________________
१३८
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आपटतो, अशी गोष्ट आहे ही. आंधळी माणसं समोरासमोर आपटतात हे आपण समजून घेतले आणि दूर उभे राहून म्हटले की, 'हे तर
आंधळे आहेत वाटते.' एवढे आपटतात याचे काय कारण? तर त्यांना दिसत नाही म्हणून. बाकी जगात कुठलाही जीव दोषी नाहीच. आणि दोष दिसतो तो तुमचाच दोष आहे. म्हणूनच कषाय टिकून राहिले आहेत.
दुसऱ्यांचे दोष दाखवतो तो कषायभावाच्या पडदा आहे. त्यामुळेच दुसऱ्यांचे दोष दिसतात. शिंगांसारखे कषायभाव असतात, ते वाकवल्याने वाकत नाही.
__ आता क्रोध-मान-माया-लोभ 'कमी करा, कमी करा' असे सांगतात पण ते कमी केव्हा होतील? ते काय कमी होतात? वास्तविकतेचे ज्ञान असेल की कोणीच दोषी नाही, मग तर क्रोध-मान-माया-लोभ कमी करण्याचे काही कारणच उरले नाही ना! दोषी दिसतात म्हणूनच प्रतिक्रमण करावे लागते ना?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : एखाद्यावेळी मागील क्रोध-मान-माया-लोभच्या कारणाने दोषी दिसत असतील तर प्रतिक्रमण करावे लागते. म्हणजे मग क्रोधमान-माया-लोभ निघून जातात.
तिथे कोणावर रागवाल? आता डोंगरावरुन एक ढेकूळ घरंगळत आले व डोक्याला लागले आणि रक्त निघाले, त्यावेळी तुम्ही कोणाला शिवी देता? कोणावर रागावता?
डोंगरावरुन एवढा मोठा दगड पडला तर आधी वर बघतो की कोणी घरंगळवला की काय? तिथे कोणीच दिसत नाही. किंवा मग माकडाने जरी घरंगळवला असेल तरी हरकत नाही. फार तर त्याला पळवून लावाल. त्याला काय शिव्या द्याल? माकडाचे नाव-निशाण काहीच नाही, मग कुठे