________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२४
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१३५ अहिंसा परमो धर्मः ॥ ३।२०७/७४
अहिंसा हा परमश्रेष्ठ धर्म होय. १३६ अहिंसायां तु निरता यतयो द्विजसत्तम ।
कुर्वन्त्येव हि हिंसां ते यत्नादल्पतरा भवेत् ॥३।२०८।३४ (धर्मव्याध ब्राह्मणाला म्हणाला) अहिंसेकरितां झटणाऱ्या यतींच्या हातून देखील हिंसा घडतेच; मात्र ती टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे फार थोडी घडते. १३७ अहिंसार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम् ।
यास्यादहिंसासंयुक्तःस धर्म इति निश्चयः॥१२।१०९।१२ प्राण्यांना पीडा होऊ नये एवढ्यासाठीच धर्म सांगितला आहे. जो अहिसेनें युक्त असेल तोच धर्म, हा सिद्धांत आहे. १३८ अहिंसा सत्यवचनं सर्वभूतेषु चार्जवम् ।
क्षमा चैवाप्रमादश्च यस्यैते स सुखी भवेत् ।। १२।२१५/६ अहिंसा, सत्य भाषण, सर्वांशी सरळपणाची वागणूक, क्षमाशीलता व सावधानता हे गुण ज्याच्यापाशी असतील तो सुखी होईल. १३९ अहिंसाऽसाधुहिंसेति श्रेयान्धर्मपरिग्रहः ॥ १२।१५।४९
दुष्टांची हिंसा ही धर्मशास्त्राप्रमाणे अहिंसाच होय असे मानणे युक्त आहे. १४० अहो बत महत्कष्टं विपरीतमिदं जगत् । ___ येनापत्रपते साधुरसाधुस्तेन तुष्यति ॥ ३२।६४
अरेरे ! मोठी दुःखाची गोष्ट की, या जगाची रीत विपरीत आहे. ज्याच्या योगानं सज्जनाला खेद होतो त्यानेच दुर्जनाला संतोष वाटतो. १४१ अहो ह्यनित्यं मानुष्यं जलबुद्धदचञ्चलम् ।। ७७८११७ पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे मनुष्याचें जीवित किती क्षणभंगुर आहे !
For Private And Personal Use Only