Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८८
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४२१ लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् । अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥ २।११२।१८
( राम भरताला म्हणतो.) फारतर काय, कांति चंद्राला सोडून जाईल, हिमालयपर्वतावरीलही बर्फ नाहींसें होईल व समुद्रही मर्यादेचे उल्लंघन करील, परंतु मी आपल्या पित्याच्या प्रतिज्ञेचा त्याग करणार नाहीं.
४२२ लोकप्रवादः सत्योऽयं पण्डितैः समुदाहृतः ।
अकाले दुर्लभो मृत्युः स्त्रिया वा पुरुषस्य वा || ५ | २५ | १२ ( सीता म्हणते. ) स्त्रीला काय किंवा पुरुषाला काय, अकालीं मृत्यु येणें दुर्लभ होय, ही विद्वानांच्या तोंडची म्हण सत्य आहे. ४२३ वक्तव्यतां च राजानो वने राज्ये व्रजन्ति च ॥७|४३|६
( राम म्हणतो. ) राजे वनामध्यें असोत अथवा राज्यावर असोत; लोक त्यांना कांहींना कांहीं तरी नांवें ठेवीतच असतात. ४२४ वयस्यस्योपकर्तव्यं धर्ममेवानुपश्यता || ४|१८ २९
धर्माकडे दृष्टि देऊन वागणाऱ्यानें मित्रावर उपकार केलाच पाहिजे. ४२५ वर्जयेद्वज्रमुत्सृष्टं वर्जयेदन्तकश्चिरम् ।
त्वद्विधं नतु संक्रुद्धो लोकनाथः स राघवः || ५ | २१।२३ ( सीता रावणाला म्हणते.) इंद्राच्या हातून सुटलेलें वज्र अथवा प्रत्यक्ष मृत्युही पुष्कळ दिवसपर्यंत कदाचित् तुझी उपेक्षा करील. परंतु क्रुद्ध झालेला लोकनाथ राम तुझ्यासारख्याचा प्राणघात केल्याशिवाय रहाणार नाहीं.
४२६ वसेत्सह सपत्नेन क्रुद्धेनाशीविषेण च ।
न तु मित्रप्रवादेन संवसेच्छत्रुसेविना ।। ६ । १६।२
( रावण बिभीषणाला म्हणतो. ) शत्रूशीं सहवास करावा. क्रुद्ध झालेल्या सर्पाबरोबरही रहावें; परंतु मित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि शत्रूची शुश्रूषा करणाऱ्या पुरुषाबरोबर कधीं वास्तव्य करूं नये.
For Private And Personal Use Only