Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१०२
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४८२ स सुहृयो विपन्नाथ दीनमभ्युपपद्यते ।
स बन्धुर्योपनीतेषु साहाय्यायोपकल्पते ॥ ६६३।२७ ज्याचा कार्यभाग नष्ट झाला आहे, अशा दीनावर जो उपकार करितो, तोच सुहृद् होय, आणि नीतिमार्गापासून दूर गेलेल्या लोकांना नीतिमार्गावर आणून सोडण्यासाठी जो साह्य करण्यास तयार असतो तो बंधु होय. ४८३ सहस्राण्यपि मूर्खाणां यापास्ते महीपतिः ।
अथवाप्ययुतान्येव नास्ति तेषु सहायता ॥२॥१००।२३ एकोऽप्यमात्यो मेधावी शूरो दक्षो विचक्षणः ।
राजानं राजपुत्रं वा प्रापयेन्महतीं श्रियम् ।।२।१००।२४ (राम भरताला म्हणतो.) हजारोंच नव्हे परंतु लाखों मूर्ख लोक जरी राजाजवळ असले तरी त्यांची राजाला मदत होत नाही. परंतु बुद्धिमान, शूर, दक्ष व नीतिशास्त्रवेत्ता असा एक जरी अमात्य जवळ असला, तरी तो राजाला अथवा राजपुत्राला मोठे वैभव प्राप्त करून देईल. ('अयुत' म्हणजे 'दहा हजार' असा अर्थ असतांना 'अयुतानि' याचे भाषांतर भाषेत जुळण्याकरितां लाखों, असें केले आहे.) ४८४ सहैव मृत्युव॑जति सह मृत्युनिषीदति ।
गत्वा सुदीर्घमध्वानं सह मृत्युर्निवर्तते ॥२।१०५।२२ (राम भरताला म्हणतो.)प्राणी जाऊ लागला तरी मृत्यु त्याच्या बरोबर जातोच; तो बसला तरी मृत्यु त्याच्या बरोबर बसतोच, आणि बराच दूर मार्ग चालून प्राणी परत फिरूं लागला, तरी देखील मृत्यु त्याच्या बरोबरच चालत जाऊन परत फिरतो ( मृत्यु प्राण्यांच्या संनिध एकसारखा आहेच आहे.)
For Private And Personal Use Only