________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४ सार्थश्रीरामायणसुभाषितानि ६२ आनृशंस्यं परो धर्मः ॥ ५।३८।३९ (प्राणिमात्रावर ) दया करणे हाच श्रेष्ठ धर्म होय. ६३ आभिजात्यं हि ते मन्ये यथा मातुस्तथैव च ।
नहि निम्बात्स्रवेत्क्षौद्रं लोके निगदितं वचः।।२।३५।१७ ( सुमंत्र सारथि कैकेयीला धिक्कारपूर्वक म्हणतो) तुझा कुलीनपणा तुझ्या आईप्रमाणेच मी समजत आहे! ( तुझ्या आईप्रमाणेच तूं दुष्ट आहेस.) 'लिंबाच्या झाडांतून कधी मध पाघळत नाही' ही म्हण लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. ६४ आनं छित्त्वा कुठारेण निम्बं परिचरेत्तु कः।
यश्चैनं पयसा सिञ्चन्नैवास्य मधुरो भवेत् ।। २।३५।१६ आंब्याचे झाड कु-हाडीने तोडून टाकून लिंबाच्या झाडाची जोपासना कोण करणार आहे ? कारण, या लिंबाच्या झाडाला जो पाणी घालील त्याच्याकरिता ते कधी मधुर होणार नाही. ६५ आयस्ते विपुलः कञ्चित्कच्चिदल्पतरो व्ययः ।
अपात्रेषु न ते कच्चिकोशो गच्छति राघव ॥२॥१००।५४ (राम भरताला विचारतो.) हे राघवा, तुझी प्राप्ति विपुल आहेना? तुझा खर्च अति अल्प आहेना ? तुझ्या खजिन्यांतील द्रव्य अपात्रीं खर्च होत नाहींना ? ६६ आराधिता हि शीलेन प्रयत्नश्वोपसेविताः।
राजानः संप्रसीदन्ति प्रकुप्यन्ति विपर्यये ॥ २।२६।३५ राजे लोकांची सद्वर्तनाने आराधना आणि प्रयत्नपूर्वक सेवा केली असतां ते प्रसन्न होतात. याच्या उलट वर्तनाने ते क्रुद्ध होतात.
For Private And Personal Use Only