________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
मोक्ष होईल. तुमची समजूतच चुकीची आहे. ती जेव्हा अचूक होईल, माझ्याजवळ सत्संगात बसाल तेव्हा निपटारा होईल. जोपर्यंत चूक आहे तोपर्यंत निपटारा कसा होईल? चुका असतील का कोणाच्या?
पुढे काय सांगतात की, तू स्वतः मोक्ष स्वरुप आहेस. तू स्वतः परमात्मा आहे. मात्र अचूक ज्ञान आणि अचूक समजूतीचे भान झाले पाहिजे. ज्ञान कसे असावे? अचूक. आणि समज कशी असली पाहिजे? अचूक. फक्त ज्ञानच असेल तर पपई लागणार नाही. झाड तर पपईचे आहे पण एक सुद्धा पपई लागणार नाही, असे घडते का? तुम्ही बघितला नाही का पपया?
प्रश्नकर्ता : बघितला आहे.
दादाश्री : बघितला आहे ना? अरे मूर्खा, तुला वाढवून मोठे केले तरी तू असा निघालास? पाणी पाजून वाढवले तरीही तू आतून असा निघालास? त्या झाडाला पपई लागतच नाही. ___ तात्पर्य हेच की ज्ञान चूकरहित असले पाहिजे आणि समज चूकरहित असली पाहिजे. आता फक्त ज्ञानच चूक रहित झाले तरीही काही उपयोगाचे नाही. समज जर चूक रहित झाली तरी चालेल. कारण समज ही हार्टपर्यंत पोहचते आणि ज्ञान हे बुद्धीपर्यंत पोहचते.
आजचे जे ज्ञान आहे, म्हणजे लोकांचे जे व्यवहारिक ज्ञान आहे ते बुद्धीपर्यंत पोहोचते आणि समज ही हार्टपर्यंत पोहचते, हार्टवाले ज्ञान थेटपर्यंत पोहोचवते, मोक्षापर्यंत पोहोचवते. त्यास आपले लोक सूझ म्हणतात. ही जी समज आहे, त्यामुळे सूझ उत्पन्न होते आणि सूझ मुळे समज उत्पन्न होते, जी थेटपर्यंत पोहोचवणारी सर्वोत्तम वस्तू आहे.
चुकीमुळे तर हा संसार सुद्धा व्यवस्थित चालत नाही, तर मग चुकीमुळे कधी मोक्ष होऊ शकतो का? ज्ञान आणि समज चूक रहित होईल, म्हणजे जेव्हा तुम्ही जाणाल की ज्ञान तर असे आहे आणि हे तर सर्व अज्ञान आहे, चुकीचे आहे, तेव्हापासूनच ज्ञान प्राप्त होत राहते.