________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२९
१४० गृह्यन्ते यदि रोषेण त्वादशोऽपि विचक्षणाः। __ ततः शास्त्रविपश्चित्त्वं श्रम एव हि केवलम् ॥५॥५२।८ (बिभीषण रावणाला म्हणतो) तुझ्यासारखे शहाणे लोक जर क्रोधाधीन होतात, तर मग शास्त्रांमध्ये पांडित्य संपादन करणे म्हणजे केवळ वृथा श्रमच होत. १४१ गोने चैव सुरापे च चौरे भगवते तथा । निष्कृतिर्विहिता सद्भिः कृतघ्ने नास्ति निष्कृतिः॥४॥३४।१२
गोहत्या करणाराला, सुरापान करणाराला, चोराला, व्रतभंग करणाराला, सज्जनांनी प्रायश्चित्त सांगितले आहे; परंतु कृतघ्नाला प्रायश्चित्त सांगितले नाही. १४२ गोदावरी प्रवेक्ष्यामि हीना रामेण लक्ष्मण । - आबन्धिष्येऽथवा त्यक्ष्ये विषमे देहमात्मनः॥॥३॥४५॥३७
पिबामि वा विषं तीक्ष्णं प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
न त्वहं राघवादन्यं कदापि पुरुषं स्पृशे ॥ ३१४५।३८ (सीता म्हणते ) हे लक्ष्मणा, रामाचा वियोग झाला असतां मी गोदावरीमध्ये उडी टाकीन, गळ्याला फास लावून घेईन, कड्यावर उभी राहून तेथून आपला देह लोटून देईन, नाहीतर तीक्ष्ण विष सेवन करीन अथवा अग्नीमध्ये प्रवेश करीन. परंतु रामावांचून इतर पुरुषाला मी कधीहि स्पर्श करणार नाही. १४३ गोब्राह्मणहितार्थाय देशस्य च हिताय च।
तव चैवाप्रमेयस्य वचनं कर्तुमुद्यतः ॥ १।२६।५ (विश्वामित्र मुनींनी ताटकेचा वध करण्याविषयी रामाला सांगितलें असतां राम विश्वामित्रांना म्हणतो ) गोब्राह्मणांच्या हिताकरितां आणि देशाच्या कल्याणाकरितां अतयं प्रभावाने युक्त जे आपण त्या आपल्या आज्ञेप्रमाणे वागण्यास मी तयार आहे.
For Private And Personal Use Only