Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ~~~~~~~~~~~~~~~~ ९० इच्छोदयो यथा दुःखमिच्छाशान्तिर्यथा सुखम् ।
तथा न नरके नापि ब्रह्मलोकेऽनुभूयते ॥ ७३६।२४ इच्छा उत्पन्न झाल्याने दुःख होते तसे दुःख नरकांतही होत नाहीं; आणि इच्छा नाहीशी झाली असतां जें सुख मिळते तसे श्रेष्ठसुख ब्रह्मलोकामध्येही अनुभवाला येत नाही. ९१ इच्छोपशमनं कर्तुं यदि कृत्स्नं न शक्यते ।
स्वल्पमप्यनुगन्तव्यं मार्गस्थो नावसीदति ॥ ७।३६।३० सर्व इच्छा एकदम नाहींशा करणे अशक्य झाल्यास क्रमाक्रमाने थोडथोड्या इच्छा सोडीत जाव्या. कारण, सन्मार्गाने जाणारा पुरुष कधीही क्लेश भोगीत नाही. ९२ इतो नाभिमताः सर्वे ज्ञस्य भोगाः स्वभावतः।
भवन्ति कोऽतितृप्तो हि दुरनं किल वाञ्छति ॥६।५९।३० ज्ञानी पुरुषाला स्वभावतःच कोणताही भोग स्वीकारणे मान्य नसते. कारण जो मिष्टान्नाने अतिशय तृप्त झाला तो कदन्नाची इच्छा कशी धरील ? ९३ इत्युक्तवत्यथ मुनौ दिवसो जगाम
सायंतनाय विधयेऽस्तमिनो जगाम । स्नातुं सभा कृतनमस्करणा जगाम
श्यामाक्षये रविकरेण सहाजगाम ॥ २५॥३२ (श्रीवाल्मीकि भरद्वाजाला म्हणाले)-वसिष्ठ मुनींनी अशा त-हेचे भाषण केल्यानंतर संध्याकाळ झाली, व सूर्य अस्तास गेला. तेव्हां सभेतील मुनि वसिष्ठमुनींना नमस्कार करून सायंकाळची स्नानसंध्यादि विहित कर्मे करण्यासाठी निघून गेले, आणि रात्र सरल्यानंतर पुन्हां दुसन्या दिवशी सूर्याच्या किरणांबरोबर वसिष्ठमुनींकडे आले.
For Private And Personal Use Only