________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
दादाश्री : एक मिनिटही, अरे, एक क्षण सुद्धा विसरत नाही.
प्रश्नकर्ता : आता पूर्णपणे मोक्षमार्गात राहायचे आणि परत हा व्यवहारही सांभाळायचा. एकाही व्यक्तीला दु:खं होऊ नये, त्याचा रोग निघेल, इतके कडक बोलावे लागते, असे सर्व करावे लागते.
दादाश्री : मग दोन लुटारुंची गोष्ट सुद्धा वाचतो. प्रश्नकर्ता : हो, ते पण करायचे आणि मोक्षही चुकवायचा नाही.
दादाश्री : दोन लुटारुंची गोष्टही वाचायची. ते पुस्तक हातात आले तर तेही पूर्ण करायचे. पेपर वाचण्याच्या फाईलचाही निकाल करायचा आणि हे सांगतात की, 'आम्हाला खुप काम आहे!' घ्या, आले मोठे काम करणारे! इथे पाणी ठेवले असेल ते मला आणून देतात, मला प्यायचे नसेल तरीही देतात ! त्यांना वाटते की हे काम केले! मला प्यायचे नसेल तरीही देत राहतात. मी म्हणतो, 'नाही, आता नको.' पण त्यास ते काम समजतात.
आम्ही जे सांगतो ना की 'कर्म बांधली जात नाहीत,' ते तर ऐंशी टक्के पाच आज्ञा पाळत असेल तरच. नाही तर कर्म बांधलेच जातील. आज्ञा पालन केले नाही, तर कर्म बांधलेच जातील. माझ्याजवळ दिवसभर बसून राहिले तरी काही होणार नाही. आणि मला सहा महिन्यांपासून भेटला नसेल परंतु जर आज्ञेचे पालन करीत असेल त्याचे कल्याण होईल. बाकी इथे सर्वांना शांती वाटते, म्हणून सगळे बसूनच राहतात ना! कुत्रा सुद्धा इथून हटत नाही! मारले तरी पुन्हा इथे येऊन बसतो. एकदा आम्ही औरंगाबादला गेलो होतो तेव्हा तिथे एक कुत्रा माझ्यापासून दूर जातच नव्हता.
सरळ व्यक्तीवर ज्ञानी कृपा अपार मोक्षमार्ग हातात आल्यानंतर जितकी धावपळ (पुरुषार्थ) तुमच्याकडून होते तितकी यांच्याकडून होत नाही. हे तर सर्व प्रमादी खाते.