________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि २०४ नखैस्तुदन्तो दशनैर्दशन्त
स्तलैश्च पादैश्च समापयन्तः । मदात्कपि ते कपयः समन्ता
न्महावनं निर्विषयं च चक्रुः ॥ ५।६१२४ (सीतेचा शोध लागल्यामुळे आनंदित झालेले वानर दधिमुखाने रक्षण केलेल्या मधुवनांत शिरले व त्याला न जुमानतां तेथे त्यांनी धुमाकूळ घातला.) काही जण नखांनी त्या दधिमुखाचे बोचकारे काढू लागले, काहीजण दांतांनी त्याला चावू लागले, आणि काहीजण चपराकांनी व लाथांनी त्याला मृतप्राय करूं लागले. असो. अशा रीतीने मद चढल्यामुळे त्या वानरांनी त्या सर्व महावनांतील यत्किंचितही योग्य वस्तु शिल्लक ठेविली नाही. २०५ न च कर्मसु सीदन्ति महत्स्वमिततेजसः ॥ ५।६८।१९ , महातेजस्वी लोक मोठ्या कामांत कधीही श्रम पावत नाहीत. ( खचून जात नाहीत.) २०६ न च पश्यामि सदृशं पृथिव्यां तव किंचन ।
सदृशं यत्प्रियाख्याने तव दत्त्वा भवेत्सुखम् ६।११३।१९ ( रामाने रावणाचा वध केला ही आनंदाची वार्ता मारुतीच्या मुखांतून ऐकल्यावर सीता म्हणते हे मारुते, ) तूं जी प्रियवार्ता कथन केलीस, त्याबद्दल योग्य देणगी तुला देऊन सुख पावेन, अशी एकही वस्तु पृथ्वीवर मला दिसत नाही. २०७ न च सीता त्वया हीना न चाहमपि राघव ।
मुहूर्तमपि जीवावो जलान्मत्स्याविवोद्भुतो ॥ २॥३५॥३१ (लक्ष्मण म्हणतो) हे राघवा, उदकांतून बाहेर काढलेले मासे ज्याप्रमाणे जिवंत राहणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे तुझा वियोग झाला असतां, सीतेला अथवा मला थोडावेळही जिवंत राहणे अशक्य आहे.
For Private And Personal Use Only