________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
५९
बक्षिस मिळते. कुणालाही स्वत:चे दोष दिसत नाहीत. आत्मा प्राप्त केल्यानंतर निष्पक्षपाती होतो, म्हणून चुका दिसू लागतात.
हे ज्ञान दिल्यानंतर तुम्ही निष्पक्षपाती झालात म्हणून आत्ता देहाचा पक्षपात तुम्हाला शेजाऱ्याइतकाच राहिला आहे, म्हणून जी चूक असेल ती दिसत राहते. आणि दिसली म्हणजे जाण्याची तयारी करते.
नाही स्पर्शत काही शुद्ध उपयोगीला आता हे ज्ञानच तुम्हाला तुमच्यातील चुका दाखवते. 'चंदुभाऊ' कुणावर संतापले तर 'तुमच्या' लक्षात येते की आहोहो, किती मोठी चूक झाली! अर्थात चुका दिसतात त्याचे नाव आत्मा. निष्पक्षपाती झाला त्याचे नाव आत्मा. जोपर्यंत तुम्ही आत्मा आहात तोपर्यंत दोष स्पर्शत नाही. जर तुम्ही शुद्ध उपयोगात असाल तर तुमच्या हातून एखादे चुकीचे काम झाले तरीही ते तुम्हाला स्पर्शत नाही. शुद्ध उपयोगीला कोणतेही कर्म स्पर्शत नाही. म्हणून आचार्य महाराज आम्हाला विचारतात की, जीवांची अहिंसा पाळण्यासाठी 'आम्ही अनवाणी पायांनी फिरतो, आणि तुम्ही तर गाड्यांमधून फिरता. तुमचे ज्ञान खरे आहे, हे आम्ही कबूल करतो पण तुम्हाला त्याचा दोष लागत नाही का? त्यावर मी म्हणालो 'आम्ही शुद्ध उपयोगी आहोत.'
आरोप लावल्याने थांबते पुढील विज्ञान समोरचा निर्दोष दिसला, तर दोषी कोण दिसेल? प्रश्नकर्ता : ज्याच्याजवळ अज्ञान जास्त असेल त्याला जास्त
दोषी वाटतो.
दादाश्री : हो, समोरची व्यक्ती दोषी वाटते आणि ज्याच्याजवळ ज्ञानच असेल, त्याला समोरची व्यक्ती अजिबात दोषी वाटत नाही.
आता दोषी वाटत नाही पण मग दोष कुणाचा? कुणाचा तरी दोष