Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७६
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
४७१ न वै श्रुतमविज्ञाय वृद्धाननुपसेव्य वा ।
धर्मायौं वेदितुं शक्यौ बृहस्पतिसमैरपि || ५|३९|४१
शास्त्र समजून घेतल्यावांचून अथवा वृद्धांचा समागम केल्यावांचून धर्म व अर्थ या दोन पुरुषार्थाचें ज्ञान होणें बृहस्पतीसारख्या बुद्धिमान् पुरुषांनाहि शक्य नाहीं. ४७२ न वै सुखं प्राप्नुवन्तीह भिन्नाः || ५ | ३६ | ५६
आपसांत फुटून राहणारांना जगांत सुख खचित प्राप्त होत नाहीं.
४७३ न शत्रुर्वशमापन्नो मोक्तव्यो वध्यतां गतः || ५|३८|२९
ज्याचा अवश्य वध केला पाहिजे असा शत्रु हातांत सांपडला असतां सोडून देऊ नये.
४७४ न शत्रुर्विवृतः कार्यो वधमस्याभिकाङ्क्षता ।
क्रोधं भयं च हर्षे च नियम्य स्वयमात्मनि ॥१२११०३।८
शत्रूला ठार मारण्याची इच्छा करणाऱ्यानें आपला शत्रु प्रगट करूं नये, म्हणजे - त्याच्याशीं उघड द्वेष करूं नये. राग, भय व आनंद हीं आंतल्याआत दाबून ठेवावीं. ४७५ न श्रेयः सततं तेजो न नित्यं श्रेयसी क्षमा || ३ |२८|६ सदोदित तीव्रपणा श्रेयस्कर नाहीं, तसेंच नेहमीं सौम्यपणाहि कामाचा नाहीं. • ४७६ नष्टं समुद्रे पतितं नष्टं वाक्यमशृण्वति ।
अनात्मनि श्रुतं नष्टं नष्टं हुतमनग्निकम् ||५|३९|४२
जें समुद्रांत पडलें तें नष्ट झालें. न ऐकणाऱ्याला सांगितलेले वायां गेलें. स्वेच्छाचारी माणसाची विद्या फुकट गेली. राखेंत टाकलेली आहुति व्यर्थ गेली. ४७७ न संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति ।
संशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति ।। १२/१४०/३४ संकटांत सांपडल्यावांचून मनुष्याला चांगल्या गोष्टी प्राप्त होत नाहींत. पण संकटांत • सांपडल्यानंतर जर तो जिवंत राहिला तर त्याला आपलें कल्याण झालेलें दिसून येईल.
For Private And Personal Use Only