________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
ती जागा परत भरुन काढा. आणि त्यावर पाणी शिंपडून जशी होती तशी जमीन करुन द्या. ___म्हणजे हे सर्व लोक जे करतात ना, ते चुकीच्या जागी खोदतात. त्यापेक्षा खोदले नसते आणि कोणाला तरी विचारले असते की, भाऊ माझ्या समस्या सोडवून द्या. माझी सुटका करा, तर कोणीतरी त्याला सोडवेल. जो सुटलेला असेल तो सोडवू शकतो आणि एखादा बांधलेला मनुष्य, जो स्वतःच डुबक्या खात असेल, 'वाचवा' असे म्हणत असेल तर 'मेल्या, तूच वाचवा वाचवा असे ओरडतोस मग मला कसा वाचवशील?
प्रश्नकर्ता : समस्या सोडवण्यासाठी आत्तापर्यंत ज्याला शरण गेलो तिथेच बुडून गेलो, ज्या डॉक्टरचे औषध घेतले त्याने दुखणे वाढवले, कमी केले नाही.
दादाश्री : ते डॉक्टर नीट शिकलेले नव्हते. ते स्वतःच डुबक्या खात होते. आणि जे डॉक्टर असे म्हणत असतील की, 'हो, आम्ही तरुन पार उतरलो आहोत, तू ये.' तेव्हा आपण समजावे की तो स्वत:च सांगत आहे ना!
बाकी, असे कोणीही सांगत नाही की आम्ही तरुन पार उतरलो आहोत. कारण त्यांना माहीत आहे की कधी काही भानगड झाली तर लोक समजून जातील की, हे तर बुडत असताना ओरडत होते. लोक तर ओळखतीलच ना? तुम्ही तर तरलेले आहात मग आता बुडत असताना का ओरडता? असे म्हणतील की नाही लोक? अर्थात तेव्हा चांगले संयोग जुळन आले नव्हते. यावेळी चांगले संयोग जुळून आले आहेत, म्हणून (मोक्षाचे) काम होऊन जाईल.
मग यात प्राप्ती कशी काय होईल? ओहोहो! डोक्यावरचे केस तर मोजता येतील पण यांच्या चुका मात्र मोजता येणार नाहीत.
दररोज पंचवीस चुका जरी लक्षात आल्या तर आश्चर्यकारक शक्ती