Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
५६२ नैकमिच्छेदगणं हित्वा स्याचदन्यतरग्रहः ।
यस्त्वेको बहुभिः श्रेयान्कामंतेन गणं त्यजेत्।।१२।८३।१२
श्रेयसो लक्षणं चैतद्विक्रमो यस्य दृश्यते ॥१२।८३३१३ समुदायाला सोडून [ राजानें ] एकाच मनुष्याची इच्छा करूं नये; व एकाचाच अंगीकार करणे अवश्य असल्यास, जो एकटा इतर पुष्कळांपेक्षा श्रेष्ठ असेल, त्याचा स्वीकार करून समुदायाचा खुशाल त्याग करावा. कारण, ज्या पक्षांत जास्त पराक्रम असेल तो स्वीकारणे हे कल्याणाचे लक्षण आहे. ५६३ नैवास्य कश्विद्भविता नायं भवति कस्यचित् ।।
पथि सङ्गतमेवेदं दारबन्धुसुहृज्जनः ।। १२।२८।३९ ह्या जीवात्म्याचा कोणी नाही आणि हा कोणाचा नाही. स्त्री, इतर नातलग व इष्ट मित्र यांचा सहवास हा केवळ रस्त्यांतील भेटीसारखा आहे. ५६४ नैवाहितानां सततं विपश्चितः
क्षणं प्रतीक्षन्त्यपि दुर्बलीयसाम् । विशेषतोऽरीन्व्यसनेषु पण्डितो
निहत्य धर्म च यशश्च विन्दते ॥ ८९०७१ शत्र दुर्बळ झाले म्हणजे शहाणे लोक केव्हांहि त्यांचा नाश करण्याला क्षणभरदेखील विलंब लावीत नाहीत. शत्रूचा वध करणें तो विशेषेकरून तो संकटांत असतांनाच केला पाहिजे. शहाण्याने अशाच स्थितीत शत्रूचा नाश केल्यास त्याजकडून धर्माचरण होऊन शिवाय त्यास कीर्तिहि प्राप्त होते. ५६५ नोदकक्लिन्नगावस्तु स्नात इत्यभिधीयते ।
सस्नातोयो दमस्त्रातः स बाह्याभ्यन्तरः शुचिः।।१३।१०८९ पाण्याने आंग भिजविलें म्हणजे स्नान केले असे म्हणत नाहीत. ज्याने इंद्रियदमनरूप उदकांत स्नान केलें तोच खरोखर 'स्नात' झाला. तो अंतर्बाह्य शुचिर्भूत झाला. ५६६ न्यायागतस्य द्रव्यस्य बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ।
अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम् ॥५॥३३॥५९ न्यायाने मिळालेल्या द्रव्याचे दोन दुरुपयोग जाणावे. एक, अपात्री दान करणे. व दुसरा, सत्पात्री न करणे.
For Private And Personal Use Only