________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
mirmirmirmirmireommmmmmmmmmmmar ६३ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ १०८११४ (श्रीकृष्ण सुदाम्याला सांगतात. ) जो कोणी मला पान, फूल, फळ आणि पाणी यांपैकी काहीही भक्तीने अर्पण करतो, त्या शुद्ध अंतःकरणाच्या मनुष्याने तें भक्तीने अर्पण केलेले मी सेवन. करतो. (आनंदानें ग्रहण करतो.) ६४ पथि च्युतं तिष्ठति दिष्टरक्षितं
गृहे स्थितं तद्विहतं विनश्यति । जीवत्यनाथोऽपि तदीक्षितो वने
गृहेऽपि गुप्तोस्य हतो न जीवति ॥ ७२।४० ईश्वराने रक्षण केलेली वस्तू मार्गामध्येही पडली असतां तशीच राहते, तिला कोणी नेत नाही. आणि ज्या वस्तूची ईश्वराने उपेक्षा केली ती घरामध्ये असली तरी नाहीशी होते. त्याचप्रमाणे एखादा पुरुष अनाथ असूनही ईश्वराने त्याच्यावर कृपादृष्टि ठेविली असतां तो वनामध्येही जिवंत राहतोच. आणि ईश्वराने ज्याची उपेक्षा केली तो पुरुष घरामध्ये सुरक्षित असूनही जगत नाही. ६५ परोऽप्यपत्यं हितकृद्यथौषधं
स्वदेहजोऽप्यामयवत्सुतोऽहितः । छिन्द्यात्तदङ्गं यदुतात्मनो हितं
शेषं सुखं जीवति यद्विवर्जनात् ।। ७।५।३७ परिणामी हितकारक असणान्या औषधाप्रमाणे एखादा परका पुरुष जर आपला हितकर्ता असेल, तर तोआपले अपत्यच समजला पाहिजे. आणि प्रत्यक्ष औरस पुत्र असूनही अहित करणारा असेल, तर तो रोगाप्रमाणे शत्रु समजला पाहिजे. फारतर काय, शरीराचा एखादा अवयव आपणांस अपायकारक असेल तर तो तोडून टाकावा. कारण तेवढ्या भागाचा त्याग केला असतां बाकीचे शरीर सुखाने जिवंत राहते.
For Private And Personal Use Only