________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१०३
६४१ बुद्धौ कलुषभूतायां विनाशे प्रत्युपस्थिते ।
अनयो नयसङ्काशो हृदयान्नापसर्पति ॥ ५/३४।८२: बुद्धि मलिन झाली व विनाशकाल जवळ येऊन ठेपला म्हणजे नीतीसारखी दिसणारी अनीति मनुष्याच्या हृदयांत ठाणे देऊन बसते. ६४२ बुभुक्षां जयते यस्तु स स्वर्ग जयते ध्रुवम् ॥१४।९०९१
ज्याने क्षुधा जिंकली त्याने खचित स्वर्ग जिंकला.. ६४३ ब्रह्मक्षत्रं हि सर्वेषां वर्णानां मूलमुच्यते ॥११७३१५
ब्राह्मण आणि क्षत्रिय हेच सर्व वर्णाचें मूळ होत. ६४४ ब्रह्म क्षत्रेण सहितं क्षत्रं च ब्रह्मणा सह । __ संयुक्तौ दहतः शत्रून्वनानीवाग्निमारुतौ ॥ ३॥१८५/२५
ब्राह्मणानें क्षत्रियाशी व क्षत्रियाने ब्राह्मणाशी सहकार्य केलें म्हणजे ते दोघे मिळून वनेंच्या वनें जाळून फस्त करणाऱ्या अग्नि-वायूंप्रमाणे, शबूंना जाळून टाकतील. ६४५ ब्रह्मचर्य परो धर्मः ॥ १।१७०।७१ ___ ब्रह्मचर्य पाळणे हा श्रेष्ठ धर्म होय. ६४६ ब्रह्म वर्धयति क्षत्रं क्षत्रतो ब्रह्म वर्धते ॥ १२।७३।३२
ब्राह्मण क्षत्रियाचे सामर्थ्य वाढवितो आणि क्षत्रियामुळे ब्राह्मणाचा उत्कर्ष होतो. ६४७ ब्रह्महत्याफलं तस्य यः कृतं नावबुध्यते ॥ ७१८३।२८ ___ आपणांवर दुसऱ्याने केलेला उपकार जो स्मरत नाही, त्याला ब्रह्महत्त्येचें पातक लागते. ६४८ ब्राह्मणस्य तु देहोऽयं न कामार्थाय जायते ।
इह क्लेशाय तपसे प्रेत्य त्वनुपमं सुखम् ।।१२।३२११२३ ब्राह्मणाचा देह हा सुखोपभोगासाठी निर्माण झालेला नाही, इहलोकी क्लेश भोगून तपाचरण करण्यासाठी ब्राह्मण जन्मला आहे. असे केले तरच परलोकी जीवाला निरुपम सुख मिळेल.
For Private And Personal Use Only