________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दोष आहे, तेव्हाच ही भानगड उभी झाली आणि म्हणून असे लोक तुम्हाला भेटले, त्याशिवाय असे लोक भेटतील का कधी? नाही तर फले वाहतील अशी माणसे भेटतात. पाहा ना, मला फुले वाहणारी माणसे नाही का भेटत? तुम्हाला समजले ना?
__ घरात टोकावे कोणत्या चुकांसाठी?
जीवन सर्व बिघडून गेले आहे, जीवन असे नसावे. जीवन तर प्रेममय असायला हवे. जिथे प्रेम असेल तिथे चुका दाखवायच्या नाही. चूक दाखवायची असेल तर त्या व्यक्तीला नीट समजावून सांगावे. त्याला आपण सांगावे की, 'असे करण्यासारखे' आहे. तेव्हा तो सुद्धा म्हणेल, 'बरे झाले मला सांगितले' तुमचे उपकार मानेल.
'चहात साखर नाही,' असेही म्हणेल. अरे, पिऊन टाक ना चुपचाप. नंतर तिलाही कळणारच आहे ना? तेव्हा उलट ती आपल्याला म्हणेल, 'तुम्ही साखर का मागितली नाही?!' तेव्हा आपण सांगावे, तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा पाठवा.
जीवन जगणे जमत नाही. घरच्या माणसांची चूक पाहायची नसते. पाहतात की नाही आपले लोक?
प्रश्नकर्ता : रोजच पाहतात.
दादाश्री : बापाची, आईची, मुलांची, सर्वांचीच चूक पाहतात. फक्त स्वतःचीच चूक पाहत नाही! किती हुशार! अक्कलवान! असे मूर्ख लोक आहेत हे. पण आता शहाणे व्हा. म्हणजे अतिक्रमण करु नका.
जर कधी एखादा शिंतोडा उडाला की लगेच आपण समजून जावे की, हा डाग पडला म्हणून लगेच धुऊन टाकावा. चूक तर होणार, नाही होणार असे नाही, पण चूक धुऊन स्वच्छ करणे हे आपले काम.
प्रश्नकर्ता : पण डाग दिसेल अशी दृष्टी प्राप्त झाली पाहिजे.