________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
१३
३३ जन्मलाभः परः पुंसामन्ते नारायणस्मृतिः ॥२।१६
अंतकाळी नारायणाची स्मृति होणे हाच मनुष्यजन्म प्राप्त झाल्याचा मोठा लाभ होय. ३४ जातस्य मृत्युर्बुव एष सर्वतः
प्रतिक्रिया यस्य न चेह कृता । लोको यशश्वाथ ततो यदि ह्यमुं
को नाम मृत्युं न वृणीत युक्तम् ॥६॥१०॥३२ उत्पन्न झालेल्या प्राण्याला तो कोठेही गेला तरी मृत्यु निःसंशय येणारच. या लोकी मृत्यु टाळण्याचा उपाय ईश्वराने निर्माण केला नाही. म्हणून या मृत्यूपासून जर इहलोकीं यश आणि परलोकीं स्वर्ग ही प्राप्त होत असतील, तर या प्राप्त झालेल्या योग्य मृत्यूचा कोण बरें स्वीकार करणार नाही ? सर्वही करतीलच. ३५ जिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः ।
मृत्युमृच्छत्यसद्बुद्धिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥ ११।८।१९ ज्याप्रमाणे मासा आमिष लाविलेल्या गळाच्या (लोहकंटकाच्या) योगाने मृत्युमुखी पडतो, त्याप्रमाणे रससेवनाविषयीं आसक्त झालेला दुर्बुद्धि मनुष्य उच्छृखल, दुर्जय अशा जिव्हेच्या योगाने मृत्युमुखांत पडतो. ३६ जिह्वां कचित्संदशति स्वदद्भिः
तद्वेदनायां कतमाय कुप्येत् ॥ ११॥२३॥५१ केव्हां तरी मनुष्य आपल्याच दांतांनी आपली जीभ चावतो, त्यावेळी होणान्या वेदनांमुळे त्याने कोणावर रागें भरावें? (दांतांना रागें भरून ताडण करावें तर आपणांलाच दुसरी पीडा होईल.)
For Private And Personal Use Only