________________
किंवा मौन राहून समाधान आणावे. सम्यक् दृष्टीमुळे नवे दोष वाढत नाहीत आणि जुने दोष कमी होतात. ज्ञान प्राप्तीनंतर सुद्धा कषाय होतात पण ते लगेचच लक्षात येतात आणि 'स्वतः' त्यापासून वेगळाच राहतो.
अक्रम विज्ञानी (परम पूज्य दादा भगवान) यांनी तर ज्ञान देऊन पंचवीस प्रकारच्या मोहांचा नाश करुन टाकला. चांगल्या सवयी आणि वाईट सवयी दोन्हीही भ्रांती आहेत, असे सांगून त्या सर्वांपासून सुटका करुन दिली.
समोरच्या व्यक्तीला त्याची कोणती चूक दाखवावी? तर जी चूक त्याला दिसत नसेल तीच. आणि ती चूक कशा प्रकारे दाखवावी? जर समोरच्याला चूक दाखवणारा उपकारी वाटत असेल तरच दाखवावी. 'कढी खारट झाली', असे बोलून भांडण करु नये.
घरातील सर्वजण निर्दोष दिसतात व स्वतःचेच दोष दिसतात तेव्हा होतात खरे प्रतिक्रमण.
प्रतिक्रमण कुठपर्यंत करावे? ज्याच्यासाठी मन बिघडत असेल, सतत आठवत असेल तोपर्यंत. जोपर्यंत आपला अँटॅकिंग नेचर असेल तोपर्यंत मार पडेल. (त्रास होईल)
आपल्याशी जर कोणी संघर्ष करायला आला तरी आपण संघर्ष करणे टाळले पाहिजे, आपण तिथून निसटून जावे!
स्वतः कर्ता नाही परंतु समोरच्याला कर्ता पाहतो तेव्हा स्वत:च कर्ता झाल्यासारखे आहे ! समोरच्याला किंचितमात्र कर्तारुपात पाहिले की स्वतः कर्ता होऊनच गेला! प्रकृती भांडत असेल तरीपण त्यास कर्ता पाहू नये. कारण तो करत नाही, 'व्यवस्थित शक्ती' करते!
दोष करणाराही अहंकार आणि दोष पाहणारा सुद्धा अहंकार! दोष पाहणारा निर्विवादपणे अहंकारी असतोच.
दिवसभर माफीच मागत राहावी. दिवसभर माफी मागण्याची
७