपहास करणे हा तर मानाने राहणाऱ्यांचा घातच होय. २७५ निरुत्साहस्य दीनस्य शोकपर्याकुलात्मनः।
सर्वार्था व्यवसीदन्ति व्यसनं चाधिगच्छति ॥ ६॥२॥६ निरुत्साह, दीन, शोकानें व्याकुल, अशा पुरुषांची सर्व कार्ये नाश पावतात, आणि त्यांजवर संकट कोसळतात. २७६ नीत्या सुनीतया राजा धर्म रक्षति रक्षिता ।। यदान पालयेद्राजा क्षिप्रं नश्यन्ति वै प्रजाः॥७५९ प्र. २।५
प्रजेचे रक्षण करणारा राजा उत्कृष्ट चालविलेल्या नीतीने धर्माचें रक्षण करीत असतो. राजा जेव्हां धर्माचे रक्षण करीनासा होतो तेव्हां प्रजेचा सत्वर नाश होतो. २७७ नृशंसमनृशंसं वा प्रजारक्षणकारणात् ।
पातकं वा सदोषं वा कर्तव्यं रक्षता सदा ॥ १।२५।१८ ज्यास प्रजारक्षण करावयाचे आहे, त्याला त्या रक्षणाकरितां क्वचित् प्रसंगी थोडेंसें क्रौर्याचे किंवा किंचित् पातक, अगर कांहीं सदोष कर्म करणे भाग पडले, तरी त्याने तें करावें. २७८ नेयं मम मही सौम्य दुर्लभा सागराम्बरा ।
न हीच्छेयमधर्मेण शक्रत्वमपि लक्ष्मण ॥ २९७७ (राम म्हणतो) हे सौम्य लक्ष्मणा, ही सागररूप वस्त्र परिधान केलेली पृथ्वी मला दुर्लभ आहे, असें नाही. तथापि मी तिची इच्छा करीत नाही. अधर्माने इंद्रपद मिळाले, तरी त्याची मी इच्छा करीत नाही.
For Private And Personal Use Only
Page #256
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
wwww
२७९ नैकान्तविजयो युद्धे भूतपूर्वः कदाचन । - परैर्वा हन्यते वीरः परान्वा हन्ति संयुगे ॥६।१०९।१८
युद्धांत निश्चयात्मक जयच होतो, असें पूर्वी कधीही झाले नाही. वीरपुरुष रणांगणावर शत्रूकडून मारला जातो, किंवा शत्रुला मारितो. २८० नैतच्चित्रं नरव्याघ्र शीलवृत्तविदां वरे ।
यदायं त्वयि तिष्ठेत्तु निनोत्सृष्टमिवोदकम्॥२।११३।१६ ( भरद्वाज मुनि म्हणतात हे भरता, ) तूं नरश्रेष्ठ आणि उत्तम प्रकारचा शीलवृत्तज्ञ आहेस. तसेंच, तुझ्या ठिकाणी उत्तम चारित्र्य वसत आहे, त्यांत आश्चर्य नाही. टाकलेले पाणी खोलगट जागेतच रहात असतें. २८१ नैतच्छिथिलया बुद्धया त्वं वेत्सि महदन्तरम् ।
क च स्वजनसंवासः क च नीचपराश्रयः ॥ ६।८७।१४ (इंद्रजित् विभीषणाला म्हणतो.) स्वजनासह वास्तव्य करणे कोणीकडे, आणि शत्रूच्या आश्रयाला राहून नीच बनणे कोणीकडे ? यांतील महदंतर तुझ्या कोत्या बुद्धीमुळे तुला समजत नाही. २८२ नैवंविधमसत्कारं राघवो मषेयिष्यति ।
बलवानिव शार्दूलो वालधेरभिमर्शनम् ॥ २॥६१।१९ (कौसल्या दशरथाला सांगते, भरताने उपभोगिलेले राज्य राम स्वीकारणार नाही.) बलवान् व्याघ्र ज्याप्रमाणे पुच्छस्पर्श सहन करीत नाही, त्याप्रमाणे राम अशा प्रकारचा अपमान कधीही सहन करणार नाही. २८३ नैषा हि सा स्त्री भवति श्लाघनीयेन धीमता ।
उभयोर्लोकयोलॊके पत्या या संप्रसाद्यते ॥ २६२।१३ स्वर्गलोक व मनुष्यलोक या दोहोंमध्ये स्तुत्य असलेल्या विचारी भर्त्याकडून जी स्त्री आपण प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करून घेते,. ती स्त्री लोकामध्ये कुलीन म्हणून गणली जात नाही.
For Private And Personal Use Only
Page #257
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
wwwwwwwwwwwimmwwwmarwari
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ५९ २८४ न्यस्तदण्डा वयं राजन् जितक्रोधा जितेन्द्रियाः।
रक्षणीयास्त्वया शश्वद्गर्भभूतास्तपोधनाः॥ ३१॥२२ (महर्षि रामाला म्हणतात.) हे राजा, आम्ही क्रोधसंयमन व इंद्रियदमन करून प्राण्यांचा निग्रह करण्याचे सोडिले आहे. म्हणून माता ज्याप्रमाणे गर्भाचे रक्षण करिते, त्याप्रमाणे तुला आमचे रक्षण करणे अवश्य आहे. २८५ पतिर्हि देवता नार्याः पतिर्बन्धुः पतिर्गुरुः ।
प्राणैरपि प्रियं तस्माद्भर्तुः कार्य विशेषतः॥ ७४८।१८ पति ही स्त्रियांची देवता आहे. स्त्रियांचा बंधु आणि गुरुही तोच आहे. म्हणून भांचे प्रियकार्य प्राण खची घालूनही विशेषेकरून त्यांनी करावें. २८६ पतिशुश्रूषणानार्यास्तपो नान्यविधीयते ॥ २॥११८।९
पतिशुश्रूषेपलीकडे स्त्रीला दुसरे कोणतेही तप नाही. २८७ पद्ममातपसंतप्तं परिक्लिष्टमिवोत्पलम् । काञ्चनं रजसा ध्वस्तं क्लिष्टं चन्द्रमिवाम्बुदैः।।२।१०४।२५ मुखं ते प्रेक्ष्य मां शोको दहत्यग्निरिवाश्रयम् ।
भृशं मनसि वैदेहि व्यसनारणिसंभवः ॥ २१०४।२६ (कौसल्या म्हणते.)हे सीते, उन्हाने संतप्त झालेले पद्म, चुरडलेले रक्तकमल, धुळीने मलिन झालेले सुवर्ण, अथवा मेघाच्छादित चंद्र, यांप्रमाणे तुझें मुख पाहून (अरणीपासून उत्पन्न झालेला) अग्नि आश्रयभूत काष्ठांस दहन करितो, तसाच माझ्या अंत:करणांत दुःखरूप अरणीपासून उत्पन्न झालेला शोक मला दहन करीत आहे.
For Private And Personal Use Only
Page #258
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६०
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
- २८८ परत्रवासे हि वदन्त्यनुत्तमं तपोधनाः सत्यवचो हितं नृणाम् || २।११।२९
( कैकेयी दशरथाला म्हणते. ) परलोकीं वास्तव्य करण्यामध्ये मनुष्यांना सत्यवचन अत्यंत हितकारक होतें असें तपोधन
म्हणत असतात.
२८९ परदाराभिमर्शात्तु नान्यत्पापतरं महत् || ३ | ३८ | ३० परस्त्रीगमनापेक्षां अधिक असें दुसरें कोणतेंही महापातक नाहीं. - २९० परदारावरोधस्य प्रसुप्तस्य निरीक्षणम् ।
इदं खलु ममात्यर्थं धर्मलोपं करिष्यति ।। ५।११।३९
( सीतेचा शोध लावण्यासाठीं रावणाच्या अंतःपुरांत शिरलेला मारुति म्हणतो. ) अंतःपुरांत निजलेल्या परस्त्रियांचें अवलोकन, ही गोष्ट माझ्या धर्माचा अतिशयेंकरून लोप करील. २९१ परं निर्वेदमागम्य न हि नोन्मीलनं क्षमम् ॥ ४४९/८
( अंगद वानरांना म्हणतो. ) मनामध्यें अतिशय खिन्न होऊन उद्योग सोडून देणें योग्य नाहीं.
२९२ परमापद्गतस्यापि धर्मे मम मतिर्भवेत् ।। ७।१०।३०
( विभीषणानें ब्रह्मदेवाजवळ वर मागितला. ) मी पराकाष्ठेच्या विपत्तींत जरी सांपडलों तरी धर्माकडेच माझी बुद्धि असावी. २९३ परस्पर्शात्तु वैदेह्या न दुःखतरमस्ति मे ।
पितुर्विनाशात्सौमित्रे स्वराज्यहरणात्तथा ||३|२| २१
( विराध राक्षसानें सीतेला उचलून नेलें हें पाहून राम म्हणतो. ) हे लक्ष्मणा, सीतेला झालेला परपुरुषाचा स्पर्श, ह्याहून अधिक दुःखदायक असें मला कांहीं वाटत नाहीं. पित्याचें मरण आणि स्वराज्यहरण ह्यांहूनही तें दुःख अधिक आहे
For Private And Personal Use Only
Page #259
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२९४ परस्य वीर्य स्वबलं च बुद्धा
__ स्थानं क्षयं चैव तथैव वृद्धिम् । तथा स्वपक्षेऽप्यनुमृश्य बुद्धथा
वदेत्क्षमं स्वामिहितं स मन्त्री ॥ ६।१४।२२ जो पुरुष शत्रूचे आणि आपलें बल जाणतो, शत्रूच्या आणि आपल्या सैन्याची स्थिति, वृद्धि, आणि क्षय ह्यांचा बुद्धिपूर्वक विचार करितो, आणि स्वामीचे हित कशांत आहे ते योग्य रीतीने सांगतो, तोच खरा मंत्री होय. २९५ परस्वहरणे युक्तं परदाराभिमर्शकम् ।
त्याज्यमाहुर्दुरात्मानं वेश्म प्रज्वलितं यथा ॥६८७।२३ परद्रव्यापहारी आणि परस्त्रीहरणकर्ता असा जो दुरात्मा ते प्रज्वलित गृहाप्रमाणे त्याज्य होय. २९६ परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम् ।
सुहृदामतिशङ्का च त्रयो दोषाःक्षयावहाः॥ ६१८७।२४ परद्रव्य हरण करणे, परस्त्रीसमागम आणि मित्रांच्या ठिकाणी शंकित वृत्ति हे तीन दोष नाशकारक आहेत. २९७ पराक्रमोत्साहमतिप्रताप
सोशील्यमाधुर्यनयानयैश्च । गाम्भीर्यचातुर्यसुवीर्यधैर्यै
हनूमतः कोऽप्यधिकोऽस्ति लोके ॥ ७३६॥४३ पराकम, उत्साह, बुद्धि, प्रताप, सुशीलता मधुरवाणी, नीति व अनीति यांचे ज्ञान, गांभीर्य, चातुर्य, उत्कृष्टवीर्य, आणि धैर्य या गुणांनी जगतामध्ये हनुमानापेक्षां कोण बरें अधिक आहे ?
For Private And Personal Use Only
Page #260
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२९८ परान्तकाले हि गतायुषो नरा
हितं न गृह्णन्ति सुहृद्भिरीरितम् ॥६।१६।२७ ज्यांचे आयुष्य संपले आहे असे पुरुष सुहृदांनी केलेले हितकारक भाषण अंतकाली ऐकून घेत नाहीत. २९९ परिमृष्टो दशान्तेन दशाभागेन सेव्यते ॥ ३७२।८
(सुग्रीव तुझ्या सारखाच दुःखी आहे त्याच्याशी तूं सख्य कर, असें कबंधाने रामाला सांगितले. ) जो ग्रहदशेच्या फेन्यांत सांपडला आहे, त्याला ग्रहदशेच्या फेन्यांत सांपडलेल्याचीच मदत होत असते. ३०० पापानुबन्धो वै यस्य कर्मणः को नु तत्पुमान् । ___ कुर्वीत लोकाधिपतिः स्वयंभूर्भगवानपि ॥ ३५१३३२
(जटायु रावणाला म्हणतो.) ज्याचा परिणाम चांगला नाही तें कर्म प्रत्यक्ष लोकाधिपति भगवान् ब्रह्मदेवही जरी झाला, तरी कोणता बरें ( कल्याणेच्छु) पुरुष करण्यास प्रवृत्त होईल ? ३०१ पिता हि दैवतं तात देवतानामपि स्मृतम् ॥ २॥३४५२
(राम दशरथाला म्हणतो.) बाबा, देवतांना सुद्धा पिता हेच दैवत म्हणून म्हटले आहे. ३०२ पितुर्हि वचनं कुर्वन कश्चिन्नाम हीयते ॥ २॥२१॥३७ .
पितृवाक्याचे पालन करणारा कोणीहि हानि पावत नाही. ३०३ पितुर्हि समतिकान्तं पुत्रो यः साधु मन्यते ।
तदपत्यं मतं लोके विपरीतमतोऽन्यथा ॥२।१०६।१५ (भरत रामाला म्हणतो.) पित्याच्या हातून कांहीं अतिक्रम झाला असतां जो पुत्र तो सुधारून घेतो, त्यालाच लोकांमध्ये अपत्य म्हणून म्हणतात. याच्या उलट वागणारास अपत्य म्हणत नाहीत.
For Private And Personal Use Only
Page #261
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३०४ पीडाकरममित्राणां यच्च कर्तव्यमेव तत् ॥ ६।८।२९
शत्रुना जें जें म्हणून पीडादायक आहे, तें तें (त्यांत पाप असले तरी ) कर्तव्यच होय. ३०५ पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः पितॄन्यः पाति सर्वतः॥२।१०७।१२ 'पुत् । नामक नरकापासून पित्याचे रक्षण करितो, अथवा (स्वर्गलोकप्राप्तिकारक कर्मानी ) जो पितरांचें नित्यशः रक्षण करितो, त्यासच 'पुत्र ' असे म्हणतात. ३०६ पुरुषस्य हि लोकेस्मिन् शोकः शौर्यापकर्षणः॥६।२।१३
या लोकीं शोक हा पुरुषाच्या शौर्याचा नाश करणारा आहे. ३०७ पूर्व कृतार्थो मित्राणां न तत्प्रतिकरोति यः।
कृतमः सर्वभूतानां स वध्यः प्लवगेश्वर ॥४।३४।१० ( लक्ष्मण सुग्रीवाला म्हणतो.) हे वानरश्रेष्ठा, पूर्वी मित्रांच्या हातून स्वतःचे कार्य झाले असतांही जो त्या मित्रांचे उपकार फेडीत नाही, असा कृतघ्न पुरुष सर्व लोकांस वध्य आहे.. ३०८ पूर्वापकारिणं हत्वा न ह्यधर्मेण युज्यते ॥२९६२४ __ ज्याने प्रथम अपकार केला आहे, अशाचा वध केला असतां अधर्म घडत नाही. ३०९ पौरकार्याणि यो राजा न करोति दिने दिने ।
संवृते नरके घोरे पतितो नात्र संशयः॥७५३।६ जो राजा पौरजनांची कार्ये प्रत्यही करीत नाही, तो वायूचा संचार नसलेल्या घोर नरकांत पडतो यांत संशय नाही.
For Private And Personal Use Only
Page #262
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ३१० पौरा ह्यात्मकृतादुःखाद्विप्रमोच्या नृपात्मजैः ।
न तु खल्वात्मना योज्या दुःखेन पुरवासिनः॥२।४६।२३ (राम लक्ष्मणाला सांगतो.) आपणांकरितांजर नगरवासी लोकांना दुःख होत असेल, तर राजपुत्रांनी त्यांना दुःखांतून मुक्त केलें पाहिजे. आपल्याकरितां लोकांना दुःख होऊ देणे खरोखर योग्य नाही. ३११ पौरुषेण तु यो युक्तः स तु शूर इति स्मृतः॥६७१।६०
ज्याच्या आंगीं पराक्रम आहे त्यालाच शूर असे म्हणतात. ३१२ प्रतिग्रहो हि विप्रेन्द्र क्षत्रियाणां सुगर्हितः॥७७६।३५
(राम अगस्त्य मुनींना म्हणतो.) हे ब्राह्मणश्रेष्ठा, क्षत्रियांस प्रतिग्रह म्हणजे अत्यंत निंद्य होय. ३१३ प्रतिज्ञायां हि नष्टायां धर्मो हि विलयं व्रजेत्॥७।१०६।९
प्रतिज्ञा नष्ट झाली असतां धर्म लयाला जातो. ३१४ प्रतिवक्तं प्रकृष्टे हि नापकृष्टस्तु शक्नुयात् ।। ४।१८।४७
(वाली रामाला म्हणतो.) श्रेष्ठाच्यापुढे उत्तर देण्यास कनिष्ठ समर्थ होणार नाही. ३१५ प्रत्यगारमिवायान्ती सवत्सा वत्सकारणात् ।
बद्धवत्सा यथा धेनू राममाताभ्यधावत ॥ २॥४०॥४३ (राम वनवासाला निघाला असता त्याच्यामागे कौसल्या जाऊं लागली. ) घरांत वासरूं बांधून ठेविले असले म्हणजे गाय परत येतांना वासराकरितां जशी धावत धावत घरी येते, तशी राममाता कौसल्या रामाच्या मागोमाग धावू लागली.
For Private And Personal Use Only
Page #263
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३१६ प्रधानं साधकं वैद्यं धर्मशीलं च राक्षस ।
ज्ञातयोऽप्यवमन्यन्ते शूरं परिभवन्ति च ॥ ६।१६।४ (रावण बिभीषणाला म्हणतो.) हे राक्षसा, आपल्या कुलामध्ये श्रेष्ठ पदास चढलेला, राज्यरक्षण वगैरे करणारा, ज्ञानी आणि धर्मशील असा जरी कोणी असला, तरी भाऊबंद त्याचा अपमान करीत असतात. आणि तो जरी शूर असला तरी छिद्र पाहून त्याचा पराजय करीत असतात. ३१७ प्रवादःसत्यमेवायं त्वां प्रति प्रायशो नृप ।
पतिव्रतानां नाकस्मात्पतन्त्यश्रूणि भूतले॥६।११११६६ (रावणवधामुळे विलाप करणारी मंदोदरी रावणाला उद्देशून म्हणते.) हे राजा, ‘पतिव्रता स्त्रियांचे अश्रु कांहीतरी अनर्थ ओढवल्यावांचून विनाकारण कधीहि भूमीवर पडत नाहीत' अशी जी लोकांमध्ये म्हण आहे, ती तुझ्या संबंधाने खरी ठरली. ३१८ प्रशमश्च क्षमा चैव आर्जवं प्रियवादिता ।
असामर्थ्यफला ह्येते निर्गुणेषु सतां गुणाः॥६२१।१४ शांति, क्षमा, सरलपणा, प्रियवादित्व हे सज्जनांचे गुण निर्गुण पुरुषांच्या ठिकाणी निरुपयोगी होतात. ३१९ प्राप्तचारित्रसंदेहा मम प्रतिमुखे स्थिता ।
दीपो नेत्रातुरस्येव प्रतिकूलासि मे दृढा ॥६।११५/१७ ( राम सीतेला म्हणतो.) ज्याप्रमाणे नेत्ररोगी पुरुषाला दिवा अतिशय प्रतिकूल होत असतो, त्याप्रमाणे माझ्या समोर असलेली तूं, तुझ्या वर्तनासंबंधाने संशय उत्पन्न झाल्यामुळे माझ्या दृष्टीला अतिशय प्रतिकूल झाली आहेस.
रा. सु. ५
For Private And Personal Use Only
Page #264
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३२० प्राप्स्यामि यानद्य गुणान्को मे श्वस्तान्प्रदास्यति । __ अपक्रमणमेवातः सर्वकामैरहं वृणे ॥२॥३४।४० (राम दशरथाला म्हणतो, ठरल्याप्रमाणे वनांत गेलो असतां) आज जे गुण मला प्राप्त होतील, ते मला उद्यां कोण देणार आहे ? येथून गमन करणे यांतच माझे सर्व मनोरथ परिपूर्ण होत आहेत, यासाठी आजच्या आज वनवासाला जाणे हेच मला पसंत आहे. ३२१ प्रासादाग्रे विमानैर्वा वैहायसगतेन वा
सर्वावस्थागता भर्तुः पादच्छाया विशिष्यते।।२।२७९ (सीता रामाला म्हणते. ) कोणतीही अवस्था प्राप्त झाली तरी स्त्रीने पतिचरणांच्या छायेला असणेंच-राजवाड्यांत राहण्यापेक्षा, विमानांत बसून फिरण्यापेक्षां अथवा सिद्धि प्राप्त झाल्यामुळे आकाशमार्गानें गमन करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. ३२२ प्रियं चेद्भरतस्यैतद्रामप्रव्राजनं भवेत् ।
मा स्म मे भरतः कार्षीत्प्रेतकृत्यं गतायुषः ॥२।१२।९२ (दशरथ म्हणतो.) रामाचा वनवास जर भरताला प्रिय असेल, तर मी मृत झाल्यावर माझें उत्तरकार्य त्याने करूं नये. ३२३ प्रैष्यं पापीयसां यातु सूर्यं च प्रति मेहतु ।
हन्तु पादेन गां सुप्तां यस्यार्योऽनुमते गतः॥२।७५।२२ (रामाला वनांत पाठविणान्यास भरताचे शिव्याशाप.) ज्याच्या अनुमतीने श्रेष्ठ राम वनवासाला गेला, त्याला अत्यंत पापी जनांची सेवा करणे भाग पडो. त्यास सूर्याचे पुढे मूत्र केल्याचे पाप लागो; तसेंच निद्रिस्त गाईला लाथ मारल्याचे पाप त्याच्या आंगीं जडो.
For Private And Personal Use Only
Page #265
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३२४ प्रोत्साहितोऽयं कैकेय्या संतुष्टो यदि नः पिता ।
अमित्रभूतो निःसङ्गं वध्यतां वध्यतामपि ॥२।२१।१२ ( लक्ष्मण रामाला व कौसल्येला म्हणतो. ) कैकेयीच्या प्रोत्साहनाने तिजवर संतुष्ट होऊन आमचा पिता जर आमच्यांशी शत्रुत्वाने वागू लागेल, तर खरोखर त्याला बांधून टाकण्याला अथवा त्याचा वध करण्यालाही काही चिंता नाही. ३२५ बलिषड्भागमुद्धत्य नृपस्यारक्षितुः प्रजाः। अधर्मो योऽस्य सोऽस्यास्तु यस्यार्योऽनुमते गतः।।२।७५/२५
(भरत म्हणतो.) प्रजांपासून (कररूपाने ) सहावा भाग घेऊनही त्यांचे रक्षण न केल्याने जे पाप राजास लागते, तें पाप ज्याच्या अनुमतीने श्रेष्ठ राम वनाला गेला, त्याला लागो. ३२६ बलैः समप्रैयुधि मां रावणं जित्य संयुगे ।
विजयी स्वपुरं यायात्तत्तस्य सदृशं भवेत् ॥५॥३९।२९ (सीता मारुतीला म्हणते.) समग्र सैन्यासह येऊन व रणांगणावर रावणाला जिंकून विजयी होत्साता राम मला राजधानीला घेऊन जाईल, तर ती गोष्ट त्याला शोभण्यासारखी होईल. ३२७ बहवः साधवो लोके युक्ता धर्ममनुष्ठिताः।
परेषामपराधेन विनष्टाः सपरिच्छदाः ॥३॥३९।२१ धर्मानुष्ठान करूनही इतरांच्या अपराधाने परिवारासह नाश पावलेले अनेक साधुपुरुष या लोकों आहेत. ३२८ बालिशस्तु नरो नित्यं वैक्लव्यं योऽनुवर्तते ।
स मजत्यवशः शोके भाराकान्तेव नौजेले ॥४७१० ( सुग्रीव रामाला म्हणतो.) ओझ्याने जर्जर झालेली नौका ज्याप्रमाणे पाण्यामध्ये बुडते, त्याप्रमाणे जो बालिश पुरुष नेहमी खेद करीत बसतो, तो निरुपाय होऊन शोकामध्ये बुडून जातो.
For Private And Personal Use Only
Page #266
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३२९ बालिशो बत कामात्मा रामो दशरथात्मजः । ' इति वक्ष्यति मां लोको जानकीमविशोध्य हि॥६।११८।१४
(राम म्हणतो.) मी सीतेची शुद्धि न करितां (तिचे ग्रहण केल्यास) राम हा अत्यंत विषयलंपट झाला आहे आणि मूर्ख आहे, असे लोक मला म्हणतील. ३३० बालेन्द्रगोपान्तरचित्रितेन
विभाति भूमिर्नवशावलेन । गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण
नारीव लाक्षोक्षितकम्बलेन ॥४।२८।२४ ( राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो.) लहान लहान इंद्रगोपसंज्ञक कीटकांनी मधून मधून चित्रविचित्र झालेल्या हिरव्यागार गवताने युक्त झालेली भूमि, लाक्षाबिंदुयुक्त अशी पोपटी रंगाची शालजोडी आंगासरशी पांघरून बसलेल्या स्त्रीप्रमाणे दिसत होती. ३३१ बाष्पेण पिहितं दीनं रामः सौमित्रिणा सह ।
चकर्षेव गुणैर्बद्धं जनं पुरनिवासिनम् ॥ २।४५।१२ (वनांत जाणान्या रामाच्या मागोमाग प्रजाजन जाऊ लागले.) अधूंनी ज्यांचे नेत्र भरून गेलेले आहेत अशा त्या नगरवासी दीन जनांना लक्ष्मणासहवर्तमान राम आपल्या गुणांनी बांधून टाकून जसा कांहीं ओढूनच नेऊं लागला. ३३२ ब्रह्मन्ब्रह्मबलं दिव्यं क्षात्राच्च बलवत्तरम् ॥ ११५४।१४
( कामधेनु वसिष्ठांना म्हणते.) हे ब्राह्मणा, क्षात्रबलापेक्षां दिव्य ब्रह्मबल अधिक श्रेष्ठ आहे. ३३३ ब्रुवन्परार्थं परवान्न दूतो वधमर्हति ॥ ५।५२।१९
दूत म्हटला म्हणजे परवश असून तो दुसन्याचा निरोप सांगणारा असतो, त्याअर्थी त्याचा वध करणे योग्य नाही.
For Private And Personal Use Only
Page #267
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३३४ भगवन्प्राणिनां नित्यं नान्यत्र मरणाद्धयम् ॥७।१०।१६
(रावण ब्रह्मदेवाला म्हणतो.) हे भगवन्, प्राण्यांना नेहमी मरणापेक्षा दुसरे कशाचेही भय नाही. ३३५ भर्ता तु खलु नारीणां गुणवान्निर्गुणोऽपि वा ।
धर्म विमृशमानानां प्रत्यक्षं देवि दैवतम् ॥ २॥६२।८ (दशरथ कौसल्येला म्हणतो. ) हे देवि, पति गुणवान असो, वा निर्गुण असो; धर्माने चालणान्या स्त्रियांचें तो खरोखर प्रत्यक्ष दैवत आहे. ३३६ भर्ता नाम परं नार्याः शोभनं भूषणादपि ।५।१६।२६
अलंकारापेक्षाही पति हे स्त्रियांचे परम सुंदर भूषण आहे. ३३७ भतुरिच्छा हि नारीणां पुत्रकोट्या विशिष्यते ॥२॥३५।८
पतीच्या इच्छेला अनुसरून वागणे हे, स्त्रियांना एक कोटि पुत्र प्राप्त होण्यापेक्षाही अधिक आहे. ३३८ भर्तुर्भक्तिं पुरस्कृत्य रामादन्यस्य वानर ।
नाहं स्प्रष्टुं स्वतो गात्रमिच्छेयं वानरोत्तम ॥५॥३७६२ यदहं गात्रसंस्पर्श रावणस्य गता बलात् ।
अनीशा किं करिष्यामि विनाथा विवशा सती ५।३७।६३ (सीता मारुतीला म्हणते. ) हे वानरा, हे वानरश्रेष्ठा, भर्त्याच्या ठिकाणी अतिशयच भक्ति असल्यामुळे त्या रामावांचून दुसऱ्या कोणाच्याही शरीराला आपण होऊन स्पर्श करण्याची माझी इच्छा नाही. रावणाच्या शरीराचा स्पर्श मला झाला आहे; परंतु तो माझ्या इच्छेविरुद्ध झाला आहे. मी अनाथ, स्वतः असमर्थ आणि पराधीन असल्यामुळे करणार काय ?
For Private And Personal Use Only
Page #268
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३३९ भर्तुः शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् ।
अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात् ।।२।२४।२७ ( राम कौसल्येला म्हणतो.) जी स्त्री देवादिकांस नमस्कार करीत नाही, किंवा त्यांचे पूजन करीत नाही, केवळ भर्त्याची शुश्रूषा करिते, त्या स्त्रीला उत्कृष्ट स्वर्ग प्राप्त होतो. ३४० भवान्कलनमस्माकं स्वामिभावे व्यवस्थितः ।
स्वामी कलत्रं सैन्यस्य गतिरेषा परंतप ॥ ४।६५।२३ (जांबवान अंगदाला म्हणतो.) स्वामी या नात्याने असलेला तूं आम्हांला भार्येच्या स्थानी आहेस. (भाने भायेचे रक्षण करणे जसें अत्यंत अवश्य आहे, तसे आम्ही सर्व वानरांनी जिवांत जीव आहे तोपर्यंत तुझें रक्षण करणे अवश्य आहे.) हे शत्रुतापना, स्वामी हीच सैन्याची भार्या होय. तोच सैन्याचा आधार आहे. ३४१ भावज्ञेन कृतज्ञेन धर्मज्ञेन च लक्ष्मण ।
त्वया पुत्रेण धमोत्मा न संवृत्तः पिता मम ॥३॥१५/२९ - (पर्णशालेमध्ये तयार केलेला आश्रम पाहून संतुष्ट झालेला राम लक्ष्मणाला म्हणतो.) हे लक्ष्मणा, तूं माझ्या मनांतील अभिप्राय जाणणारा आहेस. तूं कृतज्ञ आहेस, धर्मज्ञ आहेस; असा तूं पुत्र असल्यामुळे माझा धर्मात्मा पिता ( दशरथ) मरण पावलाच नाहीं असे मला वाटते. ( कारण तूंच माझें पित्याप्रमाणे परिपालन करीत आहेस.) ३४२ भूताश्चार्था विनश्यन्ति देशकालविरोधिताः ।
विक्लवं दूतमासाद्य तमः सूर्योदये यथा ।। ५।२।३७ सूर्योदय झाला असतां ज्याप्रमाणे अंधकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे अयोग्य दूताची गांठ पडली असतां, देश व काल विरुद्ध झाल्या कारणाने जवळ जवळ सिद्धीस गेलेलीही कार्ये नाहींशी होत असतात.
For Private And Personal Use Only
Page #269
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ranAN
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ३४३. मत्ता गजेन्द्रा मुदिता गवेन्द्रा
वनेषु विक्रान्ततरा मृगेन्द्राः। रम्या धरेन्द्रा निभृता नरेन्द्राः
प्रक्रीडितो वारिधरैः सुरेन्द्रः ॥ ४।२८१४३ (वर्षाकालाचे वर्णन.) वनामध्ये जिकडे तिकडे गजेंद्र मत्त झाले आहेत, मोठमोठे वृषभ आनंदित झाले आहेत, सिंह आपला पराक्रम जास्त जास्तच गाजवू लागले आहेत, पर्वत रमणीय दिसू लागले आहेत, राजे लोक स्वस्थ बसले आहेत आणि देवराज इंद्र मेघांच्या योगानें कीडा करीत बसला आहे. ३४४ मदङ्गे जीर्णतां यातु यत्त्वयोपकृतं कपे।
नरः प्रत्युपकाराणामापत्स्वायाति पात्रताम् ॥७॥४०।२४ (राम मारुतीला म्हणतो.) हे कपे, तूं केलेले उपकार माझ्या आंगीं जिरून जावोत. ( तुझ्या उपकारांची फेड तुझ्यावर तसा प्रसंग येऊन माझ्या हातून न होवो.) मनुष्य संकटकालीं उपकारांच्या फेडीला पात्र होत असतो. (तुझे उपकारांचे ओझें मजवर जशाचे तसें राहणार.) ३४५ मनो हि हेतुः सर्वेषामिन्द्रियाणां प्रवर्तने ।
शुभाशुभास्ववस्थासु तच्च मे सुव्यवस्थितम्।।५।११।४३ (सीतेचा शोध लावण्यासाठी रावणाचे अंतःपुर पाहिल्यावर मारुति म्हणतो.) बऱ्या वाईट स्थितीमध्ये कोणत्याही इंद्रियाची प्रवृत्ति होण्याचे कारण मन हेच आहे. आणि ते माझें मन तर अगदी स्वस्थ आहे. ३४६ मन्त्रमूलं च विजयं प्रवदन्ति मनस्विनः ६६।५ __ जय मसलतीवर अवलंबून असतो, असे विचारी लोक म्हणत
असतात.
For Private And Personal Use Only
Page #270
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३४७ मन्ये प्रीतिविशिष्टा सा मत्तो लक्ष्मण सारिका ।
यत्तस्याः श्रूयते वाक्यं शुक पादमरेर्दश ॥ २॥५३।२२ ( राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, ( माझ्या मातेने पालन करून बोलण्यास शिकविलेली) साळुकी माझ्यापेक्षा माझ्या मातेवर अधिक प्रीति करणारी आहे असे मला वाटते. कारण 'हे शुका, शत्रूच्या पायाला दंश कर ' असें तरी त्या साळुकीचं वाक्य तिच्या कानावर पडत असतें. ( परंतु शत्रूचा पराजय करण्यासंबंधाचे तसे नुसते माझे शब्द देखील तिच्या कानावर पडत नाहीत.) ३४८ ममैव नूनं मरणं न विद्यते
न चावकाशोऽस्ति यमक्षये मम । यदन्तकोऽद्यैव न मां जिहीर्षति
प्रसह्य सिंहो रुदती मृगीमिव ॥ २।२०५० (कौसल्या म्हणते.) शोक करीत बसलेल्या हरिणीला एकाएकी उचलून नेणाऱ्या सिंहाप्रमाणे मृत्यु मला नेण्याचे मनांत आणीत नाही, यावरून मी खरोखर अमर आहे, व यमाच्या घरी मला जागा नाही हेच खरें. ३४९ मयैकेन तु निर्यक्तः परिमच्यस्व राघव ।
मां हि भूतबलि दत्त्वा पलायस्व यथासुखम्॥३॥६९।३९
अधिगन्तासि वैदेहीमचिरेणेति मे मतिः ॥ ३॥६९।४० (कबंध राक्षसाच्या तावडीत सांपडल्यावर लक्ष्मण रामाला म्ह्णाला. ) हे राघवा, माझ्या एकट्याचा या राक्षसाला ( कबंधाला ) बलि देऊन आपणाला सोडीव, आणि येथून सुखाने पळून जा. लवकरच जानकीची तुला प्राप्ति होईल, असे मला वाटते.
For Private And Personal Use Only
Page #271
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ७३ ३५० मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम् । ___क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव ॥६।१०९।२६
(रावणाचें और्वदेहिक कर्म करण्याविषयी अनुज्ञा देतांना राम विभीषणाला सांगतो.) वैराचा अंत मरणाबरोबर होत असल्यामुळे, ते आमचें वैराचे प्रयोजन आतां संपलें. (आपला कार्यभाग उरकला आहे.) तर जसा तो तुझा आप्त, तसाच माझाही असल्यामुळे, त्याचा संस्कार कर. ३५१ महतेवाम्बुवेगेन भिन्नः सेतुर्जलागमे ।
दुरावरं त्वदन्येन राज्यखण्डमिदं महत् ॥ २।१०५।५ (भरत रामाला म्हणतो.) ज्याप्रमाणे पर्जन्यकाली जलवेगाने मोडलेला पूल दुरुस्त करणे अत्यंत कठीण आहे, त्याप्रमाणे हे भरतखंड नांवाचे प्रचड राज्य तुझ्यावांचून इतरांस आवरतां येणें कठीण आहे. ३५२ महर्षयो धर्मतपोभिरामाः
कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः । अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु
कथं न सज्जेत सुखेषु राजा ॥ ४॥३३॥५७ ( कामासक्त झालेल्या सुग्रीवाबद्दल तारा लक्ष्मणाला म्हणते.) धर्मार्थ तपश्चर्या करून त्यांत रममाण होणारे असे महर्षिही कामातुर होऊन स्त्रियांविषयीं मोहित झाले आहेत, मग जातीनेच चंचल असलेला हा वानर, आणि त्यांतूनही राजा असतांना विषयसुखाविषयी कसा बरें आसक्त होणार नाही ?
For Private And Personal Use Only
Page #272
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७४
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३५३ मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः । यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् || १/२/१५
(वाल्मीकि मुनींच्या मुखांतून निघालेले सहज उद्गार. ) हे निषादा, ज्याअर्थी या क्रौंच पक्ष्यांच्या जोडप्यापैकीं काममोहित झालेल्या एकाचा ( नराचा ) तूं वध केला आहेस, त्याअर्थी तुझे पाय फार वर्षे भुईला लागणार नाहींत. ( तूं फार दिवस जगणार नाहींस. ) ( या श्लोकाचा अन्य रीतीनें आशीर्वादपर खालीलप्रमाणें अर्थ करितां येतो. हे मा-निषाद-लक्ष्मीचे निवासस्थानभूत रामचंद्रा ! मंदोदरी व रावण या दंपत्यांतून रावणाचा तुम्हीं वध केला, त्याअर्थी अनेक वर्षेपर्यंत अखंड प्रतिष्ठेस-ऐश्वर्यास आपण प्राप्त व्हावें. ) ३५४ मितं ददाति हि पिता मितं भ्राता मितं सुतः ।
अमितस्य तु दातारं भर्तारं का न पूजयेत् || २|३९| ३० पिता भ्राता किंवा पुत्र यांनी कितीही दिले, तरी तें परिमितच असावयाचें: अपरिमित देणारा म्हणजे एक पतिच होय. अशा पतीची सेवा कोणती स्त्री करणार नाहीं ? ३५५ मुमूषूणां तु सर्वेषां यत्पथ्यं तन्न रोचते || ३ |५३।१८ जे मरणोन्मुख झालेले असतात, त्यांना पथ्य म्हणून आवडतच नाहीं. ३५६ मूलमर्थस्य संरक्ष्यमेष कार्यविदां नयः ।
मूले हि सति सिध्यन्ति गुणाः सर्वे फलोदयाः || ४ | ६५/२५ कोणत्याही गोष्टीचें मूळ रक्षण करून ठेविलें पाहिजे, असा कार्यवेत्त्या पुरुषांचा न्याय आहे. कारण मूळ जर कायम असेल तर इतर सर्व उदयोन्मुख गुण सिद्धीस जातात. ( सर्व किरकोळ गोष्टी सिद्ध होतात. )
३५७ मृदुर्हि परिभूयते । २।२१।११
जो मृदु असतो, त्याचा ( सर्वत्र ) पराजय व्हावयाचाच. ( मऊ: सांपडलें म्हणजे लोक कोपरानें खणूं लागतात. )
For Private And Personal Use Only
Page #273
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ३५८ यः कृते हन्यते भर्तुः स पुमान् स्वर्गमृच्छति॥६९२९
जो स्वामिकार्यासाठी वध पावतो, तो पुरुष स्वर्गाला जातो. ३५९ यः खल्वपि वनं प्राप्य मृगव्यालनिषवितम् ।
न पिबेन्मधु संप्राप्य स नरो बालिशो भवेत् ॥ ६।१३।२' मृग आणि सर्प यांनी आश्रय केलेले दुर्गम वन प्राप्त झाल्यावर मध हाती आला असता, जो त्याचे सेवन करीत नाहीं तोमूर्ख पुरुष होय.. ३६० यः पश्चात्पूर्वकार्याणि कर्माण्यभिचिकीर्षति ।
पूर्व चापरकार्याणि स न वेद नयानयौ ॥६।१२।३२ पूर्वी कर्तव्य असलेल्या कर्माचा जो मागाहून विचार करितो आणि नंतरची कामें पूर्वी करूं पाहतो. त्याला न्याय अन्याय कांहींच समजत नाही. ३६१ यतो मूलं नरः पश्येत्प्रादुर्भावमिहात्मनः ।
कथं तस्मिन्न वर्तेत प्रत्यक्षे सति दैवते ॥ २॥१८॥१६ (राम कैकेयीला म्हणतो. ) जो (पिता) आपल्या जन्मास मूळ कारण, ज्यापासून आपण जन्माला आलों,व म्हणून जो आपले प्रत्यक्ष दैवत, त्या पित्याच्या मनाप्रमाणे कोणता बरें पुरुष वागणार नाही ? ३६२ यत्कर्तव्यं मनुष्येण धर्षणां प्रतिमार्जता।
तत्कृतं रावणं हत्वा मयेदं मानकाडिणा॥६।११५।१३ ( राम सीतेला म्हणतो. ) अपमानाचे परिमार्जन करणान्या मनुष्याच्या हातून जें होण्यासारखे आहे, ते मी लौकिकाची. चाड बाळगणान्या रामाने रावणाचा वध करून केले आहे. ३६३ यत्कृत्वा न भवेद्धर्मो न कीर्तिने यशो ध्रुवम् ।
शरीरस्य भवेत्खेदः कस्तत्कर्म समाचरेत् ॥ ३॥५०१९ (जटायु रावणाला म्हणतो.) जे केल्याने धर्म, कीर्ति, अढळ यश यांपैकी काहीएक प्राप्त होत नाही, उलट शरीराला क्लेश मात्र होतात त्या कर्माचे आचरण कोण बरें करील ?
For Private And Personal Use Only
Page #274
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३६४ यत्र रामो भयं नात्र नास्ति तत्र पराभवः ।।२।४८११५
ज्या ठिकाणी राम आहे त्याठिकाणी भय नाहीं व पराजयही नाही. ३६५ यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महार्णवे ।
समेत्य तु व्यपेतायां कालमासाद्य कंचन ॥२।१०५।२६ एवं भार्याश्च पुत्राश्च ज्ञातयश्च वसूनि च ।
समेत्य व्यवधावन्ति ध्रुवो ह्येषां विनाभवः।।२।१०५।२७ 'ज्याप्रमाणे महासागरामध्ये एक काष्ठ आणि दुसरें काष्ठ यांचा समागम होतो, नंतर काही वेळाने त्यांचा वियोग होतो, त्याचप्रमाणे भार्या, पुत्र, भाऊबंद व संपत्ति यांचा समागम होत असून नंतर ती एकमेकांपासून दूर धावू लागतात. कारण, ह्यांचा वियोग हा ठरलेलाच आहे. ३६६ यथागारं दृढस्थूणं जीणं भूत्वोपसीदति ।
तथावसीदन्ति नरा जरामृत्युवशं गताः॥२॥१०५।१८ घराचे खांब बळकट असले, तरी ते घर जीर्ण होऊन नाश पावतें, त्याप्रमाणे मनुष्ये जरा व मृत्यु यांच्या स्वाधीन होऊन नाश पावतात. ३६७ यथा तव तथान्येषां रक्ष्या दारा निशाचर ।
आत्मानमुपमां कृत्वा स्वेषु दारंषु रम्यताम् ।।५।२११७ (सीता रावणाला म्हणते.) हे राक्षसा, जशा तुझ्या स्त्रिया तुला संरक्षणीय आहेत तशाच दुसन्यांच्याही आहेत, म्हणून जें आपणाला दुःख तेंच दुसऱ्याला दुःख, असे समजून तूं स्वतःच्याच स्त्रीजनांचे ठिकाणी रममाण हो. ३६८ यथा दृष्टिः शरीरस्य नित्यमेव प्रवर्तते । _तथा नरेन्द्रो राष्ट्रस्य प्रभवः सत्यधर्मयोः ॥ २०६७।३३
ज्याप्रमाणे शरीराचे हिताहित पाहण्याविषयी दृष्टि नेहमीं तत्पर असते, त्याचप्राणे सत्य आणि धर्म यांची प्रवृत्ति करणारा राजा राष्ट्राच्या हिताहिताविषयीं नेहमी दक्ष असतो.
For Private And Personal Use Only
Page #275
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि
३६९ यथा पुष्करपत्रेषु पतितास्तोय बिन्दवः । न श्लेषमभिगच्छन्ति तथाऽनार्येषु सौहृदम् || ६ | १६।११ कमलपत्रांवर पडलेले जलबिंदु ज्याप्रमाणें त्या पत्रांना चिकटत नाहींत, त्याचप्रमाणें दुष्ट पुरुषांचे अंतःकरणांत मैत्री ठरत नाहीं. ३७० यथा पूर्व गजः स्नात्वा गृह्य हस्तेन वै रजः ।
दूषयत्यात्मनो देहं तथाऽनार्येषु सौहृदम् || ६ | १६ | १५
७७
ज्याप्रमाणें हत्ती प्रथमतः स्नान करितो, आणि नंतर लगेच सोंडेनें धूळ घेऊन आपले सर्व शरीर मलिन करितो, ( म्हणजे स्नानामुळें प्राप्त झालेली निर्मलता नाहींशी करून टाकितो) त्याप्रमाणें दुष्ट लोक पूर्वी संपादन केलेला स्नेह स्वतःच नाहींसा करून टाकितात.
३७१ यथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनाद्भयम् ।
एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद्भयम् ॥ २।१०५।१७ ज्याप्रमाणे पक्व फलांना पतनावांचून दुसरें भय नाहीं, त्याचप्रमाणें जन्मास आलेल्या मनुष्यांना मरणावांचून दुसरें भय नाहीं. ३७२ यथा हि कुरुते राजा प्रजास्तमनुवर्तते ॥ ७|४३|१९ जसें राजा करूं लागतो, तसें लोकही त्याला अनुसरून वागूं लागतात.
३७३ यथा ह्यनुदका नद्यो यथा वाप्यतृणं वनम् ।
अगोपाला यथा गावस्तथा राष्ट्रमराजकम् ॥ २२६७/२९ जशा उदकहीन नद्या, जसें तृणरहित वन, जशा गुराख्यावांचून गाई, त्याप्रमाणें अराजक राष्ट्र होय.
For Private And Personal Use Only
Page #276
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ३७४ यदन्तरं वायसवैनतेययो
यंदन्तरं मद्गुमयूरयोरपि । यदन्तरं हंसकगृध्रयोर्वने
तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ३॥४७/४७ (सीता रावणाला म्हणते.) कावळा आणि गरुड यांमध्ये जेवढे 'अंतर आहे, पाणकोंबडा आणि मोर यांमध्ये जेवढे अंतर आहे हंस आणि गिधाड यांमध्ये जेवढे अंतर आहे, तेवढें अंतर तूं आणि दाशरथि राम यांच्यामध्ये आहे. ३७५ यदन्तरं सिंहशृगालयोर्वने
यदन्तरं स्यन्दनिकासमुद्रयोः। सुराग्र्यसौवीरकयोर्यदन्तरं
तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ३४७१४५ (सीता रावणाला म्हणते.) सिंह आणि कोल्हा ह्यांच्यांत जे "अंतर वनामध्ये दिसून येते, किंवा समुद्र आणि ओढा यांच्यामध्ये जें अंतर दृष्टोत्पत्तीस येते, अथवा अमृत आणि कांजी ह्यांच्यामध्ये में अंतर अनुभवाला येते, तें अंतर दाशरथि राम आणि तूं यांच्यामध्ये असल्याचे निदर्शनास येत आहे. ३७६ यदन्तरं काञ्चनसीसलोहयो
यदन्तरं चन्दनवारिपङ्कयोः। यदन्तरं हस्तिबिडालयोर्वने
तदन्तरं दाशरथेस्तवैव च ॥ ३४७४६ (सीता रावणाला म्हणते.) जेवढे अंतर सुवर्ण आणि शिसें या धातूंमध्ये आहे, जेवढे अंतर चंदनोदक आणि चिखल यांत आहे, आणि जेवढें अंतर हत्ती व मांजर यांत आहे, तेवढे अंतर दाशरथि राम आणि तूं यांत आहे.
For Private And Personal Use Only
Page #277
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीरामायण सुभाषितानि
३७७ यदन्नः पुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः || २|१०३।३० ( राम म्हणतो. ) जें अन्न पुरुष भक्षण करीत असेल तेंच अन्न त्यानें आपल्या देवतांना द्यांवें.
७९
३७८ यदाचरति कल्याणि शुभं वा यदि वाशुभम् ।
तदेव लभते भद्रे कर्ता कर्मजमात्मनः || २/६३/६
( दशरथ कौसल्येला म्हणतो. ) हे कल्याणि मनुष्य शुभ अथवा अशुभ जें कांहीं कर्म करितो, त्याचें फल त्या कर्त्या पुरुषाला कर्माप्रमाणें प्राप्त होतेंच.
३७९ यदा विनाशो भूतानां दृश्यते कालचोदितः ।
तदा कार्ये प्रमाद्यन्ति नराः कालवशं गताः || ३|५६।१६ जेव्हां कालाच्या प्रेरणेप्रमाणें प्राण्यांचा नाश होण्याचा समय दिसत असतो, तेव्हां कालाच्या अधीन झालेल्या लोकांची बुद्धि कर्तव्या संबंधानें विपरीत होत असते.
३८० यदि त्वं प्रस्थितो दुर्गं वनमद्यैव राघव ।
अग्रतस्ते गमिष्यामि मृगन्ती कुशकण्टकान् ॥ २।२७/७ ( सीता म्हणते. ) हे राघवा, आपण जर आजच दुर्गम वनवासाला निघालां, तर तुमच्यापुढें मीहि दर्भ व कांटे तुडवीत तुडवीत जाणार. ३८१ यदिन्द्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसौ सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नभः ॥४॥३९॥२ चन्द्रमा रजनीं कुर्यात्प्रभया सौम्य निर्मलाम् त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परंतप || ४|३९|३ ( राम सुग्रीवाला म्हणतो. ) इंद्रानें जर पर्जन्यवृष्टि केली किंवा हजारों किरणांनी युक्त असलेल्या सूर्यानें आकाश अंधकाररहित केलें, चंद्रानें आपल्या प्रभेच्या योगानें रात्र निर्मल करून टाकिली किंवा हे विनयसंपन्न शत्रुतापना, तुझ्यासारख्यानें मित्रांवर प्रेम केलें, तर कांहीं आश्चर्य म्हणतां येणार नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #278
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३८२ यदि ह्यकाले मरणं यदृच्छया
लभेत कश्चिद्गुरुदुःखकर्शितः। गताहमद्यैव परेतसंसदं
विना त्वया धेनुरिवात्मजेन वै ॥२।२०५३ ( कौसल्या रामाला म्हणते. ) अत्यंत दुःखपीडित मनुष्य स्वेच्छेनुरूप जर मरण पावेल, तर वत्सरहित धेनूप्रमाणे मीहि तुझ्या वियोगाने आजच यमसदनाला गेल्ये असत्यें. ३८३ यद्रव्यं बान्धवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् ।
नाहं तत्प्रतिगृह्णीयां भक्ष्यान्विषकृतानिव ॥२।९७४ (राम लक्ष्मणाला म्हणतो.) बांधवांच्या व मित्रांच्या नाशाने प्राप्त होणारे द्रव्य विषमिश्रित भक्ष्य पदार्थाप्रमाणे मी स्वीकारणार नाही. ३८४ यद्विना भरतं त्वां च शत्रुघ्नं वापि मानद ।
भवेन्मम सुखं किंचिद्भस्म तत्कुरुतां शिखी ॥२।९७८ ( राम म्हणतो.) हे मान देणान्या ( लक्ष्मणा,) तुझा, भरताचा किंवा शत्रुघ्नाचा वियोग होऊन जें कांहीं सुख मला होणार असेल त्याचे अग्नि भस्म करून टाको. ३८५ यद्वृत्ताःसन्ति राजानस्तद्वृत्ताः सन्ति हि प्रजाः२।१०९।९
राजे ज्या वर्तनाचे असतात, त्याच वर्तनाच्या प्रजा असतात. ३८६ यमक्षयमनुप्राप्ता द्रक्ष्यन्ति न हि मानवाः॥२॥६४।६१
(दशरथ कौसल्येला म्हणतो. ) यमसदनाला निघालेल्या मानवांना काही दिसेनासें होतें. ३८७ यमिच्छेत्पुनरायातं नैनं दूरमनुव्रजेत् ॥ २।४०५०
(देशांतरी जाणान्याने ) पुनः सत्वर परत यावे, अशी इच्छा असल्यास त्याला फार दूरपर्यंत पोहोचविण्यास जाऊ नये.
For Private And Personal Use Only
Page #279
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ३८८ यमिच्छेन्नरकं नेतुं सपुत्रपशुबान्धवम् ।
देवेष्वधिष्ठितं कुर्याद्गोषु तं ब्राह्मणेषु च ॥७५९प्र.२।४८ ज्याला पुत्र, पशु, बांधव या सर्वांसह नरकांत पाडण्याची आपली इच्छा असेल, त्याला देवांवर, ब्राह्मणांवर किंवा गाईवर अधिकारी नेमावें. ३८९ यस्तु राजा स्थितोऽधर्मे मित्राणामुपकारिणाम् ।
मिथ्या प्रतिज्ञां कुरुते को नृशंसतरस्ततः॥ ४॥३४८ जो राजा अधर्माने वागणारा असून, उपकार करणाऱ्या मित्रांपाशी खोटी प्रतिज्ञा करितो, त्याहून अत्यंत दुष्ट असा कोण बरें आहे ? ३९० यस्तु हित्वा मतं भर्तुः स्वमतं संप्रधारयेत् । ___ अनुक्तवादी दूतः सन् स दूतो वधमहेति ॥ ६२०१९
जो दूत आपल्या धन्याचे मत सोडून आपलेच मत प्रतिपादन करितो, तो दूत धन्याने न सांगितलेले बोलत असल्यामुळे वधास पात्र आहे. ३९१ यस्त्वया सह स स्वर्गो निरयो यस्त्वया विना ।
इति जानन्परां प्रीतिं गच्छ राम मया सह ॥२।३०।१८ (सीता रामाला म्हणते.) आपल्याबरोबर जी स्थिति मला प्राप्त होईल तो माझा स्वर्ग आहे, आणि आपला वियोग होऊन कसलीही स्थिति जरी प्राप्त होणार असली, तरी तो मला नरक आहे; हे माझें आपल्या ठिकाणी असलेले पराकाष्ठेचे प्रेम जाणून हे राम, आपण मला बरोबर घेऊन वनांत चला. ३९२ यस्मात्पश्यन्ति दूरस्थान्सर्वानर्थान्नराधिपाः ।
चारेण तस्मादुच्यन्ते राजानो दीर्घचक्षुषः ॥३।३३।१० राजेलोक दूरदूरच्या सर्व गोष्टी हेरांकडून जाणून घेतात म्हणून त्यांना 'दीर्घदृष्टि' असें म्हणतात.
रा. सु. ६
For Private And Personal Use Only
Page #280
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३९३ यस्य भृत्याश्च दासाश्च मृष्टान्यन्नानि भुञ्जते ।
कथं स भोक्ष्यते रामो वने मूलफलान्ययम् ॥२।२४।३ (कौसल्या म्हणते.) ज्याचे नोकर आणि ज्याचे दास मिष्टान्न भोजन करीत आहेत, असा हा राम वनामध्ये मुळे आणि फळे खाऊन कसा राहणार ? ३९४ यस्याः पुत्रसहस्राणि सापि शोचति कामधुक् ।
किं पुनः विना रामं कौसल्या वर्तयिष्यति॥२७४।२८ जिला हजारों पुत्र आहेत, ती कामधेनु देखील (आपल्या पुत्रांना दुःखी पाहून ) शोक करिते, (मग जिला एकच पुत्र आहे ) अशी कौसल्या रामावांचून ( रामाला वनांत होणारे क्लेश मनांत आणून) कसे बरे जीवन धारण करील ? ३९५ यस्यार्था धर्मकामार्थास्तस्य सर्व प्रदक्षिणम् ।
अधनेनार्थकामेन नार्थः शक्यं विचिन्वता ॥६८३।३८ ज्याच्यापाशी द्रव्य असेल त्याचेच धर्म, अर्थ व काम हे पुरुषार्थ सिद्धीस जातात. सर्व काही त्याला अनुकूल असते. द्रव्याची इच्छा करणारा मनुष्य शोधक असला तरी दरिद्री असल्यास त्याला द्रव्यप्राप्ति होणार नाही. (आरंभी थोडे तरी द्रव्य असल्यावांचून द्रव्य मिळणे शक्य नाही.) ३९६ यस्यास्तिस्य मित्राणि यस्यास्तिस्य बान्धवाः ।
यस्यार्थाः स पुमाँल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः॥६।८३॥३५ • ज्याच्याजवळ पैसा आहे, त्याला मित्र आणि बांधव यांची प्राप्ति होते. ज्याच्याजवळ संपत्ति आहे, तोच जगांत मनुष्य, आणि तोच जगांत पंडित.
For Private And Personal Use Only
Page #281
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ८३ ३९७ यस्यार्थाः स च विक्रान्तो यस्यार्थाः स च बुद्धिमान् । । यस्यार्थाः स महाबाहुर्यस्यार्थाः स गुणाधिकः॥६।८३३३६ , ज्याच्याजवळ पैसा आहे, तोच पराक्रमी; ज्याच्याजवळ धन आहे, तोच बुद्धिमान. ज्याच्याजवळ द्रव्य आहे, तो महाबाहु आणि तोच अधिक गुणवान्. ३९८ यः समुत्पतितं क्रोधं क्षमयैव निरस्यति । - यथोरगस्त्वचं जीर्णा स वै पुरुष उच्यते ॥ ५।५५।६ __ सर्प जशी जीर्ण त्वचा सोडतो, त्याप्रमाणे उत्पन्न झालेल्या क्रोधाला जो क्षमेने घालवितो, तोच खरोखर पुरुष म्हटला आहे. ३९९ यः स्वपक्षं परित्यज्य परपक्षं निषेवते । ___ स स्वपक्षे क्षयं याते पश्चात्तैरेव हन्यते॥६।८७१६ (इंद्रजित् बिभीषणाला म्हणतो. ) जो स्वकीय पक्ष सोडून परपक्षाचा स्वीकार करितो, तो, स्वपक्ष नाशाला गेला असतां, त्याच्या (परपक्षा) कडून मारला जातो. ४०० या त्वं विरहिता नीता चलचित्तेन रक्षसा।
दैवसंपादितो दोषो मानुषेण मया जितः॥६।११५१५ ( रावणवधानंतर राम सीतेला म्हणतो.) चंचल चित्ताच्या राक्षसाने । रावणाने) तुला एकटी असतांना नेलें, हा अनर्थ दैवामुळे घडला व तो मी मनुष्याच्या पराक्रमानें नाहींसा केला. ४०१ यादृशं कुरुते कर्म तादृशं फलमश्नुते ॥ ७१५।२४
ज्याप्रकारचे कर्म मनुष्य करितो, त्याचप्रकारचे फळ त्याला मिळते. ४०२ ये तु सभ्याः सदा ज्ञात्वा तूष्णीं ध्यायन्त आसते । __यथाप्राप्तं न ब्रुवते ते सर्वेऽनृतवादिनः ॥७.५९प्र.३१३४
जे सभासद एकादी गोष्ट जाणूनही स्वस्थ बसून राहतात, बोलणें प्राप्त झाले असतांही बोलत नाहीत, ते खोटे बोलणारे होत.
For Private And Personal Use Only
Page #282
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४०३ ये शोकमनुवर्तन्ते न तेषां विद्यते सुखम् ।
तेजश्व क्षयते तेषां न त्वं शोचितुमर्हसि ॥४७१२ ( सुग्रीव रामाला म्हणतो.) जे शोकाला अनुसरून वागतात, त्यांना सुख होत नाही. त्यांच्या तेजाचा क्षय होतो. म्हणून तूं शोक करूं नकोस. ४०४ यो विषादं प्रसहते विक्रमे समुपस्थिते ।।
तेजसा तस्य हीनस्य पुरुषार्थो न सिध्यति ॥४६४।१० ( अंगद वानरांना म्हणतो.) पराक्रम करून दाखविण्याचा प्रसंग आला असतां जो पुरुष खिन्न होऊन बसतो, त्या तेजोहीन पुरुषाचा मनोरथ कधीही सिद्धीस जात नाही. ४०५ यो हि कालव्यतीतेषु मित्रकार्येषु वर्तते ।।
स कृत्वा महतोऽप्यर्थान्न मित्रार्थेन युज्यते ॥४।२९।१५ जो योग्य काल निघून गेला असतां, मित्रका करितां प्रयत्न करितो, त्याने मोठमोठी कार्ये केली, तरी मित्रकार्य सिद्धीस नेल्याचे फळ त्याला प्राप्त होत नाही. ४०६ यो हि दत्त्वा द्विपश्रेष्ठं कक्ष्यायां कुरुते मनः। । रज्जुस्नेहेन किं तस्य त्यजतः कुञ्जरोत्तमम् ॥ २॥३७॥३ (राम दशरथाला म्हणतो.) श्रेष्ठ हत्तीचे दान करून जो त्याला बांधावयाच्या दोरीवर मन ठेवील, (तर तें आश्चर्य होय.) त्याला उत्तम हत्तीचा त्याग केल्यानंतर त्या दोरीशी काय कर्तव्य असते ? ४०७ यो हि भृत्यो नियुक्तः सन्भत्रों कर्मणि दुष्करे।
कुर्यात्तदनुरागेण तमाहुः पुरुषोत्तमम् ॥६।१७ धन्याने दुर्घट कार्याकडे योजना केली असतां तें कार्य पार पाडून त्याच्या ठिकाणी प्रेम असल्यामुळे जो सेवक दुसरेही कार्य शेवटास नेतो, तो उत्तम पुरुष होय.
For Private And Personal Use Only
Page #283
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४०८ यो हि विक्लवया बुद्धया प्रसरं शत्रवे दिशेत् ।
स हतो मन्दबुद्धिः स्याद्यथा कापुरुषस्तथा॥७१६८।२० जो अविचाराने शत्रूला अवसर देतो, त्या मंदबुद्धि पुरुषाचा दुर्बल पुरुषाप्रमाणे वध होतो. ४०९ रकारादीनि नामानि रामत्रस्तस्य रावण ।
रत्नानि च रथाश्चैव वित्रासं जनयन्ति मे ॥३॥३९।१८ (मारीच म्हणतो. ) हे रावणा, रामाची जरब बसून गेल्यामुळे रकाराने ज्या नांवांचा आरंभ होतो, ती नांवें म्हणजे उदाहरणार्थ, रत्ने, रथ इत्यादि ही माझे ठिकाणी भय उत्पन्न करितात. ४१० रक्ष्या हि राज्ञा धर्मेण सर्वे विषयवासिनः ॥२॥१००१४८ __राजाने आपल्या देशांत राहणा-या सर्व लोकांचे धर्माने परिपालन केले पाहिजे. ४११ राघवस्य प्रियां भार्यामधिगन्तुं त्वमिच्छसि ।
अवसृज्य शिलां कण्ठे समुद्रं तर्तुमिच्छसि ।।३।४७१४१ (सीता रावणाला म्हणते.) रामाची प्रिय भार्या प्राप्त होण्याची तूं इच्छा करीत आहेस; म्हणजे गळ्यामध्ये शिळा बांधून समुद्र तरून जाण्याचेच तूं मनामध्ये आणिलें आहेस. ४१२ राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः ।
असवृत्ते हि नृपतावकाले म्रियते जनः ॥ ७७३।१६ अन्यायाने पाळलेल्या प्रजांचा राजाच्या दोषांनी नाश होतो. राजा दुर्वर्तन करणारा निघाल्यास प्रजा अकालीं मरतात. ४१३ राजमूला प्रजाः सर्वा राजा धर्मः सनातनः७।५९प्र.३३३८
सर्व प्रजा राजमूलक असतात. राजा म्हणजे सनातन धर्म होय.
For Private And Personal Use Only
Page #284
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४१४ राजा कर्ता च गोप्ता च
सर्वस्य जगतः पिता। राजा कालो युगं चैव
राजा सर्वमिदं जगत् ॥ ७.५९प्र.श६ राजा हा कर्ता, रक्षक, तसाच सर्व जगाचा पिता आहे. राजा काल आणि युग असून हे सर्व जगत् राजाच आहे. ४१५ राजा धर्मश्च कामश्च द्रव्याणां चोत्तमो निधिः। ___ धर्मः शुभं वा पापं वा राजमूलं प्रवर्तते ॥ ३५०।१०
(जटायु रावणाला म्हणतो.) धर्म, काम आणि उत्तम वस्तूंचे उत्कृष्ट भांडार हे सर्व राजाच आहे. कारण, धर्म, पुण्य अथवा पातक हे सर्व राजमूलकच प्रवृत्त होत असते. ४१६ राजा माता पिता चैव
राजा हितकरो नृणाम् ॥ २२६७३४ राजा (प्रजांची ) माता, त्याप्रमाणे पिताही आहे. राजा प्रजांचे हित करणारा आहे. ४१७ राजैव कर्ता भूतानां
राजा चैव विनायकः। राजा सुप्तेषु जागर्ति
राजा पालयति प्रजाः ॥ ७/५९प्र.२।४ राजाच सर्व भूतांचा कर्ता असून, त्यांचा मोठा नायकही तोच आहे. सर्व लोक निजले असतां राजा जागतो, आणि प्रजापालन करितो.
For Private And Personal Use Only
Page #285
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४१८ राज्यं भ्रष्टं वनेवासः सीता नष्टा मृतो द्विजः ।
ईदृशीयं ममालक्ष्मीर्दहेदपि हि पावकम् ॥ ३॥६७।२४ संपूर्णमपि चेदद्य प्रतरेयं महोदधिम् । सोऽपि नूनं ममालक्ष्म्या विशुष्येत्सरितांपतिः ३०६७२५ (जटायु पक्षी मूञ्छित झालेला पाहून राम म्हणतो.) राज्य नाहींसें झालें, वनामध्ये वास्तव्य करण्याचा प्रसंग आला, सीतेचा ठिकाण नाही, आणि (कैवारी जटायु) पक्षीही मरून गेला; अशा प्रकारची ही माझी आपत्ति अग्नीलाही जाळून टाकील. हा दुःखसंताप शमन होण्याकरितां संपूर्ण महासागरामध्ये जर मी आज उडी घातली, तर तो नद्यांचा अधिपति असलेला सागरही माझ्या आगीमुळे खरोखर शुष्क होऊन जाईल. ४१९ रामं दशरथं विद्धि मां विद्धि जनकात्मजाम् ।
अयोध्यामटवीं विद्धि गच्छ तात यथासुखम्॥२।४०९ (सुमित्रा लक्ष्मणाला म्हणते.) बाबा, तूं रामाचे ठिकाणी दशरथ राजाची भावना कर, जनकात्मजा सीता मी आहे, असे समज. आणि अरण्य म्हणजे अयोध्या, असे समजून वनाला सुखाने जा. ४२० रामो भामिनि लोकस्य चातुर्वर्ण्यस्य रक्षिता ।
मर्यादानांच लोकस्य कर्ता कारयिता च सः॥५॥३५।११ (मारुति लंकेमध्ये सीतेच्यापुढे रामाचे गुण वर्णन करितो. ) बाई सीते, राम हा चातुर्वर्ण्याचा रक्षणकर्ता असून लोकांना धर्ममर्यादा घालून देणारा व त्याप्रमाणे लोकांना वागविणाराही
आहे.
For Private And Personal Use Only
Page #286
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८८
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४२१ लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् । अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥ २।११२।१८
( राम भरताला म्हणतो.) फारतर काय, कांति चंद्राला सोडून जाईल, हिमालयपर्वतावरीलही बर्फ नाहींसें होईल व समुद्रही मर्यादेचे उल्लंघन करील, परंतु मी आपल्या पित्याच्या प्रतिज्ञेचा त्याग करणार नाहीं.
४२२ लोकप्रवादः सत्योऽयं पण्डितैः समुदाहृतः ।
अकाले दुर्लभो मृत्युः स्त्रिया वा पुरुषस्य वा || ५ | २५ | १२ ( सीता म्हणते. ) स्त्रीला काय किंवा पुरुषाला काय, अकालीं मृत्यु येणें दुर्लभ होय, ही विद्वानांच्या तोंडची म्हण सत्य आहे. ४२३ वक्तव्यतां च राजानो वने राज्ये व्रजन्ति च ॥७|४३|६
( राम म्हणतो. ) राजे वनामध्यें असोत अथवा राज्यावर असोत; लोक त्यांना कांहींना कांहीं तरी नांवें ठेवीतच असतात. ४२४ वयस्यस्योपकर्तव्यं धर्ममेवानुपश्यता || ४|१८ २९
धर्माकडे दृष्टि देऊन वागणाऱ्यानें मित्रावर उपकार केलाच पाहिजे. ४२५ वर्जयेद्वज्रमुत्सृष्टं वर्जयेदन्तकश्चिरम् ।
त्वद्विधं नतु संक्रुद्धो लोकनाथः स राघवः || ५ | २१।२३ ( सीता रावणाला म्हणते.) इंद्राच्या हातून सुटलेलें वज्र अथवा प्रत्यक्ष मृत्युही पुष्कळ दिवसपर्यंत कदाचित् तुझी उपेक्षा करील. परंतु क्रुद्ध झालेला लोकनाथ राम तुझ्यासारख्याचा प्राणघात केल्याशिवाय रहाणार नाहीं.
४२६ वसेत्सह सपत्नेन क्रुद्धेनाशीविषेण च ।
न तु मित्रप्रवादेन संवसेच्छत्रुसेविना ।। ६ । १६।२
( रावण बिभीषणाला म्हणतो. ) शत्रूशीं सहवास करावा. क्रुद्ध झालेल्या सर्पाबरोबरही रहावें; परंतु मित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि शत्रूची शुश्रूषा करणाऱ्या पुरुषाबरोबर कधीं वास्तव्य करूं नये.
For Private And Personal Use Only
Page #287
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४२७ वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति
ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति । नद्यो घना मत्तगजा वनान्ताः
प्रियाविहीनाः शिखिनः प्लवङ्गमाः ॥४।२८।२७ (माल्यवान् पर्वतावर राहत असतां राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो.) सांप्रतकाळी नद्या वाहूं लागल्या आहेत, मेघांनी वर्षाव सुरू केला आहे, मदोन्मत्त हत्ती गर्जना करीत आहेत, वनप्रदेशामध्ये शोभा येत चालली आहे, प्रिय स्त्रियांचा वियोग झालेले पति स्त्रियांचे ध्यान करीत आहेत, मोर नृत्य करूं लागले आहेत आणि ( सुग्रीवाला राज्य प्राप्त झाल्यामुळे) वानरांनाही धीर येऊ लागला आहे. (या श्लोकांतील पहिल्या दोन चरणांमध्ये क्रियापदें आली असून शेवटच्या दोन चरणांमध्ये त्या क्रियापदांचे कर्ते क्रमाने दिले आहेत.) ४२८ वाच्यावाच्यं प्रकुपितो न विजानाति कर्हिचित ।
नाकार्यमस्ति क्रुद्धस्य नावाच्यं विद्यते क्वचित्॥५।५५।५ अतिशय क्रुद्ध झालेला मनुष्य बोलावे काय, आणि बोलू नये काय, हे जाणत नाही. क्रुद्ध मनुष्याला अकार्य असे काही नाही, आणि अवाच्य असेंही काही नाही. ४२९ वामः कामो मनुष्याणां यस्मिन्किल निबध्यते ।
जने तस्मिस्त्वनुक्रोशः स्नेहश्च किल जायते ॥ ५।२२।४ (रावण सीतेला म्हणतो.) हा मनुष्यांचा काम दुष्ट आहे. रागावण्यास योग्य अशा मनुष्याचे ठिकाणी हा जडला, तर त्याविषयीं सुद्धां मनुष्याचे मनांत स्नेह व दया ही उत्पन्न होतात.
For Private And Personal Use Only
Page #288
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९०
सार्थ श्रीरामायण सुभाषितानि
४३० वाहि वात यतः कान्ता तां स्पृष्ट्वा मामपि स्पृश । त्वयि मे गात्रसंस्पर्शश्चन्द्रे दृष्टिसमागमः || ६ | ५ | ६
( सीताविरहामुळें शोकाकुल झालेला राम वाऱ्याला म्हणतो. ) हे वायो, ज्या ठिकाणीं माझी कांता आहे, तेथें जा, आणि तिला स्पर्श करून ये, नंतर मला स्पर्श कर. कारण, चंद्र दृष्टीस पडला असतां ज्याप्रमाणें उष्णतेमुळे झालेला संताप नाहींसा होतो, त्याप्रमाणें कांतेच्या शरीराला स्पर्श करून तूं मला स्पर्श केलास, म्हणजे माझा विरहजन्य संताप कांहीं कमी होईल.
४३१ विवो वीर्यहीनो यः सदैवमनुवर्तते । वीराः संभावितात्मानो न दैवं पर्युपासते ।। २।२३।१७
जो भित्रा आणि पराक्रमहीन असतो, तो देवाच्या मार्गे लागतो.. वीर आणि अबूदार पुरुष दैवाची कास धरून बसत नाहींत.
४३२ विगर्हितं च नीचं च कथमार्योऽभिधास्यति ।
त्राहीति वचनं सीते
दिशानपि || ३|५९।११
( लक्ष्मण म्हणतो. ) हे सीते; जो देवांचेही रक्षण करूं शकेल तो आर्य राम ' लक्ष्मणा, माझें संरक्षण कर ' हें क्षत्रियाला अयोग्य आणि म्हणूनच निंद्य असे शब्द कसे उच्चारील ?
For Private And Personal Use Only
Page #289
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४३३ विदितथास्तु भद्रं ते योऽयं रणपरिश्रमः।
सुतीर्णः सुहृदां वीर्यान्न त्वदर्थ मया कृतः॥६।११५।१५. रक्षता तु मया वृत्तमपवादं च सर्वतः। प्रख्यातस्यात्मवंशस्य न्यङ्गं च परिमार्जता ॥
६११५।१६ ( राम सीतेला म्हणतो.) तुझें कल्याण असो. मित्रांच्या सामर्थ्यामुळे ज्याच्यांतून मी चांगल्या रीतीने पार पडलों, तो हा संग्रामासंबंधी खटाटोप तुझ्या करितां केलेला नाही. हे तुला माहीत असूं दे. आपले वर्तन कायम राखण्याकरितां, अपवाद सर्वस्वी टाळण्याकरितां आणि आपल्या प्रख्यात वंशाला आलेला कमीपणा. नाहींसा करण्याकरितां हा सर्व खटाटोप मी केला आहे. ४३४ विद्यते गोषु संपन्न विद्यते ज्ञातितो भयम् ।
विद्यते स्त्रीषु चापल्यं विद्यते ब्राह्मणे तपः॥६१६।९. (पद्मवनांत हत्तींनी म्हटलेले श्लोक रावण विभीषणाला सांगतो.) गाईचे ठिकाणी हव्यकव्यसाधनसंपत्ति, ज्ञातींचे ठिकाणी भय, स्त्रियांचे ठिकाणी चंचलता व ब्राह्मणाचे ठिकाणी तप ही. ठरलेलीच आहेत. ४३५ विनाशयन्ति भर्तारं सहिताः शत्रुभिर्बुधैः ।
विपरीतानि कृत्यानि कारयन्तीह मन्त्रिणः॥६६३।१७ विचारी शत्रूशी मिळून गेलेले कांहीं मंत्री धन्याचा नाश. करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडून विपरीत कृत्ये करवितात.
For Private And Personal Use Only
Page #290
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४३६ विनाशे बहवो दोषा जीवन्प्रामोति भद्रकम् ।
तस्मात्प्राणान्धरिष्यामि ध्रुवो जीवति संगमः॥५।१३।४५ ( लंकेंत सीतेचा शोध लागेना त्यावेळी मारुति म्हणतो.) प्राणत्याग करण्यांत पुष्कळच दोष असून पुरुष जिवंत राहिला असतां त्याचे कधीतरी कल्याण होतेच. म्हणून मी प्राण धारण करून राहीन. कारण पुरुष कायम राहिल्यास त्याला इष्ट असलेली गोष्ट कधीतरी निःसंशय प्राप्त होतच असते. '४३७ विनीतविनयस्यापि प्रकृतिने विधीयते ।
प्रकृतिं गूहमानस्य निश्चयेन कृतिधुवा।।७।५९प्र. २२२६ ज्याला विनयाचे शिक्षण मिळाले आहे, त्यालाही मूळस्वभाव टाकितां येत नाही. ह्यास्तव ( दुष्ट ) स्वभाव जरी एखाद्याने बाहेर दाखविला नाही, तरी ( दुष्ट ) कृत्य त्याच्या हातून होणार हे ठरलेलेच आहे. ४३८ विलीयमानैर्विहगैनिमीलद्भिश्च पङ्कजैः।
विकसन्त्या च मालत्या गतोऽस्तं ज्ञायते रविः।।४।२८.५२ सांप्रत पक्षी आपापल्या घरट्यांत जाऊ लागले आहेत, सूर्यविकासी कमलें मिटली आहेत, आणि मालती प्रफुल्लित झाली आहे, यावरून सूर्य अस्तास गेला आहे असे समजतें. ४३९ विव्यथे भरतो तीव्रव्रणे तुद्येव सूचिना ॥ २७५।१७
(कौसल्येनें निर्भर्त्सना केली असतां ) भरत, तीव्र व्रणाचे ठिकाणी सुईनें टोचावें, त्याप्रमाणे व्यथित झाला.
For Private And Personal Use Only
Page #291
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४४० विषादनक्राध्युषिते परित्रासोर्मिमालिनि ।
किं मां न त्रायसे मनां विपुले शोकसागरे ॥३२१११२ (कान व नाक कापले गेल्यानंतर शूर्पणखा भ्रात्या खराला म्हणते.) खेदरूप नक्रांचें ज्यांत वास्तव्य आहे, आणि ज्यावर त्रासरूप लाटा उसळत आहेत अशा अगाध शोकसागरांत मग्न झालेल्या माझा उद्धार तूं का बरे करीत नाहींस ? ४४१ व्यसने वार्थकृच्छ्रे वा भये वा जीवितान्तगे।
विमृशंश्च स्वया बुद्धया धृतिमानावसीदति ॥ ४७९ संकटकाली, धनाचा नाश झाला असतां, अथवा जीविताचा नाश करणारे असें भय प्राप्त झाले असतांही स्वताच्या बुद्धीने विचार करणारा धैर्यवान् पुरुष मनामध्ये खचत नाही. ४४२ व्रतोपवासनिरता या नारी परमोत्तमा ।
भर्तारं नानुवर्तेत सा च पापगतिर्भवेत् ॥ २।२४।२६ आचरणाने सर्वोत्कृष्ट आणि नेहमी व्रतें व उपवास करणारी अशी जरी स्त्री असली, तरी भर्त्याच्या अनुरोधाने जर ती वागत नसेल तर तिला नरकप्राप्ति होते. ४४३ शक्यमापतितः सोढुं प्रहारो रिपुहस्ततः ।
सोढुमापतितः शोकः सुसूक्ष्मोऽपि न शक्यते॥२।६१६ शत्रूच्या हातचा प्रहार सहन करणे शक्य आहे. परंतु प्राप्त झालेला अतिसूक्ष्मही शोक सहन करणे शक्य नाही. ४४४ शक्या लोभयितुं नाहमैश्वर्येण धनेन वा । _अनन्या राघवेणाहं भास्करेण यथा प्रभा ॥५।२११५ (सीता रावणाला म्हणते.) ऐश्वर्याच्या योगाने अथवा धनाच्या योगानें माझें मन कोणालाही वळविता येणे शक्य नाही. कारण, सूर्यापासून जशी त्याची प्रभा भिन्न नाहीं, तशीच मी रामापासून भिन्न नाही.
For Private And Personal Use Only
Page #292
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९४
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४४५ शतयोजनविस्तीर्णः सागरो मकरालयः ।
विक्रमश्लाघनीयेन क्रमता गोष्पदीकृतः ॥५॥३६८ (सीता मारुतीला म्हणते.) मकरांचे वसतिस्थान, तसेंच शंभर योजनें विस्तीर्ण अशा समुद्राचे उल्लंघन करून तूं त्याला गाईच्या पावलाप्रमाणे करून टाकिलें आहेस. त्याअर्थी तुझा पराक्रम अत्यंत वर्णनीय आहे. ४४६ शरार्चिषमनाधृष्यं चापखगेन्धनं रणे ।
रामाग्निं सहसा दीप्तं न प्रवेष्टुं त्वमर्हसि ॥३॥३७॥१५ (मारीच रावणाला म्हणतो. ) बाण ह्या ज्याच्या ज्वाला आहेत, धनुष्य व खड्ग ही ज्याची इंधने आहेत, व ज्याच्यासमोर जाणेही दुर्घट आहे अशा रामरूप प्रदीप्त अग्नीत रणामध्ये अविचाराने प्रवेश करणे तुला योग्य नाही. ४४७ शिलातलं प्राप्य यथा मृगेन्द्रो
महारणं प्राप्य यथा गजेन्द्रः। राज्यं समासाद्य यथा नरेन्द्र
स्तथा प्रकाशो विरराज चन्द्रः॥ ५/५/७ (लंकेंत गेलेल्या मारुतीने आकाशाच्या मध्यभागी आलेला चंद्र अवलोकन केला. ) शिलातलावर प्राप्त झालेला सिंह, मोठ्या रणांगणावर येऊन ठेपलेला गजश्रेष्ठ, राज्यप्राप्ति झालेला नरपति जसे शोभतात, त्याप्रमाणे ह्या वेळी प्रकाशमान झालेला चंद्र शोभत होता. ४४८ शुभं वा यदि वा पापं यो हि वाक्यमुदीरितम् ।
सत्येन प्रतिगृह्णाति स वीरः पुरुषोत्तमः॥४३०७२ शुभ किंवा अशुभ वाक्य एकदां उच्चारिले असतां तें जो खरें करून दाखवितो तोच वीर पुरुषश्रेष्ठ होय.
For Private And Personal Use Only
Page #293
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४४९ शुभकृच्छुभमामोति पापकृत्पापमश्नुते ।
विभीषणः सुखं प्राप्तस्त्वं प्राप्तः पापमीदृशम् ॥६।१११।२६ ( मंदोदरी वध पावलेल्या रावणाला उद्देशून म्हणते. )
पुण्यकर्म करणान्याला कल्याणप्राप्ति होते, तर पापकर्म करणान्याला पापफळ भोगावे लागते. बिभीषणाला सुखाची प्राप्ति झाली, आणि ( त्याच्या उलट ) तुला अशी वाईट स्थिति प्राप्त झाली आहे. ४५० शुष्ककाष्ठेर्भवेत्कार्य लोष्टैरपि च पांसुभिः ।
नतु स्थानात्परिभ्रष्टैः कार्य स्याद्वसुधाधिपः॥३।३३।१८ __ शुष्क काष्ठांनी, मातीच्या ढेकळांनी, तसेंच रजःकणांनीही कार्ये होतात. परंतु राजा एकदां स्थानभ्रष्ट झाला म्हणजे त्याजपासून कोणतेही कार्य होत नाही. ४५१ शूराश्च बलवन्तश्च कृतास्त्राश्च रणाजिरे ।
कालाभिपन्नाः सीदन्ति यथा वालुकसेतवः।। ३।६९।५० शूर असोत, बलवान् असोत, अथवा रणभूमीवर अस्त्रविद्यानैपुण्य दाखविणारे असोत, कालाने व्याप्त झाले असतां ते वाळूच्या सेतूप्रमाणे नाश पावतात. ४५२ शूरेण धनदभ्रात्रा बलैः समुदितेन च ।
अपोह्य रामं कस्माच्चिदारचौर्य त्वया कृतम् ॥५।२२।२२ (सीता रावणाला म्हणते.) सैन्यांच्या योगाने प्रबल झालेला तूं कुबेराचा भ्राता मोठा शूर पडलास; म्हणूनच मारीच राक्षसाच्या मायेनें रामाला दूर घालवून स्त्रीचौर्य करण्याचे शौर्य तुझ्या हातून घडले.
For Private And Personal Use Only
Page #294
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४५३ शोकश्च किल कालेन गच्छता ह्यपगच्छति ।
मम चापश्यतः कान्तामहन्यहनि वर्धते ॥ ६।५।४ (राम लक्ष्मणाला म्हणतो.) काल जसजसा जातो, तसतसा शोक खरोखर कमी होत असतो. परंतु सीता दृष्टीस पडत. नसल्यामुळे माझा शोक तर दिवसेंदिवस वाढत आहे. ४५४ शोकः सर्वार्थनाशनः ॥ ६।२१७
शोक हा सर्वार्थांचा नाशक आहे. ४५५ शोकेनाभिप्रपन्नस्य जीविते चापि संशयः ॥ ४७१३
शोकानें मनुष्य व्याप्त झाला असता जीविताविषयीं देखील संशय उत्पन्न होत असतो. ४५६ शोको नाशयते धैर्य शोको नाशयते श्रुतम् ।
शोको नाशयते सर्व नास्ति शोकसमो रिपुः।।२।६२।१५. शोक धैर्याचा नाश करितो, शोक (शिकलेल्या) शास्त्रविद्येचा नाश करितो, शोक सर्वांचा नाश करितो. म्हणून शोकासारखा दुसरा शत्रु नाही. ४५७ शोच्यस्त्वमसि दुर्बुद्धे निन्दनीयश्च साधुभिः ।
यस्त्वं स्वजनमुत्सृज्य परभृत्यत्वमागतः ॥ ६१८७/१३ (इंद्रजित् बिभीषणाला म्हणतो.) हे दुर्बुद्धे, ज्याअर्थी स्वजनांचा त्याग करून तूं परक्यांचा दास झाला आहेस, त्याअर्थी तुझी स्थिति शोचनीय झाली असून तूं सज्जनांच्या निदेस पात्र झाला आहेस.
For Private And Personal Use Only
Page #295
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ___९७ ४५८ श्रूयते हि द्रुमः कश्चिच्छेत्तव्यो वनजीवनैः ।
संनिकर्षादिषीकाभिर्मोचितः परमाद्भयात् ॥ २८॥३० (मंथरा कैकेयीला म्हणते.) वनामध्ये उपजीविका करणाऱ्यांना एक वृक्ष तोडावयाचा होता; परंतु त्याच्या भोवताली असलेल्या कांटेरी झुडपांनी त्या पराकाष्ठेच्या तोडण्याच्या भीतीपासून त्या वृक्षाला मुक्त केलें असें ऐकण्यांत आहे. ४५९ षट्पादतन्त्रीमधुराभिधानं
प्लवङ्गमोदीरितकण्ठतालम् । आविष्कृतं मेघमृदङ्गनादै
वनेषु संगीतमिव प्रवृत्तम् ॥ ४॥२८॥३६ (राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो. ) वनामध्ये आज गायन सुरू झाल्यासारखे वाटत आहे. कारण भंग गुंजारव करीत असल्यामुळे तंतुवाद्यांच्या मधुरध्वनीचा भास होत आहे, बेडूक शब्द करीत असल्यामुळे कोणी गवईच आपल्या कंठांतून तालसूर काढीत असल्यासारखे भासत आहे. आणि मेघांची गर्जना चालू असल्यामुळे मृदंगवादनच सुरू असल्याचा भास होत आहे. ४६० संश्रुत्य च न शक्ष्यामि जीवमानः प्रतिश्रवम् ।
मुनीनामन्यथाकतु सत्यमिष्टं हि मे सदा ॥३।१०।१७ ( राम सीतेला म्हणतो.) एकदां जी मुनींच्या जवळ प्रतिज्ञा केली, त्या प्रतिज्ञेचे जिवांत जीव आहे तोपर्यंत माझ्याने उल्लंघन होणे शक्य नाही. ४६१ सक्तं ग्राम्येषु भोगेषु कामवृत्तं महीपतिम् ।
लुब्धं न बहु मन्यन्ते श्मशानाग्निमिव प्रजाः॥३॥३३॥३ जो राजा ग्राम्य विषयांचे ठिकाणी आसक्त होऊन मनास येईल, तसें वर्तन करणारा आणि लोभी असतो, त्यास प्रजा स्मशानांतील अग्नीप्रमाणे अनादरणीय समजतात.
रा. सु. ७
For Private And Personal Use Only
Page #296
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९८
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
mananam
४६२ संजीवितं क्षिप्रमहं त्यजेयं
विषेण शस्त्रेण शितेन वापि । विषस्य दाता न तु मेऽस्ति कश्चि
च्छत्रस्य वा वेश्मनि राक्षसस्य ॥ ५।२८।१६ (रावणाच्या कारागृहांत त्रस्त झालेली सीता म्हणते.) विषाने किंवा तीक्ष्ण शस्त्राने मी आतां जीविताचा त्याग सत्वर करणार आहे, परंतु या राक्षसाच्या गृहांत विष किंवा शस्त्र कोणी मला आणून देईल, असा नाही. ४६३ स तु श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ।
बहिश्वर इव प्राणो बभूव गुणतः प्रियः ॥ २॥१११९ उत्कृष्ट गुणांनी संपन्न असलेला तो राजकुमार राम आंगच्या गुणांमुळे प्रजाजनांना-शरीराबाहेर संचार करणारा प्राणच की काय असा-प्रिय झाला. ४६४ सत्यधर्माभिरक्तानां नास्ति मृत्युकृतं भयम्॥६।४६।३४
सत्यधर्माचे ठिकाणी आसक्त झालेल्या लोकांना मृत्यूचें भय नसते. ४६५ सत्यमेकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः ।
सत्यमेवाक्षया वेदाः सत्येनावाप्यते परम् ॥ २।१४७ सत्य हे एकपदरूप (ॐकाररूप ) ब्रह्म आहे; सत्याचे ठिकाणी धर्माची स्थिति आहे; अक्षय वेदही सत्याच्याच आश्रयाने आहेत. सत्यानें परब्रह्माची प्राप्ति होते. ४६६ सत्यमेवेश्वरो लोके सत्ये धर्मः सदाश्रितः।।२।१०९।१३
सत्य म्हणजेच परमेश्वर होय, सज्जनांनी आश्रय केलेला धर्म सत्याचे ठिकाणी आहे.
For Private And Personal Use Only
Page #297
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
९९
४६७ सत्यं बतेदं प्रवदन्ति लोके
नाकालमृत्युर्भवतीति सन्तः ॥ ५॥२८॥३ (सीता म्हणते. ) अकाली कोणालाही मरण येत नाही, म्हणून सत्पुरुष बोलतात, ते सत्य आहे. ४६८ सत्यश्चात्र प्रवादोऽयं लौकिकः प्रतिभाति मा।
पितृन्समनुजायन्ते नरा मातरमङ्गनाः॥२॥३५।२८ (सुमंत्र सारथि कैकेयीला म्हणतो.) पुरुष पित्याप्रमाणे होतात आणि स्त्रिया मातेप्रमाणे निपजतात, या लौकिक म्हणीची सत्यता ह्या तुझ्या आचरणांत तर मला अगदी खरोखर पटत आहे. ४६९ सदृशाच्चापकृष्टाच लोके कन्यापिता जनात् ।
प्रधर्षणमवामोति शक्रेणापि समो भुवि ॥ २॥११८३३५ कन्येचा पिता हा पृथ्वीवर इंद्रासारखा असला, तरी आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्याहून कमी योग्यतेच्याही वरपक्षाकडून त्याचा अपमान होतो. (मग योग्यतेने अधिक असलेल्या वरपक्षाची तर गोष्ट पाहिजे कशाला ?) । ४७० सन्तश्चारित्रभूषणाः॥६।११३।४२ ___ सज्जनांचे भूषण म्हणजे त्यांचे चारित्र्य होय. ४७१ संनिकांच सौहार्द जायते स्थावरेष्विव ।। २।८।२८
(मंथरा कैकेयीला म्हणते.)वृक्षलतादिकांचे ठिकाणी सांनिध्यामुळे जसें परस्परसंयोगरूप प्रेम वाढत असते, तसें मनुष्यांमध्येही सांनिध्यामुळेच प्रेम वाढत असते. ४७२ स भारः सौम्य भर्तव्यो यो नरं नावसादयेत् ।
तदनमपि भोक्तव्यं जीर्यते यदनामयम् ।। ३।५०।१८ (जटायु रावणाला म्हणतो.) हे सौम्या, ज्याच्याखाली चिरडून जाण्याची पाळी येणार नाही, तो भार मनुष्याने उचलावा आणि अन्न तरी रोगोत्पत्ति न होतां जें जिरेल तेच खावें.
For Private And Personal Use Only
Page #298
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१००
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४७३ समुत्पतितमेघस्य वीचिमालाकुलस्य च ।
विशेषो न द्वयोरासीत्सागरस्याम्बरस्य च ॥ ६।४।१२० उद्भवलेल्या मेघांनी युक्त असलेले आकाश आणि लाटांच्या समुदायांनी व्याप्त होऊन गेलेला समुद्र द्यांमध्ये काहीएक भेद दिसेनासा झाला. ४७४ संपृष्टेन तु वक्तव्यम् ॥३॥४०९
विचारले असतां बोलावें. ४७५ संप्राप्तमवमानं यस्तेजसा न प्रमार्जति ।
कस्तस्य पौरुषेणार्थो महताप्यल्पचेतसः ॥ ६।११५।६ - (राम सीतेला म्हणतो.) अपमान झाला असतां जो तेजाच्या योगाने त्याचे परिमार्जन करीत नाही, त्या मंदमति पुरुषाचा पराक्रम जरी मोठा असला तरी त्याचा काय उपयोग ? ४७६ सरितां तु पतिः स्वल्पां मर्यादां सत्यमन्वितः।
सत्यानुरोधात्समये वेलां स्वां नातिवतेते ॥ २॥१४॥६ समुद्र सत्यव्रत असल्या करणाने सत्याचा त्याग होईल, या भीतीने ( चंद्रोदयकालीं ) स्वल्प मर्यादा उलंध्य असूनही तो स्वतःच्या मर्यादेचे उल्लंघन करीत नाही. ४७७ सर्वत्र खलु दृश्यन्ते साधवो धर्मचारिणः ।
शूराःशरण्या:सौमित्रे तिर्यग्योनिगतेष्वपि ॥३॥६८।२४ ( सीतेला सोडविण्यासाठी रावणापाशी युद्ध करीत असतां जटायु पक्षी मरण पावला हे पाहून राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, शूर व शरण जाण्यास योग्य असे धर्माने वागणारे साधुजन खरोखर सर्वत्र म्हणजे तिर्यग्योनि प्राप्त झालेल्या प्राण्यांतही दृष्टीस पडतात.
For Private And Personal Use Only
Page #299
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४७८ सर्वथा सुकरं मित्रं दुष्करं प्रतिपालनम् ।
अनित्यत्वात्तु चित्तानां प्रीतिरल्पेऽपि भिद्यते॥४॥३२७ (सुग्रीव मंत्र्यांना म्हणतो. ) मित्र संपादन करणे सुलभ आहे, परंतु त्याच्याशी सख्य कायम राखणे मात्र सर्व प्रकारे कठीण आहे. कारण,अंतःकरणे स्थिर नसल्यामुळे शचूंनी अल्पस्वल्प जरी मित्राच्या कानांत सांगितले, तरी सुद्धा उभयतांतील प्रेमाला व्यत्यय येतो. ४७९ सर्वदा सर्वभूतानां नास्ति मृत्युरलक्षणः । __ तव तद्वदयं मृत्युमैथिलीकृतलक्षणः ॥६।११।२९ (मंदोदरी रावणाला उद्देशून म्हणते.) सर्व प्राण्यांना सर्वकाळी निमित्तावांचून मृत्यु नाही, त्याप्रमाणे तुला हा आलेला मृत्यु सीतेच्या निमित्ताने आहे. ४८० सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः।
संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं च जीवितम्।।७५२।११ तस्मात्पुत्रेषु दारेषु मित्रेषु च धनेषु च ।
नातिप्रसङ्गः कर्तव्यो विप्रयोगो हि तैध्रुवम् ॥ ७॥५२।१२ सर्व ऐश्वर्याचा शेवट नाशांत होतो, उच्चत्वाचा शेवट पतनांत होतो, संयोगाचा शेवट वियोगांत होतो, आणि जीविताचा शेवट मरणांत होतो. म्हणून पुत्र, स्त्री, मित्र, धनसंपत्ति यांच्या ठिकाणी अतिशय आसक्ति कधीं करूं नये. कारण, त्यांचा वियोग निःसंशय व्हावयाचाच आहे. ४८१ सर्वे चण्डस्य बिभ्यति ॥ ६२१ जो अत्यंत क्रुद्ध असतो, त्याला सर्व भितात.
For Private And Personal Use Only
Page #300
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४८२ स सुहृयो विपन्नाथ दीनमभ्युपपद्यते ।
स बन्धुर्योपनीतेषु साहाय्यायोपकल्पते ॥ ६६३।२७ ज्याचा कार्यभाग नष्ट झाला आहे, अशा दीनावर जो उपकार करितो, तोच सुहृद् होय, आणि नीतिमार्गापासून दूर गेलेल्या लोकांना नीतिमार्गावर आणून सोडण्यासाठी जो साह्य करण्यास तयार असतो तो बंधु होय. ४८३ सहस्राण्यपि मूर्खाणां यापास्ते महीपतिः ।
अथवाप्ययुतान्येव नास्ति तेषु सहायता ॥२॥१००।२३ एकोऽप्यमात्यो मेधावी शूरो दक्षो विचक्षणः ।
राजानं राजपुत्रं वा प्रापयेन्महतीं श्रियम् ।।२।१००।२४ (राम भरताला म्हणतो.) हजारोंच नव्हे परंतु लाखों मूर्ख लोक जरी राजाजवळ असले तरी त्यांची राजाला मदत होत नाही. परंतु बुद्धिमान, शूर, दक्ष व नीतिशास्त्रवेत्ता असा एक जरी अमात्य जवळ असला, तरी तो राजाला अथवा राजपुत्राला मोठे वैभव प्राप्त करून देईल. ('अयुत' म्हणजे 'दहा हजार' असा अर्थ असतांना 'अयुतानि' याचे भाषांतर भाषेत जुळण्याकरितां लाखों, असें केले आहे.) ४८४ सहैव मृत्युव॑जति सह मृत्युनिषीदति ।
गत्वा सुदीर्घमध्वानं सह मृत्युर्निवर्तते ॥२।१०५।२२ (राम भरताला म्हणतो.)प्राणी जाऊ लागला तरी मृत्यु त्याच्या बरोबर जातोच; तो बसला तरी मृत्यु त्याच्या बरोबर बसतोच, आणि बराच दूर मार्ग चालून प्राणी परत फिरूं लागला, तरी देखील मृत्यु त्याच्या बरोबरच चालत जाऊन परत फिरतो ( मृत्यु प्राण्यांच्या संनिध एकसारखा आहेच आहे.)
For Private And Personal Use Only
Page #301
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४८५ सागरं चाम्बरप्रख्यमम्बरं सागरोपमम् । __ रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव ॥६।१०७।५१
सागर आकाशासारखा आहे तसें आकाश सागरासारखे आहे. परंतु रामरावणाचे युद्ध म्हणजे रामरावणांच्या सारखेच होय. (त्याला उपमाच नाही.) ४८६ सापराधोऽपि बालो हिरक्षितव्यः स्ववान्धवैः ७।१३।२०
कोणी बालक जरी अपराधी असला, तरी त्याचे बांधवांनी रक्षण करणे योग्य आहे. ४८७ सीताहरणजं दुःखं न मे सौम्य तथागतम् ।
यथा विनाशो गृध्रस्य मत्कृते च परंतप ।। ३।६८०२५ ( जटायूचा वध झाल्यानंतर राम लक्ष्मणाला म्हणतो. ) हे विनयसंपन्न शत्रुतापना, माझ्याकरितां गृध्रपक्ष्याचा (जटायूचा) वध झाला, याबद्दल जसा माझ्या मनाला चटका लागून राहिला आहे, तसा सीतेचा अपहार झाल्यामुळे होणा-या दुःखाचा चटका लागून राहिलेला नाही. ४८८ सुजीवं नित्यशस्तस्य यः परैरुपजीव्यते ।
राम तेन तु दुर्जीवं यः परानुपजीवति ॥२॥१०५।७ (भरत म्हणतो.) हे रामा, ज्या पुरुषाच्या जीवितावर दुसरे जीवित चालवितात, त्या पुरुषाचे जीवित धन्य होय. तसेंच ज्या पुरुषाचें जीवित दुसन्यावर अवलंबून असते, तें जीवित दुःखावह होय. ४८९ सुनीतं हितकामेन वाक्यमुक्तं दशानन ।
न गृह्णन्त्यकृतात्मानः कालस्य वशमागताः॥६।१६।२० (विभीषण रावणाला म्हणतो.) हे दशानना, हितेच्छु पुरुषाने उत्कृष्टनीतीला अनुसरूनही केलेले भाषण कालाच्या तावडीत सापडलेले अजितेंद्रिय पुरुष स्वीकारीत नाहीत.
For Private And Personal Use Only
Page #302
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०४
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४९० सुमुखं दुर्मुखी रामं वृत्तमध्यं महोदरी । विशालाक्षं विरूपाक्षी सुकेशं ताम्रमूर्धजा || ३|१७|९ प्रियरूपं विरूपा सा सुस्वरं भैरवस्वना । तरुणं दारुणा वृद्धा दक्षिणं वामभाषिणी || ३ | १७|१०
न्यायवृत्तं सुदुर्वृत्ता प्रियमप्रियदर्शना । शरीरजसमाविष्टा राक्षसी राममब्रवीत् ||३|१७|११
( रामाजवळ शूर्पणखा आली आणि बोलूं लागली. ) राम सुंदर मुखाचा, तर ती (शूर्पणखा ) दुर्मुखी, राम कृश उदराचा, तर ती महोदरी, राम विशालाक्ष, तर ती विरूपाक्षी; राम सुंदर केशांचा, तर ती ताम्रकेशी राम सुस्वरूप, तर ती कुरूप, रामाचा सुस्वर तर तिचा कर्कश स्वर, राम तरुण तर ती क्रूर व वृद्ध; राम चतुर भाषण करणारा; तर ती दुर्भाषण करणारी; राम न्यायानें वागणारा, तर ती अत्यन्त दुर्वृत्तः राम सर्वोस प्रिय, तर ती सर्वास अप्रिय, अशी ती कामपीडित ( शूर्पणखा ) राक्षसी रामाला म्हणाली. ( या ठिकाणीं राम व शूर्पणखा यांना दिलेलीं विशेषणें परस्पर विरुद्ध आहेत. )
४९१ सुलभाः पुरुषा राजन्सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः || ३|३७|२
( मारीच रावणाला म्हणतो. ) हे राजा, ( हिताहिताचा विचार न करितां केवळ ) सतत मधुर भाषण करणारे पुरुष सुलभ आहेत; परंतु अप्रिय जरी असले तरी हितकारक भाषण करणारा वक्ता आणि तें ऐकून घेणारा श्रोता हे दुर्लभ आहेत.
For Private And Personal Use Only
Page #303
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४९२ सुहृदामर्थकृच्छ्रेषु युक्तं बुद्धिमता सदा।
समर्थेनोपसंदेष्टुं शाश्वती भूतिमिच्छता ॥६।१७।३३ ( राम वानरांना म्हणतो.) मित्रांचा निरंतर अभ्युदय व्हावा, अशी इच्छा करणाऱ्या बुद्धिमान् व विचारसमर्थ पुरुषानें, कार्याकार्याविषयीं संदेह प्राप्त झाला असतां, मित्रांना उपदेश करणे सर्वदा योग्यच आहे. ४९३ सूक्ष्मः परमविज्ञेयः सतां धर्मःप्लवङ्गम ।
हृदिस्थः सर्वभूतानामात्मा वेद शुभाशुभम् ॥४।१८।१५ (राम वालीला म्हणतो.) हे वानरा, सज्जनांचा धर्म सूक्ष्म असल्यामुळे तो इतरांना समजणे अत्यंत अशक्य आहे. प्राणिमात्राच्या हृदयामध्ये वास करणारा परमात्मा मात्र प्राण्यांचें पापपुण्य जाणीत आहे. ४९४ सौमित्रे योऽभिषेकार्थे मम संभारसंभ्रमः ।
अभिषेकनिवृत्त्यर्थे सोऽस्तु संभारसंभ्रमः ॥ २२२२१५ (राम म्हणतो.) हे लक्ष्मणा, माझ्या अभिषेकाचं सामान जितक्या त्वरेनें जुळविण्यांत आले आहे, तितक्या त्वरेनें वनवासाला जाण्याच्या सामग्रीची तयारी झाली पाहिजे. ४९५ स्त्रिया भर्ता हि दैवतम् ।। २।३९।३१
पति म्हणजे स्त्रियांचे दैवतच होय. ४९६ स्त्रीणां पवित्रं परमं पतिरेको विशिष्यते ॥२॥३९।२४
स्त्रियांना पति हेच उत्कृष्ट पुण्यसाधन आहे, स्त्रीला इतर सर्व पुण्यसाधनांपेक्षां पति अधिक आहे.
For Private And Personal Use Only
Page #304
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४९७ स्थिरं हि नूनं हृदयं ममायसं
न भिद्यते यद्धवि नो विदीर्यते । अनेन दुःखेन च देहमर्पित
ध्रुवं ह्यकाले मरणं न विद्यते ॥ २।२०५१ (राम वनवासाला जाणार हे ऐकून शोकाकुल झालेली कौसल्या म्हणते.) खरोखर माझें हृदय ज्याअर्थी ह्या प्रसंगी फाटून जात नाही, त्याअर्थी तें लोखंडाचे बनविल्याप्रमाणे बळकट आहे आणि अशा प्रकारच्या दुःखाने देह व्याप्त झाला असतांना देखील ज्याअर्थी तो विदीर्ण होऊन पृथ्वीवर पडत नाही, त्याअर्थी मरण अकाली कोणाला येत नाही, हेच निश्चित आहे. ४९८ स्निग्धस्य भजमानस्य युक्तमर्थाय कल्पितुम् ॥७।२५।४९
प्रेमाने आपल्याजवळ येणान्याच्या उपयोगी पडणे योग्य आहे. ४९९ स्वर्गों धनं वा धान्यं वा विद्याः पुत्राः सुखानि च । ___ गुरुवृत्त्यनुरोधेन न किंचिदपि दुर्लभम् ॥ २॥३०॥३६
( राम सीतेला म्हणतो. ) वडिलांच्या तंत्राने वागणाऱ्याला स्वर्ग, धन, धान्य, विद्या, पुत्र आणि सुख ह्यांपैकी काहींच दुर्लभ नाही. ५०० स्वामिना प्रतिकूलेन प्रजास्तीक्ष्णेन रावण ।
रक्ष्यमाणा न वर्धन्ते मृगा गोमायुना यथा ॥३॥४१।१४ (मारीच रावणाला म्हणतो.) व्याध रक्षण करीत असतांना ज्याप्रमाणे मृग वृद्धिंगत होत नाहीत, त्याचप्रमाणे प्रतिकूल आणि उग्र असा राजा रक्षण करीत असतांना प्रजेची भरभराट होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #305
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
५०१ हंसो यथा राजतपञ्जरस्थः सिंहो यथा मन्दरकन्दरस्थः । वीरो यथा गर्वितकुञ्जरस्थचन्द्रोऽपि बभ्राज तथाम्बरस्थः || ५|५|४
( लंकेत गेलेल्या मारुतीनें चंद्र अवलोकन केला. ) रुप्याच्या पिंजऱ्यामध्यें असलेला हंस जसा शोभतो, मंदरपर्वताच्या गुहेंत राहिलेला सिंह जसा दिसतो आणि मदोन्मत्त हत्तीवर आरूढ झालेला वीर जसा चमकतो, तसा आकाशांत असलेला चंद्र झळकूं लागला.
५०२ हित्वा धर्मं तथार्थं च कामं यस्तु निषेवते ।
१०७
स वृक्षाग्रे यथा सुप्तः पतितः प्रतिबुध्यते || ४|३८|२२
( राम सुग्रीवाला म्हणतो. ) धर्म व अर्थ यांची पर्वा न करितां जो कामाचेंच सेवन करितो, तो, वृक्षाग्रावर झोपी गेलेला पुरुष ज्याप्रमाणें खालीं पडल्यावर जागा होतो, त्याप्रमाणें ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्यानंतर शुद्धीवर येतो.
For Private And Personal Use Only
Page #306
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीरामायणसुभाषितानि विषयसूची
विषयः
अधर्मः ४७ । १९१ । ३०८ | ३२५ । ३८९
अनार्यः ३७०
अनिर्वेद: १८ – २० ( उत्साहः )
अनृतम् ७४ । ४०२
अन्नम् ४७२
अपवादः २६ । ४३३
अमित्र: ३०४ । ३२४ ( अरि: रिपुः ) अराजकम् २६५–२६९ । ३७३
अरिः ३३ | ७६ ( अमित्र: रिपुः )
अर्थः ३४ । ३८-४१ । ९६ । ९७ । १८५ । १८६ ।
१८८ । २१९ । ३५६ । ३९५ – ३९७ । ४४१ ।
४९२ । ५०२
आकार: ५५
आत्मजः १३२ ( पुत्रः सुतः ) आत्मा ६० । ६१ । २११ । ४९३
आयु: ५४ । ५९ । २९८
क्रमाङ्कः
For Private And Personal Use Only
Page #307
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
इन्द्रियम् ३४५ उत्साहः ७२ । ७३ । २७५ ( अनिर्वेदः) ऐश्वर्यम् ९० । ९१ । २०९ ( भूतिः) कर्म ४०१ कलत्रम् ३४० (दाराः नारी योषित् स्त्री) कामः ३४।९६।१६० । १८५।२१९ । ३५२ । ३९५ ।
४१५ । ४२९ । ५०२ काल: ११३ । १८५ । २०० । २०१ । २१४ । २१७ ।
२१९ । ३६५। ३७९ । ४०५ । ४१४ । ४२२ ।
४५१ । ४६७ । ४८९ कीर्तिः ११५। २४३ । ३६३ कृतघ्नः ११९ । १४१ । १६५। १७५ । ३०७ कोपः १२३ । १६० । १८४ । २३९ (क्रोधः) क्रोधः १२४ । १२५। १५८ । ३९८ । ४२८ ( कोपः) क्षत्रियः १२६-१२९ । ३१२ । ३३२ क्षमा १३० । १६५ । ३१८ । ३९८ गार्हस्थ्यम् १४४ गुरुः ४९ । १३९ । १६७ । २८५। ४९९ चन्द्रः ४४७। ५०१ चारित्रम् ११६ । ४७० जयः १६ । २४३ । २७९ । ३४६
For Private And Personal Use Only
Page #308
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११०
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
जीवितम् ८४।१०६ । १७३ । २२१ । ४३६ ।
४५५ । ४८० । ४८८ ज्ञातिः १२१ । १३२ । १४८ । २६१ । २७१ ।३१६ । ४३४ तपः १५९ । २८६ । ४३४ तेजः ४०३ । ४०४ । ४७५ दक्षः ४८३ दण्डः २७ । ३१ । ५७ । १६५ दाक्ष्यम् १८ दाराः ६१ । २१२ । ३६७ । ४८० ( कलत्रम् नारी योषित्
स्त्री)
दुःखम् १०२ । २७२ । ३१० दूतः ३५। ९३ । २१८ । ३३३ । ३४२। ३९० दैवम् १८१ । ४३१ धनम् ४८० । ४९९ ( श्रीः) धर्म: ३४ । ४७ । ५८। ६२।६८ । ७४ । ९६ । १२० ।
१७३ । १८५-१९१ । १९३ । १९४।२१९।२४४। २५० । २५१ । २५५ । २७६ । २९२ । ३१३ । ३५२ । ३६३ । ३६८ । ३९५ । ४१० । ४१३ ।
४१५। ४६४-४६६ । ४७७ । ४९३ । ५०२ धृतिः ४४१ (धैर्यम् ) धैर्यम् ४५६ ( धृतिः)
For Private And Personal Use Only
Page #309
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
विषयसूची
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
नृपः ३१० । ३२५
पण्डितः ९४ । ३९६
नरक : ३८८ ( निरयः )
नराधिपः ७ । ३२ । ८६ । ९२ ( नरेन्द्रः पार्थिवः भूपतिः महीपतिः राजा वसुधाधिपः )
१११
नरेन्द्रः ३६८ ( नराधिपः पार्थिवः भूपतिः महीपतिः राजा वसुधाधिपः )
नारी ८७ । १३२ । २२४ | २८५ | २८६ । ३३५-३३७ । ३३९ | ४४२ ( कलत्रम् दाराः योषित् स्त्री )
निरयः ३९१ ( नरकः )
निर्वेद: २९१
पतिः १३२ । १७४ । १८० । २२४ । २६२ । २८३ । २८५ | २८६ | ४९६ ( भर्ता )
परजनः १३७
परदाराः ९ । १०१ । २३० । २८९ । २९० । २९५ । २९६ परपक्षः ३९९
पराजय: १६ ( पराभव: )
पराभवः ९ ( पराजयः )
पातकम् १०९ । २७७ (पापम् )
पापम् १ । ४२ । ७५ । २०९ । २१० । २२३ । २८९ । ३०० । ४१५ । ४४९ ( पातकम् )
For Private And Personal Use Only
Page #310
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११२
सार्थ श्रीरामायण सुभाषितानि
पार्थिवः १६१ । २७३ ( नराधिपः नरेन्द्रः भूपतिः महीपतिः राजा वसुधाधिपः )
पिता: ४९ । १५२ । २२५ । ३०१-३०३ | ३०५ । ३५४ । ४१४ । ४१६ । ४६८ । ४६९
पुत्रः ४ । ८९ । ९२ । २४० । ३०३ | ३०५ । ४८० । ४९९ ( आत्मजः सुतः )
पुमान् ३९६ ( पुरुषः )
पुरुष: ३९८ । ४०७ ( पुमान् )
पुरुषकारः १८१ ( यत्नः )
पौरुषम् ३११
प्रकृति: ४३७
प्रजा २७६ । २७७ । ३७२ । ३८५ । ४१२ । ४१३ । ४१७ । ४६१ | ४६३ | ५००
प्रतिज्ञा २५ | २५३ | ३१३ । ४२१ ।
प्राणः ४३ । ४३६ | ४६३
प्रीतिः १७५ । ४७८ । ( सौहृदम् स्नेह : ) फलम् ४०१
बन्धुः ४८२ ( बान्धवः भ्राता )
बलम् १७१
बान्धवः ४ । ३८३ । ३९६ । ४८६ ( बन्धुः भ्राता ) बाल: १३८ । ४८६ ( मूर्खः )
बुद्धिमान् ११० । ३९७ । ४९२
For Private And Personal Use Only
Page #311
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसची
११३
ब्राह्मणः ३३२ । ४३४ भयम् १६० | ३३४ । ३७१ । ४३४ । ४४१ । ४६४ भर्ता १४९ । १६७ । ३२१ । ३३५-३३९ । ३५४।४४२ ।
४९५ ( पतिः) भारः ४७२ भावः ५५ भूतिः ४९२ ( ऐश्वर्यम् ) भूपतिः १३ (नराधिपः नरेन्द्रः पार्थिवः महीपतिः राजा वसुधाधिपः) भृत्यः २५८ । ४०७ । ४५७ भ्राता २४० । ३५४ ( बन्धुः बान्धवः) मनः ३४५ मन्त्रः १००।३४६ मन्त्री २९४ ! ४३५ मरणम् ८४ । ३३४ । ३५० । ३७१ । ३८२ । ४८० (मृत्युः) महीपतिः४६१(नराधिपः नरेन्द्रः पार्थिवः भूपतिः राजा वसुधाधिपः) माता ४ । ४९ । २२५ । ४१६ । ४६८।। मित्रम् ७६ । ९५। १८६ । ३०७ । ३८३ । ३८९ । ३९६
४०५ । ४२६ । ४७८ । ४८० (वयस्यः सखा सुहृद्) मूर्खः ९४ । ४८३ (बालः) मूलम् ३५६
रा.सु. ८
For Private And Personal Use Only
Page #312
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि mommmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm मृत्युः ३६६।४२२।४६४।४६७।४७९।४८४ (मरणम्) मृदुः ३५७ मेधावी ४८३ यत्नः ४१ ( पुरुषकारः) यशः २४३ । ३६३ युगम् ४१४ योषित् १९६ ( कलत्रम् दाराः नारी स्त्री) राजा २॥ २७ ॥ २८ । ३४ । ५३ । ६६ । ७८ । १०१ ।
१११।१६३।१७१। १७३ । १८५११८९।२२८ । २५७ । २७६ । ३०९ । ३५२ । ३७२ । ३८५ । ३८९ । ३९२ । ४१०।४१२-४१७। ४२३
(नराधिपः नरेन्द्रः पार्थिवः भूपतिः महीपतिः वसुधाधिपः) राष्ट्रम् १८९ । ३६८ । ३७३ रिपुः ४४३ । ४५६ ( अमित्रः अरिः) वक्ता ४९१ वयस्यः ५६ । १८३ | ४२४ ( मित्रम् सखा सुहृद् ) वसुधाधिपः ४५० (नराधिपः नरेन्द्रः पार्थिवः भूपतिः महीपतिः
राजा) वाक्यम् ४५ विषादः २३३ । ४०४
For Private And Personal Use Only
Page #313
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
विषयसूची
श्रीः १९ । ४८३ ( धनम् )
श्रेयः १५९
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
वृद्धः २४४
वैरम् ३५०
व्यसनम् ९१ । २७५ । ४४१
शुचिः १
शुभम् ३७८ । ४१५ | ४४९ | ४९३
शूरः १४ । १३४ | ३११ । ४५१ । ४७७ । ४८३ । शोकः ४४ । ४६ । १०७ । २३६ । २७५ । ३०६ । ३२८ । ४०३ । ४४३ | ४५३ -- ४५६
श्रोता ४९१
सखा १६९ ( मित्रम् वयस्यः सुहृद् )
सत्त्ववान् १२३
सत्यम् ६८ । ७४ । १९० । २४४ । २५३ । २८८ । ३६८ । ४४८ । ४६० । ४६४ - ४६६ । ४७६
सन् २३२ । ४७० । ४९३ ( साधुः )
सभा २४४ । ४०२
साधुः ३२७ । ४७७ (सन् )
साम २४२ । २४३
११५
सुखम् १९ । ५८ । १५९ । १७२ । १८७ । १८८ । २७२ । ३५२ । ३८४ | ४०३ | ४९९
For Private And Personal Use Only
Page #314
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
सुतः ३५४ ( आत्मजः पुत्रः) सुहृद् २४० । २९६ । २९८ । ४८२ । ४९२ ( मित्रम्
वयस्यः सखा) सौहृदम् १७५ । ३७० । ४७१ ( प्रीतिः स्नेहः ) स्त्री ७१ । ८८ । १४९ । १७४ । १८० । १९६ । २४९ ।
२८३ । ४३४ । ४९५ । ४९६ (कलत्रम् दाराः नारी
योषित् ) स्नेहः ८।१८३ । ४२९ । ४९८ (प्रीतिः सौहृदम् ) स्वजनः १३७ । २८१ । ४५७ स्वपक्षः ३९९ स्वभावः १८२ स्वर्गः ३९१ । ४९९ हितम् २९८
DETE
R
MAIma
( सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन) मुद्रक-रा. रा. रघुनाथ रामचंद्र बखले, मुंबईवैभव प्रेस,
सर्व्हटस् ऑफ इंडिया सोसायटी, गिरगांव, मुंबई.
प्रकाशक-केशव भिकाजी ढवळे, ( रामचंद्र बिल्डिंग )
गिरगांव, मुंबई.
For Private And Personal Use Only
Page #315
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
-
-
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
For Private And Personal Use Only
Page #316
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
NEXSEISEXSENSENSEXSEXXSEXSEXSI
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि संपादक-विष्णु विनायक परांजपे, पेण भाषांतरकार-चिंतामण मोरेश्वर परांजपे,
बी. ए., एलएल्. बी. (१०३२ सुभाषितें, किंमत १२ आणे)
सार्थश्रीरामायणसुभाषितानि भाषांतरकार-भालचंद्र शंकरशास्त्री देवस्थळी
( ५०२ सुभाषितें, किंमत ८ आणे)
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि भाषांतरकार-विष्णु विनायक परांजपे (५०८ सुभाषितें, किंमत ८ आणे)
RASHISHASHISHASKASHASKASISES.ISHISHASKASHISHASASIAS
सार्थश्रीभागवतसुभाषितानि भाषांतरकार-विष्णु विनायक परांजपे (११७ सुभाषितें, किंमत ३ आणे)
सार्थश्रीरामरक्षा
( किंमत १ आणा) Hos-6464 6
For Private And Personal Use Only
Page #317
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्टसुभाषितानि
संपादक व भाषांतरकार विष्णु विनायक परांजपे, पेण
प्रकाशक
केशव भिकाजी ढवळे, गिरगांव - मुंबई
आवृत्ति दुसरी
आषाढ शके १८५२ सन १९३०
किंमत ८ आणे
For Private And Personal Use Only
Page #318
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
AAAAAAA
( सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन ) मुद्रकः-रा. रा. रघुनाथ रामचंद्र बखले, मुंबईवैभव प्रेस,
सर्व्हटस् ऑफ इंडिया सोसायटी, गिरगांव, मुंबई. ।
प्रकाशक-केशव भिकाजी ढवळे, ( रामचंद्र बिल्डिंग )
गिरगांव, मुंबई.
VVVPAPyt/vvvv४५
rrrrrivruvv
For Private And Personal Use Only
Page #319
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
प्रस्तावना
श्रीयोगवासिष्ठ हा वेदान्ताचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. वसिष्ठ महर्षीनी रामाला केलेला उपदेश आद्य कवि वाल्मीकि यांनी आपल्या प्रासादिक वाणीने यामध्ये वर्णिला आहे. या ग्रंथाची मुख्य प्रकरणे ६ असून श्लोकसंख्या ३२ हजार आहे. यांतील निवडक ५०८ संस्कृत सुभाषितवचनें प्रस्तुत पुस्तकांत घेतली
आहेत आणि वचनांच्याखाली मराठी भाषान्तर दिले आहे. वचनें वर्णक्रमाने दिली असून शेवटी मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. वचनांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांतील डावीकडून पहिला अंक प्रकरणाचा, दुसरा सर्गाचा व तिसरा श्लोकाचा समजावा. ६ व्या निर्वाण प्रकरणाच्या उत्तरार्धाबद्दल ७ हा अंक घातला आहे. सूचीमध्ये विषयापुढील अंक हे वचनांचे क्रमांक आहेत.
हे सुभाषितवचनांचे पुस्तक सर्वांच्या वाचनात येवो, अशी श्रीरामप्रभूची प्रार्थना करून प्रस्तावना संपवितों. श्री विष्णु विनायक परांजपे
श्रीरामनवमी, शके १८५१६ राहणार पेण, जिल्हा कुलाबा.
For Private And Personal Use Only
Page #320
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
निवेदन
श्रीमहाभारत, श्रीरामायण, श्रीयोगवासिष्ठ व श्रीभागवत या राष्ट्रीय व धार्मिक ग्रंथांतील निवडक सुभाषितांची मराठी भाषांतरासह चार पुस्तकें प्रकाशित केली. ही पुस्तकें सर्व लोकांना मान्य झाल्यामुळे पहिली आवृत्ति एका वर्षांतच खपून गेली. आतां ही दुसरी आवृत्ति काढिली आहे.
वचन कोणी कोणाला सांगितले, हे समजण्याची विशेष अवश्यकता ज्या श्लोकांत दिसून येते, अशा श्लोकांचा अर्थ देतांना आरंभी कंसांत अवतरण दिले आहे. अशा अवतरणांची संख्या या आवृत्तीत वाढविली आहे.
धार्मिक शिक्षण देण्याच्या कामी ही चारहि सुभाषितांची पुस्तकें बरीच उपयोगी पडतात, असे पुष्कळ पालकांच्या व शिक्षकांच्या प्रत्ययास आले आहे. तरी सर्व जनतेला या पुस्तकांचा उपयोग होवो, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. आषाढ, शके १८५२
प्रकाशक
For Private And Personal Use Only
Page #321
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
श्रीयोगवासिष्ठांतील प्रकरणांची नांवें
१ वैराग्य २ मुमुक्षुव्यवहार ३ उत्पत्ति ४ स्थिति ५ उपशम ६ निर्वाण पूर्वार्ध ७ निर्वाण उत्तरार्ध
For Private And Personal Use Only
Page #322
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only
Page #323
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री योगवासिष्ठसुभाषितानि
१ अकृत्रिमं सुखं कीर्तिमायुश्चैवाभिवाञ्छता । प्र०स० लो० सर्वाभिमतदानेन पूजनीया गुणान्विताः || ३|७७/२६ स्वाभाविक सुख, कीर्ति आणि आयुष्य ह्यांची इच्छा करणाऱ्या मनुष्यानें सर्वांना इष्ट अशा दानाच्या योगानें गुणिजनांचा सत्कार करणें योग्य आहे.
२ अकृत्रिमफलं त्यक्त्वा यः कृत्रिमफलं व्रजेत् ।
त्यक्त्वा स मन्दारवनं कारचं याति काननम् ।।६।२९।१२६ स्वाभाविक फळ सोडून कृत्रिम फळाच्या मागे लागणारा, स्वर्गीतील मंदारवन सोडून कड्डू करंजाच्या वनांत जाणारा समजावा. ३ अजितात्मा जो मूढो रूढो भोगेककर्दमे ।
आपदां पात्रतामेति पयसामिव सागरः ।। ७।३३।२२ ज्याप्रमाणें पाणी शेवटीं समुद्राला जाऊन मिळतें, त्याप्रमाणें आत्मसंयमन न करणाऱ्या व भोगरूपी चिखलांत रुतून गेलेल्या मूढ मनुष्याला सर्व आपत्ति प्राप्त होतात. ४ अज्ञतातज्ज्ञते पूर्वं वक्तुर्निणय कार्यतः ।
यः करोति नरः प्रश्नं प्रच्छकः स महामतिः ।। २।११।४७ व्यवहारावरून वक्ता तज्ज्ञ आहे किंवा नाहीं, याचा प्रश्न करण्यापूर्वी विचार करून नंतर जो मनुष्य प्रश्न करितो तो खरोखरीच बुद्धिमान होय.
For Private And Personal Use Only
Page #324
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
५ अज्ञस्यार्धप्रबुद्धस्य सर्वं ब्रह्मेति यो वदेत् ।
महानरकजालेषु स तेन विनियोजितः ॥ ४॥३९।२४ अगदी अज्ञ असलेल्या व अर्धवट ज्ञान झालेल्या शिष्याला 'हे सर्व ब्रह्म आहे' असा बोध जो गुरु करितो तो त्या शिष्याला महानरकांतच लोटतो.
६ अज्ञानमपि नास्त्येव प्रेक्षितं यन्न लभ्यते । - विचारिणा दीपवता स्वरूपं तमसो यथा ॥ ७५७।५
ज्याप्रमाणे दिवा घेऊन अंधकाराचा शोध करणाऱ्याला अंधकार कधीहि दिसावयाचा नाही, त्याप्रमाणे विचारपूर्वक पाहणारास अज्ञान देखील नाही, असे दिसून येईल. ७ अज्ञोऽपि तज्ज्ञतामेति ___ शनैः शैलोऽपि चूर्ण्यते । बाणोऽप्येति महालक्ष्यं
पश्याभ्यासविजृम्भितम् ॥७६७।२६ (विद्याधरी वसिष्ठांना म्हणते) अभ्यासाचा म्हणजे पुनः पुनः एखादी गोष्ट केल्याचा परिणाम पहा. या अभ्यासाने अज्ञ देखील तज्ज्ञ होतो, हळूहळू पर्वताचेंहि चूर्ण अभ्यासामुळे होते, आणि अचेतन असलेला बाण देखील धनुर्धराच्या अभ्यासामुळेच सूक्ष्म लक्ष्याचा वेध करू शकतो. ८ अत उक्तं मया राम यदि शुद्धे हि चेतसि ।
उपदेशः प्रसरति तैलबिन्दुरिवाम्भसि ॥७१६४ श्रीवसिष्ठ म्हणतात-पाण्यामध्ये पडलेला तेलाचा थेंब जसा सहज पसरतो, तसा शुद्ध अन्तःकरणाच्या शिष्याला केलेला उपदेश तत्काळ ठसतो.
For Private And Personal Use Only
Page #325
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
९ अतज्ज्ञायैव विषया स्वदन्ते न तु तद्विदः।
न हि पीतामृतायान्तः स्वदते कटु काञ्जिकम्॥७४५/४० तत्त्व न जाणणा-या पुरुषालाच विषय आवडतात, तत्त्ववेत्त्याला कधीहि आवडत नाहीत. कारण अमृत पिऊन तृप्त झालेल्याला कडू कांजी पिण्याची इच्छाच होणार नाही. १० अत्राहारार्थं कर्म कुर्यादनिन्धं
कुर्यादाहारं प्राणसंधारणार्थम् । प्राणाः संधार्यास्तत्त्वजिज्ञासनार्थ
तत्त्वं जिज्ञास्यं येन भूयो न दुःखम् ॥ ७।२१।१० मुमुक्षु पुरुषाने या लोकी आहारासाठी निंद्य कर्म करू नये. आहार प्राणधारण होण्यासाठी करावा. तत्त्वजिज्ञासेकरितांच प्राणांच धारण करावें व ज्याच्या ज्ञानाने पुनः दुःख उत्पन्न होण्याचा प्रसंग येणार नाही, तेंच तत्त्व जाणण्याची इच्छा करावी. ११ अथापदं प्राप्य सुसंपदं वा
महामतिः स्वप्रकृतं स्वभावम् । जहाति नो मन्दरवेल्लितोऽपि
शौक्लयं यथा क्षीरमयाम्बुराशिः ॥५।९३।९८ ज्याप्रमाणे मंदरपर्वताच्या योगाने घुसळला जाणारा क्षीरसागर आपले शुक्लत्व सोडीत नाही, त्याप्रमाणे महामति पुरुष आपत्काली किंवा संपत्कालीं आपला मूळ स्वभाव सोडीत नाही. १२ अदर्शितमुखा एव दुर्जना मर्मवेधिनः ॥ ३७०६०
दुर्जन मनुष्य नेहमी आपले तोंड लपवून दुसन्याचा मर्मभेद करीत असतात.
For Private And Personal Use Only
Page #326
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१३ अद्यैव कुरु यच्छ्रेयो वृद्धः सन्किं करिष्यसि ।
स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये ॥ ७|१६२।२०
आजच आपले कल्याण करून घे. तूं वृद्ध झाल्यावर काय करूं शकणार ? कारण वृद्धापकालीं आपलीं गात्रेंच आपणांला भारभूत होत असतात.
१४ अद्यैव न चिकित्सां यः करोति मरणापदः ।
संप्राप्तायां मृतौ मूढः करिष्यति किमातुरः ॥ ७।१०३।३८ मरणरूपी आपत्तीची चिकित्सा जो मूढ मनुष्य आजच्या आज करीत नाहीं, तो, मरणकाल प्राप्त झाला असतां, पीडित झाल्यावर काय करूं शकेल ?
१५ अनन्तं समतानन्दं परमार्थं विदुर्बुधाः ।
स येभ्यः प्राप्यते नित्यं ते सेव्याः शास्त्रसाधवः || २|६|३४
समत्वापासून होणाऱ्या शाश्वत आनंदाला ज्ञाते लोक परमार्थ म्हणतात. या परमार्थाची प्राप्ति शास्त्र व सत्पुरुष यांच्या योगानें होते, म्हणून निरंतर त्यांची सेवा केली पाहिजे.
१६ अनन्तमपतृष्णस्य स्वयमेव प्रवर्तते ।
ध्यानं गलितपक्षस्य संस्थानमिव भूभृतः || ७|४५।४४ पंख तुटून गेल्यामुळें पर्वत जसा एकाच जागीं स्थिर राहतो, तसा निरिच्छ पुरुष सहजच ध्यानस्थ होतो.
१७ अनन्ताः पितरो यान्ति यान्त्यनन्ताश्च मातरः । इह संसारिणां पुंसां वनपादपपर्णवत् || ५|२०|३३ ज्याप्रमाणे वनामधील वृक्षावर असंख्य पानें येतात आणि गळून जातात, त्याप्रमाणे या संसारांत आपले अनंत आईबाप होतात आणि जातात.
For Private And Personal Use Only
Page #327
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
साथश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२८ अनन्तानीह दुःखानि सुखं तृणलवोपमम् ।
नातः सुखेषु बन्नीयादृष्टिं दुःखानुबन्धिषु ॥ २।१३।२३ या जगांत सुख पहावें तर अत्यंत अल्प आहे, व दुःख पहावें तर अनंत आहे; यासाठी परिणामी दुःख देणाऱ्या विषयसुखाची आस्था बाळगू नये. १९ अनहंवेदनं सिद्धिरहंवेदनमापदः ॥ ६।९९।१३
'अहम् ' असें न जाणणे हीच सिद्धि व ' अहम् ' असें जाणणे ह्याच सर्व आपत्ति. २० अनागतानां भोगानामवाञ्छनमकृत्रिमम् ।
आगतानां च संभोग इति पण्डितलक्षणम् ॥ ४।४६१८ अप्राप्त विषयांची इच्छा स्वाभाविक नसणे आणि प्राप्त विषयांचा उपभोग घेणे हे पंडिताचे लक्षण आहे. २१ अनायासकदर्थिन्या गृहीते जरसा जने ।
पलाय्य गच्छति प्रज्ञा सपत्न्येवाहताङ्गना ॥ १।२२।५ आयास न पडतां दीन करून सोडणा-या जरेचा पगडा मनुष्यावर बसला म्हणजे त्याची बुद्धि सवतीमत्सराने रागावलेल्या स्त्रीप्रमाणे त्याला सोडून निघून जाते. २२ अनार्तेन हि संमानो बहुमानो न बुध्यते ।
पूर्णानां सरितां प्रावृटपूरः स्वल्पो न राजते ॥४।२३।५४ पाण्याने नेहमीं भरलेल्या नद्यांना पावसाच्या लहान लहान सरींनी येणा-या पुराचे महत्त्व नाही, त्याप्रमाणे ज्याला दुःख कधी माहीत नाही, अशा मनुष्याचा सन्मान केला तर त्याला त्याची फारशी किंमत वाटत नाही.
For Private And Personal Use Only
Page #328
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२३ अनित्यं यौवनं बाल्यं शरीरं द्रव्यसंचयाः।
भावाद्भावान्तरं यान्ति तरङ्गवदनारतम् ॥ १।२८।१० बाल्य, तारुण्य, शरीर, द्रव्यसंचय इत्यादि सर्व वस्तू अनित्य असून समुद्रावरील लाटांप्रमाणे त्यांची रूपें एकसारखी पालटत असतात. २४ अनुद्वेगः श्रियो मूलम् ॥ ३॥११२२
उद्विग्न न होणे हे संपत्तीचें मूळ होय. २५ अनुरक्ताङ्गनालोललोचनालोकिताकृति ।
स्वस्थीकर्तुं मनः शक्तो न विवेको महानपि ॥१॥२६॥३८ अनुरक्त असलेल्या तरुणीने चंचल नेत्रकटाक्ष फेकले असतां मोठा विवेकी मनुष्य असला तरी, तो आपले मन आवरण्याला समर्थ होत नाही. २६ अनेकजन्मनामन्ते विवेकी जायते पुमान् ॥ ६।१२६४
अनेक जन्मांचा अनुभव घेऊन पुरुष विवेकी होतो. २७ अन्तकः पर्यवस्थाता जीविते महतामपि ।
चलन्त्यायूंषि शाखाग्रलम्बाम्बूनीव देहिनाम् ॥७।९३३८५ मोठमोठ्यांच्या जीवितालाही ग्रासण्यासाठी यम त्यांच्याभोंवतीं घिरट्या घालीत असतो. प्राण्यांचे आयुष्य शाखाग्रावर लोंबणान्या जलबिंदूइतकेंच स्थिर आहे ! २८ अन्तर्नैराश्यमादाय बहिराशोन्मुखेहितः।
बहिस्तप्तोऽन्तरा शीतो लोके विहर राघव ॥ ५।१८।२१ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, आंतून निराश राहा, पण बाहेरून आशावान असल्यासारखा उद्योग कर. तसेंच धनादिकांचा नाश झाला असतां आंतून शांत रहा, पण बाह्यतः संतप्त असल्याप्रमाणे वर्तन ठेव.
For Private And Personal Use Only
Page #329
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२९ अन्तःशीतलता या स्यात्तदनन्ततपःफलम् ॥ ५/५६।९
अन्तःकरण शांत असणे, हे अनंत तपांचे फल होय. ३० अन्तस्तृष्णोपतप्तानां दावदाहमयं जगत् ।
भवत्यखिलजन्तूनां यदन्तस्तद्वहिःस्थितम् ॥ ५५६॥३४ तृष्णेमुळे अन्तःकरण संतप्त झालेल्या लोकांना हे जग वणवा लागल्यासारखे दिसते. कारण, जे मनुष्याच्या मनांत असते, तेंच त्याच्या दृष्टीला बाह्य जगांत दिसते. ३१ अन्तःसंसक्तिरेवैकं कारणं बन्धमोक्षयोः॥५६७३४
अन्तःकरणाची आसक्ति असणे व नसणे हेच बंध आणि मोक्ष यांचे मुख्य कारण होय. ३२ अन्तःसंत्यक्तसर्वाशो वीतरागो विवासनः।
बहिःसर्वसमाचारो लोके विहर राघव ॥ ५॥१८॥१८ (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा, अन्तःकरणांतील सर्व आशा, विषयप्रेम व वासना यांना पार झुगारून दे, आणि बाह्यतः सर्व लोकव्यवहार करीत जा. ३३ अन्तःसारतया कार्य लघवोऽप्याप्नुवन्ति हि॥३७२।१९
एखादा क्षुद्र मनुष्यदेखील आपले कार्य अन्तःकरणाच्या दृढनिश्चयाच्या सामर्थ्यामुळे पार पाडतो. ३४ अन्नभूता हि महतां लघवो यत्नशालिनाम् । ___ यथेष्टं विनियोज्यन्ते तेन कर्मसु लोष्टवत् ॥ २।६।१३
दैववादी दुबळे लोक उद्योगी बलिष्ठ लोकांच्या भक्ष्यस्थानी पडतात. मातीच्या ढेकळांना तुडवून वाटेल तसा आकार देतां येतो, त्याप्रमाणे प्रयत्न करणारे लोक आपल्या कार्यामध्ये दुबळ्या आळशी लोकांचा वाटेल तसा उपयोग करून घेतात.
For Private And Personal Use Only
Page #330
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री योगवासिष्ठ सुभाषितानि
३५ अपरीक्ष्य च यः शिष्यं प्रशास्त्यतिविमूढधीः ।
स एव नरकं याति यावदाभूतसंप्लवम् || ४ | ३९।२६ शिष्याची परीक्षा न करतां आणि त्याची योग्यता न जाणतां जो गुरु त्याला ज्ञानोपदेश करितो, तो चिरकाल नरकवासाचें दुःख भोगितो.
३६ अपश्यन्काष्ठरन्ध्रस्थवृषणाक्रमणं यथा
कीलोत्पाटी कपिर्दुःखमेतीदं हि तथा मनः || ३|९९।४१ लाकडामध्यें ठोकलेली पाचर उपटणाऱ्या एखाद्या अविचारी वानराचा वृषण फटीमध्यें सांपडून तो मूर्ख वानर जसा संकटांत सांपडतो, त्याप्रमाणें नेहमीं कांहींना कांहीं उलाढाली करण्यांत दंग झालेलें चंचल मन दुःख भोगतें. ३७ अपि कष्टतरां प्राप्तैर्दशां विवशतां गतैः ।
मनागपि न संत्याज्या मानवैः साधुसंगतिः ॥ २।१६।८ कसल्याही प्रकारची कष्टदशा प्राप्त होऊन मनुष्य विव्हल झाला, तरी त्यानें सत्संगाचा त्याग क्षणभरहि करूं नये. ३८ अपि जीवितदानेन गुणिनं परिपालयेत् ।
गुणवत्संगमपध्या मृत्युरप्येति मित्रताम् || ३ | ७७ २८ गुणिजनांच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष जीवितावर पाणी सोडण्याचा प्रसग आला तरी, त्याला माघार घेतां कामा नये, कारण गुणिजनांच्या समागमरूपी औषधीमुळे प्रत्यक्ष मृत्युसुद्धां मित्र बनत असतो. ३९ अपि पौरुषमादेयं शास्त्रं चेद्युक्तिबोधकम् ।
अन्यत्त्वार्षमपि त्याज्यं भाव्यं न्याय्यैकसेविना ।।२।१८।२
युक्तिबोध करणारें शास्त्र एखाद्या सामान्य पुरुषानें केलेलें असले तरी तें ग्राह्य आहे. परंतु एखाद्या प्राचीन ऋषीनें केलेलेंहि शास्त्र युक्तिशून्य असले, तर न्यायी मनुष्याने त्याचा त्याग करणेंच उचित आहे.
For Private And Personal Use Only
Page #331
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
mmmmmmmwwwantr
४० अपि मेरुसमं प्राज्ञमपि शूरमपि स्थिरम् ।
तृणीकरोति तृष्णैका निमेषेण नरोत्तमम् ॥ १।१७५० एखादा मनुष्य मेरूप्रमाणे अटळ, विद्वान्, शूर आणि स्थिर बुद्धीचा असला तरी त्याला, तृष्णा क्षणामध्ये तृणाप्रमाणे तुच्छ करून सोडते. ४१ अपि शूरा अतिप्राज्ञास्ते न सन्ति जगत्त्रये ।
अविद्यया ये पुरुषा न नाम विवशीकृताः॥४॥४१॥३७
अविद्येच्या तडाक्यांत सांपडला नाही असा शूर किंवा महाबुद्धिमान् पुरुष त्रिभुवनांतहि विरळा. ४२ अपूर्वाह्लाददायिन्य उच्चैस्तरपदाश्रयाः ।
अतिमोहापहारिण्यः सूक्तयो हि महीयसाम् ॥ ५।४।५ थोर पुरुषांच्या सूक्ति अपूर्व आल्हाद देणान्या, अत्युच्चपदाला पोचविणा-या आणि अनर्थकारक मोह घालविणाऱ्या असतात. ४३ अपेक्षैव घनो बन्ध उपेक्षैव विमुक्तता ॥ ७।२६।३६
विषयांची अपेक्षा हाच दृढबंध होय. आणि उपेक्षा हाच मोक्ष होय. ४४ अप्यब्धिपानान्महतः सुमेरून्मूलनादपि ।
अपि वह्नयशनात्साधो विषमश्चित्तनिग्रहः ॥ १।१६।२४ समुद्र पिऊन टाकणे, मेरुपर्वत उपटून काढणे, किंवा अग्नि भक्षण करणे याच्यापेक्षांहि चित्ताचा निग्रह करणे हे जास्त कष्टतर आहे. ४५ अप्यापदि दुरन्तायां नैव गन्तव्यमक्रमे ॥ ४॥३२॥३९ केवढेंहि अनिवार संकट कोसळले तरी सन्मार्ग सोडून जाऊ नये.
For Private And Personal Use Only
Page #332
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१० सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ४६ अप्राप्तकारिणं भूपं रोधयन्ति च वै प्रजाः ॥ ६८४।२७
प्रजा अयोग्य कार्य करणाऱ्या राजाचे निवारण करतात. ४७ अबन्धुर्वन्धुतामेति नैकट्याभ्यासयोगतः ।
यात्यनभ्यासतो दूरात्स्नेहो बन्धुषु तानवम् ।। ७।६७।२९ नेहमींच्या सहवासामुळे जो आप्त नसतो तोही आप्त होतो, आणि प्रत्यक्ष बंधु असून तो निरंतर दूर राहिल्यास स्नेहसंबंध कमी होऊन परक्याप्रमाणे भासतो. ४८ अभ्यासभास्वति तपत्यवनौ वने च
वीरस्य सिध्यति न यन्न तदस्ति किंचित् । अभ्यासतो भुवि भयान्यभयीभवन्ति
सर्वासु पर्वतगुहास्वपि निर्जनासु ॥ ७६७।४५ जितेंद्रिय वीर पुरुषाचा अभ्याससूर्य प्रकाशमान होत असतांना भूमि, जल, अंतरिक्ष इत्यादिकांतील कोणतीही वस्तू त्याला प्राप्त करून घेता येते. इतकेच नव्हे कोणत्याही निर्जन पर्वतगुहेतील व्याघ्रसादि भयंकर प्राणीहि त्याला भय उत्पन्न करूं शकत नाहीत. ४९ अभ्यासेन कटु द्रव्यं भवत्यभिमतं मुने ।
अन्यसै रोचते निम्बस्त्वन्यस्मै मधु रोचते॥७६७।२८ (विद्याधरी श्रीवसिष्ठांना म्हणते) हे मुने, अभ्यासाने कडू पदार्थही गोड वाटू लागतो. एखाद्याला मध आवडतो, तर एखाद्याला अभ्यासामुळे कडू लिंबच आवडतो.
For Private And Personal Use Only
Page #333
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि www.rrmwarrrrrr.maa .५.१.१ ..१००००. . . . . .www.wommmmmaane ५० अम्लं मधुरसासिक्तं मधुरं मधुरञ्जितम् ।
बीजं प्रतिविषाकल्कसिक्तं च कटु जायते ॥ ४॥३५।२९ चिंचेच्या झाडाला मध, साखर इत्यादि पदार्थाचे खत घातले तर त्या चिंचेच्या झाडावर येणाऱ्या चिंचा गोड असतात. परंतु चिंचेला धोतरा, करंज यांच्या रसांचे खत घातल्यास त्याच चिंचा कडू निपजतात, असा आरामशास्त्राचा नियम आहे. ५१ अयं बन्धुरयं नेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु विगतावरणैव धीः ।५।१८६१ 'हा माझा बंधु' आणि 'हा माझा बंधु नन्हे' ही विचारसरणी क्षुद्र पुरुषांच्या ठिकाणी असते. परंतु श्रेष्ठ आचरणाच्या महात्म्यांच्या बुद्धीवरील संकुचित भावनेचे आवरण नाहीसे होऊन त्यांची बुद्धि सर्वत्र सम झालेली असते. ५२ अयोध्यासि च संतप्ते शुद्धे तप्तं तु लीयते ॥ ४।१७।२९
लोखंडाचे दोन तुकडे एकत्र ठेवल्याने एकमेकांत मिसळत नाहीत, परंतु कांहीं क्षार टाकून शुद्ध केलेले आणि तापवून द्रवमय झालेले तेच तुकडे एकमेकांत पूर्णपणे मिसळतात. ५३ अर्थिनां यनिराशत्वं सत्तमेऽभिभवो हि सः॥१७।१०
आपल्याकडे याचना करण्यासाठी आलेल्या मनुष्याची निराशा होणे हे सत्पुरुष लांछन समजतात. ५४ अर्ध सज्जनसंपर्कादविद्याया विनश्यति ।
चतुर्भागस्तु शास्त्रार्थश्चतुर्भागं स्वयत्नतः ॥ ७।१२।३७ सज्जनांच्या सहवासाने अर्धी अविद्या नष्ट होते. चतुर्थाश अविद्या शास्त्रविचाराने जाते. राहिलेला चतुर्थभाग आपल्या प्रयत्नानें घालवितां येतो.
For Private And Personal Use Only
Page #334
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
wwwmmmmmmmmmmmmmmm
५५ अलब्धज्ञानदृष्टीनां क्रिया पुत्र परायणम् ।
यस्य नास्त्यम्बरं पढें कम्बलं किं त्यजत्यसौ॥६।८७।१७ ज्यांना ज्ञानदृष्टि प्राप्त झाली नाही, त्यांना कर्म हेच परम साधन आहे. ज्याचेपाशी उंची वस्त्र नाहीं त्याने आपल्या जवळचा कांबळा टाकून देणे योग्य होईल काय ? ५६ अवश्यभाव्यस्तमयो जातस्याहर्पतेरिव ॥ ४।४८।२७ __ सूर्याचा उदय झाला म्हणजे त्याचा अस्त व्हावयाचा हा नियम जसा ठरलेला आहे, तसा जो प्राणी जन्मास आला तो केव्हांतरी मरणारच. ५७ अविरुद्धैव सा युक्तिर्ययापदि हि जीव्यते ॥ ३॥६८।१२
आपत्तीमध्ये वाटेल ती युक्ति योजून जिवंत राहणे ही गोष्ट शास्त्राला केव्हाही संमतच आहे. ५८ अशिष्यायाविरक्ताय यत्किचिदुपदिश्यते ।
तत्प्रयात्यपवित्रत्वं गोक्षीरं श्वदृताविव ॥ २।२।२१ जे ज्ञान विषयासक्त अयोग्य शिष्याला दिले जाते, ते कुत्र्याच्या कातड्याच्या पात्रांत ठेविलेल्या गाईच्या दुधाप्रमाणे अपवित्र होते. ५९ असतः शशशृङ्गादेः कारणं मार्गयन्ति ये ।
वन्ध्यापुत्रस्य पौत्रस्य स्कन्धमासादयन्ति ते ॥७।२२।९ सशाच्या शिंगासारख्या मुळीच नसलेल्या वस्तूंच्या कारणांचा जे शोध करीत बसतात, ते वन्ध्येच्या मुलाच्या नातवाच्या खांद्यावर बसतात असेंच म्हटले पाहिजे. ६० असतामपि संरूढं सौहार्द न निवर्तते ॥ ३॥८२४७
दुष्टांच्याही अंतःकरणांत एकदां प्रेम दृढ झाले, म्हणजे तें नाहींसें होणे शक्य नसतें.
For Private And Personal Use Only
Page #335
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
६१ असत्यभूतं तोयान्तश्चन्द्रव्योमतलादिकम् ।
बाला एवाभिवाञ्छन्ति मनोमोहाय नोत्तमाः॥४।४५/४७ पाण्यामध्ये पडलेलें चंद्राचे किंवा आकाशाचे असत्य प्रतिबिंब धरण्याचा मोह अज्ञ मुलांना पडतो, परंतु ज्ञात्या पुरुषाला असा मोह कधीही उत्पन्न होणार नाही. ६२ अस्माच्छास्त्रवराद्धोधा जायन्ते ये विचारितात ।
लवणैर्व्यञ्जनानीव भान्ति शास्त्रान्तराणि तैः॥७॥१६३।५४ मिठाच्या योगाने चटणी, भाजी यांना जशी रुचि येते त्याप्रमाणे या मुख्य शास्त्राच्या (योगवासिष्ठाच्या) विचाराने होणाऱ्या बोधामुळे इतर शास्त्रे सहज समजतात. ६३ अहंकारघने शान्ते तृष्णा नवतडिल्लता ।
शान्तदीपशिखावृत्त्या क्वापि यात्यतिसत्वरम् ॥१।१५।१३ अहंकाररूपी मेघ एकदा नाहीसा झाला, म्हणजे तृष्णारूपी वीज विझलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे कोठे नाहीशी होते तेही समजत नाही. ६४ अहंकारानुसंधानवर्जनादेव राघव ।
पौरुषेण प्रयत्नाच तीयते भवसागरः ॥४।३३।७० (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा, मोठ्या प्रयत्नाने आणि धैर्याने अहंकाराला हद्दपार कर म्हणजे, तूं भवसागर तरून जाशील. ६५ अहंकाराम्बुदे क्षीणे दृश्यते चिद्दिवाकरः ॥ ५/६४।४५
अहंकाररूपी मेघ दूर झाला म्हणजे चैतन्यरूपी सूर्याचे दर्शन होते.
For Private And Personal Use Only
Page #336
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
६६ अहमित्येव बन्धाय नाहमित्येव मुक्तये ॥ ७।२५/२०
देहादिकालाच 'मी' असे मानणे हा बंध, व देहादिक 'मी' नाहीं असे मानणे हाच मोक्ष. ६७ अहो नु चित्रा मायेयं तता विश्वविमोहिनी ।
असत्यैवापि सद्रूपा मरुभूमिषु वारिवत् ॥ ६॥६३१७ खरोखर विश्वाला मोह पाडणारी ही विचित्र माया पसरली आहे ! ही असत्य आहे, तथापि निर्जल प्रदेशावर भासणान्या मृगजळाप्रमाणे सत्यच आहे असे वाटते. ६८ अहो बत दुरुच्छेदाः प्राणिनां स्नेहवागुराः ॥ ३॥४३॥४८
प्राण्यांना बद्ध करणारे स्नेहपाश तोडून टाकणे खरोखर अतिशय कठीण आहे. ६९ अहो मोहस्य माहात्म्य
यदयं सर्वदुःखहा । चिन्तामणिर्विचाराख्यो
हृत्स्थोऽपि त्यज्यते जनैः ॥ ७१।१२ केवढे हो हे मोहाचे माहात्म्य, की लोक आपल्या हृदयांत असलेल्याही सर्वदुःखनाशक विचार नांवाच्या चिंतामणीला टाकून
देतात.
७० आज्ञाचरणमेवाहर्मुख्यमाराधनं सताम् ॥६२३।४
सज्जनांच्या आज्ञेप्रमाणे वर्तन ठेवणे हेच त्यांचे मुख्य आराधन आहे.
For Private And Personal Use Only
Page #337
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
७१ आत्मज्ञानं विदुर्ज्ञानं ज्ञानान्यन्यानि यानि तु ।
तानि ज्ञानावभासानि सारस्थानवबोधनात् ।। ७।२११७ आत्मज्ञान हेच खरे ज्ञान असून बाकीची ज्ञाने म्हणजे ज्ञानाभास आहेत. कारण, त्यांच्या योगानें साररूप तत्त्व कळत नाही. ७२ आत्मवत्सर्वभूतानि परद्रव्याणि लोष्टवत् ।
स्वभावादेव न भयाद्यः पश्यति स पश्यति ॥५।५६।४९ जो भयामुळे नव्हे, तर स्वभावतःच सर्व भूतांना आपल्याप्रमाणे मानतो आणि परद्रव्याला मातीच्या ढेकळांप्रमाणे समजतो, तोच खरा तत्त्ववेत्ता होय. ७३ आत्मीयेष्वर्थजातेषु मिथ्यात्मसु सुतादिषु ।
बुद्धदेष्विव तोयानां न स्नेहस्तत्त्वदर्शिनाम् ।।७।१०२।१६ स्वकीय धनपुत्रादिकांवर ती मिथ्या असल्यामुळे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे तत्त्ववेत्त्यांची आस्था नसते. ७४ आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥७।१६२।१८
प्रत्येक मनुष्य आपणच आपला हितकर्ता होतो व अहितकर्ताहि होतो. ७५ आत्यन्तिकी विरसता यस्य दृश्येषु दृश्यते ।
स बुद्धो नाप्रबुद्धस्य दृश्यत्यागे हि शक्तता ॥ ७४५।३६ ज्याच्या ठिकाणी दृश्य वस्तूंविषयी पूर्णपणे वैराग्य असेल तोच ज्ञानी, असें जाणावें. कारण अज्ञ पुरुषाला दृश्य वस्तूंचा त्याग करण्याचे सामर्थ्य नसते.
For Private And Personal Use Only
Page #338
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
७६ आदावन्ते च यन्नास्ति कीदृशी तस्य सत्यता ।
आदावन्ते च यन्नित्यं तत्सत्यं नाम नेतरत् ॥ ५।५।९ जें पूर्वकाली आणि उत्तरकाली नाही ते मधल्या कालांत तरी सत्य कसे असणार ? जें सर्वदा (तिन्हीकालांत) असते, तें वास्तविक सत्य होय, तद्यतिरिक्त सत्य असणे शक्य नाही. ७७ आदावेव हि नोत्पन्नं यत्तस्येहास्तिता कुतः। __कुतो मरौ जलसरिद्वितीयेन्दौ कुतो ग्रहः ॥ ३७४२
जें आरंभी उत्पन्नच झालेले नाही त्याला अस्तित्व कोठून असणार ? रखरखीत वाळवंटांत भासणारी नदी आणि दृष्टिदोषामुळे. आकाशांत भासणारा दुसरा चंद्र यांना अस्तित्व कसे असेल ? ७८ आदौ शमदमप्रायैर्गुणैः शिष्यं विशोधयेत् ।
पश्चात्सर्वमिदं ब्रह्म शुद्धस्त्वमिति बोधयेत् ॥ ४।३९।२३ शिष्याची बुद्धि प्रथम शमदमादि गुणांनी चांगली शुद्ध करावी, नंतर ' हे सर्व जग ब्रह्म आहे' आणि 'तूंहि शुद्ध ब्रह्मच आहेस' असा उपदेश करावा. ७९ आनन्दायैव भूतानि यतन्ते यानि कानिचित्।६।१०८।२०
कोणताहि प्राणी सुखासाठींच यत्न करीत असतो. ८० आपतन्ति प्रतिपदं यथाकालं दहन्ति च ।
दुःखचिन्ता नरं मूढं तृणमग्निशिखा इव ॥ २॥११॥४० अग्नीची ज्योत गवताला जाळून टाकते त्याप्रमाणे दुःख आणि चिंता यांचे तडाखे मूढ मनुष्याला पावलोपावली सहन करावे लागतात; व त्याच्या आंगाचा नेहमी दाह करतात.
For Private And Personal Use Only
Page #339
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
८१ आपदः क्षणमायान्ति क्षणमायान्ति संपदः।
क्षणं जन्म क्षणं मृत्युमुने किमिव न क्षणम् ॥ १।२८।३१ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) क्षणांत आपत्ति, क्षणांत संपत्ति; क्षणांत जन्म, क्षणांत मृत्यु अशा त-हेने हे मुने, जगांतील सर्व गोष्टी क्षणिक आहेत. ८२ आपदो या दुरुत्तारा याश्च तुच्छाः कुयोनयः।
तास्ता मौख्यात्प्रसूयन्ते खदिरादिव कण्टकाः॥२।१३।१६ खैराच्या झाडापासून कांटे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे सर्व त-हेच्या अधम योनि आणि दुस्तर आपत्ति मूर्खपणापासून उत्पन्न होतात. ८३ आपातमात्ररम्येभ्यो भोगेभ्यः किमवाप्यते ।
सत्सङ्गचिन्तामणितः सर्वसारमवाप्यते ॥ ६॥२०१३९ विचार करी पर्यंतच रम्य वाटणान्या भोगांपासून काय मिळणार? कांहीं नाही. पण सत्संगरूप चिंतामणीपासून सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेले पद प्राप्त होते. ८४ आयुः पल्लवकोणाग्रलम्बाम्बुकणभङ्गुरम् ।
उन्मत्तमिव संत्यज्य यात्यकाण्डे शरीरकम् ॥ ११४।१ झाडावरील पानाच्या टोकावर लोंबणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे जीवित क्षणभंगुर आहे. उन्मत्त मनुष्याप्रमाणे जीवित शरीराचा त्याग करून केव्हांच निघून जात. ८५ आयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते ।
नीयते तद्वृथा येन प्रमादः सुमहानहो ॥ ७।१७५।७८ आयुष्याचा एक क्षण सुद्धा रत्नांच्या राशी दिल्यानेही मिळणार नाही, हे जर निश्चित आहे, तर आयुष्य व्यर्थ घालविणे हा मोठा बेसावधपणा नव्हे काय ?
यो. वा. २
For Private And Personal Use Only
Page #340
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
wmmmmmmmmm.niruvr
..
१८ सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ८६ आयुषः खण्डखण्डाश्च निपतन्तः पुनः पुनः ।
न कश्चिद्वत्ति कालेन क्षतानि दिवसान्यहो ।।७।९३१५१ हरहर ! काळ हा प्राण्यांच्या आयुष्याचे तुकडे तुकडे करून टाकीत असतो. पण प्रत्येक दिवशी अशा प्रकारें क्षय पावणारे आयुष्य संपत आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. ८७ आलस्यं यदि न भवेजगत्यनर्थः
को न स्याबहुधनको बहुश्रुतो वा । आलस्यादियमवनिः ससागरान्ता
संपूर्णा नरपशुभिश्च निधनैश्च ।। २।५।३० या जगामध्ये अनर्थकारक आळस नसता, तर प्रत्येक मनुष्य संपत्तिमान आणि विद्वान् झाला असता. परंतु आळसामुळे ही समुद्रवलयांकित संपूर्ण पृथ्वी नरपशूनी आणि निर्धन लोकांनी भरून गेली आहे. ८८ आशा हि लोहरज्जुभ्यो विषमा विपुला दृढा ।
कालेन क्षीयते लोहं तृष्णा तु परिवर्धते ॥ ६१९११६ आशा ही लोखंडी साखळदंडाहून अतिशय कठीण व मोठी मजबूत आहे. लोखंड कांहीं कालाने घासून घासून झिजून जाते, परंतु आशा मात्र उत्तरोत्तर वाढतच जाते. ८९ आस्थामात्रमनन्तानां दुःखानामाकरं विदुः।
अनास्थामात्रमभितः सुखानामाकरं विदुः ॥४।२७।२५ आसक्ति असणे ही केवळ अनंत दुःखांची खाण आहे. आणि आसक्ति नसणे ही स्थिति सर्व सुखांची खाण आहे.
For Private And Personal Use Only
Page #341
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ~~~~~~~~~~~~~~~~ ९० इच्छोदयो यथा दुःखमिच्छाशान्तिर्यथा सुखम् ।
तथा न नरके नापि ब्रह्मलोकेऽनुभूयते ॥ ७३६।२४ इच्छा उत्पन्न झाल्याने दुःख होते तसे दुःख नरकांतही होत नाहीं; आणि इच्छा नाहीशी झाली असतां जें सुख मिळते तसे श्रेष्ठसुख ब्रह्मलोकामध्येही अनुभवाला येत नाही. ९१ इच्छोपशमनं कर्तुं यदि कृत्स्नं न शक्यते ।
स्वल्पमप्यनुगन्तव्यं मार्गस्थो नावसीदति ॥ ७।३६।३० सर्व इच्छा एकदम नाहींशा करणे अशक्य झाल्यास क्रमाक्रमाने थोडथोड्या इच्छा सोडीत जाव्या. कारण, सन्मार्गाने जाणारा पुरुष कधीही क्लेश भोगीत नाही. ९२ इतो नाभिमताः सर्वे ज्ञस्य भोगाः स्वभावतः।
भवन्ति कोऽतितृप्तो हि दुरनं किल वाञ्छति ॥६।५९।३० ज्ञानी पुरुषाला स्वभावतःच कोणताही भोग स्वीकारणे मान्य नसते. कारण जो मिष्टान्नाने अतिशय तृप्त झाला तो कदन्नाची इच्छा कशी धरील ? ९३ इत्युक्तवत्यथ मुनौ दिवसो जगाम
सायंतनाय विधयेऽस्तमिनो जगाम । स्नातुं सभा कृतनमस्करणा जगाम
श्यामाक्षये रविकरेण सहाजगाम ॥ २५॥३२ (श्रीवाल्मीकि भरद्वाजाला म्हणाले)-वसिष्ठ मुनींनी अशा त-हेचे भाषण केल्यानंतर संध्याकाळ झाली, व सूर्य अस्तास गेला. तेव्हां सभेतील मुनि वसिष्ठमुनींना नमस्कार करून सायंकाळची स्नानसंध्यादि विहित कर्मे करण्यासाठी निघून गेले, आणि रात्र सरल्यानंतर पुन्हां दुसन्या दिवशी सूर्याच्या किरणांबरोबर वसिष्ठमुनींकडे आले.
For Private And Personal Use Only
Page #342
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
xmmm ९४ इंद्रियोत्तमरोगाणां भोगाशावर्जनादृते ।
नौषधानि न तीथोनि न च मन्त्राश्च शान्तये ॥७।६।४५ इंद्रियरूपी रोगावर भोगांची आशा सोडणे यावांचून दुसरें कोणतेही औषध नाही. तीर्थे, मंत्र इत्यादिकांच्या योगाने हा रोग नाहीसा होत नाही. ९५ इष्टवस्त्वर्थिनां तज्ज्ञसूपदिष्टेन कर्मणा ।
पौनःपुन्येन करणान्नेतरच्छरणं मुने ॥ ७६७४२३ (विद्याधरी श्रीवसिष्ठांना म्हणते) हे मुने, लौकिक शिल्प अथवा वैदिक विद्या इत्यादि फलांची इच्छा करणान्या विद्यार्थ्यांस त्या त्या विद्यांच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे पुनः पुनः त्याचा अभ्यास करणे हेच श्रेयस्कर आहे. ९६ इहैव नरकव्याधेश्चिकित्सां न करोति यः।
गत्वा निरौषधं स्थानं सरुजः किं करिष्यति ॥७१०३१५१ येथे असतांनाच पुढच्या नरकव्याधीची चिकित्सा केली पाहिजे. औषध मिळणार नाही अशा ठिकाणी गेल्यावर रोगग्रस्त मनुष्य काय करणार? ९७ ईप्सितावेदनाख्यात्तु मनःप्रशमनादृते ।
गुरूपदेशशास्त्रार्थमन्त्राद्या युक्तयस्तृणम् ॥ ३॥१११।१४ इष्टवस्तूविषयीं वैराग्य उत्पन्न होऊन मन शांत झाल्याशिवाय गुरूपदेश, शास्त्रार्थ, मंत्र इत्यादि युक्त्या व्यर्थ होत. ९८ ईश्वरप्रेरितो गच्छेत्स्वर्ग नरकमेव वा । । स सदैव पराधीनः पशुरेव न संशयः॥ २।६।२७
केवळ ईश्वराने प्रेरणा केल्यामुळे मनुष्य स्वर्गाला किंवा नरकाला जातो, असें ज्याला वाटते, असा मनुष्य नेहमीं पराधीनच राहणार, व असला मनुष्य निःसंशय पशु होय.
For Private And Personal Use Only
Page #343
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
साथश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
९९ ईश्वरो न महाबुद्धे दूरे न च सुदुर्लभः ।
महाबोधमयैकात्मा स्वात्मैव परमेश्वरः ॥७॥४८॥२२ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) ईश्वर दूर नाहीं, तो अतिशय दुर्लभही नाही. परमेश्वर ज्ञानस्वरूप, एकरूप असून स्वतःचा आत्माच आहे. १०० उत्कन्धरो विततनिर्मलचारुपक्षो
हंसोऽयमत्र नभसीति जनैः प्रतीतः । गृह्णाति पल्वलजलाच्छफरीं यदासौ
ज्ञातस्तदा खलु बकोऽयमितीह लोकैः ॥७११८.५ आकाशांतून जात असतांना वर उंच केलेली मान व पसरलेले शुभ्र सुंदर पंख यांवरून ' हा हसच असावा, ' असें प्रथम लोकांना वाटले; परंतु पुढे जेव्हां डबक्यांतील पाण्यातून मासे गट्ट करीत आहे असे दृष्टीस पडल, तेव्हां ' हा बगळा आहे' अशी लोकांची खातरी झाली. (बाह्य आकारावरून जरी एखाद्याची बरोबर ओळख न पटली, तरी त्याचे आचरण पाहिल्यावर ती सहज पटते.) १०१ उत्थितानुत्थितानेतानिन्द्रियाहीन्पुनःपुनः ।
हन्याद्विवेकदण्डेन वज्रेणेव हरिगिरीन् ॥ ५।८।१७ इंद्र आपल्या वज्राने पर्वतांचे चूर्ण करून टाकितो, त्याप्रमाणे इंद्रियरूपी सोनी आपली डोकी वर केलेली असोत किंवा नसोत, ती विवेकरूपी दंडाने पुनः पुन्हां फोडून टाकावी. १०२ उत्सवादपि नीचानां कलहोऽपि सुखायते ॥३॥७०।७६
नीचवृत्तीच्या लोकांना आनंदोत्सवापेक्षाहि कलहच अधिक प्रिय असतो.
For Private And Personal Use Only
Page #344
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१०३ उदारगुणयुक्ता ये विहरन्तीह देहिनः ।
धरातलेन्दवः सङ्गादृशं शीतलयन्ति ते ॥३७७।३० जे उदार व गुणवान पुरुष या जगांत विहार करतात, ते आपल्या सहवासाने सर्व लोकांना शीतलता आणि आल्हाद देणारे पृथ्वीवरील दुसरे चंद्रच होत. १०४ उपदेशक्रमो राम व्यवस्थामात्रपालनम् ।
ज्ञप्तस्तु कारणं शुद्धा शिष्यप्रज्ञैव राघव ॥ ६१८३।१३ (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा, उपदेश करणे हे केवळ शास्त्रीय व्यवस्थेचे परिपालन करणे आहे. पण ज्ञानाचे कारण केवळ शिष्याची शुद्ध बुद्धिच आहे. १०५ उभाभ्यामेव पक्षाभ्यां यथा खे पक्षिणां गतिः ।
तथैव ज्ञानकर्मभ्यां जायते परमं पदम् ॥ १।१७ पक्ष्यांना आकाशांत संचार करण्याला ज्याप्रमाणे दोन पंखांची गरज असते, त्याप्रमाणे कर्म आणि ज्ञान या दोन साधनांच्या योगाने मोक्षरूपी परमपदाची प्राप्ति होते. १०६ उह्यन्ते वारणा यत्र तत्रोर्णायुषु का कथा ॥७६८१३७
हत्तीसारखे मोठेमोठे प्राणीही ज्या प्रवाहांतून वाहत जातात, तेथे क्षुद्र मेंढ्यांची काय कथा ! १०७ ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न च कश्चिच्छृणोति तत् ।
असंकल्पः परं श्रेयः स किमन्तर्न भाव्यते ॥६॥१२६।९४' (श्रीवसिष्ठ म्हणतात ) मी हात वर करून मोठ्याने ओरडत आहे पण माझ्या आक्रोशाकडे कोणी लक्ष देत नाही. विषयसंकल्पाचा त्याग केल्याने मोक्षप्राप्ति होईल, ही गोष्ट लोक अंतःकरणांत कां ठसवून घेत नाहीत ?
For Private And Personal Use Only
Page #345
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१०८ एतया तदलं मेऽस्तु तुच्छया पूर्वचिन्तया । पौरुषं याति साफल्यं वर्तमानचिकित्सया ||५/२५/१६
( बलि म्हणतो ) गत गोष्टीबद्दल शोक करण्यांत काय अर्थ आहे ? वर्तमानकाळी कोणती गोष्ट कर्तव्य आहे, याचा विचार केल्यानें पुरुषप्रयत्न सफल होतो. १०९ एतावति धरणितले सुभगास्ते साधुचेतनाः पुरुषाः ।
पुरुष कलासु च गण्या
न जिता ये चेतसा स्वेन || ४।२३।६०
२३
या पृथ्वीवर तेच भाग्यवान्, साधु, खरे पुरुष, आणि कलावान् होत कीं, ज्यांना त्यांच्या चित्तानें जिंकून त्यांच्यावर आपला पगडा बसविला नाहीं.
११० एतावतैव देवेशः परमात्मावगम्यते ।
१११ एतावदेव बोधस्य
काष्ठोष्टसमत्वेन देहो यदवलोक्यते || ५ | ६४।४४
देह हा काट व ढेकूळ यांच्या सारखा जड आहे ही गोष्ट मनांत निरंतर वागवीत जाणें हाच देवश्रेष्ठ परमात्म्याच्या ज्ञानाचा उपाय आहे.
बोधत्वं यद्वितृष्णता । पाण्डित्यं नाम तन्मौख्यं
यत्र नास्ति वितृष्णता || ७|१९४।३४
च खरें ज्ञान कीं, ज्याच्या योगानें विषयलालसा नाहींशी होईल. ज्याच्यायोगानें विषयतृष्णा नाहींशी होत नाहीं असें पांडित्य म्हणजे केवळ मूर्खत्वच होय.
For Private And Personal Use Only
Page #346
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२४
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
११२ कपर्दकार्धलाभेन कृपणो बहु मन्यते ||३ | ७० / ७७
एखाद्या कृपणाच्या हातीं एखादी फुटकी कवडी लागली, तरी तेवढ्यामुळे त्याला एखादा मोठा निधि सांपडल्यासारखा आनंद होतो [ अशा रीतीनें प्राण्यांच्या अहंकाराचा चमत्कार खरोखर दुर्निवार आहे ]
१९३ कवलयति नरकनिकरं
परिहरति मृणालिकां ध्वाङ्क्षः ।
यदतोऽस्तु मा स्मयस्ते
स्वभ्यस्तं सर्वदा स्वदते ॥ ७ ११६।६४
( एकजण मित्राला म्हणतो) कावळा कमलतंतु सोडून घाणेरडे पदार्थ खातो, यांत आश्चर्य नाहीं; कारण रोजच्या सवयीनें निंद्य पदार्थही स्वादिष्ट वाटू लागतात.
११४ कान्तावियोगजातेन हृदि दुःस्पर्शवह्निना ।
यौवने दह्यते जन्तुस्तरुर्दावाग्निना यथा || १ | २० | १७
तारुण्यांत स्त्रीचा वियोग झाला म्हणजे, स्पर्श करण्यास कठीण अशा शोकरूपी अग्नीनें मनुष्याचें अंतःकरण वणव्यानें जळणाऱ्या वृक्षाप्रमाणे जळून जातें.
११५ कामनाम्ना किरातेन विकीर्णा मुग्धचेतसाम् ।
नार्यो नरविहङ्गानामङ्ग बन्धनवागुराः || १ | २१|१८
(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) कामरूपी भिल्लानें मूढमनुष्यरूपी पक्ष्यांना पकडण्यासाठीं तरुण स्त्रिया हैं एक जाळें पसरून ठेविलें आहे.
११६ कारणेन विना कार्य न च नामोपपद्यते ॥ ७/५७/१३ कारणावांचून कार्य संभवतच नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #347
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
११७ कार्यमण्वपि काले तु कृतमेत्युपकारताम् । ___ महदप्युपकारोऽपि रिक्ततामेत्यकालतः॥ १।७२६ योग्यवेळी एखाद्याचे लहानसें काम केले तरी तो मनुष्य आभारी होतो; परंतु वेळ निघून गेल्यावर कितीही मोठा उपकार केला तरी फुकट जातो. ११८ कालः कवलनैकान्तमतिरत्ति गिरनपि । __ अनन्तैरपि लोकौधैर्नायं तृप्तो महाशनः ॥ १।२३।१०
काल हा सर्वांना खाऊल टाकण्यांत अगदी दंग झालेला आहे. तो एकाच वेळी अनेकांचा संहार करीत असतो. तो इतका अधाशी आहे की, अगणित लोकांचा संहार करूनही त्याची तृप्ति होत नाही. (तोंडांत घास असतांना आणखी खातच असतो.) ११९ कालविद्भिर्विनिर्णीतं पाण्डित्यं यस्य राघव ।
अनध्यापित एवासौ तज्ज्ञश्चेदैवमुत्तमम् ॥ २।८।१९ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, एखादा मनुष्य पंडित होणार, असें ज्योतिष्याने भाकीत केले, परंतु अध्ययन न करतां असा मनुष्य विद्वान होऊ शकेल, तर दैव बलिष्ठ आहे असे म्हणता येईल. १२० कालविद्भिर्विनिर्णीता यस्यातिचिरजीविता ।
स चेज्जीवति संछिन्नशिरास्तदैवमुत्तमम् ॥ २।८।१८ एखादा मनुष्य पुष्कळ दिवस जगणार असें ज्योतिष्याने सांगितले, आणि अशा स्थितीत त्या मनुष्याचे डोके उडविलें असतांही तो जगला, तर मात्र दैव समर्थ आहे, असे म्हणता येईल. १२१ कालः सर्वकषो ह्ययम् ॥ ७१४०५ काल हा सर्वांचाच नाश करणारा आहे.
For Private And Personal Use Only
Page #348
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१२२ किं दूरं व्यवसायिनाम् ॥ ३॥२९॥३८
उद्योग करणाऱ्या लोकांना मिळविण्यास कठीण असें या जगांत काय आहे ? १२३ कुटिला कोमलस्पर्शा विषवैषम्यशंसिनी ।
दशत्यपि मनाक्स्पृष्टा तृष्णा कृष्णेव भोगिनी १११७।१७ विषयतृष्णा ही कुटिल असून तिचा स्पर्श आरंभी मोठा गोड वाटतो, परंतु परिणामी ती विषाप्रमाणे घात करिते. एकाद्या काळ्या नागिणीला जरा स्पर्श होतांच ती डसते त्याप्रमाणे तृष्णेला स्पर्श केल्याबरोबर ती मनुष्याला मूट बनविते. १२४ कुरङ्गालिपतङ्गेभमीनास्त्वेकैकशो हताः।
सर्वैयुक्तैरनफस्तु व्याप्तस्याज्ञ कुतः सुखम् ॥५।५२।२१ (उद्दालक मुनि अज्ञचित्ताला बोध करितात) शब्दस्पर्शादि विषय इतके अनर्थकारक आहेत की, एकेका विषयामध्ये आसक्त होणारे हरिण, भ्रमर, पतंग, हत्ती आणि मासा हे जीव घात करून घेतात. पांचही विषयांमध्ये रममाण होणान्या मनुष्यावर सर्व त-हेचे अनर्थ कोसळतील यांत नवल काय ? त्याला कोठून सुख मिळणार? १२५ कृच्छ्रेषु दूरास्तविषादमोहाः
स्वास्थ्येषु नोसिक्तमनोभिरामाः। सुदुर्लभाः संप्रति सुन्दरीभि
रनाहतान्तःकरणा महान्तः ॥ १।२७८ विपत्तीमध्ये ज्यांना विषाद वाटत नाही व मोह पडत नाहीं आणि संपत्ति प्राप्त झाली असतां जे गर्वाने फुगून जात नाहीत;. तसेंच सुंदर स्त्रिया पाहून ज्यांच्या अंतःकरणांत मुळींच विकार उत्पन्न होत नाही असे महात्मे सांप्रतकाळी फारच दुर्मिळ आहेत.
For Private And Personal Use Only
Page #349
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२७
१२६ केनापदि विचार्यन्ते वर्णधर्मकुलक्रमाः॥ ३३१०६।५२
आपत्तीमध्ये सांपडलेला मनुष्य आपला वर्ण, धर्म, किंवा आपली कुलपरंपरा ह्यांचा विचार कधी तरी करतो का ? १२७ केवलात्कर्मणो ज्ञानान हि मोक्षोऽभिजायते ।
किं तूभाभ्यां भवेन्मोक्षः साधनं तूभयं विदुः ॥ १।११८ केवल कर्माने किंवा केवल ज्ञानानें मोक्ष साध्य होत नाही. तर कर्म आणि ज्ञान ही दोन्ही मोक्षाची साधने आहेत.' १२८ कोकिलः काकसंघातैः समवर्णाननाकृतिः।
गदितैर्व्यक्ततामेति सभायामिव पण्डितः ॥७११६।७३ कावळ्यांच्या समूहांत असलेला कोकिल पक्षी हा वर्ण, मुख व आकृति यांच्यामध्ये साम्य असल्यामुळे जरी ओळखू आला नाही, तरी ज्याप्रमाणे पंडित कोण आहे हे सभेतील भाषणावरून समजते,. त्याप्रमाणे मधुर शब्दांवरून कोकिल पक्षी सहज ओळखू येतो. १२९ को न गृह्णाति मूढोऽपि
वाक्यं युक्तिसमन्वितम् ॥७१८३२२ ज्या भाषणांत कांहीतरी युक्ति आहे, असे भाषण मूर्ख मनुष्य देखील मानीत असतो. १३० को नाम परिपृच्छन्तं विनीतं वश्चयेत्पुमान् ॥६।८५/८४
नम्रतेने प्रश्न करणाराला कोणता बरें पुरुष फसवील ? १३१ कोपं विषादकलनां विततं च हर्ष
नाल्पेन कारणवशेन वहन्ति सन्तः ॥१।५।१५ सत्पुरुषांना अल्पकारणावरून क्रोध, खेद किंवा हर्ष कधीही. उत्पन्न होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #350
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२८
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
* १३२ कोsहं कथमयं दोषः संसाराख्य उपागतः । न्यायेनेति परामर्शो विचार इति कथ्यते । २।१४/५०
माझें खरें स्वरूप काय व हा संसाररूपी दोष आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं कसा उत्पन्न झाला, इत्यादि प्रश्नांचें शास्त्रानें सांगितलेल्या मार्गानें चिंतन करणें यालाच विचार असें म्हणतात. १३३ क्षणमानन्दितामेति क्षणमेति विषादिताम् ।
क्षणं सौम्यत्वमायाति सर्वस्मिन्नटवन्मनः || १ |२८|३८ मनाची स्थिति एकाद्या नटाप्रमाणे क्षणांत आनंदाची तर क्षणांत खिन्नतेची व क्षणांत सौम्यतेची दिसून येते.
१३४ क्षणमायाति पातालं क्षणं याति नभःस्थलम् ।
क्षणं भ्रमति दिने तृष्णा हृत्पद्मषट्पदी ॥ १।१७ ३१
तृष्णा ही क्षणामध्यें पातालांत जाते, व क्षणामध्यें आकाशांत गमन करते अशा रीतीनें तृष्णा ही हृदयरूपी कमळावरील भ्रमरी असून दिशारूपी कुंजामध्यें भ्रमण करीत असते.
१३५ गम्भीराणि प्रसन्नानि साधुचेतः सरांसि हि ।।७।२३।३५ साधूंचीं अतःकरणरूपी सरोवरें खोल व स्वच्छ असतात.
१३६ गुणं ममेमं जानातु जनः पूजां करोतु मे ।
इत्यहंकारिणामीहा न तु तन्मुक्तचेतसाम् ||७|१०२।३१
माझा हा गुण लोकांना कळावा, त्यांनीं माझा सत्कार करावा, ही इच्छा अहंकार असलेल्या लोकांना असते. मुक्त झालेल्यांना अशी इच्छा मुळींच नसते.
१३७ गुणवति जने बद्धाशानां श्रमोऽपि सुखावहः । ७।११८।२६ गुणी मनुष्याच्या आशेवर राहून श्रम पडले तरी ते सुखावह होतात.
For Private And Personal Use Only
Page #351
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२९
१३८ गुणैः कतिपयैरेव बहुदोषोऽपि कस्यचित् ।
उपादेयो भवत्येव शौर्यसंतोषभक्तिभिः॥७११६।५५ पुष्कळ दोष असलेल्या मनुष्यालाही त्याच्या आंगच्या शौर्यादि काही थोड्याशा गुणांमुळे काही लोक पदरी बाळगतात. १३९ गुरुश्चेदुद्धरत्यज्ञमात्मीयात्पौरुषादृते ।
उष्ट्रं दान्तं बलीवदं तत्कस्मानोद्धरत्यसौ ॥५॥४३।२६ शिष्याने स्वतः प्रयत्न केला नसतांही जर गुरु त्याचा अज्ञानांतून उद्धार करू शकतात, तर वठणीस आणलेल्या उंट, बैल इत्यादि जनावरांनासुद्धा त्या गुरूने आत्मज्ञानी केले असते. १४० गेहमेवोपशान्तस्य विजनं दूरकाननम् ।
अशान्तस्याप्यरण्यानी विजना सजना पुरी ॥७३॥३८ शांत पुरुषाला त्याचे घरच निर्जन अरण्य आहे. पण शांत नसलेल्या पुरुषाला निर्जन अरण्यही लोकांनी गजबजून गेलेले नगर आहे. १४१ गोरर्थे ब्राह्मणस्यार्थे मित्रस्यार्थे च सन्मते ।
शरणागतयत्नेन स मृतः स्वर्गभूषणम् ॥ ३॥३१॥२८ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) गाई, ब्राह्मण, मित्र आणि शरण आलेला यांच्या रक्षणासाठी लढत असतां, जो वीरपुरुष आपला देह धारातीर्थी अर्पण करतो, तो स्वर्गलोकाला खरोखर अलंकृतच करतो. १४२ चन्द्रांशव इवोत्सार्य तमांस्यमृतनिर्मलाः ।
अन्तः शीतलयन्त्येता महताममला गिरः॥ ५।४।४ महात्म्यांची वाणी चंद्रकिरणासारखी निर्मल, शीतल आणि अमृतमय असून मोहांधकार नष्ट करणारी व अंतःकरणाला सुख देणारी असते.
For Private And Personal Use Only
Page #352
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३.०
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१४३ चित्तमिन्द्रियसेनाया नायकं तज्जयाजयः । उपानद्गूढपादस्य ननु चर्मावृतैव भूः ॥ ७/१६३/६ इंद्रियरूपी सेनेचा अधिपति चित्त आहे. या चित्ताला जिंकलें असतां इंद्रिये जिंकलीं जातात. पायांत जोडे घातलेल्या मनुष्याला सर्व पृथ्वी चामड्यानें आच्छादिल्यासारखीच आहे. ( जोडे घालून पाय झांकले म्हणजे पृथ्वीवरील सर्व कांट्यांचें निवारण झालेच, त्याप्रमाणें एका चित्ताला जिंकल्यानें सर्व इंद्रियांना जिंकल्यासारखेंच होतें. ) १४४ चित्रसंग युद्धस्य सैन्यस्याक्षुब्धता यथा ।
तथैव समता ज्ञस्य व्यवहारवतोऽपि च || ७|३०|५ चित्रांतील समरांगणांत युद्ध करीत असलेलें सैन्य निश्चेष्ट असतें, त्याप्रमाणें ज्ञानी पुरुष व्यवहार करीत असतांही आंतून निश्चल असतो.
१४५ चित्रामृतं नामृतमेव विद्धि चित्रानलं नानलमेव विद्धि ।
चित्राङ्गना नूनमनङ्गनेति
वाचा विवेकस्त्वविवेक एव || ४|१८/६९
( श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) चित्रांतील अमृत खरें अमृत नव्हे, चित्रांतील अग्नि हा खरा अग्नि नव्हे, आणि चित्रांतील स्त्री ही खरी स्त्री नव्हे, त्याप्रमाणें केवळ बोलण्यांतील विवेक म्हणजे खरा विवेक नव्हे, तर तो अविवेकच होय. १४६ चिन्तनेनैधते चिन्ता विन्धनेनेव पावकः ।
नश्यत्यचिन्तनेनैव विनेन्धनमिवानलः || ५ | २१६
ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन टाकीत गेल्यास तो एकसारखा वाढत जातो, त्याप्रमाणे विषयांचं चिंतन करीत गेल्यानें चिंता वाढू लागते; परंतु इंधने टाकण्याचे बंद केल्यास अग्नि आपोआप विझून जातो, त्याप्रमाणे विषयांचे चिंतन थांबविलें म्हणजे चिंतेचाही नाश होतो.
For Private And Personal Use Only
Page #353
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१४७ चिन्तामणिरियं प्रज्ञा हृत्कोशस्था विवेकिनः।
फलं कल्पलतेवैषा चिन्तितं संप्रयच्छति ॥५॥१२॥३४ विचारी पुरुषांच्या हृदयकोशांत असलेली बुद्धि हा चिन्तामणिच आहे. अथवा चिंतिलेलें फल देणारी ती एक कल्पलताच आहे. १४८ जगदृश्यं तु यद्यस्ति न शाम्यत्येव कस्यचित् ।
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ॥३।१२६ दृश्यजग जर खरोखरच असेल तर त्याचा कोणाच्याही ठिकाणी बाध होणे शक्य नाही. कारण जें नाहीं तें आहेसे होत नाही, व जें आहे तें नाहींसें होत नाही. १४९ जडः क इव वा नाम गुणागुणमपेक्षते ॥ ३७०।६२
मूर्ख मनुष्याच्या ठिकाणी गुण आणि अवगुण यांचे तारतम्य बेताचेच असते. १५० जडत्वान्निःस्वरूपत्वात्सर्वदैव मृतं मनः ।
मृतेन मार्यते लोकश्चित्रेयं मौयंचक्रिका ॥५।१३।१०० मन हे जड आणि निःस्वरूप असल्यामुळे सर्वदा मेलेलेच आहे परंतु या मृत मनाकडून अनेक लोक मारले जातात, ही मूर्खपरंपरा विचित्रच म्हणावयाची. १५१ जडेन मुकेनान्धेन निहतो मनसापि यः। ___ मन्ये स दह्यते मूढः पूर्णचन्द्रमरीचिभिः॥ ५।१३।१०३
जड, मूढ आणि अंध अशा मनाकडून जो मारला जातो, असा मूढ पुरुष पूर्ण चंद्राच्या शीतळ किरणांनी सुद्धां जाळला जाण्याला काय हरकत आहे ? १५२ जडो देहो मनश्चात्र न जडं नाजडं विदुः।।३।११०११३
देह हा केवळ जड आहे, परंतु मन हे धड जडही नाही, आणि चेतनही नाही.
For Private And Personal Use Only
Page #354
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
३२
सार्थ श्री योगवासिष्ठसुभाषितानि
१५३ जन्मान्तरशताभ्यस्ता राम संसारसंस्थितिः ।
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सा चिराभ्यासयोगेन विना न क्षीयते क्वचित् ५।९२।२३
संसारस्थितीचा अभ्यास मागील शेंकडों जन्मांत झालेला आहे, त्यामुळें दीर्घ काल साधनांचा अभ्यास केल्यावांचून संसारस्थिति क्षीण होणार नाहीं.
१५४ जयन्ति ते महाशूराः साधवो यैर्विनिर्जितम् ।
अविद्यामेदुरोल्लासैः स्वमनो विषयोन्मुखम् || ४ | ३५ | १
अविद्येच्या योगानें विलक्षण रीतीनें उल्लास पावणारें आणि विषयोन्मुख होणारे स्वतःचें मन ज्यांनी जिंकले अशा महाशूर सत्पुरुषांचा जयजयकार असो !
१५५ जराकुसुमितं देहद्रुमं दृष्ट्चैव दूरतः ।
अध्यापतति वेगेन मुने मरणमर्कटः || १।२२।१६
(राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) हे मुने, देहरूपी वृक्ष म्हातारपणामुळें फुलला आहे असें दुरून दृष्टीस पडतांच मरणरूपी माकड त्यावर जोरानें झडप घालतें.
१५६ जरा जगत्यामजिता जनानां
सर्वेषणास्तात तिरस्करोति ।। १।२२।३८
( राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) म्हातारपण हॅ अजिंक्य आहे, तें मनुष्यांच्या सर्व इच्छांना न जुमानतां त्यांच्यावर आपला पगडा बसवितें.
१५७ जरामार्जारिका भुङ्के यौवनाखं तथोद्धता ।
परमुल्लासमायाति शरीरामिषगर्धिनी || १ | २२/२५
जरा ही उद्धट मांजरी असून ती तारुण्यरूपी उंदीर गट्ट करून टाकते आणि शरीररूपी भक्ष्य भक्षण करण्यास अगदीं टपून बसलेली असते.
For Private And Personal Use Only
Page #355
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री योगवासिष्ठसुभाषितानि
१५८ जरासुधालेपसिते शरीरान्तःपुरान्तरे । अशक्तिरार्तिरापच्च तिष्ठन्ति सुखमङ्गनाः || १ |२२|३६
जरारूपी चुन्याचा लेप दिल्यामुळें शरीररूपी अंतःपुर फटफटीत दिसूं लागलें, म्हणजे अशक्तता, पीडा व आपत्ति ह्या स्त्रिया त्या अंतःपुरांत आनंदाने राहू लागतात.
१५९ जलमेव यथाम्भोधिर्न तरङ्गादिकं पृथक् ।
३३
आत्मैवेदं तथा सर्व न भूतोयादिकं पृथक् ॥ ५/७१।१४
समुद्र म्हणजे पाणीच असून लाटा पाण्याहून निराळ्या नसतात त्याप्रमाणें हें सर्व जग तत्त्वतः आत्माच असून पृथ्वी, उदक इत्यादि भूतें आत्म्याहून भिन्न नाहींत.
१६० जले जलचरव्यूहान् सूक्ष्मान्स्थूलो निकृन्तति ।
ग्रासार्थं निर्दयो मत्स्यः कैवात्र परिदेवना ।। ५।१४।२०
पाण्यांतील मोठा निर्दय मासा आपणापेक्षां लहान जलचर प्राण्यांना खाऊन टाकतो, या ठिकाणीं शोक तरी किती करणार ? ( प्रबलांकडून दुर्बलांना पीडा व्हावयाची असा या सृष्टींतील नियमच आहे. )
१६१ जाग्रत्येव सुषुप्तस्थः कुरु कर्माणि राघव ।
अन्तः सर्व परित्यागी बहिः कुरु यथागतम् || ६ | १२५/६
( श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा, जागृतीमध्यें सुषुप्तीमध्यें असल्याप्रमाणें राहून कर्मे करीत जा. आंतून सर्वांचा परित्याग कर, पण बाहेर प्राप्त झालेला व्यवहार करण्यास चुकूं नकोस. १६२ जायते जीव्यते पश्चादवश्यं च विनश्यति || ४|४८|२५ उत्पन्न होऊन जगणें, हें जसें सृष्टींतील एक कार्य आहे, तसेंच शेवटी मरणें हेंही एक अवश्य कार्य होय.
यो. वा. ३
For Private And Personal Use Only
Page #356
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
wwermeranarmed
१६३ जायते दर्शनादेव मैत्री विशदचेतसाम् ॥ ३७८१३५
मोकळ्यामनाची माणसे एकमेकांना भेटताक्षणी त्यांची परस्पर मैत्री जमत असते. १६४ जायन्ते च नियन्ते च शरीराणि शरीरिणाम् ।
पादपानां च पर्णानि का तत्र परिदेवना ॥६॥३२॥५० झाडांना पाने येतात, व पुढे गळून पडतात; त्याप्रमाणे प्राण्यांची शरीरें उत्पन्न होतात व पुढे नष्ट होतात; यांत दुःख कशाचें ? १६५ जितेन्द्रिया महासत्त्वा ये त एव नरा भुवि ।
शेषानहमिमान्मन्ये मांसयन्त्रगणांश्चलान् ॥ ७६६४३ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) ज्यांनी इंद्रियें जिंकिली आहेत, आणि जे अत्यन्त धैर्यवान् व बुद्धिशाली आहेत, त्यांनाच या पृथ्वीवर खरोखर 'मनुष्ये' असें म्हणता येईल. बाकीचे लोक म्हणजे केवल हालचाल करणारी मांसाची यंत्रेच होत असें मी समजतों. १६६ जिते मनसि सर्वैव विजिता चेन्द्रियावलिः।
शीर्यते च यथा तन्तौ दग्धे मौक्तिकमालिका३।११०।२५ दोरा जळतांच त्यांत ओंवलेले मोत्यांचे दाणे गळून पडतात; त्याप्रमाणे एक मन जिंकले म्हणजे सर्व इंद्रिये जिंकली गेली असे समजावे. १६७ जीर्यन्ते जीर्यतः केशा दन्ता जीयन्ति जीर्यतः ।
क्षीयते जीर्यते सर्वं तृष्णैवैका न जीर्यते ॥ ७१९३८६ वृद्ध झालेल्या प्राण्यांचे केस पिकतात, दांत पडतात, सर्व अवयव शिथिल होतात, पण एक तृष्णा मात्र तरुण राहते, ती कमी होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #357
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ३५ १६८ जीवं विवेकिनमिहोपदिशन्ति तज्ज्ञा
नो बालमुद्धममसन्मयमार्यमुक्तम् ॥ ६।४११५९ तत्त्वज्ञ लोक विवेकी जीवालाच उपदेश करतात. श्रेष्ठ लोकांनी ज्याची उपेक्षा केली आहे, देहादिकांच्या ठिकाणी जो आसक्त आहे अशा अत्यंत भ्रमिष्ट मूर्खाला ते उपदेश करीत नाहीत. १६९ जीवितं गलति क्षिप्रं जलमञ्जलिना यथा ।
प्रवाह इव वाहिन्या गतं न विनिवर्तते ॥ ७९३।८९ ओंजळीत घेतलेले पाणी ज्याप्रमाणे गळून जाते, त्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी होत जाते. नदीचा पुढे गेलेला ओघ जसा माग येत नाही, तसे गेलेले आयुष्य परत येत नाही. १७० जेतुमन्यं कृतोत्साहैः पुरुषैरिह पण्डितैः ।
पूर्व हृदयशत्रुत्वाजेतव्यानीन्द्रियाण्यलम् ॥ ४।२३।५९ दुसन्यांना जिंकण्याची हाव धरणाऱ्या सुज्ञ पुरुषांनी प्रथम आपल्या हृदयाच्या शत्रुभूत असलेल्या इंद्रियांना जिंकावे. १७१ ज्ञातज्ञेयस्य मनसो नूनमेतद्धि लक्षणम् ।
न स्वदन्ते समग्राणि भोगवृन्दानि यत्पुनः ॥ २२॥३ ज्ञेयतत्त्व जाणल्याची म्हणजे परब्रह्मसाक्षात्कार झाल्याची हीच खूण आहे की, त्या स्थितीनंतर सर्व त-हेच्या विषयोपंभोगांबद्दल कायमचा वीट येऊन जातो. १७२ ज्ञानं हि परमं श्रेयः ॥ ६।८७१६ ज्ञान हेच परमश्रेष्ठ आहे.
For Private And Personal Use Only
Page #358
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१७३ ज्ञानवानेव सुखवान ज्ञानवानेव जीवति ।
ज्ञानवानेव बलवांस्तस्माज्ज्ञानमयो भव ॥ ५।९।४९ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, जो ज्ञानी असतो, तोच खरा सुखी, तोच खरा जिवंत, आणि तोच खरा बलवान् असतो; म्हणून तूं ज्ञानी हो. १७४ ज्ञानाद्विषयवैरस्यं स समाधिहि नेतरः ॥ ७४६।१५
ज्ञानामुळे विषयांची आवड नाहीशी होणे, हीच समाधि होय. इतर कारणांमुळे विषय नावडणे ही समाधि नव्हे. १७५ ज्ञानिनैव सदा भाव्यं राम न ज्ञानबन्धुना ।
अज्ञातारं वरं मन्ये न पुननिबन्धुताम् ॥ ७।२।१ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) प्रत्येकाने ज्ञानी व्हावे, पण ज्ञानाच्या योगाने यथेष्ट आचरण करणारा ज्ञानबंधु होऊं नये. अशा ज्ञानबंधूपेक्षा मुळीच ज्ञान नसलेला बरा; असें मी समजतो. १७६ तचिन्तनं तत्कथनमन्योन्यं तत्प्रबोधनम् ।
एतदेकपरत्वं च तदभ्यासं विदुर्बुधाः ॥ ३।२२।२४ श्रवणाच्या योगाने समजलेले तत्त्व बुद्धीमध्ये आरूढ व्हावें, अशा दृष्टीने त्याचे निरंतर चिंतन करणे, ज्ञात्या पुरुषांशी संवाद करणे, समान अधिकाऱ्यांनी तें तत्त्व एकमेकांना सांगून त्यासंबंधान परस्परांना बोध करून देणे आणि अखंड तदाकार वृत्ति राखण्याचा प्रयत्न करणे, याला ज्ञाते पुरुष अभ्यास असे म्हणतात. १७७ तडित्सु शरदभ्रेषु गन्धर्वनगरेषु च ।
स्थैर्य येन विनिर्णीतं स विश्वसितु विग्रहे ॥ १।१८।६१ आकाशांतील वीज, शरहतूमधील मेघ आणि गंधर्वनगर ही सर्व स्थिर आहेत, असें ज्याला वाटत असेल, त्याने देहाच्या शाश्वतीविषयीं खुशाल विश्वास बाळगावा.
For Private And Personal Use Only
Page #359
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१७८ तपसैवं महोग्रेण यदुरापं तदाप्यते ॥ ३६।६८।१४ __ मिळविण्यास कठीण अशी कोणतीही वस्तु मोठ्या उग्रतपाने प्राप्त होते. १७९ तरङ्गं प्रतिबिम्बेन्दुं तडित्पुञ्ज नभोऽम्बुजम् ।
ग्रहीतुमास्थां बध्नामि नत्वायुषि हतस्थितौ ॥१।१४।७ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) पाण्यावरील लाटा, चंद्राचे प्रतिबिंब, विजेची चमक, आकाशांतील कमळे यांना पकडतां येईल. परंतु चंचल आयुष्यावर विश्वास ठेवता येणार नाही. १८० तर तारुण्यमस्तीदं यावत्ते तावदम्बुधेः।
ननु संसारनामोऽस्माद्बुद्धया नावा विशुद्धया ७१६२।१९ (श्रीवसिष्ठ रामाला सांगतात) तारुण्य आहे तोपर्यंतच 'शुद्धबुद्धि' या नौकेच्या योगाने संसारसागरांतून तरून जाण्याचा यत्न कर. १८१ तरन्ति मातङ्गघटातरङ्गं
रणाम्बुधिं ये मयि ते न शूराः । शूरास्त एवेह मनस्तरङ्गं
देहेन्द्रियाम्भोधिमिमं तरन्ति ॥ १।२७९ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) ज्या रणरूपी समुद्रामध्ये शेंकडों हत्तींचे कळप तरंगाप्रमाणे दिसत आहेत, असा समुद्र तरून जाणारे लोक खरे शूर, असें मी समजत नाही, तर खरे शूर योद्धे तेच की, जे मनोरूपी तरंगांनी युक्त असलेल्या देहेंद्रियरूपी समुद्रांतून सुरक्षितपणे तरून जातात. १८२ तरवोऽपि हि जीवन्ति जीवन्ति मृगपक्षिणः ।
स जीवति मनो यस्य मननेन न जीवति ॥ १।१४।११ जगांत वृक्ष किंवा पशुपक्षी जगतच आहेत; परंतु ते जगणे खरें नव्हे. तोच खरा जिवंत की, ज्याचे मन वासनाक्षयामुळे जिवंत नाही. किंवा तत्त्वबोधामुळे जो मनाला तुच्छ लेखतो.
For Private And Personal Use Only
Page #360
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
३८
सार्थ श्री योगवासिष्ठसुभाषितानि
१८३ ताडितस्य हि यः पश्चात्संमानः सोऽप्यनन्तकः । शालेग्रीष्माभितप्तस्य कुसेकोऽप्यमृतायते ||४|२३।५३ उन्हानें करपून गेलेल्या भाताच्या शेतावर थोडासा पाऊस पडला तरी त्याला ती अमृतवृष्टि वाटते, त्याप्रमाणें पुष्कळ कालपर्यंत निग्रह केलेल्या मनाला थोडासा मान दिला म्हणजे तें संतुष्ट होतें. १८४ तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणाः
क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति ।। ७।१६३।५६
हेकेखोर लोक जवळ असलेले गंगोदक न पितां, ही आमच्या बापाची विहीर आहे, असें म्हणून तिचेंच खारट पाणी पितात. १८५ तावदुत्तमतामेति पुमानपि दिवौकसाम् ।
कृपणैरिन्द्रियैर्यावत्तणवन्नापकृष्यते || ७|६|४२
विषयासक्त होणारी इंद्रियें जोपर्यंत मनुष्याला गवताप्रमाणें आकर्षण करीत नाहींत, तोंपर्यंतच तो देवांना देखील मान्य होतो. १८६ तावन्नयति संकोचं तृष्णा वै मानवाम्बुजम् ।
यावद्विवेकसूर्यस्य नोदिता विमला प्रभा ।। २।१३।२० जोपर्यंत विवेकरूपी सूर्याचा उदय होऊन त्याचा स्वच्छ प्रकाश सर्वत्र पसरला नाहीं, तोंपर्यंतच तृष्णा ही मनुष्यरूपी कमलाला संकुचित करते.
१८७ तिष्ठतस्तव कार्येषु मास्तु रागेषु रञ्जना |
स्फटिकस्येव चित्राणि
प्रतिविम्बानि गृह्णतः || ३|११४।७६
( श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) स्फटिक मणि अनेक प्रकारच्या वस्तूंचीं प्रतिबिंबें ग्रहण करतो, परंतु तो त्या वस्तूंचे ठिकाणीं आसक्त होत नाहीं; त्याप्रमाणें व्यवहारांत वावरत असतां मोह उत्पन्न करणाऱ्या विषयांच्या ठिकाणीं तुझें चित्त आसक्त न होवो.
For Private And Personal Use Only
Page #361
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३९
१८८ तुच्छोऽप्यर्थोऽल्पसत्त्वानां
गच्छति प्रार्थनीयताम् ॥ ३७०।३१ क्षुद्र अंतःकरणाचे लोक नेहमीं क्षुद्र फलासाठीच धडपडत असतात. १८९ तुल्यवर्णच्छदैः कृष्णः संगतैः किल कोकिलैः ।
केन विज्ञायते काकः स्वयं यदि न भाषते ॥७११६६६६ कोकिल पक्ष्यांप्रमाणेच पंख, रंग हे असणारा कावळा त्या कोकिलांच्या बरोबर असतां जोपर्यंत स्वतःचा शब्द करीत नाही, तोपर्यंत तो कोणाला ओळखू येणार आहे ? १९० ते पूज्यास्ते महात्मानस्त एव पुरुषा भुवि ।
ये सुखेन समुत्तीर्णाः साधो यौवनसंकटात ॥१॥२०१४१ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) जे पुरुष यौवनरूपी संकटांतून सुखाने तरून जातात, तेच पृथ्वीवर पूज्य, तेच महात्मे, आणि तेच खरे पुरुष होत. १९१ ते महान्तो महाप्राज्ञा निमित्तेन विनैव हि ।
वैराग्यं जायते येषां तेषां ह्यमलमानसम् ॥ २।११।२४ ते महाबुद्धिमान महात्मे खरोखरच धन्य होत की, ज्यांच्या निर्मल मनामध्ये निमित्ताशिवायच वैराग्य उत्पन्न होतें. १९२ त्यक्तावनेविटपिनो भूयः पत्राणि नो यथा ।
निर्वासनस्य जीवस्य पुनर्जन्मादि नो तथा॥५।४८५५ वृक्षाची मुळेच तोडून टाकली म्हणजे त्याच्यावर पुन्हां पाने येत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या वासना नाहीशा झालेल्या आहेत, अशा प्राण्याला पुनर्जन्मादि अवस्था प्राप्त होत नाहीत.
For Private And Personal Use Only
Page #362
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१९३ त्यजत्स्वात्मसुखं सौम्यं मनो विषयविद्रुतम् ।
अङ्कुशेनेव नागेन्द्रं विचारेण वशं नयेत् ॥४।२३५१ हत्तीला अंकुशाच्या योगानें कह्यांत ठेवतात, त्याप्रमाणे स्वात्मसुखाचा त्याग करून विषयसुखाच्या मागे धांव घेणाऱ्या मनाला विचाराच्या योगाने तान्यांत ठेवावे. १९४ त्यजन्त्युद्यममुधुक्ता न स्वकर्माणि केचन ॥ ३।२।५
उद्योगी पुरुष स्वकर्मापासून कधीही पराङ्मुख होत नाहीत. १९५ त्यागो न युक्त इह कर्मसु नापि रागः ॥ ५।५।५४
अवश्य प्राप्त कर्माचा त्याग करणे व त्याविषयी आसक्ति ठेवणे ही दोन्ही युक्त नव्हत. १९६ दासाः पुत्राः स्त्रियश्चैव बान्धवाः सुहृदस्तथा ।
हसन्त्युन्मत्तकमिव नरं वार्धककम्पितम् ॥ १।२२।६ उन्मत्त मनुष्याकडे पाहून लोक हसतात, त्याप्रमाणे म्हातारपणी मनुष्याचे शरीर कांपूं लागले म्हणजे त्याचे नोकर चाकर, मुलगे, बायका, बधु, आणि मित्र त्याच्याकडे पाहून हसू लागतात. १९७ दीनो वासनया लोकः कृतान्तेनापकृष्यते ।
रज्ज्वेव बालेन खगो विवशो भृशमुच्छ्रसन्॥४२७।३४ जाळ्यांत किंवा फासांत सांपडून पराधीन झालेल्या व घाबरलेल्या पक्ष्याला एका लहान पोर दोरी धरून सहज ओढते; त्याप्रमाणे वासनेच्या योगाने दीन झालेल्या मनुष्याला यम आपल्या फासांनी ओढतो. १९८ दीर्घसंसाररोगस्य विचारो हि महौषधम् ॥ २॥१४॥२ संसाररूपी दीर्घरोगावर विचार हे रामबाण औषध आहे.
For Private And Personal Use Only
Page #363
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
१९९ दुःखशोकमहाष्टीलः कष्टकण्टकसंकटः । सहस्रशखतां याति दारिद्र्य शाल्मलिः ||६/७ १९
दुःख व शोक या ज्याच्या मोठ्या बिया आहेत, कष्टरूपी कांट्यांनी जो भरून गेला आहे, असा हा दारिद्र्यरूपी बळकट सावरीचा वृक्ष 'हजारों खांद्यांनीं विस्तार पावतो.
२०० दुःखानि मौर्ण्यविभवेन भवन्ति यानि नैवापदो न च जरामरणेन तानि || ६ |८८।२७
आपत्ति, जरा व मरण यांच्या पासून जें दुःख होत नाहीं, तें मूर्खपणाच्या प्रभावानें भोगावें लागतें.
दुःख
२०१ दुःखाद्यथा दुःखकाले हा कष्टमिति कथ्यते । हाकष्टशब्दपर्यायस्तथा हादैवमित्यपि || २|६| ३
४ १
दुःखाचे वेळीं ' हाय हाय, केवढी दुःखाची गोष्ट' असे उद्गार निघतात. या अर्थानंच कधीं कधीं ' हाय हाय, देव केवढें बलिष्ठ आहे' असेही उद्गार पर्यायानें निघतात.
२०२ दुःखितस्य निशा कल्पः सुखितस्यैव च क्षणः ३।६०।२२
मनुष्य दुःखी कष्टी असला म्हणजे त्याला एक रात्र कल्पाप्रमाणे दीर्घ वाटते आणि सुखामध्यें कितीही काळ लोटला, तरी तो त्याला एक क्षणाप्रमाणेंच वाटतो.
२०३ दुरीहितं दुर्विहितं सर्व सज्जनसूक्तयः ।
प्रमार्जयन्ति शीतांशोस्तमः काण्डमिवाङ्मयः || ५|४/७
ज्याप्रमाणें चंद्राचे किरण अंधकाराचा नाश करतात, त्याप्रमाणें सज्जनांची चांगलीं वचनें सर्व शारीरिक व मानसिक दोष दूर
करतात.
For Private And Personal Use Only
Page #364
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२०४ दुरुत्तरा या विपदो दुःखकल्लोलसंकुलाः ।
तीर्यते प्रज्ञया ताभ्यो नावापद्धयो महामते॥५।१२।२० (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) दुःखरूपी लाटांच्या योगानें भयंकर आणि दुस्तर भासणारी विपत्तिरूपी नदी प्रज्ञारूपी नौकेचा आश्रय केल्याने सहज तरून जाता येते. २०५ दुर्जनो येन तेनैव नाशितेनैति हृष्टताम् ॥ ३७०।८२
कोणत्या तरी रीतीने दुसऱ्याचा नाश झाला म्हणजे दुर्जनाला आनंद होत असतो. २०६ दुःसाध्याः सिद्धिमायान्ति रिपवो यान्ति मित्रताम् ।
विषाण्यमृततां यान्ति संतताभ्यासयोगतः ॥७६७३३ सतत अभ्यासाने, मिळण्यास कठीण अशी कोणतीही वस्तू प्राप्त होते, शत्रु मित्र होतात, आणि विष हे अमृताप्रमाणे होते. २०७ दुःसाध्यो वासनात्यागः सुमेरून्मूलनादपि ॥५।९२।१०
मेरु पर्वत उपटून टाकण्यापेक्षाही वासनांचा त्याग करणे कठीण आहे. २०८ दूरमुत्सहते राजा
महासत्त्वो महापदि । अल्पसत्त्वो जनः शोच
त्यल्पेऽपि हि परिक्षते ॥ ६।१२७१४३ महाबलवान् राजा युद्धादिकांच्या मोठ्या आपत्तींत सांपडला, तरी साधनसंपन्न असल्यामुळे फार मोठा उत्साह धारण करतो. पण अल्प सामर्थ्य असलेला मनुष्य त्याची थोडीशी जरी हानि झाली तरी फार शोक करतो.
For Private And Personal Use Only
Page #365
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२०९ दृष्टान्तेन विना राम नापूर्वार्थोऽवबुध्यते ।
यथा दीपं विना रात्रौ भाण्डोपस्करणं गृहे ॥२।१८।५१ ( श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे रामा, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशाशिवाय घरांतील भांडी वगैरे वस्तू दिसत नाहीत, त्याप्रमाणे दृष्टांताशिवाय अदृष्ट अर्थाचा बोध होत नाही. २१० देहपादपसंस्थस्य हृदयालयगामिनः ।
तृष्णा चित्तखगस्पेयं वागुरा परिकत्पिता॥४।२७३३ देहरूपी वृक्षावरील हृदयरूपी घरट्याकडे जाणान्या चित्तरूपी पक्ष्याला पकडण्याकरितांच हे तृष्णारूपी जाळे जणूंकाय निर्माण करण्यांत आले आहे. २११ देहोऽहमिति या बुद्धिः सा संसारनिबन्धनी ।
न कदाचिदियं बुद्धिरादेया हि मुमुक्षभिः ।।६।११८१८ 'मी देह आहे,' अशी जी बुद्धि ती संसारांत जखडून टाकणारी आहे. यासाठी मुमुक्षूनी त्या बुद्धीचा स्वीकार केव्हाही करू नये. २१२ दैन्यदारिद्यदुःखार्ता अप्यन्ये पुरुषोत्तमाः।
पौरुषेणैव यत्नेन याता देवेन्द्रतुल्यताम् ॥ २।५।२७ दैन्य, दारिद्य आणि दुःख यांनी युक्त असलेले उत्तम पुरुष पूर्वी पुरुषप्रयत्नानेंच इंद्रपदाला पोंचले आहेत. २१३ दैवं संप्रेरयति मामिति दग्धधियां मुखम् ।
अदृष्टश्रेष्ठदृष्टीनां दृष्ट्वा लक्ष्मीनिवर्तते ॥ २।५।२० 'मला दैव प्रेरणा करीत आहे ' असें म्हणणाऱ्या लोकांची बुद्धि होरपळून गेली आहे, असे समजावें. ज्यांच्या दृष्टीला दैवच श्रेष्ठ आहे असे वाटते, अशा लोकांचे तोंड दिसल्याबरोबर लक्ष्मी त्यांच्याकडे पाठ फिरविते.
For Private And Personal Use Only
Page #366
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२१४ दैवमेवेह चेत्कर्तृ पुंसः किमिव चेष्टया ।
स्नानदानासनोच्चारान्दैवमेव करिष्यति ।। २।८६ सर्व गोष्टी जर देवानेच होत असतील, तर मनुष्याला काही हालचाल तरी करून काय करावयाचे आहे ? तसे असेल तर स्नानदानादि क्रियाही दैवच करूं शकेल. २१५ दैवात्तमिति मन्यन्ते ये हतास्ते कुबुद्धयः ॥ २।५।२९
कोणतीही गोष्ट दैवाने घडून येते, अशी ज्यांची भावना असते, ते मनुष्य दुष्टबुद्धीचे असून त्यांचा अखेरीस नाश होतो. २१६ दोषान्प्रसवति स्फारान्वासनावलिता मतिः।
कीर्णकण्टकबीजा भूः कण्टकप्रसरं यथा ॥४॥३५।६ कांटेरी झाडे तोडून टाकली, पण त्या झाडांची मुळे भूमीत तशीच कायम असली, तर त्यांची पुन्हां जोराने वाढ होऊन सर्व भूमि कांट्यांनी भरून जाते, त्याचप्रमाणे विषयांचा त्याग केला, तरी जोपर्यंत अंतःकरणांत वासनाबीज शिल्लक आहे, तोपर्यंत तें विषयांचे स्मरण करवून रागद्वेषादि दोष उत्पन्न केल्याशिवाय राहणार नाही. २१७ द्विविधो भवति प्रष्टा तत्त्वज्ञोऽज्ञोऽथवापि च ।
अज्ञस्याज्ञतया देयो ज्ञस्य तु ज्ञतयोत्तरः॥ ७।२९।३२ तत्त्वज्ञ आणि अज्ञ असे दोन प्रकारचे प्रश्न करणारे असतात, तत्त्वज्ञाला तात्त्विक उत्तर दिले पाहिजे आणि अज्ञ मनुष्याला त्याच्या सारखें सांगून शांत केले पाहिजे. २१८ द्वौ हुडाविव युध्येते पुरुषार्थों समासमौ ।
प्राक्तनश्चैहिकश्चैव शाम्यत्यत्राल्पवीर्यवान् ॥ २।५।५ दोन एडके आपसांत लढू लागले म्हणजे त्यांची कधी बरोबरी होते किंवा एक अधिक बलिष्ठ असल्यास तो दुसऱ्याला जिंकतो, त्याचप्रमाणे पूर्वीचा व हल्लीचा प्रयत्न हे एकमेकांशी लढत असतात. त्यामध्ये कमी सामर्थ्याचा असेल त्याला हार खावी लागते.
For Private And Personal Use Only
Page #367
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२१९ धीमन्तो न निषेवन्ते पर्यन्ते दुःखदां क्रियाम्॥५॥५२॥४
ज्या कृत्याचा परिणाम दुःखदायक होणार, असे कृत्य करण्याला विचारी लोक केव्हांच तयार होत नाहीत. २२० धीरोऽप्यतिबहुज्ञोऽपि कुलजोऽपि महानपि ।
तृष्णया बध्यते जन्तुः सिंहः शृङ्खलया यथा॥४॥२७॥३२ ज्याप्रमाणे सिंह श्रृंखलेने बद्ध होतो त्याप्रमाणे मनुष्य कितीही धैर्यवान, ज्ञानी आणि कुलीन असला, तरी तृष्णेच्या जाळ्यांत सांपडून बद्ध होतो. २२१ धीः सम्यग्योजिता पारमसम्यग्योजिताऽऽपदम् ।
नरं नयति संसारे भ्रमन्ती नौरिवार्णवे ॥ ५॥१२॥३६ बुद्धि चांगल्या रीतीने योजिली तर मनुष्य संकटांतून पार पडतो, अयोग्य रीतीने तिचा उपयोग केल्यास आपत्ति प्राप्त होते. ज्याप्रमाणे अशिक्षित नावाड्याची नौका समुद्रामध्ये गिरक्या खाते, त्याप्रमाणे मंदबुद्धि पुरुष या संसारसागरांत गटंगळ्या खात राहतो. २२२ न कदाचन जायन्ते शीतांशोरुष्णरश्मयः ॥ १।९।३
चंद्राचे किरण कधीही उष्ण होत नाहीत. २२३ न कारणं विना कार्य भवतीत्युपपद्यते ॥ ७१७९।८
कारण असल्यावांचून कार्य होणे संभवत नाही. २२४ न कालमतिवर्तन्ते महान्तः स्वेषु कर्मसु ॥ ५।१०।९
महात्मे आपल्या कर्तव्यकाविषयी केव्हाही कालातिकम होऊ देत नाहीत. ( वेळच्यावेळी काम करतात.) २२५ न किंचन फलं धत्ते स्वाभ्यासेन विना क्रिया॥२।१८।११ अभ्यास केल्याशिवाय कोणतेच कृत्य फलद्रूप होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #368
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२२६ न किंचिद्दीर्घसूत्राणां सिध्यत्यात्मक्षयादृते ॥३७८८
दीर्घसूत्री मनुष्य विलंब करून आपल्या कार्याचा नाश करून घेतात, यापेक्षा जास्त काही त्यांच्या पदरांत पडत नाही. २२७ न केचन जगद्भावास्तत्त्वज्ञ रञ्जयन्त्यमी । ___ मर्कटा इव नृत्यन्तो गौरीलास्यार्थिनं हरम् ॥४५७५६
गौरीच्या नृत्याची इच्छा करणा-या शंकरापुढे माकडे नाचूं लागली असता त्याला त्याबद्दल प्रेम वाटणे शक्य नाही, त्याप्रमाणे या जगांतील कोणतीही वस्तु ज्ञानी पुरुषाचे चित्त आकर्षण करूं शकत नाही. २२८ न क्षमन्ते महान्तोऽपि
__ पौनःपुन्येन दुष्क्रियाम् ॥ ५।३०।१२ वारंवार केलेल्या अपराधांची महात्मे देखील क्षमा करीत नाहीत. २२९ नगयों दह्यमानायां भूषितायां तथोत्सवे ।
सम एव महीपालो जनको भूभृतां वरः ॥७।१९८१३१ राजधानीची मिथिलानगरी जळू लागली किंवा उत्सवाचे वेळी ती सुशोभित केली, तरी दोन्ही स्थितीत राजश्रेष्ठ जनकराजाची अंतःकरणाची समता कायम असे. २३० न च निस्पन्दता लोके दृष्टेह शवतां विना । __ स्पन्दाच्च फलसंप्राप्तिस्तस्मादेवं निरर्थकम् ॥ २।८८
हालचाल ही फक्त प्रेतामध्येच काय ती होत नाहीं; हालचाल केल्यानेच फलप्राप्ति होत असल्यामुळे दैव हे निरर्थक आहे. २३१ न जातु ते विगण्यन्ते गणनासु गरीयसाम् ।
ये तरङ्गैस्तुणानीव ह्रियन्ते हर्षशोकयोः॥६।१२७।५० लाटांबरोबर गवत वाहत जाते त्याप्रमाणे जे हर्षशोकांच्या तडाक्यांत सांपडतात, त्यांची गणना श्रेष्ठ लोकांमध्ये होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #369
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
...misionrammmmmmmmmmmm
२३२ न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा क्वचित् ।
पौरुषेण प्रयत्नेन यन्नाप्नोति गुणान्वितः ॥ ४॥६२।१९ या पृथ्वीवर, आकाशांत किंवा देवलोकांत अशी एकही वस्तू नाहीं की, जी प्रयत्न करणाऱ्या गुणवानाला साध्य होत नाही. २३३ न तदस्ति विमोहाय यद्विविक्तस्य चेतसः॥३७८१२१
विचार करणा-या अंत:करणाला मोह पाडील अशी कोणतीही स्थिति नाही. २३४ न तपांसि न तीर्थानि न शास्त्राणि जयन्ति च ।
संसारसागरोत्तारे सजनासेवनं विना ॥४।३३।१४ संसारसागरांतून तरून जाण्यासाठी केलेले तप, तीर्थादन आणि शास्त्राध्ययन ही सर्व सज्जनसेवेवांचून व्यर्थ होत. २३५ न देशो मोक्षनामास्ति
न कालो नेतरा स्थितिः॥.६।१२१।१२ मोक्ष म्हणून कांहीं कोणता निराळा देश नाहीं, निराळा काल नाही, किंवा निराळी स्थिति नाही. २३६ न मे मनोरमाः कामा न च रम्या विभूतयः ।
इदं मत्ताङ्गनापाङ्गभङ्गलोलं च जीवितम् ।। ७।९३६० (सिद्ध श्रीवसिष्ठांना म्हणतात) विषय व ऐश्वर्य ही दोन्ही रमणीय असतील, परंतु माझे मन विषयांचे ठिकाणी रमत नाहीं, व ऐश्वर्यापासूनही आनंद पावत नाही. कारण, जीवित हेच मुळी मत्तस्त्रियांच्या कटाक्षाइतकेंच चंचल आहे.
For Private And Personal Use Only
Page #370
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४८
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२३७ न मोक्षो नभसः पृष्ठे न पाताले न भूतले ।
मोक्षो हि चेतो विमलं सम्यग्ज्ञानविबोधितम् ५/७३ | ३५
मोक्ष हा कांहीं कोठें आकाशांत, पाताळांत किंवा पृथ्वीवर आहे असें नाहीं, तर योग्य तऱ्हेचें ज्ञान होऊन झालेली मनाची निर्मल स्थिति म्हणजेच मोक्ष होय.
२३८ न मौर्य्यादधिको लोके कश्चिदस्तीह दुःखदः || ५|२९|५७
या लोकांत मूर्खपणापेक्षां अधिक दुःखदायक असें कांहीं नाहीं. २३९ न वैराग्यात्परो बन्धुर्न संसारात्परो रिपुः ।। ६।१२७/५९ वैराग्याहून श्रेष्ठ दुसरा बंधु नाहीं व संसाराहून दुसरा शत्रु नाहीं. २४० न व्याधिर्न विषं नात्तथा नाधिश्व भूतले ।
खेदाय स्वशरीरस्थं मौर्ण्यमेकं यथा नृणाम् ||२| १३|१३
स्वतःच्या मूर्खपणामुळे जितकें दुःख भोगावें लागतें, तितकें दुःख मानसिक चिंता, शारीरिक पीडा, विष व आपत्ति यांच्यापासूनही भोगावें लागत नाहीं.
२४१ न शास्त्रैर्नापि गुरुणा दृश्यते परमेश्वरः ।
दृश्यते स्वात्मनैवात्मा स्वया सच्वस्थया धिया ६ । ११८|४ परमेश्वर शास्त्रे व गुरु यांच्या योगानें दिसत नाहीं. तर आपल्या स्वतःच्या सत्त्वस्थ बुद्धीनेंच त्याचें दर्शन होतें.
२४२ नष्टं नष्टमुपेक्षेत प्राप्तं प्राप्तमुपाहरेत् ।
निर्विकारतयैतद्धि परमार्चनमात्मनः || ६ |३९|४४
जें जें नष्ट झालें असेल त्याची उपेक्षा करणें आणि जें जें यहच्छेनें प्राप्त होईल त्याचा स्वीकार करण या दोन्ही गोष्टी निर्विकार चित्तानें कराव्या, म्हणजे हेंच आत्म्याचें श्रेष्ठ पूजन होईल.
For Private And Personal Use Only
Page #371
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww
२४३ न सजनारतरः क्वचिद्भवे
द्भजेत साधून्विनयक्रियान्वितः । स्पृशन्त्ययत्नेन हि तत्समीपगं
विसारिणस्तद्गतपुष्परेणवः ॥ ७९८।२४ सज्जनांपासून केव्हाही दूर राहूं नये, नम्रतापूर्वक त्यांची सेवा करावी. कारण, सज्जनांच्याजवळ राहणाराला त्यांच्या गुणरूपी पुष्पांतील पसरणाऱ्या रजःकणाचा लाभ अनायासे होतो. २४४ न स्तौमि न च निन्दामि कचित्किंचित्कदाचन ।
आत्मनोऽन्यस्य वा साधो तेनाहं शुभमागतः ६।२६।१३ (भुशुंड श्रीवसिष्ठांना म्हणतो) मी केव्हाही व कोठेही थोडीसुद्धा आपली स्तुति करीत नाही व दुसऱ्याची निंदा करीत नाहीं त्यामुळे मला कल्याणकारक स्थिति प्राप्त झाली आहे. २४५ न स्वकर्म विना श्रेयः प्रामुवन्तीह मानवाः॥५।४८।६९
स्वकर्माचे अनुष्ठान केल्याशिवाय मनुष्यांना या जगांत श्रेय प्राप्ति होत नाही. २४६ न स्वधैर्यादृते कश्चिदभ्युद्धरति संकटात् ॥५।२१।१०
स्वतःच्या धैर्यावांचून आपणाला संकटांतून कोणीही पार पाडणार नाही. २४७ न हि चन्द्रं विना शुद्धा सविकासा कुमुद्वती ॥२॥१२॥६ चंद्रावांचून श्वेत कमलिनी विकास पावत नाही.
यो. वा. ४
For Private And Personal Use Only
Page #372
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५०
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२४८ न हि जानाति दुर्बुद्धिविनाशं प्रत्युपस्थितम् || ३|१०२|३६
दुर्बुद्धि असलेल्या मनुष्याला आपल्या पुढे येऊन ठेपलेला स्वतःचा नाश समजून येत नाहीं.
२४९ न हि तज्ज्ञस्य शान्तस्य ममाहमिति विद्यते || ७|३०|२
तत्त्वज्ञ आणि शांत मनुष्याचे ठिकाणी 'मी' आणि 'माझे' असे दोन्ही भाव नसतात. २५० न हि पर्यनुयोक्तव्याः स्वप्रविभ्रमरीतयः ।
न तदस्ति जगत्यस्मिन् यन्न संभवति भ्रमे || ६ |६१।१६ परमात्म्याची माया अघटितघटना करण्यांत मोठी पटाईत आहे, त्यामुळे या जगांत स्वप्न. भ्रम इत्यादिकांप्रमाणे ' असें कसें होऊं शकेल' असें म्हणतांच येत नाहीं. जें भ्रमांत संभवत नाहीं, असें या जगांत कांहीं नाहीं.
२५१ न हि सच्चवतामस्ति दुःसाध्यमिह किंचन ।। ३ ।८२/२९ उद्योगी लोकांना मिळविण्यास कठीण असें या जगांत कांहींएक नाहीं.
२५२ ना यथा यतते नित्यं यद्भावयति यन्मयः ।
यादृगिच्छेच भवितुं तादृग्भवति नान्यथा ॥७।१५७/३१
मनुष्य नित्य ज्यासाठीं अगदीं तन्मय होऊन अनन्य भावानें प्रयत्न करतो व जसें होण्याची इच्छा करतो, तसाच तो होतो. एरवी कधीही होत नाहीं.
२५३ नाशोऽपि सुखयत्यज्ञ मेकवस्त्वतिरागिणम् || ३|७०।२३
एखाद्या वस्तूवर आसक्त झालेल्या अज्ञ मनुष्याला स्वतःचा नाश झाला तरी तो सुद्धां सुखदायकच वाटतो.
For Private And Personal Use Only
Page #373
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२५४ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः। ___ यत्तु नास्ति स्वभावेन कः क्लेशस्तस्य मार्जने ॥३।७।३८ जें असत् आहे, त्याला कधीं अस्तित्वच नाही, आणि जें सत् आहे त्याचा केव्हाही अभाव होऊ शकत नाही. म्हणून जें वस्तुतः नाही, ते नाहीसे करण्याला क्लेश कसले ? । २५५ नासिधारा न वज्राचिर्न तप्तायाकणार्चिषः ।
तथा तीक्ष्णा यथा ब्रह्मंस्तृष्णेयं हृदि संस्थिता॥१११७४८ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो ) मनुष्याच्या हृदयामध्ये राहणारी तृष्णा ही जितकी तीक्ष्ण असते, तितकी तरवारीची धार, वज्राचे तेज किंवा तापलेल्या लोखंडांतून बाहेर पडणान्या ठिणग्या तीक्ष्ण नसतात. २५६ नास्ति शत्रुः प्रकृत्यैव न च मित्रं कदाचन ।
सुखदं मित्रमित्युक्तं दुःखदाः शत्रवः स्मृताः॥५।५३१५८ कोणी कोणाचा मूळचाच शत्रु नाही, व मूळचाच मित्रही नाही. सुख देणारा तो मित्र, व दुःख देणारा तो शत्रु, असेंच मानले जाते. २५७ नाहं देहस्य नो देहो मम नायमहं तथा।
इति विश्रान्तचित्ता ये ते मुने पुरुषोत्तमाः १११८५३ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) 'मी देहाचा कोणी नाहीं, देह माझा कोणी नाही, व हा देह हे माझें खरें स्वरूप नव्हे, ' या भावनेने जे मनुष्य परमात्मस्वरूपांत स्थिर होतात, तेच उत्तम पुरुष होत. २५८ नित्यं सज्जनसंपर्काद्विवेक उपजायते ।
विवेकपादपस्यैव भोगमोक्षौ फले स्मृतौ ॥ २॥११॥५८ __ सज्जनांचा सहवास केल्याने विवेक अवश्य उत्पन्न होतो, व भोग आणि मोक्ष ही त्या विवेकरूपी वृक्षाचींच फळे आहेत.
For Private And Personal Use Only
Page #374
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५२
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
~
~
~
~
२५९ नित्याशुचेऽप्रियजने भषणैकनिष्ठ
रथ्यान्तरभ्रमणनीतसमस्तकाल । कौलेयकाशयसमानतयैव मन्ये
मूर्खण केनचिदहो बत शिक्षितोऽसि ॥७॥११६।५८ हे कुत्र्या, तुझ्यामध्ये आपल्यासारखेच गुण आहेत असे पाहून, नित्य अपवित्रता, अप्रिय जनांवर भों भों करणे, रस्त्यांतून फिरत सारा वेळ फुकट घालविणे, इत्यादि गुण कोणी मूर्खाने तुला शिकविले आहेत असे मला वाटते. (अर्थात् तुझ्यापेक्षा तुझ्या. गुरूमध्ये असले गुण अधिक असले पाहिजेत.) २६० निरिच्छतैव निर्वाणं सेच्छतैव हि बन्धनम् ॥७॥३६॥३८
इच्छा नसणे हाच मोक्ष होय. आणि इच्छा असणे हाच बंध होय. २६१ निर्दयः कठिनः क्रूरः कर्कशः कृपणोऽधमः।
न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम् ॥११२३९ काल हा निर्दय, कठीण, क्रूर, कर्कश, कृपण आणि अधम आहे. काळ हा ज्याला गिळून टाकीत नाही. असें अद्यापि कांहींच नाही. २६२ निर्मले मुकुरे वक्रमयत्नेनैव बिम्बति ॥ २।२।१९
स्वच्छ आरशामध्ये तोंडाचे प्रतिबिंब सहज रीतीने पडते. २६३ निर्वासनं जीवितमेव मोक्षः ॥७१७७४३
जीवित वासनारहित असणे हाच मोक्ष होय. २६४ निःसंकल्पो यथाप्राप्तव्यवहारपरो भव ॥ ४५३।४७
(दाशूर तपस्वी आपल्या पुत्राला म्हणतो.) संकल्परहित होऊन प्राप्त झालेला व्यवहार योग्य रीतीने करीत जा.
For Private And Personal Use Only
Page #375
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ५३ २६५ नैघृण्यमस्थैर्यमथाशुचित्वं
रथ्याचरत्वं परिकुत्सितत्वम् । श्वभ्यो गृहीतं किमु नाम मूखै
मूर्खेभ्य एवाथ शुना न जाने ॥ ७११६।५४ निर्दयता, चंचलता, अपवित्रता, रस्त्यांतून व्यर्थ भटकणे, निंद्य असणे हे धर्म मूर्त्यांनी कुत्र्यांपासून घेतले, किंवा कुत्रे मूर्खापासून शिकले हे नक्की समजत नाही. २६६ नैवास्त्यसौ जगति यः परदुःखशान्त्यै
प्रीत्या निरन्तरतरं सरलं यतेत ॥ ७/११९।३ दुसऱ्याचे दुःख नाहीसे करण्यासाठी मनापासून निरंतर योग्य रीतीने झटणारा या जगामध्ये कोणीही नाही. २६७ नोदेति नास्तमायाति सुखे दुःखे मुखप्रभा ।
यथाप्राप्तस्थितेर्यस्य जीवन्मुक्तः स उच्यते ॥ ३।९।६ सुखाचे वेळी ज्याच्या तोंडावरील तेज वाढत नाही, आणि दुःखाचे वेळी ते कमी होत नाही. याप्रमाणे प्राप्त स्थितीमध्ये जो निर्विकार असतो तोच जीवन्मुक्त होय. २६८ नोद्विजन्ते स्वकार्येषु जना अध्यवसायिनः॥६।८८।१९
निश्चयी लोक आपल्या कार्याविषयीं कधीं उद्विग्न होत नाहीत. २६९ नोपपन्नं हि यद्यत्र तत्र तन्न विराजते ।
मध्ये काचकलापस्य महामूल्यो मणियथा ॥५।३२।२८ जें ज्या ठिकाणी योग्य नसते, ते त्या ठिकाणीं शोभतही नाही. काचेच्या मण्यांच्या ढिगांत महामूल्यवान रत्न कसे शोभणार ?
For Private And Personal Use Only
Page #376
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२७० पथिकाः पथि दृश्यन्ते रागद्वेषविमुक्तया ।
यथा धिया तथैवैते द्रष्टव्याः स्वेन्द्रियादयः॥६॥११८१५ प्रवासी ज्या मार्गाने जातात, त्या मार्गावर आसक्ति ठेवीत नाहीत त्याप्रमाणे आपल्या देहोंद्रियादिकांस रागद्वेषरहित बुद्धीने पाहावें. २७१ पदमतुलमुपैतुमिच्छतोच्चैः
प्रथममियं मतिरेव लालनीया । फलमभिलषता कृषीवलेन
प्रथमतरं ननु कृष्यते धरैव ॥ ५।१२।४० चांगल्या पिकाची इच्छा करणारा शेतकरी प्रथम जमीन नांगरून तिची उत्तम मशागत करतो, त्याप्रमाणे अतुल अशा परमात्मपदाच्या प्राप्तीची इच्छा करणान्या पुरुषाने प्रथम विवेकाच्या योगाने आपली बुद्धि शुद्ध करावी. २७२ परं विवर्धनं बुद्धेरज्ञानतरुशातनम् । . समुत्सारणमाधीनां विद्धि साधुसमागमम् ।। २।१६।५
(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात) साधूंचा समागम बुद्धीची वाढ करतो, अज्ञानरूपी वृक्षाला तोडून टाकतो आणि सर्व मानसिक दुःखें नाहींशी करतो. २७३ परं विषयवैतृष्ण्यं समाधानमुदाहृतम् ।
आहृतं येन तन्नूनं तस्मै नृब्रह्मणे नमः ॥ ७४५/४६ विषयांविषयी अत्यंत वैराग्य हेच समाधान आहे. ते ज्याने संपादन केले आहे, त्या मनुष्यरूपी ब्रह्माला नमस्कार असो. २७४ परमपदप्रतिमो हि साधुसङ्गः ॥ ५।६११४८ सत्पुरुषांच्या सहवासाची योग्यता प्रत्यक्ष मोक्षसुखाइतकी आहे.
For Private And Personal Use Only
Page #377
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२७५ परं पौरुषमाश्रित्य दन्तैर्दन्तान्विचूर्णयन् ।
शुभेनाशुभमुद्युक्तं प्राक्तनं पौरुषं जयेत् ॥ २।५।९ दांतांनी दांतांचे चूर्ण होईल इतक्या जोराने शास्त्रीय प्रयत्न करून अनर्थ उत्पन्न करणाऱ्या पूर्वीच्या कर्माचा पाडाव करावा. २७६ परस्परेच्छाविच्छित्तिर्न हि सौहार्दबन्धनी ॥३॥५५।७२
परस्परांच्या इच्छांचा भंग झाला असतां खरी मैत्री टिकत नाही. २७७ परस्परेप्सितस्नेहो दुर्लभो हि जगत्रये ॥ ६।१०८।२१
परस्परांना इष्ट असलेला, अर्थात् कृत्रिम नसलेला, स्नेह त्रैलोक्यांत दुर्लभ आहे. २७८ परामृश्य विवेकेन संसाररचनामिमाम् ।
वैराग्यं येऽधिगच्छन्ति त एव पुरुषोत्तमाः २।११।२६ या संसाररचनेचा विवेकाने विचार करून ज्यांना वैराग्य उत्पन्न होते, ते खरोखर उत्तम पुरुष होत. २७९ परायणं हि प्रभवः संदेहेष्वनुजीविनाम् ।। ३।२।१६
सेवकांना कोणतेही संकट उत्पन्न झाले असता, त्याप्रसंगी धनी हाच त्यांचा मुख्य आधार होय. २८० परिज्ञातोपभुक्तो हि भोगो भवति तुष्टये ।
विज्ञाय सेवितो मैत्रीमति चोरो न शत्रुताम् ॥४।२३।४१ अमुक चोर आहे, असे पक्के ज्ञान झाल्यावर त्याच्याशी वागतांना सावधपणा ठेवता येतो, यामुळे स्नेहभाव जुळतो, वैरभाव राहात नाही. त्याप्रमाणे विषयांचे वास्तविक स्वरूप ओळखून, ते योग्य रीतीने सेवन करणाराला त्यांची बाधा होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #378
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२८१ परोपकारकारिण्या परार्तिपरितप्तया।
बुद्ध एव सुखी मन्ये स्वात्मशीतलया धिया॥२६॥३९ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) परोपकार करणारी, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होणारी व आत्मज्ञानाने तृप्त झालेली अशी बुद्धि ज्या ज्ञानी पुरुषाची आहे, तो खरा सुखी असे मला वाटते. २८२ पापस्य हि भयाल्लोको राम धर्मे प्रवर्तते ॥ ५/७५/३७
(श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे रामा, पापाच्या भयानेच लोकांची धर्माकडे प्रवृत्ति होत असते. २८३ पीताशेषविवेकाम्बुः शरीराम्भोधिवाडवः।
न निर्दहति यं कोपस्तं मृत्युने जिघांसति ॥ ६।२३।९ ज्याने विवेकरूपी सर्व उदक पिऊन टाकले आहे, असा शरीररूपी समुद्रातील क्रोधरूपी वडवाग्नि ज्याला जाळीत नाही, त्याला ठार मारण्याची इच्छा मृत्यु करीत नाही. २८४ पुण्यानि यान्ति वैफल्यं
वैफल्यं यान्ति मातरः । भाग्यानि यान्ति वैफल्यं
नाभ्यासस्तु कदाचन ॥७६७।३२ 'मी अमुक पुण्य केले' असें आपल्या तोंडाने दुसन्यास सांगितले असतां तें पुण्य व्यर्थ जाते. प्रसंगी मातेचा व ऐश्वर्याचाही उपयोग होत नाही, परंतु अभ्यास हा कधीही फुकट जात नाही. २८५ पुत्रमित्रकलत्रादि तृष्णया नित्यकृष्टया ।
खगेष्विव किरात्येदं जालं लोकेषु रच्यते ॥१११७४१५ भिल्लीण पक्ष्यांना पकडण्याकरितां जाळे तयार करते, त्याप्रमाणे मनुष्यांना नेहमी आकर्षण करणारी तृष्णा ही पुत्र, मित्र, स्त्री इत्यादिकांचे जाळे तयार करते.
For Private And Personal Use Only
Page #379
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२८६ पुरुषार्थात्फलप्राप्तिर्देशकालवशादिह ।
५७
प्राप्ता चिरेण शीघ्रं वा यासौ दैवमिति स्मृता ॥ २७ २१
पुरुषप्रयत्नानेंच होणारी फलप्राप्ति देश व काल यांच्या परिस्थितीप्रमाणें लवकर किंवा उशिरां होत असते. यालाच दैव असें म्हणतात.
२८७ पूजनं ध्यानमेवान्तर्नान्यदस्त्यस्य पूजनम् ।
तस्मात्त्रिभुवनाधारं नित्यं ध्यानेन पूजयेत् || ६ |३८|६
परमेश्वराचें अंतःकरणांत ध्यान करणें हेंच त्याचें मुख्य पूजन होय. त्याहून दुसरें पूजन नाहीं. यासाठीं त्रिभुवनाचा आधार जो परमात्मा, त्याचें ध्यानाच्या योगानें नेहमीं पूजन करावें. २८८ पूर्णस्तु प्राकृतोऽप्यन्यत् पुनरप्यभिवाञ्छते ।
जगत्पूरणयोग्याम्बुर्गृह्णात्येवार्णवो जलम् || ४ | २३/५५
सर्व जगाला बुडवून टाकतां येईल, इतका पाण्याचा सांठा ज्यांत भरलेला आहे, असा समुद्र देखील तेवढ्यानें तृप्त न होतां जास्त जास्त पाणी सांठवीत असतो; त्या प्रमाणें प्राकृत मनुष्य कितीही श्रीमान् असला, तरी अधिकाधिक संपत्तीची हाव बाळगीतच असतो. २८९ पूर्वसिद्धस्वभावोऽयमादेहं न निवर्तते || ३ | ८२ ।४० देह पडेपर्यंत पूर्वसिद्ध स्वभाव पालटत नाहीं. २९० पूर्वापरविचारार्थचारुचातुर्यशालिनी ।
सविकासा मतिर्यस्य स पुमानिह कथ्यते ।। २ ।११/७२ पूर्वापर विचार आणि कोणताही सूक्ष्म अर्थ उत्तम रीतीनें ग्रहण करण्याचें चातुर्य जिला आहे, अशी विकास पावलेली बुद्धि ज्याचे ठिकाणी आहे तोच खरा मनुष्य समजावा.
For Private And Personal Use Only
Page #380
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२९१ पौनःपुन्येन करणमभ्यास इति कथ्यते ।
पुरुषार्थः स एवेह तेनास्ति न विना गतिः।। ७६७।४३ पुन्हा पुन्हा तेच तेच करणे याला अभ्यास असे म्हणतात, हाच पुरुषार्थ होय. या अभ्यासावांचून मनुष्याला दुसरा मार्ग नाही. २९२ पौरुषं सर्वकार्याणां कर्तृ राघव नेतरत् ।
फलभोक्तृ च सर्वत्र न दैवं तत्र कारणम् ॥ २।९।२ (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे राघवा; कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांचा संबंध मनुष्याच्या प्रयत्नाकडे आहे; देवाचा त्याच्याशी कांहींएक संबंध नाही. २९३ पौरुषं स्पन्दफलवदृष्टं प्रत्यक्षतो न यत् ।
कल्पितं मोहितैर्मन्दैर्दैवं किंचिन्न विद्यते ।। २।४।१० मनुष्याने प्रयत्नपूर्वक एखादे कार्य केले असता, त्याचा परिणाम प्रत्यक्ष दृष्टीस पडतो. परंतु दैव प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे ती केवळ मंदबुद्धीच्या मूर्ख लोकांची कल्पना आहे. २९४ पौरुषस्य महत्त्वस्य सत्त्वस्य महतः श्रियः ।
इन्द्रियाक्रमणं साधो सीमान्तो महतामपि ॥ ७६.४१ ( विद्याधर भुशुंडाला म्हणतो ) इंद्रियांवर आपला पगडा. बसविण्यासाठी महात्म्यांनाही आपलें पौरुष, महत्त्व, मोठे धैर्य व शांतिरूपी संपदा यांची पराकाष्ठा करावी लागते. २९५ पौरुषादृश्यते सिद्धिः पौरुषाद्धीमतां क्रमः ।
दैवमाश्वासनामात्रं दुःखे पेलवबुद्धिषु ॥ २७१५ कार्यसिद्धि उद्योगाने होते. ज्ञाते पुरुष आपला वर्तनक्रम पौरुषाच्याच योगाने चालवितात. दुबळ्या बुद्धीच्या लोकांना दुःखाचे वेळी समाधानासाठी दैवाचा उपयोग होतो.
For Private And Personal Use Only
Page #381
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीयोगवासिष्ठ सुभाषितानि
२९६ पौरुषेण प्रयत्नेन त्रैलोक्यैश्वर्यसुन्दराम् । कश्चित्प्राणिविशेषो हि शक्रतां समुपागतः || २|४|१३ पौरुषप्रयत्नाचा अवलंब करून कोणा एका मनुष्यानें त्रैलोक्याच्या ऐश्वर्यानें युक्त असलेलें श्रेष्ठ इंद्रपद प्राप्त करून घेतलें. २९७ पौरुषेणान्नमाक्रम्य यथा दन्तेन चूर्ण्यते ।
अन्यः पौरुषमाश्रित्य तथा शूरेण चूर्ण्यते ।। २६ । १२
१९
प्रयत्नानें अन्न मिळवून तोंडांत घातल्यानंतर त्याचें चर्वण दांतांनी केलें जातें, त्याप्रमाणें पौरुषाचाच आश्रय करून शूर मनुष्य दुबळ्या लोकांचें मर्दन करतो.
२९८ प्रज्ञया नखरालून मत्तवारणयूथपाः ।
जम्बुकैर्विजिताः सिंहाः सिंहरिणका इव || ५|१२|३१
आपल्या भयंकर पंजांनी मस्त हत्तीच्या कळपांतील मुख्य हत्तींना फाडून टाकणाऱ्या बलाढ्य सिंहांनाही कोल्ह्यांनी, आपल्या बुद्धीच्या बळावर सिंहांनी हरणांना सहज जिंकावें, त्याप्रमाणें अनेक वेळां जिंकले आहे.
२९९ प्रज्ञावानसहायोऽपि कार्यान्तमधिगच्छति । कार्यमासाद्य प्रधानमपि नश्यति ।। ५।१२।२३
दुष्प्रज्ञः
बुद्धिमान मनुष्याला कोणत्याही प्रकारची मदत नसली तरी तो मोठमोठी कार्ये करतो. पण बुद्धि नसलेल्या मनुष्याला केवढेही मोठें साहाय्य असलें तरी त्याच्या मुख्य कार्याचाच नाश होतो. ३०० प्रज्ञासौजन्ययुक्तेन शास्त्रसंवलितेन च ।
पौरुषेण न यत्प्राप्तं न तत्क्वचन लभ्यते || ६ | २९/९ शास्त्रीय मार्गानें विचार करणारी बुद्धि, सौजन्य व पौरुषप्रयत्न यांच्या योगानें प्राप्त होत नाहीं, अशी कुठेही वस्तू नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #382
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३०१ प्रत्यक्षमानमुत्सृज्य योऽनुमानमुपेत्यसौ।
स्वभुजाभ्यामिमौ साविति प्रेक्ष्य पलायते ॥२।५।१९ प्रत्यक्ष ज्याचें फळ दिसत आहे अशा पौरुषप्रयत्नाचा त्याग करून, केवळ अनुमानाने सिद्ध होणाऱ्या दैवाचा आश्रय जो मनुष्य करतो, तो आपल्याच हातांना सर्प मानून पळू लागतो, असे म्हणण्यास काय हरकत आहे ? ३०२ प्रभुताबृहितं चेतो नाहार्यमभिनन्दति ॥५।४६६
ज्याच्या ठिकाणी प्रभुत्व आले आहे, व अधिकार चालविण्याचे ‘सामर्थ्य आहे, त्याला कृत्रिम भूषणादिकांचे काय महत्त्व आहे. ३०३ प्रवाहपतितं कार्य कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ४॥५६३४
प्रवाहपतित कार्य करणारा दोषांपासून अलिप्त असतो. ३०४ प्राक्तनं चैहिकं चेति द्विविधं विद्धि पौरुषम् ।
प्राक्तनोऽद्यतनेनाशु पुरुषार्थेन जीयते ॥२।४।१७ पूर्वीचें व हल्लींचे असे दोन प्रकारचे पौरुष आहे. या जन्मांत मनुष्याने नेटाने प्रयत्न केला असतां पूर्वजन्मांतील पौरुष नाहीसे करून टाकितां येते. ३०५ प्राक्स्वकर्मेतराकारं देवं नाम न विद्यते ।
बालः प्रबलपुंसेव तजेतुमिह शक्यते ॥ २।६।४ आपणच पूर्वी केलेल्या कर्माशिवाय दैव म्हणून काही निराळी वस्तु नाहीं; इतकेच नव्हे तर शक्तिमान् मनुष्य एखाद्या लहान मुलाला आपल्या कह्यांत ठेवतो, त्याप्रमाणे पूर्वीच्या दुष्टसंस्कारांना सध्या केलेल्या प्रयत्नांनी जिंकून टाकतां येणे अगदीं शक्य आहे. ३०६ प्राशं प्राप्य न पृच्छन्ति ये केचित्ते नराधमाः ३७८१३३
विद्वानाची गांठ पडली असतां प्रश्न विचारून जे आपला संशय नाहींसा करून घेत नाहीत, ते केवळ नराधम होत.
For Private And Personal Use Only
Page #383
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
www.mmmmmmmmmmm
३०७ प्राप्तकालं कृतं कार्य राजते नाथ नेतरत ।
वसन्ते राजते पुष्पं फलं शरदि राजते ॥ ६।०४।२२ (चूडाला शिखिध्वज पतीला म्हणते ) योग्य समयीं केलेलेंच कार्य शोभते. दुसरें शोभत नाही. वसंतऋतूमध्ये फूल शोभते आणि शरहतूंत फळ शोभतें. ३०८ प्राप्तेन येन नो मूयः प्राप्तव्यमवशिष्यते । ___ तत्प्राप्तौ यत्नमातिष्ठेत्कष्टयापि हि चेष्टया ॥७॥६॥३१
जे मिळविले असतां पुन्हां कांहींएक मिळवावयाचें उरणार नाहीं, असेंच पद मिळविण्याविषयी जोराचा प्रयत्न करावा. मग त्यामध्ये कितीही कष्ट पडले तरी चालतील. ३०९ प्रामाणिकस्य तज्ज्ञस्य वक्तुः पृष्टस्य यत्नतः।
नानुतिष्ठति यो वाक्यं नान्यस्तस्मान्नराधमः २।११।४६ प्रमाणशुद्ध भाषण करणा-या तज्ज्ञ मनुष्याला प्रश्न केल्यानंतर जो त्याच्या वचनाप्रमाणे वागत नाही, त्याच्यापेक्षा अधम मनुष्य दुसरा कोणीही नाही. ३१० प्रायः परपरित्राणमेव कमे निजं सताम् ॥ ३॥२६।२०
दुसन्याचे रक्षण करण्यासाठीच सत्पुरुषांच्या हातून कोणतेही कर्म होत असते. ३११ बद्धो हि वासनाबद्धो मोक्षः स्याद्वासनाक्षयः ४।५७१९
जो वासनेने बद्ध असतो, तोच खरा बद्ध आणि ज्याचा वासनाक्षय झाला, तोच मुक्त समजावा.
For Private And Personal Use Only
Page #384
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३१२ बन्धमुक्तो महीपालो ग्राममात्रेण तुष्यति ।
परैरबद्धो नाक्रान्तो न राज्यं बहु मन्यते ॥४।२३१५७ अटकेत असलेला राजा मोकळा झाल्यावर त्याला जरी एखादा गांव मिळाला तरी तेवढ्याने तो संतुष्ट होतो. परंतु ज्याला शबूंनी बद्ध केले नाही व ज्याच्यावर कोणाचा ताबा नाही अशा राजाला राज्य देऊ केले, तरी सुद्धा त्याचे त्याला कांहींच महत्त्व वाटत नाही. ३१३ बलं बुद्धिश्च तेजश्च क्षयकाल उपस्थिते ।
विपर्यस्यति सर्वत्र सर्वथा महतामपि ॥ ७।१४०।६ नाश होण्याची वेळ आली म्हणजे सर्वठिकाणी सर्वप्रकारें मोठमोठ्यांचीही बुद्धि विपरीत होते, बळ चालेनासे होते, व तेज लोपून जाते. ३१४ बहुनात्र किमुक्तेन संक्षेपादिदमुच्यते ।
संकल्पनं परो बन्धस्तदभावो विमुक्तता ॥६।१२६।९७ अधिक बोलून काय करावयाचे आहे ? थोडक्यात सांगावयाचे हे की, संकल्प करणे हाच मोठा बंध होय, व संकल्परहित असणे हाच मोक्ष होय. ३१५ बाल्यमल्पदिनैरेव यौवनश्रीस्ततो जरा ।
देहेऽपि नैकरूपत्वं कास्था बाह्येषु वस्तुषु ॥ १।२८।३७ बाल्यदशेनंतर थोडक्याच दिवसांनी तारुण्य, व नंतर म्हातारपण अशा भिन्न दशा प्रत्यक्ष देहाचे ठिकाणी दिसून येतात; मग बाह्य वस्तु एकरूप राहतील असा भरंवसा ठेवण्यांत काय अर्थ आहे ! -
For Private And Personal Use Only
Page #385
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३१६ बीजात्कारणतः कार्यमङ्कुरः किल जायते ।
न बीजमपि यत्रास्ति तत्र स्यादरः कुतः॥७५७/१२ कारणापासून कार्य उत्पन्न होते. या नियमाप्रमाणे बीजापासून अंकुर उत्पन्न होतो. परंतु ज्या ठिकाणी बीजच नाहीं तेथें अंकुर कसा उत्पन्न होईल ? ३१७ बीभत्सं विषयं दृष्ट्वा को नाम न विरज्यते ।
सतामुत्तमवैराग्यं विवेकादेव जायते.॥ २११।२३ बीभत्स विषय पाहून त्यांच्याबद्दल कोणाला तिटकारा वाटणार नाहीं? परंतु सत्पुरुषांचे ठिकाणी जे उत्कृष्ट वैराग्य असते तें विवेकामुळे उत्पन्न होते. ३१८ भवत्यखिलजन्तूनां यदन्तस्तद्धहिः स्थितम् ॥५॥५६॥३४
कोणत्याही प्राण्याच्या अंतःकरणांत ज्याविषयी विचार चालू असतो त्याप्रमाणेच त्याला बाह्य जगांत दिसत असते. ३१९ भविष्यं नानुसंधत्ते नातीतं चिन्तयत्यसौ ।
वर्तमाननिमेषं तु हसन्नेवानुवर्तते ॥ ५।१२।१४ जनक राजा भावी गोष्टींची चिंता वहात नसे. आणि गत गोष्टींचें स्मरण करीत नसे. तसेंच वर्तमानकाळी सर्व व्यवहार आनंदाने करीत असे. ३२० भारोविवेकिनः शास्त्रं भारो ज्ञानं च रागिणः ।
अशान्तस्य मनो भारो भारो नात्मविदो वपुः॥१।१४।१३ अविवेकी मनुष्याला शास्त्र, विषयी मनुष्याला ज्ञान व रागीट मनुष्याला मन हे भारभूत वाटते. परंतु आत्मज्ञान झालेल्या मनुष्याला शरीर हे भारभूत होत नाही.
For Private And Personal Use Only
Page #386
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३२१ भूतानि सन्ति सकलानि बहूनि दिक्षु
बोधान्वितानि विरलानि भवन्ति किंतु । वृक्षा भवन्ति फलपल्लवजालयुक्ताः।
कल्पद्रुमास्तु विरलाः खलु संभवन्ति ॥ ७९७४४७ पाने, फळे यांनी भरून गेलेले सामान्य वृक्ष सर्वत्र आढळतात परंतु कल्पवृक्ष सर्वत्र दिसत नाहीत. त्याप्रमाणे मोहांत गुरफटून गेलेले लोक सर्व ठिकाणी दृष्टीस पडतात, परंतु ज्ञानसंपन्न लोक अगदी क्वचित्च आढळतात. ३२२ भोगेच्छामात्रको बन्धस्तत्त्यागो मोक्ष उच्यते॥४॥३५॥३ _ विषयोपभोगांची इच्छा असणे हाच बंध, आणि भोगेच्छा नसणे हाच मोक्ष होय. ३२३ भोगेष्वस्वदमानेषु पुंसः श्रेयः पुरो गतम् ॥४॥३३॥६९ __ ज्याला विषयोपभोगांचा अत्यंत तिटकारा आला, त्याच्या पुढे मोक्ष हात जोडून उभा आहे ! ३२४ मत्त ऐरावतो बद्धः सर्पपस्येव कोटरे ।
मशकेन कृतं युद्धं सिंहौधैरणुकोटरे ॥ ३२०१९ पद्माक्षे स्थापितो मेरुर्निगीर्णो भृङ्गसूनुना ।
स्वभाब्दगर्जितं श्रुत्वा चित्रं नृत्यन्ति बहिणः३।२०।१० (असमंजस विधाने ) एकाद्या मत्तहत्तीला मोहरीच्या गाभ्यांत बांधून ठेवलें, एखाद्या चिलटान परमाणूच्या पोटांत सिंहांच्या कळपाबरोबर युद्ध केलें, एखाद्या कमलाच्या बीजामध्ये मेरुपर्वत सांठविला व तो एखाद्या लहानशा भुंग्याने गिळून टाकला, स्वमांतील मेघांची गर्जना ऐकून चित्रांतील मोर नाचूं लागले.
For Private And Personal Use Only
Page #387
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३२५ मन एव समर्थं वो मनसो दृढनिग्रहे ।
अराजा का समर्थः स्याद्राज्ञो राघव निग्रह।।३।११२।१९ (श्रीवसिष्ठ म्हणतात ) श्रोतृजनहो, तुमच्या मनाचा दृढनिग्रह करण्याला तुमचे मनच समर्थ आहे. हे राघवा, राजाचा निग्रह करण्याला जोराजा नाही,असा कोणतासामान्य मनुष्य समर्थ होईल? ३२६ मनाकृतं कृतं लोके न शरीरकृतं कृतम् ॥ ३४८९।१
मनाने में केलें तेच खरोखर केलेले असे समजावें; केवळ शरीराने केले, तें केलें असें म्हणतां येत नाही. ३२७ मनो हि न जडं राम नापि चेतनतां गतम् ॥३९६३७
(श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे रामा, मन हे धड जडही नाही, आणि चेतनही नाही. ३२८ मरणस्य मुने राज्ञो
जराधवलचामरा। आगच्छतोऽग्रे निर्याति
स्वाधिव्याधिपताकिनी ॥ १।२२।३० (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो ) मरण हा एक राजा असून त्याची स्वारी आपल्याकडे येऊ लागली, म्हणजे त्याच्या अगोदर आधिव्याधिरूपी सेना बाहेर पडत असून जरारूपी पांढरी चवरी पुढे दिसू लागते. ३२९ महतां दर्शनं नाम न कदाचन निष्फलम् ॥३।२६।३९
महात्म्यांचे दर्शन केव्हाही निष्फळ होत नाही. ३३० महतामेव संपर्कात्पुनदुःखं न बाधते ।
को हि दीपशिखाहस्तस्तमसा परिभूयते ॥ ३१८२८ जळणारी मशाल हातांत असली म्हणजे अंधारांत चांचपडण्याचा कोणालाही प्रसंग येत नाही, त्याप्रमाणे महात्म्यांचा सहवास झाल्यावर कोणालाही दुःख भोगण्याचा प्रसंग येत नाही.
यो. वा. ५
For Private And Personal Use Only
Page #388
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
vvvvwww
३३१ महाकर्ता महाभोक्ता महात्यागी' भवानघ ।
सर्वाः शङ्काः परित्यज्य धैर्यमालम्ब्य शाश्वतम् ६।११५।१ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे निष्पाप रामा, तूं सर्व शंका सोडून देऊन, शाश्वत धैर्याचा आश्रय करून, महाकर्ता, महाभोक्ता, व महात्यागी हो. ३३२ महाशनानामेकान्ते भोजनं हि सुखायते ॥ ३१८२४४ __ पुष्कळ आहार करणारांना एकान्तांत भोजन करणें सुखावह होत असते. ३३३ मांसपाञ्चालिकायास्तु
यन्त्रलोलेऽङ्गपञ्जरे। स्नायवस्थिग्रन्थिशालिन्या:
स्त्रियाः किमिव शोभनम् ॥ १।२१।१ यंत्रांतील निरनिराळे भाग अत्यंत चंचल असतात. त्याप्रमाणे स्त्रीच शरीर असून ते स्नायु, अस्थि इत्यादिकांनों बनलेले असते. स्त्री केवळ मांसाची पुतळी असून तिच्यामध्ये रमणीय असें काय आह ? ३३४ मुकुरे निर्मले द्रव्यमयत्नेनैव विम्बति ॥ ७/७४
स्वच्छ आरशामध्ये कोणत्याही वस्तूचे प्रतिबिंब सहज पडते. ३३५ मुख्याङ्करं सुभग विद्धि मनो हि पुंसो
देहास्ततः प्रविसृतास्तरुपल्लवाभाः । नष्टेऽकुरे पुनरुदेति न पल्लवश्री
नँवाङ्करः क्षयमुपैति दलक्षयेषु ॥ ३॥८९।५२ (इंद्रब्राह्मण इंदद्युम्न राजाला म्हणतो) मनुष्याचे मन हाच संसारतरूचा मुख्य अंकुर आहे. आणि ह्या अंकुरापासून ससाररूपी वृक्षाला देहरूपी पालवी फुटत असते. मूळ अंकुरच नाहीसा झाला, तर झाडाला पुन्हा पालवी फुटत नाही; पण नुसती पाने गळून पडली असतां मूळ अंकुर नष्ट होत नाही,
केवळ मारीर असून ताट भाग
For Private And Personal Use Only
Page #389
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३३६ मुढानुमानसंसिद्धं दैवं यस्यास्ति दुर्मतेः । दैवाद्दाहोऽस्ति नैवेति गन्तव्यं तेन पावके ।। २२८५
केवळ मूर्खपणाच्या अनुमानामुळें दैव आहे असें ज्याला वाटतें, त्यानें त्या दैवाची परीक्षा करण्याकरितां अग्नीमध्ये उडी टाकून आंगाचा दाह होतो किंवा नाहीं तें पहावें !
३३७ मूढैः प्रकल्पितं दैवं तत्परास्ते क्षयं गताः ।
६७
प्राज्ञास्तु पौरुषार्थेन पदमुत्तमतां गताः || २|८|१६
दैव ही केवळ मूर्खाची कल्पना आहे या दैवाच्या नादीं जे लागतात त्यांचा नाश होतो. ज्ञाते लोक उद्योगाच्या योगानें उत्तम पदाला जाऊन पोहोंचतात.
३३८ मूढोत्तारणमेवेह स्वभावो महतामिति ।। ३ ।७६।१२
मूढ लोकांचा उद्धार करणे हाच महात्म्यांचा स्वभाव असतो. ३३९ मृतिर्गुणितिरस्कारो जीवितं गुणिसंश्रयः || ३।७७।३१ गुणिजनांचा तिरस्कार म्हणजेच मृत्यु आणि गुणिजनांचा आश्रय म्हणजेच खरें जीवित होय.
३४० मोक्षद्वारे द्वारपालाश्चत्वारः परिकीर्तिताः ।
शमो विचारः संतोषश्चतुर्थः साधुसंगमः || २ | ११।५९ शम, विचार, संतोष आणि साधुसमागम हे मोक्षाच्या द्वारावरील चार द्वारपाल आहेत.
३४१ मोक्षः शीतलचित्तत्वं बन्धः संतप्तचित्तता ।। ७/९५/२९
चित्त शांत असणें हा मोक्ष व चित्त संतप्त असणें हा बंध होय. ३४२ मोहनाशाय महतां वचो नो मोहवृद्धये ॥ ५।४९।६ महात्म्यांचं भाषण मोहाचा नाश करतें त्याची वाढ करीत नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #390
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६८
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३४३ मौख्यं हि बन्धनमवेहि परं महात्मन् || ६।८९।३१ ( चूडाला शिखिध्वजाला म्हणते ) मूर्खपणा हें मोठें बंधन आहे असें समज.
३४४ य एव यत्नः क्रियते बाह्यार्थोपार्जने जनैः ।
स एव यत्नः कर्तव्यः पूर्वं प्रज्ञाविवर्धने || ५ | १२|२६ द्रव्यादि बाह्य पदार्थ मिळविण्यासाठीं मनुष्य जसा प्रयत्न करतो तसा जोराचा प्रयत्न प्रथमतः बुद्धि वाढविण्यासाठीं करावा. ३४५ यत्कृतं मनसा तात तत्कृतं विद्धि राघव ।
यत्यक्तं मनसा तावत्तत्त्यक्तं विद्धि चानघ ॥ ३।११०।१४ ( श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे निष्पाप रामा, जें मनानें केलें तेंच खरोखर केलें असें जाण. आणि ज्याचा मनानें त्याग केला त्याचाच त्याग केला असें समज.
३४६ यत्नवद्भिर्दृढाभ्यासैः प्रज्ञोत्साहसमन्वितैः ।
मेरवोऽपि निगीर्यन्ते कैव प्राक्पौरुषे कथा || २|४|१८
बुद्धिमान, उत्साही, उद्योगी पुरुषांनीं प्रयत्नपूर्वक दृढ अभ्यास केला असतां, त्यांना मेरुपर्वत सुद्धां गडप करून टाकतां येतो, मग पूर्वजन्मांतील पौरुष नाहींसें करतां येईल, यांत नवल काय ? ३४७ यत्नेनापि पुनर्बद्धं केन वृन्तच्युतं फलम् ॥ ७/१२५।३२ देठापासून गळलेले फळ पुन्हां कोणीतरी प्रयत्न करून देठाला पूर्वीप्रमाणें चिकटवू शकेल काय ? ३४८ यत्सुखं दुःखमेवाहुः क्षणनाशानुभूतिभिः ।
अकृत्रिममनाद्यन्तं यत्सुखं तत्सुखं विदुः || ७|६८ ३१
क्षणांत नाश पावण्याचा अनुभव येत असल्यामुळें ज्ञाते लोक विषयसुखाला दुःखच असें म्हणतात. आणि जें स्वाभाविक, अनादि, अनंत असें आत्मस्वरूपाचें सुख त्यालाच खरें सुख म्हणतात.
For Private And Personal Use Only
Page #391
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३४९ यथाचारं यथाशास्त्रं यथाचित्तं यथास्थितम् ।
व्यवहारमुपादत्ते यःस आये इति स्मृतः॥६।१२६।५५ वृद्धांचा आचार व शास्त्र यांच्या अनुरोधाने प्रसन्नचित्ताने यथास्थित कर्म करणारा व लौकिक व्यवहारही पाळणारा, त्याला आर्य असें म्हणतात. ३५० यथा देहोपयुक्तं हि करोत्यारोग्यमौषधम् ।
तथेन्द्रियजयेऽभ्यस्ते विवेकः फलितो भवेत् ॥४।१८।६६ औषध पथ्यपूर्वक सेवन केल्यानेच आरोग्य प्राप्त होते, त्याप्रमाणे इंद्रियजयाचा अभ्यास केला, तरच आत्मानात्मविवेक फलद्रूप होईल. ३५१ यथा न किंचित्कलयन्मश्चके स्पन्दते शिशुः।
तथा फलान्यकलयन्कुरु कर्माणि राघव ॥ ५/७०२० (श्रीवसिष्ठ म्हणतात.) हे राघवा, एखादें लहान मूल कोणत्याही त-हेचा संकल्प न करितां आनंदाने पलंगावर लोळत असते; त्याप्रमाणे कर्मफलाचा मुळींच विचार न करतां तूं आपली प्राप्तकर्मे करीत जा. ३५२ यथा नाशेन वा भाव्यं तथोदेत्यशुभा मतिः।।३।७१।१७
जशा रीतीने नाश व्हावयाचा असतो, तशा त-हेची दुर्बुद्धि अगोदर उत्पन्न होते. ३५३ यथाप्राप्तं हि कर्तव्यमसक्तेन सदा सता ।
मुकुरेणाकलङ्केन प्रतिबिम्बक्रिया यथा ॥ ३॥८८।११ एखादा स्वच्छ आरसा आपल्यासमोर येणाऱ्या पदार्थाचे प्रतिबिंब धारण करतो, त्याप्रमाणे आसक्त न होतां आपलें प्राप्त झालेले कर्तव्य प्रत्येकाने अवश्य करीत राहिले पाहिजे.
For Private And Personal Use Only
Page #392
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३५४ यथा रजोभिर्गगनं यथा कमलमम्बुभिः ।
न लिप्यते हि संश्लिष्टै हैरात्मा तथैव च ॥ ५।५।३१ आकाशांत धूळ उडाली म्हणून ते मलिन होत नाही, किंवा कमलपत्रावर उदक पडले तरी ते त्याला चिकटत नाही, त्याप्रमाणे आत्म्याशी कितीहि देहांचा संबंध आला तरी तो त्यांच्या योगाने लिप्त होत नाही. ३५५ यथा वन्ध्यासुतो नास्ति यथा नास्ति मरौ जलम् ।
यथा नास्ति नभोवृक्षस्तथा नास्ति जगद्भमः॥३॥७१४३ ज्याप्रमाणे वंध्येचा मुलगा, मृगजळांतील पाणी, आकाशांतील वृक्ष यांना अस्तित्व नसते त्याप्रमाणे जगाच्या भ्रमाची स्थिति आहे. ३५६ यथा शाम्येन्मनोनिच्छं
नोपदेशशतैस्तथा ॥ ७३६।२३ इच्छा सोडल्याने मन जसें शांत होते, तसे शेकडों उपदेशांनीही शांत होत नाही. ३५७ यथा स्पर्शन पवनः सत्तामायाति नो गिरा ।
तथेच्छातानवेनैव विवेकोऽस्य विबुध्यते ॥ ४।१८।६८ नुसता 'वारा ' हा शब्द ऐकल्याने त्याचे अस्तित्व कळत नसते, तर त्यासाठी वान्याचा अंगाला स्पर्श व्हावा लागतो, त्याप्रमाणे 'मी विवेकी आहे ' असे म्हटल्याने विवेकाची परीक्षा होत नाही, तर विषयाची तृष्णा कमी असणे हीच विवेक असल्याची खूण होय. ३५८ यथा हि काष्ठजतुनोर्यथा बदरकुण्डयोः ।
श्लिष्टयोरपि नैकत्वं देहदेहवतोस्तथा ॥ ३॥११४६२ लाकूड आणि लाख किंवा बोरे आणि भांडे ही एकमेकांशी चिकटलेली दिसली, तरी त्यांचे वास्तविक ऐक्य संभवत नाही, त्याचप्रमाणे देह आणि जीवात्मा यांची स्थिति आहे.
For Private And Personal Use Only
Page #393
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री योगवासिष्ठ सुभाषितानि
३५९ यदवयवधात्पापं वध्यत्यागात्तदेव हि || ३ |९०/३ अवध्याचा वध केल्यानें जितकें पातक लागतें, तितकेंच पातक वध्याचा वध न केल्यानें लागत असतें. ३६० यदार्यगर्हितं यद्वा न्यायेन न समार्जितम् ।
तस्माद् ग्रासाद्वरं मन्ये मरणं देहिनामिदम् || ३ |७६।७ आर्य लोकांनी निंद्य ठरविलेले किंवा अन्यायाचें कृत्य करून आपले पोट भरण्यापेक्षां मनुष्यांनीं मरून जाणें हेंच श्रेयस्कर होय. ३६१ यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित् ।
७१.
इमं समस्तविज्ञानशास्त्रकोशं विदुर्बुधाः || ३|८|१२
जें या योगवासिष्ठ ग्रंथांत आहे, तेच इतर ग्रंथांतून आहे आणि जें यांत नाहीं तें कोठेही नाहीं. कारण हा ग्रंथ म्हणजे सर्व विज्ञानशास्त्रांचें भांडार आहे, असें विद्वान् लोक मानतात. ३६२ यदेव क्रियते नित्यं रतिस्तत्रैव जायते || ३ |२| ४८
मनुष्य जें कृत्य नेहमीं करतो, तेंच पुन्हा करण्याची आवड त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते.
३६३ यद्यथा कल्पितं येन स संपश्यति तत्तथा ।। ७।१७७।३
ज्यानें ज्या वस्तूची ज्या प्रकाराने कल्पना केली, तो त्या वस्तूला तशा प्रकारानें पाहतो. ३६४ यद्वस्तु विद्यमानं सत् प्रश्नस्तत्र विराजते ।। ६।९६।४२ जी वस्तु विद्यमान व सद्रूप असते, तिच्याविषयीं प्रश्न केला तर तो शोभतो.
३६५ यन्त्रं तिलानां कठिनं राशिमुग्रमिवाकुलम् ।
यं पीडयति नानङ्गस्तं मृत्युर्न जिघांसति || ६ | २३।१० तेल काढण्याचा कठीण घाणा तिळांची मोठी रास पिळून काढतो, त्याप्रमाणें मदन ज्याला व्याकुळ करून पीडा देत नाहीं, त्याला ठार मारण्याची इच्छा मृत्यु करीत नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #394
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७२
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३६६ यन्नाम किल नास्त्येव
। तच्छान्तौ का कदर्थना ॥ ७१४२।४५ मुळांत जी वस्तु नाही,तिचा परिहार करण्याविषयी क्लेश तरी कसले! ३६७ यन्मयो हि भवत्यङ्ग पुरुषो वक्ति तादृशम् ॥७।२९।४०
(श्रीवसिष्ठ रामाला सांगतात.) मनुष्याचे जसें ज्ञान असेल, तसें तो भाषण करतो. ३६८ यमो निणराजेन्द्रो नातं नामानुकम्पते ।
सर्वभूतदयोदारो जनो दुर्लभतां गतः ॥ १।२६।७ यम हा अत्यंत निर्दय असून त्याला दुःखितांची मुळींच कींव येत नाही. सर्व प्राण्यांवर दया करणारा थोर मनुष्य या जगांत फारच विरळा. ३६९ ययैवाजीव्यते युक्त्या सैवापदि विराजते ॥७१९६।१६
आपत्काली ज्या युक्तीने प्राण वाचतात, तीच उत्तम होय. ३७० यस्त्विच्छातानवे यत्नं न करोति नराधमः ।
सोऽन्धकूपे स्वमात्मानं दिनानुदिनमुज्झति ॥७३६।३१ जो नीच मनुष्य आपल्या इच्छा कमी करण्याचा प्रयत्न करीत नाहीं तो आपणाला प्रत्येक दिवशी अंधकूपांत फेकीत असतो. ३७१ यस्याग्रे न गलति संशयः समूलो
नैवासौ कचिदपि पण्डितोक्तिमेति ॥ ३७९।३३ जो आपल्यापुढे मांडलेल्या शंकेचे समूल निरसन करीत नाही, त्याला पंडित ही पदवी केव्हांच प्राप्त होत नाही. ३७२ यस्यान्तर्वासनारज्ज्वा ग्रन्थिवन्धः शरीरिणः ।
महानपि बहुज्ञोऽपि स बालेनापि जीयते ॥४।२७।२० जो मनुष्य अंतःकरणांतील वासनारूपी दोरीने घट्ट बांधलेला असतो, तो कितीही बलवान् किंवा विद्वान् असो, प्रसंगी लहानशा पोराकडूनही पराजित होतो.
For Private And Personal Use Only
Page #395
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३७३ यस्येच्छाननुसंधानमात्रे दुःसाध्यता मतेः । गुरूपदेशशास्त्रादि तस्य नूनं निरर्थकम् || ७|३६|३५
इच्छेचा संबंध न ठेवणें, एवढें देखील ज्याच्या बुद्धीला दुःसाध्य वाटत असेल, त्यानें घेतलेला गुरूपदेश, त्याचें शास्त्रज्ञान इत्यादि सर्व खरोखर व्यर्थ होय.
७३
३७४ यस्योज्ज्वलति तीक्ष्णाग्रा पूर्वापरविचारिणी ।
प्रज्ञादीपशिखा जातु जाड्यान्ध्यं तं न बाधते ।।५।१२।१९ ज्याच्या ठिकाणीं पूर्वापरविचार करणाऱ्या कुशाग्र बुद्धीची ज्योति प्रज्वलित झालेली असते, त्याला अज्ञानरूपी अंधकार केव्हांही बाधा करीत नाहीं.
३७५ यः स्नातः शीतसितया
साधुसंगतिगङ्गया । किं तस्य दानैः किं तीर्थैः
किं तपोभिः किमध्वरैः । २।१६।१०
ज्यानें सत्संगरूपी गंगेच्या थंड व स्वच्छ पाण्यांत स्नान केलें आहे, त्याला दान, तीर्थ, तप आणि यज्ञ यांच्यापासून कोणतें पुण्य प्राप्त व्हावयाचें राहिलें आहे ?
३७६ यावत्तिलं यथा तैलं यावद्देहं तथा दशा ।
यो न देहदशामेति स च्छिनत्यसिनाम्बरम् ६ । १०४।४२
जोपर्यंत तीळ असतात तोपर्यंत त्यांत तेल असतेंच. त्याप्रमाणें जोंपर्यंत शरीर असतें तोंपर्यंत हर्ष, खेद इत्यादि विकार होणारच देह असेपर्यंत ज्याला हे विकार होत नाहींत तो तरवारीनें आकाशच कापून काढतो.
For Private And Personal Use Only
Page #396
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७४
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३७७ यावत्सर्वं न संत्यक्तं तावदात्मा न लभ्यते ।
सर्वावस्थापरित्यागे शेष आत्मेति कथ्यते ॥५।५८१४४ जोपर्यंत मनाने सर्व विषयांचा पूर्णपणे त्याग केला नाही, तोपर्यंत कोणालाही आत्मप्राप्ति होणार नाही. कारण मनाच्या सर्व अवस्थांचा त्याग झाल्यानंतर अवशिष्ट राहणारातोच आत्मा, असा सिद्धांत आहे. ३७८ यावदन्यन्न संत्यक्तं
तावत्सामान्यमेव हि । वस्तु नासाद्यते साधो
स्वात्मलामे तु का कथा ॥ ५।५८।४५ (मांडव्य ऋषि सुरघु राजाला म्हणतात.) सामान्य व्यवहारामध्ये देखील एखादी क्षुद्र वस्तु तिच्या विरोधी वस्तूंचा त्याग केल्याशिवाय हाती लागत नाही, असा नियम आहे. तर आत्मलाभाच्या संबंधाने हा नियम विशेषच लागू पडावा, यांत काय आश्चर्य आहे ? ३७९ यावदेहं स्वभावोऽस्य देहस्य न निवर्तते ॥३७६।५
जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत त्याचे धर्म नाहीसे होत नाहीत. ३८० या विवेकविकासिन्यो मतयो महतामिह ।
नता विपदि मजन्ति तुम्बकानीव वारिणि ।।२।१४।११ भोपळा पाण्यात बुडत नाही, त्याप्रमाणे विवेकाने विकास पावलेली महात्म्यांची बुद्धि विपत्काळी निराशेत बुडून जात नाही. ३८१ युक्तियुक्तमुपादेयं वचनं बालकादपि । __ अन्यत्तृणमिव त्याज्यमप्युक्तं पद्मजन्मना ॥ २।१८।३ एखाद्या मुलानेही केलेले सयुक्तिक भाषण ग्राह्य समजावें, परंतु प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेही केलेले भाषण युक्तीच्या विरुद्ध असल्यास तें त्याज्य समजावे. ३८२ युक्त्या च व्यवहारिण्या स्वार्थःप्राज्ञेन साध्यते३।७८।२५ ज्ञाते लोक आपले कार्य व्यवहार्य युक्तीने साधीत असतात.
For Private And Personal Use Only
Page #397
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ७५ ३८३ युक्त्या प्रबोध्यते मूढः प्राज्ञस्तत्त्वेन बोध्यते॥६॥४९।२१
मूढाला युक्तीने बोध करावा लागतो व जाणत्याला तत्त्व सांगून बोध करावा लागतो. ३८४ युक्त्यैव बोधयित्वैष जीव आत्मनि योज्यते । __यद्युक्त्यासाद्यते कार्य न तद्यत्नशतैरपि ॥ ६४९।१९
युक्तीनेच बोध करून या जीवाला आत्मप्राप्ति करून द्यावी लागते. कारण जें कार्य युक्तीने साधतें तें शेकडो प्रयत्नांनीही साधत नाही. ३८५ युज्यते वेष्टनं वायोराकाशस्य च खण्डनम् ।
ग्रथनं च तरङ्गाणामास्था नायुषि युज्यते ॥ १।१४।५ वाऱ्याची गुंडाळी करता येते, आकाशाचे तुकडे करता येतात, पाण्यावरील लाटांना एकत्र ओंवतां येते. इत्यादि गोष्टींवर एकवेळ विश्वास बसेल, परंतु आयुष्यावर विश्वास बसत नाही. ३८६ ये केचन समारम्भा ये जनस्य क्रियाक्रमाः।
ते सर्वे देहमात्रार्थमात्मार्थं न तु किंचन ॥४५७/३१ बाह्य विषयांवर दृष्टि ठेवणारे लोक सर्व वैदिक किंवा लौकिक कमें केवळ देहाच्या सुखासाठी करीत असतात; परंतु आत्मज्ञानासाठी मुळींच प्रयत्न करीत नाहीत. ३८७ येन नासादितं हेम रीतिं किं स परित्यजेत् ॥६१०१।४०
ज्याला सोन्याची माहितीच नाहीं तो पितळ मिळविण्याच्याच मार्गात असणार. ३८८ येन प्राप्तेन लोकेऽस्मिन्न प्राप्यमवशिष्यते ।
तत्कृतं सुकृतं मन्ये शेष कर्म विषूचिका ॥ ६७४।१७ (भगीरथ म्हणतो) जें प्राप्त झाले असतां या लोकांत कांहीं अधिक मिळावयाचें राहात नाही, तेच करणे याला मी 'सुकृत' समजतो. बाकीचें कर्म म्हणजे पटकीप्रमाणे अपवित्र व दुःखदायक होय.
For Private And Personal Use Only
Page #398
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३८९ येनाभ्यासः परित्यक्त इष्टे वस्तुनि सोऽधमः ।
कदाचिन्न तदामोति वन्ध्या स्वतनयं यथा॥७६७१३४ ज्याने इच्छिलेल्या वस्तूविषयींचा अभ्यास सोडून दिला, तो नीच होय. वंध्येला ज्याप्रमाणे स्वतःचा मुलगा प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे अभ्यास सोडून देणाराला इष्ट वस्तु कधीही प्राप्त होत नाही. ३९० ये शूरा ये च विक्रान्ता ये प्राज्ञा ये च पण्डिताः ।
तैस्तैः किमिव लोकेऽस्मिन्वद दैवं प्रतीक्ष्यते ॥२।८।१७ (श्रीवसिष्ठ म्हणतात हे रामा,) या जगांत जे लोक शूर, पराक्रमी, बुद्धिमान व पंडित म्हणून प्रसिद्धीला आले ते केवळ पौरुषाच्याच योगाने होत. तूंच सांग की, ते कधी देवाची वाट पहात बसले होते काय? ३९१ येषां गुणेष्वसंतोषो रागो येषां श्रुतं प्रति ।
सत्यव्यसनिनो ये च ते नराः पशवोऽपरे ॥४॥३२॥४३ ज्यांचा हावरेपणा सद्गुणांविषयी आहे, ज्यांना प्रेम विद्येचे आहे, आणि व्यसन सत्याचे आहे, तेच खरोखर मनुष्य होत. इतर लोक केवळ पशुतुल्य होत. ३९२ यैरेव जायते रागो मूर्खस्याधिकतागतैः ।
तैरेव भोगैः प्राज्ञस्य विराग उपजायते ॥४।४६५ ज्या विषयोपभोगांच्या समृद्धीमुळे मूर्ख मनुष्यांना प्रेम उत्पन्न होते, त्याच विषयांच्या अभिवृद्धीमुळे ज्ञात्यांना वैराग्य उत्पन्न होतें. ३९३ यो न निर्वासनो नूनं सर्वधर्मपरोऽपि सः।
सर्वज्ञोऽप्यभितो बद्धः पञ्जरस्थो यथा खगः॥६॥५५।४४ ज्याच्या वासना नाहीशा झाल्या नाहीत, तो खरोखर सर्वधर्मपरायण व सर्वज्ञ जरी असला तरी पिंजन्यांतील पक्ष्याप्रमाणे सर्व बाजूंनी बद्धच आहे.
For Private And Personal Use Only
Page #399
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
३९४ योऽन्तःशीतलता यातो यो भावेषु न मज्जति ।
व्यवहारी न संमूढः स शान्त इति कथ्यते॥२।१३।७८ ज्याचे अंतःकरण तृप्त आहे, विषयांच्या पसान्यांत राहूनही जो विषयासक्त होत नाही, आणि व्यवहार करीत असूनही जो मोह. पावत नाही, तोच खरा शांत होय. ३९५ यो यादृक्क्लेशमाधातुं समर्थस्ताहगेव सः ।
अवश्यं फलमानोति प्रबुद्धोऽस्त्वज्ञ एव वा॥७१०२।३३. ज्ञानी असो अज्ञानी असो, जो ज्या प्रकारचे कष्ट करण्यास समर्थ असेल, त्याप्रकारचे फल त्याला अवश्य प्राप्त होते. ३९६ यो यो यथा प्रयतते स स तत्तत्फलैकभाक् ।
न तु तूष्णीं स्थितेनेह केनचित्प्राप्यते फलम् ॥२।७।१९ जो जो मनुष्य जसा जसा प्रयत्न करतो, तसे तसें फल त्याला प्राप्त होते; परंतु स्वस्थ बसून कोणालाही फल प्राप्त होत नाही. ३९७ यो यो यादृग्गुणो जन्तुः स तामेवैति संस्थितिम् ।
सदृशेष्वप्यजेषु श्वा न मध्ये रमते क्वचित् ॥५॥३२।२९ जो ज्या गुणाचा असेल तो त्या गुणाला योग्य अशा स्थितीतच राहातो. रंगारूपाने एखादा कुत्रा बकन्यासारखा असला तरी तो त्यांच्या कळपांत केव्हांही रमत नाही. ३९८ योऽस्मत्तातस्य कूपोऽयमिति कौपं पिबत्यपः। त्यक्त्वा गाङ्गं पुरःस्थं तं को न शास्त्यतिरागिणम् ॥२।१८।४ 'ही विहीर आमच्या वडिलांनी खणलेली आहे ' असें म्हणून आपल्या पुढे असलेले गंगेचे पाणी टाकून जो त्या विहिरीचेच पाणी पितो, त्या हट्टी मनुष्याला कोण बरें सांगणार ? ३९९ रम्यवस्तुक्षयायैव मूढानां जृम्भते पदम् ॥ ६।१२।२५ सुंदर वस्तूंचा नाश करण्यासाठीचमूढलोकांचे स्थान वाढत असते
For Private And Personal Use Only
Page #400
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४०० राग एव हि शोभायै
निर्गुणानां जडात्मनाम् ।। ७।१२०।१० (हा फुललेला पळसाचा वृक्ष केवळ रंगीत फुलांच्या योगानें राजासारखा शोभत आहे, त्याप्रमाणे ) खरी शोभा देणारे औदार्यादि गुण सूर्याच्या ठिकाणी नसल्यामुळे शोभा आणण्यासाठी त्यांना केवळ रंगीत वस्त्रालंकारच धारण करावे लागतात. ४०१ राजते हि पदार्थश्रीमहतामर्पणाच्छुभा ॥ ३॥१०४।३७ ___ एखादा मूल्यवान् चांगला पदार्थ योग्य असलेल्या थोर लोकांना अर्पण केला असतां शोभू लागतो. ४०२ राज्यानि संपदः स्फारा भोगो मोक्षश्च शाश्वतः ।
विचारकल्पवृक्षस्य फलान्येतानि राघव ॥२।१४।१० (श्रीवसिष्ठ म्हणतात ) राज्य, विपुलसंपत्ति, विषयोपभोग आणि मोक्ष ही सर्व विचाररूपी कल्पवृक्षाचींच फळे होत. ४०३ लोकनिन्यस्य दुर्जन्तोजीवितान्मरणं वरम् ॥५।४६।४३
लोकांच्या निंदेला पात्र झालेल्या दुष्ट पुरुषाने जगण्यापेक्षा मरून जाणे हेच श्रेयस्कर आहे. ४०४ लोकस्थितिरलङ्घया हि महतामपि मानद ॥५।६५।३०
(श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात ) महात्म्यांनासुद्धा लोकस्थितीचें उलंघन करता येत नाही. ४०५ वरं शरावहस्तस्य चाण्डालागारवीथिषु ।।
भिक्षार्थमटनं राम न मौख्य॑हतजीवितम् ॥ २।१३।२७ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, चांडालांच्या वस्तीतून हातांत थाळी घेऊन भीक मागण्याचा प्रसंग आला तरी पुरवला, परंतु मूर्खपणामुळे निष्फळ झालेलें जीवित कंठण्याचा प्रसंग नको.
For Private And Personal Use Only
Page #401
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ७९ wwwmmmmmmmmmmwwwwwwwwwa...www.unimawwwwwwwwwwwww ४०६ वरं कर्दमभेकत्वं मलकीटकता वरम् । ___ वरमन्धगुहाहित्वं न नरस्याविचारिता ॥२॥१४॥४६ चिखलांत बेडूक होऊन राहावे लागणे, घाणीमधील किडा बनावें लागणे किंवा एखाद्या गुहेमध्ये आंधळा सर्प होऊन रहावें लागणे चांगले, परंतु मनुष्य होऊनही विचाररहित असणे चांगले नाही. ४०७ वसनाशनमात्रेण तुष्टाः शास्त्रफलानि ये।
जानन्ति ज्ञानबन्धूंस्तान्विद्याच्छास्त्रार्थशिल्पिनः७।२११५ उत्तमवस्त्रे आणि भोजनादि पदार्थ मिळणे हेच शास्त्रज्ञानाचे फल असे समजून आनंद मानणारे लोक शास्त्रार्थाचे केवळ शिल्पी (कसबी) होत. ज्ञानी नव्हत. ( कारागीर लोकांनी तयार केलेल्या सुंदर वस्तूंचे भोक्ते दुसरे, कारागीर फक्त मजुरीचे मालक. तीच यांची त-हा.) ४०८ वसन्तो नन्दनोद्यानमिन्दुरप्सरसः स्मृताः।
इत्येकतः समुदितं संतोषामृतमेकतः ॥ ७४७४४४ वसंत ऋतु, नंदनवन, चंद्र, आणि अप्सरा या सर्वांपासून होणारें सुख एका संतोषरूपी अमृतापासून मिळतें. ४०९ वस्त्वल्पमप्यतिबृहल्लघुसत्त्वो हि मन्यते ॥ ७।१८।२३ ___ कोणताही प्राणी आपल्या बुद्धिसामर्थ्याप्रमाणे वस्तूला महत्त्व देतो. कमी बुद्धीचा मनुष्य अतिशय मूल्यवान पदार्थाला कमी किंमतीचा समजून क्षुद्रवस्तूला फार महत्त्व देतो. (उंदीर रत्नादिकांना तुच्छ मानून धान्याचे कण गोळा करतात. तसेंच खेळणारे मूल मातीचें नवीन चित्र घेण्यासाठी जवळचा मूल्यवान दागिना देण्यासही तयार होते.) ४१० वस्त्वस्थानगतं सर्व शुभमप्यशुभं भवेत् ॥७११६।५२ कोणतीही शुभवस्तु अयोग्य ठिकाणी राहिल्यास ती अशुभ होते.
For Private And Personal Use Only
Page #402
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४११ वातान्तर्दीपकशिखालोलं जगति जीवितम् ।
तडित्स्फुरणसंकाशा पदार्थश्रीर्जगत्रये ॥ १।२८।११ वान्याच्या झोतांत सांपडलेल्या दिवटीच्या ज्योतीप्रमाणे जगांतील जीविताची स्थिति क्षणभंगुर आहे. त्रैलोक्यांतील सर्व पदार्थाची शोभा विजेच्या प्रकाशाप्रमाणे चंचल आहे. ४१२ वासनातन्तुबद्धा ये आशापाशवशीकृताः।
वश्यतां यान्ति ते लोके रज्जुबद्धाः खगा इव ॥४।२७।१८ जे आशापाशांत गुरफटले जाऊन वासनातंतूंनी बद्ध झालेले असतात, ते जाळ्यांत अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे कोणालाही सहज जिंकतां येतात. ४१३ वासनातानवं राम मोक्ष इत्युच्यते बुधैः ।
पदार्थवासनादाढ्य बन्ध इत्यभिधीयते ॥ २।२।५ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, वासना क्षीण होत जाणे या स्थितीलाच ज्ञाते पुरुष मोक्ष असें म्हणतात. व पदार्थाबद्दलची वासना दृढ होत जाणे हाच बंध होय असे त्यांचे मत आहे. ४१४ वासनावागुराकृष्टो मनोहरिणको नृणाम् ।
परां विवशतामेति संसारवनगुल्मके ॥ ३॥११०।११ . वासनारूपी जाळ्यांत सांपडलेलें मनुष्याचें मनोरूपी हरिण संसाररूपी वनांतील झाडींत अतिशय विव्हल होऊन जाते. ४१५ विचारसंतोषशमसत्समागमशालिनि ।।
प्रवर्तन्ते श्रियो जन्तौ कल्पवृक्षाश्रिते यथा॥२।१६।२४ कल्पवृक्षाचा आश्रय केला म्हणजे सर्व त-हेचें ऐश्वर्य प्राप्त होते याप्रमाणे विचार, संतोष, शम आणि सत्समागम यांनी युक्त असलेल्या मनुष्याला सर्व ऐश्वर्य प्राप्त होते.
For Private And Personal Use Only
Page #403
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४१६ विचारः सफलस्तस्य विज्ञेयो यस्य सन्मतेः । , दिनानुदिनमायाति तानवं भोगगृध्नुता ॥४।१८१६५ __ चांगली बुद्धि असलेल्या ज्या पुरुषाचा विषयोपभोगांचा लोभ दिवसेंदिवस कमी होत असतो, त्याचाच आत्मविषयक विचार सफल होत जातो. ४१७ विचारोदयकारिण्या धिया व्यवहरन्ति ये। __फलानामत्युदाराणां भाजनं हि भवन्ति ते ॥२॥१४॥१२
जे लोक विचार करणाऱ्या बुद्धीने व्यवहार करतात, ते अतिशय उत्कृष्ट फळ मिळविण्याला पात्र होतात. ४१८ विद्राविते शत्रुजने समस्ते
समागतायामभितश्च लक्ष्म्याम् । सेव्यन्त एतानि सुखानि यावत्
तावत्समायाति कुतोऽपि मृत्युः ॥ १।२७।२० सर्व शत्रूचें पारिपत्य करून, सर्व प्रकारची संपत्ति मिळवून मनुष्य अनेक सुखांचा अनुभव घेत आहे, तोच मृत्यु अचानक येऊन त्याच्यावर झडप घालतो. ४१९ विना पुरुषयत्नेन दृश्यते चेजनार्दनः ।
मृगपक्षिगणं कस्मात्तदासौ नोद्धरत्यजः॥५॥४३॥१५ मनुष्याने स्वतः उद्योग केल्यावांचून जर त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकले असते, तर पशु, पक्षी इत्यादिकांचा सुद्धा उद्धार त्याने कां केला नसता ? ४२० वियोगायैव संयोगाः ॥ ६।१२६।२८ वियोग होण्यासाठीच संयोग होत असतात.
यो. वा. ६
For Private And Personal Use Only
Page #404
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४२१ विविधवनकुसुमकेसरधवलवपुहंस इव दृष्टः। काकः कृमिकुलकवलं क्लिनमथो कवलयन् ज्ञातः७११६३६५
वनांतील नानाप्रकारच्या पुष्पपरागांनी शुभ्र झालेला कावळा हंसासारखा जरी वाटला, तरी किड्यांनी भरलेलें व माखून गेलेले मांस खाण्यासाठी तो उचलून घेत आहे असें दिसल्याबरोबर हा कावळाच आहे अशी खात्री झाली. ४२२ विवेकोऽस्ति वचस्येव चित्रेऽग्निरिव भास्वरः।
यस्य तेनापरित्यक्ता दुःखायैवाविवेकिता॥४।१८।६७ ज्याचा विवेक बोलण्यांतच मात्र आहे, त्याला चित्रांतील अग्नीप्रमाणे विवेकाचा मुळीच उपयोग होत नाही. त्याच्या ठिकाणी अविवेकच असल्यामुळे त्यापासून दुःख होतें.. ४२३ विश्वामित्रेण मुनिना दैवमुत्सृज्य दूरतः।
पौरुषेणैव संप्राप्तं ब्राह्मण्यं राम नान्यथा ॥२।८।२० (श्रीवसिष्ठ म्हणतात ) हे रामा, विश्वामित्र मुनींनी दैव दूर बाजूला झुगारून देऊन केवळ पौरुषाच्याच बलावर ब्राह्मण्य प्राप्त करून घेतले. ४२४ विषं विषयवैषम्यं न विषं विषमुच्यते ।
जन्मान्तरना विषया एकदेहहरं विषम् ॥ १।२९।१३ ज्याला आपण विष म्हणून म्हणतो, तें वास्तविक विष नसून विषय हेच खरें विष होय. विषप्राशन केले असतां एका देहाचा नाश होतो, परंतु विषयांचे सेवन हे अनेक जन्मांचा नाश करतें. ४२५ विषयान्प्रति भोः पुत्र सर्वानेव हि सर्वथा । ___ अनास्था परमा ह्येषा सा युक्तिमनसो जये ॥५।२४।१७
(विरोचन बलीला म्हणतो) हे पुत्रा, सर्व विषयांसंबंधानें पूर्णपणे अनास्था असणे हीच मनोजयाची सर्वोत्कृष्ट युक्ति आहे.
For Private And Personal Use Only
Page #405
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानिं
*४२६ वृक्षाः प्रतिवनं सन्ति नित्यं सफलपल्लवाः । नत्वपूर्वचमत्कारो लवङ्गः सुलभः सदा ॥ १।३३।४१
प्रत्येक वनामध्यें फळांनीं व फुलांनीं भरलेले असे शेंकडों वृक्ष आढळून येतात. परंतु आश्चर्यकारक लवंगवृक्ष एखादाच आढळतो.
८३
४२७ व्याचष्ट यः पठति च शास्त्रं भोगाय शिल्पिवत् ।
यतते न त्वनुष्ठाने ज्ञानबन्धुः स उच्यते ।। ७।२१।३
कारागीर द्रव्य मिळविण्यासाठीं प्रयत्न करतो, त्याप्रमाणें -उपभोग मिळविण्यासाठीं जो शास्त्र पढतो व त्याचें व्याख्यान करतो, पण स्वतः त्याप्रमाणें वागण्याविषयीं झटत नाहीं, तो ज्ञानबंधु म्हणजे नांवाचाच ज्ञानी होय.
४२८ शतादेकतमस्यैव सर्वोदारचमत्कृतिः ।
ईप्सितार्थापणैकान्तदक्षा भवति भारती || १।३३।३२
शेंकडों वक्त्यांमध्ये एकाद्याचेंच भाषण सहृदय मनुष्यांच्या अंतःकरणांत विस्मय उत्पन्न करणारे आणि इच्छिलेल्या अर्थाचा निश्चयानें बोध करणारें असतें.
४२९ शमेनासाद्यते श्रेयः शमो हि परमं पदम् ॥। २।१३।५२ शमानेंच मोक्ष प्राप्त होतो. व शम हेंच श्रेष्ठपद आहे. ४३० शरदम्बुधरच्छायागत्वर्यो यौवनश्रियः ।
आपातरम्या विषयाः पर्यन्तपरितापिनः ।। ७।९३।८४
शरतूंतील मेघांच्या छायेप्रमाणें तारुण्याची शोभा क्षणिक आहे, आणि शब्दादिविषय वरवर सुखदायक खरे; परंतु शेवटीं अत्यंत दुःखदायक होत.
For Private And Personal Use Only
Page #406
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४३१ शरीरमरुतापोत्यां युवतामृगतृष्णिकाम् ।
मनोमृगाः प्रधावन्तः पतन्ति विषयावटे ॥ १।२०१३२ शरीर में रखरखीत वाळवंट आहे, त्यांतील तापाने उत्पन्न झालेल्या तारुण्यरूपी मृगजळाकडे मनोरूपी हरिण धांवत जातात; आणि शेवटी विषयांच्या खड्डयांत जाऊन पडतात. ४३२ शस्त्राणि दयिताङ्गानि लग्नान्यङ्गे निरम्बरे ।
योबुध्यमानः सुसमः स परस्मिन्पदे स्थितः॥७/११०१ ज्याच्या उघड्या आंगावर झालेले शस्त्रांचे प्रहार आणि स्त्रीच्या अवयवांचा स्पर्श ही दोन्ही ज्याला सारखींच वाटतात, तो ब्रह्मपदाला पोचला असे समजावें. ४३३ शास्त्रं सुबोधमेवेदं सालंकारविभूषितम् ।।
काव्यं रसमयं चारु दृष्टान्तः प्रतिपादितम् ॥२।१८।३३ हा योगवासिष्ठ शास्त्रीय ग्रंथ अतिशय सुबोध आहे, अनेक अलंकार व पुष्कळ दृष्टांत यांच्या योगाने एखाद्या काव्याप्रमाणे. रम्य व सरस बनला आहे. ४३४ शास्त्रसज्जनसंसर्गः प्रज्ञा पूर्व विवर्धयेत् ।
सेकसंरक्षणारम्भैः फलप्राप्तौ लतामिव ॥५।१२।२४ एखाद्या वेलीला चांगली फळे यावी असे वाटत असेल, तर तिला पाणी घालून तिचे रक्षण करावे लागते, त्याप्रमाणे कार्य सिद्धीस नेणाऱ्या पुरुषाने शास्त्र आणि सत्समागम यांच्या योगाने प्रथम आपली बुद्धि वाढवावी. ४३५ शिखी वार्यपि नादत्ते भूमे ले बलादहिम् ।
दौरात्म्यं तन्न जाने किं सर्पस्य शिखिनोऽथवा॥७११८।१९ मोर भूमीवरील पाणीही पीत नाही पण साला मात्र बलात्काराने खाण्यासाठी उचलून नेतो, तेव्हां याठिकाणीं अंतःकरणाचा दुष्टपणा सर्पाचा आहे किंवा मोराचा आहे ते समजत नाही.
For Private And Personal Use Only
Page #407
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४३६ शिष्यप्रज्ञैव बोधस्य कारणं गुरुवाक्यतः॥६।१२८।६३
ज्ञान होण्याला गुरुवाक्यापेक्षा शिष्याची बुद्धिच अधिक कारण आहे. ४३७ शुद्धेऽल्पोऽप्युपदेशो हि निर्मले तैलबिन्दुवत् ।
लगत्युत्तानचित्तेषु नादशे इव मौक्तिकम् ॥ ७।५।३ तेलाचा थेंब निर्मल वस्त्रावर पडला असतां आंत शिरून जसा पसरतो तसा थोडाही उपदेश शुद्ध चित्तामध्ये चांगल्या रीतीने बिंबतो, परंतु चित्त गंभीर नसल्यास आरशांत पडलेल्या मोत्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे उपदेश ठसत नाही. ४३८ शुभवासनया चेतो महत्या जायते महत् ।
भवतीन्द्रमनोराज्य इन्द्रतास्वप्नभाङ्नरः ॥४॥३५।३० शुभ वासनेमुळे मन शुभ होते, आणि मोठ्या वासनेमुळे मनही मोठे होते. 'मी इंद्र होईन ' असें मनोराज्य करणारा स्वप्नामध्ये इंद्र होतो. ४३९ शुभाशुभाभ्यां मार्गाभ्यां वहन्ती वासनासरित् ।
पौरुषेण प्रयत्नेन योजनीया शुभे पथि ॥२।९।३० वासनारूपी नदी शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही मार्गांनी वाहत असते. आपल्या वासनेचा प्रवाह अशुभमार्गाने जात आहे असे दिसून आल्यास प्रयत्न करून तो प्रवाह शुभ मार्गाकडे वळवावा. ४४० शून्यमाकीर्णतामेति मृतिरप्युत्सवायते ।
आपत्संपदिवाभाति विद्वञ्जनसमागमे ॥ २१६।३ विद्वान लोकांच्या सहवासांत असणा-याला एखादें शून्यस्थानही मनुष्यांनी गजबजल्याप्रमाणे दिसते, मृत्युही उत्सवाप्रमाणे आनंददायक वाटतो. व आपत्तीलाही त्याच्या दृष्टीने संपत्तीचे स्वरूप प्राप्त होते.
For Private And Personal Use Only
Page #408
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ४४१ शैशवं वार्धकं ज्ञेयं तिर्यक्त्वं मृतिरेव च ।
तारुण्यमेव जीवस्य जीवितं तद्विवेकि चेत् ॥७१६२।२१ बाळपण आणि म्हातारपण या दोन्ही अवस्थांत ज्ञान प्राप्त होत नसल्यामुळे त्या पशुपक्ष्यांप्रमाणे व्यर्थ होत. त्या मरणतुल्यच आहेत. प्राण्याचे खरें जीवित म्हणजे तारुण्य होय. परंतु ते देखील विचार करणारे असेल तर. ४४२ शैशवं च मनश्चैव सर्वास्वेव हि वृत्तिषु ।
भ्रातराविव लक्ष्यते सततं भङ्गुरस्थिती ॥ १।१९।१६ बाळपण आणि मन या दोहोंचे स्वरूप सारखेंच चंचल आहे,. यावरून सर्व वृत्तींमध्ये ही दोन्ही भावंडेंच आहेत, असे वाटते. ४४३ श्मशानमापदं दैन्यं दृष्ट्वा को न विरज्यते ।
तद्वैराग्यं परं श्रेयः स्वतो यदभिजायते ॥ १।२८ स्मशानांत गेल्यानंतर किंवा आपत्ति आणि दैन्य प्राप्त झाल्यानंतर कोणाला वैराग्य उत्पन्न होत नाही ? परंतु असलें वैराग्य खरे नव्हे, स्वतः विचार करून जें वैराग्य उत्पन्न होते, तेच अत्यंत श्रेयस्कर होय. ४४४ श्रीमानजननिन्द्यश्च शूरश्चाप्यविकत्थनः ।
समदृष्टिः प्रभुश्चैव दुर्लभाः पुरुषास्त्रयः ॥ १।१३।११ लोकांच्या निंदेला पात्र न झालेला श्रीमंत, स्वतः प्रौढि न सांगणारा शूर, आणि सर्वत्र समदृष्टि असणारा राजा हे तीन पुरुष या जगांत दुर्लभ आहेत. ४४५ श्रुत्वा स्पृष्ट्वा च दृष्ट्वा च भुक्त्वा घ्रात्वा शुभाशुभम् ।
न हृष्यति ग्लायति यः स शान्त इति कथ्यते।।२।१३।८२ चांगल्या किंवा वाईट गोष्टी ऐकून, पाहून, तसेंच चांगल्या किंवा वाईट पदार्थांना स्पर्श करून, त्यांचा वास घेऊन, किंवा उपभोग घेऊन ज्याला हर्ष किंवा विषाद उत्पन्न होत नाही, त्यालाच शांत असे म्हणतात.
For Private And Personal Use Only
Page #409
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४४६ संयोगेच वियोगेच महान्तोहि महाशयाः॥६।११।११
पुत्र, मित्र इत्यादिकांचा समागम किंवा वियोग झाला असतां महात्मे पुरुष मेरुपर्वताप्रमाणे स्थिर असतात. ४४७ संशान्ताहंकृतेर्जन्तोर्मोगा रोगा महामते ।
न स्वदन्ते सुतृप्तस्य यथा प्रतिविषा रसाः॥४॥३३॥६८ (श्रीवसिष्ठ रामाला म्हणतात. ) भोजन करून अत्यंत तृप्त झालेल्या मनुष्याला उत्तमोत्तम पक्वान्नेही विषाप्रमाणे वाटतात; त्याप्रमाणे अहंकार नाहीसा होऊन आत्मज्ञानाने तृप्त झालेल्या मनुष्याला विषयोपभोग रोगांप्रमाणे वाटतात. . ४४८ संशान्ते चित्तवेताले यामानन्दकलां तनुः ।
याति तामपि राज्येन जागतेन न गच्छति ॥४।१५।२० चित्तरूपी वेताळ शांत झाला असतां, शरीराला प्राप्त होणाऱ्या सुखाच्या एका कलेची म्हणजे सोळाव्या हिश्शाची बरोबरी सर्व जगताचे राज्य मिळाल्याने होणा-या आनंदालाही करता येणार नाही. ४४९ संसार एव दुःखानां सीमान्त इति कथ्यते ।
तन्मध्यपतिते देहे सुखमासाद्यते कथम् ॥ ५।९।५२ संसार म्हणजे दुःखाची पराकाष्ठा असें सत्पुरुष सांगतात. तेव्हां अशा संसारांत पडलेल्या देहामध्ये सुखप्राप्ति कोठून होणार ? ४५० संसारविषवृक्षोऽयमेकमास्पदमापदाम् ।
अज्ञं संमोहयेन्नित्यं मौख्यं यत्नेन नाशयेत् ॥२।११।६ संसार हा एक विषवृक्ष असून त्याच्यापासून सर्व त-हेच्या आपत्ति उत्पन्न होतात. अज्ञमनुष्याला हा संसार मोह उत्पन्न करतो, यासाठी प्रयत्न करून अज्ञानाचा नाश केला पाहिजे.
For Private And Personal Use Only
Page #410
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४५१ संसारस्यास्य दुःखस्य सर्वोपद्रवदायिनः।
उपाय एक एवास्ति मनसः स्वस्य निग्रहः ॥४।३५/२ सर्व प्रकारे उपद्रव होणान्या अशा या संसारदुःखाचा नाश होण्याला स्वतःच्या मनाचा निग्रह हाच काय तो एक उपाय आहे. ४५२ संसारात्तरणे जन्तोरुपायो ज्ञानमेव हि ॥२।१०।२२
संसारांतून तरून जाण्याला ज्ञान हाच काय तो एक उपाय आहे. ४५३ संसाराम्बुनिधावस्मिन्वासनाम्बुपरिप्लुते।।
ये प्रज्ञानावमारूढास्ते तीणा बुडिताः परे ॥४।४६।२२ वासनारूपी पाण्याने ओतप्रोत भरलेल्या या संसारसमुद्रांत जे बुद्धिरूपी नावेचा आश्रय करतात, तेच या समुद्राच्या पलीकडे तरून जातात, इतर बुडून जातात. . ४५४ संकटे विस्मरत्येव जनो गौरवसत्क्रियाम् ।।३।७४।२५
कोणीही झाला तरी संकटाचे वेळी आदर सत्कार करणे विसरून जातोच. ४५५ संकल्पः परमो बन्धस्त्वसंकल्पो विमुक्तता॥३॥११४।२४
संकल्प हाच मोठा बंध असून असंकल्प हाच खरा माक्ष आहे. ४५६ सज्जनाशयनीकाशं त्यक्त्वा बही महत्सरः ।
पिबत्यम्ब्वभ्रनिष्ठयतं मन्ये तन्नतिभीतितः ७११८४२० (सहचर राजाला म्हणतो) सज्जनांच्या अंतःकरणाप्रमाणे स्वच्छ असलेले मोठे सरोवर सोडून, मोर मेघांतून गळलेले पाणी पितो, याचे कारण आपले मस्तक वाकवावे लागेल, हेच असावे असे वाटते. ४५७ सजनो हि समुत्तार्य विपद्भयो निकटस्थितम् ।
नियोजयति संपत्सु स्वालोकष्विव भास्करः ॥७४७।३० सूर्य स्वतःच्या प्रकाशाने इतरांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे सज्जन आपल्याजवळ असलेला कोणी विपत्तीत पडल्यास त्याला विपत्तीपासून सोडवून चांगली स्थिति प्राप्त करून देतात.
For Private And Personal Use Only
Page #411
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४५८ सतां साप्तपदं मैत्रम् ॥ ७॥२१६।४ . सज्जनांच्या मागून सात पावलं चालल्याने त्यांच्याशी सख्य होते. ४५९ सतो हि मार्जनक्लेशो नासतस्तु कदाचन ॥ ३॥६०२
जी सद्वस्तु आहे ती नाहीशी करणे शक्य नाही, परंतु जी असद्वस्तु आहे तिचा बाध करण्याला मुळीच क्लेश पडत नाहीत. ४६० सत्यं मनोरमाः कामाः सत्यं रम्या विभूतयः।
किंतु मत्ताङ्गनापाङ्गभङ्गलोलं हि जीवितम्॥७९३।७९ विषय आणि ऐश्वर्य ही रमणीय आहेत, असें धरून चाललों, तथापि जीवित हेच मुळी मत्त स्त्रियांच्या कटाक्षा इतकें चंचल आहे याला काय करणार? ४६१ सत्यां प्रज्ञामहानावि विवेके सति नाविके।
संसारसागरादस्माद्यो न तीर्णो धिगस्तु तम् ॥५/७६।१३ बुद्धिरूपी मोठी नौका व विवेकरूपी नावाडी असतां, या संसारसागराच्या पैल तीराला जो जात नाही, त्याला धिक्कार असो. ४६२ सन्तोऽतीतं न शोचन्ति भविष्यच्चिन्तयन्ति नो।
वर्तमानं च गृह्णन्ति कर्म प्राप्तमखण्डितम् ।। ६।१२४।१३ सज्जन भूतकालाच्या गोष्टीविषयीं शोक करीत बसत नाहीत व पुढील कार्याबद्दलही चिंता करीत नाहीत, तर वर्तमानकाळी प्राप्त झालेले कर्म मात्र सतत करीत राहतात. ४६३ संतोषः परमो लाभः सत्सङ्गः परमा गतिः।।
विचारः परमं ज्ञानं शमो हि परमं सुखम् ॥२।१६।१९ संतोष हा अत्यंत श्रेष्ठ लाभ, सत्संग ही परमगति, विचार हैं परमज्ञान, आणि शम हेच परम सुख होय.
For Private And Personal Use Only
Page #412
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४६४ संतोषः साधुसङ्गश्च विचारोऽथ शमस्तथा । ___एत एव भवाम्भोधावुपायास्तरणे नृणाम् ॥२।१६।१८
संतोष, सत्संग, विचार आणि शांति हीच काय ती मनुष्यांना संसाररूपी सागरांतून तारून नेणारी मुख्य साधने आहेत. ४६५ संतोषो हि परं श्रेयः संतोषः सुखमुच्यते ॥ २।१५।१
संतोष हाच मोक्ष, व संतोष हेच आत्यंतिक सुख होय. ४६६ समया स्वच्छया बुद्धया सततं निर्विकारया ।
__ यथा यत्क्रियते राम तददोषाय सर्वदा ॥ ७१९९/७
सम, निर्मल व निर्विकार बुद्धीनें जें जें करावें तें तें नेहमी निर्दोषच असते. ४६७ समुद्रस्येव गाम्भीर्य धैर्य मेरोरिव स्थितम् ।
अन्तःशीतलता चेन्दोरिवोदेति विचारिणः॥२।१८।१८ समुद्राचे गांभीर्य, मेरूचे धैर्य व चंद्राची शीतलता ही विचारी मनुष्याच्या अंतःकरणाला प्राप्त होतात. ४६८ संपदः प्रमदाश्चैव तरङ्गोत्तुङ्गभङ्गुराः ।
कस्तास्वहिफणच्छत्रच्छायासु रमते बुधः ॥ ७४४७१४९ संपदा आणि प्रमदा म्हणजे तरुण व सुंदर स्त्रिया या पाण्यावरील मोठ्या तरंगाप्रमाणे क्षणभंगुर आहेत. सर्पाच्या फणांच्या छायेप्रमाणे असलेल्या संपदा आणि प्रमदा यांच्या ठिकाणी कोणता शाहाणा मनुष्य रममाण होईल ? ४६९ संभवत्यङ्ग जगति न बीजेन विनाकुराः ॥ ६।९४१६२
(कुंभमुनि शिखिध्वज राजाला म्हणतात ) या जगांत बीजावांचून अंकुर संभवत नाही.
For Private And Personal Use Only
Page #413
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४७० सर्वकर्माणि संत्यज्य कुर्यात्सजनसङ्गमम् । ___ एतत्कर्म निराबाधं लोकद्वितयसाधनम् ॥ ७९८१२३
सर्व कर्मे सोडून प्रथम सज्जनांचा सहवास करावा. सत्समागम हा उपाय मुळीच त्रासदायक नसून इहलोक व परलोक साधून देणारा आहे. ४७१ सर्व काले हि शोभते ॥ ३।६७६१
सर्व गोष्टी योग्यवेळीच शोभत असतात. ४७२ सर्वज्ञोऽपि बहुज्ञोऽपि माधवोऽपि हरोऽपि च । __अन्यथा नियतिं कर्तुं न शक्तः कश्चिदेव हि ॥५।८९।२६ कोणी एखादा सर्वज्ञ असो, बहुज्ञ असो, स्वतः भाग्यवान् विष्णु असो, किंवा शंकर असो नियतीला म्हणजे सृष्टिनियमाला बदलण्यास कोणीही समर्थ नाही. ४७३ सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
यदा पश्यत्यभेदेन तदा जीवो विमुच्यते ॥६।१२८१४९ सर्वभूतांमध्ये आत्म्याला व आत्म्यामध्ये सर्व भूतांना हा जीव जेव्हां अभेदाने पाहतो तेव्हां तो मुक्त होतो. ४७४ सर्वमेवेह हि सदा संसारे रघुनन्दन ।
सम्यक्प्रयुक्तात्सर्वेण पौरुषात्समवाप्यते ॥२१४८ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, या संसारांत योग्य दिशेने प्रयत्न केला असतां सर्वांना नेहमी वाटेल ती वस्तु प्राप्त करून घेता येते. ४७५ सर्व ब्रह्मेति यो ब्रूयादप्रबुद्धस्य दर्मतेः।
स करोति सुहृवृत्त्या स्थाणोर्दुःखनिवेदनम् ॥६।४९।२० दुष्टबुद्धीच्या मूर्ख मनुष्याला ‘हे सर्व ब्रह्मच आहे' असें जो सांगतो, तो, जड खांबाला आपला मित्र समजून आपले दुःख सांगतो; असेंच म्हटले पाहिजे.
For Private And Personal Use Only
Page #414
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९२
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४७६ सर्वस्य जन्तुजातस्य सर्ववस्त्ववभासने ।
सर्वदेवैक एवोच्चैर्जयत्यभ्यासभास्करः ॥७६७।४१ __ सर्व प्राण्यांना कोणतीही वस्तु सर्वदा भासविणारा एक अभ्यासरूपी सूर्यच सर्वोत्कृष्ट आहे. ४७७ सर्वस्य बीजे संत्यक्ते सर्व त्यक्तं भवत्यलम् ॥६।९३३३५ . सर्वांचे बीज टाकले असतां सर्वांचा त्याग पूर्णपणे केल्यासारखा होतो. ४७८ सर्वस्याः सरितो वारि प्रयात्यायाति चाकरात् ।
देहनद्याः पयस्त्वायुर्यात्येवायाति नो पुनः।।७।९३।४८ सर्व नद्यांचे पाणी जरी वाहून जात असले, तरी ते पुनः मेघ, पर्वत इत्यादिकांपासून येत असते. परंतु या देहरूपी नदीतील आयुष्यरूपी पाणी एकसारखें जात मात्र असते, पण त्यांत दुसरी कडून भर पडत नाही. ४७९ सर्वः स्वसंकल्पवशाल्लघुर्भवति वा गुरुः ॥ ३७०१३०
जो तो प्राणी आपल्या संकल्पाच्या योगाने उच्च किंवा नीच स्थिति प्राप्त करून घेत असतो. ४८० सर्वे क्षयान्ता निचयाः पतनान्ताः समुच्छ्रयाः।
संयोगा विप्रयोगान्ताः सर्वे संसारवमनि ॥५।८६५५ या संसारांत सर्व संग्रहांचा शेवटी नाश होतो, उंचावर चढलेले अखेरीस पतन पावतात, आणि ज्यांचा संयोग झाला असेल, त्या सर्वांचा शेवटी वियोग होतो. ४८१ सर्वेषामेव धर्माणां कर्मणां शर्मणामपि ।
पण्डितः पुण्डरीकाणां मार्तण्ड इव मण्डनम् ।। ७।१४३।१ आकाशाचे भूषण असलेला सूर्य ज्याप्रमाणे कमलांना विकसित करतो, त्याप्रमाणे सभेचे भूषण असलेला पंडित सर्व धर्माचा, कर्माचा, आणि सुखांचा निर्णय करतो.
For Private And Personal Use Only
Page #415
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
~~
~~~~~~~~
४८२ सर्वेषु सुखदुःखेषु सर्वासु कलनासु च ।
मनःकते मनो भोक्त मानसं विद्धि मानवम्।।३।११५।२४ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे रामा, सर्व सुखदुःखांचे आणि कल्पनांचे कर्तृत्व आणि भोक्तृत्व मनाकडे आहे. यासाठी मन म्हणजेच मनुष्य हे लक्षात ठेव. ४८३ सर्वैव लोकयात्रेयं प्रोता तृष्णावरत्रया ।
रज्जुबन्धाद्विमुच्यन्ते तृष्णाबन्धान केचन॥५।१५।२३ हे सर्व लोकसमुदाय तृष्णारूपी चामड्याच्या वादीमध्ये ओवले गेले आहेत. इतर कसल्याही दोरीने बद्ध झालेला मनुष्य त्या बंधापासून मुक्त होऊ शकतो, परंतु तृष्णेच्या बंधांतून कोणीही सहसा मुक्त होऊ शकत नाही. ४८४ सलिलं स्थलतां याति स्थलीभवति वारिभूः।
विपर्यस्यति सर्व हि सकाष्ठाम्बुतृणं जगत् ॥ १२२८९ ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी काही काळाने भूमि दिसते; व ज्या ठिकाणी भूमि असते, त्या ठिकाणी काही दिवसांनी पाणी दिसू लागते. अशारीतीने काष्ठ, उदक आणि तृण यांनी युक्त असलेले जग कालमानाने बदलत असते. ४८५ सहस्रेभ्यः सहस्रेभ्यः कश्चिदुत्थाय वीर्यवान् ।
भिनत्ति वासनाजालं पञ्जरं केसरी यथा ॥ ७/१९४१३९ ज्याप्रमाणे सिंह पिंज-यांतून बाहेर पडतो, त्याप्रमाणे हजारों लोकांतील एखादाच सामर्थ्यवान् पुरुष वासनेचे जाळें तोडून मोकळा होतो. ४८६ साधुसंगतयो लोके सन्मार्गस्य च दीपिकाः॥२॥१६९
या जगामध्ये साधूंचा समागम हा सन्मार्ग दाखविणारा दिवा आहे.
For Private And Personal Use Only
Page #416
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ४८७ साधूपदिष्टमार्गेण यन्मनोऽङ्गविचेष्टितम् ।
तत्पौरुषं तत्सफलमन्यदुन्मत्तचेष्टितम् ॥ २।४।११ सत्पुरुषांनी आंखून दिलेल्या मार्गाने काया, वाचा आणि मन यांनी जें कर्म केले जाते, तेच पौरुष होय. अशा पौरुषानेच फलप्राप्ति होते. याशिवाय केलेले इतर कर्म उन्मत्त मनुष्याच्या कर्माप्रमाणे निष्फल होते. ४८८ सिंहवत्सर्ववेगेन पतन्त्यर्थे किलार्थिनः ॥ ३१७८०६ __ कार्य साधणारे लोक आपल्या कार्यावर सिंहाप्रमाणे एकदम झडप घालीत असतात. ४८९ सीमान्तं सर्वदुःखानामापदां कोशमुत्तमम् ।
बीजं संसारवृक्षाणां प्रज्ञामान्धं विनाशयेत् ॥५।१२।२७ सर्व दुःखांची पराकाष्ठा, आपत्तीचे मोठे भांडार, व संसारवृक्षाचें बीज, अशा प्रकारच्या बुद्धिमांद्याचा नाश करावा. ४९० सुनिर्मलापि विस्तीर्णा पावन्यपि हि यौवने ।
मतिः कलुषतामेति प्रावृषीव तरङ्गिणी ॥ १।२०।१८ पावसाळ्यांत नदीचे पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे बुद्धि कितीही निर्मल, उदार आणि शुद्ध असली, तरी ती तारुण्यांत मलिन होते. ४९१ सुभगाः सुलभारोहाः फलपल्लवशालिनः । __ जायन्ते तरवो देशे न तु चन्दनपादपाः॥१॥३३॥४० दिसण्यांत सुंदर आणि चढण्याला सुलभ असे फल आणि पल्लव यांनी युक्त असलेले वृक्ष सर्वत्र दिसून येतात; परंतु चंदनाचे वृक्ष मात्र विरळा होत.
For Private And Personal Use Only
Page #417
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
४९२ सुरज्ज्वेव बलीवर्दो बध्यते जन्तुरास्थया ॥६॥२८॥६४
दोरीने बैल बांधला जातो त्याप्रमाणे आशेच्या योगानें प्राणी बद्ध होतो. ४९३ सुलभो दुर्जनाश्लेषो दुर्लभः सत्समागमः ॥ १।२६।२१
दुर्जनांची संगति सुलभ आहे, परंतु सत्समागम मात्र दुर्लभ आहे. ४९४ सुविरक्तं मुनेश्वेतो रक्तं च विषयार्थिनः ।
रमयन्ति समं रम्या विजना वनभूमयः ॥७१२०।२९ मुनिजनांचे विरक्त चित्त आणि कामी पुरुषांचे विषयासक्त चित्त या दोहोंना एकांत असलेल्या रम्य वनभूमि सारख्याच आनंद देतात. ४९५ सुसाध्यः करटोद्भेदो मत्तैरावणदन्तिनः ।
नोत्पथप्रतिपन्नानां स्वेन्द्रियाणां विनिग्रहः॥७६४० इंद्राच्या मत्त ऐरावत हत्तीचे गंडस्थळ सहज फोडतां येईल; परंतु भलत्याच मार्गाने जाणाऱ्या स्वतःच्या इंद्रियांचा निग्रह करणे सुलभ नाही. ४९६ सौहार्द सुजनानां हि दर्शनादेव वर्धते ॥ ३॥८२३७
चांगल्या लोकांची भेट होतांच मैत्री वाढत असते. ४९७ सौहार्देन प्रवृत्तस्य को वाक्यं नाभिनन्दति ॥३॥८२१४८
प्रेमाने बोलणान्याच्या भाषणाचे कोण बरे कौतुक करणार नाही ? ४९८ स्त्रीलोचनैस्तडित्पुझेालाजालैस्तरङ्गकैः ।
चापलं शिक्षितं ब्रह्मञ्छशवाक्रान्तचेतसः ॥ १।१९।१५ (राम श्रीवसिष्ठांना म्हणतो) स्त्रियांचे नेत्र, विद्युल्लता, अग्नीच्या ज्वाला, आणि समुद्रावरील लाटा यांनी बाल्यदशेकडूनच चांचल्याचे शिक्षण घेतले आहे, असे वाटते.
For Private And Personal Use Only
Page #418
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
ramin
४९९ स्फटिका प्रतिबिम्बेन यथा याति न रञ्जनम् ।
तज्ज्ञः कर्मफलेनान्तस्तथा नायाति रञ्जनम् ॥६।१२२।६ स्फटिकमणि प्रतिबिंबाच्या योगाने जसा रंगीत होत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य अंतःकरणांत कर्मफलाच्या योगाने काहीएक विकार पावत नाही. ५०० स्वधर्मेण च हिंसैव महाकरुणया समा ॥ ३८२।४६
स्वधर्माप्रमाणे केलेली हिंसा ही मोठ्या दयेसारखीच आहे. ५०१ स्वया वासनया लोको यद्यत्कर्म करोति यः ।
स तथैव तदामोति नेतरस्येह कर्तृता ॥ ४।१३।११ जगामध्ये आपल्या वासनेप्रमाणे लोक जें जें कर्म करितात, त्या त्या कर्माचेच फळ ते भोगतात, त्यांत इतरांच्या कर्तृत्वाचा मुळीच संबंध नाही. ५०२ स्ववासनानुसारेण सर्व आस्पदमीहते ॥ ३७३।२९
प्रत्येक प्राणी आपापल्या वासनेप्रमाणेच स्थानाची इच्छा करितो. ५०३ हरिवक्षोगता लक्ष्मीरपि शोभार्थमेव यत् ।
बिभर्ति कमलं हस्ते कान्याशंसाधिका भवेत् ७।११७।२१ कमल हे इतकें सुंदर आहे की, प्रत्यक्ष विष्णूच्या वक्षःस्थळाच्या ठिकाणी बसणारी, सर्व सौंदर्याची अधिदेवता जी लक्ष्मी तिने शोभा येण्यासाठी आपल्या हातांत कमल धारण केले आहे. दुसरा कोणी यापेक्षा कमलाची अधिक प्रशंसा काय करणार आहे ? ५०४ हस्तं हस्तेन संपीड्य दन्तैर्दन्तान्विचूर्ण्य च ।
अङ्गान्यङ्गरिवाक्रम्य जयेच्चेन्द्रियशात्रवान् ॥४।२३।५८ हातावर हात चोळून, दांतांनी दांत चावून, गात्रांनी गात्रे आवळून धरून, अर्थात् वाटतील ते दृढ प्रयत्न करून इंद्रियरूपी शजूंना जिंकून टाकावें.
For Private And Personal Use Only
Page #419
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ९७
mmmmmmmmm. ५०५ हृदि यावदहंभावो वारिदः प्रविजृम्भते । ___ तावद्विकासमायाति तृष्णाकुटजमञ्जरी ॥ ४॥३३॥३०
जोपर्यंत अंतःकरणरूपी आकाशांत अहंकाररूपी मेघ वावरत आहे तोपर्यंत तृष्णारूपी कुड्याची वेल विकास पावत असते. ५०६ हदहावासिचित्तत्त्वं मुख्यं सानातनं वपुः ।।
शङ्खचक्रगदाहस्तो गौण आकार आत्मनः॥ ५।४३३२७ हृदयरूपी गुहेमध्ये वास करणारे चैतन्यतत्त्व हेच आत्म्याचे मुख्य आणि सनातन शरीर आहे; हातांत शंख, चक्र व गदा ही असलेला आकार हे मुख्य शरीर नव्हे. ५०७ हृद्याकाशे विवेकार्के शमालोकिनि निर्मले ।
अनर्थसार्थकारो नोद्यन्ति किल केतवः ॥२।१८।२१ हृदयाकाशांत विवेकरूपी सूर्याचा उदय झाला म्हणजे शांतिरूपी स्वच्छ प्रकाश पडतो, मग अनर्थसूचक कामादि धूमकेतु उदय पावत नाहींत. ५०८ हेलया राजहंसेन यत्कृतं कलकूजितम् ।
न तद्वर्षशतेनापि जानात्याशिक्षितुं बकः ॥७११७३५ राजहंसाने सहज केलेला मधुर किलबिल शब्द बगळ्याला शंभर वर्षे अभ्यास करूनही करता येणार नाही.
यो. वा..
For Private And Personal Use Only
Page #420
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
विषयसूची
विषयः
क्रमाङ्कन अज्ञः ४५० अज्ञानम् ६ अनङ्गः ३६५ अभ्यासः ७।४७-४९ । ९५। ११३ । १५३ । १७६ ।
२०६। २२५ । २८४ । ३४६ । ३८९ । ४७६ अविद्या ४१ । ५४ आत्मा ७४ । १५९ । २४१ । २४२ । ३२० । ३७७।
३७८ । ३८३ । ३८६ आनन्दः ७९ आपद् ५७ । ८१। ८२ । १२६ । ३६९ । ४४३ ।
४५०। ४८९ आयुः १ । २७ । ८४-८६ । १७९ । ३८५। ४७८ आर्यः ३४९ आलस्यम् ८७ आशा ८८।४१२ आस्था ८९ । ४२५ । ४९२ इच्छा ९०१९१।२६०।३२२।३५७।३७०।३७३ इन्द्रियम् ९४ । १०१ । १४३ । १६६ । १७० । १८१ ।
१८५। २९४ । ३५०। ४९५। ५०४
For Private And Personal Use Only
Page #421
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
गुणः
ईश्वरः ९९ । २४१ उपकारः ११७ उपदेशः ९७ । १०४ । ३५६ । ३७३।४३७ कर्म १०५ । १२७ । २४५ कामः ११५ । ४६० कालः ११७ । ११८ । १२१ । २२४।२६१। ३०७ ।
४७१ कीर्तिः १ कोपः २८३
१ । ३८ । १०३ । १३७ । १३८ । १४९ ।
२३२ । ३३९ गुरुः ९७। १३९ । २४१ चित्तम् ४४ । १४३। ३४१ । ४४८ चिन्ता चेतः १०९ । ४३८ । ४९४ जडः १४९ । ४०० जरा २१ । १५५-१५८ । ३२८ जीवितम् १८२ । ३३९ । ४०३ । ४११ । ४४१। ४६० ज्ञः ९२।१४४ ज्ञप्तिः १०४ ज्ञानम् ७१ । १०५ । १२७। १७१-१७५ । २३७ ।
३२० । ४०७। ४२७ । ४५२ । ४६३ तत्त्वम् १० । २२७ । ३८३
For Private And Personal Use Only
Page #422
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
ARKANNAAA
तपः
२९।१७८ तृष्णा ३० । ४०।१११ । १२३ । १३४ । १६७ ।
१८६ । २१० । २२० । २५५ । ४८३ । ५०५ दारिद्यम् १९९ दुःखम् १८ । ८९ । २००। २०२ । २३८ । ३४८ ।
४५१ । ४८२ । ४८९ दुर्जनः १२ । २०५। ४९३ देवः ११० दैवम् . ११९ । १२० । २०१ । २१३-२१५ । २३० ।
२८६ । २९२ । २९३ । २९५। ३०५। ३३६ ।
३३७ । ३९० । ४२३ . धर्मः २८२ । ५०० धीः २१९ । २२१ । २४१ । २८१ । ४१७ धैर्यम् २४६ । ३३१ ध्यानम् १६ । २८७ नरः १६५। ३९१ नारी : ११५ नीचः १०२ पण्डितः २० । ३७१ । ४८१ परमार्थः १५ पाण्डित्यम् १११ 'पापम् २८२ । ३५९
For Private And Personal Use Only
Page #423
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
पुमान् २९० पुरुषः १०९ । १९० । २५७ । २७८ पुरुषार्थ: २१८ । २९१ । ३०४ पौरुषम् १३९ । २१२ । २३२ । २७५ । २९२-२९७ ।
३०० । ३०४ । ३३७ । ४२३ । ४३९।४७४।
४८७ प्रज्ञा २१ । १०४।१४७ । २०४ । २९८-३०० ।
३४४ । ३४६।३७४। ४३४ । ४३६ । ४५३ ।
४६१ । ४८९ प्राज्ञः ३०६ । ३३७ । ३८२ । ३८३ । ३९२ बद्ध:
३११ बन्धः ३१ । ४३ । ६६ । ३१४ । ३२२ । ३४१ ।
३४३ । ४१३ । ४५५
७५ | २८१ बुद्धिः ४६६
१११ । ३२१ । ४३६ भवः ४६४ भोगः
- २५८।२८० ।३२२ । ३२३ । ३९२ । ४०२ ।
४१६ । ४२७ । ४४७ मतिः
२७१ । २९०।३५२ । ४९० २५ । ३६ । ९७। १३३ । १५०।१५१ । १५४।१६६ । १८१ । १८२। १९३ । ३२० । ३२५-३२७ । ३३५। ३४५। ३५६ । ४१४ । ४२५। ४३१ । ४३८ । ४४२।४५१ । ४८२
बोधः
For Private And Personal Use Only
Page #424
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
मरणम् १४ । १५५ । ३२८ । ३६० । ४०३ महात्मा महान् १२५। १४२ । १९१ । २२४ । २२८ । २९४ ॥
३१३ । ३२९ । ३३० । ३३८ । ३४२ । ३७२।
३८० । ४०४ । ४४६ माया ६७ मित्रम् २५६ मुक्तः १३६ । २६७ मुक्तिः मूढः ३।१४। ८० । १२९ । १५१ । ३३६-३३८ ।
३८३ । ३९९ मूर्खः
२५९ । २६५ मृतिः ३३९ । ४४० मृत्युः २८३ । ३६५ । ४१८ मैत्री १६३ । ४५८ मोक्षः ३१ । १२७ । २३५ । २३७ । २५८ | २६३ ।
३११ । ३२२ । ३४० । ३४१ । ४०२ । ४१३ मौर्यम् ८२ । १११ । २०० । २३८ । २४० । ३४३ ।
४०५।४५० यत्नः ३४ । २१२ । २३२ । २९६ । ३४६ । ४१९ ।
युक्तिः रिपुः
१२९ । ३८१-३८४ । ४२५ ७४
For Private And Personal Use Only
Page #425
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूची
~~~~~~~~ लक्ष्मीः २१३ वासना १९२ । १९७। २०७ । २१६ । २६३ । ३११ ।
३७२ । ३९३ । ४१२-४१४ । ४३८ । ४३९ ।
४५३ । ५०१ । ५०२ विचारः ६९ । १३२ । १९३ । १९८ । ३४० । ४०२ ।
४०६ । ४१५-४१७।४६३।४६४।४६७ विद्वान् ४४० विमुक्तता ४३ । ३१४ । ४५५ । ४७३ विरागः ३९२ विवेकः २५ । २६ । १०१ । १४५ । १४७ । १६८।
१८६ । २३३ । २५८ । २७८ । ३१७।३२० । ३५०।३५७।३८०। ४२२ । ४४१ । ४६१ ।
५०७ विषयः ९।४२४ । ४२५ । ४३० । ४३१ वैतृष्ण्यम् २७३ वैराग्यम् १९१ । २३९ । २७८ । ३१७ । ४४३ व्यवसाय: १२२ शत्रुः २५६ शमः ३४० । ४१५ । ४२९ । ४६३ । ४६४ । ५०७ शान्तः १४० । २४९ । ३२० । ३९४ । ४४५ शास्त्रम् १५ । ३९ । ९७ ॥ २४१ । ३२० । ३७३ ।
४२७ । ४३४ शिष्यः ३५। ५८ । ७८ । १०४
For Private And Personal Use Only
Page #426
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०४
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
marrina
viwww.
mar
शूरः १८१ । २९७ । ४४४ श्री: २४ । ४११ । ४१५ । ४३० । ४४४ श्रेयः १३।२४५। ३२३ । ४२९ । ४६५ संसारः १७ । १३२ । १५३ । १८० । १९८ । २११ ।
२३९ । २४३ | ४१४ । ४४९-४५३ । ४६१ ।
४८०। ४८९ संकल्पः १०७ । २६४ । ३१४ । ४५५ । ४७९ सज्जनः २०३ । २३४ । २५८ । ४३४ । ४५७ । ४७० सन् ७० । ८३ । १३१ । ३१० । ४१५ । ४५८.।
४६२ । ४६३ । ४९३ संतोषः ३४०। ४०८ । ४१५ । ४६३-४६५ साधुः १५ । ३७ । १०९ । १३५। १५४ । २४३ ।
२७२ । २७४ । ३४०।३७५/४६४।४८६ ।
४८७ सिद्धिः १९ । २९५ सुखम् १ । १८ । ८९ । १२४ । २०२। २८१। ३४८
४४९ । ४६३ । ४६५ । ४८२ सुजनः ४९६ सौहार्दम् ६० । २७६ । ४९६ । ४९७ स्त्री ३३३ । ४९८ स्नेहः । ६८ । ७३ । २७७ स्वभावः ११ । २८९ । ३३८ । ३७९ हिंसा ५००
For Private And Personal Use Only
Page #427
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागक्तसुभाषितानि
COPE
स
संपादक व भाषांतरकार विष्णु विनायक परांजपे, पेण
प्रकाशक
केशव भिकाजी ढवळे, गिरगांव-मुंबई
आवृत्ति दुसरी
आषाढ, शके १८५२ सन १९३०
किंमत ३ आणे
For Private And Personal Use Only
Page #428
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MPETINMDXNXXHINDIPHONE
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि संपादक-विष्णु विनायक परांजपे, पेण भाषांतरकार-चिंतामण मोरेश्वर परांजपे,
बी. ए., एल्.एल्. बी. (१०३२ सुभाषितें, किंमत १२ आणे)
-
-
सार्थश्रीरामायणसुभाषितानि भाषांतरकार-भालचंद्र शंकरशास्त्री देवस्थळी
(५०२ सुभाषितें, किंमत ८ आणे)
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि भाषांतरकार-विष्णु विनायक परांजपे (५०८ सुभाषितें, किंमत ८ आणे )
सार्थश्रीभागवतसुभाषितानि भाषांतरकार-विष्णु विनायक परांजपे (११७ सुभाषितें, किंमत ३ आणे )
Hindi
सार्थश्रीरामरक्षा ( किंमत १ आणा)
Whas 46666666666
For Private And Personal Use Only
Page #429
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
प्रस्तावना
श्रीभागवत हा पुराणग्रंथांमध्ये प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे १२ स्कंध असून श्लोकसंख्या १८ हजार आहे. यांतील निवडक ११७ संस्कृत सुभाषितवचनें प्रस्तुत पुस्तकांत घेतली आहेत. आणि प्रत्येक श्लोकाच्याखाली त्याचे मराठी भाषांतर दिले आहे. वचनें वर्णक्रमाने लाविली असून शेवटीं मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. वचनांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत व उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांत डावीकडून पहिला अंक स्कंधाचा, दुसरा अध्यायाचा व तिसरा श्लोकाचा समजावा. सूचीमध्ये विषयापुढील अंक हे वचनाचे क्रमांक आहेत. __ही सुभाषितवचनें सर्वांच्या वाचनात येवोत अशी श्रीकृष्णपरमात्म्याची प्रार्थना करून प्रस्तावना संपवितो. ज्येष्ठ, शके १८५१ १ विष्णु विनायक परांजपे
'S रहाणार पेण, जिल्हा कुलाबा
For Private And Personal Use Only
Page #430
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
निवेदन
श्रीमहाभारत, श्रीरामायण, श्रीयोगवासिष्ठ व श्रीभागवत या राष्ट्रीय व धार्मिक ग्रंथांतील निवडक सुभाषितांची मराठी भाषांतरासह चार पुस्तकें प्रकाशित केली. ही पुस्तकें सर्व लोकांना मान्य झाल्यामुळे पहिली आवृत्ति एका वर्षातच खपून गेली. आतां ही दुसरी आवृत्ति काढिली आहे.
वचन कोणी कोणाला सांगितले, हे समजण्याची विशेष अवश्यकता ज्या श्लोकांत दिसून येते, अशा श्लोकांचा अर्थ देतांना आरंभी कंसांत अवतरण दिले आहे. अशा अवतरणांची संख्या या आवृत्तीत वाढविली आहे.
धार्मिक शिक्षण देण्याच्या कामी ही चारहि सुभाषितांची पुस्तकें बरीच उपयोगी पडतात, असे पुष्कळ पालकांच्या व शिक्षकांच्या प्रत्ययास आले आहे. तरी सर्व जनतेला या पुस्तकांचा उपयोग होवो, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे.
आषाढ, शके १८५२
प्रकाशक
For Private And Personal Use Only
Page #431
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१ अचक्षुरन्धस्य यथाग्रणीः कृतः स्क. अ. श्लो.
तथा जनस्याविदुषोऽबुधो गुरुः ॥ ८ । २४ । ५० ज्याप्रमाणे आंधळ्या मनुष्याने आंधळा मनुष्य आपला पुढारी केला असतां त्यापासून कांहींएक उपयोग होत नाही, त्याप्रमाणे ज्ञान नसलेल्या लोकांनी अडाणी गुरु केला असता त्याचा काहीएक उपयोग होत नाही. २ अज्ञानादथवा ज्ञानादुत्तमश्लोकनाम यत् ।
संकीर्तितमचं पुंसो दहेदेधो यथानलः ॥ ६।२।१८ ज्याप्रमाणे जाणूनबुझून टाकिलेला किंवा नकळत पडलेला अग्नि काठे जाळून टाकितो, त्याप्रमाणे पवित्र कीर्ति असलेल्या परमेश्वराचें नांव समजून उच्चारिले किंवा त्याचा सहज उच्चार झाला, तरी ते नांव मनुष्याचे पातक नाहीसे करून टाकितें. ३ अणुभ्यश्च महद्भयश्च
शास्त्रेभ्यः कुशलो नरः । सर्वतः सारमादद्यात्
पुष्पेभ्य इव षट्पदः॥११।८।१० ज्याप्रमाणे भ्रमर लहानमोठ्या फुलांतील रस ग्रहण करतो, त्याप्रमाणे विवेकी मनुष्याने लहानमोठ्या सर्व शास्त्रांतील महत्त्वाचा भाग ग्रहण करावा.
For Private And Personal Use Only
Page #432
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
annnnnnnnnnnnn
४ अण्वप्युपाहृतं भक्तैः प्रेम्णा भूर्येव मे भवेत् ।
भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते ॥ १०८११३ (श्रीकृष्ण सुदाम्याला म्हणाले.) भक्तांनी प्रेमाने अर्पण केलेली वस्तू जरी थोडी असली तरी ती मला पुष्कळ वाटते. आणि अभक्तांनी पुष्कळ वस्तू जरी अर्पण केल्या, तरी त्यापासून मला संतोष होत नाही. ५ अनागतमतीतं च वर्तमानमतीन्द्रियम् ।
विप्रकृष्टं व्यवहितं सम्यक् पश्यन्ति योगिनः१०६१।२१ पुढे होणाऱ्या, पूर्वी झालेल्या आणि वर्तमानकाळी इंद्रियांना न समजणान्या, दूर असलेल्या, मध्ये पडदा, भिंत इत्यादि व्यवधान असल्यामुळे न दिसणान्या सर्व वस्तूंना योगी लोक प्रत्यक्ष पाहतात.
६ अनापृष्टमपि ब्रूयुर्गुरवो दीनवत्सलाः ॥ ३७३६ दीनांवर दया करणारे गुरु न विचारलेल्यादेखील गोष्टींबद्दल सांगत असतात.
७ अयं हि परमो लाभो नृणां साधुसमागमः॥१२॥१०७. साधूंचा समागम घडणे हा मनुष्यांना मोठाच लाभ होय. ८ अरयोऽपि हि संधेयाः सति कार्यार्थगौरवे ।
अहिमूषकवद्देवा ह्यर्थस्य पदवीं गतैः ॥ ८।६।२० (समुद्रमंथनाचेपूर्वी दैत्यांशी सख्य करा, असें भगवान् विष्णूंनी देवांना सांगितले.) देवहो, एखादे मोठे कार्य घडवून आणण्यासाठी शत्रंबरोबर सुद्धा मैत्री केली पाहिजे. ती तुम्ही करा आणि तुमचा कार्यभाग झाल्यावर, सर्प उंदरांना गिळून टाकतो त्याप्रमाणे दैत्यांचा नाश करा.
For Private And Personal Use Only
Page #433
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री भागवतसुभाषितानि
९ असतः श्रीमदान्धस्य दारिद्र्यं परमञ्जनम् । आत्मौपम्येन भूतानि दरिद्रः परमीक्षते ।। १०।१०।१३
संपत्तीच्या मदानें अंध झाल्यामुळे कर्तव्याकर्तव्य न पाहणाऱ्या विवेकशून्य पुरुषाला दारिद्र्य हेंच उत्तम अंजन होय. कारण, दरिद्री पुरुष आपल्यासारखींच दुःखें सर्वाना प्राप्त होत असतील असें निश्चयानें जाणतो.
१० अहं भक्तपराधीनो स्वतंत्र इव द्विज || ९|४|६३
( श्रीभगवान् विष्णु सुदर्शन चक्रानें पीडित झालेल्या दुर्वास ऋषींना म्हणाले. ) हे ब्राह्मणा, मी भक्ताच्या अधीन आहे, यामुळें तुझ्या रक्षणाविषयीं स्वतंत्र असल्यासारखा नाहीं.
११ अहो दैन्यमहो कष्टं पारक्यैः क्षणभङ्गुरैः ।
यनोपकुर्यादस्वार्थैर्मर्त्यः स्वज्ञातिविग्रहैः ।। ६।१०।१०
द्रव्य, पुत्रादिक बांधव व शरीर यांची स्थिति अशी आहे कीं, यांचा स्वतःला उपयोग होत नाहीं, यांना कोल्हीं कुत्रों खाऊन टाकणार व यांचा क्षणाचाही भरंवसा नाहीं. तेव्हां यांच्या योगानें मनुष्यानें कोणावरही उपकार न करणें ही किती तरी दैन्याची व दुःखाची गोष्ट आहे !
१२ आयुः श्रियं यशो धर्म लोकानाशिष एव च ।
हन्ति श्रेयांसि सर्वाणि पुंसो महदतिक्रमः || १० |४ |४६ सज्जनांचा छळ केला असतां, मनुष्याचें आयुष्य, संपत्ति, यश, धर्म, उत्तमलोकप्राप्ति. आशीर्वाद, कल्याणकारक गोष्टी या सर्वांचा नाश होतो.
For Private And Personal Use Only
Page #434
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१३ आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् ॥११८४४
आशा धरणे हे अतिशय दुःखाचे कारण आहे. आणि आशा नसणे हे परम सुखाचे कारण आहे. १४ इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः।
वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥ ११।८।२० आहाराचा त्याग करणारे विचारी पुरुष रसनेंद्रियाशिवाय बाकीच्या सर्व इंद्रियांना जिंकतात. परंतु अन्नरहित पुरुषाचे रसनेंद्रिय वाढत जाते. (रसाविषयीं अधिक आसक्ति उत्पन्न होते.) १५ ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् ।
तेषां यत्स्ववचोयुक्तं बुद्धिमांस्तत्समाचरेत् १०॥३३॥३२ कुशलाचरितेनैषामिह स्वार्थो न विद्यते ।
विपर्ययेण वाऽनर्थो निरहंकारिणां प्रभो ॥१०॥३३३३३ (शुकाचार्य परीक्षितीला म्हणतात.) ज्ञानी समर्थ पुरुषांचे भाषण सत्य असते. उपदेशाप्रमाणे त्यांचे आचरण क्वचित् असते. म्हणून बुद्धिमान मनुष्याने त्यांच्या उपदेशाला अनुसरून असलेल्या आचाराचे आचरण करावे. हे राजा, अशा अहंकार नसलेल्या पुरुषांना धर्माप्रमाणे आचरण करून या लोकीं कांहीं सुखप्राप्ति करून ध्यावयाची नसते, किंवा त्यांच्या हातून अधर्माचरण घडल्यास त्यांना परलोकी दुःखही प्राप्त होणारे नसते. १६ उत्तमश्चिन्तितं कुर्यात्प्रोक्तकारी तु मध्यमः।
अधमोऽश्रद्धया कुर्यादकर्वोच्चरितं पितुः ॥ ९।१८।४४ जो मुलगा बापाच्या मनांत असलेले कार्य करतो तो उत्तम, जो सांगितलेले करतो तो मध्यम, जो सांगितलेले अश्रद्धेने करतो तो कनिष्ठ आणि जो बापाचे सांगणे अश्रद्धेनेसुद्धा करीत नाही, तो केवळ विष्ठेसारखाच होय.
For Private And Personal Use Only
Page #435
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१७ उद्यतस्य हि कामस्य प्रतिवादो न शस्यते । ___ अपि निमुक्तसङ्गस्य कामरक्तस्य किं पुनः॥३॥२२॥१२
सर्वसंगपरित्याग केलेल्या पुरुषाला देखील स्वतः प्राप्त झालेल्या विषयाचा अव्हेर करणे योग्य नाही, मग विषयासक्त पुरुषाला तो कोठून योग्य होईल ? १८ एकः प्रसूयते जन्तुरेक एव प्रलीयते ।
एकोऽनुभुङ्क्ते सुकृतमेक एव च दुष्कृतम् ॥१०॥४९।२१ प्राणी एकटाच जन्मास येतो, (स्त्रीपुत्रादिकांसह जन्मास येत नाही) व एकटाच मरण पावतो. तसेंच पुण्याचे फळ सुख, एकटाच भोगतो व पापाचे फळ दुःखसुद्धा एकटाच भोगितो. १९ एतदेव हि सच्छिष्यैः कर्तव्यं गुरुनिष्कृतम् ।
यद्वै विशुद्धभावेन सर्वार्थात्मार्पणं गुरौ ॥ १०८०४१ उत्तम शिष्यांनी गुरूंच्या उपकारांची फेड हीच करावी की, सर्व पुरुषार्थ ज्यापासून प्राप्त होतात, तो देह शुद्धभक्तीने गुरूंना अर्पण करावा. २० एतावत्येव शुश्रूषा कार्या पितरि पुत्रकैः ।
बाढमित्यनुमन्येत गौरवेण गुरोर्वचः ॥३॥२४॥१३ मुलांनी वडिलांची सेवा करावयाची म्हणजे एवढेच की, त्यांच्या आज्ञेचा स्वीकार 'ठीक आहे ' अशा बहुमानाने करावयाचा. २१ एतावानव्ययो धर्मः पुण्यश्लोकैरुपासितः।
यो भूतशोकहर्षाभ्यामात्मा शोचति हृष्यति ॥६॥१०९ प्राणिमात्राला दुःख झाले असतां, ज्याला स्वतःला दुःख होतें, व प्राणिमात्राचे सुख पाहून ज्याला सुख होते, अशा पुरुषाचा जो धर्म, तोच अक्षय धर्म होय. कारण सत्कीर्तिमान लोकांनी याच धर्माचे आचरण केले आहे.
For Private And Personal Use Only
Page #436
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
२२ एतावान् हि प्रभोरर्थो यद्दीनपरिपालनम् ॥ ८।७३८
समर्थ पुरुषांचे हेच कर्तव्य आहे की, त्यांनी दीन जनांचे परिपालन करावे. २३ एष राज्ञां परो धर्मो ह्यार्तानामातिनिग्रहः ॥११७११
पीडित झालेल्या लोकांचे दुःख निवारण करणे हाच राजांचा मुख्य धर्म आहे.
२४ एष वै परमो योगो मनसः संग्रहः स्मृतः। - हृदयज्ञत्वमन्विच्छन् दम्यस्येवावतो मुहुः॥११।२०।२१
शिक्षण देण्यास योग्य अशा उद्धट घोड्याला शिकवितांना, ज्याप्रमाणे कांही वेळ त्याच्या तंत्राने चालून हळूहळू त्याला योग्य ते वळण लावावे लागते, त्याप्रमाणे प्रथम कांही प्रसंगी मनाच्या तंत्राने चालून शेवटीं तें मन पूर्णपणे ताब्यांत आणावें. अशा रीतीने मनाचा निग्रह करणे हेच मोठे योगसाधन आहे. २५ कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव निलीयते ।
सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते ॥१०॥२४।१३ प्राणी कर्माच्या योगानें उत्पन्न होतो, कर्माच्या योगाने लय पावतो. सुख दुःख, भय, आणि कल्याण ही सर्वही कर्माच्याच योगानें प्राप्त होतात. २६ कालो बलीयान्बलिनां भगवानीश्वरोऽव्ययः।
प्रजाः कालयते क्रीडन् पशुपालो यथा पशून्१०५१।१९ . काल हा सर्व बलिष्ठांमध्ये बलिष्ठ असून अविनाशी भगवान् ईश्वर आहे. तो क्रीडा करीत असतां, ज्याप्रमाणे पशुंचे रक्षण करणारा पशुंना इकडे तिकडे नेतो, त्याप्रमाणे प्रजांची घडामोड करतो.
For Private And Personal Use Only
Page #437
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
२७ कि विद्यया किं तपसा
किं त्यागेन श्रुतेन वा। किं विविक्तेन मौनेन
स्त्रीभिर्यस्य मनो हृतम् ११।२६।१२ ज्याचे मन स्त्रियांनी आपल्या ताब्यात ठेविले आहे, ( जो स्त्रीलंपट झाला आहे ) त्याच्या विद्येचा, तपाचा, त्यागाचा, अध्ययनाचा, एकान्तवासाचा आणि मौनाचा काय उपयोग आहे ? २८ किं दुर्मर्ष तितिक्षूणां
किमकार्यमसाधुभिः। किं न देयं वदान्यानां
कः परः समदार्शनाम् १०७२।१९ सहनशील पुरुषांना दुःसह असें कांहींच नाही. दुष्टांना अकार्य म्हणून कांहींच नाही. (वाटेल तें दुष्कृत्य करण्याची त्यांची तयारी असते.) देतां येणार नाही असें दानशूर पुरुषांजवळ काय आहे ? (ते वाटेल ती वस्तू देऊन टाकतील.) आणि समदृष्टि असलेल्या लोकांना परका असा कोणीच नाही. २९ किं प्रमत्तस्य बहुभिः परोक्षैयिनैरिह ।
वरं मुहूर्त विदितं घटेत श्रेयसे यतः ॥ २॥१११२ या लोकीं सावध नसल्यामुळे अविचाराने केवळ विषयसेवनांत एखाद्या मनुष्याची पुष्कळ वर्षे निघून गेली, तरी त्यांचा काय उपयोग आहे ? त्यापेक्षा ज्ञानाने युक्त अशा दोन घटकाही श्रेष्ठ होत. कारण, मनुष्य त्या दोन घटकांमध्ये स्वहितासाठी यत्न करतो.
असते. ) देतां येणावाटल तें दुष्कृत्य करताना अकार्य
भाग २
For Private And Personal Use Only
Page #438
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
....mmmmmmmm
३० कोन्वर्थः सुखयत्येनं कामो वा मृत्युरन्तिके ।
आघातं नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिदः॥११।१०।२० या जीवाच्या संनिध मृत्यु उभा आहे अशा स्थितीत कोणता धनादि पदार्थ किंवा शब्दादि विषय त्याला सुख देणार आहे ? वध्य पुरुषाला वध करण्याच्या जागेकडे नेत असतां, त्यावेळी माळा, चंदन, मिष्टान्न इत्यादि पदार्थ दिले असतां, ते त्याला सुखदायक होत नाहीत; त्याप्रमाणे पुढे मृत्यु असलेल्या या जीवाला कोणताच पदार्थ संतोष उत्पन्न करीत नाही. ३१ कौमार आचरेत्प्राज्ञो धर्मान् भागवतानिह ।
दुर्लभं मानुषं जन्म तदप्यध्रुवमर्थदम् ॥७६१ ज्ञात्या पुरुषाने या मनुष्यजन्मामध्येच व त्यांतूनही कौमारावस्थेमध्येच भागवतधर्माचे आचरण करावें. कारण, हा मनुष्यजन्म दुर्लभ असून पुरुषार्थ साधून देणारा आहे, तथापि तो अशाश्वत आहे. ३२ गुरुन स स्यात्स्वजनो न स स्यात्
पिता न स स्याङ्जननी न सा स्यात् । दैवं न तत्स्यान्न पतिश्च स स्यात्
न मोचयेद्यः समुपेतमृत्युम् ॥ ५।५।१८ . आपल्याजवळ आलेल्या लोकांची मृत्यूपासून ज्याला सुटका करता येत नाही, तो गुरु नव्हे, स्वजन नव्हे, आणि पिता होण्याला योग्य नव्हे, ती माता नव्हे, तें दैवत नव्हे, तो पति नव्हे, (ज्याला आपले कर्तव्य बरोबर करता येत नसेल, त्याने ती ती पदवी प्राप्त करून घेऊं नये)
For Private And Personal Use Only
Page #439
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१३
३३ जन्मलाभः परः पुंसामन्ते नारायणस्मृतिः ॥२।१६
अंतकाळी नारायणाची स्मृति होणे हाच मनुष्यजन्म प्राप्त झाल्याचा मोठा लाभ होय. ३४ जातस्य मृत्युर्बुव एष सर्वतः
प्रतिक्रिया यस्य न चेह कृता । लोको यशश्वाथ ततो यदि ह्यमुं
को नाम मृत्युं न वृणीत युक्तम् ॥६॥१०॥३२ उत्पन्न झालेल्या प्राण्याला तो कोठेही गेला तरी मृत्यु निःसंशय येणारच. या लोकी मृत्यु टाळण्याचा उपाय ईश्वराने निर्माण केला नाही. म्हणून या मृत्यूपासून जर इहलोकीं यश आणि परलोकीं स्वर्ग ही प्राप्त होत असतील, तर या प्राप्त झालेल्या योग्य मृत्यूचा कोण बरें स्वीकार करणार नाही ? सर्वही करतीलच. ३५ जिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः ।
मृत्युमृच्छत्यसद्बुद्धिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥ ११।८।१९ ज्याप्रमाणे मासा आमिष लाविलेल्या गळाच्या (लोहकंटकाच्या) योगाने मृत्युमुखी पडतो, त्याप्रमाणे रससेवनाविषयीं आसक्त झालेला दुर्बुद्धि मनुष्य उच्छृखल, दुर्जय अशा जिव्हेच्या योगाने मृत्युमुखांत पडतो. ३६ जिह्वां कचित्संदशति स्वदद्भिः
तद्वेदनायां कतमाय कुप्येत् ॥ ११॥२३॥५१ केव्हां तरी मनुष्य आपल्याच दांतांनी आपली जीभ चावतो, त्यावेळी होणान्या वेदनांमुळे त्याने कोणावर रागें भरावें? (दांतांना रागें भरून ताडण करावें तर आपणांलाच दुसरी पीडा होईल.)
For Private And Personal Use Only
Page #440
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
RAMA www
सार्थश्रीभागवतसुभाषितानि ३७ जीवितं मरणं जन्तोः
गतिः स्वेनैव कर्मणा । राजंस्ततोऽन्यो नान्यस्य
प्रदाता सुखदुःखयोः ॥ १।६।२५ (बृहस्पति जनमेजय राजाला सांगतात.) हे राजा, जिवंत राहणे, मृत्यु येणे, स्वर्गादिलोकांची प्राप्ति होणे ही सर्व प्राण्याला आपल्या कर्माच्याच योगानें प्राप्त होत असतात. यासाठी दुसऱ्याला सुखदुःखें देणारा दुसरा कोणी नाही. ३८ तत्कर्म हरितोषं यत्
सा विद्या तन्मतिर्यया ॥ ४।२९।४९ ज्याच्या योगाने ईश्वराला संतोष होतो तेच खरें कर्म होय. आणि जिच्या योगाने श्रीहरीकडे बुद्धि लागते, तीच खरी विद्या होय. ३९ तथारिभिन व्यथते शिलीमुखैः
शेतेऽर्दिताङ्गो हृदयेन दूयता। स्वानां यथा वक्रधियां दुरुक्तिभिः
दिवानिशं तप्यति मर्मताडितः॥४॥३॥१९ ज्याप्रमाणे आपल्या कुटिलबुद्धि बांधवांच्या दुर्भाषणाने मर्मस्थानी ताडित झालेला पुरुष व्यथित झालेल्या अंतःकरणामुळे रात्रंदिवस संताप पावतो, त्याप्रमाणे शचूंनी बाणांच्या योगाने आंगाचे तुकडे पाडिले तरी संताप पावत नाही. कारण, त्याला थोडी तरी झोप येते, परंतु मर्मभेद झालेल्याला मुळीच चैन पडत नाही.
For Private And Personal Use Only
Page #441
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
४० तद्वै धनुस्त इषवः स रथो हयास्ते
सोऽहं रथी नृपतयो यत आनमन्ति । सर्व क्षणेन तदभूदसदीशरिक्तं
भस्मन्हुतं कुहकराद्धमिवोप्तमूष्याम् ॥ १।१५।११ . (श्रीकृष्ण निजधामास गेल्यानंतर अर्जुनाचा गवळ्यांनी पराजय केला त्यासंबंधाने अर्जुन युधिष्ठिरास सांगतो. ) संग्रामाचेवेळी राजे लोक ज्याला नमस्कार करीत असत, तेच गांडीव धनुष्य, तेच बाण, तोच अग्नीने दिलेला दिव्यरथ, तेच घोडे, तोच मी रथी पण हे सर्व साहित्य श्रीकृष्णाचा वियोग झाल्यामुळे एका क्षणांत व्यर्थ झालें! भस्मामध्ये केलेलें हवन, मायावी पुरुषांपासून मिळविलेल्या वस्तु किंवा उखर म्हणजे खाऱ्या जमिनीत पेरलेले धान्य ही ज्याप्रमाणे व्यर्थ होतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे अधिष्ठान नाहीसे झाल्याबरोबर माझे सर्व सामर्थ्य फुकट गेले. ४१ तप्यन्ते लोकतापेन साधवः प्रायशो जनाः।
परमाराधनं तद्धि पुरुषस्याखिलात्मनः ॥ ८७४४ साधु पुरुष बहुतकरून लोकांच्या दुःखाने स्वतः दुःखी होतात. ( लोकांचे दुःख निवारण करण्यासाठी स्वतः दुःख भोगितात.) दुसन्याकरितां दुःख सहन करणे हेच सर्वात्म्या परमेश्वराचे उत्कृष्ट आराधन होय. ४२ तांस्तान्कामान्हरिदद्यात् यान् यान् कामयते जनः ।
आराधितो यथैवैष तथा पुंसां फलोदयः॥४१३॥३४ मनुष्य ज्या ज्या विषयांची इच्छा धारण करतो , ते ते विषय श्रीहरि त्याला देतो. जसें हरीचें आराधन करावें, तशीच फलप्राप्ति मनुष्यांना होते.
For Private And Personal Use Only
Page #442
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
४३ तावजितेन्द्रियो न स्याद्विजितान्येन्द्रियः पुमान् ।
न जयेद्रसनं यावजितं सर्व जिते रसे ॥ ११।८।२१ इतर इंद्रिये जिंकणाऱ्या पुरुषाने जोपर्यंत रसनेंद्रिय जिंकिलें नाही, तोपर्यंत तो जितेंद्रियच नव्हे. रसनेंद्रिय जिंकिलें असतां त्याने सर्व इंद्रियें जिंकिल्यासारखी आहेत. ४४ तावत्प्रमोदते स्वर्गे यावत्पुण्यं समाप्यते ।
क्षीणपुण्यः पतत्यागनिच्छन्कालचालितः॥११।१०।२६ प्राणी स्वर्गामध्ये पुण्य संपेपर्यंत विषयांचा उपभोग घेत असतां आनंद पावतो, परंतु पुण्य संपतांच तेथून पडण्याची इच्छा करीत नसतांही, कालाने त्यास पाडिले म्हणजे तो खाली पडतो. ४५ दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गुरः ।
तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ॥ ११।२।२९ (निमिराजा, कवि हरि इत्यादि नऊ योगेश्वरांना म्हणाला.) क्षणभंगुर असलेलाही हा मनुष्यदेह जीना दुर्लभ आहे; आणि त्या मनुष्यजन्मामध्येही भगवद्भक्तांचे दर्शन दुर्लभ आहे असें मी मानितों. ४६ दुष्करः को नु साधूनां दुस्त्यजो वा महात्मनाम् ९।५।१५ महात्म्या साधूंना करण्यास अथवा टाकण्यास कठीण असें काय आहे ? कांहींच नाही. ४७ दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेजलम् ।
सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत् ॥ १।१८।१६ दृष्टीने पाहून शुद्ध ठरलेल्या जागी पाऊल टाकावें, वस्त्राने गाळलेले पाणी प्यावें, सत्याने पवित्र अशी वाणी उच्चारावी आणि मनाने विचार करून शुद्ध असेल तेंच आचरण करावें.
For Private And Personal Use Only
Page #443
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
४८ द्वावेव चिन्तया मुक्तौ परमानन्द आप्लुतौ । __ यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्यः परं गतः ॥१०९।४
या जगांत ज्यांना चिंता नाही, व जे परमानंदांत निमग्न आहेत, असे दोघेजणच आहेत. एक अज्ञानी उद्योगरहित बालक आणि दुसरा परमेश्वराशी ऐक्य पावलेला गुणातीत साधु. ४९ धर्मव्यतिक्रमो दृष्ट ईश्वराणां च साहसम् ।
तेजीयसां न दोषाय वढेः सर्वभुजो यथा ॥१०॥३३॥३०
नैतत्समाचरेज्जातु मनसापि ह्यनीश्वरः । विनश्यत्याचरन्मौढ्याद्यथा रुद्रोऽब्धिजं विषम् ॥
१०॥३३॥३१ पवित्र असलेल्या सर्वभक्षक अग्नीने जरी अमंगल पदार्थ जाळून टाकिले तरी त्यामुळे तो जसा अपवित्र होत नाही, त्याप्रमाणे तेजस्वी समर्थ पुरुषांच्या हातून धर्ममर्यादांचे उल्लंघन आणि भलत्याच गोष्टी करण्याचे साहस जरी झाले, तरी त्यांना दोष लागत नाही. शंकरांनी कालकूट विष भक्षण केलें, म्हणून दुसरा सामान्य पुरुष तसे करण्यास प्रवृत्त होईल, तर तो जसा नाश पावेल, त्याप्रमाणे मूर्खपणामुळे शास्त्रविरुद्ध कर्म करणारा नाश पावेल. समर्थ नसलेल्या पुरुषाने शास्त्रविरुद्ध कर्म मनानेही आचरण करूं नये. ५० धर्मार्थकाममोक्षाख्यं य इच्छेच्छ्रेय आत्मनः ।
एकमेव हरेस्तत्र कारणं पादसेवनम् ॥ ४।८४१ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ साधल्याने कल्याण प्राप्त होते. हे कल्याणकारक पुरुषार्थ साधण्यास श्रीहरीच्या चरणांचे सेवन करणे हेच एक साधन आहे.
For Private And Personal Use Only
Page #444
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१८
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
mmarmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmwww.
५१ न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति । . हविषा कृष्णवर्मेव भूय एवाभिवर्धते ॥९।१९।१४
ज्याप्रमाणे अग्नि हा तूप इत्यादि हवनीय द्रव्यांच्या योगाने शांत न होतां अधिकच प्रदीप्त होतो, त्याप्रमाणे विषयांच्या उपभोगाने विषय भोगण्याची इच्छा कधीही शांत होत नाही. उलट वाढतच जाते. ५२ न तथा तप्यते विद्धः पुमान्बाणैः सुमर्मगैः।
यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः ॥११॥२३॥३ मर्मस्थळी लागलेल्या दुर्जनांच्या कठोर वाग्बाणांनी पुरुष दुःखाने जसा संतप्त होतो, तसा मर्मस्थानी लागलेल्या लोहमय खन्या बाणांनी विद्ध झालेलाही पुरुष संतप्त होत नाही. ५३ ननु स्वार्थपरो लोको न वेद परसंकटम् ।
यदि वेद न याचेत नेति नाह यदीश्वरः ॥ ६१०१६ (देव दधीचि ऋषींना म्हणतात.) खरोखर स्वार्थाविषयीं तत्पर असलेल्या लोकांना दुसन्याचे संकट समजत नाही. जर समजेल तर ते याचनाच करणार नाहीत, तसेंच ज्याच्यापाशी याचना केली, तो जर देण्यास समर्थ असेल व दुसऱ्याचे संकट जाणणारा असेल, तर 'देत नाही' असें कधींच म्हणणार नाही. ५४ न वै शूरा विकत्थन्ते दर्शयन्त्येव पौरुषम् ॥१०५०।२०
शूर पुरुष आपली स्वतःची स्तुति करीत नाहीत, तर स्तुतीला कारण असलेला पराक्रमच करून दाखवितात. ५५ न संरम्भेण सिध्यन्ति सर्वेऽर्थाःसान्त्वया यथा॥८।६।२४ सामोपचाराने जशी कार्ये सिद्ध होतात तशी रागाने होत नाहीत.
For Private And Personal Use Only
Page #445
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
mmmmmmmmmmm
सार्थश्रीभागवतसुभाषितानि • ५६ न सभां प्रविशेत्प्राज्ञः सभ्यदोषाननुस्मरन् ।
अब्रुवन्विब्रुवन्नज्ञो नरः किल्बिषमश्नुते ॥ १०१४४।१० सभासदांचे दोष जाणणाऱ्या बुद्धिमान मनुष्याने आधीं सभेमध्येच जाऊ नये. कारण, दोष जाणूनही न बोलेल, किंवा धर्मपक्षाच्या उलट बोलेल, अथवा विचारिलें असतां मी जाणत नाही असें म्हणेल, तर त्याला पाप लागते. ५७ नहि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ॥ ६।११५३
कोणीही एक क्षणभर देखील कर्म केल्यावांचून कधीही राहूं शकत नाही. ५८ न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः।
ते पुनन्त्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥ १०॥४८॥३१ उदकाने युक्त असलेली तीर्थे ही तीर्थे नव्हत, असें नाहीं, त्याचप्रमाणे मातीचे व दगडाचे देव हे देव नव्हत असें नाही, परंतु ही तीर्थे व हे देव पुष्कळ काळपर्यंत सेवा केली असतां पवित्र करतात आणि साधुलोक त्यांचे दर्शन होतांच पवित्र करतात. ५९ नामसंकीर्तनं यस्य
सर्वपापप्रणाशनम् । प्रणामो दुःखशमनस्तं
नमामि हरिं परम् ॥ १२॥१३॥२३ - ज्याचे नामसंकीर्तन केले असतां तें सर्व पातकांचा नाश करितें, व ज्याला नमस्कार केला असतां सकल दुःखांचा नाश होतो, त्या सर्वोत्तम श्रीहरीला मी नमस्कार करितों.
For Private And Personal Use Only
Page #446
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२०
६० नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् मयानुकूलेन नभस्वतेरितं
सार्थ श्री भागवतसुभाषितानि
पुमान्भवाब्धि न तरेत्स आत्महा || ११ | २० | १७
( भगवान् श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. ) सर्व उत्कृष्ट फळें प्राप्त करून देण्याचें मुख्य साधन हा नरदेह आहे. हा कोट्यवध उद्योगांनीही प्राप्त होणारा नाहीं तथापि सहज प्राप्त झाला आहे. ही नरदेहरूपी नौका चांगल्या प्रकारची आहे. गुरु हा तिच्या मधील नावाडी होय. वारा अनुकूल असला म्हणजे नाव चांगल्या तऱ्हेने चालते त्याप्रमाणें माझें स्मरण केलें असतां मी अनुकूल होऊन प्रेरणा करतों. अशा तऱ्हेची सर्व सामग्री असलेली ही नरदेहरूपी नौका प्राप्त झाली असतां, जो संसाररूपी सागर तरून जात नाहीं, तो आत्मघातकीच समजावा.
६१ नेह चात्यन्तसंवासः कर्हिचित्केनचित्सह ।
राजस्वेनापि देहेन किमु जायात्मजादिभिः १० ।४९।२०
( अक्रूर धृतराष्ट्र राजाला सांगतो. ) हे राजा, यालोकीं कोणत्याही प्राण्याचा कोणाही प्राण्याबरोबर केव्हांही निरंतर एकत्र सहवास घडत नाहीं. अत्यंत प्रिय असलेल्या आपल्या देहाबरोबर सुद्धां निरंतर सहवास घडत नाहीं, मग स्त्रीपुत्रादिकांबरोबर घडत नाहीं, हैं काय सांगावें ?
६२ नैकत्र प्रियसंवासः सुहृदां चित्रकर्मणाम् ।
जाणाऱ्या
ओघेन व्यूह्यमानानां प्लवानां स्रोतसो यथा ।। १०/५/२५ ज्याप्रमाणें उदकप्रवाहाच्या ओघानें वाहून तृणकाष्ठादिकांची स्थिति एके ठिकाणीं घडत नाहीं, त्याप्रमाणें चित्रविचित्र कर्मे असणाऱ्या सुहृज्जनांचा प्रिय असलेला समागम एका ठिकाणी कायमचा घडत नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #447
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
mirmirmirmirmireommmmmmmmmmmmar ६३ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ १०८११४ (श्रीकृष्ण सुदाम्याला सांगतात. ) जो कोणी मला पान, फूल, फळ आणि पाणी यांपैकी काहीही भक्तीने अर्पण करतो, त्या शुद्ध अंतःकरणाच्या मनुष्याने तें भक्तीने अर्पण केलेले मी सेवन. करतो. (आनंदानें ग्रहण करतो.) ६४ पथि च्युतं तिष्ठति दिष्टरक्षितं
गृहे स्थितं तद्विहतं विनश्यति । जीवत्यनाथोऽपि तदीक्षितो वने
गृहेऽपि गुप्तोस्य हतो न जीवति ॥ ७२।४० ईश्वराने रक्षण केलेली वस्तू मार्गामध्येही पडली असतां तशीच राहते, तिला कोणी नेत नाही. आणि ज्या वस्तूची ईश्वराने उपेक्षा केली ती घरामध्ये असली तरी नाहीशी होते. त्याचप्रमाणे एखादा पुरुष अनाथ असूनही ईश्वराने त्याच्यावर कृपादृष्टि ठेविली असतां तो वनामध्येही जिवंत राहतोच. आणि ईश्वराने ज्याची उपेक्षा केली तो पुरुष घरामध्ये सुरक्षित असूनही जगत नाही. ६५ परोऽप्यपत्यं हितकृद्यथौषधं
स्वदेहजोऽप्यामयवत्सुतोऽहितः । छिन्द्यात्तदङ्गं यदुतात्मनो हितं
शेषं सुखं जीवति यद्विवर्जनात् ।। ७।५।३७ परिणामी हितकारक असणान्या औषधाप्रमाणे एखादा परका पुरुष जर आपला हितकर्ता असेल, तर तोआपले अपत्यच समजला पाहिजे. आणि प्रत्यक्ष औरस पुत्र असूनही अहित करणारा असेल, तर तो रोगाप्रमाणे शत्रु समजला पाहिजे. फारतर काय, शरीराचा एखादा अवयव आपणांस अपायकारक असेल तर तो तोडून टाकावा. कारण तेवढ्या भागाचा त्याग केला असतां बाकीचे शरीर सुखाने जिवंत राहते.
For Private And Personal Use Only
Page #448
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२२
सार्थश्रीभागवत सुभाषितानि
६६ पुत्रदाराप्तवन्धूनां संगमः पान्थसंगमः ।। ११ ।१७/५३
पुत्र, स्त्री, आप्त आणि बांधव यांचा समागम केवळ पांथस्थ लोकांच्या सहवासासारखा क्षणिक आहे.
६७ पौरुषं दर्शयन्ति स्म शूरा न बहुभाषिणः || १० | ७७ १९
शूर पुरुष ( युद्धामध्यें ) पुष्कळ बोलून न दाखवितां आपला पराक्रमच करून दाखवितात.
६८ प्रभवो ह्यात्मनः स्तोत्रं जुगुप्सन्त्यपि विश्रुताः ४ । १५/२५ प्रख्यात असलेले समर्थ पुरुष आपल्या वर्णनीय पराक्रमाचीही स्तुति करवीत नाहींत. स्तुति ऐकण्याचा त्यांस कंटाळा येतो. ६९ प्रायेणाभ्यर्चितो देवो येऽप्रजा गृहमेधिनः ।
कदपत्यभृतं दुःखं ये न विन्दन्ति दुर्भरम् ||४|१३|४३
जे गृहस्थ निपुत्रिक आहेत त्यांनी बहुतकरून देवाचें चांगलें पूजन केले असले पाहिजे. कारण त्यांना कुपुत्रापासून होणारे अतिशय दुःसह दुःख मुळींच सोसावें लागत नाहीं. ( कुसंतानापेक्षां निसंतान बरें. )
७० बन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष एषां च संयमः ॥। ११ ।१८।२२ इंद्रियें विषयासक्त होणे हाच बंध व इंद्रियें विषयांपासून आवरून धरणें हाच मोक्ष होय.
७१ ब्राह्मणस्य हि देहोऽयं क्षुद्रकामाय नेष्यते ।
कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानन्तसुखाय च ।। ११।१७/४२ ब्राह्मणाचा देह संसारांतील तुच्छ विषय भोगण्यासाठीं नाहीं, तर या लोकीं, जिवंत असेपर्यंत कष्ट करून तप करण्याकरितां, आणि मरण पावल्यानंतर परलोकीं अनंत सुख भोगण्याकरितां आहे.
For Private And Personal Use Only
Page #449
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
२३
७२ ब्राह्मणः समदृक् शान्तो दीनानां समुपेक्षकः ।
स्रवते ब्रह्म तस्यापि भिन्नभाण्डात्पयो यथा ॥४।१४।४१ सर्व ठिकाणी समदृष्टि ठेवणारा व शांत असा ब्राह्मणही जर दीन जनांची उपेक्षा करील, तर त्याचेही तप ज्याप्रमाणे फुटक्या भांड्यांतून पाणी हळूहळू पाझरून जाते, त्याप्रमाणे उत्तरोत्तर क्षीण होत जाऊन शेवटीं नाहींसें होतें. ७३ ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत ॥१११११८ गुरु प्रेमळ शिष्याला रहस्यही सांगतात. ७४ भयं प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात्
यतः स आस्ते सहषट्सपत्नः। जितेन्द्रियस्यात्मरतेव॒धस्य
गृहाश्रमः किं नु करोत्यवद्यम् ॥५।१।१७ · आसक्ति उत्पन्न होईल या भीतीने इंद्रिये स्वाधीन नसलेला मनुष्य या वनांतून त्या वनांत जरी फिरत राहिला, तथापि तेथे त्याला संसारभय प्राप्त होतेच. कारण त्याच्याबरोबर कामक्रोधादि सहा शत्रु असतातच. बरें, इंद्रिये जिंकून आत्मस्वरूपी रममाण असणारा ज्ञाता पुरुष गृहस्थाश्रमांत राहिला, तरी त्याचे काय नुकसान होणार आहे ? कांहीं नाहीं. ७५ भूतानामिह संवासः प्रपायामिव सुव्रते ॥ ७।२।२१ ( हिरण्यकशिपु आपल्या मातेला म्हणतो. ) हे सुव्रते माते, पाणपोईवर जमलेल्या लोकांचा सहवास जसा क्षणिक असतो, त्याप्रमाणे या लोकामध्ये प्राण्यांचा समागम क्षणिक आहे.
For Private And Personal Use Only
Page #450
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
७६ भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते ॥११॥२७॥१८ (श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात.) ज्याच्या अंतःकरणांत भक्ति नाही त्याने पुष्कळ उपचार अर्पण केले तरी त्यापासून मला संतोष होत नाही. ७७ भौमान् रेणून स विममे यो विष्णोर्वर्णयेद्गुणान् ८५।६
श्रीविष्णूचे संपूर्ण गुण जो वर्णन करील, तो भूमीच्या रजःकणांचीही गणना करील. ७८ भ्रातरीशकृतः पाशो नृणां यः स्नेहसंज्ञितः ।
तंदुस्त्यजमहं मन्ये शूराणामपि योगिनाम् १०१८४६१ (वसुदेव नंदाला म्हणाला.) हे दादा, स्नेह नांवाचा जो मनुष्यांना पाशच आहे, तो ईश्वराने निर्माण केलेला असल्यामुळे शूर लोकांना व योगिजनांना देखील तोडण्यास मोठा कठीण आहे असें मी समजतो. ७९ मल्लानामशनिर्गुणां नरवरः स्त्रीणां स्मरो मूर्तिमान्
गोपानां स्वजनोऽसतां क्षितिभुजां शास्ता स्वपित्रोः शिशुः। मृत्युर्भोजपतेर्विराडविदुषां तत्त्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रङ्गं गतः साग्रजः ॥
१०॥४३॥१७ ( कंसाच्या रंगमंडपांत असलेल्या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या अभिप्रायाप्रमाणे श्रीकृष्ण भासला. ) चाणूरमुष्टिकादिक मल्लांना वज्र, सामान्य मनुष्यांना श्रेष्ठ पुरुष, स्त्रियांना मूर्तिमंत मदन, नंदादिक गोपांना स्वजन, दुष्ट राजांना शासन करणारा, वसुदेव देवकी यांना बालक, कंसाला मृत्यु, अज्ञ लोकांना मोठाच पराक्रम करणारा, योग्यांना परमात्मतत्त्व आणि यादवांना परमदेवता. याप्रमाणे श्रीकृष्ण बलरामासह रंगमंडपांत शिरला असतां, ज्यांच्या त्याच्या भावनेप्रमाणे एकच असून अनेकप्रकारचा भासला.
For Private And Personal Use Only
Page #451
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्री भागवतसुभाषितानि
८० महत्सेवां द्वारमाहुर्विमुक्तेः ||५/५/२
सत्पुरुषांची सेवा करणें हेंच मुक्तीचें द्वार आहे. असें म्हणतात. ८१ मातरं पितरं वृद्धं भार्यां साध्वीं सुतं शिशुम् ।
गुरुं विप्रं प्रपन्नं च कल्पोऽविभ्रच्छ्रसन्मृतः ।। १०।४५/७ जो पुरुष पालनपोषण करण्यास समर्थ असूनही वृद्ध आईबापांचें, पतिव्रता स्त्रीचें, लहान पुत्राचें, गुरूचें, ब्राह्मणाचें, व शरणागताचें रक्षण करीत नाहीं, तो जिवंत असून मेल्यासारखाच होय. ८२ मातरं पितरं भ्रातृन्सर्वांश्च सुहृदस्तथा ।
मन्ति सुतृपो लुब्धा राजानः प्रायशो भुवि ।। १०।१।६७ आपल्या प्राणांची तृप्ति करणारे व लोभी असलेले राजे बहुतकरून आई, बाप, भाऊ, त्याचप्रमाणें सर्वही मित्र यांचा सुद्धां वध करतात मग इतरांची कथा काय ?
८३ मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते ।
अद्य वाब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः ||१०|१|३८
२५
( वसुदेव कंसाला म्हणाला. ) हे वीरा, जन्मास आलेल्या प्राण्यांचा मृत्यु देहाबरोबरच उत्पन्न होतो. आज किंवा शंभर वर्षांनी तरी प्राण्यांना मृत्यु हा निश्चित प्राप्त होणार.
- ८४ मृत्युर्बुद्धिमताऽपोह्यो यावद्बुद्धिबलोदयम् ।
यद्यसौ न निवर्तेत नापराधोऽस्ति देहिनः || १०|१|४८
बुद्धिमान् पुरुषानें आपल्या बुद्धीची व बळाची पराकाष्टा करून प्राप्त झालेला मृत्यु चुकवावा. प्रयत्न करूनही मृत्यु टाळतां आला नाहीं, तर त्या प्राण्याकडे कांहीं दोष नाहीं.
For Private And Personal Use Only
Page #452
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
८५ य उद्धरेत्करं राजा प्रजा धर्मेष्वशिक्षयन् ।
प्रजानां शमलं मुझे भगं च स्वं जहाति सः॥४॥२॥२४ ( पृथुराजा सभासदांना म्हणाला. ) जो राजा प्रजांना धर्माविषयीं शिक्षण न देतां त्यांच्यापासून करभार मात्र ग्रहण करितो, त्याला प्रजांचें पाप भोगावे लागते. आणि तो आपल्या ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो. ८६ य उद्यतमनादृत्य कीनाशमभियाचते ।
क्षीयते तद्यशः स्फीतं मानश्वावज्ञया हतः॥३॥२२॥१३ जो पुरुष न मागतां प्राप्त झालेल्या वस्तूचा अनादर करून पुढे त्या वस्तूची याचना एखाद्या कृपण मनुष्याजवळ करतो, त्या पुरुषाचे यश जरी सर्व ठिकाणी पसरलेले असले तरी ते नाश पावतें, आणि लोकांमध्ये त्याची अवज्ञा होऊन मानखंडनाही होते. ८७ यत्पृथिव्यां व्रीहियवं हिरण्यं पशवः स्त्रियः ।
न दुह्यन्ति मनाप्रीतिं पुंसः कामहतस्य ते ॥९।१९।१३ ( ययाति देवयानीला म्हणतो.) तांदूळ, जव, सोने, पशु, स्त्रिया इत्यादि पृथ्वीवरील सर्व विषय, विषयवासनांनी ग्रस्त झालेल्या पुरुषाच्या मनाला संतोष देण्यासाठी कधीही पुरे पडत नाहीत. ८८ यथा प्रयान्ति संयान्ति स्रोतोवेगेन वालुकाः ।
संयुज्यन्ते वियुज्यन्ते तथा कालेन देहिनः ॥ ६॥१५॥३ ज्याप्रमाणे ( नदीच्या ) प्रवाहवेगाने वाळू एका ठिकाणी जमते व दूरही जाते. त्याप्रमाणे कालाच्या योगानें प्राण्यांचा समागम आणि वियोग हे घडत असतात.
For Private And Personal Use Only
Page #453
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
२७
८९ यदा न कुरुते भावं सर्वभूतेष्वमङ्गलम् ।
समदृष्टेस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः॥९।१९।१५ जो पुरुष प्राणिमात्राच्या अकल्याणाची इच्छा करीत नाही, आणि सर्वत्र समदृष्टि ठेवितो. त्याला सर्वही दिशा सुखमयच होतात, ९० यद्यदाचरति श्रेयानितरस्तत्तदीहते ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ६।२।४ श्रेष्ठ पुरुष जें जें कर्म करितो, तें तें कर्म इतर लोकही करतात, व तो श्रेष्ठ पुरुष जें शास्त्र प्रमाण मानितो, त्या शास्त्रालाच प्रमाण मानून इतर लोकही वागत असतात. ९१ ययोरात्मसमं वित्तं जन्मैश्वर्याकृतिर्भवः ।
तयोर्विवाहो मैत्री च नोत्तमाधमयोः क्वचित् १०।६०।१५ जात, कूळ, स्वरूपसौंदर्य, संपत्ति, ऐश्वर्य व उत्कर्ष ही परस्परांना अनुरूप ज्यांच्यामध्ये असतील, त्यांच्यामध्ये विवाहसंबंध घडून येतो व मैत्री जडते. श्रेष्ठ व कनिष्ठ यांच्यामध्ये विवाहसंबंध होत नाही व अशा लोकांची मैत्रीही जुळत नाही. ९२ यशो यशस्विनां शुद्धं
श्लाघ्या ये गुणिनां गुणाः । लोभः स्वल्पोऽपि तान् हन्ति
श्वित्रो रूपमिवेप्सितम् ॥ ११॥२३॥१६ . ज्याप्रमाणे श्वेतकुष्ठाच्या योगाने सुंदर रूपाला कमीपणा येतो, त्याप्रमाणे स्वल्प असलेलाही लोभ यशस्वी पुरुषांच्या निर्मल यशाचा व गुणी पुरुषांच्या स्तुत्य गुणांचा नाश करतो.
For Private And Personal Use Only
Page #454
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
९३ यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धेः परं गतः ।
तावुमौ सुखमेधेते क्लिश्यत्यन्तरितो जनः॥ ३७१७ देहादिकांच्या ठिकाणी अत्यंत आसक्त असलेला परममूर्ख व प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परमेश्वरस्वरूपाला प्राप्त झालेला. ज्ञानी हे दोघे सुखाने राहतात. यांच्या स्थितींच्या मधल्या अवस्थेत असणारा हा मात्र अतिशय क्लेश भोगितो. ( जो केवळ अज्ञानी तो एक सुखी किंवा जो पूर्ण ज्ञानी तो एक सुखी. परंतु धड ज्ञानी नाही व अज्ञानीही नाहीं, तो अतिशय दुःखी असतो.) ९४ यस्य राष्ट्र प्रजाः सर्वास्त्रस्यन्ते साध्व्यसाधुभिः ।
तस्य मत्तस्य नश्यन्ति कीर्तिरायुभगो गतिः॥१।१७।१० (परीक्षिति राजा गोरूप धारण केलेल्या पृथ्वीला म्हणतो.) हे साध्वि, ज्या राजाच्या राष्ट्रांतील निरपराधी लोकांना दुष्टांपासून त्रास उत्पन्न होतो, त्या मत्त झालेल्या राजाची कीर्ति, आयुष्य भाग्य व परलोक ही सर्वही नाश पावतात. ९५ सा दुस्त्यजा दुर्मतिभिर्जीयतो या न जीर्यते ।
तां तृष्णां दुःखनिवहां शर्मकामो द्रुतं त्यजेत् ॥९।१९।१६ दुर्बुद्धि असलेल्या पुरुषाला विषयतृष्णा सोडवत नाही. तो जरी वृद्ध झाला तरी विषयांची तृष्णा कमी होत नाही. या विषयतृष्णेमुळे अतिशय दुःखें प्राप्त होतात, हे जाणून कल्याणेच्छु पुरुषाने हिचा सत्वर त्याग करावा. ९६ यावद्भियेत जठरं तावत्स्वत्वं हि देहिनाम् । ___ अधिकं योऽभिमन्येत स स्तेनो दण्डमर्हति ॥७१४८
आपले पोट भरण्यास जितकें अन्न लागेल, तितकेंच अन्न खरोखर आपलें आहे असे म्हणता येईल. त्यापेक्षा अधिकावर जो आसक्ति ठेवितो, तो केवळ चोर होय. तो दंडाला पात्र होतो.
For Private And Personal Use Only
Page #455
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
२९.
२९.
९७ योऽनित्येन शरीरेण ___ सतां गेयं यशो ध्रुवम् । नाचिनोति स्वयं कल्पः
स वाच्यः शोच्य एव सः॥१०॥७२।२० जो प्राणी स्वतः समर्थ असूनही आपल्या अनित्य शरीराने साधूंना गायन करण्यास योग्य असें शाश्वत यश संपादन करीत नाहीं, तो निंद्य होय व भाग्यहीनपणामुळे शोक करण्यासही योग्य होय. (त्याची कीव करावी तितकी थोडीच.) ९८ यो वा अनन्तस्य गुणाननन्तान्
अनुक्रमिष्यन्स तु बालबुद्धिः। रजांसि भूमेर्गणयेत्कथंचित्
कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः॥११॥४ार जो पुरुष अनंताच्या अनंत गुणांची गणना करण्यास तयार होईल तो मंदबुद्धि समजला पाहिजे. कारण कोणी एखादा महाबुद्धिमान पुरुष दीर्घकालपर्यंत मोठा प्रयत्न करून कदाचित् भूमीच्या रजःकणांची गणना करील, परंतु सर्व शक्तींचा आश्रय अशा भगवंताच्या गुणांची गणना करण्यास तो समर्थ होणार नाही. ९९ राज्ञो हि परमो धर्मः स्वधर्मस्थानुपालनम् ।
शासतोऽन्यान् यथाशास्त्रमनापद्युत्पथानिह ॥१।१७।१६ आपत्काल नसतां भलत्याच मार्गाने (शास्त्रविरुद्धमार्गाने) जाणान्या अधार्मिक लोकांस यथाशास्त्र शासन करून स्वधर्मनिष्ठ सज्जनांचें निरंतर पालन करणे हाच राजाचा मुख्य धर्म होय.
For Private And Personal Use Only
Page #456
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१०० लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते
___ मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः । तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावत्
निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात्॥११।९।२९ अनित्य असूनही सर्व पुरुषार्थ साधून देणारा म्हणूनच अत्यंत दुर्लभ असा नरदेह यालोकी पुष्कळ जन्म घेतल्यानंतर भाग्याने प्राप्त झाला असतां, हा वारंवार मरणारा आहे म्हणून जोपर्यंत हा पडला नाही, तोपर्यंतच धैर्यवान् पुरुषाने मोठ्या त्वरेनें मोक्ष मिळविण्यासाठी यत्न करावा. केवळ विषयसेवन हे श्वानसूकरादिक योनींमध्येही प्राप्त होतेच, त्यासाठी यत्न कशाला ? १०१ विक्रीडतोऽमृताम्भोधौ किं क्षुद्रैःखातकोदकैः ६।१२।२२
अमृताच्या सागरामध्ये क्रीडा करणाऱ्याला लहानशा खाचेतील ( खळग्यांतील) पाण्याचे काय महत्त्व आहे ? कांहींच नाही. १०२ श्रेयः कुर्वन्ति भूतानां साधवो दुस्त्यजासुभिः।।८।२०१७
साधु लोक त्याग करण्यास कठीण अशा प्राणांच्या योगानेही प्राण्यांवर उपकार करितात. १०३ षड्वर्गसंयमैकान्ताः सर्वा नियमचोदनाः॥७१५।२८
सर्वही नियमविधींचे पर्यवसान कामक्रोधादि सहा शत्रूचें संयमन करण्यामध्येच आहे. १०४ संसारेऽस्मिन्क्षणार्थोऽपि सत्सङ्ग शेवधिर्नृणाम्११।२।३०
एखादा द्रव्याचा निधि प्राप्त झाला असतां जसा आनंद होतो, तसा या संसारामध्ये मनुष्यांना अर्धा क्षणभर सुद्धां घडलेल्या सत्समागमापासून आनंद होतो.
For Private And Personal Use Only
Page #457
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१०५ संकीर्त्यमानो भगवाननन्तः
- श्रुतानुभावो व्यसनं हि पुंसाम् । प्रविश्य चित्तं विधुनोत्यशेष
यथातमोऽर्कोऽभ्रमिवातिवातः॥ १२।१२।४७ ज्याप्रमाणे सूर्य अंधकाराचा नाश करतो, किंवा प्रचंड वारा मेघांना वितळून नाहींसें करितो, त्याप्रमाणे भगवान् अनंताचें कीर्तन केले असतां, अथवा त्याचा प्रभाव श्रवण केला असतां तो भगवान् कीर्तन किंवा श्रवण करणा-या मनुष्यांच्या हृदयांत प्रवेश करून त्यांची सर्व दुःखें नाहींशी करितो. १०६ संनिकर्षोत्र मानामनादरणकारणम् । गाङ्गं हित्वा यथान्याम्भस्तत्रत्यो याति शुद्धये ॥
१०८४१३१ या लोकीं अत्यंत सहवास असला म्हणजे मनुष्यांना अनादर उत्पन्न होतो. गंगेच्या तीरीं राहणारा मनुष्य शुद्धतेसाठी गंगोदक सोडून दुसन्या तीर्थाच्या उदकाकडे जात असतो. १०७ संभावितस्य स्वजनात्पराभवो
यदा स सद्यो मरणाय कल्पते ॥ ४।३।२५ संभावित मनुष्याचा आप्तजनांकडून अपमान झाला म्हणजे त्याचवेळी त्याला तो अपमान मरणासारखा वाटतो. (अपमानापेक्षा मरण बरे, असे त्याला होते.) १०८ सर्वार्थसंभवो देहो जनितः पोषितो यतः।
न तयोर्याति निर्वेशं पित्रोर्मर्त्यः शतायुषा ॥१०॥४५।५ सर्व पुरुषार्थ संपादन करून देणारा देह ज्यांच्यापासून उत्पन्न झाला, व ज्यांनी त्याचे पोषण केले, त्या आईबापांचे ऋण फेडणे हे शंभर वर्षे जगूनही घडत नाही.
For Private And Personal Use Only
Page #458
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि १०९ सर्वाश्रमानुपादाय खाश्रमेण कलत्रवान् ।
व्यसनार्णवमत्येति जलयानैर्यथार्णवम् ॥३।१४।१७ ज्याप्रमाणे नावाडी नौकेच्या योगाने दुसऱ्या लोकांसह समुद्रांतून तरून जातो, त्याप्रमाणे सपत्नीक पुरुष आपल्या गृहस्थाश्रमाच्या योगाने इतर आश्रमी लोकांस बरोबर घेऊन (त्यांना अन्नवस्त्रादिक देऊन ) संकटरूपी सागरांतून तरून जातो. ११. सर्वाः समुद्धरेद्राजा पितेव व्यसनात्प्रजाः॥११।१७।४५
ज्याप्रमाणे बाप आपल्या मुलांना संकटांतून सोडवितो, त्याप्रमाणे राजाने आपल्या प्रजांना संकटांतून सोडवावें. १११ साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहम् ।
मदन्यत्ते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि ॥९।४।६८ (भगवान् विष्णु दुर्वास ऋषींना म्हणाले.) साधु हे माझें हृदय आहेत (साधु हे मला फार प्रिय आहेत ) आणि मी साधूंचे हृदय आहे ( मी त्यांना फार प्रिय आहे) कारण ते माझ्याहून दुसरी प्रिय वस्तु कोणतीही जाणत नाहीत आणि मीही त्यांच्याहून प्रिय असलेली दुसरी स्वल्पही वस्तू जाणत नाही. ११२ साधुषु प्रहितं तेजः प्रहर्तुः कुरुतेऽशिवम् ॥९।४।६९
साधूंवर गाजविलेलाप्रभाव प्रहार करणान्याचेच अकल्याण करितो. ११३ सुखदुःखदो न चान्योऽस्ति
यतः स्वकृतभुक् पुमान् ॥१०॥५४॥३८ मनुष्याला सुख किंवा दुःख देणारा दुसरा कोणीच नाही. तर तो आपण स्वतः केलेल्या कर्मानेच सुख किंवा दुःख भोगीत असतो.
For Private And Personal Use Only
Page #459
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
११४ सुलभा युधि विप्रर्षे ह्यनिवृत्तास्तनुत्यजः ।
न तथा तीर्थ आयाते श्रद्धया ये धनत्यजः॥ ८॥२०१९ (बली शुक्राचार्यांना सांगतो.) हे ब्रह्मर्षे, युद्धामध्ये परत न 'फिरतां देहाचा त्याग करणारे लोक या लोकी जसे पुष्कळ आढळतात, तसे सत्पात्रीं श्रद्धापूर्वक द्रव्य देणारे लोक पुष्कळ आढळत नाहीत. ११५ स्त्रीषु नर्म विवाहे च
वृत्त्यर्थे प्राणसंकटे। गोब्राह्मणार्थे हिंसायां
नानृतं स्याज्जुगुप्सितम् ॥ ८।१९।४३ स्त्रियांना अधीन ठेवणे, विनोद, विवाह, उपजीविका, प्राणसंकट, गोब्राह्मणांचे हित, आणि हिंसा टाळणे या प्रसंगी असत्य भाषण केले असतां तें निंद्य ठरत नाही. ११६ स्नेहानुबन्धो बन्धूनां मुनेरपि सुदुस्त्यजः ॥ १०॥४७५
बांधवांच्या स्नेहाचा संबंध सोडून देणे, हे एखाद्या मननशील मुनीला देखील कठीण जाते. ११७ स्वयं हि तीर्थानि पुनन्ति सन्तः ॥ १।१९।८
सत्पुरुष तीर्थाना स्वतः पवित्र करीत असतात.
-
For Private And Personal Use Only
Page #460
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
विषयसूची
विषयः क्रमाङ्कः | विषयः क्रमाङ्क: अनृतम् ११५
कालः २६ । ४४ अपत्यम् ६५/६९
गुणः ७७ । ९२ । ९८ अर्थः ८५०५५
गुरुः १।६।१९ । २० । असन् ९/५२
३२। ६० । ७३। ८१ असाधुः २८
गृहस्थाश्रमः ६९/७४ आनन्दः ४८
चिन्ता ४८ आयुः १२१९४
जननी ३२ आशा १३
जीवितम् ३७ इन्द्रियम् १४।४३७०।७४ तपः २७ । ७१ ईश्वरः १५।४०।४९।५३ तीर्थम् ५८। ११४ । ११७ उपकारः ११
तृष्णा ९५ कर्म २५१:३७ । ३८ ॥ ५७ दण्डः ९६ कलत्रम् १०९
दारिद्यम् ९ कामः १७।३०।४२।५०५१। दिष्टम् ६४
७१ । ८७ । ८८ दीनः २२ । ७२
For Private And Personal Use Only
Page #461
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
विषयसूर्च.
दुःखम् १३ । २५ । ३७। मरणम् ३७ । १०७
६९ । ९५ । ११३ । महान् १२ । ४६ । ८० दुरुक्तिः ३९
मृत्युः ३२ । ३४ । ३५। देहः ( मानुषः ) ३१ । ३३॥ ८३ । ८४
४५। ६०।६१। ७१ । मैत्री ९१ १००
मोक्षः ७०। ८० धर्मः १२ । २१ । ३१॥ यशः१२१८६ । ९२ । ९७ ४९। ५०
याचना ५३ पतिः ३२
योगः २४ पिता ३२। ८१।८२।१०८
योगी ५। ७८ पुत्रः १६ । २०
रसनम् १४ । ४३ पौरुषम् ५४ । ६७
राजा २३ । ८२ । ८५ । प्रभुः २२ । ६८
९४ । ९९ । ११० बन्धः ७०
लाभः ७।३३ ब्राह्मणः ७१ । ७२ । ११५ लोभः ९२ भक्तः४।१०। ७६ विद्या २७ । ३८ भक्तिः ६३
विवाहः ९१ । ११५ भवः ६०
शिष्यः १९ । ७३ मनः २४ । २७ । ४७।८७ | शूरः ५४ । ६७ । ७८
-
-
-
For Private And Personal Use Only
Page #462
--------------------------------------------------------------------------
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
mmmmmmmmmmmmmmmmmmmm - mmm
श्रीः ९।१२
साधुः ७।४१।४६ । ५८। श्रेयः २९॥५०॥१००।१०२ १०२।१११ । ११२ श्रेयान् ९०
सुखम् १३ । २५। ३० । ३७ संवासः ६१ । ६२ । ७५ __ ७१। ८९ । ९३ । ११३ संकटम् ५३
स्तेनः ९६ संगमः ६६
स्त्री २७ । ११५ सन् १०४।११७
स्नेहः ७८ । ११६ सभा ५६
स्वार्थः ५३ समदृक् २८ । ७२ । ८९ हिंसा ११५
-
-
-
-
( सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन) मुद्रक-रा. रा. रघुनाथ रामचंद्र बखले, मुंबईवैभव प्रेस,
सव्हॅटस् ऑफ इंडिया सोसायटी, गिरगांव, मुंबई.
प्रकाशक-केशव भिकाजी ढवळे, ( रामचंद्र बिल्डिंग )
गिरगांव, मुंबई.
For Private And Personal Use Only
Page #463
--------------------------------------------------------------------------
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir Sering Jinshasan 092555 gyanmandir@kobatirth.org For Private And Personal Use Only