________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३३९ भर्तुः शुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् ।
अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात् ।।२।२४।२७ ( राम कौसल्येला म्हणतो.) जी स्त्री देवादिकांस नमस्कार करीत नाही, किंवा त्यांचे पूजन करीत नाही, केवळ भर्त्याची शुश्रूषा करिते, त्या स्त्रीला उत्कृष्ट स्वर्ग प्राप्त होतो. ३४० भवान्कलनमस्माकं स्वामिभावे व्यवस्थितः ।
स्वामी कलत्रं सैन्यस्य गतिरेषा परंतप ॥ ४।६५।२३ (जांबवान अंगदाला म्हणतो.) स्वामी या नात्याने असलेला तूं आम्हांला भार्येच्या स्थानी आहेस. (भाने भायेचे रक्षण करणे जसें अत्यंत अवश्य आहे, तसे आम्ही सर्व वानरांनी जिवांत जीव आहे तोपर्यंत तुझें रक्षण करणे अवश्य आहे.) हे शत्रुतापना, स्वामी हीच सैन्याची भार्या होय. तोच सैन्याचा आधार आहे. ३४१ भावज्ञेन कृतज्ञेन धर्मज्ञेन च लक्ष्मण ।
त्वया पुत्रेण धमोत्मा न संवृत्तः पिता मम ॥३॥१५/२९ - (पर्णशालेमध्ये तयार केलेला आश्रम पाहून संतुष्ट झालेला राम लक्ष्मणाला म्हणतो.) हे लक्ष्मणा, तूं माझ्या मनांतील अभिप्राय जाणणारा आहेस. तूं कृतज्ञ आहेस, धर्मज्ञ आहेस; असा तूं पुत्र असल्यामुळे माझा धर्मात्मा पिता ( दशरथ) मरण पावलाच नाहीं असे मला वाटते. ( कारण तूंच माझें पित्याप्रमाणे परिपालन करीत आहेस.) ३४२ भूताश्चार्था विनश्यन्ति देशकालविरोधिताः ।
विक्लवं दूतमासाद्य तमः सूर्योदये यथा ।। ५।२।३७ सूर्योदय झाला असतां ज्याप्रमाणे अंधकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे अयोग्य दूताची गांठ पडली असतां, देश व काल विरुद्ध झाल्या कारणाने जवळ जवळ सिद्धीस गेलेलीही कार्ये नाहींशी होत असतात.
For Private And Personal Use Only