________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१११ अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः ॥५/४०१४
दुर्लक्ष्य, त्वरा व स्तुति हे तीन विद्येचे शत्रु होत. ११२ अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येत्पराक्रमम् ।
भैषज्यमेतदुःखस्य यदेतन्नानुचिन्तयेत् ॥११।२।२७ पराक्रम करता येईल असें दिसेल तर शोक न करतां प्रतिकार करावा, दुःखावर औषध हेच की, त्याचे एकसारखें चिंतन करीत बसू नये. ११३ अश्नाम्याच्छादयामीति प्रपश्यन्पापपूरुषः।
नामर्ष कुरुते यस्तु पुरुषः सोऽधमः स्मृतः ॥ २।५०।१७ अन्न आणि आच्छादन आपल्याला मिळत आहे एवढ्यावरच नजर देऊन स्वस्थ राहणारा व शत्रूच्या उत्कर्षाविषयी असहिष्णुता नसणारा पुरुष अधम पापी, असे म्हटले आहे. ११४ अश्रद्धा परमं पापं श्रद्धा पापप्रमोचनी ।
जहाति पापं श्रद्धावान्सर्पो जीणामिव त्वचम्।।१२।२६४।१५ अश्रद्धा हे मोठे पाप आहे. श्रद्धा ही पापापासून मुक्त करणारी आहे. जसा सर्प जीर्ण झालेली कात टाकून देतो तसा श्रद्धावान मनुष्य पातकाचा त्याग करतो. ११५ अश्रुतश्च समुनरो दरिद्रश्च महामनाः ।
अश्विाकर्मणा प्रेप्सुर्मूढ इत्युच्यते बुधैः ॥ ५।३३।३० अध्ययन नसतांनाहि गर्विष्ट, दरिद्री असून मोठमोठ्या खर्चाच्या गोष्टी मनामध्ये आणणारा आणि उद्योग न करितां द्रव्यप्राप्तीची इच्छा करणारा अशाला शहाणे लोक मूढ म्हणतात. ११६ अश्वमेधसहस्रं च सत्यं च तुलया धृतम् । __अश्वमेधसहस्राद्धि सत्यमेव विशिष्यते ॥१२।१६२।२६
सहस्र अश्वमेध आणि सत्य ही तराजूत घातली तेव्हां सहस्र अश्वमेधांपेक्षां सत्यच अधिक भरलें.
For Private And Personal Use Only