________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५२
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९५१ सन्ति पुत्राः सुबहवो दरिद्राणामनिच्छताम् ।
नास्ति पुत्र:समृद्धानांविचित्रं विधिचेष्टितम् ।।१२।२८।२४ दरिद्री लोकांना इच्छा नसतां पुष्कळ मुलगे होतात आणि कित्येक श्रीमंतांना मुलगा नसतो. दैवाची लीला विचित्र आहे. ९५२ संतोषो वै श्रियं हन्ति ह्यभिमानं च भारत ।
__अनुक्रोशभये चोभे यैठूतो नाश्नुते महत् ॥ २।४९।१४ . [ दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो ] अल्पसंतुष्ट राहिल्याने ऐश्वर्याचा व स्वाभिमानाचा नाश होतो. दया आणि भय यांचीही गोष्ट अशीच. यांचा मनुष्यावर पगडा बसला म्हणजे मोठेपणाचें नांवच घ्यावयास नको ! ९५३ संनिमजेजगदिदं गम्भीरे कालसागरे ।
जरामृत्युमहाग्राहे न कश्चिदवबुध्यते ॥ १२॥२८॥४४ ... जरामृत्युरूपी मोठमोठ्या नकांनी व्याप्त असलेल्या खोल अशा कालसागरांत हैं सर्व जग (एक दिवस ) बुडून जाईल हे कोणाच्याच लक्ष्यांत येत नाही ! ९५४ सपत्नसहिते कार्ये कृत्वा संधिं न विश्वसेत् ।
अपकामेत्ततः शीघ्रं कृतकार्यो विचक्षणः।।१२।१४०।१४ ' में कार्य केले असतां शत्रूचे आणि आपलें सारखेच हित होईल, त्या कार्यापुरता शत्रूशी समेट करावा. तथापि त्याजवर विश्वास ठेवू नये; आणि कार्य झाले म्हणजे सुज्ञ मनुष्याने लागलेच शत्रूपासून दूर व्हावें. ९५५ समत्वं योग उच्यते ॥ ६२६४८
(सुखदुःख, यशापयश इत्यादि द्वंद्वांविषयी सारखी बुद्धि ठेवणे अशा प्रकारच्या) समत्वबुद्धीला योग असे म्हणतात. ९५६ समर्थ वाऽसमर्थ वा कृशं वाप्यकृशं तथा ।
रक्षत्येव सुतं माता नान्यः पोष्टा विधानतः ॥१२२२६६।२९ समर्थ असो वा असमर्थ असो, कृश असो वा लठ्ठ असो, मुलगा कसाहि असला तरी, आईच त्याचा प्रतिपाळ करते. तसें पोषण करणारा दुसरा कोणी नाही.
For Private And Personal Use Only