________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
प्रस्तावना
श्रीवाल्मीकिरामायण हे आदिकाव्य आहे. आर्य लोकांच्या राष्ट्रीय ग्रंथांमध्ये याची गणना होते. या सर्वमान्य ग्रंथांतील निवडक ५०२ सुभाषितवचनांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकांत केला आहे. वचनें वर्णक्रमाने दिली असून त्यांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांत कांड, सर्ग व श्लोक अशा क्रमाने अंक मांडिले आहेत. वचन प्रक्षिप्त सापैकी असल्यास मुख्य सगोचा व प्रक्षिप्त सर्गाचा असे दोन्ही अंक आहेत. वचनांच्या शेवटी मुख्य विषयांची सूची जोडिली आहे. जो विषय ज्या वचनांत आला त्या वचनाचा क्रमांक त्या विषयापुढे सूचीमध्ये घातला आहे. सूचीमध्ये एकाच अर्थी आलेले अनेक शब्द त्या त्या ठिकाणी दिले असून पर्यायशब्द कंसांत घातले आहेत. ही सुभाषितवचनें सर्वांच्या वाचनांत येवोत, अशी श्रीरामप्रभूजवळ प्रार्थना करून प्रस्तावना संपवितों.
श्रीरामनवमी विष्णु विनायक परांजपे शके १८५१
, जिल्हा कुलाबा
रामायणांतील कांडांची नांवें १ बालकांड
५ सुंदरकांड २ अयोध्याकांड
६ युद्धकांड ३ अरण्यकांड
७ उत्तरकांड ४ किष्किंधाकांड
For Private And Personal Use Only