________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
(रक्षण) केले नाही, तर तो दोष निघून जातो. पण पुन्हा प्रोटेक्शन देतोच. आपण त्यांना विचारले की, 'साहेब, तुम्ही अजूनही तपकीर ओढता?' तेव्हा म्हणेल, 'त्यात हरकत नाही.' यास प्रोटेक्शन दिले असे म्हटले जाते. मनात जाणतो की हे चुकीचे आहे. म्हणजे प्रतीती बसली आहे, पण पुन्हा प्रोटेक्शन देतो. प्रोटेक्शन देऊ नये. प्रोटेक्शन देतात का लोक?
प्रश्नकर्ता : हो प्रोटेक्शन देतातच ना!
दादाश्री : अब्रू निघून गेली आहे, आहेच कुठे अब्रू? अब्रूदार तर काय हे कपडे घालून फिरत असेल? हा तर झाकत राहतो आब्रू! झाकूनझाकून अब्रू वाचवित राहतो. कपडे फाटले तर शिवून घेतो, अरे कोणी बघेल ना, शिवून घे.
चूक मिटवतील ते भगवंत स्वत:ची एक चूक मिटवतो त्याला देव म्हणतात. स्वत:ची चूक दाखवणारे तर खूप असतात पण कोणी मिटवू शकत नाही. चूक दाखवताही आली पाहिजे. जर चूक दाखवता येत नसेल तर ती आपली चूक आहे, असे मान्य करुन घ्यावे. कुणाला चूक दाखवणे हे खूप कठीण काम आहे आणि ती चूक जो मिटवून देतो तो देवच म्हटला जातो. हे तर ज्ञानी पुरुषांचेच काम. आम्हाला या जगात कोणी दोषी दिसतच नाही. ____ 'आम्ही' दृष्टी संपूर्ण निर्दोष केली आणि संपूर्ण जगाला निर्दोष पाहिले! म्हणूनच 'ज्ञानी पुरुष' तुमची 'चूक' मिटवू शकतात. दुसऱ्या कोणाचे हे कामच नाही. भगवंतांनी संसारी दोषांना दोष मानले नाही. 'तुझ्या स्वरुपाचे अज्ञान' हाच सर्वात मोठा दोष आहे. 'मी चंदुलाल आहे, तोपर्यंत इतर सर्व दोष सुद्धा उभे आहेत. आणि एकदा जर 'स्वत:च्या स्वरुपाचे' भान झाले, की मग इतर दोषही निघू लागतात.
चूकरहित दर्शन आणि चूक असलेले वर्तन स्वतःची चूक स्वत:ला समजते तो भगवंत होतो.