Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारत सुभाषितानि
१५६ आदावेव मनुष्येण वर्तितव्यं यथाक्षमम् । यथा नातीतमर्थं वै पश्चात्तापेन युज्यते ।। ११।११३५
आधीपासूनच मनुष्यानें योग्य रीतीनें वागावें. म्हणजे गोष्ट हातची गेल्यावर त्याकरितां पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाहीं.
१५७ आदित्यचन्द्रावनिलानलौ च द्यौर्भूमिरापो हृदयं यम । अहश्व रात्रिश्व उभे च संध्ये
२७
धर्मश्च जानाति नरस्य वृत्तम् ||१|७४|३०
सूर्य, चंद्र, वायु, अग्नि, आकाश, पृथ्वी, जल, तसेंच आपले अंतःकरण, यम, दिवस, रात्र, सकाळ संध्याकाळचा संधिप्रकाश आणि धर्म इतक्यांना मनुष्याचें बरेवाईट कृत्य समजते.
१५८ आनृशंस्यं परो धर्मः परमार्थाच्च मे मतम् || ३ | ३१३।१२९
[ युधिष्ठिर यक्षाला म्हणतो ] क्रौर्य नसणे म्हणजे दयाळुपणा हाच श्रेष्ठ धर्म होय. असें माझें निश्चित मत आहे.
१५९ आपत्सु विहितं स्तैन्यं विशिष्टं च महीयसः ।
विप्रेण प्राणरक्षार्थं कर्तव्यमिति निश्चयः ।। १२।१४१।३९
आपत्काली एकवेळ पोट भरेल इतक्या धान्याचें चौर्य शास्त्रविहित आहे. त्यांतूनहि विशेषतः मोठ्यांना. कारण ते प्राणान्तींही शास्त्राचें उल्लंघन न करणारे असल्यामुळे प्राणास. मुकतील. म्हणून ब्राह्मणानेही प्राणरक्षणार्थ तें करावें असा सिद्धांत आहे. १६० आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेद्धनैरपि ।
आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि || ५|३७|१८
संकटप्रसंगी उपयोग व्हावा म्हणून धनाचें रक्षण करावें. धनाचा त्याग करूनसुद्धां स्वस्त्रीचें रक्षण करावें. आणि धनाचा व स्त्रीचा त्याग करून देखील नेहमी स्वतःचें रक्षण करावें.
For Private And Personal Use Only