________________
१४२
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
महावीर भगवंतांना त्या लोकांनी (कानात) खिळे ठोकले होते, तेव्हा त्यांनी लगेच ज्ञानात पाहिले की हा कसला परिणाम आला आहे! म्हणजे कानात खिळे ठोकले त्यांनाही निर्दोष पाहिले होते!
जगात कुणाचाही दोष काढण्यासारखा नाहीच. आम्ही कधीच कुणाचा दोष काढीत नाही. कुणाचा दोष नसतोच. भगवंतानी सुध्दा निर्दोष पाहिले मग आपण दोष काढणारे कोण? त्यांच्याहीपेक्षा हुशार? भगवंतापेक्षाही हुशार? भगवंतांनीही निर्दोष पाहिले आहे.
जगात कुणाला दोषी पाहिले नाही, त्याचे नाव महावीर आणि महावीरांचा खरा शिष्य कोण की ज्याला लोकांचे दोष दिसणे कमी झाले आहे. संपूर्ण दशेपर्यंत होत नाही, पण दोष दिसणे कमी होऊ लागले आहेत.
अभेद दृष्टी झाल्याने होतो वीतराग हे जे तुम्हाला दोषी दिसतात त्याचे काय कारण आहे, तर तुमची दृष्टी विकारी झाली आहे. तुझे-माझे करणारी बुद्धी आहे. हे माझे आणि हे तुझे, असा भेद करणारी आहे! जोपर्यंत दोषी दिसतात तोपर्यंत काहीच प्राप्त केले नाही. आम्हाला कोणाशीही दुरावा नाही. ज्याची अभेद दृष्टी झाली, त्याला भगवंत म्हटले जाते. हे आमचे आणि हे तुमचे, हे सर्व सामाजिक धर्म आहेत.या सामाजिक धर्मांनीच गुंतागुंत निर्माण केली आहे, धर्म पाळत जातात आणि चिंता वाढत जाते.
गच्छ-मताची जी कल्पना बाकी, कृपाळुदेवांनी म्हटले आहे की 'गच्छ-मताची जी कल्पना तो नाही सद्व्यवहार.
कल्पना ती मात्र कल्पनाच नाही, पण तेच आवरण स्वरुप झाले आहे. पण तरी भगवंतांनी त्यास धर्म म्हटले. तो त्याच्या जागेवर धर्मातच आहे. तुम्ही शहाणपणा करू नका. तो जे करत आहे, तो त्याच्या जागेवर