________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
उत्पन्न होईल. संसार नडत नाही, खाण्या-पिण्याचे नडत नाही. लोकांना तपानेही बांधले नाही, त्यागानेही बांधले नाही. लोकांना स्वत:च्या चुकांनीच बांधले आहे. आत तर अमर्याद चुका आहेत पण फक्त मोठमोठ्या पंचवीस चुकाच जरी संपवल्या तर सव्वीसावी चूक आपोआप निघून जाईल. कित्येक लोक तर चुकीला ओळखतातही पण तरी स्वतःच्या अहंकारामुळे त्यास चूक म्हणत नाहीत, असे का ? एकच चूक अनंत जन्म बिघडवून टाकते. मग हे कसे परवडणार ? कारण मोक्षाचा नियाणां (आपल्या संपूर्ण पुण्याच्या बदल्यात एकाच गोष्टीची मनोकामना करणे) केला होता. पण तोही पूर्णपणे केला नव्हता, म्हणूनच असे झाले ना! दादांजवळ यावे लागले ना ?
४६
तेव्हा चूक संपवली असे म्हटले जाईल
प्रत्येक जन्मात एक जरी चूक संपवली असती तरीही मोक्ष स्वरुप झाला असता. पण हे तर एक सुद्धा चूक संपवत नाहीत, उलट पाच चुका वाढवून ठेवतात. बाहेर सर्व सुंदर पण आत अपार क्लेश ! यास चूक संपवली असे कसे म्हणता येईल ? तुमचा वरिष्ठ कोणीच नाही. पण चूक दाखविणारा पाहिजे. चुकांना संपवा, पण स्वतःची चूक स्वतःला कशी सापडेल? आणि त्याही काय एक-दोनच आहेत ? अनंत चुका आहेत ! कायेच्या अनंत चुका तर फार मोठ्या दिसतात. कुणाला जेवायला बोलवताना इतके कठोर बोलतात की, त्यांच्या बत्तीस प्रकारच्या पकवान्नांचे आमंत्रण असेल तरीही ते आवडणार नाही. त्यापेक्षा नसते बोलावले तरी बरे झाले असते, असे वाटते. अरे, बोलतो तेव्हा अशी कर्कश वाणी निघते आणि मनाचे तर असंख्य दोष असतात !
चूक काढणारा, आत कोण ?
आपल्या चुका कोण मिटवू शकेल ? तर 'ज्ञानी पुरुष', की जे स्वत:च्या सर्व चुका मिटवून बसले आहेत. जे शरीर असूनही अशरीर भावाने, वीतराग भावाने राहतात. अशरीर भाव म्हणजे ज्ञानबीज. सर्व चुका