________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
....mmmmmmmm
३० कोन्वर्थः सुखयत्येनं कामो वा मृत्युरन्तिके ।
आघातं नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिदः॥११।१०।२० या जीवाच्या संनिध मृत्यु उभा आहे अशा स्थितीत कोणता धनादि पदार्थ किंवा शब्दादि विषय त्याला सुख देणार आहे ? वध्य पुरुषाला वध करण्याच्या जागेकडे नेत असतां, त्यावेळी माळा, चंदन, मिष्टान्न इत्यादि पदार्थ दिले असतां, ते त्याला सुखदायक होत नाहीत; त्याप्रमाणे पुढे मृत्यु असलेल्या या जीवाला कोणताच पदार्थ संतोष उत्पन्न करीत नाही. ३१ कौमार आचरेत्प्राज्ञो धर्मान् भागवतानिह ।
दुर्लभं मानुषं जन्म तदप्यध्रुवमर्थदम् ॥७६१ ज्ञात्या पुरुषाने या मनुष्यजन्मामध्येच व त्यांतूनही कौमारावस्थेमध्येच भागवतधर्माचे आचरण करावें. कारण, हा मनुष्यजन्म दुर्लभ असून पुरुषार्थ साधून देणारा आहे, तथापि तो अशाश्वत आहे. ३२ गुरुन स स्यात्स्वजनो न स स्यात्
पिता न स स्याङ्जननी न सा स्यात् । दैवं न तत्स्यान्न पतिश्च स स्यात्
न मोचयेद्यः समुपेतमृत्युम् ॥ ५।५।१८ . आपल्याजवळ आलेल्या लोकांची मृत्यूपासून ज्याला सुटका करता येत नाही, तो गुरु नव्हे, स्वजन नव्हे, आणि पिता होण्याला योग्य नव्हे, ती माता नव्हे, तें दैवत नव्हे, तो पति नव्हे, (ज्याला आपले कर्तव्य बरोबर करता येत नसेल, त्याने ती ती पदवी प्राप्त करून घेऊं नये)
For Private And Personal Use Only