________________
१००
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आम्हाला उचलून घ्यावे लागते. म्हणजे हे मांजरीच्या पिल्लांसारखे आहेत. मांजरीला तिच्या पिल्लांना स्वतः उचलून फिरावे लागते आणि तुम्ही माकडाच्या पिल्लांसारखे आहात. तुम्ही तर पकडून ठेवता, सोडतच नाही, फार पक्के! डिजाईन म्हणजे डिजाईन! आणि यांना तर आम्हाला उचलून घ्यावे लागते! कारण यांची सरळता पाहून आम्ही खुश होत असतो. आणि खुश होतो म्हणून उचलून फिरतो.
सरळता आहे म्हणून सर्वच (दोष) उघडे करुन टाकतात. सर्व कपाट उघडून टाकतात. घ्या साहेब, बघा आमच्याजवळ हा माल आहे, असे म्हणतात. आणि असरळता म्हणजे एकच कपाट उघडतो. दुसरे कपाट तर सांगितले तरच उघडेल, नाही तर नाही उघडणार. आणि हा (सरळ) तर सांगायच्या अगोदरच सर्व उघडून टाकतो. सरळता म्हणजे काय ते तुम्हाला समजले?!
गुण पाहिल्याने गुण प्रकटतो समोरच्या व्यक्तीचे गुण पाहिले तर गुण उत्पन्न होतील. बस! आपण कुणाला शिव्या दिल्या आणि तो काही बोलला नाही तर आपल्याला कळते की याच्यात किती चांगले गुण आहेत ! मग आपल्यातही ते गुण उत्पन्न होतात. आणि जगात कुणाचाही दोष नाही. हे सर्व स्वत:च्या दोषांमुळेच आहे.
निजकर्म म्हणजे निजदोष हे कर्म-कर्म असे गात राहतात पण कर्म म्हणजे नक्की काय याचे त्यांना भानच नाही. स्वत:चे कर्म म्हणजे निजदोष. आत्मा निर्दोष आहे पण निजदोषांमुळे बांधला गेला आहे. जितके स्वतःचे दोष दिसू लागतात तितकी मुक्ती अनुभवात येते. काही दोषांचे तर लाख लाख थर (आवरण) असतात म्हणून लाख-लाख वेळा पाहिल्याने ते निघू लागतात. दोष तर मन-वचन-कायेत भरलेलेच आहेत. आम्ही स्वतः ज्ञानात पाहिले आहे की जग कशामुळे बांधलेले आहे. निजदोषांनेच बांधलेले आहे. निव्वळ