________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दादाश्री : तेव्हा कुणी म्हणेल, साहेब जप-तप करायचे का? तर ज्या दिवशी तुझ्या पोटात अजीर्ण झाले असेल त्या दिवशी उपास कर. जप-तप करण्याची आमची अट नाही. कसेही करुन तुझी समजूत आणि तुझे ज्ञान अचूक कर. यात काय खोटे सांगतात भगवंत? चूक आहे तोपर्यंत कोणी मान्यच करणार नाही ना! अजून तर बऱ्याच चुका आहेत?! मी चंदुलाल आहे, या बाईचा नवरा आहे, पुन्हा असेही म्हणतो की या मुलाचा बाप आहे. कितीतरी चुका! ही तर चुकांची परंपराच आहे. मुळातच चूक. मूळ जी रक्कम आहे, त्यात एक अविनाशी आहे आणि एक विनाशी आहे. आणि अविनाशीबरोबर विनाशीचा गुणाकार करायला जातो, तोपर्यंत तर ती रक्कम उडून जाते. ती विनाशी, रक्कम, मग नवरा नाही पण बाप तर आहे, ही रक्कम ठेवतो तोपर्यंत ती रक्कम उडून जाते. म्हणजे गुणाकार कधीच होत नाही, उत्तर मिळत नाही आणि दिवस बदलत नाही. शुक्रवारच कायम राहतो. शुक्रवार बदलत नाही आणि शनिवार होत नाही. एव्हरी डे फ्रायडे (दररोज शुक्रवार).
भगवंताने काय असे सांगितले आहे की तप करा, जप करा, उपाशी मरा, उपास करा, त्याग करा, असे सांगितले आहे का? तुझे ज्ञान आणि तुझी समज अचूक कर, त्या दिवशी तू स्वतःच मोक्ष स्वरूप आहेस ! जिवंत देहधारीचा मोक्ष!!!
भगवंताची गोष्ट तर सोपीच आहे पण तुम्ही कधी तपास केला की, अचुक ज्ञान आणि अचुक समजूत कशी होऊ शकते? तुम्ही तर असा तपास केला की आज कसला उपास करु किंवा कसला त्याग करु? अरे! भगवंतांने त्यागाची अट कुठे केली आहे? हे तर सर्व चुकीच्यामार्गाने चालू लागले, आडगल्लीत शिरले. भगवंताने काय म्हटले होते की, 'तू ज्ञान आणि समजूत अचूक कर.'
प्रश्नकर्ता : चूक नसलेली अचूक समज, ही गोष्ट पुन्हा समजवा. दादाश्री : हो, जेव्हा तुमची समज अचूक होईल तेव्हा तुमचा