________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
परंतु ज्ञानाचे फळ मिळणार नाही. आपली दृढ इच्छा आहे की ज्ञानींच्या आज्ञेतच राहायचे आहे, तर त्यांच्या कृपेमुळे आज्ञेत राहू शकतो. आज्ञा पालन करतो तेव्हा आज्ञेची मस्ती राहते. आणि ज्ञानाची मस्ती कोणाला राहते की जो दुसऱ्यांना उपदेश देत असेल.
हे विज्ञान तर रोख आहे, त्वरित फळ देणारे आहे. तुम्ही एक तास माझ्या आज्ञेत राहिले तर काय होईल? समाधि वाटेल!
वीतरागभावाने विनम्रता आणि सक्ती प्रश्नकर्ता : सत्संगात फाईलींचा समभावे निकाल करण्याची गोष्ट निघाली होती, परंतु विनम्रता दाखवल्याने चिकट फाईल जास्त त्रास देत असेल, तर मग तिथे विनम्रता दाखवण्याची गरज नाही. उलट तो जास्त वाकडा वागेल.
दादाश्री : अशी काही गरज नसते. पण त्याचे उत्तर शोधता येत नाही, ती लेव्हल काढणे कठीण आहे.
प्रश्नकर्ता : हे कशाप्रकारे लेव्हलमध्ये ठेवावे?
दादाश्री : हे तर प्रत्येक मनुष्य असेच म्हणतो, समोरच्याचीच चूक बघत असतो ना! चूक तर स्वत:चीच आहे, पण त्यांना मी सांगितले की विनम्रता दाखवयाची नाही. त्यांच्याशी वीतराग भावे राहायचे. सक्तीत सुद्धा वीतराग भाव असले पाहिजे.
प्रश्नकर्ता : पण असे राहणे कठीण आहे ना? असे कसे राहू शकतो?
दादाश्री : उत्तम प्रकारे राहू शकतो. आपला दोष नसेल तर नक्कीच राहू शकतो. आपला दोष असेल तर मात्र राहू शकत नाही. मुळात दोष आपलाच असतो. जो दुसऱ्यांवर दोष लादण्याचा प्रयत्न करत असतो त्याचाच दोष असतो. हे तर स्वत:ची सेफसाईड (सुरक्षितता) शोधत बसतात!
हे दुसरे सर्व तर आपलेच प्रतिबिंब आहे. कोणी आपल्याला काही