________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
९३ यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धेः परं गतः ।
तावुमौ सुखमेधेते क्लिश्यत्यन्तरितो जनः॥ ३७१७ देहादिकांच्या ठिकाणी अत्यंत आसक्त असलेला परममूर्ख व प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परमेश्वरस्वरूपाला प्राप्त झालेला. ज्ञानी हे दोघे सुखाने राहतात. यांच्या स्थितींच्या मधल्या अवस्थेत असणारा हा मात्र अतिशय क्लेश भोगितो. ( जो केवळ अज्ञानी तो एक सुखी किंवा जो पूर्ण ज्ञानी तो एक सुखी. परंतु धड ज्ञानी नाही व अज्ञानीही नाहीं, तो अतिशय दुःखी असतो.) ९४ यस्य राष्ट्र प्रजाः सर्वास्त्रस्यन्ते साध्व्यसाधुभिः ।
तस्य मत्तस्य नश्यन्ति कीर्तिरायुभगो गतिः॥१।१७।१० (परीक्षिति राजा गोरूप धारण केलेल्या पृथ्वीला म्हणतो.) हे साध्वि, ज्या राजाच्या राष्ट्रांतील निरपराधी लोकांना दुष्टांपासून त्रास उत्पन्न होतो, त्या मत्त झालेल्या राजाची कीर्ति, आयुष्य भाग्य व परलोक ही सर्वही नाश पावतात. ९५ सा दुस्त्यजा दुर्मतिभिर्जीयतो या न जीर्यते ।
तां तृष्णां दुःखनिवहां शर्मकामो द्रुतं त्यजेत् ॥९।१९।१६ दुर्बुद्धि असलेल्या पुरुषाला विषयतृष्णा सोडवत नाही. तो जरी वृद्ध झाला तरी विषयांची तृष्णा कमी होत नाही. या विषयतृष्णेमुळे अतिशय दुःखें प्राप्त होतात, हे जाणून कल्याणेच्छु पुरुषाने हिचा सत्वर त्याग करावा. ९६ यावद्भियेत जठरं तावत्स्वत्वं हि देहिनाम् । ___ अधिकं योऽभिमन्येत स स्तेनो दण्डमर्हति ॥७१४८
आपले पोट भरण्यास जितकें अन्न लागेल, तितकेंच अन्न खरोखर आपलें आहे असे म्हणता येईल. त्यापेक्षा अधिकावर जो आसक्ति ठेवितो, तो केवळ चोर होय. तो दंडाला पात्र होतो.
For Private And Personal Use Only