________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४०३ ये शोकमनुवर्तन्ते न तेषां विद्यते सुखम् ।
तेजश्व क्षयते तेषां न त्वं शोचितुमर्हसि ॥४७१२ ( सुग्रीव रामाला म्हणतो.) जे शोकाला अनुसरून वागतात, त्यांना सुख होत नाही. त्यांच्या तेजाचा क्षय होतो. म्हणून तूं शोक करूं नकोस. ४०४ यो विषादं प्रसहते विक्रमे समुपस्थिते ।।
तेजसा तस्य हीनस्य पुरुषार्थो न सिध्यति ॥४६४।१० ( अंगद वानरांना म्हणतो.) पराक्रम करून दाखविण्याचा प्रसंग आला असतां जो पुरुष खिन्न होऊन बसतो, त्या तेजोहीन पुरुषाचा मनोरथ कधीही सिद्धीस जात नाही. ४०५ यो हि कालव्यतीतेषु मित्रकार्येषु वर्तते ।।
स कृत्वा महतोऽप्यर्थान्न मित्रार्थेन युज्यते ॥४।२९।१५ जो योग्य काल निघून गेला असतां, मित्रका करितां प्रयत्न करितो, त्याने मोठमोठी कार्ये केली, तरी मित्रकार्य सिद्धीस नेल्याचे फळ त्याला प्राप्त होत नाही. ४०६ यो हि दत्त्वा द्विपश्रेष्ठं कक्ष्यायां कुरुते मनः। । रज्जुस्नेहेन किं तस्य त्यजतः कुञ्जरोत्तमम् ॥ २॥३७॥३ (राम दशरथाला म्हणतो.) श्रेष्ठ हत्तीचे दान करून जो त्याला बांधावयाच्या दोरीवर मन ठेवील, (तर तें आश्चर्य होय.) त्याला उत्तम हत्तीचा त्याग केल्यानंतर त्या दोरीशी काय कर्तव्य असते ? ४०७ यो हि भृत्यो नियुक्तः सन्भत्रों कर्मणि दुष्करे।
कुर्यात्तदनुरागेण तमाहुः पुरुषोत्तमम् ॥६।१७ धन्याने दुर्घट कार्याकडे योजना केली असतां तें कार्य पार पाडून त्याच्या ठिकाणी प्रेम असल्यामुळे जो सेवक दुसरेही कार्य शेवटास नेतो, तो उत्तम पुरुष होय.
For Private And Personal Use Only