________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
३९३ यस्य भृत्याश्च दासाश्च मृष्टान्यन्नानि भुञ्जते ।
कथं स भोक्ष्यते रामो वने मूलफलान्ययम् ॥२।२४।३ (कौसल्या म्हणते.) ज्याचे नोकर आणि ज्याचे दास मिष्टान्न भोजन करीत आहेत, असा हा राम वनामध्ये मुळे आणि फळे खाऊन कसा राहणार ? ३९४ यस्याः पुत्रसहस्राणि सापि शोचति कामधुक् ।
किं पुनः विना रामं कौसल्या वर्तयिष्यति॥२७४।२८ जिला हजारों पुत्र आहेत, ती कामधेनु देखील (आपल्या पुत्रांना दुःखी पाहून ) शोक करिते, (मग जिला एकच पुत्र आहे ) अशी कौसल्या रामावांचून ( रामाला वनांत होणारे क्लेश मनांत आणून) कसे बरे जीवन धारण करील ? ३९५ यस्यार्था धर्मकामार्थास्तस्य सर्व प्रदक्षिणम् ।
अधनेनार्थकामेन नार्थः शक्यं विचिन्वता ॥६८३।३८ ज्याच्यापाशी द्रव्य असेल त्याचेच धर्म, अर्थ व काम हे पुरुषार्थ सिद्धीस जातात. सर्व काही त्याला अनुकूल असते. द्रव्याची इच्छा करणारा मनुष्य शोधक असला तरी दरिद्री असल्यास त्याला द्रव्यप्राप्ति होणार नाही. (आरंभी थोडे तरी द्रव्य असल्यावांचून द्रव्य मिळणे शक्य नाही.) ३९६ यस्यास्तिस्य मित्राणि यस्यास्तिस्य बान्धवाः ।
यस्यार्थाः स पुमाँल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः॥६।८३॥३५ • ज्याच्याजवळ पैसा आहे, त्याला मित्र आणि बांधव यांची प्राप्ति होते. ज्याच्याजवळ संपत्ति आहे, तोच जगांत मनुष्य, आणि तोच जगांत पंडित.
For Private And Personal Use Only