Book Title: Life Without Conflict Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 98
________________ समजदारीने शोभेल गृहसंसार आपटून ठेवेल आणि कुरकुर करेल की नाही? बायको सुद्धा लगेच समजून जाते की कुरकुर करत आहे म्हणून. हे क्लेशमय जीवन आहे. । क्लेशरहित घर जणू देऊळच जिथे क्लेश असतो तिथे भगवंत वास करीत नाही, म्हणून आपण भगवंताला सांगावे, ‘साहेब तुम्ही मंदिरातच राहा, माझ्या घरी येऊ नका! आम्ही पुष्कळ मंदिरे बांधू, पण घरी येऊ नका! जिथे क्लेश नसतो तिथे भगवंताचा वास नक्कीच असतो, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि क्लेशाला आपण बुद्धी आणि योग्य समज वापरुन मीटवू शकतो. मतभेद टळू शकतील इतकी जागृती प्रकृती गुणानेही येऊ शकते. इतकी बुद्धी पण येऊ शकेल असे आहे. 'जाणले' त्यास म्हणतात की ज्यामुळे कुणाशीही मतभेद होत नाहीत. मती पोहोचत नाही म्हणून मतभेद होतात. मती पूर्णपणे पोहोचली तर मतभेद होणार नाही, मतभेद म्हणजे संघर्ष, तोच कमकुवतपणा आहे. काही भानगड झाली तर चित्त थोडा वेळ स्थिर ठेवा आणि शांतपणे विचार करा म्हणजे तुम्हाला आतूनच सुचेल. क्लेश झाला म्हणजे देव निघून जाणार की नाही? प्रश्नकर्ता : निघून जातील. दादाश्री : काही लोकांच्या घरातून देव कधीच जात नाही पण भांडणे होऊ लागली तर म्हणतात, 'चला आता निघूया, आपल्याला इथे जमणार नाही.' क्लेशमय घरात राहायला मला आवडणार नाही म्हणून मग देरासरात आणि मंदिरात जातात. या मंदिरात देखील क्लेश करतात. मुकुट, दागिने घेऊन जातात तेव्हा देव म्हणतात की आता इथूनही निघूया. देवांना सुद्धा या सगळ्यांचा वीट आला आहे. इंग्रजांच्या वेळी म्हणत असत ना की, 'देव गया डुंगरे, पीर गया मक्के.'

Loading...

Page Navigation
1 ... 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180 181 182 183 184 185 186 187 188 189 190 191 192