________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४४० विषादनक्राध्युषिते परित्रासोर्मिमालिनि ।
किं मां न त्रायसे मनां विपुले शोकसागरे ॥३२१११२ (कान व नाक कापले गेल्यानंतर शूर्पणखा भ्रात्या खराला म्हणते.) खेदरूप नक्रांचें ज्यांत वास्तव्य आहे, आणि ज्यावर त्रासरूप लाटा उसळत आहेत अशा अगाध शोकसागरांत मग्न झालेल्या माझा उद्धार तूं का बरे करीत नाहींस ? ४४१ व्यसने वार्थकृच्छ्रे वा भये वा जीवितान्तगे।
विमृशंश्च स्वया बुद्धया धृतिमानावसीदति ॥ ४७९ संकटकाली, धनाचा नाश झाला असतां, अथवा जीविताचा नाश करणारे असें भय प्राप्त झाले असतांही स्वताच्या बुद्धीने विचार करणारा धैर्यवान् पुरुष मनामध्ये खचत नाही. ४४२ व्रतोपवासनिरता या नारी परमोत्तमा ।
भर्तारं नानुवर्तेत सा च पापगतिर्भवेत् ॥ २।२४।२६ आचरणाने सर्वोत्कृष्ट आणि नेहमी व्रतें व उपवास करणारी अशी जरी स्त्री असली, तरी भर्त्याच्या अनुरोधाने जर ती वागत नसेल तर तिला नरकप्राप्ति होते. ४४३ शक्यमापतितः सोढुं प्रहारो रिपुहस्ततः ।
सोढुमापतितः शोकः सुसूक्ष्मोऽपि न शक्यते॥२।६१६ शत्रूच्या हातचा प्रहार सहन करणे शक्य आहे. परंतु प्राप्त झालेला अतिसूक्ष्मही शोक सहन करणे शक्य नाही. ४४४ शक्या लोभयितुं नाहमैश्वर्येण धनेन वा । _अनन्या राघवेणाहं भास्करेण यथा प्रभा ॥५।२११५ (सीता रावणाला म्हणते.) ऐश्वर्याच्या योगाने अथवा धनाच्या योगानें माझें मन कोणालाही वळविता येणे शक्य नाही. कारण, सूर्यापासून जशी त्याची प्रभा भिन्न नाहीं, तशीच मी रामापासून भिन्न नाही.
For Private And Personal Use Only