________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९०
सार्थ श्रीरामायण सुभाषितानि
४३० वाहि वात यतः कान्ता तां स्पृष्ट्वा मामपि स्पृश । त्वयि मे गात्रसंस्पर्शश्चन्द्रे दृष्टिसमागमः || ६ | ५ | ६
( सीताविरहामुळें शोकाकुल झालेला राम वाऱ्याला म्हणतो. ) हे वायो, ज्या ठिकाणीं माझी कांता आहे, तेथें जा, आणि तिला स्पर्श करून ये, नंतर मला स्पर्श कर. कारण, चंद्र दृष्टीस पडला असतां ज्याप्रमाणें उष्णतेमुळे झालेला संताप नाहींसा होतो, त्याप्रमाणें कांतेच्या शरीराला स्पर्श करून तूं मला स्पर्श केलास, म्हणजे माझा विरहजन्य संताप कांहीं कमी होईल.
४३१ विवो वीर्यहीनो यः सदैवमनुवर्तते । वीराः संभावितात्मानो न दैवं पर्युपासते ।। २।२३।१७
जो भित्रा आणि पराक्रमहीन असतो, तो देवाच्या मार्गे लागतो.. वीर आणि अबूदार पुरुष दैवाची कास धरून बसत नाहींत.
४३२ विगर्हितं च नीचं च कथमार्योऽभिधास्यति ।
त्राहीति वचनं सीते
दिशानपि || ३|५९।११
( लक्ष्मण म्हणतो. ) हे सीते; जो देवांचेही रक्षण करूं शकेल तो आर्य राम ' लक्ष्मणा, माझें संरक्षण कर ' हें क्षत्रियाला अयोग्य आणि म्हणूनच निंद्य असे शब्द कसे उच्चारील ?
For Private And Personal Use Only