________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ८९९ शरीरनियमं प्राहुाह्मणा मानुषं व्रतम् ।
मनो विशुद्धों बुद्धिं च दैवमाहुव्रतं द्विजाः ॥३९३।२१ [ व्यासादिकमुनि पांडवांना म्हणतात. ] शारीरिक नियम पाळणे हे ज्ञानी लोक मानवी व्रत समजतात. आणि मनावर जय मिळवून बुद्धि शुद्ध करणे हे दैवी व्रत मानतात. ९०० शरीरस्य विनाशेन धर्म एव विशिष्यते ॥२२१३२०
आपला प्राण खर्ची घालूनहि धर्म पाळणे हेच अधिक श्रेयस्कर आहे. ९०१ शाश्वतोऽयं धर्मपथः सद्भिराचरितः सदा ।
यद्भायाँ परिरक्षन्ति भतारोऽल्पबला अपि ॥३॥१२॥६८ [ द्रौपदी पांडवांस म्हणते. ] भर्ते अशक्त असले तरीहि भायेंचे संरक्षण करितात. हा सनातन धर्ममार्ग असून सज्जनांनी नेहमीं आचरलेला आहे. ९०२ शीलं प्रधानं पुरुषे तद्यस्येह प्रणश्यति ।
न तस्य जीवितेनार्थो न धनेन न बन्धुभिः ॥५॥३४।४८ मनुष्याच्या ठिकाणी शील हेच मुख्य आहे. तेंच ज्याचें नष्ट झाले त्याला या जगांत जीविताचा, धनाचा अथवा बांधवांचा काहीएक उपयोग नाही. ९०३ शीलवृत्तफलं श्रुतम् ॥५॥३९॥६७
विद्येचें फल म्हणजे उत्तम शील आणि सदाचार. ९०४ शीलेन हि त्रयो लोकाः शक्या जेतुं न संशयः ।
नहि किंचिदसाध्यं वै लोके शीलवतां भवेत्॥१२॥१२४।१५ शीलाच्या जोरावर त्रैलोक्य जिंकणे शक्य आहे. यांत शंका नाही. खरोखर, शीलसंपन्न मनुष्यांना असाध्य असें कांहींच नाही. ९०५ शुचेरपि हि युक्तस्य दोष एव निपात्यते ।
मुनेरपि वनस्थस्य स्वानि कर्माणि कुर्वतः ॥१२॥११११६० शुचिर्भूत व आपले कर्तव्य करण्यांत तत्पर अशाहि पुरुषावर दोषारोप केला जातो. आणि अरण्यामध्ये राहून केवळ आपली कर्मे करीत असणाऱ्या ऋषीवरहि दोषारोप केला जातो.
For Private And Personal Use Only