Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४८५ सागरं चाम्बरप्रख्यमम्बरं सागरोपमम् । __ रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव ॥६।१०७।५१
सागर आकाशासारखा आहे तसें आकाश सागरासारखे आहे. परंतु रामरावणाचे युद्ध म्हणजे रामरावणांच्या सारखेच होय. (त्याला उपमाच नाही.) ४८६ सापराधोऽपि बालो हिरक्षितव्यः स्ववान्धवैः ७।१३।२०
कोणी बालक जरी अपराधी असला, तरी त्याचे बांधवांनी रक्षण करणे योग्य आहे. ४८७ सीताहरणजं दुःखं न मे सौम्य तथागतम् ।
यथा विनाशो गृध्रस्य मत्कृते च परंतप ।। ३।६८०२५ ( जटायूचा वध झाल्यानंतर राम लक्ष्मणाला म्हणतो. ) हे विनयसंपन्न शत्रुतापना, माझ्याकरितां गृध्रपक्ष्याचा (जटायूचा) वध झाला, याबद्दल जसा माझ्या मनाला चटका लागून राहिला आहे, तसा सीतेचा अपहार झाल्यामुळे होणा-या दुःखाचा चटका लागून राहिलेला नाही. ४८८ सुजीवं नित्यशस्तस्य यः परैरुपजीव्यते ।
राम तेन तु दुर्जीवं यः परानुपजीवति ॥२॥१०५।७ (भरत म्हणतो.) हे रामा, ज्या पुरुषाच्या जीवितावर दुसरे जीवित चालवितात, त्या पुरुषाचे जीवित धन्य होय. तसेंच ज्या पुरुषाचें जीवित दुसन्यावर अवलंबून असते, तें जीवित दुःखावह होय. ४८९ सुनीतं हितकामेन वाक्यमुक्तं दशानन ।
न गृह्णन्त्यकृतात्मानः कालस्य वशमागताः॥६।१६।२० (विभीषण रावणाला म्हणतो.) हे दशानना, हितेच्छु पुरुषाने उत्कृष्टनीतीला अनुसरूनही केलेले भाषण कालाच्या तावडीत सापडलेले अजितेंद्रिय पुरुष स्वीकारीत नाहीत.
For Private And Personal Use Only