________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
९७
अद्भुतताच आहे! इथे दोष पाहण्याचे काही कारणच नाही, ज्यांना संपूर्ण, अद्भुत ज्ञान दशा वर्तत असते!
दादाश्री : असे आहे, की, तुमचे जैन असतातना ते चांगले. एवढासा छोटा मुलगा असेल तो ही सांगेल की 'दादाजी सांगतात तेच खरे, दुसरे नाही.' सर्व जण असेच मानतात. आणि हे दुसरा सर्व कच्चा माल.
प्रश्नकर्ता : तुम्ही निरंतर अगदी सूक्ष्मतम उपयोगात वर्तत असतात, तिथे तर काही दोष राहतच नाही ना? मग आम्ही आपले दोष कसे पाहू शकतो?
दादाश्री : अशी समज नाही ना, बिलकूल समज नाही.
प्रश्नकर्ता : केवळज्ञान स्वरुपात वर्तत असता मग बाहेरचे वाटेल तसे असो, श्रीमद् राजचंद्रांनी तर इथपर्यंत सांगितले की ज्ञानींना सन्निपात झाला असेल, तरीही त्यांचे दोष पाहू नये.
दादाश्री : पण अशी समज असली पाहिजे ना! समज ही काही सोपी गोष्ट आहे !
प्रश्नकर्ता : उलट हे विचारण्यात, चर्चा करण्यात आम्ही विनय चुकतो, त्या सर्व चुका आम्हाला धुवायला लागतात.
दादाश्री : जिथे पाहायचे नसते तिथेही पाहतात, हेही आश्चर्यच आहे ना! दुसऱ्या ठिकाणी दोष पाहिले तर ते मी मिटवून देतो, पण इथे जर दोष पाहिले तर कोण मिटवू शकेल? मग मिटवणारा कोणी भेटणारच नाही ना! म्हणून मी सावध करतो की अरे, बघ हं, इथे सावध रहा. समज नाही ना बिचाऱ्याला! कोणत्याही प्रकारची समज नाही ना! तेव्हा असे थोडे-फार ज्ञान दिलेले असेल, तर त्या लोकांना जागृती राहते, जर चोख मनाचे असतील तर. आणि त्यांना दुसरी कुठलीच समज नाही की मी हे काय करीत आहे! बुद्धी फसवते, पण ते स्वतःला समजत नाही ना! बुद्धी सर्वांनाच फसवते. जे पाहायचे नसेल तेही दाखवते.
या बाबतीत मी नीरुबेनला पाहिले. त्यांना एक दिवस सुद्धा उलटा