SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 49
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि २३२ कपाले यद्वद्दापः स्युः श्वदृतौ च यथा पयः । आश्रयस्थानदोषेण वृत्तहीने तथा श्रुतम् || १२|३६|४२ ३९ ज्याप्रमाणें मस्तकाच्या कवटींत ठेवलेले पाणी किंवा कुत्र्याच्या कातड्याच्या पिशवीत घातलेलें दूध आश्रयस्थान वाईट असल्यामुळे दूषित होतें, त्याप्रमाणें आचारहीन मनुष्याचें ज्ञान व्यर्थ होतें. २३३ करिष्यन्न प्रभाषेत कृतान्येव तु दर्शयेत् || ५|३८|१६ एकादी गोष्ट करण्याचें मनांत असतांच उगाच बोलू नये. काय तें करूनच दाखवावें. २३४ कर्णिनालीकनाराचान् निर्हरन्ति शरीरतः । वाक्शल्यस्तु न निर्हर्तुं शक्यो हृदिशयो हि सः || ५ | ३४।७९ शरीरांत रुतलेला बाण, तीर किंवा भाला उपटून काढतां येतो. वाग्बाण मात्र उपटून काढतां येत नाहीं; कारण तो हृदयांत खोल शिरून बसलेला असतो. २३५ कर्तव्यमिति यत्कार्य नाभिमानात्समाचरेत् ||३|२|७६ कर्तव्य म्हणून जें करावयाचें तें अहंकारबुद्धीनें करूं नये. २३६ कर्मणा येन केनैव मृदुना दारुणेन च । उद्धरेद्दीनमात्मानं समर्थो धर्ममाचरेत् ||१|१४० /७२ सौम्य किंवा तीव्र कोणत्याहि उपायाने प्रथमतः आपला हीन स्थितींतून उद्धार करावा; आणि समर्थ होऊन धर्माचरण करावें. २३७ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि || ६ |२६|४७ [ अर्जुना ], फक्त कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, कर्मफलाच्या ठिकाण मुळींच नाहीं. [ यासाठी ] तूं कर्मफलाची इच्छा करूं नकोस. तसेंच कर्म न करण्याचाहि आग्रह धरूं नको. २३८ कर्मभूमिरियं ब्रह्मन् फलभूमिरसौ मता ||३|२६१।३५ मृत्युलोक ही कर्मभूमि असून परलोक ही फलभूमि आहे, असें म्हणतात. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy